(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • आजची संध्याकाळ माझ्यासाठी खास होती

    मी नमस्कार करून गाडीकडे वळलो. गाडी सुरू करताना सहज म्हणून पाठी पाहिलं. दोघेही हसत होते आणि हात हलवून निरोप देत होते.

  • रविवार

    आताही रविवार येतात पण आवडत नाही कारण या दिवशी आईबाबा मुलांना घेऊन एक तर फिरायला म्हणजे गावाला जाणे. किंवा जे सकाळी जातात ते रात्रीचे जेवण करूनच येतात. घरात कामे नसतात. मुलगी जर जवळपास असेल तर तिच्या कडे पण हेच असेल कदाचित. थोडा फार फरक असेल पण रविवारी येत नाहीत.

  • मानसकोंड – पडझड

    आयुष्यात पडझड केव्हा सुरू होते माहितेय ? ”
    माशाने अचानक विचारले .
    याची अनेक उत्तरे आहेत , पण तुला काय अभिप्रेत आहे , हे मला कसे कळणार ?
    असं त्याला विचारावं , असं वाटलं .

  • आंबेटाकळीची आमराई

    माझे मूळ गाव खामगाव तालुक्यामधील आंबेटाकळी आहे. प्राथमिक शिक्षण गावातच झालेले असून गावाचे वैशिष्ट्ये म्हणजे, नावाप्रमाणे आंबेटाकळी शिवारात आमराई होत्या. त्या लोप पावल्या असल्या तरी आठवणी मात्र कायम आहेत. याविषयी…

  • बेटा-बेटांचं मुंबई बेट (कथा)

    पूर्वी कधीतरी मुंबई सात बेटांची असेल. आज ती बेटं एकमेकांना सांधण्यात आली आहेत. मात्र आज मुंबई नावाच्या शहरात अनेक छोटी-मोठी बेटं तयार झाली आहेत. इथं राहणारा प्रत्येक माणूस एक स्वतंत्र बेटच आहे.

  • त्याचे वेगळेपण

    हा लेख अनघा प्रकाशनच्या दिवाळी २०२३ मधून घेतला आहे.

    मनुष्याचा स्वार्थी स्वभाव काही आजचा नाही तो प्रत्येक युगात स्पष्टपणे दिसत आलेला आहे अगदी रामायण, महाभारत ते सध्याच्या कलियुगापर्यत. कधी- कधी तर असे वाटते की माणूस हा मुळातच एक स्वार्थी प्राणी आहे. इतर प्राण्यात तो स्वार्थीपणा दिसत नाही कारण ते निसर्गाच्या अधीन आहेत. पण माणूस हा असा प्राणी आहे ज्याने नेहमीच निसर्गावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न लाखो वर्षापूर्वीही केला आहे आणि आजही करत आहे. त्याची आज अनेक उदाहरणे समाजात दिसत आहेत.

    त्यातील सर्वात मोठी कुरघोडी म्हणजे लिंगबदल शस्त्रक्रिया… त्याचे समर्थन करताना काही महाभाग महाभारतातील श्रीखंडीचे उदाहरण देतात. पण त्यांना हे कळत नाही. श्रींखडीनी स्त्रीची पुरुष तिच्यात पुरुषाच्या लैंगिक भावना होत्या म्हणून झाली नव्हती तर आपला बदला घेण्यासाठी झालेली होती.

  • नाणे (गूढ कथा)/शतशब्द कथा

    कारीगर वजनी नाणे बनविणे शिकून आले, ब देशाच्या राजाने त्यांना अ देशापेक्षा दुप्पट वजनी नाणे बनविण्याचे आदेश दिले……

  • नागपूर-ढाका-नागपूर – बांगलादेशची साहसी सायकल यात्रा : भाग ४

    आतापर्यंत आपल्या देशात असल्यामुळे कोणीतरी ओळखीचा मिळेल, अशी एक शक्यता होती. मात्र जिथे कोणीच ओळखीचा भेटणार नाही, अशा संपूर्ण अज्ञात, अनोळखी प्रदेशात आम्ही निघालो होतो. कलकत्त्याहून बांगलादेशला न जाताच परत नागपूरला जाण्याची नामुष्की येते की काय? अशा परिस्थितीतून वैध परवाना मिळवून, अर्धी लढाई आपण जिंकल्याचा आनंद आणि अभिमान आम्हाला वाटत होता.

  • दुःख कसे विसरलो

    काय केले दुःख विसरण्याला
    मुक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला ।।धृ।।

    निराशेच्या काळांत
    दुःख होते मनांत
    हार झाली जीवनांत
    शांत राहण्याचा मार्ग, त्यावर शोधला ।।१।।
    मुक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला

    चूक राई एवढे
    दुःखाचा पर्वत पडे
    मनीं पश्चाताप घडे
    भोग भोगण्या, झालो तयार ।।२।।
    मुक्ति जमली नामीं आनंद आणण्याला

    एकाग्र चित्तांत
    जातां ध्यानांत
    डूबता आनंदात
    विसरुन गेलो जगाला ।।३।।
    मुक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला

    सारी ऊर्जा जाई
    ध्यानांत एकरुप होई
    त्यांत ईश्वर पाही
    ऊर्जा शिल्लक न राही, दुःख भावनेला ।।४।।
    मुक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    e-mail- bknagapurkar@gmail.com

  • मी का लिहितो..

    ‘तुम्ही का लिहिता’ हा प्रश्न मला अनेकजण विचारत असतात. मलाही हा प्रश्न बऱ्याचदा पडतो. इतरांना पटो वा न पटो, पण याचं साधं सोपं उत्तर आहे. ते म्हणजे, मला लिहायला आवडतं, हे. परंतू हे एवढंच नाही. तर माझ्याकडे सांगण्यासारखं जे आहे किंवा मला जे प्रश्न पडतात, ते मला कागदावर (आता स्क्रिनवर) मांडायला (आता टायपायला) आवडतं, असा त्याचा पुढचा भाग आहे.