नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
एका सकाळी महेशचा फोन आला व त्यानं डेक्कनवरील हाॅटेल ‘परिचय’मध्ये आम्हाला भेटायला बोलावलं. आम्ही दहा वाजता रुमवर पोहोचलो. महेश भेटला. चर्चा झाली. एवढ्यात त्या रुममध्ये एका धिप्पाड व्यक्तीने प्रवेश केला. आम्ही त्यांच्याकडे पहातच राहिलो. महेशने आमची त्यांच्याशी ओळख करुन दिली, ‘शिवाजी, हे नावडकर बंधू. आपल्या चित्रपटाची पब्लिसिटीचं काम करताहेत.’
February 26, 2022
नारायण भंडारी या नावासह पूर्णतः काल्पनिक . यातील घटना प्रसंगाचा वास्तवाशी कोणताही संबंध नाही , तसा कुणाला आढळला तर तो योगायोग समजावा.
February 5, 2026
बायकोनी बाहेरुन आल्यावर फक्त गरमागरम बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी करुन दोघांनी झुणका भाकरीचा आस्वाद घ्यायचा अस सरप्राइज पँकेज होत. बायको वेळेवर आली, भाकरी केल्या आणि माझ्या आयुष्यातील किचनमधील पहिल्या वहिल्या आविष्काराच्या सांगतेची घटिका समीप आली.
November 18, 2019
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळाने मराठी ग्रंथांच्या अनुवादासाठी प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. अर्थात, राज्याच्या सांस्कृतिक धोरणाचा एक भाग म्हणून ही महत्त्वाकांक्षी योजना पूर्ण करण्याचे निर्देश शासनाने मंडळास दिले आहेत. त्यानुसार, ‘मराठीतील उत्तम साहित्यकृती अन्य भारतीय भाषांमध्ये विशेषतः हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये अनुवादित होण्यासाठी उपक्रम राबविले जातील.
December 31, 2023
रायगड जिल्ह्यातील कर्जतजवळील जांभिवली हे माझ्या वाडवडिलांचे गाव. मला कळायला लागल्यापासूनच्या जास्त आठवणी या गावाशी निगडित आहेत.
March 25, 2026
त्या वेळी फक्त दूरदर्शन होते. तेही जेमतेम चार तास. त्यामुळे आज दिसणारी इतर मराठी आणि हिंदी चॅनेल्स आणि त्यावर होणाऱ्या झी सारेगमप आणि इंडियन आयडॉलसारख्या संगीत स्पर्धा त्यावेळी अस्तित्वातच नव्हत्या. आज या गोष्टीचे आश्चर्य वाटेल कदाचित. पण १९८० साली ही वस्तुस्थिती होती. त्यामुळे संगीतामध्ये पुढे येण्यासाठी धडपडणाऱ्या माझ्यासारख्या मुलामुलींना आंतरमहाविद्यालयीन गायन स्पर्धा हाच पर्याय उपलब्ध होता. सायन मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असलेल्या डॉ. महादेव भिडे आणि डॉ. मुकुल आचार्य या माझ्या मित्रांनी त्या कॉलेजमध्ये आयोजित होणाऱ्या अश्वमेध या स्पर्धेबद्दल सांगितले आणि त्या स्पर्धेत मी भाग घ्यावा असा आग्रहही केला. आमच्या कॉलेजतर्फे मी या स्पर्धेत गाण्यासाठी गेलो. ही स्पर्धा माझ्या पुढील आयुष्यात किती मोठे परिवर्तन आणणार आहे याची पुसटशी कल्पनादेखील त्यावेळी मला नव्हती. स्पर्धा बरीच मोठी होती. जवळजवळ 142 गायक-गायिका या स्पर्धेत गाण्यासाठी आले होते. या स्पर्धे चे एक परीक्षक होते संगीतकार श्रीकांत ठाकरे. सुप्रसिद्ध गायिका शोभाताई गुर्टू यांनी त्यांच्या गायलेल्या 'उघड्या पुन्हा जहाल्या जखमा उरातल्या' 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' यासारख्या गझलांचा मी फॅन होतो. त्या आणि सुमारास सौ. मानसी कणेकर या गायिका गझल शिकवण्यासाठी माझ्या घरी येत असत. श्रीकांतजींना परीक्षक म्हणून पाहिल्यावर मी या स्पर्धेत एक गझल गाण्याचा धाडसी निर्णय घेतला. स्पर्धा सकाळी 9.30 वाजता सुरू झाली. माझा गाण्याचा क्रम दुपारी सुमारे 12 वाजता लागला. मी रंगमंचावर गाण्यासाठी बसलो. गझलच्या सुरवातीला दोन ओळींचा एक शेर पेश केला आणि आता गझल सुरू करणार तोच सभागृहातील वीज गेली. त्यामुळे दिवे आणि मुख्यतः साऊंड सिस्टिम बंद पडली. दोन मिनीटे मी स्टेजवरच बसून राहिलो. इतक्यात तो बंद पडलेला वीजपुरवठा परत सुरू झाला आणि परीक्षकांनी मला पुन्हा गाण्याची खूण केली. मधल्या दोन मिनिटात मी त्या शेरची वेगळी चाल मनात बांधून ठेवली होती. तेव्हा पुन्हा संधी मिळताच मी त्या सुरवातीच्या शेरच्या दोन ओळी निराळ्या चालीत पेश केल्या आणि गझलला सुरवात केली. आयत्या वेळच्या माझ्या प्रयोगामुळे मला भरपूर टाळ्या मिळाल्या आणि मी आनंदात गझल पूर्ण करून रंगमंचावरून उतरलो. स्पर्धा पूर्ण झाल्यावर निकाल जाहीर करण्यासाठी श्रीकांत ठाकरे रंगमंचावर आले. मला बक्षीस मिळणार अशी मला आशा होती. एकूण पाच बक्षिसे होती. ठाकरेसाहेबांनी शेवटून नावे जाहीर करायला सुरुवात केली. पाच-चार-तीन-दोन. नावे जाहीर झाली. पण मला बक्षीस नव्हते. हार्मोनियमची साथ करणाऱ्या विवेक दातारकडे मी प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले. तोच श्रीकांतजीचे शब्द माझ्या कानावर पडले. 'या स्पर्धेच्या पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मी त्या मुलाला देत आहे, ज्याने आयत्यावेळी गाण्यात खंड पडल्यावरही त्याचा फायदा घेऊन गझलच्या आधीचा शेर निराळ्या चालीत सादर केला. अनिरुद्ध जोशी.' मला अतिशय आनंद झाला. आज माझ्या आवडत्या आणि नावाजलेल्या संगीतकारांच्या हस्ते मला पारितोषिक मिळणार होते. श्रीकांतजींनी माझे अभिनंदन केले. माझी विचारपूसही केली आणि त्यांच्या घरी गाणे ऐकवण्यासाठी येण्याचे निमंत्रण दिले. हे त्यांचे निमंत्रण माझे आजचे सगळ्यात मोठे पारितोषिक होते.
- अनिरुद्ध जोशी
June 30, 2022

देसाईआजोबांनी जोऱ्यात फोन आपटला . रागानी ते अगदी हिरवे पिवळे पडले होते , टकलाला घाम आला होता , त्यांनी हाताशीच असलेल्या टॉवेलनी टकालाचा घाम पुसल्यावर टकलाला आधीच्या पेक्षा जास्त केस चिकटलेले वाटले तेंव्हा लक्षात आले कि तो त्यांच्या मनीचा बसायचा टॉवेल होता .
January 19, 2024
समुद्रावरचे आल्हाददायक वारे अंगावर घेत तेनाली रामचा मित्र स्वत:शीच विचार करीत झोपाळ्यावर पहुडला होता. तेनालीरामने त्याला विचारले, “मित्रा कसला विचार करतोस?” तेव्हा तेनालीरामच्या मित्राबरोबर त्याचा संवाद सुरू झाला.
December 20, 2023
पाणी अंगावर उसळत होते . पण कमी भिजण्याचा नादात… पार एकत्र झालो होतो.
September 10, 2021
व्यापता न येणारं अस्तित्व आणि मोजता न येणारं प्रेम म्हणजे आई. तिच्या निर्व्याज प्रेमाची परतफेड करणे अशक्यच आहे. आपल्या आधी तिचा दिवस चालू होतो. सर्वांच्या आवडी निवडी, कामाच्या वेळा, लहान-मोठ्यांची काळजी आणि घर सांभाळताना स्वत:ला ती पूर्णपणे विसरते.
August 26, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti