(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • मला माहीत आहे

    मी आणि ती ‘ हल्ली अनेकांना आवडत आहे , अर्थात कारण मला ती आवडते .

  • पाऊस

    मंडळी , पहाटेचे ४.३० वाजलेले, सिंहगडाच्या पायथ्याशी कोंढणपूर नामक एका गावात निर्मिती फार्म्च्या खोलीत बसून खिडकीतून बाहेर अविरत बरसणारा पाऊस अाणि रातकिड्यांची किरकिर..... कधी कधी असा एकांत अापल्याला अंतर्मुख करून जातो......अख्खा जन्म पुरणार नाहि इतकं निसर्ग सौंदर्य अापल्या अाजूबाजूला असतं , पण निव्वळ ऐहिक सुखाच्या मागे लागून अापण असे क्षण जगायचंच विसरून जातो.....बघा कधीतरी असं पहाटेचं शांत बसून.....निसर्ग खूप काहि शिकवून जातो अाणि निसर्गापुढे अापण किती खुजे अाहोत याची जाणीव करून देणार्‍या विधात्यासमोर अापण अापोअाप नतमस्तक होतो !

    इथे माझी कल्पनाशक्ति संपली मित्र—मैत्रिणिंनो.....जे अाणि जसं सुचलं तसं पाठवतोय.....बघा अावडतंय का.....

    कधी बरसतो धो धो पाऊस
    मरगळ जाते दूर निघून
    कधी परंतू अखंड रिपरिप
    दूरदेशीची ती येई समीप

    कधी अचानक झोडपतो मग
    जशी अाठवण तुझी नी...तगमग
    निरभ्र सारे अासमंत मग
    अवतरते बघ थंडी होऊन

    कळकटलेल्या किटलीमधला
    घोट चहाचा अमृत होतो
    शब्दहि येती अवचित ओठी
    कॅनव्हास मग.....जिवंत होतो!

    श्रेय कुणाचे , मिळते कोणा ?
    निसर्ग असतो थोर गुरु
    बांधून इमले शब्दांचे मग
    कुणीही लागतो कविता करू

    जलबिंदूंचा खारट साठा...
    डोळ्यांमधूनी अवतरतो
    अखंड उरतो तुझाच अाठव
    तूमय तन्मय ..... उदय उरतो......

    उदय गंगाधर सप्रेम—ठाणे
    २ जुलै २०१७..०५.२०वा.

  • शाश्वत जगी काय आहे

    सुमंत जयंत परचुरे. 

    याने माझा विश्वासघात केला, याने मला फसवलं, ही व्यक्ती विश्वास ठेवण्या लायक नाही, अशा अनेक वाक्यांना आपल्या आयुष्यात केव्हां ना केव्हां स्थान मिळतेच. जगण्याचे रहाटगाडगे बदलत नाही

  • किती कोण हा मोठा पंडित (सुमंत उवाच – १७)

    सुमंत जयंत परचुरे. 

    मला किती कळतं किंवा मलाच सारं कळतं या भावनेच्या पोटी जर एखाद्या विषयातील व्यक्ती राहू लागला तर हा समाज त्याच्या तोंडावर चांगलं तर पाठीमागे वाईट बोलू लागतो.

  • ख’वट सावित्री

    वर्षातून एकदाच येणारा, माझा ‘वट पौर्णिमेचा सण’ या तमाम मराठी मालिकावाल्यांनी, त्यांच्या कथानकातील ‘कट कारस्थानां’नी उधळून लावलाय.. पूर्वी साधंसुधं ‘दूरदर्शन’ असताना वट सावित्रीच्या व्रत वैकल्याचे, या दिवशी गोडवे गायले जायचे. या दिवसाचं निमित्त साधून वट पौर्णिमेचं एखादं गाणं किंवा प्रसंग असलेला मराठी चित्रपट आवर्जून दाखवले जायचे. त्याकाळातील सुलोचना, आशा काळे, इंदुमती पैंगणकर, उमा भेंडे, अलका कुबल, इ. सोज्वळ नायिका, मला प्रसन्न करण्यासाठी वडाच्या झाडाला धागा गुंडाळत, भक्तीभावाने सुमधुर गाणी म्हणायच्या..मला अगदी कृतकृत्य वाटायचं..

  • भारताचे ‘साहित्यिक’ पंतप्रधान

    राजकारण आणि साहित्य ही खरंतर दोन विरुद्ध टोकं असं आपल्याला वाटतं. साहित्य संमेलनात राजकारण्यांचा वावर हा दरवर्षी चघळला जाणारा विषय. पण आचार्य अत्रे, ग दि माडगूळकर यासारख्या काही प्रतिथयश साहित्यिकांनी राजकारणातही त्यांची चमक दाखवली आणि यशवंतराव चव्हाणांसारख्या काही राजकारण्यांनी साहित्य क्षेत्रातही ! सावरकर तर दोन्ही क्षेत्रातले स्टार व्यक्तिमत्त्व.

    साहित्याची विशेष जाण आणि साहित्यात यशस्वी वाटचाल करणारे काही पंतप्रधान आपल्याकडे होऊन गेले.

    स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी प्रामुख्याने आत्मचरित्र आणि इतिहास यावर लेखन केले.

    पं. नेहरु ब्रिटिशांच्या तुरुंगात कारावास भोगत असताना त्यांनी कोठडीतून आपल्या कन्येला – इंदिराला - आपल्या भावना आणि विचार मोकळे करणारी विविध पत्रे लिहिली. तीच पुढे संग्रहित होऊन त्यांचे सुरेख पुस्तक तयार झाले.

    पं. नेहरुंकडे अंगभूत लेखनकला होती. मात्र त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांसाठी अन्य लोकांचे साहाय्य नेहरूंना घ्यावे लागले. Glimpses of World History हा पं. नेहरूंचा इतिहास ग्रंथ जगभर चर्चिला गेला. त्यांच्याचबरोबर कारावासात शिक्षा भोगणाऱ्या अब्दुल कलाम आझाद यांची तो लिहिण्याकरता बहुमोल मदत झाली. आझाद यांना इतिहासाचे सखोल ज्ञान होते. त्यांनी पं. नेहरूंना वेळोवेळी मूल्यवान ऐतिहासिक घटनांचे संदर्भ पुरवले.

    पं. नेहरुंशी तुलना करता लाल बहादूर शास्त्री आणि मोरारजी देसाई हे वृत्तीने थोडे कोरडे पंतप्रधान. त्यातल्या मोरारजींचा लौकिक रसहीन माणूस म्हणून होता. तरीही त्यांनी तीन खंडात आपले आत्मचरित्र लिहिले.

    पी. व्ही नरसिंहराव हे बुद्धिवंत. त्यांनी अंधश्रद्धांवर वेळोवेळी प्रहार केले. The Insider हे त्यांचे आत्मचरित्र बरेच गाजले. बाबरी मशिद प्रकरणावर त्यांनी "Ayodha – 6 December 1992" हे पुस्तक लिहिले. त्यांनी तेलगूमध्येही बरेच लेखन केले.

    अटलबिहारी वाजपेयी प्रतिभावान नेते तर होतेच पण उत्तम वक्तेही होते. त्यांच्या अंगी असलेल्या प्रतिभेला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली. त्यांनी केलेली भाषणेही काव्यात्मक असायची. मेरी इक्यावन कविताऍं, क्या खोया, क्या पाया यासारखे काव्यसंग्रह, मेरी संसदीय यात्रा, गठबंधन की राजनीति ही पुस्तके गाजली.

    इंद्रकुमार गुजराल यांची गणना राजकारणातील एक सुसंस्कृत व्यक्ती म्हणून केली जाते. कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे ही सुसंस्कृतता त्यांना चिकटून आली असावी. परंतु त्यांचे आत्मचरित्र हे विशेष चमकदार ठरले नाही.

    इंदिरा आणि राजीव गांधी ही दोघेही अनुक्रमे ऑक्सफर्ड आणि केंब्रिजचे विद्यार्थी. तरीही ते पुस्तक वगैरे लिहिण्यासाठी लेखणी उचलण्याच्या भानगडीत पडले नाहीत. मात्र त्यांच्यावर बरीच पुस्तके लिहिली गेली.

    मनमोहन सिंग यांच्याकडे अर्थ विषयाची डॉक्टरेट आहे. ते पुस्तकी विद्वान आहेत. मात्र स्वतंत्रपणे काही लिहिण्याचा त्यांना वकूब नाही. त्यांना काव्यात रस आहे. परंतु त्यांची आवड इक्बाल या उर्दू कवीपुरतीच मर्यादित आहे. त्यांचे सर्व लिखाण हे अकॅडेमिक (पुस्तकी) स्वरूपाचे आहे आणि तेही त्यांनी भारताचे अर्थमंत्री होण्यापूर्वी म्हणजे वीसेक वर्षापूर्वीचे आहे.

    सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन पुस्तके लिहिली आहेत आणि एक अनुवादित केले आहे. त्यांचे पहिले पुस्तक 'संघर्ष मा गुजरात' (गुजरातचा लढा) फार कमी लोकांनी वाचले आहे. हे त्यांनी आणिबाणीच्या काळात म्हणजे, ते आपल्या वयाच्या विशीत असताना, लिहिले आहे. त्यांची बाकी तीनही पुस्तके ही तशी स्वारस्यपूर्ण आहेत. त्यापैकी एक म्हणजे 'पत्ररूप श्री गुरुश्री'. माजी सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या पत्रांचा हा अनुवाद आहे.

    दुसरे पुस्तक म्हणजे एक कवितासंग्रह आहे. संग्रहाचे नाव आहे 'आँख आ धन्य छे!'

    तिसरे पुस्तक पहिल्या दोन पुस्तकांपेक्षा उजवे आहे. ते चरित्रवजा आहे. स्वतः मोदींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील ज्या ज्या नेत्यांनी, त्यांच्या हाताखाली काम करीत असताना स्फूर्ती दिली, त्यांची रेखाटने या पुस्तकात आली आहेत.

    हा होता आपल्या काही पंतप्रधानांचा साहित्यिक आढावा.

    – निनाद अरविंद प्रधान

  • पद्य आणि मृत्युविचार : भाग-४/११

    आधुनिक जपानी संस्कृतीवर निश्चितच ‘हिरोशिमा-नागासाकी’चा परिणाम झाला असणारच, आणि तो काव्यात उमटलेला असणारच. त्यामुळे, हल्लीच्या जपानी काव्यात  मृत्यूचा उल्लेख येणें अटळ आहे. जपानीत मृत्यूकाव्याला ‘जिसेई’ ( Jisei ) म्हणतात, व अशा काव्याच्या बर्‍याच anthologies जपानीत आहेत.

  • भाऊबीजेचा डब्बा

    आगरीकोळी समाजात हुंडा देत नाहीत आणि घेत नाहीत ही परंपरा आहे. आताच्या जमान्यात भाऊ बहिणीला हिस्सा द्यायला मागत नाहीत आणि बहिणी पण सोडायला मागत नाहीत.
    पण काही बहिणींची माया अशी आहे की त्या अजूनही काय दिलं किंवा काय मिळणार असं मनात येऊ न देता लाडक्या भावाची माहेरी जाण्यासाठी आतुरतेने वाट बघत असतात.

  • अजब न्याय नियतीचा – भाग १८

    त्या दिवशी exactly काय घडलं ते आरू सांगत होती. “14 तारखेला आम्ही तिघं खरंतर गढी बघायला जाणार होतो. तोपर्यंत दीने गढीविषयी आम्हाला काहीच माहिती दिली नव्हती. आपण गढी पहायला गेलो की माहिती सांगेन असं ती म्हणाली. परवा आपण देवळात गेलो तेव्हा तू विचारलंस म्हणून दीने आपल्याला गढीची माहिती सांगितली.

  • रस्त्याचं दुखणं

    औरंगाबाद जळगांव रस्ता खराब आहे, हे समजायला मोठ्या हाॅस्पीटलमधे जाऊन पैसे खर्च करून घ्यावे लागतात, ही झालेली प्रगती काय कमी आहे ?