(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • ताज हॉटेल’ ची कथा

    १६ ऑक्टोबर १९०३ रोजी अरबी समुद्राच्या साक्षीने पहिले हॉटेल ताज मुंबापुरीत उभे राहिले. काही ब्रॅण्ड स्वप्न असतात. केवळ ब्रॅण्डकर्त्यांचं नाही तर वापरकर्त्यांचंही. अमुक ब्रॅण्ड एकदा तरी वापरता यावा यासाठी काही जण प्रयत्नशील असतात; पण ब्रॅण्डनेम इतकं मोठं, की त्यातले केवळ मोजकेच यशस्वी होतात. भारतीय हॉटेल समूहातील असा स्वप्नवत ब्रॅण्ड म्हणजे ताज. जे कामानिमित्त वा स्वखर्चाने इथे वारंवार, क्वचित किंवा अगदी एकदा जातात त्या सर्वासकट जे कधीच इथे जाऊ शकलेले नाहीत त्या सर्वानाच या ताजचं आकर्षण आहे.

    टाटा ग्रुपचे संस्थापक जमशेटजी टाटा यांनी इंडियन हॉटेल कंपनीची (आयएचसीएल) स्थापना १८९९ मध्ये केली. त्यादरम्यान भारतात पाश्चिमात्य धर्तीवर पंचतारांकित हॉटेल उभारण्याचा त्यांचा मानस होता. यामागे अनेक दंतकथा सांगितल्या जातात. त्यातील एक अशी की, मुंबईत त्या वेळी अनेक अशी हॉटेल्स होती जी फक्त युरोपीयन मंडळींसाठी मर्यादित असत. त्यापैकी एक असलेल्या वॅटसन हॉटेलमध्ये जमशेटजींना भारतीय असल्याने वंशभेदाचा अनुभव आला. त्यामुळे स्वदेशी पंचतारांकित हॉटेलची कल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणायचं ठरवलं. काहींच्या म्हणण्यानुसार टाटांच्या काही मित्रमंडळींनी मुंबईतील तत्कालीन हॉटेलविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांनी ताजच्या उभारणीचा निश्चय केला. या कहाण्यांपेक्षा लोवाट फ्रेझर या टाटा समूहाशी जवळचे संबंध असणाऱ्या जमशेटजीच्या मित्राचं कथन अधिक पटतं. त्यांच्या मते ही संकल्पना जमशेटजींच्या मनात अनेक वर्ष घोळत होती. त्यावर त्यांनी अभ्यासही केला होता. मालकी हक्क वा उत्पन्नाच्या साधनापेक्षा पर्यटनदृष्टय़ा लोकांनी भारत पाहायला यावं, मुंबईच्या सौंदर्यात भर घालेल अशी आलिशान वास्तू निर्माण व्हावी, हा उद्देश जमशेटजींच्या मनात होता. १६ ऑक्टोबर १९०३ रोजी अरबी समुद्राच्या साक्षीने पहिले हॉटेल ताज मुंबापुरीत उभे राहिले. स्वत: जमशेटजींनी लंडन, पॅरिस, बर्लिन, डुसेलडॉर्फ इथून सामान, फर्निचर, अंतर्गत सजावटीच्या कलात्मक वस्तू आणवल्या. हॉटेल ताज मुंबापुरीचा सरताज ठरलं. तेव्हापासून ताज हॉटेलची साखळी भारतभर पसरत गेली.

    भारतातील पहिलं आंतरराष्ट्रीय बीच रिसॉर्ट गोवा फोर्ट अग्वादा इथं सुरू केलं, ते १९७४ मध्ये ताज हॉटेल समूहानेच. हिप्पी पर्यटकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गोव्याचे परदेशी पर्यटकांसाठी आदर्श ठिकाण असे रूपांतर होण्यात या हॉटेल समूहाचा वाटा मोठा आहे. त्यानंतर याच समूहाने अनेक राजवाडे हॉटेलमध्ये रूपांतरित केले. उदयपूर लेक पॅलेस त्यातील पहिला राजवाडा ठरला. भारतीय संस्कृतीला आंतरराष्ट्रीय मान्यतांचा पंचतारांकित साज चढवत ताज हॉटेल समूहाने एकेक शिखर सर केलं.

    भारतीय राष्ट्रीय उद्यानातील ताज सफारी असो, ताज विवांता, ताज एक्झॉटिका या साऱ्या हॉटेल्सनी देशीपरदेशी मंडळींना पंचतारांकित अनुभव देण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. आज या समूहाच्या हॉटेल्सनी शंभरी गाठली आहे. त्यातील ८४ हॉटेल्स भारतभरात सेवा देतात, तर अमेरिका, लंडन, दक्षिण आफ्रिका, मालदीव, नेपाळ अशा विविध १६ देशांत ताज हॉटेलने आपला झेंडा रोवला आहे. २०१० मध्ये ताज हॉटेल कर्मचारी संख्या १३,००० इतकी होती.

    २००८ च्या अतिरेकी हल्ल्याने मुंबईसोबत सारं जग हादरलं; पण हॉटेल ताजवरील हल्ला काळजावर ओरखडा उमटवणारा होता. अतिरेक्यांनी या वास्तूची निवडच भारतीयांच्या गौरवावर घाला घालण्यासाठी केली होती. २०१० मध्ये या हल्ल्याच्या खुणा तशाच जपत पूर्वीच्या तोऱ्याने ताज पुन्हा उभे राहिले तेव्हा प्रत्येक मुंबईकर, प्रत्येक भारतीय भरून पावला. या ब्रॅण्डची गंमत हीच की, त्याचा अनुभव घेणारे फार कमी; पण अनुभव न घेताही या ब्रॅण्डकडे आशेने, कुतूहलाने, अभिमानाने, मीसुद्धा एकदा इथे पोहोचेन या निश्चयाने पाहणारे जास्त. भारतीयांसाठी हा हॉटेल ब्रॅण्ड सोनेरी दुनियेसारखा आहे.

    संकलन: संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • शॉक

    साला वैताग आहे ! आज पुन्हा निर्मलेने कडकड केली ! आमच्या लग्नाला आता या चोवीस मेला पाच वर्ष होतील .अजून तिच्या स्वभावात काही फरक पडत नाही . तशी ती भांडकुदळ नाही , पण भडक माथ्याची मात्र आहे . कधी कधी फारच लावून धरते , लहान मुलांसारखं . हल्ली तिला भडकायला कसलंही कारण चालत , इतकंच काय ती विनाकारण पण भडकते !पण मला त्याचे खरे कारण माहित आहे ! माझी आई ! आई माझ्या सोबत रहाते , ते तिला नको आहे ! आता मला सांगा , या उतार वयात तिने कोठे जावे आणि का ? डोळे ,कान आदू झालेत , चकरा येतात , बी. पी. ,डायबिटीज सारखे जन्माचे सोबती आहेत ! येथे शहरात डॉक्टर दवाखाना हाकेच्या अंतरावर आहेत . मी निर्मलला परोपरीने सांगून पहिले . पण समजून घेत नाही .

  • सुई-दोरा

    खेड्यामध्ये अजूनही दुपारच्या वेळी चार बायका एकत्र येऊन वापरुन झालेले कपडे, साड्या जोडून वाकळा, गोधड्या तयार करतात. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या कपड्यांपासून तयार झालेले ते एक प्रकारचे नात्यांचे ‘फ्युजन’च असते.. ज्याला घडविणारा असतो तो.. सुई-दोरा!

  • भारताची राष्ट्रीय प्रतीके

    National-Symbols-of-India-300‘ओळख राष्ट्रीय प्रतीकांची’ या पुस्तकात लेखक मंगेश विठ्ठल कोळी या लेखकाने संकलित केलेल्या राष्ट्रीय प्रतीकांच्या बारीक सारीक तपशिलासह वर्णन केलेल्या प्रतीकांचे वाचन करतांना एक वेगळाच आनंद मिळतो. मुळात भारतभूमीबद्दल अपार प्रेम असणारी आपण भारतीय मंडळी, देश व देशातल्या गोष्टींचे वर्णन लिहिताना वा वाचतांना आपणाला एक प्रकारचे स्फुरण चढते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्यांत आपल्या मातृभूमितील मातृभूमीची ‘अस्मिता’ वैशिष्टये ठरणा-या महत्वपूर्ण गोष्टींचे महत्वपूर्ण संकलन वाचतांना खरोखरीच आनंदाला मोहोर येतो. मग ते आंबा या राष्ट्रीय फळांचे वर्णन असो वा कमळ या फुलाचे किंवा वटवृक्षाचे.

    राष्ट्रध्वज-तिरंगा, राष्ट्रीय भाषा-हिंदी, टागोरांचे जनगणमन वा बंकिमचंद्राचे वंदेमातरम. राष्ट्रीय खेळ-हॉकी, राष्ट्रीय प्राणी-वाघ, याच बरोबर गंगा, रुपया, अशोक स्तंभ. देवनागरी राष्ट्रीय लिपी, सत्यमेव जयते हे घोषवाक्य इत्यादी गोष्टी नित्यपरिचयाच्या व नेहमी ओठावर असल्यातरी त्याबद्दलची तपशीलवार माहिती फारच थोडयांना असते. पण वरील सर्व गोष्टींवर आपण अपार प्रेम करीत असल्यामुळे त्यांच्या बद्दलची इत्यंभूत माहिती वाचतांना खरोखरच ‘अलिबाबाची गुहा’ सापडल्याचा आनंद आपणाला होतो.

    कथा - कादंब-या अफाट झाल्या, विपुल काव्य निर्मिती झाली मात्र ज्या गोष्टींची माहिती प्रत्येक भारतीयाला असलीच पाहिजे असे साहित्य किती निर्माण झाले आहे? या दृष्टीकोनातून विचार करता लेखक मंगेश विठ्ठल कोळी यांनी ‘ओळख राष्ट्रीय प्रतीकांची’ या विषयावर संकलन करून एक फार मोठी पोकळी भरून काढून एक मोलाची साहित्यकृती निर्माण केली आहे असं मी म्हणेन.

    बरेचदा आपण पाहतो, वाचतो, ऐकून घेतो, विसरतो पण ‘ओळख राष्ट्रीय प्रतीकांची’ हे पुस्तक त्या पलीकडचा ठरणार आहे. कारण एकदा का आपण हे वर्णन वाचल की ते कोणत्याही प्रकारानं विसरलं जाणार नाही याची मला शंभर टक्के खात्री वाटते. विद्यार्थी, शिक्षक, वक्ते, राजधुरीण या सर्वासर्वांना हा विशेषांक अत्यंत उपयुक्त ठरेल म्हणून ‘ज्ञानाचा दीपस्तंभ’ असं वर्णन या संकलनाचं केल्यास अतिशोयक्ती ठरणार नाही. या लेखक मंगेश विठ्ठल कोळी यांच्या हातून अशीच अधिकाधिक मौलिक साहित्य सेवा घडो असा शुभाशीर्वाद देतो.

    मला खात्री आहे की, ‘ओळख राष्ट्रीय प्रतीकांची’ हे पुस्तक वाचक, विद्यार्थी, शिक्षक, पालक या सर्वांना नक्कीच आवडेल व त्यांच्या ज्ञानात भर घालणारा ठरेल. तसेच विविध स्पर्धा परीक्षा देणा-या स्पर्धकांना सुद्धा या पुस्तकाची मोलाची मदत झाल्याशिवाय राहणार नाही असे मला वाटते.

    बी. बी. गुरव (09421287107)
    (ज्येष्ठ साहित्यिक - समीक्षक व माजी प्राचार्य)

    ओळख राष्ट्रीय प्रतीकांची
    • संपादक - मंगेश विठ्ठल कोळी
    • पृष्ठे - 117
    • प्रकाशक - डॉ. सुनील दादा पाटील
    • प्रकाशन - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर
    • संपर्क - 02322 - 225500, 09975873569
    • ईमेल - sunildadapatil@gmail.com
    • ईबुक - http://www.readwhere.com/read/933659/Olakh-Rashtriya-Pratikanchi-
    • फ्लिप बुक - http://fliphtml5.com/fkws/gxan

  • उडणाऱ्या हत्तीची गोष्ट

    कुणी एकेकाळी हत्तीला चार पंख होते. जसा सकाळी कोंबडा बांग देतो
    तसेच हत्ती पण देत होते. असंही म्हणतात की हत्तीवर बसून देव विश्वफेरीला
    निघत असत. परंतु जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली आणि लोकांची वस्ती वाढली
    तेव्हा नवनवीन अडचणी निर्माण होऊ लागल्या. आकाशात उडता उडता
    थकवा आला की हत्ती घरांच्या छतावर येऊन बसत; त्यामुळे त्यांच्या वजनामुळे घरे पडायला लागली. काही माणसं मेली.

  • हितसंबंध आणि कर्तव्य

    वर्षापूर्वीची गोष्ट. आर्थिक व्यवहारात फसल्याने माझ्या एका मित्राला कोर्टाचा दरवाजा खटखटावा लागला. `खरे तर कोर्टाची पायरी नको रे बाबा' हे सगळ्याच सामान्य माणसांचे सूत्र. तर हे महाशय कोर्टात गेले. न वटलेल्या चेकची ती केस. अर्थातच फौजदारी. प्रतिपक्षही काही कमी नव्हता. त्यांनी माझ्या मित्रावर फसवणुकीचीच फिर्याद ठोकली. `एक तर कोर्टाची पायरी चढू नये; अन्यथा सर्व काय ते सहन करावे.' हे सांगण्यासाठी सोपे आहे; पण प्रत्यक्षात अशा प्रसंगाने काय होते, याचा अनुभव मी या माझ्या मित्राबरोबर घेतला. आपण फसवणूक केलेली नसताना आपल्यावर आरोप? आपले पैसे अडकलेले असताना हा मनस्ताप? या आणि अशा प्रश्नांनी मित्राचे सारे कुटुंबच अस्वस्थ झालेले. आता काय करावे? काय करायला हवे? आपल्याला कोण, कसे प्रश्न विचारतील? लोक काय म्हणतील? समाजातल्या माणसांचा माझ्याबद्दल काय ग्रह होईल? कोणता वकील द्यावा? की दोन द्यावेत? आपल्याला जो ताण येतो तो वकिलांना नाही का? ते पैसे घेऊन मोकळे? असे अनेक प्रश्न सर्वच अस्वस्थ करणारे, ताण वाढविणारे, झोप उडविणारे...त्या घटनेनंतरची ही गोष्ट. न्यायालयीन कामासाठी मी विदर्भात गेलो होतो. प्रकरण फौजदारी होते. कोर्टाने कळवूनही मी हजर राहू शकलो नव्हतो. आता हजर राहणे आवश्यकच होते. वॉरंट काढले गेले होते. हजर राहून ते रद्द करून घेणे आवश्यक होते. पुढील तारखांना हजर न राहण्याची परवानगीही मिळवायची होती. प्रकरण फौजदारी आणि वेळ अटक होण्यापर्यंत आलेली; पण माझ्या मनात तणावही नव्हता किंवा अस्वस्थताही! न्यायालयाचे काम सुरू असताना आणखी एक लक्षात आले, की आणखी एका फौजदारी प्रकरणातही मी `वॉन्टेड' होतो. त्याचे समन्स आजच बजावले जाण्याची शक्यता होती. तसे ते झालेही. त्याचा स्वाभाविक अर्थ होता तो तातडीने जामीन घेणे, तो नसेल, तर रोख रकमेची हमी घेणे, वगैरे.

    अखेर कोर्टातील माझी दोन्ही कामे आटोपली. जामीन मिळाला आणि अन्य तारखांना अनुपस्थित राहण्याची संमतीही. न्यायालयात येतानाही मी तणावरहित होतो आणि जातानाही. प्रवासात एकच विचार येत होता. मित्राच्या प्रकरणात मित्रच नव्हे, तर त्याचे सारे कुटुंब अस्वस्थ होते. काही काळ का होईना, मीही अस्वस्थ होतो. मग या आपल्या प्रकरणात ती अस्वस्थता, तो तणाव का येऊ नये? तो का नसावा? उत्तरेही पटापट येत होती. हे न्यायालयीन प्रकरण माझ्या कार्यालयीन कामाचा, कर्तव्याचा एक भाग होता. त्यात काहीही झाले, तरी त्याचा माझ्यावर परिणाम होणार नव्हता. या प्रकरणात जो शारीरिक त्रास अपेक्षित असतो, त्याबद्दलही अस्वस्थता नव्हती, तोही तुमच्या कर्तव्यपालनाचा भाग असतो. त्यात स्वार्थ किंवा हितसंबंध नाहीत आणि स्वाभाविकपणे त्याच्या वेदना, अस्वस्थताही नाही. या उलट मित्राच्या प्रकरणामध्ये मात्र हा तणाव, यातना, अस्वस्थता होती. मित्राला ती असणे हे स्वाभाविक होते; कारण त्याची मोठी रक्कम अडकलेली होती. ती मिळेल ना? त्रासाशिवाय मिळेल का? आणखी काही गुंतागुंत होईल का? या त्याच्या चिंता व्यक्तिगत हितसंबंधातून निर्माण झालेल्या होत्या. याच स्थितीत वर्तमानाचा स्वीकार केला, तर या यातनांचा प्रभाव, परिणाम आणि कालावधी कमी होण्याची किंवा या यातनाच न होण्याचीही शक्यता असते. अर्थात, त्यासाठी तुमची अवस्था जीवनमुक्त असायला हवी. त्या अवस्थेत राहतो तो केवळ आनंद आणि निखळ आनंद. आपले काय अन् किती पणाला लागले आहे? त्यासाठी किती किंमत मोजायची आणि त्यासाठीचे मार्ग, उपाय काय, हे कळणे, हाही जीवनमुक्ततेचाच टप्पा आणि कर्तव्ये. म्हणून, कर्म करीत जाणे आणि फळासाठी त्या परमेश्वरावर अवलंबून राहणे ही जीवनमुक्त अवस्था. साध्या भाषेत सांगायचे, तर एखाद्या प्रश्नाचा वस्तुनिष्ठ विचार करणे आणि त्याच्या हितसंबंध-स्वार्थ यांच्या वलयापासून दूर राहण्यातच खरे समाधान लाभत असावे. मी विचार करू लागलो. कर्तव्यपालनात माझ्यावर आलेला प्रसंग स्वार्थातून आला तर? माझ्या मित्राने त्याच्यावर आलेला प्रसंग कर्तव्यभावनेने पाहिला तर?

    -- किशोर कुलकर्णी

  • निळू फुले

    एकदा मी आणि माझी आई लिफ्टमध्ये असताना खांगटे काका आणि निळू फुले लिफ्ट मध्ये आले. आधी आमच्या भेटी झालेल्या होत्या. मी आईला म्हणालो आई हे निळू फुले…डायरेक्ट आई लिफ्टच्या बाहेर जायला निघाली. मग आम्ही तिला अडवले. इतका निळूभाऊंचा ‘ दरारा ‘ होता पडद्यावर .

  • अडगळीतली काठी

    पल्लवी ही आई वडिलांची एकुलती एक मुलगी. तिला अतिशय लाडात वाढवल्यामुळे ती कमालीची हट्टी झाली होती. काॅलेजला असतानाच तिचे दिनेशवर प्रेम जडले.

  • भूमिका’ आजोबांची !

    रोज संध्याकाळी मी फिरावयास जात असे. कधी कधी नातव बरोबर येत असत. मी कपडे घालून निघालो. लहान पाच वर्षाचा नातू, पळत आला व मला बिलगला.
    ” आजोबा मला पण यायचं आहे बागेत तुमच्या बरोबर.”  मजसाठी ती हृदयद्रावक घटना होती.

  • वास्तुविशेषांक

    आप्पा महाशब्दे यांच्या बोटांना लाभलेले वरदान केवळ बोर्डाच्या अक्षरांपाशीच घोटाळत राहिले नाही. तर कलाक्षेत्राशी निगडित असलेल्या विविध अंगांनी ते बहरून आले. विविध संस्थांच्या अनेकविध कार्यक्रमांसाठी गौरवचिन्हे, स्मृतिचिन्हे यामधील त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे. आतापर्यंत अशी हजारो स्मृतिचिन्हे त्यांच्या हातून बनली आहेत. याशिवाय बॅनर्स, बॅचेस, साइन बोर्ड्स, मानपत्रे अशा कितीतरी बाबीत आप्पांची मुशाफिरी वैशिष्ट्यपूर्ण आहे.