नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
आख्खा ” पिंजर” फाळणीमुळे रक्तरंजित ! फक्त असंवेदनाशील व्यक्तीच डोळ्यांत पाणी न आणता आणि हाताच्या मुठी आवळल्याविना एका बैठकीत पिंजर बघू शकेल. १९४७ ची जखम माझ्या पिढीने पाहिली नाही पण अमृता आणि गुलज़ार ती आम्हाला विसरू देत नाही. या रचनेत अमृता साक्षात वारीस शाहला ( हीर रांझा या सुप्रसिद्ध प्रेम त्रिकोणाचा अक्षर निर्माता ) आवाहन करते आहे
वाराणशीचे राज्य. राजाचे नाव ब्रह्मदत्त. या राज्यातल्या एका व्यापाऱ्याच्या
कुळात बोधिसत्त्वाचा जन्म झाला. बोधिसत्त्व मोठा झाला. देशोदेशी हिंडून
व्यापार करू लागला.
एक राजा होता. तो खूपच पराक्रमी होता. जेवढा पराक्रमी तेवढाच प्रजाहितदक्ष. प्रजेच्या फायद्यासाठी त्याचे सारखे प्रयत्न चालू असायचे. त्यामुळे प्रजाही राजावर खूश होती. असा राजा जन्मोजन्मी मिळो अशीच प्रार्थना प्रजा करीत होती. राजा पराक्रमी असल्यामुळे त्याने अनेक राजांना आपले मांडलिक बनवले होते. त्या मांडलिक राजांकडून राजाला वेळोवेळी धन व संपत्तीचा पुरवठा होत असे. त्यामुळे राजाचा खजिना नेहमीच भरलेला असे. राजाची आर्थिक बाजू भरभराटीला असल्यामुळे राज्यात सुबत्ता होती. दुष्काळातही प्रजेचे फारसे हाल होत नसत. राजाच्या राज्यात एकूणच सर्वत्र आबादीआबाद होते. राजाला याच गोष्टीचा फार अभिमान होता. या अभिमानाचे रूपांतर हळूहळू अहंकारात व नंतर गर्वात झाले. पुढे पुढे हा गर्व राजाच्या आचरणातही दिसू लागला. एकदा राजधानीत एक मोठे साधूमहाराज कोठून तरी आले. साधूमहाराज अतिशय निरिच्छ वृत्तीचे होते.दर्शनासाठी वा भेटायला आलेल्या लोकांकडून ते काहीही घेत नव्हते.
राजधानीत त्यांची प्रसिद्धी वाहू लागली व त्यांचे दर्शन घेण्यासाठी लोकांची रांगही वाढू लागली. या साधूमहाराजांची महती राजाच्याही कानावर गेली. त्यामुळे एकदा राजाही त्या साधूला भेटायला गेला व म्हणाला, 'तुम्ही मागाल ते मी द्यायला तयार आहे; मात्र तुम्ही ते स्वीकारले पाहिजे. माझा सारा खजिना, सारे राजवैभव इतकेच काय माझे शरीरही तुम्हाला द्यायला तयार आहे. यापैकी तुम्ही काहीही स्वीकारू शकता ?' त्यावर साधूमहाराज राजाला म्हणाले, ' राज्याचा खजिना तर
प्रजेच्या मालकीचा आहे. त्याचा तू केवळ राखणदार आहेस. तुझ्या शरीरावर तुझ्या पत्नीचा तसेच तुझ्या मुलाबाळांचा हक्क आहे. ' साधूच्या या उत्तरामुळे राजा गोंधळला व म्हणाला, ' 'मग माझी स्वतःची अशी कोणती भेटवस्तू तुम्हाला देऊ हे तुम्हीच मला सांगा. ' त्यावर साधूमहाराज राजाला म्हणाले, ' 'तुझ्या मनातील अहंकार हा सर्वस्वी तुझाच आहे. त्याचे दान तू मला करू शकतोस. '' साधुमहाराजांच्या या
उत्तराचे मर्म राजाला समजले व त्याने अहंकार सोडून देण्याचा निश्चय केला.

ह्या विश्वात खरी मजा असते राव…. कोणीही कितीही नाव ठेवो.. कारण हे विश्व ‘शरीरापलीकडे आणि मनाच्या अल्याड’ असते…

त्याक्षणी विजयला लक्षात आले हा माणूस खूपच घमेंडी आणि कुसका आहे. त्याला धंदा करायची अक्कल नाही. तो जीवनात कधीही फार यशस्वी होणार नाही. त्याक्षणी विजयने निर्णय घेतला यापुढे याच्या दुकानात कधीही पाऊल ठेवायचे नाही.
माझ्या लहानपणी मी सदाशिव पेठेत रात्री हातात मोठी बॅटरी घेऊन फिरणारा गुरखा पाहिलेला आहे. त्याचा तो खाकी गणवेश, डोक्यावरील काळी तिरपी टोपी, त्या टोपीवर असलेले दोन खुकरीचे मेटलचे लावलेले चिन्ह अजूनही आठवतंय. त्यांचे चायनीज सारखे दिसणारे बारीक डोळे आणि गालावरील उभ्या असंख्य सुरकुत्या हीच त्यांची ओळख असायची. त्याच्या उजव्या हातात एक दंडुका असायचा.
आयुष्यात पडझड केव्हा सुरू होते माहितेय ? ”
माशाने अचानक विचारले .
याची अनेक उत्तरे आहेत , पण तुला काय अभिप्रेत आहे , हे मला कसे कळणार ?
असं त्याला विचारावं , असं वाटलं .
पण काही बोललो नाही . एक म्हणजे उपयोग झाला नसता आणि दुसरे म्हणजे माझ्या मनातला विचार त्याला अगोदरच कळत होता .
तसा तो मनकवडाच होता .
महाराष्ट्राची मायबोली मराठी असली, तरी प्रत्येक जिल्ह्यागणिक ती बदलत जाते. जसे भाषेचे आहे, तसेच खाण्याचे. काही मैलांनी खाद्यसंस्कृतीतही थोडा बदल जालेला दिसतो. माई देशपांडे यांनी या पुस्तकात मराठवाड्याचा खाद्यखजिना मोकळा केला आहे.
कृष्णा सरीन नावाची एकोणीस वर्षांची लखनौमधील मुलगी, आई-वडील आपल्याला टॅलेंट स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी मुंबईला जाऊ देत नाही म्हणून दिवसभर उपाशी राहिली.. शेवटी तिला परवानगी मिळाली व ती मुंबईला पोहोचली. त्या स्पर्धेत, ती यशस्वी झाली व तिला पहिला चित्रपटही मिळाला.. व त्याचे मानधन हे पारितोषिक स्वरुपात होते, तब्बल २५ हजार रुपये!!!
सांगली जिल्ह्यातील बिसुर या खेडेगावात माझा जन्म झाला. घरची परिस्थिती अगदी बेताची, वडील सुतगिरणीमध्ये काम करुन उर्वरित वेळेत बिघा – दोन बिघा शेतजमिनीत जमेल तेवढं काम करत होते. आई आमचा सांभाळ करायची. जवळ जवळ सर्व शेती निसर्गावर अवलंबून होती. त्यामुळे शेतीचे उत्पन्न वर्षभर जिकिरीनं पुरवावं लागत होतं. मोठ्या दोन बहिणींची लग्न होवून त्या सासरी गेलेल्या होत्या.
Copyright © 2025 | Marathisrushti