नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

मनातील वादळे तिथल्या तिथे शमविण्याचा प्रयत्न करणे, माझ्य मते न्याय्य होणार नाही. या वादळांना वाट मोकळी करून दिल्यास दिलासा मिळेल, अशी आशा वाटते. परवा नौशाद अली आमच्यातून गेले अन काय लिहू काय नाही असे वाटायला लागले. `न मिलता गम तो बरबादी के अफसाने कहाँ जाते? अगर दुनिया चमन होती तो विराने कहाँ जाते?’ असे म्हणून मनाची समजूत घालावी, की `सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगी?’ असे म्हणत स्मृतींना उजाळा द्यावा? जन्नतमध्ये नौशादसाहेबांची मैफील शकील बदायुनी, शैलेंद्र, मदन मोहन, रफी यांच्यासोबत रंगेल का? अनेक वेड्या प्रश्नांनी भंडावून सोडणारे मन! बहिणाबाईंनी म्हटलेच आहे, `मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकला हाकला परी येत पिकावर!’ माणसाचे आयुष्य फारतर पाचपन्नास वर्षांचे.
त्याचं हे वेगळं असणं , विक्षिप्त वागणं “निरुपद्रवी” प्रकारात मोडण्यासारखं होतं. म्हणजे त्याच्या अशा असण्यामुळे एक वेळ त्याला त्रास होईल पण इतरांचं मात्र कधीच नुकसान झालं नाही.
जगात अनेक जण पैजा लावत असतात. काही चांगल्या तर काही वाईट असतात. पण दोन मित्रांनी आपल्या वयाच्या पंच्च्याहत्तरीत अशी एक आगळीवेगळी पैज लावली आणि ती पुर्णही केली. जी, शिक्षणाचे स्वप्न अर्धेवट राहीलेल्या अनेक तरूणं-तरूणींना शिक्षणाची नवउमेद आणि प्रेरणा देईल.
माझं नवं ( आणि दहावं ) पुस्तक ” पांढरा पडदा ” येतंय या महिना अखेरीपर्यंत ! हे पुस्तक मी माझ्या पत्नीला अर्पण केलंय. फार पूर्वी तिने “वाटेवरच्या कविता ” हा तिचा काव्यसंग्रह मला अर्पण केला होता. ही उशिराची रिटर्न गिफ्ट ! संक्रांतीच्या पर्वाच्या पार्श्वभूमीवर !!

ह्या सगळ्या कथा राजा – राणीच्या काल्पनिक कथा होत्या. तसा या कथांमधून बोध फक्त एकच घेता येतो…प्रत्येक कथेतून काहीतरी शिकता येते…विजयनेही कथा लिहिण्याचा प्रयत्न केला…विजयने लिहिलेली पहिलीच कथा समाजमनावर भाष्य करणारी होती..ती कथा एका प्रसिद्ध वर्तमानपत्रात प्रकाशित झाली होती…त्या नंतर त्याने पहिली प्रेम कथा लिहिली…तो बसमधून प्रवास करताना एका सुंदर तरुणीच्या प्रेमात पडला होता… तसही कोणी विद्रुप मुलीच्या प्रेमात पडत नाही…ह्या बसच्या प्रवासात त्याला भेटलेल्या, त्याच्या प्रेमात पडलेल्या आणि तो ज्यांच्या प्रेमात पडला होता अशा इतक्या होत्या की आता विजयला त्या आठवायच्या म्हटल्या तरी एक दिवस अपुरा पडेल…
वर्षामागून वर्षे गेली. मीराताईचा लेख लिहितांना त्यांची अगदी जवळची मैत्रीण म्हणून मला शशिकलाताई आठवत होत्या. मीराताईच्या तोंडून कित्येकदा त्यांचा उल्लेख होत असे. दोघींची कित्येक वर्षांत भेट झालीच नाही.
“मलयगिरीचा चंदन गंधीत,
धूप तुला दाविला....
स्वीकारावी पुजा आता,
उठी उठी गोपाळा...!”
कुमार गंधर्वांच्या आवाजातली ही अमर भूपाळी शंकर मथार्याच्या टेपरिकॉर्डरवर लागली तसं सारजाची झोप मोडली.शंकर मथार्याच्या टेपरिकॉर्डरचा भोंगा वाजनं आण गल्लीतल्या बायामाणसांचं पहाटचं उठनं हे मागील काही वर्षांपासून गल्लीतल्या बायकांसाठी नेहमीचच होतं.गावात फक्त शंकर म्हाताऱ्याच्या घरीच टेपरिकॉर्डर होता. शंकर मथरा पहाट सुखाची चांदणी निघाली की मोठ्ठया आवाजात आपला टेपरेकॉर्डर सुरू करायचा. सारजा जरा गडबडीनच उठली. कामाचा लय रोंभा पडला व्हता,त्यात पेरणीचे दिवस व्हते. पहाटचे सगळे कामं आटपुन शेतात जायचं व्हतं.तिनं उठून तोंडावर पाण्याचा सपकारा मारला,केसं नीट करून बुचडा बांधला अन चुली जवळ जाऊन चुलीतला एक भला मोठा ढेपसा हातावर घेऊन दात घासत घासत तिच्या नवऱ्याल,दौलतल आवाज दिला.पेरणी पाण्याचे दिवस असल्यानं दिवसभरच्या कष्टानं थकून दौलत आरमोडून झोपला व्हता. त्यालं तसं झोपलेलं पाहून सारजाच्या डोळ्यालं समाधान वाटत होतं. खरं म्हंजे कामाचा लय रोंभा पडला होता पण तरी बी त्याची झोप न मोडु देता तशीच ती उठली . पारोश्या अंगानं सयपाक पाणी करू नाही मंतात...! सारजीलं लहानपणापासूनच थंड पाण्यानं आंघुळ करायची सवय होती,म्हणून मग आधी तिनं आंघुळ करून घेतली. तव्हरोक दौलत बी उठला होता. त्याच्याकडं रेडीओ होतख.रेडिओवर गाणे ऐकण्याचा त्यालं लय नाद होता. झोपतून उठून त्यांनं रेडिओवर विवीध भारती लावलं.तेव्हड्यातं नहानीतून आंघुळ करून बाहिर येणारी सारजा त्यालं दिसली. सारजालं पाहून त्याचे डोळे उघडे ते उघडेच राहिले.तिचा तो लांब लांब केसांचा वलबट केशसंभार पाहून तो खुळ्यागत तिच्याकडं पाहू लागला. तेवढ्यात रेडिओवर गाणं लागलं होतं...
‘सजनी ग भुललो मी काय जादू झाली
बघून तुला जीव माझा होई वर खाली’
दौलतलं आपल्याकडं तसं बघतांनी पाहून सारजीलं लय लाज वाटली. ती तसंच पळत जाऊन आरश्या पुढं गेली. देवळीतून मेणाची डबी काढून टिचकोर मेन बोटावर घेऊन तिनं कपाळावर लावलं आन् त्याच्यावर कुखाची चंद्रकोर कोरली. चापुन चोपून नेसलेल्या नऊवारी लुगड्यावर तिच्या केसांचा अंबाडा तिच्या खानदानी सौंदर्यात आजुकच भर घालत व्हता. तिच्याकडं पाहून दौलत तिच्या भोवतालच पिंगा घालू लागला. तेवढ्यात दौलतचं मथारं परसाकुन आलं. दौलतलं सारजी भवताल पिंगा घालायलेलं पाहून म्हताऱ्याचा रागाचा पारा चढला. तसं बी म्हताऱ्याचा स्वभाव जरा तामशिळच होता. “आता इथचं सोंग करत बसणार आसशील तं जनावरायचं चारा पाणी आन् शेण काय तुव्हा बाप काढणार हे का रं सुक्काळीच्या...!” म्हाताऱ्यानं पहाट रामपहार्यातच दौलतलं शिवी हासडली होती. तसं दौलतनं रेडिओ आपल्या बगलत लटकवला,बैलांच्या खुराकाच टोपलं उचललं अन खाली मान घालून मुकाटपणे जनावरांच्या गोठ्याकडे पळाला. सारजीबी आपला पदर सावरत आतल्या घरात पळाली. करड्या शिस्तीचा स्वभाव आन् तामशिळपणामुळं मथार्यापुढं घरातलेच नाही तं भावकीतले बी सगळेच जरा दबूनच राहायचे.
सारजीनं आंगनातली चूल पेटवून चुलीवर पाणी तपायलं ठेवलं आणि ती आतल्या घरात जात्यावर दळण दळायलं गेली.जात्याच्या पाळुवर खुट्टा ठोकून सुपातली मूठभर जवारी जात्याच्या तोंडात टाकत सारजा आपल्या गोड आवाजात ओव्या गाऊ लागली.
“राम म्हणू राम, राम गळ्याचं ताईत
घातिलं गळ्यामंदी, नाही जनाला माहित|
राम म्हणू राम, राम संगतीला चांगला
माझ्या हुरद्यात, यानं बंगला बांधिला|
राम म्हणू राम, राम सुपारीचं खांड
याचं नावू घेता, देही झाली गार थंड|
रामाला आला घाम, सीता पुसी पदरानं
कोणाची झाली दृष्ट, रथ गेला बाजारानं|
रामाला आला घाम, सीता पुसिती लहुलाया
कोणाची झाली तुला दृष्ट, माझ्या रामराया...|”
तिच्या आवाजालं एक आलगच गोडी होती. जात्यावर ओव्या म्हणत म्हणत ती तिच्या संसाराची गोष्ट सांगत होती.तिचा सासरा वसरीत बसून तिच्या ओव्या ऐकायचा. सारजाच्या सासर्यालं सारजीचं लई कौतुक वाटायचं. त्याच्या आडमुठ्या पोराचा संसार सारजी खूप नेटानं चालवतेय हे पाहुन त्यालं लय बरं वाटायचं. सारजा सासर आन् माहेर आसं दोन्हीकडील पाव्हणे-राव्हणे,नातेवाईक,सोयरे-धायरे असं सगळ गणगोत मानमरातब ठेवुन संभाळायची.त्यामुळं तिच्या सासर्यालं तिचा लय आभिमान वाटायचा. तेवढ्यात तिच्या सासर्यालं खोकल्याची उबळ आली आणि तो जोर जोरात खोकलु लागला.हे ऐकुन जात्यावरचं काम तसच आर्धवट सोडून सारजी पळतच बाहिर वसरीत आली.तिनं बाजखालचं टोपलं उचललं,त्यात जराक्स राखुडं टाकलं आणि ते सासऱ्याच्यापुढं आणुन ठेवलं. लग्न होऊन सासरी आलेल्या सारजाची सासू,सारजा सासरी आल्यानंतर एक-दोन महिण्यातच मेली आन् अकस्मातच सगळ्या घराची जबाबदारी सारजावर येवुन पडली होती.तिनं बी मोठ्या हिमतीनं एक एक करत सगळ्या जबाबदाऱ्या हातात घेत घर संभाळायलं शिकली होती. लग्नानंतर इतक्या वर्षांनी सुध्दा तीनं ना कव्हा सासर्यालं काही कमी पडू दिल ना कव्हा तिच्या नवरा आणि लेकरा बाळायलं काही कमी पडू दिल.दम्याची शिकायत असल्यानं पहाटं पहाटं तिच्या सासर्यालं खोकल्याचा तरास व्हयाचा.खोकल्याची हुबळ आली की मग ते मथारं तिथच बसून टोपल्यात बेंडके टाकायचं. अस असुनही सारजीनं कव्हाच तक्रार केली नाही की किळस वाटून घेतली नाही.ती घरातले सगळे काम इमाने इतबारे करून आपला संसार नेटानं चालवायची.
सारजाच दळून झालं होतं. आभाळात तांबडाई फुटत असल्याने बाहेर पाखरायचा किलबिलाट सुरू झालता.तिनं जात्या भवतालचं पीठ सुपात घेतलं अन् लगबगीनं ती चुलीकडे निघाली.तेवढ्यात,
“दार उघडा नां नाव सांगा नां,
देवाचा जी देव पहारा..
रामाचा जी राम पहारा...!”
डमरू वाजवत बैलावर बसुन भिक्षा मागणारा कुर्मुड्या तिच्या दारात डमरू वाजवत गाणं म्हणु लागला.तिनं कनग्यातून पसाभर जवारीचे दाणे घेतले आन् त्या कुर्मुड्याच्या झोळीत टाकले.डमरू वाजवत वाजवत गाणं गातं तो कुर्मुड्या निघून गेला.
पहाटं सुखाची चांदणी निघाल्यापसून ती उठली होती.तिची कामाची लगबग चालू होती दौलतच्या रेडिओवर गाणं लागलं होतं.....
“जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा.....!”
गाईच्या शेणाचा एक पव्हटा आणुन त्यात जराशी बुरुजाची ढवळी मातुडी मिसळून तीनं चूल सारवली.मग तिनं सडा सारवन आटपुन अंगणात रांगुळी काढली. तेवढ्यात दौलत जनावरायचं चारा-पाणी आटपुन,शेन काढून घरी आला होता. आल्या आल्या त्यांनं दुधाची चरवी सारजाकडं सोपवली.
सारजान रातच्यालच चुलीत ईखोरावर राखुड्याचे ढेपसे ठुलते.आताबी ईखोर चेतीच व्हता.दोन-तीन गौर्यायचे खांडं आन् झिपल्या एकाखाली एक रचुन फुकणीनं ती आतल्या ईखोरालं शिलगवु लागली.आदल्या दिवसाच्या पावसामुळे सगळं इंधन सादळलं होतं त्यामुळं सगळ्या घरात धुपटच धुपट झालतं.धुपटानं खोकल्यासंगच तिच्या डोळ्यातुन पाणी बी येऊ लागलं. हे पाहून दौलतलं वाईट वाटलं. तो सारजाजवळ गेला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून तिलं म्हणु लागला,“सारजा यंदा सुगी जर चांगली पिकली नं तं म्या तुलं पाच तोळ्याचं सोन्याच गंठण तं करीनच पण संगटच तुलं घरातं धुपट व्हवु नाही म्हणुन एक धुरांड बी करून देतो बघ....! मग तं आमच्या राणीसायबांच्या डोळ्यातं पाणी येणारं नाय नं....!”
“आले मोठ्ठे गंठण घेणारे.....त्यापक्शा जनावरायचा गोठा बांधा आंधी.... अन् लयच धुपटाची काळजी वाटत असलं नं तं बाहिर दोरणीच्या वरतुन टांगलेल्या जराक्शा सनकाड्या आणा चुल पेटवायलं...! एकदा का ईखोर पेटला की मंग धुपट आपोआप पळून जाते....!”
तसं दौलतनं वसरीतून दोरनीच्या वर्ही टांगलेल्या मूठभर सणकाड्या आणुन चुलीत घातल्या अन फुकणीनं फुकू लागला तसं त्या सनकाड्यायनं पेट घेतला.आग शिलगताच चुलीतल्या गौर्या अन झिपल्या पेटल्यानं घरातलं धुपट गायब झाल. दौलतच्या रेडीओवर गाणं लागलं....
“दिस जातील,दिस येतीलं
भोग सरंल, सुख येईल.”
सारजीनं चुलीवर दूध तपवायलं ठेवलं. बाहिर झुंजुरका उजेड पडत होता. सारजान वसरीतले शेरडं सोडुन बाहिर अंगणात नेऊन बांधले. डारल्याखालच्या कोंबड्याही चेती व्हवुन पहाटची बांग देऊ लागल्या तसं तिनं त्यांनाही मोकळ करून अंगणात सोडलं. सारजाची पहाटं उठल्यापसून सारखी लगबग सुरू होती. तेवढ्यात उगवत्या टायमालं टाळ आन चिपळ्या कुटतं वासुदेव आला होता. आंगावर झब्बा आन् पायघोळ पयजामा,कमरलं खवलेली बासरी,आणि डोक्यावर मोर पिसाचा टोप घातलेला वासुदेव आपल्या हातातला टाळ आण चिपळ्या वाजवत गवळण मनत होता.सारजानं पुन्हा एकदा कनगुल्यातून पसाभर दाणे काढुन वासुदेवालं वाढले. सगळ्या देवायच नाव घेत तेह्यलं दान भेटलं असं म्हणत वासुदेव चालता झाला.
पहाटंपासून सारजाची लगबग चालली होती.जनावरायचा चारा पाणी उरकून आलेला दौलत चुलीत जळतन टाकत टाकत सारजासंग गप्पा करू लागला. नवरा बायकोच्या त्या पहाटच्या गप्पा पहाटलं पडणाऱ्या साखर झोपंपेक्षा बी गोड होत्या. पहाटं पहाटं अंगणात कलरव करणाऱ्या चिमण्या,बांग देत अरवणाऱ्या कोंबड्या, अन गाई गुरांच्या हंबरण्यान वातावरणात चैतन्य निर्माण झालं होतं. पहाटच्या त्या रामपहार्यातल्या गारेगार,,मनमोसट अश्या त्या अल्हाददायक गारव्याचा गोडवा मनालं मोहरून टाकत होता.सारजाच्या सासऱ्याची चहाची वेळ झालती. रात्रीच्या टायमालच सारजी दोन-तीन भाकरी जास्तीच्या करून ठेवायची.दोघबी बाप-लेकं भुकचे लय कवळे व्हते.दिवस उजेडते न उजेडते की बाप लेकायलं नेहारीसाठी एक दीड भाकर आण परात भरून चहा लागायचा. भुरक्या चटणीवर तेलाचे दोन थेंब आणि एका खाराच्या फोडीनं नेहारीच ताट सजवून सारजीनं बापलेकायल न्याहारी वाढली अन लसूण निसत निसत चहाच भगुनं चुलीवर ठुलं.
नवरा आणि सासऱ्याचं चहापाणी झालं की सारजा देव पूजायलं बसली.सूर्यदेव वर येत होता. सारजाचा नवरा सुताराकडं आवतं भरून घ्यायसाठी गेला तं सासर्यानं झिपर्या वाढलेल्या लेकरायलं वारकाकडं डोसक्या करायलं नेलं. सारंजानं झटपट पूजापाथी आटपून तुळशीलं पाणी घातलं अन् प्रदक्षिणा मारत सूर्यनारायणालं नमस्कार केला.कामाच्या घटमटीत तिचा पहाटचा चहा बी प्यायचा राहिला व्हता. तेवढ्यात येटाळीतल्या दोन शेजारणीयचे भांडण डिकले होते. अंगणात कचरा टाकण्यावरून दोन शेजारणींची चांगलीच जुपली होती. बाकीचे शेजारीपाजारी गलका करून त्या भांडणाची मजा घेत होते. सरजीनं त्याकडं दुर्लक्ष केलं आणि ती आपल्या कामालं लागली.
पोरांची शाळेची वेळ झालती.डोस्की करून एवढ्यात ते येतीलच या हिसाबान तिनं अंगणातल्या चुलीवर पाणी तपाय ठेवलं आणि स्वयंपाक करायला लागली. धपाधप भाकरी थापत तिनं कोरड्यासालं फोडणी देली अन पोरांचे शाळेचे दप्तरं आवरू लागली. तेवढ्यात तिचा नवरा भरलेलं आवुतं जुपून शेताकडं जायच्या हिसाबानं दारी आला.तेवढ्यात शेजाऱ्याची फटफटी पुढून आल्यानं औतालं जुपलेले बैल बुजाडुन पळाल्यानं बेसावध दौलत धप्पकन अंगणातल्या चिखलात पडला. हे पाहून शेजारीपाजारी ख्खी ख्खी हसू लागले. सन्नकन दौलतच्या डोक्यात राग शिरला,अन् रागातच त्यांना सारजीलं आवाज देला,“सारजे,भाकरी बांधल्या का?... उशीर व्हयाला दे लवकर..!”
“देते ...देते वाईच जराक्स थांबा...! कोरडयासालं तेवढं आंधन येऊ द्या.” असं म्हणत ती धुडक्यात भाकरी बांधायलं लागली. आंधन आलेलं गरम कोरड्यास कॅटलीत भरून ती गडबडीनं बाहेर आली तं तिचा नवरा दारी नव्हता.तिलं जरासा येळ लागल्यानं तिचा नवरा भाकरी न घेताच रागानं फणफणत शेती गेलता.हे पाहुन ती कावरीबावरी झाली.पहाटपसून चहाचा घोट की अन्नाचा कण तिच्या पोटात गेला नव्हता. सुखाची चांदणी निघाल्यापासून ती सारखी राबत होती.नवरा उपाशीपोटीच शेतात गेल्यानं सारजीच्या डोळ्यात टच्चकन पाणी आलतं.
तेवढ्यात सासरा आणि लेकरं डोस्की करून आले. सारजीनं लेकरायलं आंघुळी घालुन शाळलं धाडलं.सासर्यालं आंघुळीलं पाणी टाकलं.घाईघाईत तिनं घरातला रोंभा आवरला,गडबडीतच कपडे धुतले आन सासर्यालं जेवन वाढुन टोपल्यात भाकरी भरून ती शेताकडं निंघाली. तिचा नवरा भाकरी न नेताच शेती गेल्यानं सगळ्या रस्त्यानं ती स्वतःच्याच मनालं खात होती.
शेतात येताच तिनं दौलतलं आवाज देला तसा आउत सोडून दौलत खाली मान घालून तिच्याकडं आला.पहाटं फणफणत रागानं शेतात आल्याचं त्याला वाईट वाटत होतं. बैलं बुजाडल्यानं तो पडला होता आणि शेजारीपाजारी फिदी फिदी हसत असल्यानं त्यालं सनक भरूली होती .तो आलेला राग त्यानं उगाच सारजीवर काढला व्हता.यात सारजीचा काहीबी दोष नव्हता. पहाटं चार वाजल्यापासून ती घरात राबत व्हती हे त्यालबी कळत होतं.क्षणभराच्या रागानं शेतात निघून आल्याचं त्यालं वाईट वाटत होतं. सारजीलं आलेलं पाहून त्यालं बरं वाटलं...ती कव्हा एकदा शेतात येते याचीच तो वाट पाहत होता.सारजीनं झाडाखाली टोपलं टेकवलं तसा तो मान खाली घालूनच आला.
“काय व,एवढा काय तनका आलता तुम्हालं की, भाकरी न घेताच निंघून आले...!”
“म्हंजे आपण चिखलात पडलो व्हतो हे हिलं कळलं नाही तर...!” दौलत मनातल्या मनात म्हणाला.आपली फजिती बायकोलं कळाली नाही हे वाटुन तो मनातल्या मनात खुश झाला.त्यालं बरं वाटलं.
तीन कॅटलीतलं कोरड्यास एका वाटीत घेऊन त्यालं वाढलं. त्यानं टोपल्यातल्या धुडक्यातली भाकर हातावर घेऊन त्याच्यावर खाराची फोड घेतली आणि घास मोडला. अचानक काहीतरी आठवल्यासारखं होऊन तो थांबला आणि तिलं म्हणला,“काय व सारजे, तू जेवली का नाही..?”
तसं तिनं माननच नकार देत,“तुम्ही उपाशी असतानी मलं अन्न गोड लागते व्हयं...!” असं म्हणलं आन् दौलतलं गहिवरून आलं. पहाटं आपण सारजीलं उगाचच रागात बोललो असं त्यालं वाटू लागलं. त्यांनं हातावरच्या भाकरीचा कुटका तोडून कालवणात भिजवला आणि तिच्या तोंडापुढं हात केला. दौलतच्या मायेमुळे तिच्या डोळ्यात टचकन आनंदाश्रु आले. रागाच्या भरात कधी कधी दौलत तिच्याशी हेकटपणे वागायचा पण तो तिच्यावर खूप माया बी करायचा. ती पुढ्यात आली की त्याच्या मनातला राग बर्फासारखा ईतळायचा. तीनं डोळे पुसले. भाकरीचा एक घास मोडला आणि कालवणात भिजवून त्याच्याकडे केला. त्याच्या तोंडात तो घास भरवतांना ती खट्याळपणान त्याच्याकडं पाहात हळूच म्हणली,“काय हो पहाटं बैलं बुजाडल्यावर तुम्ही चिखलात पडले आन् तसेच भरक्या कपड्याने शेतात आले का?...कपडे तं बदलायचे नं...!”
तिच्या या बोलण्यानं क्षणभर दौलत स्तब्ध होऊन तिच्याकडं पाहतच राहिला....आणि अचानक दोघेही हसायला लागले.
दौलतच्या रेडिओवर गाणं लागलं होतं...,
“देखा संसार संसार,
दोन्ही जिवांचा सुधार
कदी नगद उधार,
सुख दुखःचा बेपार....।”
©गोडाती बबनराव काळे,लातुर
9405807079
अशा अनेकांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग, घडामोडी, चढउतार, गमतीदार आठवणी यांचे सचित्र दर्शन घडवून वाचकांच्या 'बौद्धिक कक्ष्या' रुंदावण्याचा प्रयत्न केला आहे.

'वाचता वाचता' पुस्तकाद्वारे एका भव्य सृष्ष्टीचे वाङ्मयीन दर्शन घडवत असतानाच, गोविंदरावांनी आपली 'बौद्धिक क्षितिजे किती अमर्याद असू शकतात याचे विहंगम दर्शन घडविले आहे. गोविंदराव तळवलकर यांचा, श्री ह. रा. महाजनींसोबत 'लोकसत्ता' संपादक आणि नंतर ‘महाराष्ट्र टाइम्सचे , सहसंपादक, संपादक आणि शेवटी सल्लागार संपादक, ’असा त्यांचा वृत्तपत्रीय स्तंभ लेखनाचा प्रवास तब्बल ४० वर्षांचा आहे.
‘वैचारिक व्यासपीठे'

‘वैचारिक व्यासपीठे' हे श्री गोविंदराव तळवलकर यांचे 'साधना' प्रकाशनाने २०१२ मध्ये प्रकाशित केलेला 'विचार प्रवर्तक' अशा १५ लेखांचा गुंफलेला संग्रह! जगभरात गेल्या १५० वर्षांच्या कालखंडात प्रसिद्धीस पावलेल्या व लोकप्रिय झालेल्या शेकडो नियत कालिकांचे' 'नीरक्षीर विवेक बुद्धीने त्यांनी केलेले परीक्षण आणि मूल्यमापन! आपल्या सव्यसाची, अखंड वाचनातून पाश्चात्य, भारतीय आणि इतरत्र प्रसिद्ध होणाऱ्या नियत कालिकांमधून त्यांनी, फक्त १४ नियत कालिकांची समालोचनासाठी त्यांनी निवड केली. त्यातील लेखमाला आणि उपक्रम यांचा अत्यंत सुन्दर, मार्मिक आणि चित्तवेधक भाषेत त्यांनी उहापोह केला आहे.
‘समारोपाच्या’ प्रकरणात त्यांनी, प्रतिष्ठित आणि आंतर राष्ट्रीय ख्यातीच्या ' टाइम्स, ' न्यूयॉर्क टाइम्स यांचा सवंगपणा, घसरलेला दर्जा, वैचारिक पीछेहाट यांची सुंदर शब्दात ‘बोळवण’ केली आहे. त्यांच्या वार्ताहरांनी आणि संपादकांनी खोट्या बातम्यांचे रतीब टाकले याचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला आहे. इतकेच नव्हे तर त्यांना 'वैचारिक व्यासपीठातून' बाहेरचा रस्ता दाखविला आहे! 'आंतरराष्ट्रीय' नियतकालिकांची तोंड-ओळख मराठी वाचकांना करून देणे हाही उद्देश आहे. मराठी वाचकांसाठी हे पुस्तक उद्बोधक, विचारप्रवर्तक आणि डोळे उघडणारे आहे.
गोविंद तळवलकरांच्या अनेक अग्रलेखांचे संग्रहण

पुस्तक रूपाने प्रसिद्ध केल्या गेलेल्या या संग्रहणात, 'राजकीय 'भारतीय', 'राजकीय- परदेशी' , आर्थिक, व्यक्तिविषयक , संकीर्ण असे वर्गीकरण करण्यात आले आहे. आता ऐकुया गोविंदराव तळवलकरांनी आचार्य अत्रे ह्यांच्यावर लिहिलेल्या मृत्युलेखाचा संक्षिप्त स्वरूपातील काही भाग.
व्यक्तिरेखा आचार्य अत्रे – मृत्युलेख ('संक्षिप्त स्वरूपात')

महाराष्ट्राच्या दगड धोंड्यांवर, नद्या डोंगरांवर अतोनात प्रेम करणाऱ्या आचार्य अत्रे यांच्या निधनाने पहाडाचा कडा कोसळला असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्रात प्रचंड व्यक्तित्वाचे व कर्तृत्वाचे अनेक पुरुष होऊन गेले पण मुख्यतः साहित्याचा पिंड असलेले पण तरीही अनेक अंगानी आणि ढंगानी फुललेले सध्याच्या काळात कोणीही नव्हते आणि नाही. मराठी साहित्यातील आणि महाराष्ट्राच्या लोकजीवनातील एक प्रचंड आणि अफाट व्यक्तीमत्व नाहीसे झाले आहे. अशी अग्रलेखाची सुरवातच आहे.
त्यांच्या हजारो अग्रलेखांमध्ये इतका हृदयंगम आणि प्रेम आणि व्याकुळतेने बहरून गेलेला अग्रलेख विरळाच! शाळा मास्तर म्हणून त्यांनी जीवनाला प्रारंभ केला, मराठी पाठय पुस्तकांमध्ये त्यांचे 'धडे आले आणि सुवर्णपदक विजेत्या 'शामची आई' चित्रपट निर्मितीपर्यंतच्या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी विहार केला असे तळवलकर आवर्जून सांगतात. राजकारणात त्यांनी प्रवेश केला आणि आपल्या वक्तृत्वाने आणि लेखणीने सारा महाराष्ट्र दणाणून सोडला.
मराठी साहित्यात इतकी प्रसन्न आणि ओघवती शैली लाभलेले साहित्यिक क्वचितच सापडतील. ‘झेंडूची फुले’ ह्या त्यांच्या काव्यसंग्रहाने सर्वच विक्रम मोडले. अत्रे म्हणजे विनोद हे समीकरण दृढ झाले असले तरी त्यांचे काव्य, अध्यात्म यांविषयीचे लेख विनोदी नाहीत. ते रसिकतेने काठोकाठ भरलेले आहेत.'अखंड उदयोग्य हा अत्रे यांचा विशेषही दुर्मिळ होता. साहित्य, व्यक्ती आणि ग्रंथविषयक त्यांचे लेख वाचणे हा एक आनंदाचा विषय होता. आता तो आनंद संपला आहे.
शहाद्यातील संघर्ष -२४ / ११/ १९७३ (सारांशरूपाने)

धुळे जिल्हा आणि ' शहादे‘ तालुक्यात' जमीनदारांनी 'आदिवासी, शेतमजुरांच्या शांततापूर्ण चळवळी आणि मोठ्या जमीनधारकांनी 'सशस्त्र दलाची स्थापना ' करण्यासाठी केली योजना या विषयावर महाराष्ट्र विधानसभेत आणि लोकसभेत 'मोठेच वादळ उठले’.
"धुळे जिल्हा आणि शहादा तालुका गेले काही दिवस गाजत आहे". तिथे शेतमालकानी 'पीक संरंक्षणाच्या नावाखाली ;सशस्त्र दल ' उभे करण्याची योजना आखली आहे. केंद्रीय 'गृह मंत्रिं आणि राज्यमंत्री यांनी आम्हाला याची माहिती नाही आणि चौकशीसाठी 'खास अधिकारीं धुळे जिल्ह्याकडे रवाना करण्यात आले आहेत. या उत्तरांवार गोविंदरावांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.
आमच्या प्रतिनिधीने दोन्ही पक्ष्यांच्या बाजू दिल्या आहेत. व त्यावरून हे स्पष्ट होईल की 'शहाद्यातील ही योजना "पीक संरक्षणासाठी नाही तर तेथील 'आदिवासी -शेतमजूर ' जागृत होत असल्याने 'त्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी हि तयारी केली आहे. श्री. पी. के. पाटील यांनी या तयारीला 'टाईम्सच्या ' इमारती समोर गुरखे नसतात का? असा प्रश्न 'टाइम्सच्या वार्ताहराला विचारला. असता गुरखे म्हणजे 'पोलीस दलाला' पर्यायी यंत्रणा नाही' असे तिखट पण मार्मिक उत्तर दिले.
शहादे -तळोदे ' हे भाग आदिवासी भाग म्हणून ओळखले जातात'. आदिवासी सामाज्याचे दारिद्र्य, सावकारशाहीपुढे हतबल होऊन त्यांच्या कडे ' गहाण टाकलेल्या जमिनी, आदिवासी- शेतमजुरांची 'कर्जबाजारी अवस्था, यांवर त्यांनी वाचकांचे लक्ष वेधले आहे. 'शंभर रुपयांचे 'कर्जसुद्धा त्यांना फेडता येत नाही' या जमिनी मूळच्या या शेत मजुरांच्याच पण सावकारशाहीने ग्रस्त झालेल्या आदिवासींना पिळवणुकीतून मुक्त करण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून कोणतीच कारवाई केली जात नाही या बद्दल या अग्रलेखात चिंता व्यक्त केली आहे. भिल्ल समाज संघर्षाच्या पवित्रता का उभा आहे हे काँग्रेस जनांनी तपासायला हवे.
'भिल्ल सम्ज संघर्षांच्या का उभा आहे हे काँग्रेस जणांनी तपासायला हवे. शेत मालक शस्त्रधारी संघटना कश्या उभ्या करू शकतात, तिथली सालदार पद्धत कि ज्या योगे ते 'शेतमजुरांना 'बांधून ठेवतात. 'वेठबिगारीला दिलेले हे 'गोंडंस नाव आहे.
'फुले वेचिता बहरू '- अर्थात-बाबांचे साहित्यात उमटलेले ‘बाग प्रेम’

मी, गोविंदराव तळवलकरांची 'जेष्ठ कन्या '- डॉ. निरुपमा’ . बाबांना फुलांची व बागेची फारच आवड होती कारण त्यांची वृत्ती मुळातच अतिशय कलात्मक होती. रेखीव आखणी करून झाडे लावायची. पण ती नैसर्गिकरीत्याच उगवली आहेत असे सर्वांना वाटले पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असे. रंगसंगती सुद्धा भडक नसावी.
त्यांच्या काही पुस्तकांची नावे सौरभ, बहर, पुष्पांजली, मधुघट अशी आहेत. तर त्यांनी म.टा. मधील एका सदराचे नाव ठेवले होते. ‘फुलोरा’. फ्रेंच चित्रकार क्लॉमद् मोनेच्या बागेचे तर त्यांना अपार प्रेम होते. विश्वेश्वरय्यांच्या ‘वृंदावन गार्डन’चे तर विशेष कौतुक. फ्रान्समधील व्हर्सायच्या राजवाड्या भोवतीची नक्षीदार गालिच्या सारखी नयनरम्य बाग त्यांना नेहमीच प्रसन्न वाटायची.
बागेवरची कविता
शेक्सरपिअर, चेकॉव्ह, टॉलस्टॉय, वर्डस्वर्थ हे त्यांचे आवडते लेखक-कवी. त्यांच्या साहित्यात झाडांचे, फुलांचे अनेक उल्लेख आहेत. त्यांच्या घराभोवतीच्या बागा अत्यंत प्रेक्षणीय असल्यामुळे, त्या त्या जागी जाऊन त्यांनी सर्व बागा पाहिल्या.
लंडनजवळ केंटमध्ये, चर्चिलच्या चर्चिलनी चार्टवेल ह्या निवासस्थानात स्वत: बाग लावली आहे. लंडनला गेल्यावर, पहिल्या दौऱ्यातच बाबांनी त्या बागेला भेट दिली. लंडनमधील 'रिजन्ट पार्क ' मधील ' क्वीन मेरीच्या 'रोझ गार्डेनमध्ये आम्ही नेहमी जायचो . तिथे नारळ , आंबा, रातराणी आणि जास्वंद अशी 'अपलीच झाडे लंडनमध्ये पाहून त्यांना भारतात आल्यासारखे वाटत असे.
आल्या वसंतगौरी, सांगे फुलास वारा,
वार्यास गंध येतो, म्हणती ढगार तारा।
ही माडगूळकराची कविता त्यांना अत्यंत प्रिय होती. तसेच ग. दि. मां ची गीत रामायणातील 'गीते 'सुद्धा त्यांना खूपच आनंदित करत असत. “स्वयंवर झाले सीतेचे”

पूर्वी संध्याकाळी कार्यालयातून कितीही उशिरा घरी आले तरी, विहिरीतून पाणी काढून भल्या मोठ्या झारीने ते सर्व बागेला पाणी घालत असत. ते नेहमीच म्हणत. ‘‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे….’’ त्यावेळी आपले आवडते गायक सैगल, पंकज मलिक किंवा शास्त्रीय गाणी, नाट्य संगीताच्या ध्वनिमुद्रिका, गीतरामायण व अमरभूपाळी यांच्या ध्वनिमुद्रिका सुद्धा मोठ्याने लावत असत.
सैगल/पंकज मलिक- यांचे एक गीत
बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए पत्रकार कुमार केतकर यांनी आपल्या 'मानदंड' या आदरांजली वाहणाऱ्या लेखात त्यांच्या 'सांगीतिक' प्रेमाचे गोडवे गायले आहेत. कुमार गंधर्व, भीमसेन जोशी आणि किशोरी आमोणकर हे त्यांच्या सांगीतिक आस्थेचे विषय होते.


सुप्रसिद्ध पत्रकार आणि महाराष्ट्र टाइम्स चे संपादक श्री कुमार केतकर यांनी गोविंदरावांना व्हिडिओद्वारे आदरांजली वाहिली.
१९६० ते जवळजवळ १९९० परीमचा कालावधी 'महाराष्ट्र टाइम्सचे निर्भीड असे मुख्य संपादक म्हणून जबाबदारी पार पडली त्याचा परामर्श घेतला. इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधान म्हणून निवडून आल्यापासून, रेल्वेसंप, बांगलादेशमधील भारत पाकिस्तान युद्ध, आणीबाबी, जनता पक्ष्याचा उदय आणि सत्ताग्रहण, गरिबी हटाव घोषणा, पुन्हा इंदिरा गांधींच्या पक्ष विजय आणि पुढे इंदिरा गांधी यांची निर्घृण हत्या अश्या अत्यंत कठीण आणि पर्व आपल्या बौद्धिक आणि राजकीय जाणिवांच्या कक्षेत, आवाक्यात घेण्याचे कार्य महाराष्ट्र टीमचे मुख्य संपादक म्हणून गोविंदरावांनी जो प्रयत्न केला ,असा प्रयत्न कोणीही केल्याचा दाखला आजतागायत मिळत नाही असे श्री कुमार केतकर यांनी आवर्जून सांगितले. त्या सोबत त्यांचा युरोपिअन इतिहासाच्या अभ्यासाचा व्यासंग सुद्धा अतुलनीय असाच होता. असा प्रकांड अनुभव असलेला 'वृत्तपत्र, दैनिकाचा संपादक' होणे नाही . संपूर्ण मराठी आणि इतर भाषिक वाचकांची मानसिकता घडवीली, त्याला दिशा देणे याचे महान कार्य गोविंदराव तळवलकर यांनी केले.
* मैत्र जीवाचे अर्थात बाबांचे श्वानप्रेम
मी, गोविंदराव तळवलकरांची ' कनिष्ठ कन्या 'सुषमा’. अगदी लहानपणापासूनच बाबांचे पशुपक्ष्यांशी आंतरिक नाते होते. घरी आम्ही नेहमी कुत्रा पाळायचो कारण सर्वांनाच कुत्र्यांविषयी प्रेम होते. कुत्र्यालाही राग-लोभ, प्रेम सर्व काही असते, असे बाबांना वाटायचे. ‘कुत्र्यांची आवड’ या समान धाग्यामुळे बाबांनी ‘व्हर्जिनिया वूल्फवर’ लेख लिहिले. त्यांना ‘राजहंस आणि मोर’ ह्यांची सुद्धा विशेष आवड व प्रेम .
दिसायला चांगले, रुबाबदार, भरदार आवाजाचे - सिली, मोती, लॅबे्रडॉर-टायगर असे वेळोवेळी कुत्रे आम्ही पाळले होते. आईने केलेले आमरस-पुरीचे जेवण सुद्धा त्यांना आवडत असे. आमच्या बाबांवर त्यांचा विशेष लोभ ते घरी आले की त्यांच्या अवतीभवती, बाजूलाच किंवा पायाशी हक्काने ते बसून रहात.
शिवाजी महाराजांच्या खंड्या कुत्र्याची समाधी रायगडवर आहे. या स्वामिनिष्ठ कुत्र्याने महाराजांचे देहावसान झाल्यानंतर त्यांच्या चितेत उडी घेतली होती. याचे बाबांना फार कौतुक होते. राम गणेश गडकर्यांनी ‘राजसंन्यास’ हे नाटक खंड्या कुत्र्याला अर्पण केले आहे. हे त्यांना फार प्रशंसनीय वाटायचे. H.M.V. कंपनीच्या ध्वनीमुद्रिकेवरील मालकाचा आपुलकीने आवाज ऐकणारा कुत्रा पाहून त्यांना कौतुकच वाटायचे.
गोविंद तळवलकरांना पत्रकारिता आणि साहित्याला वेळोवेळी अनेक पुरस्कार लाभले आहेत त्यातील काही महत्वाचे पुरस्कार)

आमचे बाबा गेले- बाबांची प्राणज्योत मालवली-. (21 मार्च २०१७).- डॉ. निरुपमा’
दोन अडीच वर्षांच्या आमच्या आईच्या आजारपणामुळे बाबांचे रोजचे फिरणे बंद झाले. त्यांना सतत तिची काळजी असायची. दु:ख आणि त्याचबरोबर एकटेपण. तरीही ते सतत वाचन व लिहीत असायचे. 2 ऑगस्ट २०१४ ला आईच्या निधनानंतर मात्र ते पार खचून गेले आणि परत सावरलेच नाहीत. मनाने तेही आईबरोबर गेले होते. त्यावेळी भारतात यायची त्यांना तीव्र इच्छा होती, पण शरीर साथ देत नव्हते.
गोविंद तळवलकर ह्यांच्या मुलींनी त्यांच्या शेवटच्या दिवसाचे वर्णन किती ह्द्य केले आहे पहा ! कोणालाही पाझर फुटेल असा ! डॉ. निरुपमाच्या निरूपमच्या शब्दातच हे ऐकूया.
जानेवारी २०१७ पासून बाबा रात्री कधीच नीट झोपले नाहीत. आई, आई किंवा शकुन, शकुन असा आक्रोश करायचे. त्या दिवशी मंगळवारी 21 मार्च २०१७ मध्ये डोळ्यांच्या डॉक्टरची अपॉइंटमेंट होती. आता यापुढे आपल्याला वाचता येणार नाही ह्या कल्पनेनेच त्यांना रात्रभर झोप लागली नव्हती. आणि दुपारी अचानकच बाबांची शुद्ध हरपली. कृत्रिम श्वासोच्छवास सुरु केला होता. सर्व तर्हेच्या उपाययोजना केल्या पण यश आले नाही. संध्याकाळचे पावणेपाच वाजले आणि आमचे बाबा गेले. आता ते आमच्याशी कधीच बोलणार नव्हते.
आमचे मन इतके सुन्न झाले की, आम्हाला काहीच समजेनासे झाले. आम्ही सुद्धा आता जिवंत नाही, आमचा ह्या जगाशी काही संबंध राहिला नाही. असे आम्हाला वाटले. ‘अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा’ याची प्रचिती आली.


असार जीवित, केवळ माया असे सगळेच विझून गेले, अंधारात गढले, अचेतन झाले. सर्वच हरपले. संध्याकाळ होऊन नगरात नवलाख दिवे लागले होते, पण सूर्य मावळून गेला होता. आपल्याला असा अकस्मात मृत्यू यावा, रेंगाळू नये असे ते म्हणत, तसा तो आला. काळोखाच्या रजनीने सर्व घेरून टाकले होते. विषण्णतेची काजळी पसरली होती. युगान्त झाला होता.
बाबांची प्राणज्योत मालविली, पण लेखन रुपाने त्यांचा ज्ञानमय प्रदीप चिरकाल प्रज्वलित रहाणार आहे. लोकांना मार्गदर्शन आणि आनंद देणारा आहे.
लोकसत्ता (लोकरंग) २६ मार्च २०१७ त्यांच्या निधनानंतरचा त्यांच्यावरील लेख
‘व्रतस्थ आणि वृत्तस्थ’ - अंबरीश मिश्र (1)
“राजा मरण पावल्यावर इंग्लंडमध्ये ‘द किंग इज डेड, लाँग लिव्ह द किंग’ असा जाहीर पुकारा करण्याची एकेकाळी पद्धत होती. राजा मरण पावलाय आणि नव्या राजाला उदंड आयुष्य लाभो, असा या एका ओळीचा दुहेरी अर्थ. गोविंदराव तळवलकर यांची जागा घेणारा कुणी आसपास दिसत नाही. तेव्हा, ‘तळवलकर इज डेड, लाँग लिव्ह तळवलकर,’ असं म्हटलं पाहिजे”.

तळवलकर म्हणजे जणू ‘राजा’ माणूस. संपादक हा रुबाबदार असतो हे तळवलकरांमुळे संपूर्ण महाराष्ट्राला समजलं. त्यांच्यामुळे न्यूज रुमला व्यावसायिक शिस्त लागली. पेपरवाले गबाळे, पेपरची दुनिया गचाळ, डोकेफिरु संपादक, विसरभोळा उपसंपादक आणि बिलंदर रिपोर्टर हे बातमीदारीचं स्टिरीओटाईप चित्र तळवलकरां मुळे पालटलं. त्यांनी मराठी पत्रसृष्टीला दर्जा मिळवून दिला.
तळवलकर सर्वार्थाने पैलवानच होते. त्यांच्यात पीळ, लिखाणात पीळ. एका मोठ्या काळावर त्यांचा शिक्का होता. देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय देशात त्यांना मान होता. तळवलकरांनी स्वकष्टानं प्रतिष्ठा मिळविली आणि अखेरपर्यंत ती टिकवली. त्यासाठी योग्य ती पथ्ये पाळली. सभा संमेलनापासून दूर राहिले. झगमगाट, माणसांची गर्दी टाळली. वाचनाचं, लिखाणाचं व्रत पाळलं. सगळ्याच राजकीय नेत्यांची त्यांची मैत्री होती परंतु राज्यसभेसाठी कधी डाव टाकला नाही. ते आपल्या मानात जगले. स्वत:भोवती एक संरक्षक भिंत बांधून जगले. टीकाकारांची फारशी पर्वा केली नाही. बातमीदारीला व्यासंगाची जोड दिली म्हणूनच ते व्रतस्थ होते आणि वृतस्थही.
आपलं वर्तमानपत्र मराठी माणसांसाठी आहे. याचं एक सजग भान त्यांना अखेरपर्यंत होतं. विनाकारण इंग्रजीची झूल मराठीवर चढविली नाही. तळवलकरांच्यात एक Vanity होती ती त्यांना शोभून दिसत होती. जीवनसन्मुख होते ते. उत्तम खाण्यापिण्याची आवड आणि टापटिपीनं रहायची सवय. वार्ताहारांनी सुद्धा टापटिपीनं असलं पाहिजे असा त्यांचा कटाक्ष. Sense of Humour जबरदस्त. चेहर्यावरील एक रेषही न हालता विनोद सांगण्याचं त्यांच कसब भारी होतं.
‘न्यू थिएटर्स’ चे बंगाली सिनेमे हा त्यांचा सॉफ्ट स्पॉट (Spot) होता. त्यांच्यापाशी बुद्धीवैभव तर होतचं पण व्यवहार ज्ञानही भरपूर होतं. जगण्याची रग होती. वैचारिक शिस्त होती. अखेरपर्यंत लिहिते राहिले. विचारांची लढाई विचारांची लढाई विचारांनीच केली पाहिजे यावर त्यांचा दृढविश्वास होता. ते खर्या अर्थाने भारतीय गणराज्याचे ‘राखणदार’ होते. अन् मुख्य म्हणजे त्यांचं कसदार दाणेदार सररशीत मराठी यापैकी आपल्याकडे काय आहे? का नुसतच मिरवणं आभासी!
(या संकलनात प्रस्तुत केलेले संगीत आणि गाणी ही, महान आणि निर्भीड वृत्तपत्रीय कारकीर्द, भारतीय आणि जगाच्या इतिहासाचे अभ्यासक म्हणून विकास पावलेल्या व्रतस्थ बुद्धिवंताचे, गोविंदराव तळवलकर ह्यांचे भावविश्व साकार करण्याचा हा प्रयत्न आहे)
वासंती गोखले- अंधेरी (पूर्व)
मला मुलगी असती तर तिने असेच केले असते ! माझ्या मनात विचार चमकून गेला. या चार दिवसातल्या दवाखान्याच्या वास्तवातला हा सर्वात सुंदर क्षण ! कारण माझ्या नजरेतला ‘बाप ‘ खोटा नव्हता ,आणि तिचे ते स्माईल ’कॉर्पोरेट‘ नव्हते .
कुछ मीठा हो जाय’ असो कि ‘पप्पू पास हो गया’ असो, कॅडबरी ब्रँड जाहिरातीतही आपला एक उच्च असा दर्जा सांभाळून आहे. ‘कुछ खास है हम सभी में’ ची सिरीज आठवते ? सुमारे 15-20 वर्षांपूर्वीची ती जाहिरात मालिका रसिकांना विसरणं अशक्यच. त्या मालिकेला जागतिक स्तरावरील उत्कृष्ट जाहिरातीचा प्रथम पुरस्कार मिळाल्याचं कुठंतरी वाचण्यात आलं होतं.
Copyright © 2025 | Marathisrushti