(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ती त्या दिवशी माझा नंबर घेऊन गेली

    ती त्या दिवशी माझा नंबर घेऊन गेली ती गेलीच. मी पण विसरून गेलो, म्हणा अशा अनेक भेटतात ..

      July 1, 2021


  • वेगळा भाग ११

    प्रेम हि एक अशी गोष्ट आहे ती कधी कुणालाहि कुणाबद्दलहि वाटू शकते , प्रेमाला रंग -रूप कळत नाही कि जात-पात कळत नाही कि गरीब- श्रीमंत हि कळत नाही , त्या  दोघांमध्ये  नेहमी एक अखंड प्रेम करत असतो आणि दुसरा त्याला  प्रतिसाद देत असतो.

      July 28, 2022


  • गावाकडची अमेरिका – अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे चित्रण

    सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण भागात गेली १२ वर्षे वास्तव्याला असलेल्या डॉ. संजीव चौबळ यांनी केलेले अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण. अमेरिकेतील मोठमोठ्या शहरांमध्ये रहाणार्‍या बहुतांश मराठी लोकांनीही ग्रामीण अमेरिकेचा हा पैलू अनुभवलेला नाही. भारतात राहून अमेरिकेची झगझगीत आणि भव्यदिव्य कल्पनाचित्रे रेखाटणार्‍या मंडळींना हे पुस्तक वाचून वास्तवाचे नक्कीच भान येईल.

      July 16, 2011


  • अल्पोपहार (संक्षिप्त रूपांतरीत कथा २४)

    मी नाट्यगृहात बसलो होतो.
    तिने मला पाहिले व बोलावून घेतले.
    मी तिला ह्यापूर्वी पाहिल्याला अनेक वर्षे झाली होती.
    तिचे नाव सुध्दा माझ्या लक्षांत नव्हते.
    तिच्या बोलावण्यावरून मध्यंतरात मी माझी जागा सोडून तिच्या बाजूला जाऊन बसलो.
    तिने उत्साहाने बोलायला सुरूवात केली, “काळ किती भराभर जातो नाही ?
    आपण प्रथम भेटलो त्याला अनेक वर्षे झाली, नाही कां ?
    तुला आठवतंय आपण प्रथम भेटलो, तेव्हां तू मला भोजनाचं निमंत्रणच दिलं होतं !”
    मला चांगलंच आठवलं.
    वीस वर्षांपूर्वीची ती गोष्ट होती.
    मी मुंबईत रहात होतो.
    मुगभाटातील एका मित्राबरोबर खोली भागीदारीने भाड्याने घेतली होती.
    जेमतेम दोन वेळचं जेवण आणि जागेचं भाडं भरण्याएवढीच माझी कमाई होती.
    तिने माझं एक पुस्तक वाचलं होतं आणि पुण्याहून मला त्यासंबंधी पत्र लिहिलं होतं.
    ती बंगाली होती पण पुण्यांत राहून तिला मराठी उत्तम येत असे.
    तिचं नांव लिली होतं.
    मी तिला धन्यवाद देणारं छानसं उत्तर पाठवलं होतं.
    मग तिच्याकडून दुसरं पत्र आलं होतं.
    ती मुंबईत येणार होती.
    ती खरं तर पालघरला जाणार होती.
    पण मला मान्य असल्यास मला भेटण्यासाठी मुंबईत थांबणार होती.
    ‘ताजमधे तिला अल्पोपहार देणं मला जमेल कां ?’ असंही तिने पुढे विचारलं होतं.
    ताज म्हटल्यावर तुम्हाला कल्पना आलीच असेल.
    परदेशी पाहुणे, मोठे सरदार, उद्योगपती, इ. लोकांचा राबता असलेल्या त्या हॉटेलात कधी पाय ठेवायचाही मी विचार केला नव्हता.
    चैन म्हणजे छत्रेंच्या हॉटेलमधे मिसळ खाणे, एवढीच माझी धांव.
    पण लिलीच्या स्तुतीने मी भाळलो होतो.
    शिवाय एखाद्या स्त्रीला नकार कसा द्यायचा ते अजून शिकलो नव्हतो.
    मी विचार केला की माझ्याकडे थोडी शिल्लक होती व नुकताच एका प्रकाशकाकडून अागाऊ रक्कम मिळाली होती.
    साधारण तीन हजार रूपये माझ्याकडे होते.
    त्यापैकी दोन हजारात ताजमधला अल्पोपहार (त्या काळच्या किंमतींनुसार) सहज होईल. राहिलेल्या हजारांत महिना कसाबसा भागवू.
    चहा पिणे महिनाभर बंद करायला लागेल, इतकंच.
    मी उत्तरादाखल तिला लिहिलं की ताजमधे तिला अल्पोपहार देणं सहज शक्य आहे.
    “आपण येत्या गुरूवारी साडेबारा वाजतां ताजमधेच भेटू.”
    आणि आम्ही भेटलो.
    ताजमधेही वेगवेगळ्या वैशिष्ट्याची वेगवेगळी रेस्टॉरंटस आहेत.
    पण सुदैवाने मी पसंत केलेलं इंडीयन रेस्टॉरंट तिने चालवून घेतलं.
    मला वाटलं होतं तितकी ती तरूण नव्हती.
    तिचं वय पस्तीशीच्या आसपास असावं.
    सारखं हंसून ती आपले दात जरा जास्तच वेळा मला दाखवत होती.
    असं निदान मला आपलं वाटलं.
    ती खूप बोलत होती पण ती माझ्याबद्दल बोलू इच्छित होती.
    त्यामुळे मी तिचा श्रोता व्हायला तयारच होतो.
    एका सुटातल्या मॅनेजरने मेनु आणून ठेवला.
    ताजमधे ऑर्डर घेणारे आणि पदार्थ आणून देणारे वेगळे होते.
    हे मी प्रथमच पाहिले.
    मी मेनुवरून नजर फिरवतांना उजवीकडच्या किंमतींवरून नजर फिरवू लागलो आणि मला धक्काच बसला.
    माझ्या कल्पनेपेक्षा त्या बऱ्याच जास्त होत्या.
    तेवढ्यात लिली म्हणाली, “मी ह्यावेळी फारसं काहीच खातं नाही.”
    मी उसन्या औदार्याने म्हणालो, “अस्सं कसं ! कांहीतरी घे.”
    “एखादाच पदार्थ घेईन मी. मी एकापेक्षा जास्त काही एकाच वेळी खात नाही.
    मला वाटतं की लोक हल्ली फारच खातात.
    असं कर, एक बोनलेस फीशची डीश सांग.”
    मी आशा करत होतो की असा पदार्थ इथे नसेलच.
    पण वेटर म्हणाला, “आहेत ना, अगदी ताजे मासे आणलेत थोड्या वेळापूर्वी.
    एका डीशमधे दोन मोठ्या तुकड्या येतील.
    फक्त तयार व्हायला थोडा वेळ लागेल.
    बाईसाहेब, तोपर्यंत वेळ घालवायला काहीं आणू कां ?
    एखादं ॲपेटायजर?”
    ती म्हणाली, “नाही, एकावेळी मी एकच पदार्थ खाते पण जर जास्तच वेळ लागणार असेल तर कोणतंही ॲपेटायजर आणा आणि तुमच्याकडे माशाची गाभोळी खायला तयार असेल तर ती आणा. ती पचायला हलकी असते.”
    माझ्या छातीत थोडी धडधड झाली.
    हे सर्व अत्यंत महागडे पदार्थ होते.
    मग मी माझ्यासाठी सगळ्यात स्वस्त पदार्थ म्हणजे बटाटे वडा पाहिला आणि सांगून टाकला.
    ती म्हणाली, “तू चूक करतोयसं. उगीचच तेलकट आणि जड पदार्थ मागवू नको.
    असलं खाणं खाल्ल्यावर काम कसं करणार ?
    मला स्वत:चं पोट असं फुगेपर्यंत खायला नाही आवडत.
    शिवाय ताजमधे बटाटेवडा काय खातोस ? दादरला काणेंकडे बटाटेवडा चांगला मिळतो.”
    तिची खाण्याबद्दलची माहिती अद्ययावत होती.
    मग कांही पिण्याचा प्रश्न आला.
    ती म्हणाली, “दुपारच्या वेळी मी नाही ‘ड्रींक’ घेत.”
    मी घाईघाईने म्हणालो, “मी ही नाही कांही घेत.”
    माझ्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत ती म्हणाली, “अपवाद म्हणून सफेद वाईन घेते कधी कधी.
    फ्रेंच वाईन असेल इथे बहुदा.
    त्या इतक्या हलक्या असतात की त्रास तर होत नाहीच पण पचनाला मदत करतात.”
    इथे तिने आपली दंतपंक्ती पुन्हा मला दाखवली.
    आता मला विचारणे भाग होते, “काय मागवू तुझ्यासाठी ?”
    आदरातिथ्याचा भाग म्हणून मी विचारले.
    आता भावना आधीच गोठल्या होत्या.
    “माझ्या डॉक्टरांनी मला शॅम्पेनशिवाय इतर मद्य घ्यायला मनाई केली आहे.” ती म्हणाली.
    माझा चेहरा थोडा पांढरा पडला पण मी अर्धी शॅम्पेन मागवली व म्हणालो, “माझ्या डाॅक्टरांनी मला शॅम्पेन प्यायला पूर्ण मनाई केली आहे.”
    तिने विचारले, “मग तू काय पिणार आहेस ?”
    मी म्हणालो, “पाणी.”
    मग तिने ॲपेटायजर संपवलं, माशांची गाभोळी खाल्ली, बोनलेस फिश खाल्लं.
    ती मजेंत साहित्य, संगीत, कला, इ. बद्दल बोलत होती.
    मी बिल किती येईल ह्याचा विचार करत होतो.
    जेव्हा माझे बटाटेवडे आले, तेव्हा तिने मला पुन्हां चांगलेच खडसावले.
    “अच्छा, म्हणजे तू जेवणाच्या वेळी अशा पचायला जड वस्तू खाऊन प्रकृती खराब करून घेतोस तर !
    ही घोडचूक आहे तुझी.
    तू माझ्यासारखं कां करत नाहीस ?
    एका वेळी एकच पदार्थ खायचा.
    तुला त्याने खूप छान वाटेल.”
    वेटर परत मेनु घेऊन आला, तेव्हां मी म्हणालो, “मी फक्त एकच पदार्थ खातो.”
    तिने वेटरला बाजूला बोलावले व मेनु घेत म्हणाली, “छे ! छे ! मी दुपारच्या जेवणावर काहीच दुसरं घेत नाही.
    फक्त एक चावा, तो सुध्दा केवळ बरोबरच्या व्यक्तीशी संवाद चालू रहावा म्हणून.
    आता मी आणखी कांही खाऊ शकत नाही फक्त जर ती शतावरी भाजीची स्पेशल डीश असेल तर चालेल कारण ती मुंबई शिवाय इतरत्र मिळत नाही.
    मुंबईत येऊन ती न खाता जाणं म्हणजे मुंबईचा अपमान होईल.”
    आता माझं काही खरं नव्हतं.
    मुंबईच्या बाजारांत दहा रूपयाला एक जुडी मिळणारी भाजी मोठ्या हॉटेलात गेली की खूपच महाग होते असं मी ऐकून होतो.
    मी वेटरला म्हणालो, “बाईसाहेबांना तुमच्याकडे शतावरीची भाजी आहे की नाही ते जाणून घ्यायचय.”
    हे वाक्य मी ‘नाही’ वर जोर देत बोललो, जेणेकरून वेटरने “नाही” म्हणावे.
    पण एखादा चमत्कार पाहून येईल तसे त्याच्या चेहऱ्यावर हास्य पसरले.
    तो म्हणाला, “बाईसाहेब, आजच ताजी ताजी लांब, कोवळी आणि छानशी पाने आली आहेत.
    तुम्ही नशीबवान आहांत.”
    ती म्हणाली, “मला बिलकुल भूक नाही पण आता तुम्ही म्हणताच तर मी खाईन थोडीशी ! तूही घेणार ना !”
    मी म्हणालो, “नाही. मी असली पालेभाजी कधीच खात नाही.”
    ह्यावर ती म्हणाली, “मला माहित आहे की कांही जणांना पालेभाज्या आवडत नाहीत पण असे लोक कितीतरी पाचक आणि सत्त्वयुक्त अन्नाला मुकतात.”
    आम्ही पालेभाजी शिजण्याची वाट पहात होतो.
    मी भीतीने सर्द झालो होतो.
    माझं आजचं बजेट तर केव्हाच कोलमडलं होतं पण आता महिनाभर फांके मारायला लागणार, हे नक्की झालं होतं.
    निदान माझ्या खिशातले तीन हजार रूपये आताच बिल द्यायला तरी पुरे पडणार की नाही ही शंकाच होती.
    जर बिल भरताना पाच पन्नास कमी पडले तर हा विचार भयानक होता.
    माझ्या पाहुणीकडेच मला पैसे मागावे लागले असते.
    मला ते आवडले नसते.
    मी ठरवले की बिल जर खिशातल्या पैशांपेक्षा जास्त आले तर खिशात हात घालायचा आणि मोठ्याने नाटकी ओरडायचे, “माझे पाकीट मारले कोणीतरी!” मग तिलाच बिल भरायला सांगायचे.
    तिच्याकडेही पैसे नसले तर मग माझे घड्याळ आणि चेन तिथे गहाण ठेवायची आणि मग पैसे आणून देऊन वस्तू परत घ्यायच्या.
    तिच्यासाठी शतावरीची अमूल बटरमधे केलेली गरम गरम भाजी आली.
    लांब कोवळी पाने छान सजवलेली होती.
    ती निर्लज्ज बाई अगदी आरामात ते खाऊ लागली.
    वाफाळलेल्या भाजीतील तो अमूल बटरचा वास माझ्या नाकांत शिरत होता.
    शेवटी तिची भाजी संपली.
    “कॉफी ?” मी विचारले.
    ती शांतपणे म्हणाली, “हो, आईस्क्रीम आणि कॉफी.”
    आता मी बिलाची काळजी करणे सोडले होते.
    मी माझ्यासाठी कॉफी आणि तिच्यासाठी कॉफी आणि आईस्क्रीम मागवले.
    आईस्क्रीम खाता खाता ती म्हणाली, “तुला ठाऊक आहे, मी नेहमी ह्या वाक्यावर विश्वास ठेवते की जेवणावरून उठतांना तुमची थोडी भूक शिल्लक पाहिजे. आणखी थोडं खाता आलं असतं हा विचार मनांत ठेऊन पानावरुन उठावं, असं म्हणतात.”
    मी तिला घाबरत विचारले, “अजून भूक आहे तुला ?”
    ती म्हणाली, “नाही, नाही. मी तर बाई लंचच्या वेळी फारसं खातच नाही.
    मी सकाळी कॉफी घेते आणि नंतर डीनरनंतर घेते पण लंचच्या वेळी एकच पदार्थ खाते.
    मी तुझ्यासाठी ते सांगत होते.”
    मी म्हणालो, “अच्छा ! माझ्यासाठी होय.”
    कॉफी आणि आईस्क्रीमचा समाचार घेऊन झाला न झाला, एवढ्यांत एक माझ्या दृष्टीने भयानक गोष्ट घडली.
    एक ताजची टोपी घातलेला मुलगा एक फळांची टोपली घेऊन आमच्याच टेबलाजवळ आला. त्यांत रसाळ पीच फळे होती.
    ती फार महाग असतात.
    युरोपहून इथे येतात.
    पण हा तर त्या फळांचा सीझनही नव्हता. ,म्हणजे ती खूपच महाग असणार.
    ती मला म्हणाली, “हे बघ, तू वडे खाऊन पोट भरून टाकलयस.
    तेव्हा तुला कांही आता खाता येणार नाही पण मी फक्त एकच पदार्थ खाल्ल्यामुळे मी ह्या एका फळाची चव घेणार आहे.”
    तिने एक फळ उचललं व खायला सुरूवात केली.
    बिल आलं आणि मी पैसे भरले तेव्हा माझ्या लक्षांत आलं की पुरेशी टीप द्यायलाही माझ्याकडे पैसे नाहीत.
    मी उरलेले केवळ तीस रूपये टीप म्हणून ठेवले व आम्ही उठलो.
    तिच्याकडे मी पाहिलं तर तिची हांवरी नजर त्या डीशमधल्या तीस रूपयांवर खिळलेली मला दिसली.
    मी मनांत विचार करत होतो की खिशात दमडी नसतांना संपूर्ण महिना कसा काढायचा ?
    बाहेर पडून निरोप घेताना ती म्हणाली, “माझं उदाहरण डोळ्यांसमोर ठेव. फक्त एकच पदार्थ दुपारी लंचच्या वेळी खा.”
    मी म्हणालो, “मी त्याहीपेक्षा अधिक काही करीन. आज रात्री जेवणारच नाही.”
    ती टॅक्सीत बसतां बसतां म्हणाली, “विनोदी आहेस तू ! खरंच ! भीषण विनोदी. बाय.”
    त्यावेळी मला राग आला पण मी कांहीच करू शकत नव्हतो.
    तिने माझा सहज बकरा बनवला होता. ताज हे कांही तिचे नेहमीचे स्वतःच्या पैशांनी जायचे ठिकाण नव्हते.
    स्त्री दाक्षिण्य, मैत्री, लेखक म्हणून मला दिलेला भाव ह्या सर्वांमुळे मी माझी अक्कल गहाण टाकून माझी दोन तीन महिन्यांची कमाई तेव्हा खर्च करून बसलो होतो.
    त्यानंतर मी तो महिना उधारी करून, उपास करून कसाबसा काढला होता.
    पण आज लिलीकडे पहातांना मला थोडंसं समाधान वाटतंय कारण अल्पोपहाराला एकच पदार्थ खाणाऱ्या, तेव्हांची जेमतेम एकूणपन्नास- पन्नास किलो वजन असलेल्या लिलीचा, तिच्या खादाड आणि फुकटखाऊ वृत्तीमुळे, आता चांगला १३२ किलोंचा मोठा गोल गरगरीत भोपळा झालेला मला समोर दिसत होता.
    -- अरविंद खानोलकर.
    मूळ कथा - द लंचॉन
    मूळ लेखक - डब्ल्यू सॉमरसेट मॉम(१८७४ - १९६५)
    तळटीपः मॉमचीच आणखी एक छोटी आणि हलकी फुलकी गोष्ट सादर केली आहे. परंतु त्यावरून मॉम ह्या लेखकाविषयी गैरसमज करून घेऊ नये. त्याच्या कादंबऱ्या व कथांवर एकूण ४६ चित्रपट आले व त्याला ग्रँड मॅन ऑफ ओल्ड लेटर्स असं म्हटलं जातं.

      June 12, 2022


  • आग्यामव्हळाचा भडका अन वानरायचा तडाखा !

    सोंडू पाटलाच्या शेतातं भैमूंग सोंगायची लगबग चालू व्हती.नव्हाळीच्या चार शेंगा लेकरायच्या तोंडी लागतील मणून सगळं गांव पाटलाच्या शेतात उलथलं व्हत.त्याल कारणबी तसच होतं.सोंडू पाटील गावातला दिलदार माणूस समजला जायचा,पण परतेक्षात मात्र त्यो लयचं बेरकी आन धुर्त व्हता.!

      February 4, 2026


  • अ. भा. मराठी नाट्य परिषद, ठाणे शाखेचा प्रवाह

    ठाण्यातील समाजातून वेगवेगळे कलाकार निर्माण झाले पाहिजेत हीच जिगिषा, तळमळ मनांत ठेवून वि. रा. परांजपे व सन्मित्रकार स. पां. जोशी या द्वयींनी पुढाकार घेऊन अ.भा.म.ना. परिषद, ठाणे शाखेची स्थापना १ ऑक्टोबर १९७९ रोजी केली. तो विजया दशमीचा शुभ दिवस होता.

      July 15, 2022


  • राम कहाणी !

    मोहन्याच्या पावलांचा आवाज दूर गेल्यावर , रामा अंदाजे आपल्या घराकडे वळला . हातातली काठी हलकेच जमिनीवर आपटून पहिली . उघड्या पायाच्या तळव्याने अदमास घेत सराईतपणे घरा समोरची नाली ओलांडली . चार पावलावर अपेक्षे प्रमाणे घराच्या पायऱ्या लागल्या . एक ,दोन ,तीन तो पायऱ्या चढून गेला . हात सावध पणे समोर केल्यावर हाताला लाकडी दराचा स्पर्श झाला . हलका हात फिरवून आपल्याच घराचे दार असल्याचे त्याने खात्री करून घेतली . अन मग कडी वाजवली .

      June 11, 2018


  • जसबीरची फरफट

    अमिताभ बच्चन बरोबर ‘डाॅन’, ‘द ग्रेट गॅम्बलर’, ‘पुकार’, ‘महान’, ‘दोस्ताना’, ‘लावारिस’ चित्रपटात तिची केमेस्ट्री छान जुळली. फिरोज खानच्या ‘कुर्बानी’ चित्रपटातील तिच्यावरील चित्रीत ‘आप जैसा कोई, मेरे जिंदगी में आए..तो बात बन जाए..’ या नाझिया हसनच्या गाण्यामुळे ती चित्रपटाचा केंद्रबिंदू ठरली.

      March 4, 2022


  • पासिंग मुंबई !

    इन्स्पेक्टर राघवचे अंडरवर्डचे नेटवर्क जबरदस्त होते.गुप्तहेर संघटनेचा सिक्रेट मेसेज आलेच होता. काहीतरी गडबड होणार याची त्याला जाणीव होती. ड्रग्स ,सोने किवा हत्यारे मुंबई पास करण्याची शक्यता होती. हल्ली कल्पनाही करता येणार नाही अशे रुट्स हे स्मगलर्स वापरत आहेत. राघवने आपल्या इंफोर्मेर्सना ‘लक्ष’ठेवण्यास वार्न केले होते.

      September 6, 2018


  • काळाची काठी !

    एका सभागृहामध्ये सत्संगचा कार्यक्रम होता. मी त्याचा आस्वाद घेण्यसाठी गेलो होतो. हालके हालके श्रोते जमू लागले. प्रवेश दारावर मी आलो. अचानक माझी नजर एका छोट्या किड्यावर पडली. दाराच्या बाजूस तो पडला होता. त्याच्या हालचाली वरून त्याला दुखापत झालेली असावी असे वाटले. त्याची तगमग चालू असून तो उलटा पडलेला होता. त्याच्या अवस्थे विषयी भूतदया वाटली. क्षणात एक विचार आला की हा किडा दाराजवळ पडलेला आहे, लोकांची जा ये चालू आहे. दुर्दैवाने कुणाच्यातरी पायंदळी तो चिरडला जाईल. मी त्याला एका काडीवर उचलून बागेतल्या एका छोट्या झाडावर नेऊन ठेवले. मानसिक समाधान वाटले, की आपण त्याला त्यावेळी तरी मृत्यूपासून दूर नेले. पण केवळ कांही क्षणच गेले असतील, एक पक्षी तेथे झेपावून आला व त्याने त्या किड्याला अलगद उचलून नेले. एका जीवाचा अंत होताना दिसला. माझे मन खंतावले. माझा तर्काधीष्टीत हिशोब चूक वा बरोबर? समाधान हे देखील एक मानसिक शास्त्र असते. निर्माण झालेली परिस्थिती माणूस बदलू शकत नाही. परंतु त्याला वेगळा मार्ग देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या विचारांचे जे स्तर असतील त्याप्रमाणे तो योजना आखण्याचा विचार करतो. निसर्गाला मात्र तसेच अभिप्रेत असेल असे नाही. निसर्ग आपली चाल त्याच्याच पद्धतीने चालू ठेवतो. येथेच वैचरिक विविधता निर्माण होते. काळाच्या हाती एक दंडक (काठी) असतो असे म्हणतात . ज्याच्या एका टोकावर स्थळ व दुसऱ्या टोकावर वेळ ही कोरलेली असते. जेंव्हा एक टोक स्थळ निर्देश करते, त्याच वेळी दुसरे टोक वेळेची चाहूल टिपते. जीवनाच्या अंतिम मार्गावर स्थळ आणि वेळ यांची विधात्याने नोंद केलेली असते. म्हणूनच ते प्रत्येकाला अनिश्चित घटना परंतु निश्चत सत्याकडे नेते. काळाचा दंडक स्थळ वेळ ह्याची जेथे गांठ पडेल तेथेच आघात करतो.

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      August 5, 2020