(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • कार्यकर्ता सत्तू

    (लेखक – ऍड. कृष्णा पाटिल, तासगाव, सांगली) साहेबांचा सत्तूवर खूप विश्वास. भरवशाचा कार्यकर्ता. आघाडीचा नेता. पक्ष वाढवावा तर सत्तूने. सत्तू म्हणजे साहेबांचा उजवा हात. सत्तू म्हणजे मुलुख मैदान तोफ. धाडसाचं दुसरं नाव सत्तू….

  • छंद 

    प्रसिद्ध लेखक व पु काळे त्यांच्या वपुर्झा या पुस्तकात असं म्हणतात कि, माणसाला काही ना काही छंद हवा. स्वप्नं हवीत. पुरी होणारी किंवा कायम अपुरी राहणारी. त्यातून तो स्वतःला हरवायला शिकतो. सापडायला शिकतो. हे ‘हरवणं-सापडणं’ प्रत्येकाचं निराळं असतं.

  • कूटकाव्य

    एक लावण्यवती तिच्या मैत्रिणीं सोबत पाणवठ्यावर गेली असतांना समोरून एक राजकुमार येतो आणि तिच्यावर मोहित होऊन तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, कसा दिसतोय मी ? तेव्हा राजकुमारी त्याला उत्तर देते …

  • काव्यगंधर्व `गदिमा’

    आद्य वाल्मिकी म्हणून ज्यांचा गौरव केला जातो असे महान कवि, गीतकार, पटकथाकार, अभिनेते गजानन दिगंबर माडगूळकर यांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ चा. त्यांची जन्मशताब्दी आज संपन्न होते आहे. त्यांनी बालगंधर्वांविषयी लिहिलेल्या ओळी (असा बालगंधर्व आतां न होणे) सुप्रसिद्ध आहेत. त्याच धर्तीवर मी गदिमां विषयी स्वरचित कांही ओळी खाली देत आहे.

  • जैत रे जैत 

    गो नी दांडेकरांनी लिहून ठेवलेल्या अनेक अजरामर कांदबर्यांपैकी जैत रे जैत हि ठाकरवाडीतल्या ठाकरांची विशेषतः नाग्या अन् चिंधीची प्रेमकथा. महादेवाच्या गळ्यात बांधलेल्या पोळ्यात विराजमान असलेल्या राणी या मधमाशीविषयीची सूडकथा.

  • माझी मेहबूबा (ललित लेख)

    साहित्यिक म्हणून माझी ओळख करून द्यावी लागत नाही, पाहता क्षणी मी लिहिणारा आहे, “कवी तर नक्कीच आहे ” ही ओळख करून देते ती माझी प्रिय सोबती- सखी आणि जिवलग मैत्रीण-

  • हुंदका…..

    शाळा सुटली होती. सर्व मुले वेगाने गेटकडे धावत सुटली होती. प्रत्येकाचे आई-बाबा मुलांना घ्यायला यायचे. ती मात्र ह्या सर्वच गोष्टी नुसतं पाहण्याचे काम करीत होती, तिच्या मनाला वाटणारी हुरहूर मात्र तिला नकळत रडवून जायची. आज कितीतरी दिवस झाले होते सुमनला तिची आई सोडून गेली त्याला.

    तिची आईच होती तिच्या आयुष्यात तिचे सर्वस्व... तिचे आई-बाबा आणि तिचा परिवारसुद्धा... दोघींचे अनोखे विश्व होते. सुमनचे बाबा ती दहा महिन्यांची होती तेव्हाच वारले होते. सुखवस्तू घरात तिचे लहानपण गेले होते. तिला कशाचीच कमी नव्हती. उणीव असायची ती केवळ तिच्या बाबाची. ती नेहमी तिच्या आईला विचारायची आई बाबा कसे दिसायचे? ते माझा खूप लाड करायचे का? त्यांना माझी आठवण येत असेल का? आई शाळेतील सर्वच मुली त्यांच्या बाबांसोबत येतात तेव्हा मला बाबाची खूपच आठवण येते गं... जेमतेम तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या सुमनचे शब्द ऐकून मात्र तिची आई सुन्न व्हायची. ती सुमनला बाबाच्या आठवणी सांगायची. असे करता करता अनेक दिवस निघून गेले. सुमन पाचवीला शिकत होती. सुमन अभ्यासात फार हुशार होती, त्याचबरोबर ती आईला मदत करायची. तिची आई लहान मुलांना शिकवायची. त्यातून मिळणारे पैसे ती सुमनच्या शिक्षणाला लावायची. सुमन फार हळवी होती. कुणाचेही दुःख पाहून लवकरच ती भावूक व्हायची. शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या आवडीची होती सुमन. तिला निसर्गात स्वतःला विसरून बेभान व्हायला आवडायचं, तर कधी ते बालमन तासनतास त्या वेड्या पाखरांचा लपंडाव पहायचे. ई... आई बघ की ते पाखरू किती उंच उडतंय... व्वा किती गं ही उंच भरारी... आई मलापण या पाखरासारखे उडावेसे वाटते. चल ना मला घेऊन कुठेतरी या जगाला विसरून या पाखरासारखं लपंडाव करायला, असे ती आईला म्हणत होती. आई मात्र त्या कोवळ्या बालमनाचे ते निरागस प्रश्न ऐकत होती.

    "जाऊ रे माझ्या राजा", असे म्हणत आई तिची समजूत काढत होती.

    तिला सुमनचा एकही शब्द मोडवेना पण कालपर्यंत सुखात वाढलेल्या या पोरीला कधीतरी तिला नाही म्हणावं लागेल याचे आईला फार दुःख व्हायचे. आता तर आणखीच भलमोठं संकट येणार होतं, असा ती विचार करते न करते तर बाहेर पोस्टमन आला पत्र घेऊन. जसे पत्र हाती पडले तशी तिच्या पायाखालची जमीन सरकली होती. ती घाबरून नुसतं पाहण्याचे काम करायची. सुमन आली, तिला हलवले, आई आई म्हटले तेव्हा कुठेतरी तिला जाग आली. तिने सुमनला घट्ट पकडून आक्रोश केला. सुमा... माझ्या बाळा, आता आपण कुठे जावे, कुठे राहावे मला काहीच कळत नाही रे माझ्या राजा... आई सुमनला सांगत होती कारण सुमनचे बाबा गेले तेव्हापासून तिच्या काकाने त्यांना घरातून जायला भाग पाडले होते. पण खूप विनंत्या करून त्यांनी आजपर्यंत राहू दिले कारण त्या काकाने सर्व संपत्ती धोक्याने मिळवली होती. त्याला थोडाही तरस येत नव्हता सुमा आणि तिच्या आईवर... आता त्याने ते घर विकले होते. त्या घरमालकाला आता घर पाहिजे होते त्याकरिता काहीपण करून उद्या घर सोडून जाणे भागच होते. सुमनची आई खूप रडत होती... तिला काहीच कळेना, काय करायचे ते... तिला सुमनच्या भविष्याची चिंता वाटू लागली. माझी लहान पोर घेऊन मी कुठे जाऊ... माहेरी अनाथ असलेल्या सुमनच्या आईला सुमनशिवाय कोणीच नव्हते. अगदी लहान वयात सुमनला काय करावं काही सुचेना.

    आसवांच्या पुरात ती रात्र निघून गेली होती. सकाळ झाली... सुमन डोळे चोळत उठली... आई आई करून आईला हाक मारीत होती पण तिला आई मात्र कुठेच दिसत नव्हती. ती बागेत गेली जिथे तिची आई तिच्यासोबत खेळायची... तिथेही तिला आई कुठेही दिसत नव्हती. शेवटी ही आई गेली तरी कुठे... तिला काळजी वाटू लागली. ती शेवटी आईला शोधत स्वयंपाकगृहात गेली तर पाहते तर काय तिची आई झोपलेलीच होती. तिला पाहताच लहान सुमन धावतच गेली... आई आई म्हणाली. आई काही उठेना... सुमन रडत होती. त्या दिवशी तिचा काका तिच्या आईला घरातून काढून देण्याच्या आसुरी आनंदाने पाहायला आला होता. त्या घराचे मालक आणि तो गेटवर उभे होते. आता कुठे जातील ह्या मायलेकी हे पाहण्यासठी तो आला होता. तो सुमनच्या आई-बाबाचा पक्का वैरीच होता. धोक्याने त्याने त्याची संपत्ती मिळवली होती, पण सुमनच्या आईला मात्र आता काहीच संपत्तीचा लोभ नव्हता, पण तिच्या काकाने सुमनच्या रडण्याचा आवाज ऐकला. त्यांना वाटलं घर सोडून जाण्याचा आवाज असेल... त्याच आनंदासाठी तो पाहण्यासाठी ते इथे आले होते. इकडे सुमन आईला हलवून हलवून थकली. तिचा आवाज ऐकून शेजारील बाया आल्या. त्यांनी सुमनला जवळ घेतले आणि त्यांनी एकच आक्रोश केला तिला पकडून... बाळ सुमा... तुझी आई गेली... आपल्या सर्वांना सोडून... सुमाला काय करावं काही सुचेना. रडण्याचा आवाज ऐकून तो राक्षसी प्रवृत्तीचा काका आला. तो आला तर खरं पण हा सर्व क्षण पाहून मात्र त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती, त्याच्यातील माणूस जागा झाला होता. सुमाच्या आसवांनी त्याला माणूस केले होते. त्याला हा आयुष्याचा विध्वंस पहावला नाही. तो लहान सुमनजवळ आला. त्याच्या आईचे पाय पकडून माफी मागत होता. त्याच्या बदल्याच्या वृत्तीमुळेच आज हा दिवस आला होता. बाळा... मला माफ कर, मी तुझी माफी मागतो. मी तुझ्या आईच्या आणि तुझ्या आयुष्याचा गुन्हेगार आहे, मी तुझ्या आईची माफी मागण्याच्या लायक नाही. बाळा पण आजपासून तूच माझं आयुष्य आणि तूच माझी खरी संपत्ती... असे म्हणून त्या दिवसापासून निरागस सुमाचे हसणे बोलणे गेले. होता केवळ हुंदका... जो फक्त ती जिवंत आहे याचा भास करून जायचा.

    आई गेल्यावर तिच्या काकाचा प्राण आणि सर्वस्व होती सुमन... पण तिच्यातील जीव आईसोबत गेला होता. आज ती मुलींना पाहते तेव्हा तिच्याजवळ असतो तो केवळ हुंदका आणि हुंदका आणि फक्त हुंदका...

    अॅड विशाखा समाधान बोरकर

  • आभास (दिर्घ कथा)

    अजयची बस रामगड थांब्यावर पोचली तेव्हा संध्याकाळचे सात वाजून गेले होते. रामगड हे एक छोटे तालुक्याचे गाव होते. दिवसभर कोसळणाऱ्या पावसाने आता थोडी विश्रांती घेतली होती. मात्र वातावरण कुंद होते व हवेत प्रचंड गारठा आला होता. बसच्या दिवसभराच्या प्रवासाने अजय खूप वैतागला होता.

  • जीवन ऋतु आनंदाचा….

    उगाच कोणाच्या  येण्याची  प्रतिक्षा  करित बसु नये, हा जिवनॠतू  आहे  क्षणाक्षणाला तो बदलत राहतो स्वतःच्या जीवनाशी सामर्थ्याने  लढत जीवनावर  भरभरून लिहिणारे  महान लेखक होऊन गेले  ,  आजही तेवढ्याच  नव्या तन्मयतेने लिहिताहेत. आणि लिहीत राहतील. कारण जीवन या शब्दातून नव्या प्रेरणेची ऊर्जा मिळते.

  • सुप्रभात by Mg Hector

    पुरुषांची गाड्यांबद्दलची craze, त्यांच्या भावविश्वात शिरून मांडायचा प्रयत्न केलाय.. झालाय का successful?