नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
राजकीय रंग चढलेल्या धर्माच्या अनागोंदी कारभाराचा समाचार घेणारी सॅक्रेड गेम्स ही विक्रम चंद्राच्या 2006 मध्ये आलेल्या त्याच नावाच्या इंग्रजी कादंबरीवर आधारित असणारी वेबसिरीज ‘सॅक्रेड गेम्स’चा दुसरा सीझन 15 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. अनुराग कश्यप व नीरज घायवान यांनी हा सीझन दिग्दर्शित केलेला असून कथा वरूण ग्रोवरने लिहिलेली आहे.
बरेच नानाविध छंद अनेकजण जोपासतात अन् त्याच छंदांना आपल्या जगण्याचं , उत्पन्नाचं साधन बनवतात. जो छंद आपण जोपासतोय त्याच क्षेत्रात काहीतरी करायला मिळणं याहून सुंदर अनुभव, समाधान आणि आनंद दुसरा कुठलाच नाही.
अर्धवट बांधकाम झालेल्या एका ३० मजली टॉवरला लोंबकळत असलेले प्रेत राजा विक्रमादित्याने आपल्या पाठीवरच्या सॅकमध्ये कोंबले आणि तो शासकिय शवागराकडे निघाला. प्रेतात बसलेल्या वेताळाने एक दीर्घ सुस्कारा सोडला अन् म्हणाला-
अंतू नानाला राजकारणाचा खूपच नाद होता. रात्रंदिवस राजकारणाची चर्चा. भाकरीचं गाठोडं घेऊन रोज तालुक्याला. कधी एसटीने. कधी वडापने. कधी कुणाच्या तरी गाडीवर बसून. रोज तालुक्याला जाऊन अंतू नाना काय करत होता हे कुणालाच माहीत नव्हतं.
अर्थात वर वर्णन केलेले ‘मिसळखाऊ’ आणि अशी ‘मिसळ’ मिळणारी हॉटेल तुम्हाला पुण्यात, कोल्हापुरात किंवा नाशकात नाही मिळणार. हा, ऊपनगरात मिळाली तर मिळतील. पण गावाकडे मात्र तुम्हाला हमखास अशी ‘प्रसिद्ध मिसळ’ची हॉटेल मिळतीलच मिळतील. हे झाले मिसळपुराण. पण हे मिसळ वाले ‘भाऊ’ ‘तात्या’ ‘रामा’ हे एक वेगळेच आणि त्यांच्या मिसळसारखेच चटकदार प्रकरण असते. आमचा मिसळवाला रामाही त्याला अपवाद नाही.
चित्रपटसृष्टीतील ज्या कलाकारांनी काळाची पावले ओळखली व त्या बरोबर स्वत:ला जुळवून घेतले ते चित्रपटसृष्टीत कायम स्थिरावू शकले. अरूणा ईराणीने हे ओळखले. त्या स्वत:च्या वयोमानानुसार भूमिका स्विकारत गेल्या. १९९२ मध्ये प्रदर्शीत झालेल्या “बेटा” मधील त्यांची सावत्र आई अप्रतिमच….सुरूवातीला गडद काळी असणारी ही व्यक्तीरेखा हळूहळू बदलत जाते आणि शेवटी मातृत्वाच्या झऱ्यात अकंठ न्हाऊन निघते. या भूमिकेसाठी त्यानां फिल्मफेअरचे उत्कृष्ट सहकलाकाराचा पुरस्कार मिळाला.
गावच्या पाटलाला चुकून आलेलं निजामाचे पत्र, पत्र आल्याने गावभर होणारी चर्चा, पाटलाचे पटवाऱ्याला घेऊन हैद्राबादला जाणं, तिथे त्यांची पोलिसांनी केलेली धरपकड आणि मग सुटकेचा थरार.
औरंगाबाद जळगांव रस्ता खराब आहे, हे समजायला मोठ्या हाॅस्पीटलमधे जाऊन पैसे खर्च करून घ्यावे लागतात, ही झालेली प्रगती काय कमी आहे ?
अरे जगण्याचं साधन आहे “विनोद”. वीनाखर्चीक आनंद/मनोरंजनाचे साधन आहे “विनोद”. ज्याच्या कडे तल्लख “विनोदबुद्धी” असते तो दुःखा पासून बऱ्यापैकी दूर राहू शकतो !
अरे जगण्याचं साधन आहे “विनोद” वीनाखर्चीक आनंद/मनोरंजनाचे साधन आहे “विनोद” ज्याच्या कडे तल्लख “विनोदबुद्धी” असते तो दुःखा पासून बऱ्यापैकी दूर राहू शकतो !
Copyright © 2025 | Marathisrushti