(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गांवमामा

    हा एक सत्य घटनेवर आधारित प्रसंग

    गोविंदमामा हे खऱ्या अर्थाने गांवमामा झालेले होते. शिकलेले आणि तडफदार व्यक्तिमत्व. अतिशय प्रेमळ स्वभाव आणि त्यागवृत्ती. कुणीही समोरच्या व्यक्तीबद्दल आदरभाव, मदत करण्याची आंतरिक इच्छा आणि सदैव हासत आनंदी स्वभाव. सर्वच सदगुणांचे मिश्रण क्वचितच एका व्यक्तीच्या अंगी सापडणे सहसा कठीण. म्हणूनच त्यांना आपल्या वागनुकीने सर्व समाज अर्थात ते रहात असलेले खेडेगांव गोविंदमामा ह्या टोपण नावानी संबोधित असे. स्वतःचे घर व कांही एकर जमीन होती. मुलगा व पत्नी जानकीबाई एवढाच परिवार. लहान कुटुंब व सुखी कुटुंब ह्या व्याख्येमध्ये सीमित.शेती हा प्रमुख व्यवसाय होता. गांवातील लहान सहान कामे करून पैसे मिळत ते मिळवीत. मुलगा मोठा झाला. शहारांत जाऊन वेगळा व्यवसाय करू लागला. शेती करण्यात त्याला न रुची ना सवड. लग्न झाल स्वत: चा वेगळाच संसार शहरामध्ये थाटला. आधुनिकतेमध्ये जाण्यात आनंद घेत असे ज्या गोष्टी खेड्यात त्याला मिळत नव्हत्या त्या सर्व शहरी जीवनात मुबलक मिळू लागल्या. त्याला दोन मुले झाली. गोविंद मामा व जानकीबाई दोघेच खेड्यात रहात होते. सर्व गावाला भूषण असलेले व सतत आनंद देणारे गोविंदमामा गांव मंडळीना उत्तम संस्कार देण्यात यशस्वी झाले. परंतु आपल्या स्वता:च्या मुलाला आपुलकी व सह जीवनाचा पाठ शिकऊ शकले नाही. तो अलिप्त रहाण्यात समाधान मानीत होता.

    गोविंद मामांचे अकाली निधन झाले. त्यांच्या पत्नीवर जणू आकाश कोसळले. परंतु काय करणार. मुलाचा आधार असून तिला मिळाला नाही. अच्यानक एक दिवशी त्यांना शासकीय पत्रक मीळाले. त्यांच्या खेडे गांवाजवळून एक पाण्याची मोठी धरण योजना शासनाने आखली होती. गोविंद मामाची शेती त्या योजना अंतर्गत शासकीय कार्यसाठी जमा केली जाणार असल्यची नोटीस होती. जानकीबाई साठी ते संकटच होते. गोविंदमामानी जे प्रेम गांवात पेरले होते, त्याला चांगलीच फळे येणार होती. सर्व गांवकरी एकत्र जमा झाले. त्यांना धरण योजने बद्दल सहानुभूती होती. ती योजना राबवावी परंतु त्याच वेळी जानकीबाईना त्यांच्या शेतीची योग्य व चांगली किंमत दिली जावी हा त्यांचा प्रयत्न. होता. सर्वजन एक झाले. प्रकरण थेट मंत्र्यापर्यंत मंत्रालयात गाजले. प्रचंड धावपळ व प्रयत्न झाले. जानकी बाईंच्या नावे त्या शेतीच्या मोबदल्यात २६ लाख रुपयाचा धनादेश जरी केला गेला. शेती जी कोणतेही उत्पन्न देत नव्हती, केवळ डोंगराळ भागाजवळ असल्यामुळे धारण योजनेत गेली. परंतु एक प्रचंड रक्कम जानकी बाईना देवून गेली. गोविंद मामाचे प्रेम आणि गांवमामा बनण्याचे योग्य इनाम देऊन गेले. त्यांच्या पश्च्यात जानकीबाई त्या ठेवीच्या व्याजावर समाधानी जीवन जगत होत्या.

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      August 13, 2020


  • कर्णपिशाच्य! (माझे डॉक्टर – ४)

    त्याच काय झालं होत कि, नेहमी प्रमाणे एकदा सर्दी झाली. दोन दिवसांनी कानठळी बसली! औषधाने आठवड्यात आणि बिनऔषधाने सात दिवसात सर्दी कमी होते, हा आजवरचा अनुभव होता. आम्ही या अनुभवावर विसंबून रेटून नेलं. ‘जो इतरावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला!’ या युक्तीची सत्यता पटली! येथे मला माझ्या अनुभवानेच दगा दिला. कानाला ऐकू येईना! सर्दी यथाअवकाश कमी झाली. पण कानांनी आपले कार्य बंदच ठेवले. त्यात भर म्हणजे दोन्ही कानातून, म्हणजे आतूनच आवाज येऊ लागले, तेही वेगवेगळे!

      November 12, 2020


  • भारतमातेच्या वीरांगना – ५८ – सरला बहन

    १९३२ साली भारतात आल्या. भारतात आल्यावर दोन वर्षे उदयपूर येथे एका शाळेत काम केले. त्यानंतर त्या गांधीजीसमवेत सेवाग्राम येथे आल्या. तिथे त्यांनी ८ वर्ष काम केलं. पण वर्ध्याचे वातावरण त्यांना फार पोषक ठरले नाही, इथल्या उन्हाने त्यांची वारंवार तब्येत बिघडू लागली, मग त्या कसोली, अलमोडा येथे आल्या. कुमाऔ घाटीतल्या महिलांसाठी त्यांनी फार मोठे काम उभे केले. त्याच बरोबर जंगल तोडी विरोधात सुद्धा मोठी मोहीम राबविली. १९४२ च्या चलेजाव आंदोलनात कुमाऔ जिल्ह्या त्यांनी एकत्रित आणला, तिथल्या लोकांमध्ये स्वातंत्र्यज्योत पेटविली. त्यांचे नेतृत्व केले, परिणामी त्यांना दोनदा कारावास भोगावा लागला. त्याचा अवधी एकूण दोन वर्षांचा होता.

      August 20, 2022


  • कुस्करलेली कळी – उमललेले फुल – ९

    संगीताला आपल्या जीवनाचे चक्र कसे चालू करायचे हेच उमगत नव्हते. विचारांचा गुंता वाढतच चालला होता, डोळ्यासमोरून मौशु जाता जात नव्हती. एका नराधमाने त्या दोघीना खोल समुद्रात ढकलून दिले होते, आशेचा एखादा किरणही डोकविण्याची सुतराम शक्यता नव्हती.

      December 30, 2021


  • इमाम आणि देवदूत

    शेकडो वर्षांमागची गोष्ट. इराण देशातील एका पहाडाजवळ एका विस्तीर्ण तलावाच्या काठी एक लहान झोपडी होती. त्या झोपडीत एक गरीब धनगर, त्याची बायको, व इमाम नावाचा त्यांचा आठ-दहा वर्षांचा एक लहान मुलगा, ही रहात असत. या तिघांनाही पोटाकरता संबंध दिवस राबावे लागे. धनगर व त्याची बायको पहाडावर जाऊन सरपण गोळा करीत व त्याच्या मोळ्या बांधून त्या जवळच्या शहरात नेऊन विकीत.

      September 5, 2024


  • तेनालीरामाचे वाक्चातुर्य

    तेनाली रमण एकदा सपत्नीक मित्राच्या विवाहास जात होते. लग्नसमारंभाला जायचे म्हणून पत्नी महागडी साडी आणि दागिन्याने लखलखलेली होती. चारचौघात उठून दिसावे म्हणून तिने सर्व काळजी घेतली होती.

      December 19, 2023


  • ओळख

    गाडीने चांगलाच वेग घेतला होता. रात्रीचे नऊ वाजले होते.मीनल खिडकीशी बसून बाहेरच्या काळोखात बघत होती. रेल्वेच्या डब्याची सावली डब्यातल्या प्रकाशामुळे बाहेर जमिनीवर पडली होती व ती पण गाडीबरोबर धावत होती. मीनल आज फार खुश होती. ती चक्क हिमाचल प्रदेशात चालली होती. सिमला मनालीचे तिचे फार वर्षांचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर होते. सोबतीला होती तिची मैत्रिणी सारखीच असलेली वहिनी, सीमा. त्यामुळे पूर्ण प्रवास खूपच आनंदात होणार यात काही शंकाच नव्हती. हसतखेळत दोघींनी नुकतच डब्यातले जेवण घेतले होते. आता झोपायची तयारी करायची होती.

      June 6, 2026


  • दुर्मीळ खजिना गवसला

    लोकराज्यचे 1956 पासूनचे अंक मी ग्रंथालयात अनेकवेळा चाळले होते. मात्र त्यापेक्षाही जुने प्रारंभीचे अंक मिळणार म्हणून मी जरा जास्तच आनंदात होतो. मनात विचारांची गर्दी जमली होती. लोकराज्यची मोठी परंपरा नजरेसमोर येत होती. लोकराज्य हे केवळ नियतकालिक नाही तर तो आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचा साक्षीदार आहे. गेल्या सहा दशकात लोकराज्यने खूप काही अनुभवले आहे.

      October 26, 2015


  • माझी कथा – भाग २

    आमची आई आमच्या शिक्षणाबाबत प्रचंड आग्रही होती म्हणूनच तिने आमच्यासाठी गुरुकुल विद्यालय या खाजगी शाळेत प्रवेश घेतला होता तिला काय माहीत पुढे जाऊन नियतीचे फासे कसे उलटे पडणार होते.

      August 20, 2021


  • समाधान

    माझ्या मनातलं

      March 16, 2006