(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • डॉ. शांताराम कारंडे – एक मित्र

    डॉ.शांताराम कारंडे आणि माझी पहिली भेट एका कवी संमेलनात झाली होती. त्या कवी संमेलनाचे आयोजक तेच होते. तेंव्हा पहिल्या भेटीतच ते मला भावले होते. मला जो भावतो तो कोण आहे कसा आहे ही गोष्ट माझ्यासाठी गौण असते. मला जो भावतो त्याचा मी त्याच्या गुणदोषासह स्विकार करतो. पण डॉ.शांताराम कारंडे यांच्यातील फक्त गुणच माझ्या दृष्टीक्षेपात आले. त्या कवी संमेलनातच मी पहिल्यांदा त्यांच्या चारोळ्या वाचल्या होत्या आणि त्यांना बोलताना ही ऐकल होतं. त्यांच्या चारोळ्या मला प्रचंड आवडल्या होत्या. ते एक उत्तम कवी आहेत याबद्दल वादच नाही. पण कवी म्हटला की तो स्वप्नात अथवा कल्पनेत गुंतलेला असतो असा सर्वसाधारण लोकांचा समज असतो त्यांचा हा समज मला नाही पण कारंडे साहेबांना पाहिल्यावर नक्कीच दूर होतो.

    त्यांची आणि माझी पुर्वीची कोणतीही ओळ्ख नसतानाती ती व्यक्ती मला पहिल्याच भेटीत आवडली त्याला आणखी एक कारण असावं ते म्ह्णजे मला राजकारणातील दोनच व्यक्ती आवडतात एक आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे राजसाहेब ठाकरे का ते मला स्पष्टपणे नाही सांगता येणार पण मला माझे आवडते चित्रपटातील हिरो कोण ते लगेच सांगता येत नाही पण राजकारणातील या दोन व्यक्ती माझ्यासाठी कधीच बदलत नाहीत माझा राजकारणाशी फारसा संबंध नसतानाही. त्यावेळी डॉ. शांताराम कारंडे यांनी नुकताकच मनसेत प्रवेश केला होता आणि याची मला कल्पना होती. त्यामुळे कदाचित एका वेगळ्या चष्म्यातून मी त्यांच्याकडे पाहिले ही असेल. त्यापुर्वी त्यांची मला आर्कीटेक आणि कवी इतकी ओळख असली तरी ते भविष्यातील ते एक चांगला राजकारणी म्ह्णून आपली ओळख निर्माण करतील याची मला तेंव्हा ही खात्री वाटत होती. आता ते साहित्य आणि कलेच्या क्षेत्रासोबत आपले अनेक उदयोगधंदे सांभाळत राजकारणातही यशस्वी घोडदौड करीत आहेत.

    डॉ. शांताराम कांरंडे आणि माझी जवळीक जरी साहित्यामुळे असली तरी त्यांच्यातील राजकारणीही मला प्रचंड भावतो. एक साहित्यिक म्ह्णून मला त्यांच्याबद्दल आदर आहेच पण एक राजकारणी म्ह्णूनही ते मला तितकेच आदरणीय आहेत हे महत्वाचे आहे. एखादया र्तमानपत्रात, साप्ताहिकात अथवा मासिकात त्यांचा लेख दिसला की मी तो पुर्वी ही आवर्जून वाचायचो आणि आजही वाचतो आणि तो वाचल्यावर ही व्यक्ती समाजकारण आणि राजकारण यात प्रचंड व्यस्थ असतानाही साहित्य निर्मितीसाठी वेळ काढते याचे मला विशेष कौतूक वाटते. त्यांचे लिखाणातील सातत्य खरोखरच स्तुती करण्यासारखेच आहे. नाहीतर मी शेकडो कवीता लिहल्या पण एखादया महिन्यात एक ही कविता लिहली नाही की स्वतःशीच म्ह्णतो हया महिन्यात मला कविता लिहायला वेळ्च मिळाला नाही. डॉ.शांताराम कारंडे यांना मधल्या काळात मी कधीही प्रत्यक्ष भेटलो नव्हतो. आमच्या भेटीच माध्यम बर्याीचदा साहित्य हेच होत. राजकारणी म्ह्णून समाजकारणात त्यांचा सक्रीय सहभाग जेंव्हा वर्तमानपत्राच्या माध्यमातून सातत्याने वाचनात येतो तेंव्हा त्यांच्या बद्दलचा माझ्या मनातील आदर आणखी वाढतो. मी राजकारणापासून शकयतो दूरच राहतो. पण तरी ही माझा आणि राजकारणाचा संबंध हया ना त्या कारणाने येतच असतो. पण डॉ. शांताराम कारंडे आणि माझी भेट पुन्हा राजकारणामुळे नाही तर बर्यााचदा साहित्यामुळेच झाली. डॉ.शांताराम कारंडे यांना त्यांना भेटलेल्या लोकांना त्यांच्या नावासह लक्षात ठेवण्याची सवय आहे नव्हे हा त्यांच गुणच म्ह्णावा लागेल. डॉ.शांताराम कारंडे एक राजकारणी, उदयोजक, कलाकार आणि साहित्यिक म्ह्णून किती मोठे आहेत हे जाणून घेण्याची मला कधी गरजच भासली नाही कारण एक माणुस म्ह्णून ते फारच छान आहेत. समाजातील सर्वसामान्य लोकांनाच नव्हे तर साहित्याकांनाही मदत करण्याचा जणू त्यांनी विडाच उचलेला असावा.

    मुंबईतीलच नव्हे तर महाराष्ट्रातील बरेचसे साहित्यिक त्यांना राजकारणी म्ह्णून कमी तर साहित्यिक म्ह्णून अधिक ओळखतात आणि त्यांची ही ओळख त्यांना मिळालेले असंख्य साहित्यिक पुरस्कार अधोरेखीत करतात. हा लेख वाचताना कदाचित वाचकांना प्रश्न पडला असेल की मी अचानक डॉ.शांताराम कारंडे यांच्यावर लेख का बरं लिहला असेल. त्याला एक खास कारण आहे मला गुरूतुल्य असणार्यां माझ्या या मित्राचा नव्हे तर वडिल बंधूचा 28 मार्च रोजी वाढदिवस होता. त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट काय दयावी हा माझ्यासमोर एक यक्ष प्रश्न होता. त्यांना मी लवकरच माझा पुढचा कविता संग्रह सस्नेह अर्पण करणार आहेच पण तत्पुर्वी काय करावे म्ह्णून मी हा लेख लिहण्याचा प्रपंज केला. आमच्या माझे व्यासपीठ या मासिकाचे आज जरी ते सहसंपादक असले तरी आमची भेट धावपळीतच होते निवांत म्ह्णता येईल अशी चर्चा आमच्यात कधीच होत नाही आणि माझी तशी इच्छा ही नसते कारण त्यांच्या वेळेची किंमत ठरलेय आणि ती किंमत मी जाणलेय त्यामुळे त्यांच्या वेळेची किंमत माझ्याठायी ही जास्तच आहे. राजकारणात असतानाही शत्रू नव्हे तर मित्र गोळा करणारा म्हणून त्यांची ओळ्ख निर्माण होत असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. भविष्यात एक लोकप्रिय राजकारणी म्हणून ते आपली ओळख निर्माण करतील याची मला खात्री वाटते. लोकांच्या सेवेत अहोरात्र उपलब्ध असणारे डॉ.शांताराम कारंडे हे आपले समाज सेवेचे व्रत यापुढे ही तसेच सुरू ठेवतील याची मला खात्री वाटते. मी व्यक्तीशः एक राजकारणी म्ह्णून नाही पण समाजाचा एक घटक, त्यांचा एक हितचिंतक अथवा समर्थक म्ह्णून कधीतरी त्यांच्या मागे उभा दिसेनही. डॉ. शांताराम कारंडे हे नवोदित साहित्यिकांसाठी अंधारात कोठेतरी दुरवर जळणार्याउ दिव्यासारखे असले तरी तरी ते साहित्यिकांना फक्त आशेचा किरण दाखवित नाहीत तर प्रत्यक्षात मदतही करतात हे मी प्रत्यक्ष अनुभवातून सांगू शकतो. आज डॉ.शांताराम कारंडे ज्या - ज्या क्षेत्रात आहेत त्या - त्या क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविलेला आहे याबद्दल कोणाचे ही दुमत नाही. प्रचंड धावपळ कामचा व्याप असतानाही कविता वाचताना त्यांच्या चेहर्याहवरून ओसंडणारा आनंद जेंव्हा मी प्रत्यक्ष पाहिला तेंव्हा एक कवी म्ह्णून मी खर्याय अर्थाने त्यांच्यासमोर नतमस्तक झालो आणि मी स्वतःशी पुटपुटलो...

    कारंडे साहेब...

    तुंम्हाला म्ह्णू मी राजकारणी की कवी
    साहित्यिक, कलाकार की बुध्दीजीवी...
    तुंम्हाला म्ह्णू मी रसिक की उत्साही
    मित्र, बंधू की माझा सोबती...
    एकाच रस्त्यावरून वर्षानुवर्षे
    चालणारे आपण आहोत सहप्रवासी...
    आपले ध्येय आपल्या आवडीनिवडी
    आपले आचार-विचार आणि स्वप्ने आहेत निराळी...
    विचारमंथन करून आपण दोघेही नकळ्त
    बाहेर काढतोच सुविचार जगासाठी...
    त्या सुविचारांनीच जोडली गेली आहेत
    आपली आपल्या सभोवतालची सारी नाती...
    तुमच्या वाढदिवसा निमित्त मी ही
    भेट दिली तुंम्हाला फक्त शब्दांची...
    त्या शब्दातून तुमच्याप्रती अगदी सह्ज
    व्यक्त होणार्याम माझ्या प्रेमाची....

    लेखक – निलेश बामणे.

  • फसवे रंग

    आज वर्गातलं वातावरण एकदम रंगीबेरंगीच होतं. रंगीत कागद, रंगीत पेनं, पेन्सिली, खडू आणि चित्रविचित्र रंगांची स्केच पेन्स. आणि विशेष गंमंत म्हणजे मुलांनी पण आज रंगीत कपडेच घातले होते. मला काही समजेना? “आज काय सगळ्या मुलांचा वाढदिवस आहे की काय?” असं विचारताच मुलं म्हणाली,“आज कलर डे आहे! म्हणून आज सगळंच कलरफूल!” सिमरन म्हणाली,“आजचा खेळसुध्दा रंगीबेरंगी रंगांचा रंगीत खेळच हवा.” त्याबरोबर वर्गातली सगळी रंगीत मुले ओरडली, “होऽऽ होऽऽ रंगीबेरंगी रंगांचा, रंगीत खेळ खेळताना, रंगून जाऊया, हो रंगून जाऊया!”.

    “काय तुम्हाला रंग ओळखता येतात? रंगांकडे एकटक पाहाता येतं? चित्रातले रंग लक्षात ठेवता येतात?...” मला पुढे बोलू न देताच मुले म्हणाली, “होऽऽ होऽऽ होऽऽ” चला तर मग, आज आपण रंगबदलू रंगांचा रंगीत खेळ खेळू. दोन स्वच्छं पांढरे कागद घ्या. त्यातला एक जरावेळ बाजूला ठेवा. फळ्यावरच्या आकृतीत दाखविल्याप्रमाणे एका पांढऱ्या कागदावर पट्टी पेन्सिल वापरुन, तीन बाय तीन इंचाचा चौरस काढा. आता या चौरसाला किमान अर्ध्या इंचाची बॉर्डर काढा. आता सगळी मुले कामाला लागली. मिहिरने विचारलं,“पण... त्या रंगांचं काय?..”

    त्याला शांत करत म्हणालो,“आता त्या चौकोनात गडद हिरवा रंग भरा आणि त्याच्या मध्यभागी एक काळा ठिपका रंगवा. मुलांनी रंगविण्यासाठी रंगीत खडू,पेन्सिली, जलरंग व स्केच पेन्सचा वापर केला. मिहिर कुरकुरत म्हणाला,“आता ती बॉर्डर मात्र वेगळ्या रंगात रंगवूया. एकदम पिवळ्याधमक रंगातच रंगवूया.” होकारार्थी मान हलवताच सगळ्यांच्या बॉर्डर्स चकमकित पिवळ्या धमक रंगांत रंगू लागल्या. आता उजव्या हातात हे रंगवलेले चित्र व डाव्या हातात स्चच्छं पांढरा कागद धरा. मग उजव्या हातातल्या कागदाकडे एक मिनिट एकटक पाहा. तुमचे सगळे लक्ष चौकोनातल्या रंगांवर व त्या काळ्या ठिपक्यावर केंद्रित करा. मग प्रखर उजेडात पापणी न हलवता चटकन डाव्या हातातल्या कागदाकडे दृष्टी न्या..... आणि चमत्कार पाहा!! त्या पांढऱ्या कागदावर तुम्हाला वेगळेच रंग दिसतील.

    मुले भलतीच उत्साहित झाली होती. जेमतेम एक मिनिट वर्गात शांतता पसरली. आणि एकदम मुलांनी जल्लोष केला,“होऽऽ...होऽ... भलतेच रंग, फसवे रंग, रंग बदलू रंग..” आणि मग मुलांची प्रश्न एक्सप्रेस सुरू झाली. “असं का झालं? वेगळे रंग घेतले तर काय होईल? पिवळा आणि निळा यांची जोडी आहे का? आपण चौकोनच काढला, त्याऐवजी जर गोल काढला असता तर काय झाले असते? चौकोनात एकच रंग न देता दोन वेगवेगळे रंग भरले असते तर?...”

    “आधी या रंगीत खेळामागची जादू काय आहे ते तर समजून घेऊया. त्यातूनच तुम्हाला तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे नक्की मिळतील. आणि तरीपण काही प्रश्नांची उत्तरे नाहीच मिळाली तर...” मला पुढे बोलू न देता मुलेच म्हणाली,“तर.. प्रयोग करुन शोधून काढा! आता सांगा ती जादू.”

    आपले डोळे फक्त लाल, निळा आणि हिरवा हे तीनच रंग प्रत्यक्ष पाहातात. या रंगांच्या कमीअधिक संवेदनांचे एकत्रिकरण करुन मेंदू अनेक रंग पाहू शकतो. डोळ्याच्या मज्जापटलावर नळ्या आणि शंकूच्या आकाराच्या चेतापेशी असतात. या दोघांच्या कामात थोडासा फरक आहे. शंकूच्या आकाराच्या चेतापेशी वस्तूबद्दल बारीक तपशील टिपतात. तर नळीच्या आकाराच्या पेशी तपशील टिपण्यात कमी पडल्या तरी त्या रात्रीच्या वेळी शंकूपेशींपेक्षा अधिक चांगले काम करतात.

    शंकूपेशी रंगांची संवेदना ग्रहण करतात. या शंकूपेशींना काही काळ सतत वापरले तर त्या दमतात आणि पुढे त्याच रंगाची संवेदना नीट ग्रहण करू शकत नाहीत. त्यामुळेच प्रतिमेच्या रंगात फरक पडतो. आपल्या या रंगीत खेळात टिंबाकडे एकटक पाहिले की हिरव्या आणि पिवळ्या रंगांची संवेदना ग्रहण करणाऱ्या चेतापेशी दमतात. त्याचवेळी झटकन पांढऱ्या रंगाच्या कागदाकडे पाहिले तर, पांढरा रंग सात रंगांनी बनलेला असल्याने, ते सप्तरंग डोळ्यात एकत्रित होतात. शंकूपेशी दमल्या असल्याने त्या या सप्तरंगातील हिरवा व पिवळा रंग ग्रहणच करत नाहीत. पांढऱ्या रंगातून हिरवा रंग वजा झाला तर उरलेला रंग लाल म्हणून नोंदला जातो. त्याचप्रमाणे पांढऱ्या रंगातून पिवळा रंग वजा झाल्याने त्याठिकाणी निळा रंग दिसतो. त्यामुळे आपल्याला डाव्या हातातल्या पांढऱ्या कागदावर निळी बॉर्डर व लाल चौरस असे भासमय रंग असणारी आकृती दिसते.

    मिहिर, सिमरन, शिल्पा, प्रिया, रोहन, पालवी हात वर करत म्हणाले,“तरीपण आम्ही हा रंगीत प्रयोग वेगवेगळे रंग घेऊन करणारच. आमच्या शंकू पेशी दमल्या तरी आम्ही नाही दमणार!” न दमता प्रयोग करणाऱ्यांच्या “रंगीत पत्रांची” मी वाट पाहातो आहे.

    -- राजीव तांबे.

  • जीवन म्हणती याला

    जीवन म्हणती याला

    त्याची ऐकूनी करूण कहाणी, डोळे भरून आले पाणी

    हृदय येता उंचबळूनी, निराश झाले मन ।।१।।

    आघात होता त्याच्या जीवनी, तो तर नव्हता माझा कुणी

    तरी का आले प्रेम दाटूनी, उमजेना काही ।।२।।

    दु:ख दुजाचे समोर आले, मनास ज्याने कंपीत केले

    दोन जीवांच्या हृदयामधले, अदृष्य हे धागे ।।३।।

    मानव धर्म एक बिजाचा, वाढत गेला गुंता त्याचा

    ओढत असता धागा टोकाचा, दुजा हळहळतो ।।४।।

    राग लोभ वा प्रेम भावना, बांधूनी ठेवते एकमेकाना

    हिच असे निसर्ग योजना, जीवन म्हणती याला ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • हिरवळ

    HIRWALLLL123

  • पश्चाताप – एक जाणीव

    संध्याकाळची वेळ होती. दारावरची बेल वाजली. दारासमोर डॉक्टर देशमुख यांना बघून आश्चर्याचा धक्का बसला. माझ्यासाठी ते घडणे म्हणजे केवळ चमत्कार होता. डॉक्टर देशमुख शासनाचे वरिष्ठ अधिकारी होते. त्यांना निवृत्त होऊनही दहा वर्षे झाली होती. बरेच प्रशासकीय अधिकार प्राप्त. ते स्वत: एक कर्तबगार, हुशार, प्रामाणिक आणि अतिशय शिस्तप्रिय व्यक्तीमत्व होते. सर्व संबधित त्यांना वचकून होते.

    मला एक प्रसंग आठवला. त्यावेळी ” कैलास मानसरोवर “ ही यात्रा केवळ भारतीय शासन आयोजित असे. वर्षातून फक्त तीन महिने ती यात्रा चाले. ३० दिवसाची यात्रा. वर्तमानपत्रे, दूरदर्शन ह्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशातून अर्ज मागविले जात. यात्रेला जाण्यासाठी थोड्याच लोकांना प्रवेश मिळे. किचकट नियमातून प्रवेश मिळणे अत्यंत अवघड होते. मी पण अर्ज केला होता. नशिब चांगले म्हणून नंबर लागला. तार मिळाली ” कैलास मानसरोवर यात्रेसाठी तुमचा अर्ज मंजूर केला गेला. १५ दिवसात फार्म भरून अनामत रक्कम पाठविणे.” धावपळ सुरु झाली. यात्रा दोन महिन्या नंतर सुरु होणार होती. संबंधित बाबींची पूर्तता करण्याची गरज होती. शासकीय नोकरी. तेंव्हा ३० दिवसाची रजा मंजूर करून घेणे महत्वाचे होते.

    डॉक्टर देशमुख त्यावेळी संबंधित वरिष्ठ अधिकारी होते. त्यांना भेटलो व परिस्थिती समजावून सांगितली. रजेचा अर्ज दिला. माझ्यासाठी नशिबाने ही एक मिळालेली संधी असल्याचे सांगितले. त्यांनी क्षणभर विचार केला. प्रशासकीय कारण देत अर्ज नामंजूर केला. मी खूप निराश झालो. विनंत्या केल्या. वेळ पडल्यास बिनपगारी राजा द्यावी, हे ही मागितले. परंतु डॉक्टर देशमुख यांनी निर्णय बदलला नाही. माझा अर्ज फेटाळून लावला. मिळालेली संधी वरिष्ठांच्या हट्टापाई गमावून बसलो.

    १२ वर्षांपूर्वीचा तो प्रसंग, मी केंव्हाच विसरलो होतो. आणि आज अचानक ज्याचा विचार केव्हाच मनांत येणार नाही ते घडले होते. डॉक्टर देशमुख माझे वरिष्ठ अधिकारी होते. त्यांचे मी स्वागत केले. खूप आनंद व समाधान व्यक्त केले. मी देखील निवृत झालो होतो.

    डॉक्टर देशमुख सांगू लागले. ” मी खास तुम्हाला भेटण्यासाठी आलो आहे. माझ्या जीवनात मी अनेक वरिष्ठ जागा भुषविल्या. अनेक निर्णय घेतले. शकतो नियमानुसार काम करण्याचा प्रयत्न केला. नियम हे फक्त मार्ग दर्शक असतात.

    निर्णय मात्र तुम्हाला सारासार विचार करून, परिस्थितीचा अभ्यास करून, त्याच्या परिणामाचा विचार करून, घ्यावा लागतो. त्यात असते तुमचे ज्ञान, अनुभव, कार्याची क्षमता, आणि तुमचा स्वत:चा स्वभाव गुणधर्म. निर्णयात स्वभावाचा सहभाग अल्पसा असला तरी अनेक निकालांची तो उलट सुलट करु शकतो. तुमचे राग लोभ अहंकार, कुणाबद्दलचे समाज, गैरसमज ह्या बाबी तुमच्या स्वभावाला बंदिस्त चाकोरीत टाकतात. अजाणतेपणाने तुमच्या निर्णयामध्ये त्याचा अप्रत्यक्ष सहभाग होऊन जातो. अशाच कांही मी घेतलेल्या निर्णयाचे आज मी विश्लेषण करीत आहे. कांही निर्णया बाबतीत, मला खंत वाटते. तो भूत काळ होता. मी आता कांहीच करु शकत नाही.

    पश्चात्ताप होणे हेच एक प्रायश्चित असते. चुका करणे हा मानवी स्वाभव. परंतु त्याची तीव्रतेने जाणीव होणे हा निसर्ग. त्याला मानणे हे त्या दुष्ट चक्रातून केलेले बचवात्मक समाधान. ज्या ज्या निर्णयामध्ये जर कुणाची हानी झाली असेल तर आणि त्यांत मला स्वत: ची चूक उमगली असेल, तर त्याची क्षमा मागण्यासाठी मी आलो आहे. वेळ गेली, काळ गेला. भोगनाऱ्याने जे भोगले, त्यांच्या दु:ख निर्मितीत माझा अप्रत्यक्ष सहभाग होता. क्षमा व्यक्त करून मी मनाचे सांत्वन इच्छितो.”

    डॉक्टर देशमुख भावनीक झालेले दिसले. चुका सुधारण्यासाठी आता वेळ नसली, तरीं अंत:करणातून निर्माण झालेल्या प्रायश्चिताची जाणीव, हीच खरी शांतता. हाच निसर्ग व ईश्वरी संदेश नव्हे काय ?डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

    -- डॉ. भगवान केशवराव नागापूरकर

  • बोल अबोल

    जीवनाच्या एका वळणावर जेंव्हा आपल धावण थांबत आणि आता जीवनात मिळविण्याची इच्छा शिल्लकच राहिले नाही असे वाटते आणि आपल्या जीवनात फक्त शांतता उरलेली असते तेंव्हा आपण आपल्या मनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागतो . तो संवाद साधल्यावर आपल्याला जी सापडते ती म्ह्णजे आपल्या मनात कोठेतरी खोलवर दडलेली एखादी खंत असते. प्रत्येकाच्या मनात आपल्या जीवनात काही तरी करायचं राहून गेल्याची खंत ही असतेच. माझ्या आयुष्यात जेंव्हा मी मागे वळून पाहतो तेंव्हा मी जिच्यावर मनापासून प्रेम केल तिच्याकडे माझे तिच्यावरील प्रेम व्यक्त न केल्याबद्दलची खंत मला आजही अस्वस्थ करते. कदाचित त्यावेळी मी जो विचार केला तो बरोबर नव्हता हे मला आज वाटते आहे कारण आज मी विचारवंत झाल्याचा मला साक्षात्कार झालेला आहे पण त्या वेळची माझी जगाकडे पाहणारी दृष्टी आणि माझी आजची जगाकडे पाहण्याची दृष्टी यांच्यात बरेच अंतर निर्माण झालेले आहे. हे खरं होत की माझे तिच्यावर जिवापाड प्रेम होते तिचे चालणे, बोलणे, हसणे, नावणे, गाणे, रूसणे आणि रडणे ही मला आवडत होते. पण सर्वात महत्वाचे म्ह्णजे तिच्या अचाट बुध्दीमत्तेवर माझे खरे प्रेम होते. तिला ही माझ्यातील कला गुणांबद्दल आदर होता. त्यावेळच्या माझ्या कुटूंबाच्या आर्थिक स्थितीचा आणि माझ्या खाद्यावर मी स्वतःहून घेतलेल्या माझ्या कौटूंबिक जबादार्‍यांमुळे मी माझं तिच्यावरील प्रेम व्यक्त केल नाही. मला ती नाही म्ह्णण्याची भिती वाटत नव्ह्ती पण जर ती हो म्ह्णाली तर तिला माझ्यासाठी थांबायला मी कोणत्या तोंडाने सांगणार होतो ? या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्ह्ते कारण काही तरी जगावेगळे मिळविण्याच्या दिशेने केव्हांच माझा प्रवास सुरू झाला होता.

    या प्रवासात मला अनेक जणी भेटल्या पण त्यापैकी एकही तिची बरोबरी करू शकत नव्हती. अजून काही वर्षे ती थांबली असती तर कदाचित मी माझं प्रेम तिच्यासमोर व्यक्त केलच असत. पण कदाचित ते नियतीलाच मान्य नसावे बहूदा. तिने आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडला मी तिच्या या निर्णयाच समर्थनच केल कारण तेंव्हा मला माझं ध्येय खुणावत होत. पण तिला गमावल्यावर थोड्याच वर्षात मी काय चूक केली हे माझ्या लक्षात येऊ लागले. आज मी मिळविलेल्या यशावर फक्त तिचा आणि तिचाच अधिकार आहे. माझे यश हे मला फक्त तिच्यासोबत साजरं करायला आवडलं असतं म्ह्णूनच मी माझ्या यशाचा आनंद आजही कोणासोबत कधीच साजरा करीत नाही. मी माझे तिच्यावरील प्रेम व्यक्त केल नाही याची मला सर्वात जास्त खंत जाणवते कारण मी जर तस केल असत तर कदाचित माझ्या जीवनाला एक वेगळच वळ्ण मिळाल असत आणि मी तिच्या ही जगण्यालाही एक अर्थ प्राप्त करून देऊ शकलो असतो. आज तिच्या वाट्याला आलेले एका सर्वसामान्य गृहीणीचे जीवन माझ्या मनात खर्‍या अर्थाने खंत निर्माण करून जाते. माझं प्रेम अबोल न ठेवता बोलून व्यक्त केल असत तर कदाचित माझ्या आयुष्यातील ही एकमेव खंत ही दूर झाली असती.

    -- निलेश बामणे

  • मी आणि परी

    गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कार्यालयात घडणाऱ्या घटनांमुळे मी भयंकर तणावात होतो. कश्यात ही मन लागत नव्हते. प्रचंड उन्हाळ्यामुळे प्रकृती वर-खाली होत होती. निराशा मनात घर करू लागली होती. अचानक ती चिमुकली परी माझ्या आयुष्यात आली आणि सर्वच बदलले. गेल्या महिन्याचीच गोष्ट, संध्याकाळी घरी आलो. उन्हाळा असल्यामुळे सांयकाळी सात वाजता ही भरपूर उजेड होता. तसे म्हणाल तर परी आमच्या शेजारीच राहते. आपल्या आई सोबत ती पहिल्यांदाच घरी आली होती. मला पाहताच त्या चिमुकलीने दादा (आजोबा) म्हणून हाक मारली. का कुणास ठाऊक. कदाचित! गतजन्मीचे ऋणानुबंध असतील. गंमत म्हणून तिला विचारले, अपने दादा के पास आओगी. सहजा-सहजी कुणाकडे न जाणारी ती परी पटकन माझ्या कडेवर आली. तिच्या आईला ही आश्चर्य वाटले.

    आजकाल दररोज संध्याकाळ सात- आठच्या सुमारास मी कधी ही घरी पोहचतो. मी घरी पोहचल्याच्या १५-२० मिनिटातच तिची दारावर थाप ऐकू येते. मला ही आश्चर्य वाटते, परीला कसे कळते मी घरी पोहचलो ते. दार उघडल्या बरोबर आपल्या लटपटत्या पायांनी दुडदुड धावत दादा-दादा म्हणत सरळ माझ्या अंगावर येऊन धड्कते. तिच्या पायातल्या पैजणांच्या रुणझुण आवाज ऐकल्यावर, माझ्या शरीरात ही एक चैतन्य संचारते. दिवसभराचा थकवा आणि तणाव क्षणात दूर होतो. माझा हात पकडून लटपटत जिने चढत मला गच्ची वर घेऊन जाते. एकदा गच्ची पोहचल्यावर आमचा चोर-शिपायाचा खेळ सुरु होतो. दमल्यावर पुन्हा आम्ही जोडी खाली येते. तिच्या साठी खास काजू आणून ठेवले आहे. ते काजू कुठल्या डब्ब्यात आहे. तिला पक्के ठाऊक झाले आहे. दादा खाऊ (तिच्या बरोबर मी मराठीतच बोलतो. आणि तिला कळते ही). डब्बा तिच्या जवळ दिल्यावर मोजून ४-५ काजू आपल्या हाताने काढून मला देते. नखरेल एवढी कि एक-एक करून काजू तिला भरवावा लागतो. तीही गुणी मुलासारखे शांतीने काजू खाते. पण शेवटचा काजू तिच्या तोंडात भरवताना न चुकता ती खट्याळ, शैतान आपल्या सळसळत्या दातांनी कडकडून चावा घेते. तिच्याकडे डोळे वटारून बघितल्यावर, आपले डोळे बंद करून, नाक मुरडीत नुकतेच निघालेले दात दाखवत इतक्या जोरात हसते. काय म्हणावे, तिला रागवताच येत नाही. आजकाल तर परीने माझ्या शरीरावरच कब्जा केला आहे असे म्हंटले तरी गैर नाही. कधी पोटावर बसून तबला वाजवते, तर कधी पाठीवर चढून जोरात केस ओढते. रागवल्या बरोबर तिचे खट्याळ मुली सारखे हसणे. संध्याकाळचा तासभराचा वेळ कसा निघून जातो कळतच नाही. (त्या मुळे आजकाल लिहायला ही वेळ मिळत नाही).

    गेल्या रविवारी सकाळी भुरका-भुरका पाऊस सुरु होता. नेहमीप्रमाणे आमची जोडी गच्ची वर पोहचली. परी प्रथमच वादळाने भरलेले आकाश पाहत होती. आकाशाकडे आश्चर्याने पाहत, आपल्या इवल्याशा हातात पावसाच्या छोट्या-छोट्या थेम्बाना गोळा करत आनंदाने खिदळू लागली. माझ्या अवती-भवती पाय जमिनीवर आदळत परी नृत्य करू लागली. तिच्या पैंजणाचा रुणझुण आवाज, त्यात पावसाचा हलका मृदू स्वर. स्वर्गीय दृश्य होते. तिचे ते नृत्य पाहून मोराला ही लाज वाटली असती. खरंच! पाऊस आल्याबरोबर, सर्व सृष्टी आनंदित होते. सर्वत्र चैतन्याचा संचार होतो. परी ही त्याला अपवाद कशी ठरणार. पावसाचा जोर थोडा वाढला. मी परीला कडेवर उचलले, आणि म्हणालो परी चला खाली, जास्त वेळ पावसात भिजलो आणि तुला सर्दी पडसे झाले तर तुझी ममा मला मारेल. ममा मारेल, हे शब्द ऐकल्यावर, ती इतक्या जोरात हसली कि काय सांगू, कदाचित कल्पना करत असेल, ममा, दादाला मारणार, कसे दृश्य असेल ते.

    कधी कधी मला वाटते, निराशाच्या गर्तेतून मला बाहेर काढण्यासाठीच तर देवाने परी बरोबर माझी भेट घडविली असेल. एखाद दिवस जर ती घरी आली नाही तर माझे मन बैचैन होऊन जाते. पण काही ही म्हणा, तिच्या संगतीत आजकाल माझा वेळ मस्त जातो.

  • खरं गणित

    नेहमी शेवटचा पेपर गणिताचा असतो. रैना, प्रिया, अर्णव आणि राधा या चौघांनी ठरवलं की यावेळी आपण गणिताचा सॉलीड अभ्यास करायचा आणि भरपूर मार्क मिळवायचे.

  • समत्व बुद्धी

    समत्व बुद्धी

    एका टोंकावरती जातां, शांत न राही झोका तेथें,

    विलंब न करता क्षणाचा, जाई दुजा टोका वरती ।।१।।

    जीवनांतील झोके देखील, असेच सदैव फिरताती,

    बऱ्या वाईटातील अंतर, नेहमी चालत असती ।।२।।

    समाधान ते मिळत नसे, जेव्हां बघता तुम्हीं भोग,

    त्यांत देखील निराशा येते, मनीं ठरविता जेव्हां योग ।।३।।

    जवळपणाच्या नात्यामध्यें दुरत्वाचे अंकूर फूटते,

    दूर असता कुणी तरी, जवळ करावे वाटते ।।४।।

    संतूलन करूनी मनाचे, समत्व बुद्धी ठेवावी,

    टोकावरती जाण्याची भूमिका, सदैव टाळीत रहावी ।।५।।

    मध्य बिंदू तो साधतां, निवड न राही एकाची,

    स्थिरत्व येईल जीवनाचे, टोके जातां सुख दु:खाची ।।६।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • एकाच वाक्यात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची नावे

    मराठी भाषेतील एक अद्भुत गंमत बघा. एकाच वाक्यात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांची नावे कशी आली आहेत ते बघा....

    अगं कमल, उठ, पाय धु, रस, भजॆ, चहा बनव.

    अ :- अकोला, अमरावती, अौरंगाबाद, अहमदनगर
    ग :- गडचिरोली, गोंदिया
    क :- कोल्हापूर
    म :- मुंबई
    ल :- लातूर
    उ :- उस्मानाबाद
    ठ :- ठाणे
    प :- पालघर, पुणे, परभणी
    य :- यवतमाळ
    धु :- धुळे
    र :- रायगड, रत्नागिरी
    स :- सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदूर्ग
    भ :- भंडारा
    ज :- जळगाव, जालना
    च :- चंद्रपूर
    ह :- हिंगोली
    ब :- बीड, बुलढाणा
    न :- नांदेड, नागपूर, नाशिक, नंदुरबार
    व :- वर्धा, वाशिम