नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
एकदा दोन तरुण संन्यासी एका गावाहून आपल्या आश्रमाकडे परत येत होते. आत्मज्ञानाच्या शोधयात्रेमध्ये गुरूचं मार्गदर्शन लाभल्यानं दोघंही खूष होते. गाव मागे पडत होतं. वसाहत कमी झाली. निसर्ग जवळ आला.
April 20, 2010
आयुष्यात अशा काही घटना घडून गेलेल्या असतात, ज्यांची पुन्हापुन्हा उजळणी करावीशी वाटते. काही हक्काची ठिकाणे असतात_ मनाला उभारी देणारी, जगण्याची नवी उमेद देणारी… ज्यांच्या आठवणीत आपण रमून जातो, कधी अभिमानाने उर भरून येतो..प्रसंगी हळवेही होतो. माझ्यासाठी माझी बँक ही त्यापैकीच एक.
April 24, 2023
आम्ही आमच्या नंबरची सीट हुडकून त्यावर बसलो. एका ‘हवाईसुंदरी’च्या मदतीने, हिची हातातली बॅग आणि माझी लॅपटॉपची बॅकसॅक, सीटवरील रॅक मध्ये सारून दिल्या. सीटवर पाघरायची शाल, एक चिटूर्नि उशी, आणि हेडफोनचे पाकीट होते. समोरच्या सीटच्या पाठीवर एक मॉनिटर होता. खूप ‘प्रयत्न-प्रामादा'(Trial – error साठी हा शब्द कोठेतरी वाचला होता. कसा आहे?) नंतर, या स्क्रीनने माझी पंधरा तास करमणूक केली होती. दोन सिनिमे मी पहिले, एक त्यानेच दाखवला!
November 16, 2020
कोणतेही पुस्तक मी सह्सा संपूर्ण वाचून झाल्याखेरीज हाता वेगळे करत नाही आणि एकदा वाचलेले पुस्तक पुन्हा वाचायला शक्यतो घेत ही नाही. पण ‘शरसंधान’ हे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक मी तीन वेळा वाचले. ‘
शरसंधान’ हे ह्लके-फुलके पुस्तक असले तरी समजायला जड आणि पचायला अवघड आहे. हे पुस्तक आपल्या बुध्दीचा किस काढण्याबरोबर बुध्दीचा कस लावण्यास प्रवृत्त करते. कोणत्याही पुस्तकाबद्दलची मी माझी प्रतिक्रिया कधीच कोठे दिली नाही की कोठे लिह्ली ही नाही कारण लेखक कोणी का असेना त्याने निर्माण केलेलं साहित्य माझ्या दृष्टीने बहूमोलच असतं.
‘शरसंधान’ पुस्तकाच्या निर्मितीत माझा खारीचा वाटा आहे अस या पुस्तकाचे लेखक जयेश मेस्त्री मानतात. पण खरं सांगायच तर मला ते माझ्या लहान भावासारखे आहेत. सावरकरांच्या बाबतच्या त्यांच्या ज्ञानाचा मी प्रचंड आदर करतो. त्यांचे लेखन मी सातत्याने वाचत आलेलो आहे राजकारणा सोबत ते इतर विषय अगदी विनोद ही उत्तम हाताळतात. हे पुस्तक प्रकाशित होण्यापुर्वी ही माझ्या हातात आले होते पण ते वाचण्याचा मोह मी त्यावेळी टाळला. पण पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर जेंव्हा जयेशने त्या पुस्तकाची प्रत मला भेट दिली तेंव्हा मी ते पुस्तक पचेपर्यंत वाचले.
जयेश जरी नवोदित लेखक असला तरी तो नवखा नाही त्याने यापुर्वी बरेच लिखाण केलेले आहे. प्रचंड अभ्यास आणि निरीक्षणातून त्याचे हे ‘शरसंधान’ पुस्तक जन्माला आलेले आहे. हे पुस्तक म्ह्णजे एक उत्तम लेखक म्ह्णून नावारूपाला येण्याच्या दृष्टीने त्याचे पहिले पाऊलच म्ह्णावे लागेल. जयेशच्या पहिल्याच पुस्तकाला लाभलेली ज्येष्ठ पत्रकार, लेखक, वक्ते आणि समिक्षक श्री.अरविंद कुलकर्णी यांची प्रस्तावना बरेच काही सांगून जाते. त्याच सोबत जयेश मेस्त्री यांच्या लिखाणाचा दर्जाही अधोरेखीत करते. त्यांनी आपल्या प्रस्तावनेत जयेश मेस्त्री यांची पाठ थोपटण्याबरोबरच त्यांच्या हिंदूतत्वनिष्ठतेचे कौतुक करत जयेश मेस्त्री सावरकरांच्या विचारांनी प्रभावित आहे हे सांगायला विसरलेले नाहीत. या पुस्तकाला लाभलेली प्रस्तावनाच एक वाचनिय लेख आहे असे म्हटले तर ते ही वावगे ठरणार नाही.
जयेश मेस्त्री यांनी आपले हे पुस्तक स्वा.सावरकर आणि बाबा आमटे आणि परिवाराला समर्पित केलेले आहे यावरून त्यांना समाजसेवेचाही वारसा लाभलेला आहे हे स्पष्ट होते. या पुस्तकात जयेश मेस्त्री यांच्या आवघ्या सहा लेखांचा समावेश केलेला आहे. या पुस्तकाच्या सुरूवातीलाच त्यांच्या या पुस्तकाला किशोर नार्वेकर आणि डॉ.शांताराम कारंडे यांनी काव्यात्मक शुभेच्छा दिलेल्या आहेत. डॉ. शाताराम कारंडे यांनी या पुस्तकाला अर्थसहाय्य करून त्याच्या निर्मितीत मोलाची भुमिका बजावलेली आहे.
या पुस्तकातील पहिला लेख ‘आशीर्वाद देऊ की घेऊ ?’ हया लेखात लेखकाने एक प्रगत राष्ट्र घडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंदाचे चरित्र आजच्या पिढीने स्विकारण्याची गरज का आहे या बद्दल आपले परखड विचार मांडलेले आहेत. ‘कृष्णा तुला शोधू कोठे’ हा लेख भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राकडे वर्तमान पिढीने कसं डोळ्सपणे पाहायला हवे या बद्दल मार्गदर्शन करताना दिसतो. त्यापुढील पत्रकारीताः लोकहित की व्यवसाय या लेखात ते पत्रकारीता हा फक्त एक व्यवसाय बनून न राहता पुर्वीसारखीच त्याला राष्ट्रभक्तीची आणि राष्ट्रप्रेमाची जोड असावी असा आशावाद लेखकाने व्यक्त करताना बर्या च दुर्लक्षीत गोष्टी प्रकाशात आणण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून केलेला आहे. ‘तहानलेला सावरकर’ हा या पुस्तकातील चवथा लेख सावरकरांवर प्रेम करणार्यां ना नव्याने त्यांच्या प्रेमात पडायला प्रवृत्त करेल अशी खात्री वाटते. या पुढील लेख ‘अखंड भारत का आवश्यक आहे?’ या प्रश्नाच उत्तर जाणण्यास सारेच उत्सुक असतात. वाचकांची ही उत्सुक्ता दूर करण्याचा प्रयत्न लेखकाने या लेखाच्या माध्यमातून केला आहे. अखंड भारत ही संकल्पना प्रत्यक्षात आणण हे स्वप्नवत असतानाही तसा आशावाद दाखविण्याचा लेखकाचा प्रयत्न नक्कीच स्तुती करण्यासारखा आहे. या पुस्तकातील शेवटचा लेख ‘तुंम्हाला गांधी हवेत की सावरकर?’ या प्रश्नाचे उत्तर देणे तसे अवघडच पण जयेश मेस्त्री यांनी ठामपणे सावरकरांची बाजू उचलून धरल्याचे या लेखात स्पष्ट दिसते. त्यांचे सावरकर प्रेम हे वरवरचे नाही तर त्यांनी सावरकरांचा अभ्यास मनापासून केलेला आहे आणि त्या अभ्यासातूनच या लेखाचा जन्म झालेला आहे.
जयेश मेस्त्री यांचे हे अठ्ठेचाळीस पानाचे छोटेसे पुस्तक वाचकांनी वाचण्यासाठी हाती घेतल्यावर ते संपूर्ण वाचल्याखेरीज ते ते हातावेगळे करणार नाहीत याची मला खात्री वाटते. त्यातील काही वाचक हे पुस्तक आपल्या हृदयालाही कवटाळतील का ते? हे पस्तक वाचल्यावरच वाचकांच्या लक्षात येईल त्यामुळे प्रत्येक मराठी वाचकाने हे पस्तक नक्कीच वाचायला हवे...
– निलेश बामणे
June 10, 2015
आयुष्यात संकट किंवा धर्म संकट ही येतातच पण त्यावेळी दुर्लक्ष न करता साहसाने, संयम बाळगून त्या संकटाला समोर जाण्याची तयारी आपण केली पाहिजे.
September 20, 2021
माझ्या डोळ्यातही एक दैवी असा कॉम्पुटर (Computer ) आहे. असे मला वाटते. तो दैवी माऊस( Mouse ) क्लीक केल्यावर, माझ्या मनावर कोरल्या गेलेल्या साऱ्या आठवणीना उजाळा मिळतो. त्या काळाची त्यावेळची मी माझ्या डोळ्यांत सामावलेली ती छबी, आजही चटकन Display अर्थात प्रक्षेपित होते. माझ्या अंतर मनाला ते चित्रण दिसू लागते.
November 26, 2020
बैठक – माझी ध्यान योग धारणा साधारण अशी होती. एक ठरलेली जागा असे. लहान, स्वच्छ आणि जेथे वर्दळ (अर्थात घरातील) कमी प्रमाणात असेल अशी मऊ आसन व त्यावर रोज धुतलेले धुत वस्त्र आंथरलेले असे. मागे पाठीला आधार म्हणून एक मऊ उशी घेत असे. २० मिनीटे ध्यान धारणा करण्याचा सराव करीत असे. ध्यान रोज दोन वेळा केले जाई. सकाळी उठल्यानंतर व रात्री झोपेपूर्वी. ध्यान बैठक लावण्यापूर्वी शक्य तेवढे शुचिर्भूत अर्थात शरीराने स्वच्छ होवून बसत असे. २० मिनीटांच्या बैठकीसाठी अलार्म लावून घड्याळ ठेवण्याचा सराव प्रथम केला गेला. नंतर सवय होत गेली व शेवटी वेळेचे बंधन गळून पडले. साधी मांडी घालून सहज अशा आसनांत बसत असे. पाठीचा कणा शक्यतो सरळ, त्याला उशीचा आधार होताच. दोन्ही हात समोर व मांडीवर घडी घातलेले असे. मान, दात (जबडे) थोडेसे अलग,जीभ कसलाही स्पर्श रहीत न दाताला, न ओठाला, न गालाला स्पर्श केलेली अर्थात मला जी सुलभ, सहज व सरळ वाटली तीच बैठक मी अंगीकारण गोलो. प्रत्येक साधकाला त्याच्या त्याच्या देहाच्या ठेवणी प्रमाणे, सवयीनुसार तो योग्य अशा बैठकीचा आसन म्हणून उपयोग करू शकतो. नियम हे मार्गदर्शक असले तरी स्वानुभव हेच अंतीम असावे.
संकल्प: हे ईश्वरी अनुष्ठान आहे. तो कृपा करेल का हे माहित नाही. परंतू त्याची कृपा व्हावी, दया व्हावी ही अपेक्षा करणे म्हणजेच एक विश्वास, श्रध्दा, भक्ती वा प्रेम व्यक्त केल्याप्रमाणे असेल. करू घातलेल्या कार्याच्या यशाबद्दल मनाची ती निश्चितता असेल. If shall be uplift of mind. मिळणाऱ्या आनंदाचे, समाधानाचे व शांततेचे स्वागत करण्याची ती मनाची तयारी असेल. तर करू या तसा संकल्प. हे परमेश्वरा, आई, श्री जगदंबे, परमपूज्य श्री. गुरूदेव सर्वाना प्रणाम
प्रार्थना – १) ऊँ गं गणपतये न महा......
२) सर्व मंगल मंगल शिवे सर्वाथ साधीके शरण्ये गौरी नारायणी नमोस्तुते
३)गुरूर विष्णू गुरूर देवो महेश्वरा गुरूर साक्षात परब्रम्ह तस्मैय श्री गुरूर नमह:
तुम्हा सर्वाच्या कृपेची, दयेची व आशिर्वादाची मी अपेक्षा करतो. माझं मन शांत होण्यास मदत करा. माझ ध्यान लागू द्या. चित्त एकाग्र होऊ द्या. मला ईश्वरी सहवासाचा आनंद मिळू द्या. मनाची शांती प्रदान करा.
ऊँ! ऊँ! ऊँ!
नेहमीच्या सवयीप्रमाणे मन हे शरीराच्या बाह्यांगामध्ये रममान असते. सभोवताल आणि देहाचा बाह्य स्पर्शेद्रिंय ह्याच्यामध्ये गुंतून असते. त्यामुळे सभोवतालच्या होणाऱ्या हालचाली, त्यांचे आवाज ह्याची जाणीव होत राहते. शरीराला काही भागात, पाठीला, पायाजवळ, मानेजवळ वा इतर ठिकाणी कळ लागते. अवघडल्याप्रमाणे वाटते, बधीरपणा वा मुंग्या आल्याचा भास होतो. काही भागात खाज येते, तेथील हालचाली जाणवू लागतात. ह्या सर्वाचे कारण चंचल मन त्या त्या अंगाजवळ संपर्क करते व सौम्य वेदनांची (uncomfortable feeling) जाणीव होते. मनाच्या शांत करण्याच्या प्रयत्नामधली ही बाधा असते. आपल्या सहनशिलतेमध्ये मनाच्या निग्रहाने वाढ करणे गरजेचे असते. रोजच्या सवयीने हे हलके साध्य होते. बाहेरच्या मिळत जाणाऱ्या चेतना तुम्ही प्रयत्नाने घालवू शकतात. तुमची बैठक यशस्वी होते. २० मिनीटे वा अर्धातास तुम्ही केलेल्या बैठकीचा संकल्प यशस्वी होवू लागतो. ह्या सर्व वेळेमध्ये तुम्ही स्थिर बसू शकता व तुमची बाह्यांगाची जाणीव कमी होवून जाते. ही तुमची स्थीर बैठकच ध्यानाच्या दिशेने जाण्याचे पहिले पाऊल असते. मनाला तुम्ही एकप्रकारे बाह्यांगातून अंतरंगात घेवून जाण्याचा यशस्वी प्रयोग असतो. मनाचा एक चांगला गुणधर्म म्हणजे मन जरी चंचल असले तरी ते तुमच्या इच्छेला साथ देते, विरोध करीत नसते. तुमच्या ‘मन शांत’ करण्याच्या प्रयत्नाना बाधा करीत नाही.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
March 22, 2016
सध्या राज्याच्या राजकारणात गॉडफादरची चर्चा रंगली आहे. चित्रसृष्टीत गॉडफादर असल्याशिवाय काम होत नाही हे माहीत होते पण, राजकारणात ही त्रुटी तीव’तेने जाणवत असेल असे वाटले नव्हते. काँग्रेस नेते नारायण राणे यांनी ही गरज नुकतीच बोलून दाखवली आणि राज्याची राजकीय पृष्ठभूमी चांगलीच थरथरली.
October 26, 2010
जेव्हा आपण कुल्फी खात असतो तेव्हा आपण एक हात खाली धरतो, त्याला गीतेत "मोह" म्हंटले आहे.
जेव्हा कुल्फी खाऊन झाल्यावर कुल्फीची दांडी चाटतो, त्याला गीतेत "लोभ" म्हंटले आहे.
कुल्फीची दांडी फेकून झाल्यावर, समोरच्याची कुल्फी अजून कशी संपली नाही ते पाहतो त्याला गीतेत " इर्षा" म्हंटले आहे.
काही वेळेस कुल्फी संपण्याच्या अधिक दांडी हातात राहून कॅल्फी गाळून जमीनी वर पडते त्याला गीतेत " क्रोध" म्हंटले आहे.
झोप पूर्ण होऊन सुद्धा जे काही लोक अंथरुणात लोळत राहतात त्याला गीतेत"आळस"असे म्हंटले आहे.
हॉटेल मध्ये भोजन झाल्यावर, ओंजळ भर बडीशोप व साखर खातो त्याला गीते मध्ये " भिकारी" पणाचे लक्षण म्हंटले आहे.
बाहेर जाताना लावलेले कुलूप ओढून पाहाणे ह्याला गीतेत "भय" म्हंटले आहे.
आपण व्हाट्सअप्प वर मेसेज पाठवल्या वर दोन निळ्या टीका दिसतात की नाही ते पाहतो त्याला गीतेत "उतावळेपण" म्हंटले आहे.
पाणीपुरी खाऊन झाल्यावर कधी साधी पुरी, कधी शेवपुरी, कधी गोड पुरी दे रे " भय्या" असे म्हणतो त्याला गीतेत "शोषण " म्हंटले आहे.
फ्रुटी पिऊन झाल्या नंतर स्ट्रॉने शेवटच्या थेंबा पर्यंत फ्रुटी ओढत राहणे ह्याला गीतेत " मृगतृष्णा"म्हंटले आहे.
चणे विकत घेता घेता थोडे चणे किंवा शेंगदाणे हातात घेऊन खाणे ह्याला गीतेत " अक्षम्य अपराध " असे म्हंटले आहे.
जेव्हा पंगतीत जेवताना मठ्ठा वाढणारा येत आहे हे पाहून पानांतील मठ्ठा गटागट पिऊन घेतो त्याला गीतेत "छळवाद" असे म्हंटले आहे.
ही पोस्ट वाचून झाल्यावर गालातल्या गालात हसू येणे म्हणजे " मोक्ष"
July 9, 2017
सुरुवातीच्या काळात रात्रीच्या वेळी सूर्य, चंद्र आणि तारे नव्हते. रेव्हन हा सर्वशक्तिमान होता. त्याने सगळ्या प्राण्यांना, माशांना आणि माणसांना निर्माण केले होते. तरी ते सगळे प्राणी अंधारातच राहत होते. कारण त्याने अजून सूर्य तयार केला नव्हता.
December 25, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti