नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
विद्यार्थी दशेपासूनच मला वाचनाचा सातत्याने नाद आहे. गेल्या पंचावन्न छपन्न वर्षात मी वाचून काढलेल्या पुस्तकांची संख्या पाच हजारापर्यंत जाईल. योगायोगाने मला दैनंदिनी ठेवण्याची सवय लहानपणा-पासूनच लागली. कोणतेही पुस्तक वाचून झाले की, मी पुस्तकाचे नाव, तारीख, विषय याची काळजीपूर्वक नोंदणीं लागलो. याबाबतीत माझी पहिली नोंद वयाच्या सोळाव्या वर्षी आहे.
मुंबईतील बसचा प्रवास अगदी नकोस होतो...
बसमध्ये सीटवर बसलेला बस आपल्या बापाची समजतो ...
सारखेच पैसे देऊनही एक आरामात आणि
दुसरा धक्के बुक्के किव्हा प्रसंगी शिव्याही खात असतो ...
कंडक्टर सारखा आगे बढो म्हणत असतो
शेवटी उतरणाराही दरवाज्यात पोहचत असतो...
मुंबईतील बसचा प्रवासी बऱ्याचदा चुकून
झालेल्या चुकीचाच दंड भरत असतो...
त्या चुका करण्यालाही कधी - कधी
त्याचा नाइलाज कारणीभूत असतो...
बस मध्ये पुरुषाला स्त्रीचा धक्का
लागला तर तो माफ असतो...
पण पुरुषाचा चुकूनही स्त्रीला लागला
तरी तो नालायक ठरतो...
बसमध्ये राखीव जागा मिळविण्यासाठी
जो तो धडपडत असतो ...
त्या धडपडीचा त्रासही विनाकारण निमूट उभ्याने
प्रवास करणाऱ्यांनाच सहन करावा लागतो...
म्हणूनच म्हणतो मुंबईतील बसचा प्रवास अगदी नकोस होतो ...
याच बसमध्ये कित्येकदा नवीन भांडणाचा ,
भानगडीचा आणि प्रसंगी प्रेमप्रकरणाचा जन्म होतो ...
माझ्या सारखा चुकून एकादा लेखकही या बस मुळेच घडतो ...
जो या बसमध्येच कित्येक कावितांसह
कथाही जन्माला घालतो ...
- निलेश बामणे
लहानपणी आई जवळ नसली की भिती. अंधाराची भिती. गोष्टीतील चोराची. भूताची भिती. शाळेत जायला लागल्यावर शिक्षकांची भिती. वर्गातील व्रात्य मुलांची भिती. आणि जसे जसे वय वाढते तसे तसे भिती कमी व निडरपणा येतो.
भक्ती करताना मनात हेतू बाळगून ती करणे भक्तपणाला मारक आहे तर माणसाशी माणुसकीने वागणे हेही अध्यात्मच.
१९५५ सालचा प्रसंग आठवतो. औरंगाबादला मी शासकीय महाविद्यालयात इंटरला ( आजच्या बारावीला ) शिकत होतो. त्यावेळी तेथे दोनच महाविद्यालये होती. …..
विजय ! म्हणजे तुझा लग्नसंस्थेवर विश्वासच नाही ? यामिनीने विचारलेल्या या प्रश्नात जोर होता. त्यावर विजय म्हणाला, ‘ लग्न संस्थेवर माझा विश्वास नाही असं मी म्हणालो तर तू म्हणशील अरे लग्नसंस्था नसती तर तुझा जन्मच झाला नसता हा आता तू जो विचार करतोयस तो वेचार करायला ! पण मी स्पष्टच सांगतो ! कुत्री मांजरे कुठे लग्न करतात तरी त्यांचा वंश वाढतो ना ? आमचा वंश वाढवा म्हणून आम्ही लग्न करतो ! अरे पण वाढलेला वंश पाहायला असतो कोण ? तसही म्हणतात की प्रत्येकाचा वंश दहा पिढ्या झाल्या की संपतो. तुला सांगतो कालच मला माझ्यापेक्षा आठ दहा वर्षांनी लहान असणारा मित्र भेटला होता समाजाच्या नजरेत अंत्यत साधा भोळा भोळसट पण त्याने जे जे उकिरडे फुकले आहेत त्याबद्दल ऐकून मला पेलाभर पाण्यात डुबून मरावस वाटत होत. प्रत्येक आईवडिलांच्या नजरेत आपली मुलं धुतल्या तांदळाची असतात पण ती तशी असतातच असं नाही, आजचे आई- वडील आपल्या मुलांची लग्ने ठरवत नसतात तर फक्त नगाला नग जुळवू पहात असतात. त्यातही अज्ञानामुळे चुकीचे नग जुळवितात.
अशाच दिवशी एका गांवात एक स्पर्धा असल्याची बातमी पेप्रात येते. ही स्पर्धा असते एक झाड तोडायची. त्या गांवाच्या वेशीवर बरेच दिवसापासून वठलेल्या अवस्थेत उभा असलेला एक भक्तम वृक्षराज गांवकऱ्यांना तोडायचा असतो. खरं तर कोणतंही एखादं जिवंत झाड तोडणं म्हणजे माणसाच्या डाव्या हाताचा खेळ, त्यात हे तर मेलेलं झाड. ते तडायला किती वेळ लागणार?
सध्याच्या नुक्लिअर कराराचे भविष्य अंधाराचे आहे. आपण इतिहासा पासून काहीच शिकत नाही. हेच खर.

आपल्याच नादात ती काही वेळ चालत राहिली आणि तिच्यापासून काही फर्लांगभर अंतरावर, ओढ्यावर जो पुल होता, त्या पुलाच्या टोकाशी काहीतरी हालचाल होत असल्याचं तिला जाणवलं….. परत निशाच्या मनात चऽऽऽऽर्र झालं. बापरे… आता हे काय नवीन संकट??…..
आजकाल वयाच्या तीन वर्षापर्यंत लंगोटीचा काळ. अर्थात अधुनिक काळाप्रमाणे डायपर हा शब्द प्रचलीत झालेला. नंतर येतो चड्डी घालण्याचा काळ. त्याची जागा घेतो लेंगा. अर्थात पुढे पँट, इत्यादी हे सारे वर्णन केवळ गम्मत म्हणून. करण कपड्यावरुन वयाचा अंदाज हे कालबाह्य होत आहे. आतातर स्वातंत्र्य ह्या शब्दाची जशी व्याख्या बदलते, तशी ती सांगणारे बदलतात. सांगणारे स्वतःलाच महान समजतात. त्यामुळे व्यक्त होणारे विचार खरे समजावे लागतात.
Copyright © 2025 | Marathisrushti