(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • काकड आरती

    रामदास काकांनं लाऊड स्पीकरात हळी देली आण मंग मलं लय आनंद झाला. तसं पाह्यलं तं काकड आरतीचा काकडा आण परसाद याच्यासाठी गावातल्या बऱ्याच जणायची चढावढं लागायची, म्या बी मांघल्ल्या पाच-सात दिसापसनं परयत्नात व्हतो. आखरच्यान आज कुठं मव्हा नंबर लागला व्हता. मव्ह नाव पहाटं पहाटं लावूड स्पीकरात वाजलं व्हत त्यामुळ मल लय भरून आलतं.

  • केशवा

    मी म्हणाले. तसा घाबरत घुबरत सुकेश माझ्याजवळ आला.माझ्या पुढच्या खुर्चीवर पाय उकड ठेऊन बसला.तो फार घाबरलेला दिसत होता.त्याच्या मनात काहीतरी गुंतागुंत चालली होती.त्याचा चेहरा घाबरून पांढराफटक पडलेला दिसत होता.मला त्याचं हे बावळट रूप पाहुण कसतरीच वाटलं.सुकेश माझ्या बाजुलाच रहायचा.विस पंचवीशीचा तरून असावा मात्र जख्ख म्हातारा दिसायचा.शरीरयष्टीने तो एकदम हडकुळा दिसत होता.शरीरात मांस असाव की नाही ईतपत संशय घेण्याजोगे त्याचे शरीर होते.अंगाची चामडी हडांवर घट्ट चिकटलेली वाटायची.तोंडाचं बोळकं झालेलं तर डोळ्याच्या खोबनितुन त्याचे पिवळट पांढरट डोळे लुकलुकत रहायचे.डोळ्यांच्या वर नाममात्र भुवया होत्या.तर असो.

  • प्रवास

    नेमकाच ग्रॅजुयट झाल्यानं मलं पोस्ष्ट ग्रॅजुएशनसाठी औरंगाबादलं जायाच व्हतं.तिथल्या कॉलेजात मव्हा नंबर लागला व्हता.पहाटं नवची एष्टी व्हती.नवनंतर एष्टी नसल्यानं म्या पाहाटं लवकरच गडबडीनं आटपुण निंघायची तयारी केली.निघंतानी पुन्हा एकदा कागदपत्र निट तपासले.

  • खेड्यातले येडे

    लहानपणापसुन गण्या खेड्यातच राह्यलेला आसते.त्यालं त्या खेड्याच्या बाहिरच कायबी माहीत नसते…….त्यानं आयुष्यात कव्हा त्याच्या गावच्या बाहिर गेलेला नसते.गण्या नेमकाच मॅट्रिक पास झालता.त्याच्या गावातले बरेच जनं मॅट्रीकनंतर शहरात कामधंद्यासाठी जायाचे,पिर्‍या,मव्हण्या,सुरश्या,संज्या,ज्ञान्या आसे बरेचजनं मॅट्रीकनंतर शहरात गेलते.ते गावाकडं आले कि शहरातल्या लय गप्पा टप्पा सांगायचे.शहरातले लोकं आसे राहतातं,तसे राहतातं.

  • ड्रग्जच्या विळख्यात होस्टेल १

    निवांतच्या दरवाजाची बेल वाजली आणि सदूने दार उघडले.
    दोन प्रौढ गृहस्थ बाहेर उभे होते.
    सदूने त्यांना विचारले, “अपोंटमेंट आहे कां तुमची ?”
    सोफ्यावर बसलेले यशवंत हंसले आणि म्हणाले, “सदू पाहुण्यांच स्वागत आपण असं करतो कां ? येऊ दे त्यांना आंत.”
    दोघेही आंत आले.
    दोघे लांबून प्रवास करून आलेले वाटत होते.
    थकलेले दिसत होते.
    यशवंत त्यांना म्हणाले, “बसा जरा आराम करा.”
    दोघे सोफ्यावर बसले.

  • शिकार

    चिणक्या,गोल्या,रवी आन चेंड्या लहानपणापसुनच जिगरी दोस्तं व्हते.एकाच वयाचे अन एकाच शाळतं शिकल्यान तेह्यचा दोस्ताना आंजुकच घट्ट झाला व्हता.ते चौघबी लयच ईपितर व्हते.काम धंदा त काय करायचे नाही पण घरच्यायच्या जिवावरं मस्तपैकी जगुन दिसभर गावात काड्या करत हूंदडायचे.नको तिथं नाक खुपसण्याच्या तेह्यच्या सलयीधं सगळं गाव परेशान व्हतं.एकदिवस आसचं चौघं दोस्त पारावर बसले व्हते.लय दिवसाचं तेह्यच्या जिवनात एंजायमेंटच नवती.गावातबी तेह्यच्या कुरापती चालयण गेलत्या.चौघंबी शांत बसले व्हते.तेव्हड्यात गोल्या मनला,“व्हयं रं चंड्या आपण लय दिसाचं मटनबी खाल्ल नाही आन नरडंबी वल्ल केलं नाही.तव्हा मी काय मंतो आज सुकीरवार हे तं आपण पार्टी करायची का…?”

  • दुहेरी प्रेमप्रकरण

    “धिक् तं च, तां च, इमां च मदनं च मां च” समोरची व्यक्ती जे सांगत होती, ते ऐकून यशवंताना हा जुना संस्कृत श्लोक आठवत होता. संपूर्ण श्लोक असा आहे, “यां चिन्तयामि सततं मयि सा विरक्ता साप्यन्यं इच्छति जनं स जनोऽन्यसक्तः । अस्मत्कृते च परिशुष्यति काचिद् अन्या धिक् तां च तं च मदनं च इमां च मां च ॥” ह्याचा अर्थ – राजा म्हणतो, मी जिचा (पिंगलाचा) सतत विचार करतो, तिला माझ्यांत रस नाही, तिला दुसराच कुणी (अश्वपाल) आवडतो, ज्याला तिसरीच (राजनर्तिका) आवडते आणि त्या तिसरीला (राजनर्तिकेला) दुसराच कुणी म्हणजे मीच आवडतो. तिचा, त्याचा, मदनाचा, हीचा आणि माझाही धिक्कार असो. त्यांच्यासमोर एक श्रीमंत व्यक्ती बसलेली आहे. तिचं नांव आहे. राजकुमार मोकाशी. राजकुमार एका खाजगी कंपनीचे अध्यक्ष व मालक आहेत. त्यांचा व त्यांची पत्नी अस्मिता हीचा पंधरा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला आहे. त्यांच तिच्यावर आजही तेवढचं प्रेम आहे. दुर्दैवाने अस्मिताचं मात्र आता एका कलाकाराने मन जिंकलं आहे. त्याचं नांव आहे राघव ठाकूर. अस्मिताने राजकुमारपासून हे लपवलेलं नाही. तिने सरळ त्याला सांगून टाकले आहे. मात्र त्या राघवसाठी अस्मिता ही अनेकींपैकी एक आहे, हे सत्य अस्मिताला समजतं नव्हतं. यशवंत शांतपणे राजकुमार मोकाशीची प्रेमकथा ऐकून घेत होते. ह्या प्रेमप्रकरणांत आपला सल्ला घ्यायला कांही हा राजकुमार आलेला नाही, हे त्यांना ठाऊक होतं.

  • राजकारणांतील वैर

    राजकारण म्हणजे काय? देशावर अथवा देशाच्या एका भागावर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे उद्योग. ही अगदी ढोबळ व्याख्या झाली पण सत्ता मिळवण्याचे प्रयत्न नक्कीच राजकारणाचा केंद्रबिंदू असतो. लोकशाहींत ही सत्ता मिळवायची तर निवडणुका आल्या पक्ष आले. स्पर्धा आली. पक्षांतर्गत सत्ता, शासन करण्यासाठी सत्ता ह्यांत ते सर्व गुंततात. राजकारण करणाऱ्या माणसांत अनेक पातळ्यांवर स्पर्धा असते. कधी कधी ही इतकी तीव्र होते की दोन राजकारणी एकमेकांच्या जीवावर उठतात किंवा दोघांतील एक जण तरी दुसऱ्याचा इतका द्वेष करू लागतो की तो दुसऱ्याचा जीव घ्यायचा विचार करू लागतो. अर्थात उघडपणे तो हे दाखवेल तर तो कसला राजकारणी. बाहेर तो खूप मैत्री दाखवू शकतो पण त्याच वेळी वैऱ्याच्या खूनाचा बेत मनांत रचत असतो. कधीतरी तो आपला बेत पार पाडण्यात यशस्वी होतो. राजकारणी नेत्याला इतरही विरोधक असतात, जे राजकारणांत असतातच असं नाही. त्यांच्यापैकीही एखादा असाच बेत रचून त्याला मारू शकतो. असे अनेक पदर असलेला हा गुन्हा प्रत्यक्षात घडला होता. एकेकाळी स्थानिक नगरपालिकेचा अध्यक्ष असणाऱ्या एका राजकारणी व्यक्तींचा खून झाला होता आणि दीड महिना होऊन गेला तरी पोलिसांना कांही धागा मिळत नव्हता म्हणून हे प्रकरण घेऊन इनस्पेक्टर हिरवे यशवंताकडे आले होते.

  • पूल उडविण्याचा बेत

    मुंबईतील रेल्वे मार्गावर अनेक छोटे मोठे पूल आहेत.
    दहा फूट ते पंधरा फूट लांबीचे रूळ पुलावरून जातात.
    लोकल भराभर एकामागे एक अशा येत असल्यामुळे कधी कधी दोन गाड्या बाजूबाजूच्या रूळावरून जात येत असतात.
    भारतात वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळे गट घातपात करायचा प्रयत्न करतात.
    कोणी धर्मावरून, कोणी सामाजिक क्रांती घडविण्यासाठी तर कोणी फक्त गोंधळ वाढवून सत्तारूढ सरकारला आव्हान म्हणूनही घातपात करण्याकडे वळतात.
    सामान्य जनता म्हणते की ह्यांत बळी जातात सामान्यांचेच तर हे असं कां करतात ?
    एकदा कां एक मार्ग स्वीकारला की अनेकांच्या अंगात तो अभिनिवेश भिनतो.

  • फार उशीर झालाय गं मम्मी !

    चांदणी चौकातल्या हॉरीबल ट्रॅफिकमध्ये प्रचंड बेफिकिरीने निंजा घुसवत तो माझ्या बाजूला केव्हा आला ते कळलच नाही .
    ना हेल्मेट . ना ट्रॅफिक जॅमचं टेन्शन .
    ना ट्रॅफिक हवालदाराची भीती . चेहऱ्यावर जस्ट बेफिकिरी …
    मी पहात राहिले .
    तो माझ्या जुन्या गाडीकडे भयंकर नजरेनं पहात होता .
    ” या नंबरवर मेसेज टाक , उद्या तुला सोडायला येतो आयटी पार्क मध्ये .”
    त्यानं त्याचा नंबर त्याच्याच रुमालावर लिहून माझ्या अंगावर फेकला .आणि न बघता स्पिडमध्ये निघून सुध्दा गेला .
    मी रुमाल हाती घेतला आणि नकळत तो हुंगला .
    कुठल्या तरी उंची सिगारचा वास येत होता .
    ट्रॅफिक सरकेल तशी मी हळूहळू पुढं होत होते .
    मात्र डोक्यात ‘ तो ‘ होता .