नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
जीए कुलकर्णींनी ज्याक्षणी लेखणीला हात घातला तो क्षण मराठी सारस्वताच्या भाळी कायमचा गोंदला गेला. रूढार्थाने गावकुसाबाहेर राहून त्यांनी मराठी भाषेला जागतिक व्यासपीठ दिले. साहित्याचे सगळे लिखित -अलिखित नॉर्म्स न पाळता ते स्वतःच्या उंचीवर पोहोचले. आम्ही सुरुवातीला त्यांना दुर्लक्षाने मारले. त्याकाळात म. द . हातकणंगलेकर त्यांची काहीशी पाठराखण करीत होते. मग आम्ही त्यांच्यावर (सोप्पा असा ) दुर्बोधतेचा शिक्का मारला. (तसा शिक्का ग्रेसही मिरवत आहे. ) पण या दोघांच्या लेखणीतील मराठी भाषा काही औरच आहे – आपल्या पठडीतील नाही.
January 6, 2021
मला तेथे प्रत्यक्षात आला. माझ्या मित्राने सोबत आणलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशन वगैरे झाल्यावर आंम्ही आमची प्रकाशित पुस्तके त्यांना भेट म्ह्णून दिली आणि दुसर्या पुस्तकांवर त्यांची स्वाक्षरी ही घेतली त्यांच्या भेटीची आठवण म्ह्णून . त्यांच्याशी जवळपास दोन तास चर्चा केली या चर्चे दरम्यान त्यांनी आंम्हालाही बोलत केल. सुरूवातीला आंम्ही त्यांच्याशी बोलताना चाचपडत होतो पण नंतर त्यांनीच आंम्हाला बोलतं केलं.
January 16, 2014
मन , बुद्धि , आणि सदगुण , सदाचार म्हणजे ईश्वराच्या साक्षात्काराचे केवळ अंशात्मक असे दर्शन आहे. या सर्वच विधायक गोष्टी जर माणसात एकत्र आल्या तर तो नुसता माणूस राहणार नाही. त्यात देवत्वाचा अंश निर्माण होईल.
जे जे चांगले आहे , सुंदर आहे , सत्य आहे , शाश्वत चिरंजीवी आहे तो एक ईश्वरी साक्षात्कार आहे.
माणसाची बाह्य सुस्वरुपता , सौंदर्य ही त्याच्या दिसण्यावर , किंवा त्याच्या व्यक्तिमत्वावर असते हे निर्विवाद पण या सुंदरतेतील जीवंतपणा सात्विक डोळ्यातून जाणवतो .
डोळे म्हणजे मनाचा आरसा..!!
मनाची निर्मलता म्हणजे ईश्वरियता
सर्वाप्रती केवळ कल्याणकारी भावनां...!!
हे मानवतेचे मूलतत्व आहे..असे माझे मत.
मानवी मनभावनां , बुद्धि , आत्मा यांचा त्रिवेणी संगम म्हणजे मानवी जीवन आणि असे संगमी जीवन म्हणजे शाश्वत सुख..!!
मानवी मन अनाकलनिय आहे. म्हणुनच " याच्या मनाचा थांग पत्ता लागत नाही किंवा हा आतल्या गाठीचा आहे अशा प्रकारचे वाकप्रचार आपल्याला समाजात रूढ़ झालेले आढळून येतात.
तेंव्हा मानवी मनांचे अनेक कंगोरे आहेत. अनेक उपमांनी मनाला संबोधले आहे. विकारी मन साऱ्या षडरिपुंचे ते आगर आहे. तर सात्विक मनाला सद्गुणांची झालर आहे.
मन:शक्ती म्हणजे जाणीवपूर्वक विचार , स्मरणशक्ती ,भावनांची गुंफण , तर्क , कल्पना असे म्हणता येईल. या बुद्धिरूपी मेंदुच्या प्रेरणा आहेत. मन कधी सोज्वळ , संस्कारी वैचारिक सद्गुणांच प्रतीक आहे. कधी संथ जलाशय तर कधी आक्राळ विक्राळ लाटा उधळणाऱ्या महासागरासारखं देखील त्याच भयंकर असे रूप आहे. तर कधी राऊळ गाभाऱ्यातील तेवणाऱ्या मंद प्रसन्न ज्योती सारखं शांत रूप आहे. तर कधी धगधगता ज्वालाग्नी देखील आहे. याचा अनुभव आपल्याला येतो. मन चंचल आहे. चंचलता त्याचा स्थायी भाव आहे.-
मानवी शरीराला अनेक अवयवांनी दृष्य सुरुपता आलेली आहे . पण मन आणि बुद्धि जीवनाचे समतोल साधणारे प्रेरक असे अदृष्य निराकार अवयवच म्हणावे लागतील आणि ते आपल्या स्पंदनासोबत असतात हे वास्तव आहे. नीर क्षीर विवेक बुद्धिचे मूल्यांकन करण्याची क्षमता याच अदृष्य , निराकार अशा अवयवामध्ये आहे.
वर म्हटल्याप्रमाणे मन चंचल , सैरभैर , दिशाहीन स्वैर भरकटणारे बेकाबू जरी असले तरी वर म्हटल्या प्रमाणे आपले अंतर्मन म्हणजे एक बिलोरी आरसा असून ते मन आपल्याला कधीच फसवु शकत नाही.
आपल्या व्यक्तिमत्वाचं सत्य प्रतिबिंब हे आपल्या मनाच्या दर्पणात असतं..!!
नीरव शांततेत आपल्या मनाची ही विविध रूपं
म्हणजे आपण केलेले सत्कर्म , दुष्कर्म , पाप , पुण्य या साऱ्या चांगल्या , वाईट गोष्टी अगदी एखाद्या चलचित्रा प्रमाणे आपण सहज पहात असतो. म्हणुच आपले अंतर्मन आपल्याच जीवनातील प्रखर तेजस्वी सत्य कधी लपवू शकत नाही.
म्हणून तर जीवन एक रहस्य आहे असे म्हटले आहे आणि त्याचाच वेध घेण्यासाठी मन धावतं असतं.!!
ऋणानुबंधानं एकत्र आलेल्या व्यक्ती या मनानं अगदी निश्चित सन्निध असतीलच असं ठामपणे सांगता येत नाही. तिथे अंतरातिल भावभावनांच अव्यक्त गूढ असतं.!
अशा मनाच्या अवस्थेत मनाला विवेकी बुद्धिच सर्वारथाने सदैव सावरत असते.
म्हणूनच तर बुद्धि ही विवेकाधिष्ठ , वैचारिक , सतर्क , संस्कारी , कल्याणकारी मार्गदर्शक अशी जीवनाची गुरुकिल्ली आहे.
मनाला सद्गति , सन्मति , योग्य तो सन्मार्ग दाखविणारी अशी शक्ती आहे. मन चंचल स्वैर मुक्त आहे . पण बुद्धि ही निर्णायक , अविचल ,निश्चयी आहे.
मानवी जीवनात या बुद्धी आणि मन यांचा सकारात्मक विवेकी संयोग , समतोल हा जीवनाच्या सात्विक सांगते साठी अत्यंत महत्वाचा आहे.
भारतीय प्राचिन सर्वच ग्रंथसंपदे मध्ये " मन आणि बुद्धि " याबाबत अनेक दृष्टांत देवून विवेचन केलेले आहे. मानवी नात्यांची , त्या नात्यातील सर्वच भावसंवेदनांची , सगुण , निर्गुण, दुर्गुण , स्वार्थ , निस्वार्थ , वात्सल्य , प्रेम , द्वेष , संघर्ष , आणि त्यातून अंतिम सत्य असणारा जीवनाचा अर्थ उलगडुन दाखविला आहे याचा प्रत्यय येतो.
मन निरंकुश सार्वभौमी राजासारखे वागत असते
मात्र त्यावर नियंत्रणी अंकुशाची गरज आहे . ती बुद्धि म्हणजेच आपला कार्यरत असणारा विवेकी मेंदूच अशा प्रकारचा अंकुश मनावर ठेवू शकतो. आणि मनाला अविवेका पासून सावरतो , जागृत करतो.
अशा मन आणि विवेकी बुद्धिचा साधर्मी ,समन्वयी समतोल मानवी जीवनाला कल्याणप्रदी ठरतो.
जे संतत्व भगवंत दर्शनाचा मार्ग सुकर , सुलभ , सोपा करतात त्यांनी देखील आपल्या संतवाङ्गमयातुन हा विचार मांडलेला आढळून येतो.
जीव सृष्टिमध्ये मनुष्य हा सर्वात हुशार आहे. चांगले काय किंवा वाईट काय किंवा सत्य काय हे समजण्याची जन्मजात नैसर्गिक दैवी देणगी , बुद्धिमत्ता त्याला ईश्वर कृपेने लाभली आहे. तरी तर्क आणि वितर्काच्या द्विधा मनावस्थेतुन योग्य तो खंबीर मार्ग काढण्यासाठी सुसंगत मन आणि बुद्धि योग्य तो सुंदर दिशा दाखवतात. यालाच मनावरचे सुंदर संस्कार आणि त्याला अनुषंगुन भावनिक कल्याणप्रदी बुद्धिची प्रगल्भता हाच विवेकी संस्कार आहे.
म्हणूनच प्राचीन अनादीकालापासुन जे संत ,मुनी , ऋषी यांचे वाङ्गमय ग्रंथ स्वरुपात उपलब्ध आहे ते वाचल्यावर आपल्याला संस्कारांची महती लक्षात येते.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली , जगतगुरु संत तुकाराम , संत नामदेव , राष्ट्रसंत रामदास स्वामी तसेच अनेक ज्ञात संतांनी , कविवरांनी , साहित्यिकांनी , विचारवंतांनी आपल्या साहित्य संपदेत कल्याणकारी कृतार्थ जीवनाचा समग्र अर्थ समजून संगितला आहे.
रामायण , महाभारत , भगवत गीता , ज्ञानेश्वरी , तुकारामांची गाथा , पसायदान , हरिपाठ , दासबोध इत्यादि ग्रंथामधुन मानवी जीवनाच्या भावनिक नीतिमुल्यांचा परामर्श घेतला आहे.
प.पु. रामदास स्वामींनी आपल्या २०५ मनाच्या श्लोकामधून मनाबद्दल प्रत्येक श्लोकात अत्यंत मनोवेधक , प्रासादिक प्रबोधन केलेले आहे....
हे मना विवेकी बुद्धिने तू जीवन कल्याणासाठी निर्मोही भक्तिने वाटचाल कर असा उपदेश आपल्या सर्वांना केला आहे...
"
प्रभाते मनी राम चिंतित जावा।
पुढे वैखरी राम आधी वदावा।
सदाचार हा थोर सांडू नये तो।
जनी तोची तो मानवी धन्य होतो।
अशी सुरुवात करून
या मनाच्या श्लोकांची सांगता शेवटच्या २०५ व्या श्लोकात...
मनाची शते ऐकता दोष जाती ।
मतिमंद ते साधना योग्य होती ।
चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी ।
म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी।
असे उद्बोधन करून केली आहे.
ते म्हणतात..
" नुसते शंभर श्लोक आणि त्याचा अर्थ जरी तुम्ही ऐकला किंवा वाचला तरी तुमच्यातील सर्वदोष समूळ नष्ट होतील आणि मन निकोप होवून बुद्धि प्रगल्भ होवून जीवनाचा अर्थही कळू लागेल.....!!!
इती लेखन सीमा
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
अध्यक्ष : महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे. (महाराष्ट्र )
दिनांक : १२ / ९ / २०२२
October 9, 2022
पोळ्याचा सन दोन दिवसावर आलता.घरात अठरा विश्व दारीद्र्य.त्यात घरातला सगळा दाळदानाबी संपला व्हता.देवालं निवदालंपण दाळ,गुळ नव्हते.पहाटं उठल्या उठल्याच बायकोनं किरकिर कराया सुरवातं केलती.“मी हाय मनुन टिकली या घरात….” हे जगातलं सगळ्यात जास्त बोललं जाणारं वाक्य तीनं पुन्हा एकदा मलं फेकुन मारलं व्हतं..
October 22, 2023
आजूबाजूचं सौंदर्य नजरेने टिपत असताना काही मिनिटातच एकदम आरडाओरडा ऐकायला आला. समोर बघितलं तर मी सोडून दिलेली ‘गोंदोलो बोट’ पाण्यात पूर्णपणे उलटली होती. सर्वजण गंटागळया खात होते. जीवाच्या आकांताने ओरडत होते.
September 6, 2020
जसजसे शहरात राहून तिथल्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या वातावरणात नोकरीच्या मागे धावून धावून दमल्यावर स्वतःच्या मालकीची एखादी वन रूम किचन किंवा वन बी एच के पर्यंतच मजल पोहचते तेव्हा स्वतःची रूम असून सोसायटी किंवा गृहसंकुलात आपण मेंटेनन्स देऊन भाड्यानेच उपऱ्या सारखे राहतोय अशी भावना निर्माण होते, त्यावेळेस स्वतःच्या गावात, स्वतःच्या शेतात आणि शेतातल्या मातीत उन्हा तान्हा मध्ये का होईना पण राब राबून सुखाने पोट भर तरी खायला मिळत होते असे विचार येतात.
December 19, 2019
यादववंशांत शूरसेन नांवाचा एक राजा झाला. हा मथुरेंत राहून राज्याचा कारभार पाहत असे. म्हणून मथुरा ही सर्व यादव राजांची राजधानी असे लोक समजू लागले. या शूरसेनाचा मुलगा वसुदेव याचे कंसाची बहीण देवकी हिच्याशी मोठ्या थाटाने लग्न झाले. लग्नसमारंभ उरकल्यावर देवकीला घेऊन वसुदेव जाण्यास निघाला, तेव्हां कंस हा आपल्या बहिणीस व मेहुण्यास पोचविण्यासाठी मोठ्या इतमामानें सोन्याचे शेकडों रथ घेऊन निघाला; इतकेच नाही, तर आपल्या बहिणीच्या संतोषासाठी तिचा रथ हांकण्याचे काम त्याने स्वतः हातीं घेतले.
November 15, 2025
February 25, 2016
आज आपणा सर्वांस ज्यांनी इतरांसोबत मला ही मार्गदर्शन केलं, ज्यांनी मला लिहायला शिकवलं. साहित्य प्रकारची अतिशय चांगल्या पद्धतीने ओळख करून देऊन, मला समृद्ध केलं. लेखनशैली उत्तम होण्यासाठी वेळात वेळ काढून कायम तत्परता दर्शवली. असे जेष्ठ साहित्यिक श्री.अरुण वि.देशपांडे यांच्याबद्दल आणि त्यांच्या दीर्घ लेखन-प्रवासाबद्दलचा हा परिचय लेख.
June 13, 2020

परिस्थितीचा रेटा असायला हवा. त्यात गरिबी हवी. आत खोलवर जाऊन पोहोचलेली स्वाभिमानाची जाणीव हवी. स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ईर्ष्या हवी. अडथळ्यांना न जुमानता वाट शोधण्याची दृष्टी हवी. त्यासाठी सभोवतालचा अंदाज घेत कल्पकतेनं उडी मारण्याची आणि उभारी घेण्याची मनाची तयारी हवीच हवी. मग काय होतं?
October 11, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti