(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • ‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा-वैविध्य : विभाग – ४

    ‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा-वैविध्य व त्या अनुषंगानें एकाच रचनाकाराच्या भिन्नभिन्न भाषास्वरूपाची , (आणि अन्य क्षेत्रातील सृजनशील व्यक्तीँची) उदाहरणें यांची ओळख करुन देणारे सदर….

  • ‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा-वैविध्य : विभाग – ५ – अ

    ‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा-वैविध्य व त्या अनुषंगानें एकाच रचनाकाराच्या भिन्नभिन्न भाषास्वरूपाची , (आणि अन्य क्षेत्रातील सृजनशील व्यक्तीँची) उदाहरणें यांची ओळख करुन देणारे सदर….

  • भेट

    शरद जोशी, हे नाव महाराष्ट्राला तरी अपरिचित नाही. ही गोष्ट त्यांच्याच संदर्भातली आहे. घटना आहे १९८० ची.

  • पाणी

    माझं वय लहान होतं; पण सभोवताली काय चाललंय हे कळत असे. त्यामुळेही असेल कदाचित माझ्या गावाकडच्या आठवणी तेवढ्या उत्सावर्धक नसायच्या. वडील पाटबंधारे खात्यात नोकरीला, त्यांना शेती करायची मोठी हौस. शेती करावी अन् लोकांना दाखवून द्यावं की शेती कशी करतात, असं त्यांना वाटत असावं. ते त्यांच्या बोलण्यातूनही येई. नोकरीत असतानाही त्या काळी त्यांनी बटाट्याची शेती नगर जिल्ह्यात करण्याचा प्रयत्न केला होता. थेट सिमल्याहून बेणे आणल्याचं आठवतं. त्यानंतर काही काळ घरात केवळ चर्चा होती ती बटाटयाच्या शेतीची. अखेर एकदा घरात बटाटे आले. त्यांचा प्रत्येकी आकार फार तर खेळातल्या गोट्यांएवढा असेल. त्यानंतर बटाट्याची शेती मागे पडली ती कायमचीच; पण जेव्हा जेव्हा माझे काका घरी यायचे तेव्हा शेतीचा विषय निघायचाच. त्या वेळी आम्ही कोपरगाव तालुक्यातल्या कोळपेवाडी या साखर कारखान्याच्या गावी राहत असू. तेथून फार तर पन्नास किलोमीटरवर गंगापूर तालुक्यात माझं गाव होतं. मांजरी हे गावाचं नाव. लहानपणी या गावात गेलेलो, खेळलेलो. तिथलं देवीचं मंदिर, गावकऱयांनी तयार केलेला तलाव, आमच्या घरातलं रेशनचं दुकान आणि त्यासमोरचं पोस्ट, या त्यातल्या आठवणीच्या खुणा. शेतावर जायची कधी वेळ यायची नाही; कारण तिथं धड ना सावली ना पाणी. स्वाभाविकपणे नगर जिल्ह्यातील हिरवीगार शेती पाहिलेल्या मला ते शेत वैराणच वाटायचं. फार तर विसाव्याला एक चिंच होती. चिंचेच्या खाली पीर होता. त्यामुळं तिथं आम्हाला फारसा प्रवेशही नसायचा. तर, काका शेती करायचे आणि ते घरी आले की ज्या चर्चा होत त्यात शेतीचा विषय खूपच कमी असायचा. कुठे कर्ज घेतलंय, कुठलं पीक जळालं, या वेळी खायला दिढीनं दोन पोती घेतलीत (दिढीनं म्हणजे या हंगामात घेतलेलं एक पोतं धान्य दुसऱया हंगामात दीड पोतं द्यायचं) ही पोती कधी उत्पन्न आलं आणि परत करता आली, असं झालं नव्हतं. प्रत्येक वेळी वडील काही ना काही पैसे काढून देत. काकांचं आमच्या घरातलं वास्तव्य बरचसं तणावाचंच असे; पण माझ्या दृष्टीनं मात्र थोडा वेगळा अनुभव असायचा. काका परत जायला निघाले की मी त्यांच्याबरोबर स्टॅन्डवर जायचो. काकाला मिसळ आणि जिलेबी खूप आवडे. त्याच्या दृष्टीनं ती चैनच होती. आमच्याकडे आल्यावर बहुधा त्याला ती करता यायची.
    शेती हा एकूणच विषय माझ्या आईच्या दृष्टीनं फारसा उत्सुकतेचा किंवा आत्मीयतेचा नसायचा. तिला घरात वाचविलेल्या पैशातून शेतीसाठी काही द्यावं लागायचं हे त्यामागचं कारण असावं; पण मला आठवतं, त्या वेळी शेती हा उत्साहाचा विषय बनला होता. सुरुंग, ब्लास्टिंग असे एरवी वापरात नसलेले शब्द चर्चेत असायचे. पैशाचा विषयही यायचाच, पण त्या चर्चेत निराशा-नाराजी नसायची. उत्साह असायचा. स्वप्नं असायची. एके दिवशी कळलं, की आपल्या शेतावर विहीर काढायची ठरलीय. विहीर आणि पाणी यांचा संबंधच इतका अभिन्न, की या कल्पनेनंच आम्ही भारावून गेलो होतो. चार-आठ दिवसांनी बातमी यायची. खोदकाम सुरू झालंय, एक परस झालं. दोन परस खोदलेत पण जमिनीला ओलावाही नाहीये. एके दिवशी काका आले ते चेहरा एवढासा करूनच. विहिरीत पक्का दगड लागला होता. पाच परस खोदल्यानंतरही पाण्याचा पत्ता नव्हता. गेले काही दिवस सातत्यानं पैसे गावी जात होते. आज ना उद्या पाणी लागेल ही आशा होती. पाणी रोज स्वप्नात पाहिलं जात होतं त्यावर आजचा दिवस सुखाचा होत होता. त्या रात्री केवळ विहीर अन् पाणी एवढाच विषय चर्चेला होता. काका निराश होता, तर वडील काहीतरी मार्ग निघेल, अशा प्रयत्नात. अखेरीला औरंगाबादेतून चार माणसं सुरुंग काढायला न्यायचं असं ठरविलं, तेव्हा पहाट झाली होती. सकाळी-सकाळी काका गावी गेला. आमची मिसळ-जिलेबी झालीच नाही. त्या दिवशी वडील दिवसभर काही मोठ्या बागाईतदारांशी बोलत होते, काही ठरवीत होते. अखेर ठरलं. गुरुवारी निघायचं. गाडी घेऊनच जायचं. कोपरगावहून ब्लास्टिंग मशिनची गाडी येईल. हे सारं तपशिलानं लक्षात रहायचं कारण म्हणजे त्या गाडीबरोबर मलाही नेणार होते. मी केवळ गुरुवारची वाट पाहत होतो. अखेर गुरुवार उजाडला आम्ही निघालो. सकाळी दहा वाजता शेतावर पोहोचलो तेव्हा मजुरांनी विहिरीच्या खड्यात किमान दीड-दोन फूट खोलीची नऊ बिळे तयार केली होती. त्यात स्फोटके भरण्यात आली. त्याला जिलेटीन म्हणत. या सुरुंगाचं सारं नियंत्रण या गाडीतून होणार होतं. सारं काही सज्ज होतं. सर्वांना विहिरीपासून दूर जायला सांगण्यात आलं. आता लवकरच स्फोट घडविण्यात येणार होते. उत्कंठा वाढत होती. सारे विहिरीपासून किमान शंभर मीटरवर होतो. काकाही मागे झालेला होता. इशारा झाला आणि बार उडाले. किती बार झाले कळलं नाही; पण विहिरीतून दगड उडाले, खपल्या उडाल्या. `थांबा।़ एवढ्यात पुढे जाऊ नका,' असं गाडीतून सांगण्यात येत होतं; पण आता बार थांबलेत म्हणून काका पुढे झाला तेवढ्यात एक स्फोट झाला. दगड उडाले. छोटे अन् मोठेही. एक कपटा उडाला तो काकाच्या कपाळावर. त्यानं कपाळाला हात लावला. तो ओला झाला होता. रक्त येत होतं. काका तसाच विहिरीकडे धावला अन् ओरडला, `दादा।़ पाणी!' कपाळाची खोक विसरून पाण्याचं ते निर्मळ रूप तो पाहत होता. विहिरीला तीन जिवंत झरे लागले होते. झऱयाच्या मुळाशी स्वच्छ पाणी मातीत मुरत होतं. आमचा आनंद कष्ट, वेदना थिट्या करीत होता.
    आज हे सारं आठवलं ते वृत्तपत्रातल्या एका छोट्या बातमीवरनं. बातमीत म्हटलं होतं, `22 मार्च हा जागतिक जलदिन आहे.'

    -- किशोर कुलकर्णी

  • तिकडचे अन् इकडचे

    काही गोष्टींना कसा योगच यावा लागतो, तेव्हा त्या घडतात. जसे मुलीचे लग्न. योग आला की चटकन् dजमते नाही तर चपला झिजवून झिजवून वधुपिता कसा रडकुंडीला येत असतो. आमच्या कुंडलीत पण परदेशगमनाचा योग लिहिलेला असावा म्हणूनच मुलगा अन् सून हाँगकाँगला गेल्यावर आम्ही उभयता कॅथे पॅसिफिकच्या विमानाने एका संध्याकाळी हाँगकाँगला येऊन पोहोचलो.
    बेटसमूहांचा बनलेला हाँगकाँग हा आता चीनच्या ताब्यात आला आहे; पण ब्रिटिशांच्या वेळेस असलेला हाँगकाँग आता चीनने तसाच ठेवलेला आहे. तेथील स्वच्छता कशी वाखाणण्यासारखी आहे. ती तर आम्हाला लहान मुलांपासूनसुद्धा दिसली. येथील मुले च्युईंगगमचा राहिलेला भाग व्यवस्थित वरच्या आवरणात गुंडाळून डस्टबीनमध्ये फेकताना आढळली. येथे सिगारेटझोनमध्येच लोक सिगारेट ओढतात व थोटके डस्टबीनमध्ये टकतात. पान खाणे नसल्याने पिंक टाकणे हा भाग येथे दिसत नव्हता. काम व्यवस्थित करणे हे सगळ्यांच्या कसे रक्तात भिनलेले आढळले. सकाळी झाडझूड करणाऱया स्त्रिया न बोलता आपले काम व्यवस्थित करताना आढळल्या. आम्ही एका मोठ्या मॉलमध्ये एका मजुराला दिवसभर कठडे साफ करताना पाहिले. ते कठडे कसे स्वच्छ चकचकीत दिसत होते. झाडे व्यवस्थित लावलेली दिसत होती. त्यांच्या पालापाचोळ्याची विल्हेवाट दररोज लावली जात होती. मी तर रेल्वेस्थानक, बसस्थानक व मॉलमधील टॉयलेट्स कशी स्वच्छ व दुर्गंधविरहित पाहिली. जनता रहदारीच्या नियमांचा व्यवस्थित आदर करताना पाहिली. पोलीस वॉकीटॉकी घेऊन फक्त सर्व व्यवस्थित चालले आहेत की नाही, हे पाहायचे. `येथे असे केले की इतका दंड होईल' असे बोर्डपण ठिकठिकाणी होते; पण दंड भरताना आम्हाला कोणीच दिसला नाही. व्यायामाची आवड मात्र येथील सर्व स्तरांतील लोकांना असलेली दिसली. `ताई ची' हा व्यायामाचा प्रकार सकाळी 6 ते 8 पर्यंत सर्व लोक करतात. काही रेकॉर्डप्लेअरवर व्यवस्थित व्यायाम करतात, तर काही तलवारी घेऊन व्यायाम करतात. डबलबार, सिंगलबारचा व्यायामपण करणारे दिसलेत. आम्ही एका ठिकाणी तर एका वृद्धाला डबलबारचा व्यायाम करताना पाहिले. ज्यांना हे जमत नाही ते चालण्याचा किंवा धावण्याचा व्यायाम करीत होते. सकाळी चालणारे कसे जोरजोरात हात हलवीत रस्त्यावर चालताना दिसत होते. एकदा तर रात्री 9 वाजता एक युवक समुद्रकिनाऱयाच्या कडेने धावताना दिसला. आम्ही मुलाला विचारले तेव्हा त्याचे उत्तर होते, ``येथे व्यायामाला काळ-वेळ नाही. ज्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो करतो.''
    म्हणूनच आम्हाला येथे कोणीही पोट सुटलेली व्यक्ती आढळली नाही. सर्व कसे सडसडीत अन् तरुणच दिसायचे. चेहऱयावरून वयाचा अंदाज येत नव्हता. म्हणून मला सुचले-
    या चपट्या चिनी लोकांच्या देशात
    ताई ची हे करतात दररोज लोक
    म्हातारा मग कोणी दिसत नाही
    सर्वच कसे तरुण दिसतात हे लोक
    स्वच्छता तर येथे इतकी की माशापण दिसत नव्हत्या. मी एका मटणाच्या दुकानात टांगलेल्या डुकरावर एकही माशी पाहिली नाही. आम्ही हाँगकाँग पाहून कसे मग आश्चर्यचकितच झालो.
    यथावकाश आम्ही भारतात परतलो अन् आमचे मन कसे प्रत्येक गोष्टीची तुलना करीत राहायचे. वाटायचे, तिकडची स्वच्छता आपल्याकडे केव्हा येईल? मग आम्ही अमरावतीला येऊन पोहोचलो. हळूहळू मन मग पुन्हा येथील गोष्टींना सरावले. कोणी जाताना पानाची पिचकारी मारली, की आम्ही मान बाजूला वळवायचो. मटणाच्या दुकानात कापलेल्या बोकडावर असंख्य माशा बसलेल्या दिसत असूनसुद्धा मांस विकत घेणारे पाहायचो. सकाळी रस्ते झाडताना स्त्रिया काम मध्येच सोडून गप्पा मारताना पाहू लागलो. नो पार्किंगमध्ये तर एकदा पोलिसांची गाडीपण उभी असलेली पाहिली. मुलांना स्वच्छतेचे धडे देण्याऐवजी रस्त्याच्या कडेला प्रातर्विधीला बसवणाऱया स्त्रिया पाहिल्या. वाटले जाऊ द्या, पण काही तरी सुधारणा अजूनही दिसेल अन् मग दिसले- येथे लोक आता व्यायामकडे वळलेले आढळले. सकाळी किंवा संध्याकाळी लोक नियमितपणे फिरताना दिसतात. चांगले वाटले आम्हाला.
    सकाळी एका सलवार-कमीझमधील स्त्रीने रस्त्यात धावताना थांबून आम्हाला `हाय' केले. मग आठवले- अरे, ही तर देशपांड्यांची नेहमी साडीत दिसणारी मंदा. पुढे भेटले रामभाऊ जे दररोज नेहमी सूटबुटात असायचे. आता शॉर्ट पँट- जर्सी व लिबर्टीच्या जोड्यात. वारुअण्णा मात्र मलमलचा सदरा व धोतरामध्येच हिंडत होते. नानकराय सिंधी जोरजोरात हात हलवीत रस्त्याने फिरताना आम्ही पाहिला. शेजारच्या म्हाताऱया सिंधुताईही हिंडताना दिसल्या. ही सर्व मंडळी मग मालटेकडीच्या माथ्याकडे सकाळी सकाळी चालली होती. असेच पुष्कळसे लोकपण त्यांच्याबरोबर चढाव चढून व्यायाम करताना दिसले. आम्हाला खूप बरे वाटले म्हणून आम्ही खालीच एका झाडाखाली बसलो. थोड्या वेळाने व्यायाम करणारी मंडळी मालटेकडीवरून खाली उतरली. ते सर्व आता खाली बाजूला उभ्या असणाऱया हातगाड्यांकडे वळले. सर्व जण मग सामोसा, मिसळ, चहा घेत बसून श्रमपरिहार करीत होते. रामभाऊ सिगारेट फुंकत मंदाबरोबर गप्पा मारीत होते, तर मंदाताई मिसळ खात होत्या. सिंधुताईंनी गरमागरम सामोसे बांधून घेतले होते.
    असा प्रकार आम्ही तिकडे कुठेच पाहिला नव्हता; म्हणून आम्ही दोघे एकमेकांकडे पाहून हसलो. मी मग हसत हसत म्हणालो,
    चलता है चलने दो
    जो होना है वह होने दो
    अब तो हमे सिर्फ खाना है
    हम अब बहुत थक गये है
    एकंदरीत तिकडचे तिकडे अन् इकडचे इकडे हेच खरे!

    रमेश इंगोलीकर, अमरावती

    -- किशोर कुलकर्णी

  • सायकल

    त्या वेळी मी पुण्याच्या ‘तरुण भारत’मध्ये काम करीत होतो. पत्रकारितेतला तसा तो उमेदवारीचा काळ. पुणही त्या वेळी आज जसं वाढलेलं आहे, तसं नव्हतं. पेठांच्या मर्यादेत व्यवहार होते आणि पर्वतीही दूर वाटत असे. अशा या काळात मी विठ्ठलवाडी या शहराजवळच्या वस्तीत राहत होतो. बसव्यवस्था अपुरी होती. पुणेकरांच्या हक्काचं वाहन होतं सायकल; अर्थात माझ्याकडे तीही नव्हती. स्वाभाविकपणे विठ्ठलवाडीपासून पुण्यातल्या नातूबागेपर्यंत पायी किवा बसने जाणं हाच पर्याय होता. रात्री कामावर जाणं, अंकाची छपाई सुरू झाल्यानंतर पुण्यातल्या मंडईत अन्य पत्रकारांबरोबरच्या गप्पाष्टकात सहभागी होणं आणि उजाडता-उजाडता घरी परतणं असा दिनक्रम होता. अगदीच काही झालं तर संपादकीय विभागात असलेल्या एखाद्या बाकड्यावर रात्री तीन-चार वाजता आडवं होणं आणि सकाळी जाग येईल तेव्हा घराचा रस्ता पकडणं, यातही वेगळं काही वाटत नव्हतं. त्या दिवशी रात्री असाच मी एका बाकावर निद्रिस्त झालो. जेव्हा डोळे उघडले तेव्हा कोणी तरी मला उठवीत होतं. समोर पाहिलं तर विनायकराव जोशींची ती मूर्ती होती. विनायकराव जोशी हे काही पत्रकार नव्हते. खर्‍या अर्थानं ते संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते; पण त्यांची काही व्यवस्था असावी म्हणून ते ‘तरुण-भारत’मध्ये प्रादेशिक बातम्यांचं काम पाहत. संपादन शिकण्याच्या काळातही मला एवढं कळत होतं, की विनायकरावांना संपादनाचं फारसं कसब नाहीये; पण संस्थेतला एक ज्येष्ठ सहकारी असं त्यांचं स्थान मान्य करावंच लागत असे. प्रादेशिकला बातम्या नाहीत असं म्हटल्यानंतर त्यांनी एकदा प्रादेशिक बातम्यांची फाईलच कम्पोझला पाठवून दिल्याचं मी पाहिलं, अनुभवलेलं होत. स्वाभाविकपणे एक पत्रकार म्हणून त्यांच्याविषयी आवर्जून आदर वाटावा, असं नातं तयार झालेलं नव्हतं. तर त्या दिवशी त्यांनी मला झोपेतून उठविलं. ‘
    थं का झोपलास?’ त्यांचा प्रश्न. मी म्हटलं, ‘रात्री तीन वाजता काम संपलं. घरी जायला बस नव्हती आणि पायी जायचं

    तर कुत्र्यांची भीती म्हणून इथं

    झोपलो.’ ‘ही काही झोपायची जागा नव्हे,’ त्यांनी सुनावलं अन् माझ्या त्या दिवसाचा सूर्य उगवला. मनातून वैतागलो. थोडं आधी जागी व्हायला हवं होतं असं वाटलं; पण इलाज नव्हता. मी उठलो. फ्रेश झालो आणि घरी निघण्यापूर्वी जातो असं सांगण्यासाठी त्यांच्या टेबलाशी आलो. त्यांनी माझ्याकडे न पाहताच बस म्हटलं. मी बसलो. मग ते म्हणाले, ‘कुठं राहतोस?’ ‘विठ्ठलवाडीला’ मी उत्तर दिलं. ‘येतोस कसा?’ पुन्हा त्यांचा प्रश्न. ‘बसनं किवा पायीही’ माझं उत्तर. ‘सायकल का नाही घेत?’ पुन्हा प्रश्न. त्यावर मी गप्पच. ‘पगार किती मिळतो?’ पुन्हा प्रश्न आला. मी म्हटलं ‘२५० रुपये.’ माझ्या या उत्तरावर ते थांबले. माझ्याकडे पाहत ते म्हणाले, ‘दरमहा दहा रुपये वाचवू शकशील?’ हा प्रश्न मला अनपेक्षित होता. दहा रुपये वाचवायचे? कशासाठी? मनात एकूण महिन्याच्या खर्चाचा हिशेब सुरू झाला. ठरविलं तर वाचविता येतील अन्यथा नाही, असं तळ्यात-मळ्यात उत्तर मनात आलं; पण ‘हो शक्य आहे,’ असं उत्तर तोंडातून निसटलं होतं. ते ‘ठीकै’ असं म्हणाले अन् मी निघालो. माझ्या इथं झोपण्याचा अन् मी दहा रुपये वाचविण्याचा काय संबंध आहे हे कळेना. खूप विचार केल्यावर कशाला वाचवायचे असा विचार आला अन् तो विषय मी पूर्णपणे बाजूला काढून टाकला. माझा दिवस किवा फारतर रात्र म्हणा सुरू झाली होती. सायंकाळी सातच्या सुमारास मी ऑफिसला आलो. एरवी मी दिवसभरात केव्हाही येत असे; पण आज ठरवूनच सायंकाळी आलो. चार तास झोपलो तर काय बिघडलं? या प्रश्नानं माझ्या अहंकारला धक्का दिला असावा बहुतेक. ऑफिसमध्ये येऊन पाहतो तो विनायकराव जोशी अजूनही त्यांच्या जागेवर बसलेले होते. त्यांना इतका वेळ ऑफिसमध्ये बसलेलं मी पाहिलं नव्हतं. मी येऊन माझ
    या जागेवर बसणार तेवढ्यात त्यांनी मला बोलावलं. ते माझी वाटच पाहत होते, असं वाटलं अन् ते खरंही होतं. मी त्यांच्या टेबलाशी जाऊन उभा राहिलो. ‘बस,’ ते म्हणाले. आता काय, असा प्रश्न माझ्या मनातून माझ्या कपाळावरच्या आठ्यांमध्ये झळकला असावा. ते पाहून ते म्हणाले, ‘बरं असं कर,’ असं म्हणून त्यांनी दोन किल्ल्या माझ्या हातात दिल्या. म्हणाले, ‘बाहेर एक सायकल ठेवलीय. त्यावर तुझं नाव, पत्ता टाकलाय. आजपासून ती तुझी झाली. आता तुला इथून ऑफिसपर्यंत पायपीट करायला नको.’ त्यांचा प्रत्येक शब्द मला अनपेक्षित होता; पण हातात किल्ल्या होत्या. मी वर गेलो. सायकल पाहिली. नवी कोरी, चेनकव्हर, सीटकव्हर लावलेली बंपरवर अजून खाकी कागद असलेली.....माझं हक्काचं वाहन... नवं कोरं. सायकल घेणं हे आज अगदी साधी बाब; पण तीस वर्षांपूर्वीचा तो काळ आठवला म्हणजे आजही त्या सायकलचा नवेपणा जाणवू लागतो. मी पुन्हा विनायकरावांकडे आलो. त्यांनी माझ्या हातात पावती दिली. एकशे दहा रुपयांची. विनायकराव म्हणाले, ‘हे बघ, दरमहा दहा रुपये माझ्या बचत खात्यात जमा करायचे. हा माझा अकौंट नंबर. दहा हप्ते भरायचे. उरलेले दहा रुपये माझ्या वतीने तुला.’ ती पावती हातात घेताना, खिशात हात घालताना, त्या चाव्या हाताळताना मी त्या कसबी पत्रकार नसलेल्या पण माणूसपण असलेल्या माझ्या ज्येष्ठ सहकार्‍याकडे पाहत होतो अन् काहीच घडलं नाही, अशा थाटात ते बाहेर पडले.

    -- किशोर कुलकर्णी

  • कचकड्यांचे मोती

    सन्मान सांगावा जगाला, अपमान सांगावा मनाला, असं काहीसं सांगितलं जातं. त्यामुळंच कदाचित माणसं आपली झालेली फसगत सांगायला फारशी राजी होत नसावीत. मारुतीच्या बेंबीत बोट घातल्यानंतर किती गार वाटलं, याच्याच कथा अधिक. तर आज मी सांगणार आहे, ती घटना आहे माझ्या फसगतीची. अंध विश्वासाची आणि यशाकडे जाण्यासाठी शॉर्ट कट निवडण्याची.
    तो काळ होता 1998 चा. माझा व्यवसाय अत्यंत अडचणीत आलेला होता. डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. सार्वत्रिक मंदीचे चटके जाणवत होते. मी प्रिंन्टिंग, डिझायनिंग अशा व्यवसायात होतो. पुण्यातल्या शनिवार पेठेत एक मोक्याच्या जागेवर कार्यालय होतं. एके दिवशी एक गृहस्थ आले. काही तरी शोधत होते. त्यांच्या हातात एक फोटो होता. अक्कलकोट स्वामींचं महिला वेशातलं ते चित्र मी अनेक वेळा पाहिलं होतं. ते छायाचित्र त्यांनी मला दाखवलं. म्हणाले, ``असं चित्र मला हवं आहे. तुम्हाला माहीत असेल, तर पहा किंवा मला त्याच्या काही कलर प्रिन्ट्स काढून द्या.'' मंदीच्या काळात ग्राहक आलं होतं. त्यांना बसा म्हटलं. त्या छायाचित्राचं स्कॅनिंग करून फोटो लॅबमध्ये तुम्हाला चांगल्या प्रती स्वस्तात मिळतील, असं त्यांना सांगितलं. फोटोचं स्कॅनिंग केलं. त्याचे वीस रुपये त्यांनी लगेच काढून दिले. हे काम सुरू असताना गप्पा आल्याच. फोटो प्रती कशासाठी हव्या आहेत, असं विचारल्यानंतर त्यांनी त्यांच्या मित्राचा एक अनुभव सांगितला. अत्यंत अडचणीत आलेल्या त्या मित्राला कोणीतरी ही प्रतिमा दिली आणि त्याचे सारे प्रश्न सुटले, असं त्याचं सार होतं. जाताना त्यांना मी म्हटलं, ``तुमच्या फोटोकॉपीज आल्या की मला एक द्या. त्याचे हवे तर पैसे देईन मी.'' माझ्या या विधानावर तो थांबला. माझ्याकडे न्याहाळून पाहिलं, म्हणाला, ``साहेब, का थट्टा करता माझी. तुमच्यावर तर साक्षात लक्ष्मी प्रसन्न आहे. तुम्हाला आणखी काय हवंय?'' मी फारशा तपशिलात गेलो नाही; पण सध्या अडचणीत आहे, असं सूचित केलं. आता हे गृहस्थ पुन्हा बसले होते. म्हणाले, ``मी आज तुम्हाला एक कोटी रुपयाचं कर्ज द्यायला तयार आहे. कारण, तेवढी तुमची क्षमता आहे हे मी पाहातोय. माझा माझ्यावरच विश्वास बसेनासा झाला. हे कसं शक्य आहे?'' सारं शक्य आहे महाराजा, असं म्हणून तो सांगू लागला, ``मी भारतात असतो. काही वेळा आप्रिकेमध्ये. माझी बहीण तिकडेच आहे. तिच्या पैशाची गुंतवणूक मी करतो. आज मी तुमच्या व्यवसायात एक कोटीची गुंतवणूक करतोय, असं समजा. संकटात असलेल्या माणसाला मदतीचा हात हवा असतो इथं तर तो माझं सारं संकटच घ्यायला तयार होता. माझ्या आशा दुणावल्या होत्या. तो माणूस माझ्यासाठी देवमाणूसच बनलेला होता. यानंतर अर्धा पाऊणतास आम्ही गप्पा मारीत होतो. त्याला निरोप देताना दुसऱया दिवशी माझ्या घरी येण्याचं निमंत्रण द्यायला- मी विसरलो नाही. त्यानंही मोठ्या आनंदानं माझ्या निमंत्रणाचा स्वीकार केला. ती संध्याकाळ माझ्यासाठी स्वप्नवत होती. रात्र तर थेट स्वप्नांचीच होती. दुसर्‍या दिवशी सकाळी नऊ वाजताच ते माझ्या घरी आले. आम्ही दोघांनी त्यांचं स्वागत केलं. येताना त्यांनी एक मखमलीची डबी आणलेली होती. खास मला देण्यासाठी. ते म्हणाले, ``या डबीत खास आप्रिकन मोती आहेत. ते तुमच्या देवघरात ठेवा. मी संध्याकाळीच गुजरातला जात आहे. आठवड्याने येईन तेव्हा आपण एक कोटीचा व्यवहार करू. त्यासाठी आवश्यक तर तुमच्या वकिलांशी बोलून करार तयार करून ठेवा. मला माझ्या पैशाची काळजी नाही. कारण, अशा अनेक कोटींचा व्यवहार तुम्ही करताय, हे आताच मी पाहात आहे. पण एक करा- ही डबी आठ दिवसांनी माझ्या समक्ष उघडा. तिची साग्रसंगीत पूजा करू आपण त्या वेळी.'' माझा त्यालाही आक्षेप असण्याचं कारण नव्हतं. आमची न्याहरी झाली आणि ते जायला निघाले. थोडं थांबत ते म्हणाले, ``मी जी डबी दिली तुम्हाला ती फुकट देता येत नाही आणि त्या मोत्याची किंमतही करता येत नाही. असं करा, एका पाकिटात एक रुपया, दहा रुपये, शंभर रुपये तुम्हाला वाटेल तेवढी रक्कम ठेवा. पाकीट बंद करा अन् मला द्या. मी ते पाकीट तसंच बहिणीकडे पाठवून देईन.'' मी ठीक म्हणालो. आत गेलो. बायकोला सांगितलं. ती म्हणाली, ``अकरा रुपये ठीक आहेत. अजून कशाचा कशाला संबंध नाही अन् आज आपली क्षमताही कुठे आहे?'' मी म्हटले, ``असे कसे? अमूल्य गोष्टीची किंमत दहा रुपये? नाही. असं कर, एक हजार एक रुपया पाकिटात घाल अन् दे.'' तिची तयारी नव्हती; पण आम्ही दोघांनी आतल्या खोलीत अधिक काळ रेंगाळणं शंका निर्माण करणारं होतं. ती ठीक म्हणाली. एक हजार एक रुपयांचं पाकीट आदरपूर्वक त्या गृहस्थाच्या हातावर ठेवलं. त्याला नमस्कार केला आणि निरोप दिला. आज या घटनेला सात वर्षे झालीत. त्यानं दिलेल्या फोनवर कोणी भेटले नाही. तो गृहस्थ मला स्वामीमहाराजांचं छायाचित्र द्यायला आला नाही की कोणताही व्यवहार करायलाही फिरकला नाही. ज्या वेळी कर्जफेडीसाठी मी माझं राहतं घर विकलं तेव्हा सामानात ती डबी सापडली. ती उघडली. त्यात कचकड्यांचे तीन मोती होते. तापमानाच्या परिणामानं मोत्यांवरचं कवच निघालेलं होतं. विश्वास, श्रद्धा या बाबी तुमचं आत्मिक बळ वाढवायला ठीक आहेत; पण केवळ त्यावर संकटाचा सामना करता येत नाही. कारण, संकटाचा सामना करायला श्रद्धेबरोबरच प्रयत्नही लागतात, हे त्या हजारएक रुपयांनी मला शिकविलं होतं.

    -- किशोर कुलकर्णी

  • माणुसकीचा झरा

    मला 24 नोव्हेंबर, 1990ची ती उत्तररात्र आजही आठवतेय. रात्रीचा सव्वादोन-अडीचचा सुमार असेल. माझ्या पत्नीला दुसऱयांदा दिवस गेले होते. प्रसृतीची तारीख 30 नोव्हेंबर होती. एक पाच वर्षांचा मुलगा आधी होता. आता तो 21 वर्षांचा आहे.
    माझ्या पत्नीला सहा दिवस अगोदरच प्रसृतीवेदना होत होत्या. मी माझ्या आईला व पत्नीला तयार राहण्यास सांगितले. एखाद्या वाहनाची व्यवस्था होते काय, हे बघण्यास घराबाहेर पडलो. तेव्हा आम्ही मुलुंड (पू.) मध्ये रहायचो. आम्ही नाव नोंदविलेले प्रसृतीगृह मुलुंड (प.) ला होते. मला रस्त्यावर एकही रिक्षा-टॅक्सी मिळाली नाही. शेवटी आसपासच्या दोन-तीन रिक्षावाल्यांच्या घरी गेलो; पण त्यातील दोघे जण गावाला गेले होते. तिसरा म्हणाला, की त्याची रिक्षा नादुरुस्त आहे. मला खूपच दडपण आले. शेवटी मी पूर्व महामार्गावर उभा राहिलो. दिसेल त्या वाहनाला थांबण्याची विनंती करीत होतो; पण कोणीही आपले वाहन थांबविण्यास तयार नव्हता. त्यात त्यांची तरी काय चूक होती म्हणा! त्या उत्तररात्री वाहन थांबविण्याचा धोका कोण पत्करेल? इकडे माझ्या पत्नीचा व आईचा काळजीयुक्त, वेदनायुक्त चेहरा दिसत होता. इतक्यात मुलुंड चेक नाक्यावरून एक मारुती मोटर आली. मी तिला हात केला. आश्चर्य म्हणजे ती थांबली. मी त्यांना माझी असहाय्य व अगतिक परिस्थिती विशद केली. ते गाडी घेऊन माझ्या घरी आले.

    घरी आई व पत्नी डोळ्यांत प्राण आणून माझीच वाट पाहात होत्या. मी त्यांच्यासह गाडीने प्रसृतीगृह गाठले. तिथले प्रवेशाचे सोपस्कार पार पडले. खाली येऊन गाडीवाल्याचे आभार मानले व किती पैसे द्यायचे अशी विचारणा केली; पण तो भला मनुष्य होता. तो म्हणाला, ``मी माझ्या बहिणीला दवाखान्यात दाखल केलं असं समजतो. तेव्हा त्याचे कसले पैसे? उलट काही गरज भासली, तर मला

    केव्हाही हाक मारा.'' माझ्या स्वतवर विश्वासच

    बसला नाही. सध्याच्या काळात माणुसकीचा गहिवर असणारी अशीही माणसे असतात. बोलण्याच्या ओघात त्याने मला सांगितले, की त्याचे नाव शेट्टी असून, चेकनाक्यावर त्याचे हॉटेल आहे. ते बंद करून घरी जात असताना माझी भेट झाली. तो म्हणाला, ``करायचं असेल तर एकच करा. जेव्हा तुमची पत्नी बाळंत होईल, तेव्हा मला हॉटेलमध्ये येऊन पेढे द्या.'' दुसर्‍याच दिवशी, म्हणजे 25 नोव्हेंबर 1990 ला मला सकाळी आठ वाजता कन्यारत्न झाले. मी लगेच त्याला मिठाई नेऊन दिली.

    मनात विचार केला, की तो जर देवरूपाने मला भेटला नसता, तर आमची काय अवस्था झाली असती? तेव्हाच मी ठरविले, की आपल्याला संधी मिळाली तर आपणही दुसऱयांच्या अडचणीच्या वेळी, संकटाच्या वेळी निरपेक्षपणे मदत करून सात्विक समाधान प्राप्त करून घ्यायचे.

    -- किशोर कुलकर्णी

  • फौजदार

    एकोणिसशे ऐंशीचा तो काळ. नुकताच कोल्हापूरमध्ये दाखल झालेलो होतो. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घटना-घडामोडी इतक्या होत्या, की बातम्या लिहिताना दमछाक व्हावी. त्यात निवडणुकीचे दौरे, प्रत्यक्ष मतदारांचा अंदाज घेण्यासाठी भेटीगाठी असं बरंच काही सुरू होतं. अचानक एके दिवशी मुख्य कार्यालयातून फोन आला. सांगली भागाचा दौरा करून या वसंतदादांच्या दौर्‍याचा

    वृत्तांत द्या. त्यावेळी माझी सारी मदार स्कूटरवर असायची. कोल्हापूर-सांगली अंतरही तसं आवाक्यातलं. सायंकाळी सांगलीत पोहोचलो. दादांची भेट घेतली. ते म्हणाले, ‘असं कर, उद्या सकाळी सातला मी निघणार आहे. जत-कवठे महांकाळ आणि नंतर कर्नाटकच्या सीमावर्ती गावात दौरा आहे. बरोबर जाऊ. जाताना चर्चा होईल. काय लिहायचं ते लिहा.’ वसंतदादा पाटील यांच्या नावाचा दबदबा मोठा होता. अर्थात, त्यावेळी त्यांना सारं काही अनुकूल होतं असंही नव्हे. त्यांच्यासमवेत जायचं ठरविलं अन् तसा सकाळी हजरही झालो. छोट्या छोट्या सभा होत्या, तिथं दादा फारतर दहा मिनिटे बोलायचे; पण जे बोलणं असायचं ते नेमकं आणि मतदारांशी थेट संवाद साधणारं. बहुतेक भाषणांचं सूत्र पाणी आणि दुष्काळ हेच होतं. जतला तुलनात्मक मोठी सभा होती. सकाळचे साडेअकरा वाजून गेले होते. सभा झाली. आता दादा आणखी पुढे जाणार होते. मी दादांना म्हटलं, ‘मी इथं थांबतो. मिळेल त्या वाहनानं सांगलीला जातो. मला बातमी द्यायला हवी.’ त्यांचा निरोप घेऊन निघालो. सभास्थळापासूनचा एक रस्ता गावात जात होता, तर दुसरा आणखी एका जवळच्या गावाकडे. नेमकं काय झाले ते आठवत नाही; पण जिकडं जायचं होतं तो रस्ता हुकला अन् दुसर्‍याच रस्त्यानं निघालो. एक-दोन किलोमीटर चालल्यानंतरही गावाची चिन्हे दिसेनात; पण एक पोलीस अधिकारी पायीच पण वेगानं जात असल्याचं दिसलं. त्याला गाठायला हवं असं वाटलं अन् मी वेग वाढविला. त्याला गाठा
    ला पाच-दहा मिनिटं तरी लागली. अखेर त्याला गाठलंच. मी माझी ओळख करून

    दिली. त्याची ओळख त्याच्या छातीवरची नावाची पट्टी देत होती. खांद्यावर म. पो. ही अक्षरं आणि दोन तार्‍यांबरोबर तीन फिती सहजपणे सांगत होत्या, की हा पोलीस सब इन्स्पेक्टर आहे. माझ्याप्रमाणे तोही इलेक्शन ड्युटीवर होता. त्याच्याशी बोलताना कळलं की जवळच्या गावातून सायंकाळी सांगलीसाठी बस मिळू शकेल. मी त्याच्याबरोबर चालू लागलो. गप्पांच्या ओघात रस्ता संपत होता. चालत असताना आमच्यामागून काँग्रेसचे झेंडे असणारे दोन ट्रॅक्टर ट्रेलर जात होते. मी सहज त्या पीएसआयला म्हटलं, ‘अजून किती दूर आहे गाव?’ तो म्हणाला, ‘अजून सहा-सात किलोमीटर असेल. तासाच्या आत पोहचू आपण.’ मी त्याला म्हटलं, ‘हे ट्रॅक्टर तिकडेच चाललेत असं दिसतंय, त्यांना थांबवू आणि जाऊ त्यांच्याबरोबर.’ तो म्हणाला, ‘नको तुम्हाला जायचं तर जा. मी पायीच येतो.’ मी म्हटलं, ‘का हो? मी तर पत्रकार आहे. मला ट्रॅक्टर चालतो, कोणत्याही पक्षाचा असला तरी मला फरक पडत नाही. तेवढंच चालणं वाचेल.’ तो म्हणाला, ‘तुमचं बरोबर आहे. तुम्हाला चालेल ते; पण मला कोणत्याही पक्षाचं वाहन नाही वापरता येणार. मी इलेक्शन ड्युटीवर आहे. ड्युटीवर असताना एक तर पोलिसांचं वाहन किवा ही आपली विनोबा एक्सप्रेस!’ एक पोलीस अधिकारी निवडणुकीच्या काळात केवळ तो निवडणूक ड्युटीवर आहे म्हणून वाहन वापरायला नकार देतो, हा माझ्या दृष्टीने वेगळाच अनुभव होता. आता मला त्याच्यात रस निर्माण झाला होता. मीही पायी जायचं ठरविलं. जाताना त्याचं गाव, कुटुंब, त्याच्या नोकरीविषयी सतत बोलत होतो आणि तोही नेमकी उत्तरं देत होता. वाहन न वापरणं हा त्याचा संभावितपणा नव्हता, तर त्याच्या त्या निष्ठा होत्या हे सहजी जाणवत होतं. तासाभरातच आम्ही त्या गावी पोहोचलो. तिथं पंचायतीच्या ऑफिसमध्ये गेलो. पदाधिकार्‍यांपैकी कोणी नव्ह
    तं. तिथंपण एकानं फौजदारासाठी चहा सांगितला. आम्ही चहा घेतला. पैशाचं काही न विचारता मी एस.टी. स्टँडकडे वळलो. सहज मागे पाहिले तर फौजदारमहाशय आमच्या चहाचे पैसे चुकते करीत होते.

    मी सांगलीला अन् त्यानंतर कोल्हापूरला पोहोचलो. वसंतदादांचा प्रचार, त्यांचा मतदारांवर होणारा परिणाम, दादांना मिळणारं पाठबळ आणि होणारा अल्पसा विरोध याविषयीचं वार्तापत्र पूर्ण केलं. आपलं काम संपलं असं मला वाटत होतं; पण माझ्या समवेत चालणारा तो फौजदार माझ्या मनातील पाठ सोडत नव्हता. पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत चौकाचौकात पोलीस पाहिलेत, अनुभवलेत, पण हा कालचा फौजदार आगळा-वेगळा होता. सहज लिहीत गेलो. त्यावेळी निवडणूक वार्तापत्राबरोबरचं या आगळ्या फौजदाराचीही वाचकांची भेट करवून दिली. आज पंचवीस वर्षांनंतरही त्याला मी विसरलेलो नाही. नाव आठवत नाहीये; पण त्याला विसरणं कठीण.

    -- किशोर कुलकर्णी

  • ते हात … गोष्ट सुनामी प्रलयानंतरची

    मी कार्यालयामध्ये बसलो होतो. कामाचे नियोजन, झालेल्या कामाचा आढावा यावर चर्चा सुरू होती. इतक्यात, दूरध्वनी वाजला. वृत्तपत्राच्या कार्यालयात ही एक नित्याची बाब होती. दूरध्वनी उचलला. ``आपण संपादक आहात का?'' - प्रश्न आला. ``हो.'' मी उत्तर दिलं. ``साहेब, एक विनंती करण्यासाठी दूरध्वनी केला होता. आजच्या अंकात तुम्ही तमिळनाडूतील विध्वंसाची जी छायाचित्रे प्रकाशित केली आहेत, ती धक्कादायक आहेत. त्यात लहान मुलांची जी छायाचित्रे आलीत, तशी ती प्रसिद्ध करू नका.'' दूरध्वनीमधून येणारा आवाज कातर बनला होता. मी म्हणालो, ``जे वास्तव आहे ते यापेक्षाही भयानक आहे. त्याची काही तरी जाणीव व्हावी, यासाठी ही चित्रे आहेत.''
    ``ते सगळं खरं आहे; पण आता जगाला कळलंय, की काय घडलंय. आता तरी हे थांबवा.'' बोलणे संपले; पण विचारांचे चक्र थांबले नव्हते. मी पुन्हा सारे अंक चाळले. छायाचित्रे पाहिली. त्यात जे होते, ते निव्वळ वास्तव होते किंबहुना वास्तव त्यापेक्षा भयानक होते. जे प्रसिद्ध झाले होते, ते तुलनात्मक सौम्य होते; पण तरीही या छायाचित्रांतून घटनेमागच्या वेदना, त्रास, असहायता वाचकांपर्यंत पोहोचत होती. ज्यांनी हे वास्तव लाटांसारखे अंगावर घेतले, जे त्या लाटांबरोबर जलमय झाले, ज्यांनी या लाटांच्या कराल दाढेत आपल्या जवळच्यांना जाताना पाहिले, अनुभवलं, ज्यांच्या नजरा अजूनही आपले बाळ परत येईल, याची आतुरतेने वाट पाहत असतील, त्यांच्यापेक्षा या यातना मोठ्या नव्हत्या. या वेदना तीव्र नव्हत्या. हे माझे नाही, ही जाणीवही होती आणि जर हे माझ्याबाबतीत घडले असते, तर ... ही भीतीही होती.

    आपण सारे एकच आहोत; एकाच निसर्गाचे, परमेश्वराचे घटक आहोत, हे सारे ऐकले, वाचलेले गळून पडते. मी, माझे ... हे शब्द प्रभावी होतात. दुःख, वेदना, संकटे ही किमान आतातरी माझी नाहीत, ही भावना प्रबळ होते. वृत्तपत्रांतील छायाचित्रेही नकोशी वाटू लागतात ... मग नकोच वृत्तपत्र वाचणे, नकोच दूरचित्रवाणी पाहणे हा विचार प्रभावी होतो. ते सारे माझ्यासाठी नाहीच, असे म्हणून माणूस अन्य विषय शोधू लागतो. विषयांतर महत्त्वाचे ठरते. वास्तव न स्वीकारता, न पाहताच त्यापासून दूर जाण्याचा प्रवास सुरू होतो. आपण आपल्या विश्वात रमायला लागतो. कोणी मानवतेची आठवण दिलीच किंवा आवाहन केलेच, तर आपल्या कर्तव्यपूर्तीचा एक तुकडा तोडून त्यापासून मुक्त होऊ पाहतो. निसर्गत मी जसा आहे, त्याचा अनैसर्गिक प्रवास त्याला कारणीभूत आहे का? कोठून सुरू होतो हा प्रवास? काय कारणीभूत असावे या प्रवासाला? नैसर्गिक आणि अनैसर्गिक या निव्वळ मनाच्या तर कल्पना नव्हेत? की ती ही मायाच? प्रश्नांची मालिका हवी तेवढी लांबविता येईल. आपणच आपल्यात डोकावून पाहिलं तर? मला वाटतं, स्वतशी होणारा प्रामाणिक संवाद जेथे थांबतो, तेथेच अनैसर्गिकतेचा प्रवास सुरू होत असावा अन्यथा जे वास्तव आहे त्यापासून दूर जाण्याचा, ते नाकारण्याचा प्रयत्न हेच नैसर्गिक आहे, असे वाटू लागलेच नसते. आपण आपल्याला तरी आहे तसे स्वीकारतो का? की, स्वतची फसवणूक करण्यातच आपल्याला आनंद लाभतो? दुःख नाकारणे किंवा त्या दुःखापासून दूर जाणे, ते आठवणीच्या एखाद्या बंदिस्त कप्प्यात बंद करणे, हा आनंद आहे का? तसे असेल तर मग हा आनंद शाश्वत का नाही? कदाचित, स्वतला स्वतपासून सातत्याने दूर नेणे, हे तर दुःखाचे खरे कारण नसेल? स्वत आहोत तसे स्वतला स्वीकारले, वास्तव आहे तसे स्वीकारले तर दुःख कोठे असेल? दुःखाचे अस्तित्वच नसेल तर आनंदाशिवाय काय असेल? मग आपल्या दुःखाचे मूळ नैसर्गिकतेमध्ये आहे की अनैसर्गिकतेमध्ये? आज मला होणार्‍या यातना किंवा घडलेल्या विदारकतेच्या वेदना जाणवतात, हे नैसर्गिक असायला हवेच; पण त्यापासून दूर जाण्यातच मला नैसर्गिकता वाटते. स्वतला संवेदनहीन करण्यातच आपण जीवनसंघर्षाशी सक्षम आहोत, असे वाटायला लागते. खरे तर संघर्षापेक्षाही वास्तव स्वीकारण्यात, त्याला सामोरे जाण्यात खरे धैर्य आहे. तुमच्या माझ्यात जर एकाच परमेश्वराचा वास असेल, तुम्ही अन् मी जर या सर्वशक्तिमान निसर्गाचाच एक घटक असू; तर त्यापासून कसे पळता येईल? त्याला किती टाळता येईल? माणसामाणसातील नैसर्गिकतेला, नैसर्गिक मानवतेला या दुर्दैवी घटनेमध्येही धुमारे फुटलेले दिसतात. मानवी हातांच्या रूपाने दुःखावर फुंकर घालणारे ते हात दिसू शकतात, अनुभवता येतात. अशा अनुभवासाठी परमेश्वर तुम्हाला सज्ज करो, ही प्रार्थना.

    -- किशोर कुलकर्णी