नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
ही घटना खूप जुनी. मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या काळातली. अजूनही मनात ताजी असलेली. त्या वेळी पुण्यातल्या एका दैनिकाचा प्रतिनिधी म्हणून मी महाराष्ट्राच्या विधानसभेत वृत्तांकनासाठी हजर होतो. 27 जुलैचा तो दिवस. महाराष्ट्र विधिमंडळात त्या दिवशी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यायचा ठराव संमत झाला. शरद पवार मुख्यमंत्री होते. मला आठवतं, त्या दिवशी विधानसभेत या ऐतिहासिक घटनेचं कौतुक करणारी भाषणं होत होती. पत्रकारितेत तसा मी जुना झालो नव्हतो. भाषणांनी भारावून गेलो होतो. एका सदस्यानं सांगितलं, ``आपण इतिहास घडविला आहे; पण आज आपण सर्वांनी मराठवाड्यात जाण्याची गरज आहे. तेथील जनतेला शासनाच्या निर्णयाची पार्श्वभूमी, भूमिका सांगण्याची गरज आहे.'' कौतुकाच्या भाषणात हे आवाहन, हा इशारा मागे पडला. त्याच दिवशी अधिवेशनाचं सूप वाजलं. मी पुण्यात येऊन माझ्या कामाला लागलो.
त्यानंतर मराठवाड्यातून येणाऱया बातम्या पहात होतो. त्या भागात कमालीची अस्वस्थता होती. सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या होत्या. दोन दिवसांतच त्याला उग्र रूप आलं आणि सारा मराठवाडाच पेटला आहे की काय, असं वातावरण निर्माण झालं. माझी अस्वस्थता वाढत होती. माझ्यातला पत्रकार मला स्वस्थ बसू देत नव्हता. मी थेट संपादकांना भेटलो. त्यांना म्हणालो, ``मला मराठवाड्यात जायचं आहे. रोज प्रत्यक्ष माहितीवर वृत्तांत पाठवीन.'' आजच्यासारखी त्या वेळी संवादसाधने विपुल नव्हती. फोन, तार, टेलेक्स असा तो जमाना होतो. संपादक म्हणून त्या वेळी श्री. ग. मुणगेकर होते. ते म्हणाले, ``तू जाऊ नयेस. ते धोक्याचं आहे. स्वतंत्र गाडी घेऊन जाणं अधिकच धोक्याचं आहे. स्थानिक पातळीवर आपले वार्ताहर आहेत, ते पाठवतील त्या बातम्या चांगल्या वापरा. वृत्तसंस्थांच्या बातम्या आहेतच.'' मी नाराज झालो; पण निराश नव्हे. मी म्हणालो, ``मला आठवडाभराची रजा द्या. मी बातम्या पाठवीन त्या वापरा. दुर्दैवानं काही घडलच, तर ती माझी जबाबदारी असेल. मी सुखरूप परत आलो, तर माझा दौरा अधिकृत समजा.'' माझ्या या प्रस्तावावर संपादक अधिक नाराज झाले. म्हणाले, ``तुम्ही तुमच्या जिवावर उदार झाला म्हणून काय झालं. माझ्याही काही जबाबदाऱया आहेत. तुम्हाला परवानगी देता येणार नाही.'' मी परतलो. त्या दिवशी रात्री झालेली घटना पत्नीला सांगितली. मी जावं, असंच तिलाही वाटत होतं. रात्रीचे अकरा वाजले असतील. माझा एक सहकारी घरी आला होता. त्या वेळी घरात फोन नव्हता. तो म्हणाला, ``तुला मराठवाड्यात जायला संपादकांनी परवानगी दिलीय. तुझ्या सोयीनं तू जा. हा दौरा अधिकृत असेल.'' आनंद आणि उत्साह कशाला म्हणतात, त्याचा अनुभव घेतला मी अन् औरंगाबादकडे पहाटेच रवाना झालो. मजल-दरमजल करीत औरंगाबादेत पोहोचलो. परिस्थिती वाटत होती त्यापेक्षा गंभीर होती. महामार्गावर ठिकठिकाणी पूल कापण्यात आले होते. तारा बांधून रस्ता बंद करण्यात आला होता. रेल्वे जाळण्यात आल्या होत्या. आंदोलनाचा वणवा वाढत होता. औरंगाबादेत माझी भेट झाली `टाईम्स'चे प्रतिनिधी पडियार यांच्याशी. आज ते हयात नाहीत; पण अत्यंत शिस्तबद्ध पत्रकार. मला एकट्यानं नांदेडपर्यंत जाणं कठीण होतं. एसटी वाहतूक बंद होती. टॅक्सीही नव्हत्या. त्या वेळी औरंगाबादेत शहा नावाचे एक एजंट होते. त्यांची एक गाडी नांदेडकडे अंक नेण्याचा प्रयत्न करणार होती. त्यात मुंबईच्या मोठ्या दैनिकाचे म्हणून पडियार यांना नेण्याचं ठरलं होतं. मोठ्या हिकमतीनं पडियार यांना चिकटलो आणि आमचा दौरा सुरू झाला. घटना मोठी होती. टाईम्सनं स्वतंत्र फोटोग्राफरही दिला होता. टाईम्स या इंग्रजी दैनिकाची आणि आमच्या दैनिकाची स्पर्धा नाही, असं सांगत मी त्या छायाचित्रकाराकडून फोटो मिळण्याची व्यवस्था केली. त्या वेळी औरंगाबादेत नागनाथ फटाले नावाचे ज्येष्ठ पत्रकार काम पहात होते. आमच्यासाठीही ते बातम्या पाठवत. विशेष म्हणजे, एसटीच्या हमाल संघटनेचे ते अध्यक्ष होते. याचाच अर्थ, माझ्या अंकात फोटो प्रसिद्ध होण्यासाठी सायंकाळपर्यंत तरी ते औरंगाबदला पोहोचणे आवश्यक होते. पुढची जबाबदारी फटालेंची होती. काम सुरू झालं. वृत्तांत, मुलाखती, घटना, प्रतिक्रिया, असा रोजच्या रोज मजकूर जमा होत होता आणि फोन-तार या माध्यमातून जातही होता. टाईम्सचा फोटोग्राफर खऱया अर्थानं व्यावसायिक छायाचित्रकार होता. त्याचे फोटो उत्तम असत. ते मी पाठवीत होतो आणि आश्चर्य म्हणजे, माझ्या दैनिकात ते फोटो रोजच्या रोज ठळकपणे प्रसिद्ध होत असत. तेच फोटो टाईम्समध्ये दुसऱया दिवशी पहिल्या पानावर प्रसिद्ध होत असत.
वृत्तपत्रात मग ते कोणत्याही भाषेतलं असो, स्पर्धा ही असतेच. आजही आहे; पण त्या काळी अत्यल्प साधनसामग्रीत टाईम्सच्या आधी ठसठशीत छायाचित्र प्रसिद्ध करण्याचा मान माझ्या वृत्तपत्राला मिळाला आणि समाधान मला मिळालं.
मी जे काही केलं ते योग्य की अयोग्य, असा प्रश्न त्या वेळीही मला कोणी केला नाही. आज तो कोणी करील, अशी स्थिती नाही.
म्हणतात ना, प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं!
तसंच काहीसं हे असावं
-- किशोर कुलकर्णी
हॉल म्हणविल्या जाणाऱया दहा बाय बाराच्या खोलीमध्ये मी संकोचून बसलो होतो. हो, घर माझेच होते; पण आलेले पाहुणे मला घरच्यासारखे वाटत नव्हते अन् ते मात्र स्वतचे घर असल्यासारखे विसावले होते.
करा, पण मी इथं तुमच्यासमोर बसू शकतो का?’’ त्यानं मानेनंच होकार भरला. रजनीश बसले. आता संवाद
साधायचा होता.
भगवान
म्हणाले, ‘‘मी काही दिवस झाले तुमच्याशी बोलू इच्छितोय. तुम्ही हे नेमकं काय करातय?’’ तो वृद्ध म्हणाला, ‘‘मी
-- किशोर कुलकर्णी
मी आणि व्यवस्थापकीय विभागातला एक सहकारी असे आम्ही नगर जिल्ह्याच्या दौर्यावर होतो. कोपरगाव, राहता, संगमनेर, श्रीरामपूर हा तर माझ्या खूपच परिचयाचा असा परिसर. या भागातून माझ्या लहानपणी अनेकवार फिरलो होतो. काही वर्षे कोपरगावात शिकलो होतो. मित्रांचा परिवारही या भागात होता. एका अर्थानं माझ्या दृष्टीनं हा माहेरचा दौरा होता. राहता येथे एक कार्यक्रम होता. तो आटोपायला अकरा वाजले. नंतर शिर्डीला जावं असं ठरलं. त्यावेळी साईबाबाचं दर्शन इतकं अवघड नव्हतं. दुपारी बाराच्या आरतीलासुद्धा सहज जाता यायचं. कोपरगाव ते शिर्डी असं सायकलनंही अनेकवेळा आलेलो होतो. बाबाचं दर्शन झालं. आता इथंच जेवणं अन् पुढे जाणं असा विचार सुरू होता. मी माझ्या सहकार्याला म्हटलं. इथनं अवघ्या दहा किलोमीटरवर माझ्या बहिणीचं शेत आहे. शेतावरच घर करून ती राहते. तिथं जाऊ आपण. घरचं जेवण होईल आणि बहिणीला भेटणंही होईल. या प्रस्तावावर वाद होण्याचा प्रश्न नव्हता. आमची गाडी बहिणीच्या वस्तीकडे निघाली. माझी बहीण, दोन वर्षांनी मोठी. वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षे लग्न झालं तिचं. तिचे पती शेती करायचे. सगळं आयुष्य मातीतलंच. अचानक काही झालं आणि त्यात मेहुणे वारले. माझी बहीण एकटी पडली. पदरी मुलांचा गोतावळा; पण हिंमत नाही हरली ती. कोपरगावातलं घर बदलून ती इथं शेतात आली. आधी झोपडी बांधली आता दोन खोल्यांचं घर होतं. मुलांची शिक्षणं करायची. राबायला हात नाहीत; पण तिचा संघर्ष चालू होता. तिच्या कष्टाच्या आठवणी मनात दाटत असतानाच आमची गाडी तिच्या वस्तीजवळ पोहोचली होती. ऑफिसची मोठी-थोरली गाडी तिथं बांधाला उभी करून नांगरलेलं रान तुडवत आम्ही तिच्या घराकडे निघालो. ऊन रणरणत होतं. त्यावेळी शेतावर मोठी गाडी येणं हेही वेगळंच होतं. आसपासच्या लोकांचं लक्षही वेधलं जात होतं. आम्ही बहिणीच्या घराजवळ पोहोचलो. तेव्हा ती
ी कोण आलंय? हे उत्सुकतेनं
पाहात होती. तिनं ‘या’ म्हणून आत घेतलं. बसायला एक खाट होती. शेजारी चार-सहा धान्यांची पोती होती. तो काळ भारतातल्या जागतिकीकरणाचा प्रारंभीचा काळ होता. शेती हा दुर्लक्षित भाग होता अन् मनमोहनसिंग यांचा अर्थसंकल्प चर्चेचा, स्वागताचा विषय होता. आम्ही बसलो. पाणी प्यायलो. मी म्हटलं, ‘‘आम्ही जेवणार आहोत.’’ ती काय करायचं याची तयारी करायला लागली. मी आतल्या खोलीत तिच्यासोबत बसलो. प्रारंभीच खुशालीचं बोलणं झालं आणि अचानक चर्चेची गाडी राजकारणावर आली. राज्याच्या, देशाच्या धोरणावर आली. बहीण खेड्यात-वस्तीवर असली तरी तिचं वाचन, सामान्यज्ञान आणि बातम्यांची माहिती चांगली होती. चर्चेच्या ओघात ती पगारदारांवर घसरली. आर्थिक खुलेपणाचं कौतुक करताय; पण इथं पाहिलंय का शेतीत काय चाललंय? प्यायला पाणी नाही. पावसाचा भरवंसा नाही. खतांचे दर वाढलेले, मजूर मिळत नाही. शिक्षणाला तर पैसाचा मोजावा लागतो असं खूप काही ती बोलत होती.
-- किशोर कुलकर्णी
तर रोजा घरात पुरती रुळली होती. निगडीहून पुण्यात आणि पुण्यातील या घरातून त्या घरात ती आमच्यासोबत होती. स्कूटरवर बसायला घाबरणारी रोजा कारमध्ये ऐटीत बसे. आता घराला अंगण होते, मोठे फाटक होते, छोटा बगिचा होता, तिला बांधून ठेवणे मला आवडायचे
नाही; पण आता तिला मोकळे
सोडण्यासारखे वातावरणही होते. ती घराच्या मागे जाऊन प्रातर्विधी उरकीत असे. काहींच्या प्रवेशावर नाराजी, तर काहींबद्दल आनंद व्यक्त करीत असे. अशात ती मोठ्या फाटकाच्या फटीतून बाहेर पळायला लागली होती. कोणी मारेल, स्कूटरचा धक्का लागेल, कोणी घाबरेल म्हणून आम्ही काळजी घेत असू; पण ती वेळ मिळताच पळायची. नंतर स्वतहून परत यायची. दार उघडण्यासाठी आवाज द्यायची. रागावून तिला घरात घ्यायचो तेव्हा तिचा चेहराही अपराधी वाटायचा. अखेरीस एके दिवशी नेमके काय झाले असावे याची जाणीव झाली मला. पोरीने तोंडाला काळे फासले होते आमच्या. कुठे तरी जाऊन ती व्यभिचार करीत होती अन् आम्हाला पत्ताच नव्हता. हिचा संताप सुरू झाला. पोटच्या मुलीपेक्षा तिला जपले तिने हे असे करावे हे तिला मान्य होणे कठीण होते. शिवाय या अनौरस पिल्लाचे करायचे काय हा प्रश्न होताच? आता आमचे घर पुन्हा तिघांचे झाले. आम्ही तिच्या पिलांविषयी बोलू लागलो. काय करायचे? गर्भपाताचा विषय डॉक्टरांनी फेटाळला. तिला धोका होता. बाळंतपण होणे आवश्यक होते; पण तो उत्साह नव्हता, आनंद नव्हता, कौतुक नव्हते, होती ती अपरिहार्यता. मनात चीड, संताप अन् तिरस्कारही. काय वाट्टेल ते झाले तरी पिल्ले नकोत. फेकून देऊ, हा विचार वाढू लागला. पक्का होऊ लागला. कोण करणार हे काम? मी का पराग? अखेरीस परागने हे काम करावे असे ठरविले. अखेर तो दिवस आला. कोणाच्याही नशिबी येऊ नये असे दुर्लक्षित बाळंतपण तिच्या नशिबी आले. डॉक्टर नाही की औषध नाही. रोजाने चार पिलांना जन्म दिला. त्यापैकी एक जन्मतच गेले. उरले तीन, त
यांनाही लांब कुठेतरी टाकून द्यायचे होते. आम्ही तिघेही एकमेकांना बजावत होतो. आता दयामाया नको. तिने पाप केलेय, ते आपल्याला नको. तीनही पिलांना मी पाहिले. पिलासारखी पिले. डोळे मिटलेले आता कायमचे मिटणार. त्यांना कावळे खातील की घार नेईल? कोण नेईल त्यांना? कितीवेळ जिवंत राहतील? पण त्यांनी का मरावे? त्यात त्यांचा काय देष? असे प्रश्न बहुधा तिघांपुढेही होते अन् म्हणूनच आम्ही एकमेकाला आपल्या निर्धाराची आठवण करून देत होतो. बागकामाला लागणारी पाटी आणली. त्यात रद्दी पेपर ठेवले. त्यात तिघांना ठेवले. अगदीच निर्दयी होता येत नाही म्हणून एक फडके टाकले. आता रोजाचे लक्ष नाही असे पाहून परागने ती पाटी टाकून द्यायची होती. इकडे रोजा निश्चिंत होती. परागने विचारले, बाबा
-- किशोर कुलकर्णी
गदिमा व पुल ही नावे माहित नाहित असा मराठी माणूस सापडणे कठीण!,पण त्यांच्या आयुष्यातही काही गमतीशीर प्रसंग घडतात त्यापैकीच एक.२००३ साली शरद पवारांनी बारामतीत गदिमांच्या नावाने मोठे सभागृह बांधले,त्याच्या उदघाटन प्रसंगी आम्हा माडगूळकर कुटुंबियांना मोठे आग्रहाचे निमंत्रण होते,त्याच वेळी शरद पवारांनी सांगितलेला हा किस्सा.
-- किशोर कुलकर्णी
परदेशात जाणं ही बाब आता काही खूप मोठी राहिलेली नाही. रोज हजारो-लाखो लोक भारतातून अन्य देशांत जातात आणि येतात;
समोरच्या व्यक्तीमध्ये एकदम गुंतून गेल्यासारखे, समरस होणे तुला सहज जमते. मात्र एका
क्षणात निघून जाताना तू कधीही विचलीत होत
नाहीस. हृदयाची भाषा बोलून, दुसऱयाचे `विधीलिखीत' लिहिण्याची कला तू कुठे शिकलास?
-- किशोर कुलकर्णी
"दोन वाईट गोष्टींमधून एक निवडायची वेळ आल्यास अशी गोष्ट निवडा जी तुम्ही पूर्वी करून पाहिली नाही."
"ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा आहे याचा विचार करण्यात वेळ न घालवता, ग्लास रिकामा झाल्यावर धुणार कोण याचा विचार करावा."
लहानपणी खेळांविषयी प्रेम असतं तर......... तारुण्यात प्रेमाचे खेळ सुरू होतात...
आपली वडीलधारी मंडळी किती चलाख आहेत आम्हाला ते शिकवतात की , ' प्रत्येक स्त्रीला मातेसमान माना ' ठिक आहे यामुळे आपली नीतीमत्ता सुधारेल पण आपल्या वडीलांची बिघडेल त्याचं काय ? - आचार्य अत्रे
हल्लीच्या माणसांनी किती ताळतंत्र सोडलायं, काही कल्पना आहे का?... .... अहो, आपल्या स्वयंसिद्ध बापुंचं प्रवचन सुरु असताना भक्तगणांमधला एकजण चक्क आरामात सिगरेट ओढत होता... हे दृश्य पाहुन मला एवढा धक्का बसला की हातातला बिअरचा कॅन निसटून खाली पडला!!!
यशाच्या मार्गावर नेहमीच 'अंडर कन्स्ट्रक्शन'ची पाटी लटकत असते......
' सदैव' आणि 'कधीच नाही' हे शब्द कधीच वापरू नयेत हे सदैव लक्षात ठेवा.
पहिले चाक ज्याने शोधून काढले, त्याचे एवढे कौतुक कशाला? इतर तीन ज्यांनी शोधली, ते खरे कौतुकाला पात्र आहेत!!!!
माणसांचीही गंमत असते पाहा. तुम्ही एखाद्या माणसाला सांगा, आकाशगंगेत ३०० अब्ज तारे आहेत.... तो चटकन विश्वास ठेवतो. पण, पार्कातल्या बेंचला नुकताच रंग लावलाय, तो ओला आहे असं सांगा.... तो स्वत: हात लावून बोटं बरबटवून खात्री करून घेतल्याशिवाय राहात नाही!!!!
का? का? का? १. पोहणे हा जगातला सर्वात बेस्ट व्यायाम असेल, तर देवमासे इतके जाडे ढोले का असतात? २. स्टेडियममध्ये जिथे प्रेक्षक 'बसतात' त्या जागेला 'स्टँड' का म्हणतात?
३. जगात सर्वांना स्वर्गात जायचं असतं, पण मरायचं कुणालाच नसतं, असं का? ४. बुद्धिबळाच्या पटावरही वर्णभेद असतो का? नसेल, तर मग पांढऱ्या सोंगट्यांना पहिली चाल का 5. १00 वर्षांची म्हातारी जेव्हा 'हच का नया लाइफटाइम रिचार्ज' घेते!
आपली चूक असताना जो माफी मागतो, तो प्रामाणिक असतो. आपली चूक आहे की नाही, याची खात्री नसतानाही जो माफी मागतो, तो शहाणा असतो. आपली चूक नसतानाही जो माफी मागतो, तो नवरा असतो!!!
जुनी मोटर कार खरेदी करावयाची असल्यास , तिची योग्य किंमत ठरविण्याची पद्धत जी कार आवडेल ती दोन तास ट्रायलसाठी मागून घ्यावी व अशाच दुसर्या जुन्या गाड्यांच्या डिलरकडे घेऊन जावी. त्याला सांगावं की , तुम्हाला ही गाडी विकायची आहे. किती किंमत येईल ? तो सांगेल ती किंमत गाडीची खरी किंमत !
तुम्ही बरोबर असता तेव्हा कोणी तुम्हाला लक्षात ठेवत नाही, तुम्ही चुकता तेव्हा कोणी तुम्हाला विसरत नाही ....
प्रोफेसर विसराळू का असतात याचं कारण एका प्रोफेसरांनीच शोधून काढलं. परंतु नंतर ते कारण प्रोफेसर विसरून गेले.
हुशार बायको नेहमी नवऱ्याचे इतके पैसे खर्च करते की त्याला दुसऱ्या बाईचे लाड पुरवणं अशक्य व्हावं!!!
जगात एकच सर्वात सुंदर मूल आहे आणि प्रत्येक आईपाशी ते असते, असा एक सुंदर सुविचार तुम्ही वाचला असेलच. त्याचा उत्तरार्ध माहिती आहे का? जगात एकच सर्वात सुंदर बायको असते आणि ती प्रत्येक शेजाऱ्यापाशी असते!!!!
नकार देणे ही कला असेल. पण, होकार देऊन काहीच न करणे, ही त्याहून मोठी कला आहे.
मार्क ट्वेन हा अतिशय बुद्धिमान आणि खोचक विनोद करणारा लेखक होऊन गेला. त्याची काही निरिक्षणे जगप्रसिद्ध आहेत. त्याचा हा सर्वांगसुंदर विनोद "जेंव्हा एक तरुणी एका तरुणाच्या हृदयावर डोके ठेवते ; तेव्हा मला फ़ार गंमत वाटते . त्याला हृदय नसतं ; आणि तिला डोके नसतं ....."
-- सुमित्र श्रीधर माडगूळकर
Copyright © 2025 | Marathisrushti