नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
परमेश्वराचं अस्तित्व हा सातत्यानं चर्चिला जाणारा विषय. कोणी ते सहजी मान्य करतात, तर कोणी बिलकूल नाही. प्रत्येकाला आपली बाजू मांडण्यासाठी भरपूर उदाहरणं असतात. काही विज्ञानावर सिद्ध करता येतात, तर काही विज्ञानासाठीही गूढ. नेमकं काय असावं? विचार करायला लागलो, की प्रश्नांची भेंडोळी पुढे सरकत राहतात अन् उत्तरं... उत्तरं सापडली तर मग प्रश्नाचं अस्तित्व राहिलं असं कसं म्हणता येईल? अशीच काही प्रश्नांची भेंडोळी घेऊन मी एकदा माझ्या आध्यात्मिक गुरूंच्या भेटीला गेलो. चार-पाच वर्षे झाली त्याला. अम्मा-भगवान या नावानं जगात सर्वदूर त्यांना ओळखलं जातं. आमची भेट झाली. चेन्नईपासून शंभरएक किलोमीटरवर असलेल्या वरदेपालयम येथील त्यांच्या आश्रमात. सध्या तिथं वननेस विद्यापीठ साकार झालंय... तर आमची भेट झाली अन् सर्वप्रथम मी सांगितलं की, भगवान परमेश्वर खरोखर आहे का? तो दिसतो का? जाणवतो का? माझा एक मित्र तर म्हणतो, ``परमेश्वर वगैरे झूठ आहे. मीच भगवान आहे.'' भगवान म्हणाले, ``परमेश्वर आहे. तो जाणवतो, तो दिसतो हे जेवढं खरं आहे. तेवढंच तुमचा मित्र भगवान आहे हेही खरं. आता हे पाहा रस्त्याच्या कडेला तुम्ही उभे आहात. वाहतूक सुरू आहे. अचानक एक वाहन अतिवेगाने तुमच्याकडे येताना दिसतंय. त्या वाहनचालकाचा वाहनावरचा ताबा सुटलाय. कोणत्याही क्षणी तुम्ही त्याखाली सापडणार आहात. पळण्याचं त्राण नाही. तेवढा अवधीही नाही. आता केवळ जे होईल त्याचा स्वीकार करणं एवढंच हाती आहे. त्याला पर्यायही नाही. आपलं मरण आपल्याच डोळ्यांनी पाहावं असा हा प्रसंग... अन् अगदी क्षणात एक हात पुढे येतो. तुम्हाला धक्का देतो. तुम्ही रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळता. त्याचवेळी ते वाहनही भेलकडत तुमच्या पुढे जाऊन खड्ड्यात कोसळतं. तुम्हाला फारतर खरचटलं आहे. तुम्ही जिवंत आहात. कोणी धक्का दिला तुम्हाला? तुम्ही पाहाता. एक खेडूत. अशिक्षित. तो तुम्हाला सावरायला पुढे येत असतो. तुम्ही म्हणता, अगदी देवासारखा आलास. तुझ्यामुळं आज मी जिवंत आहे. हा जो खेडूत आहे तो घटनेपूर्वीही तुमच्या आसपासच होता; पण त्याच्याकडे तुमचं लक्ष गेलेलं नव्हतं. त्याचं अस्तित्व जाणवलेलं नव्हतं. आता ते जाणवलेलं आहे. तो देवासारखा आला, असं म्हणतो आपण, पण तो तर खरा परमेश्वरच! त्याला ओळखण्याची दृष्टी हवी. मनाच्या गाभाऱयात कृतज्ञता हवी. खरंतर तो परमेश्वर सततच तुमच्यासोबत असतो. तुम्ही श्वास घेता म्हणजे काय करता? आपण श्वासोच्छ्वास घेतो याची जाणीवही नसते. आपल्याला क्षणोक्षणी जिवंत ठेवणाऱया त्या परमेश्वराचं अस्तित्व मान्य करण्याची वृत्तीही नसते. तेवढा कृतज्ञभावही नसतो; पण जेव्हा तुमचं नाक-तोंड दाबलं जातं किंवा तुमची घुसमट होते तेव्हा परमेश्वराची आठवण येते.''
भगवानांनी परमेश्वरी अस्तित्वाचं निरूपण साध्या-सोप्या शब्दात केलं. त्यावेळी ते पटलंही; पण या भेटीनंतरही तो प्रश्न मनातून हद्दपार झाला असं नव्हे. कारण हे सारं प्रत्यक्षात कसं आणायचं? प्रश्न सुटत नव्हता. सहा महिन्यांपूर्वी पुण्यात डॉ. विजय सावंत यांना भेटायला गेलो. महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनचे ते कार्यकारी संचालक आहेत. ज्येष्ठ संगणकतज्ञ विजय भटकर यांच्यासमवेत त्यांनी या क्षेत्रात मोलाचं कामही केलंय. डॉ. सावंत यांच्याशी चर्चा सुरू होती. वेगवेगळे विषय येत होते अन् अधूनमधून त्यांचे फोनही सुरू होते. एक फोन आला. बहुधा राजकीय क्षेत्रातल्या एखाद्या प्रभावी व्यक्तीचा असावा. या संवादात पलीकडचा माणसू काय बोलतोय हे कळत नव्हतं; पण त्याचा अंदाज बांधता येत होता. तो सांगत होता, ``उद्या मी त्या उमेदवाराला तुमची भेट घ्यायला सांगतो. त्याला वेळ द्या. समजावून घ्या. तुम्हाला रोज अनेक लोक भेटत असतील; पण त्याला इतर अनेकांप्रमाणं समजू नका. कारण मी त्याला पाठवतोय... वगैरे!'' या संवादातलं....विजय सावंत यांचं उत्तर, विवेचन मात्र मी ऐकू शकत होतो. ते म्हणाले, ``अवश्य पाठवा. मी भेटेन त्याला. काय हवी ती मदतही करीन. तुम्ही काळजी करू नका... हो! हो!! रोज अक्षरश शंभर-दोनशे लोकांना मी भेटतो हे खरंय; पण मला भेटणारा प्रत्येकजण परमेश्वराचाच अवतार आहे या भावनेनं मी त्यांना भेटतो. त्यामुळं माझ्या दृष्टीनं इतर असं कोणीच नसतं. तुम्ही सांगा त्यांना - मी भेटेन.'
आपल्याला भेटणारा प्रत्येक माणूस हा परमेश्वराचा अवतारच आहे, अशा भावनेनं रोज शेकडो लोकांना भेटणं ही भावनाच मला अंतर्मुख करून गेली. सकारात्मकता म्हणजे यापेक्षा वेगळी काय असते? व्यावसायिक अभ्यासक्रम असो, की तणावनिर्मूलन की व्यक्तिमत्त्वविकास या साऱयात सकारात्मकता सांगितली जातेच ना? काही लोक त्याला परमेश्वर म्हणत असावेत. आपल्या भोवताली स्वार्थ, इर्षा, असूया काही कमी नाही; पण त्यातला परमेश्वर पाहायला हवा. दृष्टी जोपासायला हवी. मग त्याला परमेश्वरी अंश म्हणा किंवा तुम्ही जोपासलेली सकारात्मकता...
-- किशोर कुलकर्णी
मिळत होती. अशा स्थितीत आणखी अवघड प्रश्न विचारले जातात. तसे सुरू झाले. एखादेवेळी त्यानं प्रश्नाचा नेमकेपणा समजावून घेण्यासाठी प्रतिप्रश्न केला असेल इतकंच. त्याची उत्तरं चोख होती. त्याला थोडा वेळ बाहेर थांबायला सांगितलं. आमची सल्लामसलत झाली. या उमेदवाराला संधी द्यावी असं ठरलं; पण माझा एक सहकारी म्हणाला, ‘घ्या तुम्ही; पण तो टिकणार नाही. इंजिनिअर आहे तो. चार हजार पगार मिळतोय. आपण काय देणार? १५००, फार तर दोन हजार.’ या प्रतिक्रियेनंतरही त्याला बोलावलं. तो आला. आता प्रश्न सुरू झाले होते. ते वेगळ्याच वळणावरचे होते. इंजिनिअरिंग आवडत नव्हतं, तर तो अभ्यासक्रम केलाच का? आता नोकरी असूनही ती का सोडणार? पगार कमी होईल त्याचं काय? एकापाठोपाठ प्रश्न आले. तो म्हणाला, ‘तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देतो. एकत्रच येतील ती.’ तो बोलू लागला. ‘मी सातारा जिल्ह्यातला, वडील पोस्टात नोकरीला; सचोटीनं काम करायचं हे त्यांचं जीवनसूत्र. पैसा साठवावा अशी स्थितीही नव्हती आणि वृत्तीही. मुलांनी शिकावं, चांगलं शिकावं हीच काय ती आमची पुंजी, असं ते म्हणत. मी एसएससी झाल्यावर ते मला म्हणाले, ‘तू इंजिनिअर व्हावं अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी हवा तो खर्च मी करीन. तू हुषार आहेस. तुला ते जमेल.’ मला इंजिनिअर व्हायचं नव्हतं; पण वडिलांची इच्छा मोडणंही शक्य नव्हतं. त्यांनी कसे दिवस काढले हे अनुभवत होतो. त्यांच्या इच्छेला मान दिला. अभ्यास सुरू केला. बुद्धीनं साथ दिली आणि शिष्यवृत्तीही मिळत गेली. फारसा खर्च न होताच मी इंजिनिअर झालो. आता नोकरीचा आग्रह. तीही मिळाली; पण हे आपलं ध्येय नव्हे याची जाणीव होती. वाचन, अभ्यास सुरू होता. चार महिन्यांपूर्वी वडील वारले. आई आधीच गेलेली होती. आता
मी वडिलांच्या शब्दातून मुक्त होतो. याचकाळात तुमची जाहिरात आली. पत्रकारिता म्हणजे काय असते याची माहिती नानासाहेब परुळेकरांच्या चरित्रातून मिळालेली होती. वाटलं, आपला मार्ग सापडला. आज मी इथं आहे. तुम्ही निवड केलीत तर प्रशिक्षण घेईन. पगार, मानधन महत्त्वाचं नाही. कारण माझा पगार माझ्या गुणवत्तेवर, कौशल्यावर ठरला होता. इथं मी प्रशिक्षणार्थी आहे. माझ्यात गुणवत्ता असेल, तर मी टिकेन.’
-- किशोर कुलकर्णी
त्या वेळी मी पत्रकारितेमध्ये नवाच होतो. 1971-72चा काळ होता तो. पुण्यातील त्या वेळच्या प्रतिष्ठित दैनिकामध्ये उपसंपादक म्हणून माझी ती सुरुवात होती. उपसंपादक म्हणून कामाच्या निश्चित वेळा असल्या, तरी रात्रंदिवस कचेरीमध्ये पडून राहावं, गप्पा माराव्यात, काम करावं, नवं काही शिकावं असं ते वय होतं. स्वाभाविकपणे अत्यंत कमी अवधीतच मी मला नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्तही काम करू लागलो होतो. कामाचा तरुण आहे, अशी प्रतिमा व्हायलाही मग वेळ लागला नाही. त्या वेळी पत्रकाराची काही व्यवच्छेदक लक्षणं होती. खांद्यावर शबनम बॅग आणि हातात सिगारेट असलेला तरुण हा पत्रकारच असला पाहिजे, असं समजलं जायचं. उदास, विषण्ण, दाढी वाढलेला तरुण म्हणजे कवी, अशी एक प्रतिमा त्या काळी होती. त्याचप्रमाणं पत्रकारांचं चित्रण हे असं व्हायचं. `सिंहासन' या चित्रपटात निळू फुलेंनी पत्रकार रंगविला, त्याचा वेशही यापेक्षा वेगळा नव्हता. सांगायचा मुद्दा असा की, पत्रकाराच्या लेखणीएवढाच त्याची सिगारेट हाही एक प्रतिष्ठेचा भाग बनला असावा किंवा असं म्हणता येईल की, धूम्रपान हे अप्रतिष्ठेचं नक्कीच नव्हतं. त्या वेळी सायंकाळी पुण्यातील कोणत्याही वृत्तपत्राच्या कचेरीत आग लागली की काय, एवढा धूर भरलेला असे, तर अशा या वातावरणात माझ्या खांद्यावर शबनम आणि ओठात सिगारेट केव्हा आली, हे कळलंही नाही. मी काम करीत होतो. तेथे खरं तर मी अन्य सहकाऱयांपेक्षा वयानं लहान होतो; पण व्यसनात वयाचा अडसर येत नसावा. कारण, त्यातील आमची देवघेव ही समानता कशी असावी, याचा वस्तुपाठ देणारीच होती. असं असलं तरी सभ्यतेचे काही संकेत मी पाळत असे. एक दिवस एक सहकारी म्हणाला, ``ज्यांच्याबरोबर दिवसातील 12 तास काम करायचय, तिथं कसले आलेय संकेत अन् कसला आलाय वयाचा मान.'' एका अर्थानं माझ्या मुक्त
वागण्याला एक छान, समर्थ असं समर्थन मिळालं होतं. मा
ं धूम्रपान अधिक उघड
अन् बिनधास्त झालं होतं. अशीच एक दुपार. माझं काम सुरू व्हायचं होतं. एका सभागृहवजा दालनात आम्ही सारेजण बसत असू. आमच्या टेबलाच्या पलीकडे काही अंतरावर वृत्तसंपादक बसत. वसंतराव त्यांचं नाव. वय असेल पन्नाशीच्या आसपास. त्यांना शांतपणे एका जागेवर बसलेलं मी पाहिलं नव्हतं; पण त्या दिवशी ते स्वस्थ बसले होते. एका क्षणी त्यांची अन् माझी नजरानजर झाली. त्यांनी नजरेनंच खुणावलं, ``या,'' मी त्यांच्या पुढ्यात बसलो. ते शांत होते. काहीतरी बोलायची तयारी करीत असावेत. मिनिटभर तसंच गेलं, म्हणाले, ``किशोर, तुम्ही माझ्या मुलाच्या वयाचे आहात, एक गोष्ट बोलू?'' मी म्हणालो, ``बोला ना. काहीच प्रश्न नाही.'' ते म्हणाले, ``तुम्ही सिगारेट ओढता. वय तरुण आहे तुमचं, इतर मंडळी काय करतात बाजूला ठेवा. त्यांच्यात बदल होण्याचं त्यांचं वय सरून गेलंय. तुम्ही अजूनही बदलू शकता. मनात आणलं तर सिगारेट ओढणं बंद करू शकता.'' माझं धूम्रपान हा असा ऐरणीवरचा विषय होईल, असं वाटलं नव्हतं मला. मी म्हणालो, ``सोडेन ना, त्यात काय आहे? आतापासून मी सोडतो.'' वसंतराव म्हणाले, `बोलणं वेगळं आणि कृती वेगळी. त्यामुळं आताच काही कबूल करा असं मी म्हणत नाही; पण मी एक योजना देतो. तुमच्या सिगारेटवर रोज किती खर्च होतो?'' मी विचारपूर्वक कमी खर्च सांगितला. म्हणालो, ``रोज एक रुपया'' वसंतराव म्हणाले, ``म्हणजे दरमहा 30 रुपये. तुम्ही असं करा. सिगारेट ओढणं थांबविलं की दरमहा तुमचे 30 रुपये वाचतील. मी एक पत्र देतो. इंटरनॅशनलच्या दीक्षितांना. (पुण्यात डेक्कनवर इंटरनॅशनल हे पुस्तकाचं प्रख्यात दुकान आजही आहे.) तुम्ही दरमहा 30 रुपये त्यांना द्यायचे. दीक्षित तुम्हाला 100 रुपयांची पुस्तकं देतील. तुमच्यासाठी उरलेली रक्कम मी त्यांना देईन.'' मी ``हो'' म्हणालो, बाहेर पडलो. एक सिगारेट ओढली अन् ती सोडायचा विचार सुरू केला. या घटनेनंतर दोन महिने मी 30 रुपयांत
100ची पुस्तकं घेतली. त्यानंतर मात्र पुन्हा दीक्षितांकडे गेलो नाही. 30 रुपयांची बचत, 70 रुपयांचा लाभ आणि वाचनातून मिळणारं अमाप ज्ञान यापेक्षाही माझ्यातील व्यसनाला मी अधिक महत्त्व दिलं. त्यानंतरही मी सिगारेट ओढत असे; पण आसपास वसंतराव नाहीत ना, याची खात्री करूनच. आज जेव्हा हा प्रसंग आठवतो, तेव्हा वसंतरावांमधील माणसाचा, माणसाकडे, माणसापलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप महत्त्वाचा वाटतो. त्यांना माझ्याबद्दल वाटलेल्या आत्मीयतेचा अभिमान वाटतो आणि त्या आत्मीयतेला न जागल्याचा सलही जाणवतो. माणसाला जीवनाच्या प्रवासात योग्य मार्ग दाखविणारेही भेटतात अन् दिशाभूल करणारेही.
-- किशोर कुलकर्णी
एकदा मी माझ्या तंद्रीत चाललो होतो.एका वळणाशी येऊन पुढचे पाऊल टाकणार तोच मला आवाज आला,”थांब!! एक पाऊलही पुढे टाकू नकोस.वरची बाल्कनी तुझ्या डोख्यावर पडेल”.मी थांबलो,अन काय आश्वर्य ……..
मित्र कोणाला म्हणावे? खरंतर या प्रश्नाचं उत्तर अनेक विद्वानांनी आपापल्या परीनं शोधलं आहे, दिलं आहे. परवाच मला एक एसएमएस आला. त्यात म्हटलं होतं, ‘मित्र हा भितीसारखा असतो. काही वेळा तिचा तुम्हाला आधार घेता येतो, काही वेळा तिच्यात तोंड लपवून तुम्ही रडू शकता, काही वेळा ती तिथं आहे, ही भावनाही पुरेशी असते. मित्रांचंही असंच काही असतं.’ खरं आहे का हे? कदाचित खरं असावं- कदाचित अपुरंही. अगदी कालपरवाच एका मैत्रिणीचा एसएमएस आला. त्यात म्हटलं होतं की, दुरावा एवढा काळ असावा, की काही तरी हरवलंय याची जाणीव होत राहावी; पण तो इतकाही असू नये, की त्याच्याशिवायच जगण्याची सवय होऊन जावी. मित्रांनो, खरंच मैत्री केवळ न भेटल्यामुळं संपून जाऊ शकते का? मला वाटतं, तसं नसावं. आणखी एक एसएमएस. असाच मैत्रीचं वर्णन करणारा, महती सांगणारा. त्यात म्हटलंय, ‘तुम्ही एकमेकांना किती ओळखता, किती काळ ओळखता यावर मैत्री अवलंबून नसावी. कोण आधी भेटलं किवा कोण सर्वाधिक आवडलं यावरही अवलंबून नसावी. मैत्र असं, की जो आला तुमच्या मनात अन् परतलाच नाही.’ माणसाचं असं हे व्यक्त होणं, अभिव्यक्त होणं मला वाटतं मैत्रीच्या व्यापक अर्थाच्या शोधाचा हा प्रवास असावा. काही वेळा हा शोध एखाद्या व्याख्येजवळ थांबतो, तर काही वेळा तो तिथंच सुरू होतो. तुमच्या-माझ्यासह अनेकांनी मैत्रीची पहिली व्याख्या ऐकलेली, वाचलेली असावी. ‘फ्रेंड इन नीड, फ्रेंड इनडीड’ जो गरजेला धावून येतो तो मित्र! कितपत खरंय ते? रस्त्यातून जाताना तुमच्या मोटरसायकलला, कारला अपघात झाला. कोणीतरी लगेच धावत आला, तुम्हाला मदत केली. तो कुठे तुमचा मित्र होता? त्याला तर तुम्ही ओळखतही नव्हतात. अडचणीत सापडलेल्या कोणालाही मदत करणं हा तरी मानवी
स्वभाव असायला हवा. मग केवळ त्यामुळं कधी कोणी कोणाचा मित्र होतो? नाही. याचाच
अर्थ ही व्याख्याही अपुरीच असावी. तुम्ह
ही मैत्रीची काही तरी व्याख्या केली असेल, व्याप्ती ठरविली असेल. मी ठरविलीय... कशी? ते समजावून घेण्यासाठी एक अनुभव सांगायला हवा.
आमचा एक मित्र. पंधरा-वीस वर्षांचा परिचय. त्याचा स्वभाव, आवडी-निवडी सारं काही मित्रपरिवाराला पुरतं ठाऊक होतं. आमच्याशिवायही त्याचा मित्रपरिवार मोठा. त्या प्रत्येकाविषयी हा खूप काही मोठ्या आत्मीयतेनं सांगायचा. त्यांच्याविषयी चांगलं बोलायचा. तर अशा या मित्रानं पुण्यात एक छोटेखानी बंगला बांधला. पुण्यासारख्या ठिकाणी, पुण्यातल्या माणसाला फ्लॅट घेणं कठीण होतं. तिथं यानं बंगला बांधला यांचं आम्हाला अप्रूप. आता शानदार पार्टी व्हायला हवी, सर्वांची एकमुखी मागणी. आता ही मागणी अमान्य होण्याचं काहीच कारण नव्हतं. झालं. मेजवानीची तारीख, वेळ ठरली. आम्ही त्याच्या नव्या वास्तूत पोहोचलो. मित्रही सर्वांना कुठे, काय याची माहिती देत होता. दिवाणखान्यात छान बैठक तयार केली होती. फर्निचरही उंची होतं. फॅन आणि त्यात दिव्याची व्यवस्था ते कमी-अधिक करण्याची सोय. स्वयंपाकघरात ग्रीन ग्रॅनाईड, किचन चिमणी, कुकींग रेंज, बाथरूमला जोडून असलेल्या जागेत वॉशिग मशीन, टी.व्ही. असा की तो ३६० अंशांत फिरविता यावा... एकूणच जे काही केलं होतं ते छान होतं. मेजवानी सुरू झाली, काही जण थंड पेयपान करीत होते, तर काहींनी त्यात अधिक ऊर्जा मिळण्याची व्यवस्था केली होती. हॉलमध्ये, छोट्याशा लॉनमध्ये गप्पांची कोंडाळी पडू लागली. गप्पा रंगू लागल्या. एका कोपर्यातून आवाज आला... अर्थात हळूच, ‘‘अरे इतकं सगळं केलंय; पण पैसे आणले कुठून यानं? काही तरी लाईन केलेली दिसतेय.’’ दुसरा म्हणाला, ‘‘कशाला काही करायला हवं? इतकी वर्षे सत्तेच्या नोकरीत आहे. नुसतं काही सांगायचा अवकाश, लगेच हजर.’’ तिसरा म्हणाला, ‘‘अरे बिल्डरला खूप मदत केलीय त्यानं; मग एवढा बंगलाही देऊ नये का त्यानं?’’ एकजण म्हणत होता, ‘‘अंथरूण पाहून पाय पसरायला हवेत. इथं तर यानं खूपच कर्ज करून ठेवलेलं असावं.’’ पार्टी रंगत होती. मित्र प्रत्येकाची आवर्जून च
ौकशी करीत होता. सर्वच जण हसतमुखानं आणि तोंडभरून त्याचं कौतुक करीत होते. मनात मात्र ‘मला हे कधी जमलं नाही. सत्ता वापरायलाही अक्कल लागते. आपलं बरंय, तीन खोल्यांचा फ्लॅट; पण शांत झोप येते. कोणाचं काही घेतल्याचं ओझं नाही.’ मोठ्या आनंदात पार्टी संपली. मध्यरात्र होऊन गेली होती. बहुतेक जण परतले होते. दोघे-चौघे रेंगाळलेले होते. ‘‘काय कसं काय?’’ मित्रानं विचारलं. मीही ‘‘छान’’ म्हटलं. कौतुकानं तो सुखावला होता. मित्रांच्या कुजबुजीनं मी अस्वस्थ झालो होते. मला वाटलं, संकटकाळी धावून येतो तो मित्र, ही व्याख्या बदलायलाच हवी. आपल्या आनंदात प्रामाणिकपणे, प्रांजळपणे जो सहभागी होतो, होऊ शकतो, आनंद वाढवितो अन् स्वतःही दुःखी होत नाही, तो खरा मित्र. मी घरी परतलो. झोप येत नव्हती. मनात विचार येत होते, खरंच एवढं सगळं यानं केलंय; पण कसं केलं असेल?
-- किशोर कुलकर्णी
परवाच जागतिक महिलादिन साजरा झाला. विविध कार्यक्रमांचं आयोजन झालं. महिलांची प्रगती आणि समस्यांवर चर्चा झाली. ‘लोकमत’च्या पुणे आवृत्तीनं आयोजित केलेल्या अशाच एका कार्यक्रमाला मी हजर होतो.
मला एक आठवतं, माझ्या आईनं सांगितलं
होतं की वर्षा-दीड वर्षाचा असताना
तू खूप छान दिसायचा. त्यावेळचं माझं एक छायाचित्र मी कोपरगावच्या एका स्टुडिओमध्ये पाहिलं. खरं म्हणजे आईनं सांगितलं म्हणून तो मी होतो, अन्यथा त्या प्रतिमेकडे मी पाहिलंही नसतं. त्या फोटोच्या प्रेमात पडलो मी; पण स्वतच्या प्रेमात नाही पडलो. आजही आठवणींचे गाठोडे सोडताना, लग्नाचे अल्बम पाहताना किंवा सहलीतले मित्र पाहताना आपली नजर जाते ती आपल्या प्रतिमेवर. तो मी असं आपण सांगतो. कारण आज तो मी राहिलेला नसतो. ज्याला आपण हा मी असं म्हणत असतो तो खरोखरच मी असतो का? आपण कोणाला भीत नाही, असं छातीठोकपणे सांगणारी माणसं किती भित्री असू शकतात, हे तुम्हाला थोडं डोळसपणे पाहिलं तरी सापडेल. `आपल्याला कधी राग येत नाही अन् आला तर आपण म्हणजे अगदी हे' असं म्हणणारा माणूस बायकोच्या भुवईच्या धाकावर आवाज बदलताना आपण पाहतो. थोडक्यात काय तर आपण आपलीच आपल्याला हवी तशी प्रतिमा सुखावली तर आपणही सुखावतो. एखाद्या प्रतिमेत आपण स्वतला पहायला लागलो की आपलं स्वतच असं व्यक्तिमत्त्व तयार होतं. खरं तर हे व्यक्तिमत्त्व त्या-त्या क्षणाचं असतं. माणूस हा काही एक माणूस नसतो, तो म्हणजे विविध व्यक्तिमत्त्वांची साखळी असते. या साखळीतल्या एखाद्या कडीत आपण स्वतला अडकवून नव्या व्यक्तिमत्त्वाचा आनंद घेत नाही. ते व्यक्तिमत्त्व अनुभवत नाही. तो मी काल होतो, आज नाही याचं दुःख आज केलं जातं. उद्या मी असा असेल याचंही दुःख वाटू लागतं. जीवन हा एक अनुभवाचा प्रवास आहे. तो करायचा असेल तर वर्तमानात जगायला हवं. आजच्या स्वतला स्वीकारणं त्यासाठी आवश्यक आहे. भूतकाळाच्या प्रतिमा आणि भविष्यकाळाच्या कल्पनांना विश्राम देऊन आजचा अनुभव घ्यायला हवा. जो वर्तमानात जगतो त्याला स्पर्श करायला दुःखालाही दोनदा विचार करावा लागेल. वर्तमानात जगण्यासाठी स
वतला पाहणं, जाणून घेणंही तितकच महत्त्वाचं आहे. एकदा माझा मी जसा आहे तसा स्वीकारला की मग इतरांनाही तो जसा आहे तसं स्वीकारण्याचं भान येतं. एकदा माणूस, व्यक्ती, घटना किंवा परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारण्याची वृत्ती, प्रवृत्ती आली की मग दुःखाची बातच येत नाही.
-- किशोर कुलकर्णी
त्या वेळी मी नुकताच जपान दौर्याहून परतलो होतो. जपानमध्ये वावरताना तेथील महागाईचा विचार मनात असे अन् स्वाभाविककपणे सारे हिशोब रुपयांत होत असत. पुण्याला आल्यानंतर रस्ते, वाहतूक इथली आणि स्वच्छता, टापटीप, शिस्त या बाबी जपानच्या, अशी तुलना सतत होत असे. एका अर्थानं मी पुण्यात सरावत चाललो होतो.
‘हे असंच चालायचं’ हे वाक्य जवळचं वाटू लागलं होतं. त्या वेळी मी पुण्यापासून वीस किलोमीटरवर निगडी येथे राहत असे अन् रोज बसने प्रवास करीत असे. पुण्याच्या पालिका बस स्टॅन्डवरून पिंपरी-चिंचवड-निगडीसाठी बस निघत. तर, असाच एकदा निगडीला जाण्यासाठी म्हणून बस स्टॉपवर आलो. बरीच मोठी रांग होती, पण बस डबलडेकर होती, ती मिळण्याची शक्यता अधिक होती... पण तसे व्हायचे नव्हते. दहा-बारा प्रवाशांसह मला खालीच थांबावे लागले. आता किमान वीस मिनिटांची प्रतीक्षा होती. एकूणच बस स्टॅन्डही काहीसा आळसावलेला होता. हालचाली कमी होत्या; कारण एवढ्यातच सर्व बस मार्गस्थ झालेल्या होत्या. बस स्टॅन्डवरच्या दुसर्या रांगेत मी होतो. तोंडात पान चघळत होतो. अचानक माझ्या समोरच्या रांगेतल्या एका प्रवाशानं काही हालचाल केली अन् बस स्टॉपवर, जिथं बस उभी राहते तिथं एक लांबलचक लालभडक पिचकारी आकाराला आली. त्या प्रवाशानं त्याच्या रंगत जाणार्या पानाचा मुखरस स्वतःच्या कौशल्यानं रेखाटावा तसा बाहेर फेकला होता. काळ्याभोर डांबरी रस्त्यावर लालभडक पानाची पिचकारी आकाराला आली होती. दिसायला ते फारच विचित्र दिसत होते, पण त्या प्रवाशाला किवा इतरांना त्यात वेगळे असे काही वाटत नव्हते. स्टॅन्डवर जो कंट्रोलर असतो तो बहुधा या सार्या घटना त्याच्या छोट्याशा खोलीतून पाहत असावा. हे सारं झाल्यानंतर तो बाहेर आला. त्यानं त्या संभावित प्रवाशाकडे एक कटाक्ष टाकला अन् वळला. बाजूला गेला. तो प्रवासी क्षणभर हबकला, पण नंतर मनाच हसला. मी मात्र तोंडात पान असल्यानं उगाचच वरमलो. तो कंट्रोलर बाजूला गेला, जिथं बसमध्ये पाणी घालण्यासाठी झार्या ठेवलेल्या असतात तिथून त्यानं एक झारी घेतली. ती पाण्यानं भरून काढली अन् ती झारी घेऊन तो जिथं रंगारंग झालेलं होतं तिकडे चालू लागला. स्वच्छतेची आच असली की माणूस काय करू शकतो, असा भाव तोवर प्रतीक्षा करणार्या प्रवाशांच्या मनात आला असावा. पण, तो जवळ येऊन थांबला, त्यानं ती झारी तिथंच ठेवली, पुढे येऊन म्हणाला, ‘‘ओ, मिस्टर, या पुढं. घ्या ती झारी अन् साफ करा ते सारं.’’ हे त्या प्रवाशाला आणि आम्हालाही अपेक्षित नव्हतं; पण घडलं. मी पिचकारी मारली नाही, असं रेटून बोलण्याची संधीही त्या कंट्रोलरनं दिली नाही. तो प्रवासी निमूटपणे पुढे आला. हातात झारी घेऊन त्यानं स्वतःच्या मुखरसानं रंगलेला रस्ता स्वच्छ केला आणि आपल्या जागेवर येऊन बसला. अवघ्या दहा मिनिटातला हा सगळा प्रसंग, पण त्या प्रवाशाला त्याची चांगली अद्दल घडली होती. कधी काळी पान खाऊन तोंड रंगवणार्या मलाही ‘आपण किती पाण्यात’ याची जाणीव झाली होती. बस स्टॉपवरचा प्रत्येक माणूस त्या कंट्रोलरकडे अत्यंत आदरानं, विस्मयानं पाहत होता. तो प्रवासी मात्र आता बस लवकर येऊ देत, अशी प्रार्थना करीत असावा.
हे सारं आज आठवण्याचं कारणही तसंच आहे. आजच्या वृत्तपत्रात एक वाचकाचं पत्र वाचलं. एका वृद्धानं लिहिलंय ते. पत्रातच त्यांनी स्वतःचं वयही दिलंय. ते म्हणतात, ‘‘पुण्यात किवा महाराष्ट्रात हेल्मेटची सक्ती करण्याचा कायदा झाला. त्यावर आंदोलनं झाली, तरीही कायदा अस्तित्वात आला. काही दिवस कारवाईच्या बातम्या येत असत. आता त्याही बंद झाल्यात. पुण्यातील हेल्मेटसक्ती रद्द झाली आहे का, कृपया संबंधित खात्यानं खुलासा करावा.’’ हे पत्र वाचताना पुण्यात हे असं पत्र येणारच असं मनात येत होतं; पण हेल्मेटच्या सक्तीसाठीचं या वृद्धानं दिलेलं कारण आणखीही ज्ञानात भर टाकणारं होतं. पत्रात म्हटलं होतं, की हेल्मेट वापरणार्या व्यक्तीला दुचाकीवर बसून पान, तंबाखू किवा अशीच पिक मारता येत नाही. स्वाभाविकपणे माझ्यासारख्या वृद्धाचे कपडे रंगण्याचं प्रमाण कमी होण्याची शक्यताही आता हेल्मेट वापराचं प्रमाण संपल्यानं मावळली आहे. ते असंही म्हणतात, की मी मोपेड वापरतो. या वयात तेच सोईचं पडतं, पण अशात कोणी पिक मारली, तर वेगानं जाऊन त्याची गच्ची पकडण्याची क्षमताही आता नाही; तेव्हा हेल्मेटचा हाही एक लाभ होता.
-- किशोर कुलकर्णी
दाखल झालेले होते. माझी थोरली बहीण आणि मी असे आम्ही दोघं
मुलं. आई-वडील खूश होते. दुष्काळी भागातील शेती सोडून
बसले.
त्या वेळी शिर्डी एवढी विस्तारली नव्हती अन् गर्दीचा तर प्रश्नच नव्हता. घरी जावं का? गेलो तर घरी काय सांगावं की
-- किशोर कुलकर्णी
शब्द अन् त्याचे अर्थ याविषयी खरं तर खूप काही बोलता, लिहिता येईल; पण त्याची ही जागा नव्हे आणि तसा हेतूही. तरीही संवादासाठी शब्दांचा आधार घ्यावाच लागतो. जेव्हा तुम्ही अशा देशात किंवा प्रदेशात जाता तेव्हा शब्दही मुके होऊन जातात. रशिया, जपान एवढंच काय दक्षिणेतल्या ग्रामीण भागात गेल्यावर शब्दांना अर्थ उरत नाही आणि मग अभिनयाचा कस लागतो. तरीही आपण बोलतो. म्हणजे शब्दाचा वापर करतो. काही वेळा वाटू लागतं शब्दांना अर्थ प्राप्त होण्यासाठी संस्कार व्हावे लागत असावेत. ज्यावेळी लहान मुलांना बोलताही येत नसतं त्यावेळी ते सभोवतालच्या संभाषणाचा, संवादाचा अन् शब्दांचा अन्वयार्थ लावत असावेत. `तू छान दिसतोस' आणि `घाण दिसतोस' यामध्ये केवळ एका शब्दाचा फरक आहे; पण तो एखाद्याचे भावविश्वच बदलून टाकू शकतो. भाषासंस्कारानुसार त्याचे परिणामही बदलतात. कोल्हापूर भागात `रांडच्या' हा शब्द प्रेमानं वापरला जातो. त्यातला जिव्हाळा सर्वत्र सारखाच असेल असं नव्हे. याचाच अर्थ या शब्दाबद्दलचे संस्कार सर्वत्र समान नसावेत. तुमच्या मनात सहजी आलं असेल, की शब्द, अर्थ आणि संस्कार अशी ही एवढी प्रस्तावना कशासाठी? पण त्याला कारणही तसंच आहे, संदर्भही शब्द, अर्थ अन् संस्काराचे आहेत. परवा `वसंत विशेष' या `लोकमत'च्या उन्हाळी विशेष पानासाठी मी काही लिहावं अशी सूचना माझ्या सहकाऱयानं केली. त्याला म्हटलं, ``तू सांग. काय हवं ते लिहून देतो.'' तो म्हणाला, ``आयुष्यात एखादी गोष्ट हरवून जाते अन् मग कधी तरी आठवते, त्या गोष्टीची रूखरूख वाटत राहते, असं काही तरी लिहा.'' मी ``हो'' म्हटलं; पण अशी एकही घटना, गोष्ट, प्रसंग किंवा इप्सित आठवेना, की जे हरवून गेलेलं असावं. एखादी गोष्ट हरवलीय म्हटलं, की ती आपली होती असं वाटू लागतं किंवा तो क्षण तरी पुन्हा जगावासा वाटतो; पण कसं शक्य आहे ते? ज्या क्षणाला ही अक्षरं उमटली तोच क्षण पुन्हा मिळत नाही म्हणून तर त्याला आयुष्य म्हणतात, जीवन म्हणतात. पाण्याच्या प्रवाहात पाय टाकून बसतो आपण आणि आपल्या पावलांना पाण्याचा स्पर्श सुखावून जातो. हाच आनंद अनेकवेळा घेता येतो माणसाला; पण पाण्याचे तेच बिंदू पुन्हा तेच असतील का? तसंच काहीसं क्षणांचं आहे. ते क्षणोक्षणी हरवतच असतात.
-- किशोर कुलकर्णी
Copyright © 2025 | Marathisrushti