नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
संस्थेत असो, संघटनेत असो की व्यवसायात असो सर्वत्र नेतृत्व करावे, असे प्रत्येकालाच वाटत असते. ज्याचे नेतृत्व आहे त्यांना ते यशस्वी व्हावे, असे वाटते. परंतु यशस्वी नेतृत्वासाठी हवे असते, प्रभावी व्यक्तिमत्त्व. तेव्हा आपले व्यक्तिमत्त्व प्रभावी कसे करावे आणि त्यातून यशस्वी नेतृत्व कसे साकारावे, हे सांगणारे छोटे परंतु बहुउपयोगी पुस्तक पुस्तक : यशस्वी नेतृत्वासाठी प्रभावी व्यक्तिमत्त्व लेखक : विजय देशपांडे, पाने : 51, किंमत : 50 रू. प्रकाशन : नचिकेत प्रकाशन, नागपूर-15 भ्र.9225210130
कवी श्री. निलेश बामणे लिखीत " एका निवांत समयी " व " साहित्य उपेक्षितांचे " या पुस्तकाचे प्रकाशन करताना राजमाता प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ. आशाताई मामिडी, सरिता को.आॅप.क्रेडिट सोसायटी लि.चे अध्यक्ष श्री. सदाशिव मते, संचालक डॉ. शांताराम कारंडे, संचालक श्री विनोद निक्षे, सचिव श्री. प्रभाकर देसाई, श्री हरिशचंद्र झावरे, धगधगती मुंबई मराठी वृत्तपत्राचे उपसंपादक श्री जगदीश लाड.



मराठी साहित्यविषयक विविध मान्यवरांचे अभ्यासपूर्ण लेखांचा संग्रह.
त्यात महात्मा फुले यांची मराठी वाङमयाला देणगी, प्रा. वा. म. जोशी यांच्या तात्विक लेखनातून प्रकटणारी जीवनदृष्टी, साने गुरुजींचे निबंधखन, कला म्हणजे काय? वाङमयीन वादळ, गो.वि. करंदीकरांचे अॅिस्टॉटलच्या काव्यशास्त्रविषयक, सुखांतिका, अभिजात साहित्य आणि लोकप्रिय साहित्य, अनुभवामृताचे साक्षेपी विवेचन, र. धों. कर्वे प्रकल्पाची फलश्रुती, ज्योत्स्ना देवधर: एक सफल लेखनप्रवास, नाट्यदर्पणकार रामचंद्र - गुणचंद्र आणि त्यांची रसविषयक भूमिका, स्त्रियांच्या साहित्यातील देशीयतेचा आविष्कार, स्त्री-पुरुष संबंधाच्या चित्रनाच्या समस्या, मराठी नाटकातील स्त्रियांची रुपे, कवितेचा अन्वयार्थ, इत्याची लेखांचा अभ्यासपूर्ण आढावा या पुस्तकात एस.एन.डी.टी विद्यापीठातील मराठी भाषा विभागाचे प्रमुख डॉ. विलास खोले यांनी घेतलेला आहे.
विमर्श
लेखक : विलास खोले
प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
मूल्य :
चाणक्य म्हणजे बुद्धिमत्तेचे, शहाणपणाचे प्रतिनिधिक व्यक्तिमत्त्व. व्यवस्थापनाचा/प्रशासनाचा उद्गाता. अशा या चाणक्याच्या अनुभवसिद्ध शहाणपणाचे सार चाणक्यसूत्रे या आटोपशीर पुस्तकात संकलित केले आहे. मूळ संस्कृत सूत्र आणि लगेच त्याचा मराठी अनुवाद, अशी रचना असणारी एकूण 450 सूत्रे यात आहेत. कोणतेही सूत्र केव्हाही वाचा, त्यावर विचार करा, त्यानुसार आचार करा आणि यशस्वी व्हा. व्यावसायिक जीवन असो की, सांसारिक जीवन सर्वत्र ती सारखीच उपयुक्त व प्रभावी आहेत. यशस्वी जीवनाचा हा सोपा व प्रशस्त मार्ग आहे. चाणक्य सूत्रे/नचिकेत प्रकाशन पाने : ४८ किंमत : 50रू. नचिकेत प्रकाशन 24, योगक्षेम ले-आऊट, स्नेह नगर, वर्धा रोड, नागपूर -440 015.
भारतीय जनमानसाचे आराध्य असणाऱ्या प्रभु श्री रामचंद्राच्या रामजन्मभूमी मुक्तीचे आंदोलन भारतीय स्वातंत्र्योत्तर काळातील एक अभूतपूर्व आंदोलन आहे. स्वातंत्र्य आंदोलनापेक्षा अधिक व्यापक तीव्र असे हे आंदोलन या जन चळवळीचा साक्षेपी सखोल व साधारण मागोवा घेतला आहे प्रसिद्ध पत्रकार विचारवंत रामजन्मभूमी मुक्तीचे अभूतपूर्व आंदोलन लेखक : दि. भा. घुमरे पाने : १६०, किंमत : १५० रू. नचिकेत प्रकाशन : 24 योगक्षेम ले-आऊट, स्नेहनगर, वर्धा रोड, नागपूर-15, भ्र. 9225210130
लेखक मनोहर महादेव भोसले यांनी स्वतः च्या मनोगतामध्ये आजच्या काळातील स्त्रियांच्या बदलत्या विचार सरणीला स्पर्श केला आहे. लग्नामध्ये किंवा लग्न झाल्यावर अनेक वस्तूंच्या किंवा आर्थिक गोष्टी बद्दल एकमेकांचे वाद विवाद असतात. परंतु लेखकाने अनुभवलेल्या एका प्रसंगांमध्ये स्त्रीचे मत स्पष्टपणे आणि योग्य ठिकाणी मांडणे कितपत आवश्यक आहे याची सर्वांना नक्कीच कल्पना येईल. आजच्या या २१व्या युगातील महिलांमधील शारीरिक, मानसिक, भावनिक वैचारिक बदला बद्दलची ही लघुनाटिका आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांनाही समान मानले जाते परंतु काही धार्मिक पंडित म्हणवून घेणा-या व्यक्तीच्या मूळे लिंगभेद निर्माण केला जात आहे. त्याचा परिणाम संपूर्ण मानव जातीवर होतो आहे लिंगभेदामुळे अनेक नवनवीन वाद विवाद होत आहेत. पुरुषांना सर्व बाबतीत मुक्तता असते परंतु स्त्रीयांवर अनेक प्रकारची बंधने घातली जातात. भारतीय संस्कृती हि पुरुष प्रधान मनाली जाते परंतु कोणताही पुरुष हा स्त्री शिवाय अपूर्णच आहे.
वंश आणि अंश या लघुनाटिकेमध्ये लेखकाने एका काल्पनिक विवाहात स्त्री पुरुषामध्ये लिंगभेदामुळे घटस्फोट घेण्यासाठी ते कोर्टामध्ये जातात. त्या दोघांनाही घटस्फोट हवा असतो परंतु त्यांना तीन मुली असतात त्या मुलींच्या जोपासनेसाठी लागणारी पोटगी त्या महिलेला मिळावी यासाठी ते कोर्टात जातात. तेथे त्यास्रीला सर्वजण वंशाचा दिवा मानला जाणारा मुलगाच हवा आणि ते ती स्त्री देऊ शकत नाही म्हणून तिचा पती घटस्फोट घेत असतो. परंतु मुलं जन्माला घालणे हे फक्त एका स्त्रीचे काम नसून त्यामध्ये पुरुष देखील खुल महत्वाची भूमिका बजावत असतात. कोर्टा मध्ये काही जेष्ठ आणि तज्ज्ञ व्यक्ती तसेच डॉक्टर यांना बोलावून मुलं जन्माला घालणे, त्यासाठी आवश्यक असणा-या गोष्ट या सर्व बाबींची चर्चा होते.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार स्त्री मध्ये फक्त X पेशी असतात तर पुरुषामध्ये X आणि Y अशा दोन प्रकारच्या पेशी असतात पुरुषापासून मिळालेल्या पेशींनुसारच जे बाळ जन्माला येणार आहे ते स्त्री किंवा पुरुष ठरत असते त्यामुळे स्त्रियांना दोष देण्यापेक्षा पुरुष ही तितकाच जबाबदार आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे. स्त्री ही नेहमी जमिनीची भूमिका बजावते तर पुरुष हा शेतक-याची भूमिका बजावत असतो पुरुष जे पेरतो तेच उगवत असते मग पुरुषाने काय पेरायचे ते स्वतः ठरवावे लागेल.
लेखक मनोहर भोसले यांनी मुलगा किंवा मुलगी या दोघात ही वंश न समजता तो आपला अंश आहे म्हणून त्याचा सर्वांगीण विकास केला पाहिजे. असा मुक्त विचार सरणीचा संदेश खूप छान पद्धतीने दिला आहे. शाळा, कॉलेज, महाविद्यालयामध्ये ही लघुनाटिका सादर व्हावी आणि समाज जागृतीचे आणि प्रबोधनाचे कार्य होणे आवश्यक आहे आणि ते वंश आणि अंश या लघु नाटिकेतून नक्कीच होईल असा मला ठाम विश्वास वाटतो. लेखकाला पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा.
- मंगेश विठ्ठल कोळी (लेखक-संपादक-समीक्षक)
o Title - Vansh Aani Ansh (वंश आणि अंश)
o Author - Manohar Mahadev Bhosale (मनोहर महादेव भोसले)
o Price - Rs. 40/- (मूल्य 40/- रुपये)
o Publisher - Dr. Sunil Patil (डॉ. सुनील पाटील)
o Publication - KavitaSagar Publication (कवितासागर प्रकाशन)
o Contact - 02322 - 225500, 09975873569
o Email - sunildadapatil@gmail.com
येत्या शनिवारी म्हणजेच दिनांक ७ जानेवारी २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजता, नूतन बांदेकर लिखित मनतरंग (भाग १) या ललित लेखसंग्रहाचे व अॅडिओ सीडीचे प्रकाशन नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महानगरपालिका मुख्यालय, पहिला मजला, ठाणे (प) येथे होणार असून माननीय महापौर संजयजी मोरे (ठाणे महानगरपालिका) यांच्या हस्ते प्रकाशन होईल. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संपदा जोगळेकर-कुलकर्णी (अभिनेत्री), मिलिंद बल्लाळ (संपादक दै. ठाणे वैभव) , दीपक वेलणकर (व्हॉईस गुरु) ही नामवंत व्यक्तिमत्व लाभलेली आहेत. आपण या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती !
श्रोते हो, आपण माझ्या लिखाणाला देत असलेल्या उदंड प्रतिसादामुळे मला सतत लिहीत रहाण्याची उर्जा मिळते. तीच विचारांची मालिका आणि तंत्रज्ञानाची कास धरुन निर्माण झालेलं त्याचं हे श्राव्यरुप मी खास आपल्यासाठी सादर करीत आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी माझा हा खारीचा वाटा ! आजच्या विद्यार्थी वर्गाला मराठी भाषा वाचन आणि उच्चार सुधारण्यासाठी मदतीचा हात देण्याचा आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी माझा हा वेगळा प्रयत्न आहे. आपण माझी ही नवनिर्मिती स्विकारुन, नक्कीच प्रतिसाद द्याल, ही अपेक्षा !
घेऊन तेव्हा येईन मी, विचारांचे नवीन रंग !
द्याल जेव्हा साद मित्र हो, पुन्हा उमटतील मनतरंग !
मनापासून धन्यवाद !
- नूतन बांदेकर

सत्तरीच्या दशकात वयात आलेली तरुण मुलं आणि त्यांच्या जगण्याचं भान या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. मात्र ते सत्तरीच्या दशकापुरते मर्यादित नाही. चक्रधर, या कादंबरीचा नायक, अशा पिढीचा प्रतिनिधी आहे. तो समूहात असूनही एकाकी आहे. चक्रधरचा आणि त्याच्या पिढीचा हा प्रवास अरविंद रे यांनी मोठ्या ताकदीने चित्रित केला आहे.
महाराष्ट्राची मायबोली मराठी असली, तरी प्रत्येक जिल्ह्यागणिक ती बदलत जाते. जसे भाषेचे आहे, तसेच खाण्याचे. काही मैलांनी खाद्यसंस्कृतीतही थोडा बदल जालेला दिसतो. माई देशपांडे यांनी या पुस्तकात मराठवाड्याचा खाद्यखजिना मोकळा केला आहे.
विश्वनाथ शिरढोणकर हे मध्यप्रदेशात स्थायिक असलेले ज्येष्ठ मराठी साहित्यिक आणि कवी आहेत. हिंदी भाषेतदेखील त्यांच्या अनेक साहित्यकृती प्रसिद्ध आहेत. त्यांच्या हजार तोंडांचा रावण या लघुकथासंग्रहाची ज्येष्ठ साहित्यिक संजय सोनवणी यांनी लिहिलेली प्रस्तावना.
Copyright © 2025 | Marathisrushti