नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
चीनचे आव्हान दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. या आव्हानाचे सर्वंकष स्वरूप स्पष्ट करणारे तसेच या संदर्भात वस्तुस्थिती उलगडणारे तसेच देश व सहकार म्हणून आपण भोगती भूमिका घेऊन कशी पावले उचलायला हवी, यांचे सोपे मार्गदर्शन करणारे मराठीतील एकमेव महत्वपूर्ण पुस्तक.
बाहेरुन होते ती वाढ अन् आतून होतो तो विकास शिक्षणाने माणसाचा विकास अपेक्षित असतो.
डॉ. नीता पांढरीपांडे यांनी बर्याच देशांना जर्मनी, स्पेन, फ्रान्स.. नेदरलॅंड, जपान, ऑस्ट्रेलिया, एथेंस, स्वित्झरलॅंड, सिंगापूर, थायलॅंड, मलेशिया या देशांना भेटी दिल्यात आणि त्याच्यातील शिक्षक तेथील शिक्षणपध्दतीशी तुलना करु लागला.
आपल्या शिक्षणात काय कमी आहे? आपले विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी का जातात? या प्रश्नांनी त्याची उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नातून हे पुस्तक तयार झाले. या पुस्तकात विभिन्न देशांच्या शिक्षणपध्दतीचा अभ्यास त्यांनी केल्यावर तो मांडला आहे.
विविध देशांच्या शिक्षणपध्दतीचा, संशोधनाचा, मानांकनाचा परिचय आणि त्यातून नव्या जगाची संस्कृती, शिक्षणपध्दती निर्माण करण्याचा हा अभिनव प्रयत्न आहे.
शिक्षण समजून घेताना
लेखिका : डॉ. नीता पांढरीपांडे
प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
मूल्य : १८०/- रुपये
पाने : १६०
मानवी प्रतिभेचे उत्तुंग शिखर असणारे महर्षी भृगू यांनी जीवनाच्या आणि ज्ञानाच्या नानाविध शाखांमध्ये आश्चर्यकारक, अतुलनीय व मूलभूत काम केले आहे. अनेक ज्ञाती समाजाचे ते मूळ पुरूष आहेत. त्यांच्या कर्तृत्वाचा आणि जीवनाचा परिचय प्रथमच मराठीत एकत्रितपणे करून दिला आहे.

मराठी वाङमयातील कविता, कादंबरी व आत्मचरित्र या तीन वाङमय प्रकाराचा तौलनिक आढावा डॉ.विलास खोले यांनी घेतला आहे.
कवितांविषयी लिहिताना करूणाष्टके, स्वातंत्र्य शाहीर कुंजविहारी, प्रेम गौरव, भिजकीवही, द्रोण, संधिप्रकाशाचे लावण्य, तृतीय पुरुषाचे आगमन सारख्या प्रतिकात्मक काव्याचे सटीप विश्र्लेषण, तर कादंबरी या वाङमयाचा आढावा घेताना श्यामची आई, आस्तिक, बखर एका राजाची, गांधारी, किनारा, होमकुंड, भिन्न, विमु्क्ता यानंतर १९६० नंतरची मराठी कादंबरी व स्त्रीवाद यांचे विवेचन अभ्यासपूर्ण आहे.
आत्मचरित्र या प्रकाराबद्दल लिहिताना डॉ. खोले यांनी आत्मचरित्र व चरित्र, आत्मचरित्राचे आकलन - एक दिशा, आमच्या आयुष्यातील काही आठवणी, करुळचा मुलगा दलित आत्मकथने याविषयी सविस्तर तपशीलासह विवेचन केलेले आहे.
विभ्रम
लेखक : विलास खोले
प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
मूल्य : ३५०/- रुपये
पाने : ३०१
रसायनशास्त्राच्या प्रगतीमध्ये मोलाची भर टाकणाऱ्या प्रमुख महिला व पुरुष रसायनशास्त्रज्ञांचा हा सचित्र परिचय सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे.
स्त्रीयांना विणकाम, भरतकामाची जन्मत:च आवड असते. हे जाणून विणकामातील विविध प्रकार, डिझाईन्स भरतकामाचे सचित्र नमुने व त्याची रीत सामान्य स्त्रियांना समजेल अशा पध्दतीने केलेली मांडणीच या पुस्तकाच्या दोन आवृत्त्या संपायला कारणीभूत ठरल्यात.
घ्या हातात सुया आणि लागा विणकामाला, सोप्पय !
लेखिका : सौ. विजया किशोर भुलेस्कर
प्रकाशक : मोनिका प्रकाशन, नाशिक
मूल्य : १८०/- रुपये
पाने : १४८
मानवी जीवन ज्यावर अवलंबून आहे अशा निसर्गचक्रात कीटकांच्या दुनियेची ही महत्वाची भूमिका आहे. या कीटकांच्या दुनियेतील कोळी,पतंग, काजवा, झुरळ, माशी, उधई, आदी विविध कीटकांचा माहितीपूर्ण मनोरंजक पण सोप्या भाषेत परिचय करून दिला आहे.
विनोदी लेखाबरोबरच सामाजिक वर्तनाची खिल्ली उडवणारे लेख आहेत.
काल्पनिक देवी-देवतांच्या उपासनेत आज बहुजन समाज परता अडकलेला आहे आणि पुजारीवर्ग हा देवाच्या नावावर बहुजनांकडून जमा केलेल्या धनावर जगत आहे. देशात नवनवीन मंदिर बांधण्याची स्पर्धा लागली आहे. राजकारण्यांपासून ते उद्योगपतीपर्यंत सर्वांनी या कार्यास योगदान देत आहे. मंदिर बांधण्यासाठी मजूर म्हणून बहुजन फुकटात सेवा देतो. राजकरणी व उद्योगपती भ्रष्टाचारातून आलेला पैसा मंदिरासाठी दात देतात. तर भट-भटजी स्वत:ची तुमडी भरण्यासाठी ही सोपी संधी उपलब्ध करुन घेतात.
चंद्रसेन टिळेकरांची लेखणी समाजातील दांभिकपणावर आणि बुवाबाजीवर दांडपट्ट्याच्या गतीने चौफेर फिरली आहे. असे हे विडंबनाचे शस्त्र धारदार लेखणीने चालवून समाजाला विचार करण्यास उद्युक्त करणारी शस्त्रक्रिया टिळेकरांनी आपल्या लेखांमध्ये केली आहे.
नुस्तं हसू नका !
लेखक : प्रा. चंद्रसेन टिळेकर
प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
मूल्य : १४०/- रुपये
पाने : १२०
प्रत्यक्ष मृत्यूवर विजय मिळवून मृत्युंजय ठरलेले मार्कंडेय ऋषी. पदमशाली समाजाचे दैवत आहे. त्यांचे जीवन व कार्य, देशभरातील त्यांची स्थाने, मंदिरे, यात्रा आदीबद्दल प्रथमच सर्वंकष माहिती एकत्र ओघवत्या भाषेत लिहिली आहे.
'श्यामची आई' या सिनेमानंतर तब्बल २५ वर्षांनी मराठी सिनेमाला भारत सरकारचा उत्कृष्ठ सिनेमाचा 'कमळ' पुरस्कार 'श्र्वास' या मराठी चित्रपटाला मिळाला. या चित्रपटाची 'श्र्वास' ही कथा माधवी घारपुरेंची.
श्वास व इतर कसदार कथांचा गुच्छ म्हणजेच श्र्वास कथासंग्रह. महाराष्ट्र शासनासह इतर साहित्यिक संस्थांनी गौरविलेला हा कथासंग्रह.
श्र्वास आणि इतर कथा
लेखिका : माधवी घारपुरे
प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
मूल्य : १६०/- रुपये
पाने : १४२
Copyright © 2025 | Marathisrushti