(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • घ्या हातात सुया आणि लागा विणकामाला, सोप्पय !

    ghya-haatat-suya-Front-300स्त्रीयांना विणकाम, भरतकामाची जन्मत:च आवड असते. हे जाणून विणकामातील विविध प्रकार, डिझाईन्स भरतकामाचे सचित्र नमुने व त्याची रीत सामान्य स्त्रियांना समजेल अशा पध्दतीने केलेली मांडणीच या पुस्तकाच्या दोन आवृत्त्या संपायला कारणीभूत ठरल्यात.

    घ्या हातात सुया आणि लागा विणकामाला, सोप्पय !
    लेखिका : सौ. विजया किशोर भुलेस्कर
    प्रकाशक : मोनिका प्रकाशन, नाशिक
    मूल्य : १८०/- रुपये
    पाने : १४८

  • कीटकांची नवलाई

    मानवी जीवन ज्यावर अवलंबून आहे अशा निसर्गचक्रात कीटकांच्या दुनियेची ही महत्वाची भूमिका आहे. या कीटकांच्या दुनियेतील कोळी,पतंग, काजवा, झुरळ, माशी, उधई, आदी विविध कीटकांचा माहितीपूर्ण मनोरंजक पण सोप्या भाषेत परिचय करून दिला आहे.

  • नुस्तं हसू नका !

    Nusta-Hasu-Naka-Front-300विनोदी लेखाबरोबरच सामाजिक वर्तनाची खिल्ली उडवणारे लेख आहेत.

    काल्पनिक देवी-देवतांच्या उपासनेत आज बहुजन समाज परता अडकलेला आहे आणि पुजारीवर्ग हा देवाच्या नावावर बहुजनांकडून जमा केलेल्या धनावर जगत आहे. देशात नवनवीन मंदिर बांधण्याची स्पर्धा लागली आहे. राजकारण्यांपासून ते उद्योगपतीपर्यंत सर्वांनी या कार्यास योगदान देत आहे. मंदिर बांधण्यासाठी मजूर म्हणून बहुजन फुकटात सेवा देतो. राजकरणी व उद्योगपती भ्रष्टाचारातून आलेला पैसा मंदिरासाठी दात देतात. तर भट-भटजी स्वत:ची तुमडी भरण्यासाठी ही सोपी संधी उपलब्ध करुन घेतात.

    चंद्रसेन टिळेकरांची लेखणी समाजातील दांभिकपणावर आणि बुवाबाजीवर दांडपट्ट्याच्या गतीने चौफेर फिरली आहे. असे हे विडंबनाचे शस्त्र धारदार लेखणीने चालवून समाजाला विचार करण्यास उद्युक्त करणारी शस्त्रक्रिया टिळेकरांनी आपल्या लेखांमध्ये केली आहे.

    नुस्तं हसू नका !
    लेखक
    : प्रा. चंद्रसेन टिळेकर
    प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
    मूल्य : १४०/- रुपये
    पाने : १२०

  • मृत्युंजय मार्कंडेय ऋषी

    प्रत्यक्ष मृत्यूवर विजय मिळवून मृत्युंजय ठरलेले मार्कंडेय ऋषी. पदमशाली समाजाचे दैवत आहे. त्यांचे जीवन व कार्य, देशभरातील त्यांची स्थाने, मंदिरे, यात्रा आदीबद्दल प्रथमच सर्वंकष माहिती एकत्र ओघवत्या भाषेत लिहिली आहे.

  • श्र्वास आणि इतर कथा

    Shwaas-Front-300'श्यामची आई' या सिनेमानंतर तब्बल २५ वर्षांनी मराठी सिनेमाला भारत सरकारचा उत्कृष्ठ सिनेमाचा 'कमळ' पुरस्कार 'श्र्वास' या मराठी चित्रपटाला मिळाला. या चित्रपटाची 'श्र्वास' ही कथा माधवी घारपुरेंची.

    श्वास व इतर कसदार कथांचा गुच्छ म्हणजेच श्र्वास कथासंग्रह. महाराष्ट्र शासनासह इतर साहित्यिक संस्थांनी गौरविलेला हा कथासंग्रह.

    श्र्वास आणि इतर कथा
    लेखिका : माधवी घारपुरे
    प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
    मूल्य : १६०/- रुपये
    पाने : १४२

  • नागरी बॅंकांसाठी सहकारी परिपत्रके 1988 ते 2007

    सहकार खात्याच्या मागील 20 वर्षांतील नागरी बॅंकांना लागू असणाऱ्या सर्व परिपत्रकांचे एकमेव व प्रथम संकलन. एकूण 106 परिपत्रकांचा यात समावेश आहे. पृष्ठे 160 असून आकार एक अष्टमांश डेमी आहे. नागरी बॅंकेच्या प्रत्येक शाखेत असावेच, असे हे संकलन असून हाताळण्यास अत्यंत सुलभ आहे.

  • राजा थिबा

    Raja-Thiba-Front-300मधु मंगेश कर्णिकांच्या लेखणीतून तब्बल १२ वर्षानंतर लिहिली गेलेली कादंबरी. इंग्रजांना ब्रह्मदेशचा राजा थिबा याला रत्नागिरीला आणून स्थानबध्द केलं. राजाचा मोठा डामडौल होता. राण्यांवर तो खूप खर्च करावयाचा. आपल्या राहणीमानाला पूरक व्हावं म्हणून त्याने पोत्यांमधून जडजवाहिर बोटीत बसायच्या आधी टाकून घेतलं होतं. रत्नागिरीला आल्यावर जवळचे जडजवाहिर विकून ते आपला थाट करीत होते. रत्नागिरीला त्यांच्यासाठी 'थिबा पॅलेस' बांधण्यात आला. घरातील अंतर्गत बाबींचा यात अंतर्भाव केलेला आहे.

    राजा थिबा
    लेखक : मधु मंगेश कर्णिक
    प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
    मूल्य : १३०/- रुपये
    पाने : १२८

  • आपली सूर्यमाला

    जीवनाचे अस्तित्व असणारी ब्रम्हांडातील आपली एकुलती एक सूर्यमाला. या सूर्यमालेची, त्यातील सर्व ग्रहांची आणि संबंधित अंतराळाची संपूर्ण माहिती आपली सूर्यमाला मध्ये कोणालाही सहज समजेल अशा सोप्या भाषेत लिहिली आहे प्रसिद्ध विज्ञान लेखक डॉ. मधुकर आपटे यांनी. हे पुस्तक वाचण्याकरिता तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी असण्याची गरज नाही.

    आपली सूर्यमाला

    डॉ. मधुकर आपटे

    पाने : 96 ; किंमत : रू 90/-

    नचिकेत प्रकाशन

    ऑनलाईन खरेदी करा

  • यमदूती सुनामी

    सार्‍या जगाला भयचकित करणारे सुनामी हा काय प्रकार आहे ? याची साद्यंत, सचित्र व शास्त्रीय माहिती सोप्या भाषेत देणारे मराठीतील एकमेव पुस्तक. यमदूती सुनामी विभावरी शेंबेकर लेखक : श्री. गो.बा. सरदेसाई पाने : ६४, किंमत : ६५ रू. प्रकाशक : नचिकेत प्रकाशन मो. : 9225210130 / 9405142209

  • शरसंधान – एक वाचनिय पुस्तक

    कोणतेही पुस्तक मी सह्सा संपूर्ण वाचून झाल्याखेरीज हाता वेगळे करत नाही आणि एकदा वाचलेले पुस्तक पुन्हा वाचायला शक्यतो घेत ही नाही. पण ‘शरसंधान’ हे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक मी तीन वेळा वाचले. ‘

    शरसंधान’ हे ह्लके-फुलके पुस्तक असले तरी समजायला जड आणि पचायला अवघड आहे. हे पुस्तक आपल्या बुध्दीचा किस काढण्याबरोबर बुध्दीचा कस लावण्यास प्रवृत्त करते. कोणत्याही पुस्तकाबद्दलची मी माझी प्रतिक्रिया कधीच कोठे दिली नाही की कोठे लिह्ली ही नाही कारण लेखक कोणी का असेना त्याने निर्माण केलेलं साहित्य माझ्या दृष्टीने बहूमोलच असतं.

    ‘शरसंधान’ पुस्तकाच्या निर्मितीत माझा खारीचा वाटा आहे अस या पुस्तकाचे लेखक जयेश मेस्त्री मानतात. पण खरं सांगायच तर मला ते माझ्या लहान भावासारखे आहेत. सावरकरांच्या बाबतच्या त्यांच्या ज्ञानाचा मी प्रचंड आदर करतो. त्यांचे लेखन मी सातत्याने वाचत आलेलो आहे राजकारणा सोबत ते इतर विषय अगदी विनोद ही उत्तम हाताळतात. हे पुस्तक प्रकाशित होण्यापुर्वी ही माझ्या हातात आले होते पण ते वाचण्याचा मोह मी त्यावेळी टाळला. पण पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर जेंव्हा जयेशने त्या पुस्तकाची प्रत मला भेट दिली तेंव्हा मी ते पुस्तक पचेपर्यंत वाचले.

    जयेश जरी नवोदित लेखक असला तरी तो नवखा नाही त्याने यापुर्वी बरेच लिखाण केलेले आहे. प्रचंड अभ्यास आणि निरीक्षणातून त्याचे हे ‘शरसंधान’ पुस्तक जन्माला आलेले आहे. हे पुस्तक म्ह्णजे एक उत्तम लेखक म्ह्णून नावारूपाला येण्याच्या दृष्टीने त्याचे पहिले पाऊलच म्ह्णावे लागेल. जयेशच्या पहिल्याच पुस्तकाला लाभलेली ज्येष्ठ पत्रकार, लेखक, वक्ते आणि समिक्षक श्री.अरविंद कुलकर्णी यांची प्रस्तावना बरेच काही सांगून जाते. त्याच सोबत जयेश मेस्त्री यांच्या लिखाणाचा दर्जाही अधोरेखीत करते. त्यांनी आपल्या प्रस्तावनेत जयेश मेस्त्री यांची पाठ थोपटण्याबरोबरच त्यांच्या हिंदूतत्वनिष्ठतेचे कौतुक करत जयेश मेस्त्री सावरकरांच्या विचारांनी प्रभावित आहे हे सांगायला विसरलेले नाहीत. या पुस्तकाला लाभलेली प्रस्तावनाच एक वाचनिय लेख आहे असे म्हटले तर ते ही वावगे ठरणार नाही.

    जयेश मेस्त्री यांनी आपले हे पुस्तक स्वा.सावरकर आणि बाबा आमटे आणि परिवाराला समर्पित केलेले आहे यावरून त्यांना समाजसेवेचाही वारसा लाभलेला आहे हे स्पष्ट होते. या पुस्तकात जयेश मेस्त्री यांच्या आवघ्या सहा लेखांचा समावेश केलेला आहे. या पुस्तकाच्या सुरूवातीलाच त्यांच्या या पुस्तकाला किशोर नार्वेकर आणि डॉ.शांताराम कारंडे यांनी काव्यात्मक शुभेच्छा दिलेल्या आहेत. डॉ. शाताराम कारंडे यांनी या पुस्तकाला अर्थसहाय्य करून त्याच्या निर्मितीत मोलाची भुमिका बजावलेली आहे.

    या पुस्तकातील पहिला लेख ‘आशीर्वाद देऊ की घेऊ ?’ हया लेखात लेखकाने एक प्रगत राष्ट्र घडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंदाचे चरित्र आजच्या पिढीने स्विकारण्याची गरज का आहे या बद्दल आपले परखड विचार मांडलेले आहेत. ‘कृष्णा तुला शोधू कोठे’ हा लेख भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राकडे वर्तमान पिढीने कसं डोळ्सपणे पाहायला हवे या बद्दल मार्गदर्शन करताना दिसतो. त्यापुढील पत्रकारीताः लोकहित की व्यवसाय या लेखात ते पत्रकारीता हा फक्त एक व्यवसाय बनून न राहता पुर्वीसारखीच त्याला राष्ट्रभक्तीची आणि राष्ट्रप्रेमाची जोड असावी असा आशावाद लेखकाने व्यक्त करताना बर्या च दुर्लक्षीत गोष्टी प्रकाशात आणण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून केलेला आहे. ‘तहानलेला सावरकर’ हा या पुस्तकातील चवथा लेख सावरकरांवर प्रेम करणार्यां ना नव्याने त्यांच्या प्रेमात पडायला प्रवृत्त करेल अशी खात्री वाटते. या पुढील लेख ‘अखंड भारत का आवश्यक आहे?’ या प्रश्नाच उत्तर जाणण्यास सारेच उत्सुक असतात. वाचकांची ही उत्सुक्ता दूर करण्याचा प्रयत्न लेखकाने या लेखाच्या माध्यमातून केला आहे. अखंड भारत ही संकल्पना प्रत्यक्षात आणण हे स्वप्नवत असतानाही तसा आशावाद दाखविण्याचा लेखकाचा प्रयत्न नक्कीच स्तुती करण्यासारखा आहे. या पुस्तकातील शेवटचा लेख ‘तुंम्हाला गांधी हवेत की सावरकर?’ या प्रश्नाचे उत्तर देणे तसे अवघडच पण जयेश मेस्त्री यांनी ठामपणे सावरकरांची बाजू उचलून धरल्याचे या लेखात स्पष्ट दिसते. त्यांचे सावरकर प्रेम हे वरवरचे नाही तर त्यांनी सावरकरांचा अभ्यास मनापासून केलेला आहे आणि त्या अभ्यासातूनच या लेखाचा जन्म झालेला आहे.

    जयेश मेस्त्री यांचे हे अठ्ठेचाळीस पानाचे छोटेसे पुस्तक वाचकांनी वाचण्यासाठी हाती घेतल्यावर ते संपूर्ण वाचल्याखेरीज ते ते हातावेगळे करणार नाहीत याची मला खात्री वाटते. त्यातील काही वाचक हे पुस्तक आपल्या हृदयालाही कवटाळतील का ते? हे पस्तक वाचल्यावरच वाचकांच्या लक्षात येईल त्यामुळे प्रत्येक मराठी वाचकाने हे पस्तक नक्कीच वाचायला हवे...

    – निलेश बामणे