(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कविता सागर दिवाळी अंकाला पुरस्कार जाहीर

    जयसिंगपूर येथून जाहिरात विरहित व केवळ कवितांसाठी प्रसिद्ध होणा-या ” कविता सागर ” दिवाळी अंकाने उत्कृष्ट दिवाळी अंकाचे पारितोषिक पटकावले असून लवकरच ठाणे येथे होणार्‍या पुरस्कार वितरण सोहळ्यात ” कविता सागर ” चे प्रकाशक डॉ. सुनील पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

      January 16, 2014


  • पोचपावती

    चार दिवसांपूर्वी मी आॅफिसला पोहचल्यावर मोबाईल पाहिला, तर एक ‘मिस्ड काॅल’ येऊन गेला होता. मी तो नंबर लावल्यानंतर मला पलिकडून एका वयस्कर स्त्रीचा आवाज आला, ‘तुम्ही नावडकरच बोलताय ना?’ मी होकार दिल्यावर त्या मावशी पुढे बोलू लागल्या, ‘मी सुधा बोलतेय, मला तुम्ही व्हॅलेंटाईनवर लिहिलेलली कविता फार आवडली. ‘मी त्यांना समजावून सांगितले की, ती कविता नसून कथा होती. त्यावर त्या म्हणाल्या, ‘ती कथा वाचून मला दोन दिवस झाले. आज फोन करु, उद्या करु असा विचार करीत राहून गेले. मी पुण्यातच राहते, माझं वय आहे चौऱ्यांशी. माझ्या मिस्टरांचं वय अठ्याऐंशी. आम्ही दोघेच राहतो. आमची मुलं परदेशात असतात. रिकाम्या वेळात फेसबुक पाहते, खूप छान गोष्टी वाचायला मिळतात. आवडलेल्या पोस्टबद्दल फोन करून लेखकाला अभिप्राय देते.’ मी म्हणालो, ‘धन्यवाद, तुम्ही आवर्जून कथा आवडल्याचे सांगितल्याबद्दल. माझे फेसबुक पेजवर गेल्यास तुम्हाला अजूनही वाचायला भरपूर मिळेल.’

      November 12, 2022


  • सिकंदरचे खंतावलेले मन

    राजा अँलेक्झॉंडर दी ग्रेट हा ग्रीस देशाचा. ज्याला युनान म्हणत. एक परकीय आक्रमक भारतात आला होता. तो महापराक्रमी, लढवय्या, शुरवीर जसा होता, तसाच सहिष्णू, प्रेमळ व अध्यात्मिक प्रवृतीच होता. ह्याचमुळे त्याला भारतातच सिकंदर ( ज्येता व नशीबवान )ही लोकपदवी मिळाली होती. तो त्याच्या घोडेस्वार सैनिकासह होता. रस्त्यात लागणारे प्रदेश पादाक्रांत करीत, लुटालुट करीत, तो पुढे पुढे चालला होता. रस्त्यांत भेटणारे गांवकरी भितीने पळून रानावनांत धावत होते. जे कोणी समोर आले, ते त्याला अभिवादन करुन नतमस्तक होत. ह्याचमुळे अहंकाराच खतपाणी त्याला मिळत होत. त्याची घोडदौड चालू होती.

    अचानक त्याची नजर एका फकीरावर (साधूवर ) पडली. तो एका झाडाखाली दगडावर बसला होता. दोघांची नजरा नजर झाली. फकीराच्या चेहऱ्यावर एक अविचल, शांत, निर्भय, भाव होता. इतके सैन्य बघून देखील त्याच्या चेहऱ्यावर उत्सुकता वा भिती दिसून आली नाही. सिकंदरने आपला घोडा त्याच्या पुढ्यांत नेऊन थांबवला. सारे घोडेस्वार थांबले. सिकंदर घोड्यावरुन उतरला. फकीरासमोर गेला. दोघानी एकमेकाना बघीतले. सिकंदर फकीरास आपला परिचय देऊ लागला.

    " मी अँलेक्झॉंडर अर्थात सिकंदर युनानहून भारतात आलो आहे. "

    फकीर उठून शांतपणे त्याच्याकडे टक लाऊन बघत होता. थोड्या वेळाने फकीराने चौफेर नजर टाकली. सर्व सेनिकांचे अवलोकन केले. तो सिकंदरकडे वळून विचारु लागला.

    " राजा तू येथे कशासाठी आलांस ? "

    सिकंदर छद्मीपणाने हसला. " मी सम्राट आहे. येथील प्रदेश जिंकून घेणार. संपत्ती लूटणार ." फकीराने हलके व शांतपणे विचारले " त्या नंतर पुढे काय करणार ? "

    सिकंदर उत्तरला " पुढे काय ? हे लुटलेले धन युनानला घेऊन जाणार "

    " त्यानंतर काय करणार ? " फकीराने थोडेसे कुत्सीकतेने विचारले.

    " काय करणार त्यानंतर ? कांहीही नाही. शांतपणे जगण्याचा प्रयत्न करीत, उर्वरीत सार आयुष्य व्यतीत करणार " सिकंदर मोठ्या गर्वाने उत्तरला.

    फकीर हसला. तो सिकंदरकडे एक नजर लाऊन बघू लागला. " राजा हे सारे करुन, इतका उपद्वाप करुन, शेवटी शांततेच्याच मार्गाचा विचार करणार आहेस ना ? मला हसू येत ते याच की तू हे सार झाल्यानंतर, जे करु इच्छीतोस, ते तर मी आजच करीत आहे. - - - -

    एका शांततेचा शोध. अनुभव जाणीव ,ज्यात फक्त असेल समाधान, प्रेम आणि नितांत आनंद. "

    राजा गंभीर होऊन सारे ऐकत होता. " राजा तुझ्या बाबतीत एक सत्य परीणाम मला

    दूरदृष्टीने दिसतो. तुझ्या शांततेच्या अंतीम प्रयोगांत, एक जाणीव तुला सदैव बेचैनी करील. तुझ्या मनाची होणारी तगमग, उत्सुकता, आशा-निराशेचे झोके, केलेल्या शक्तीप्रयोगाचा पश्चाताप, दुखावलेल्या आत्म्यांचा अक्रोश, आणि तुझा बनलेला अहंकार. हे सारे भावनिक अविष्कार, तुझ्या मनाला त्या शांततेच्या जवळच येऊ देणार नाहीत. आनंदापासून वंच्छीत करतील "

    राजाचे डोळे पाणावले होते. कसल्याश्या अनामिक आंतरीक शक्तीने त्याच्या सद्सदविवेक बुद्धीवर फुंकार घातल्याची त्याला जाण आली. जवळची कांही फळे फकीरापूढे ठेवीत, त्याने फकीरास अभिवादन केले. खंतावलेल्या मनाने तो पुढे निघून गेला.

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      January 2, 2017


  • मला भावलेला युरोप – भाग २

    खरं म्हणजे युरोप विषयी लिहितांना युरोपियन लोकांचे शिष्टाचार, शिस्त,स्वच्छता, त्यांची रहदारीची पद्धत, त्यांनी आत्मसात केलेले तंत्रज्ञान वगैरे गोष्टींवर प्रकाश टाकला नाही तर ते अन्यायकारकच ठरेल.

      October 20, 2018


  • आजपासून दीपावली

    दीपावली म्हणजे आपल्या आयुष्याला आकार देणारे एक प्रकाशपर्व ! आनंदाचा मंगलमय अमृतकलश घेऊन येणारे जीवनातील अनमोल क्षण !नवी स्वप्ने , नव्या आकांक्षा यांना मिळणारी सुवर्ण झळाळी म्हणजे हा दीपोत्सव ! आपल्या जगण्याला नवीन भान देणारी , आपल्या तनमनात वज्रशक्ती पेरणारी , नवसृजनाला आवाहन करणारी तेजाची आरती म्हणजे हा दिव्यांचा सण !

      October 30, 2024


  • नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्याबरोबर `संवाद’ लाईव्ह

    नागपूरकडल्या परिसरातील एका सुखवस्तू कुटुंबात जन्मलेल्या प्रेमानंद गज्वी यांना एकांकिका आणि नाट्यलेखनाने आकृष्ट केले. पुढे १९८०-१९८५च्या सुमारास ते मुंबईला आले आणि त्यांची प्रतिभा अधिकच पल्लवीत झाली. ‘देवनवरी'(१९८१), ‘तनमाजोरी'(१९८४), ‘वांझ माती'(१९८४), ‘जय जय रघुवीर समर्थ'(१९८८), गांधी-आंबेडकर(१९८८), ‘किरवंत'(१९९१), ‘पांढरा बुधवार'(१९९५) अशी एकाहून एक सरस नाटके त्यांनी लिहिली *आणि विद्यमान मराठी नाटककारांच्या मांदियाळीत त्यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले.

      September 5, 2020


  • पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग २

    कुर्ला टर्मिनसला लिफ्टची कुठे सोय आहे का बघतच होतो की, आमच्यासमोर बॅटरी ऑपरेटेड ट्रॉली येऊन थांबली. आईला बघूनच तो आला असणार. आम्ही सामान आणि आईला घेऊन त्यात बसलो आणि त्यानेही इतके अलगद आम्हाला आमच्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या ट्रेनच्या डब्यापर्यंत आणून सोडले आणि सामानही आत चढवून सीट खाली लावून दिलं.

      April 24, 2022


  • सुखी माणूस (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३७)

    पुणे जंक्शनहून पुणे-कोल्हापूर पॅसेंजर गाडी नुकतीच सुटली होती.
    सेकंड क्लासमधे पाच प्रवासी अजून डुलक्या देत होते.
    नुकतेच त्यांचे भोजन झाले होते, त्यामुळे ते आता झोंप काढण्याच्या प्रयत्नात होते.
    सर्व कसं शांत होतं.
    अचानक दरवाजा उघडला गेला आणि एक ताडासारखा सरळ, उंच आणि नीटनेटका पोशाख केलेला, अंगात जाकीट घातल्यामुळे पत्रकार वाटणारा माणूस आंत शिरला.
    धाप लागल्यामुळे डब्यात मधेच तो थोडा वेळ नुसता उभाच होता.
    त्याचे डोळे बसायला जागा शोधत होते.
    मग तो उद्गारला, “परत चुकीचाच डबा मिळालेला दिसतोय. कमाल आहे !
    एखादा वैतागेल अशाने.”
    त्याला पाहून प्रवाश्यांमधला एकजण आनंदाने ओरडला, “श्याम आठवले, तू इकडे कसा ? श्यामच ना तू ?”
    नव्या प्रवाशाने प्रथम भकास नजरेने त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं मग तोही आनंदाने ओरडला, “राम हेगडे, अरे किती वर्षांनी भेटतो आहेस !
    कुठे होतास ? मला माहित नव्हतं तूही ह्या गाडीतच आहेस.”
    रामने विचारलं. “कसं चाललंय तुझं, श्याम ?”
    “अरे यार, मी ठीक आहे रे !
    फक्त माझा डबा चुकलाय आणि कांही केल्या तो मला सांपडत नाही.
    काय मूर्ख आहे मी ! मला कोणीतरी बडवला पाहिजे !”
    गाडीबरोबर एक हेलकावा घेऊन श्याम पुढे म्हणाला, “विचित्र गोष्टी होत असतात.
    मी गाडीतून उतरून जरा पुढे जाऊन एक छोटा पेग घेत होतो आणि दुसरी घंटा वाजली.
    एकाने कसं बरं वाटणार ?
    मग आणखी एक पेग मी घाईघाईत घेत असतांनाच तिसरी बेल झाली.”
    “मी कसाबसा तो संपवून गाडीकडे धांव घेतली आणि वेड्यासारखा समोर येईल त्या डब्यात उडी मारून चढलो.
    मूर्खपणाच झाला तो !”
    राम म्हणाला, “पण तू तर मजेत दिसतोयस ? इथे भरपूर जागा आहे. ये बस इथे !”
    “नाही रे बाबा ! मला माझा डबा शोधला पाहिजे. अच्छा !” श्यामने स्पष्टीकरण केले.
    राम म्हणाला, “ऐक माझं ! असा डबा शोधतांना जरा चूक झाली तर दोन डब्यांच्या मधे पडशील !
    आता इथे बस. स्टेशन आलं की शोध तुझा डब्बा.”
    श्यामने एक मोठ्ठा सुस्कारा सोडला आणि कांटेरी पाटावर बसल्यासारखा चुळबुळ करत तो रामच्या समोरच्या मोकळ्या जागेवर बसला.
    राम हेगडेने विचारले, “तू कुठे निघाला आहेस ?”
    श्याम आठवले म्हणाला, “मी अवकाशाच्या प्रवासाला निघालोय. माझ्या डोक्यात गोंधळ आहे की मी कुठे चाललोय तें मीच सांगू शकत नाही.
    जिथे नशीब नेईल तिथे जायचं.
    तू कधी सुखी मूर्ख पाहिला आहेस ? नाही ?
    मग सर्वात सुखी माणूस पहा.
    माझा चेहरा पाहून काय वाटतं तुला ?
    राम हेगडे त्याच्याकडे पहात म्हणाला, “विशेष कांही नाही दिसत वेगळं ! आहेस नेहमीसारखाच.”
    श्याम आठवले म्हणाला, “मी खरंच सांगतो तुला.
    मी आरशात पाहिलेलं नाही पण आतां मी अगदी येडपट दिसत असेन ना !
    मी वेडाच होतोय बहुदा.
    तुला माहित आहे, राम, अरे मी लग्न केलंय. काय समजलास !”
    राम हेगडे आश्चर्याने ओरडला, “म्हणजे तू शेवटी लग्न केलसं !”
    श्याम म्हणाला, “केलं म्हणजे काय ? आजच केलं.
    लग्न केलं, देवळातून बाहेर आलो आणि थेट गाडी पकडली.”
    रामने श्यामचे अभिनंदन वगैरे केले.
    मग तो म्हणाला, “तू तर छुपा रूस्तुम निघालास !
    म्हणून तू असा सजलायस आणि ताजातवाना वाटतोयस !”
    श्याम म्हणाला, “ हो रे मित्रा ! स्वप्न पुरं करायला, मी अगदी अत्तराचा फवारा सुध्दा अंगावर आणि कपड्यांवर मारलाय.
    ह्या क्षणी मी माझ्यावरच खूष आहे.
    स्वर्गसुख, स्वर्गसुख म्हणतात, ते हेच असावं !
    माझ्या आयुष्यात मी कधी एवढा आनंदी नव्हतो.”
    श्यामने डोळे मिटून मान हलवली.
    “मी अत्यानंदात आहे. विचार कर, दोन मिनिटांत मी माझ्या डब्ब्यात पोहोचेन.
    तिथे खिडकीशी मला आपलं सर्वस्व देऊ केलेली, सुंदर गोल चेहरा अन् सुंदर नाक डोळे असलेली माझी देवता, माझी प्रिया, माझी बायको बसलेली असेल.
    एखादी परीच आहे असं वाटणारी सुंदरी, माझी लाडकी.. !
    पण हे सर्व तुला सांगून काय उपयोग. तू व्यवहारी, अरसिक, अविवाहीत.
    प्रेम वगैरे झूठ वाटणारा तू ! तुला नाही समजणार.
    तू जर कधी विवाह केलास तर माझी आठवण येईल तुला.
    मी आता एक दोन मिनिटांत तिच्या बाजूला बसलो असेन आणि तिची हनुवटी हातात धरून तिचं सौंदर्यपान करेन.”
    पुन्हा श्याम आठवलेने डोळे मिटले अन् मान हलवली.
    तो परत बोलू लागला, “मी माझी मान तिच्या खांद्यावर ठेवून झोपेन.
    ह्या अशा आनंदाच्या क्षणी सगळं जग कवेंत घ्यावसं वाटतं.
    राम, मित्रा, ये, तुला कडकडून भेटू दे.”
    राम म्हणाला, “ये, तुझा आनंद साजरा करू.”
    दोघे कडकडून मिठी मारतात.
    आजूबाजूला बसलेले प्रवासी मोठ्या आवाजांत चाललेला हा संवाद ऐकत असतात.
    दोघे कडकडून भेटतांच सर्व एकत्र हंसतात.
    श्याम पुढे बोलू लागतो, “मग चित्र पूर्ण करण्यासाठी पॅंट्रीमधे जाऊन कांही खानपान करणार. मजा करणार.”
    आता श्यामचे बोलणं ऐकायला पांच श्रोते होते.
    त्याच्या बोलण्याला, त्याच्या हावभावांना ते सर्वच दाद देत होते.
    त्यांची झोप आता उडाली होती.
    तो बडबडतच होता.
    तो हंसला की सर्व हंसत होते.
    तो म्हणाला, “सद्गृहस्थहो, कधी दारू प्यावीशी वाटली तर प्या.
    ती पिणं चांगली की वाईट ह्याचं तत्त्वज्ञान बनवण्याची गरज नाही.
    ते तत्त्वज्ञान आणि ते मानसशास्त्र अगदी गुंडाळून ठेवा."
    तेवढ्यात एक तिकीट चेकर तिथून जात होता, त्याला उद्देशून तो म्हणाला, “साहेब, तुम्ही जेव्हां डब्बा नंबर २०९ मधे जाल तेव्हां तिथे एक हिरव्या रंगाची पांचवारी साडी नेसलेली स्त्री दिसेल, तिला सांगा की मी इथे आहे."
    चेकर म्हणाला, "जरूर सांगेन पण डब्बा नंबर २०९ ह्या गाडीला जोडलेल्या डब्ब्यांत नाही. २१९ नंबरचा डब्बा मात्र आहे."
    श्याम म्हणाला, “ ठीक आहे. मग २१९ असेल. तिला सांगा की तिचा नवरा इथे आहे आणि ठीक आहे.”
    मग तो डोक्याला हात लावत म्हणाला, “काय मजा आहे. नवरा, बायको, एक छोटा विधी झाला आणि कांही मिनिटांत आम्ही पती-पत्नी झालो. माझं ठीक आहे हो !
    पण तिचा विचार करा. काल ती मुलगी होती, लहान होती आणि आज लागलीच पत्नी झाली. कमाल आहे !”
    एक प्रवासी मधेच म्हणाला, “आज काल कोणी सुखी असणं फार कठीण झालं आहे.
    पांढरा हत्ती पहायला मिळणं जसं कठीण आहे, तसंच ते कठीण आहे.”
    “बरोबर आहे पण ह्यात दोष कुणाचा आहे ?” श्यामने बसल्या जागीच पाय लांब करत विचारलं.
    तो पुढे म्हणाला, “तुम्ही जर सुखी नसाल तर तो तुमचा दोष आहे.
    तुम्हाला नाही वाटत असं ?
    माणूस स्वतःच सुख स्वतःच निर्माण करतो.
    तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर तुम्ही सुखी होऊ शकता.
    नाही तर तुम्हीच सुखाकडे पाठ फिरवतां.”
    “पण पुढे काय होणार, ते तुम्हाला कसं कळतं ?” कोणीतरी विचारलं.
    श्याम म्हणाला, “ अगदी सोप्पं आहे.
    निसर्गाने माणसाच्या आयुष्यात वेगवेगळे भाग ठेवलेत.
    त्या त्या वेळी माणसाने आपल्या त्या स्थितीवर प्रेम करावे.
    मात्र तसं न करतां तुम्ही जर दुसऱ्याच अपेक्षा ठेवल्यात तर तुम्हाला दुःखच मिळणार.
    तरूण झालात की विवाह करावा, ही निसर्गाचीच आज्ञा आहे.
    त्या वयांत विवाहाविना आनंद नाही.
    योग्य वेळ येताच विवाह करावा.
    चालढकल करू नये पण तुम्ही लग्न करत नाही.
    दुसऱ्याच कशाची तरी वाट पहाता.
    तसं केल्याने दुःखी होता.
    विवाह करावा, मद्य प्यावसं वाटलं तर मद्य प्यावं.
    आनंद साजरा करावा.
    ‘महाजनो येन गता: स पन्थ:’ हे मला अगदी योग्य वाटतं.
    सर्व जण जातात, तोच म्हणजे मध्यम मार्ग म्हणजेच राजमार्ग.
    म्हणूनच मी सुखी आहे.”
    “तुम्ही म्हणतां की माणूस स्वतःचा आनंद निर्माण करतो पण मला सांगा की दांत दुखत असला किंवा एखादीला वाईट सासू छळत असली तर त्या व्यक्तींना आनंद कसा होणार ? सांगा !
    सर्व कांही दैवावर अवलंबून असतं.
    योगायोग असतो.
    समजा, आता आपल्या गाडीला अपघात झाला तर तुम्ही ताबडतोब सूर बदलाल.” एक प्रवासी म्हणाला.
    “एकदम चुकीचे उदाहरण.
    गाडीला अपघात वर्षा-दोन वर्षात एखादा होतो. मला अपघात होईल अशी भिती मुळीच वाटत नाही.
    मला अपघात या विषयावर मुळीच बोलायचं नाही.
    आपली गाडीची गती मंद झाली.
    बहुदा एखादं स्टेशन जवळ आलं असावं !“
    रामने विचारलं, “तू आता पुढे कुठे जाणार आहेस ? कोल्हापूरला की बेळगावला ?”
    श्याम म्हणाला, “कोल्हापूरलाही नाही आणि बेळगांवलाही नाही.
    मी सांगलीहून आलो आणि धुळ्याला चाललोय.
    कोल्हापूर, बेळगांव उलट्या दिशेला आहेत. मी उत्तरेला चाललोय.”
    राम म्हणाला, “अरे पण ही गाडी मिरजेहून कोल्हापूर किंवा बेळगांवकडे जाणारी आहे.”
    “अरे मी चाललोय नाशिकमार्गे धुळ्याला.
    परत उलट कशाला जाऊ ?” श्यामने ठामपणे सांगितले.
    “मी तर बेळगांवला चाललोय. आता सातारा येत असेल.” राम म्हणाला.
    “म्हणजे ही दिल्लीकडे जाणारी गाडी नाही ?”
    “श्याम, तू पुण्याला बहुदा चुकीच्या गाडीत चढलास.
    तू परत सांगलीकडे जाऊ शकशील पण धुळ्याला नाही.” राम म्हणाला.
    बाकीच्या प्रवाशांनीही त्याला दुजोरा दिला.
    “अरे बापरे ! मी ही किती मूर्ख आहे.
    मग तो चक्क रडू लागला.
    अरे माझी नवखी पत्नी त्या पॅसेंजर गाडींतून गेली आहे.
    बिचारी एकटीच काळजी करत बसली असेल.
    आता काय करू ?”
    तो तोंडावर हात घेऊन रडत म्हणाला, “मी एक दुःखी, दुर्दैवी माणूस आहे. आता काय करू ?”
    “अरेरे ! कठीण आहे खरं !
    पण तुम्ही साताऱ्याहून तिला तार पाठवा आणि थोड्या वेळाने मागून येणाऱ्या कलकत्ता एक्सप्रेसने धुळ्याला जा.
    तुम्ही कदाचित थोडे आधीच पोहोचाल आणि तिला धुळे स्टेशनवरच गांठू शकाल.”
    “कलकत्ता एक्सप्रेस ! आणि मी त्या कलकत्ता एक्स्प्रेसचे तिकीट कसे काढू ? माझ्याकडे पैसेच नाहीत.
    माझे पैसे पत्नीकडेच आहेत.”
    सर्व प्रवासी हंसतात.
    आपापसात कांही बोलतात आणि हंसत हंसतच थोड्या वेळापूर्वी स्वतःला सुखी म्हणवणाऱ्या त्या दुःखी माणसाच्या तिकीटासाठी पैसे जमवू लागतात.
    - अरविंद खानोलकर.
    मूळ कथा - हॅपी मॅन
    मूळ लेखक - ॲंटन चेकॉव्ह
    तळटीप - ही गोष्ट वाचून सुप्रसिध्द मराठी लेखक चिं. वि. जोशी ह्यांच्या वायफळाचा मळा मधल्या एका गोष्टीची आठवण झाली.
    चिं. वि.जोशींची गोष्ट सरस आहे.
    तिचा उल्लेख मी माझ्या आठवणींची मिसळमधे केला आहे.
    तोच भाग पुन्हा सादर करतो.
    “चिं. वि. जोशींच्या "वायफळाचा मळा" या पुस्तकांत एक लेख आहे.
    "स्मरणशक्तीचे प्रोफेसर".
    लेखकाला गाडीत एक प्रोफेसर भेटतात. प्रोफेसर साहेब लेखकाला स्मरणशक्ती कशी वाढवावी, लहान सहान गोष्टी कशा लक्षात ठेवाव्यात ह्याबद्दल उदाहरणासहीत लेक्चर देतात.
    त्यांचे एक उदाहरण पहा.
    ते म्हणतात, "मला अहमदनगर जायचे आहे.
    अहमदनगर हे नांव लक्षांत ठेवण्यासाठी मी एक कारिका रचली आहे.
    ती अशी "दिवस गर्व विष नसे ज्या पुरी" (अह + मद + न गर).
    पद्यमय कारिका पटकन् लक्षात रहाते आणि गांवाचे नांव लक्षात ठेवणे सोपे जाते."
    लेखक त्यांना विचारतो, "आपण अहमदनगरला कोणत्या कामासाठी निघाला आहेत ?"
    तर प्रोफेसर म्हणाले, "अहो, अहमदनगरला माझ्या बहिणीला स्थळासाठी दाखवण्याचा कार्यक्रम आहे."
    लेखकांने विचारले,"पण बहिण कुठे दिसली नाही तुमच्या बरोबर."
    प्रोफेसर त्या प्रश्नाने गडबडले आणि म्हणाले, "अरेच्चा, म्हणजे ती मनमाड स्टेशनवर गाडी बदलताना तिथेच राहिली वाटते !"

    -- अरविंद खानोलकर.

    मूळ लेखक- ॲंटोन चेकॉव्ह.

      August 1, 2022


  • चंदर – बाल कुमार कादंबरी – भाग १२

    विद्यापीठाचा सारा परिसर माणसांनी नुसता फुलून आलेला दिसत होता . सारे वातावरण कसे भारल्यागत वाटत होते . कोंडाळे जमवून कोपऱ्या -कोपऱ्यात बोलत उभे असलेले लोक आणि जमलेले लोक कार्यक्रम केंव्हा सुरु होतोय याचीच वाट पहात होते .

      March 16, 2019


  • छोटीसी बात…… नाही ला नाही.

    लहान मुलांमधे उपजतच कुतूहल आणि जिज्ञासा असते. जसजशी मुले मोठी होऊ लागतात तसतशी त्यांची जिज्ञासाही वाढते.आणि त्यातूनच नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी ही मुले प्रेरित होत असतात.

    मुलांच्या जिज्ञासेला,कुतुहलाला खतपाणी घालणं हे तर पालकांचं प्रथम काम आहे. किंबहुना मुलांची जिज्ञासा चेतवणं हे सुजाण पालकत्वाचं व आदर्श शिक्षकाचं पहिलं लक्षण आहे. अनेक पालकांना मुलांच्या जिज्ञासेचा मनोमन धसकाच असतो. प्रश्न विचारणार्‍या, काहीतरी प्रयोग करु पाहणार्‍या मुलांपेक्षा एका जागी गप्प बसणारं मूल अधिक समजदार असतं, असं ही काही पालकांना वाटतं. पण हे काही योग्य नाही. मुलाची जिज्ञासा खच्ची व्हावी यासाठी पालक किंवा शिक्षक प्रयत्नशील असतात,असं नव्हे. तर एका दोन अक्षरी शब्दामुळे हा सगळा घोटाळा होतो. आपण बोलताना जर तो दोन अक्षरी शब्द जाणीवपूर्वक टाळला तर सगळे प्रश्न सोपे होतील. तो महान दोन अक्षरी शब्द आहे ‘नको किंवा नाही.’ किंबहुना या शब्दामुळेच अनेक लहान मोठे अपघात होण्याचा पण संभव असतो. अशावेळी पालकांच्या ‘अशा बोलण्यामुळेच’ नंतर मुलांना पालकांची बोलणी खावी लागतात.

      June 7, 2010