(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.

Sort By:

  • p-3130-dahi bhaat

    दही भात

    साहित्य : ४ वाटया शिजलेला भात, १ वाटी गोड दही, अर्धी वाटी दूध, चवीनुसार मीठ (साधारणत: दीड ते दोन चमचे), ३ तळलेल्या सांडग्या मिरच्या.

    कृती : प्रथम शिजलेला भात एका पसरट पातेलीत किंवा ताटात पसरुन पूर्ण गार होऊ द्यावा, किंवा शक्यतो सकाळी दही भात करायचा असेल तर रात्रीच शिजवून तयार केलेला असला तर फारच बरे. गार भात पातेलीत घाला त्यात दही, दध घालून नीट कालवा. नंतर त्यात सांडग्या मिरच्या हाताने कुस्करून घाला. भाताची चव घेऊन पहा. आवश्यकता असेल तरच त्यात मीठ घाला. सांडग्या मिरचीत मीठ असते, म्हणून मीठ घालण्याआधी नेहमी चव घेऊन पहा. हा भात केळीच्या पानावर फार चांगला लागतो.

    टीप : हा भात कालवल्यानंतर फार वेळ ठेवल्यास तो फुगतो व घट्ट होता. अशावेळी त्यात पुन्हा थोडेसे दूध घालून भात कालवून खावा

  • आम्ही कोक्स (म्हणजे कोकणस्थ)

    देवाच्या कृपेने आत्तापर्यंत वेगवेगळी कुझिन्स खायचा योग आला आहे. तरीही आपल्या घरच्या पारंपरिक जेवणाची आवड प्रत्येकाला असतेच. तशी ती मलाही आहे.

  • Khava-Poli-300

    खव्याची पोळी

    थोडे तूप घालून खवा तांबूस भाजून घ्यावा. खवा गार झाल्यावर त्यात पिठीसाखर, वेलची पूड, खसखस पूड घालून मळून गोळा बनवावा. हे सारण भरून पोळ्या लाटाव्यात. सोपी पद्धत म्हणजे पेढे आणून ते कुस्करून मळून त्याचा गोळा बनवून ते भरुन भरून पोळ्या कराव्यात.

  • कसे ओळखावे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे

    कसे ओळखावे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे

    आंब्याचा सीझन जोरात चालू झाला आहे. उन्हाळ्यातील सर्वांचाच आवडता पदार्थ म्हणजे आंबा आहे. जवळपस सर्वच लोकांना आंबे आवडतात. या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात आंब्यांची विक्री होते परंतु त्याच्या रंगावर किंवा सुगंधावर भुलून आंबे विकत घेऊ नका. कारण हे आंबे शेतातून थेट आपल्याला उपलब्ध न होता त्याची साठवणूक केली जाते. यादरम्यान अधिक नफा मिळवण्यासाठी आंबे विक्रेते कॅलशियम कार्बाईड पावडरच्या सहाय्याने कृत्रिमरित्या पिकवत असल्याच्या अनेक घटना उघड झाल्या आहेत. काही ऑरगॅनिक शॉप्समध्ये तसेच नैसर्गिकरित्या आंबे पिकवणार्या आंबे विक्रेत्यांकडे उत्तम दर्जाचे व सुरक्षित आंबे उपलब्ध असतात. मात्र तरीही कृत्रिमरित्या आंबे पिकवले जात असल्याने काही गोष्टींवरुन आपण हे सहज ओळखू शकतो. आंब्याची चव ही आंबे कृत्रिमरित्या पिकवले गेल्याची प्रमुख चाचणी आहे. नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे हे कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यांपेक्षा चवीला चांगले आणि रसदार असतात. झाडावरून काढलेला कच्चा आंबा नैसर्गिकरित्या पिकविण्यासाठी जरा जास्त कालवधीत लागतो. मात्र, बाजारात आंबा लवकरात लवकर आणवा या चढाओढीपायी आंबा लवकर पिकविण्यासाठी काहीजण कॅल्शियम कार्बाईडचा वापर केला जातो. मात्र, हे घातक असून, त्यावंर बंदी घालण्यात आलेली आहे.

    फळ पिकविण्यासाठी सुरक्षित व कायदेशीर पद्धतीत नैर्सगिकरित्या किंवा इथिलिन गॅसने आंबा पिकवावा, असे अन्न व औषध प्रशासनाचे (अन्न) (एफडीए) अधिकारी सांगतात.

    रंग.
    कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यांवर हिरवे डाग असतात. आंब्यांवरचे हिरवे डाग हे केशरी किंवा पिवळ्या रंगात एकरुप होत नसल्याने ते वेगळे स्पष्ट दिसून येतात. याचप्रमाणे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे हे नैसर्गिक आंब्यांपेक्षा अधिक पिवळट रंगाचे दिसतात.
    चव. जेव्हा आपण कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे खातो, त्यावेळी तोंडामध्ये जळजळ होण्याची शक्यता असते. तसेच कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे खाल्ल्याने डायरिया (अतिसार), पोटदुखी तसेच घशात खाज अशा काही समस्या आढळून येतात.
    आंब्याचा गर.

    नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे हे केशरी रंगाचे असतात. कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यांचा रस हा हलका पिवळ्या रंगाचा असतो म्हणजेच तो पूर्ण पिकलेला नाही हे स्पष्ट होते. कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे हे बाहेरून पिकलेले दिसत असले तरीही ते आतून कच्चे असतात.
    आंब्याचा रस.

    नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा हा कापल्यानंतर त्यातील रस गळायला सुरवात होते तसेच चवीलाही अत्यंत गोड असतो. मात्र कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यामध्ये फारच कमी रस असतो. कारण एथेल घटक आंब्यांना नैसर्गिकरित्या पिकवतो व आंब्यामध्ये अधिकाधिक रस निर्माण होतो. आंबे पिकवण्यासाठी काही घातक केमिकल्स व कीटकनाशकं वापरली जातात. त्याचा शरीरावर मोठ्या प्रमाणात वाईट परिणाम होतो. असे आंबे खाल्ल्याने शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडून मधूमेह, हायपोथायरॉईड अशा समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे खाल्ल्याने पार्कीसन्स, कर्करोग असे आजार जडण्याची शक्यता अधिक वाढते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • beetroot-koshimbir

    बीटाची कोशिंबीर

    सर्वप्रथम बीट उकडवून, सोलून व किसून घेणे. त्यात हिरवी मिरची बारिक करुन घालणे. साखर, मीठ, दही व थोडी कोथिंबीर घालून ढवळून घेणे.

  • कसे ओळखावे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे

    भारतीय खाद्यसंस्कृती – भाग १० – मोगल आक्रमणानंतरचे बदल

    मोगल आक्रमणानंतर भारतीय खाद्यसंस्कृतीत आणखी बदल झाले. तांदूळ आणि मांसाचे तुकडे यांच्या मिश्रणातून बनणारे विविध पुलाव, कबाब, सामोसे, फळे वापरून केलेले गोड पदार्थ आणि फालुदा, सरबते या सारख्या पदार्थांनी अव्वल स्थान मिळवलं.

  • कसे ओळखावे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे

    कॉर्न ऑन टोस्ट

    साहित्य:- टोस्टसाठी दहा ब्रेड स्लाईस, थोडं बटर .

    कॉर्न स्ट्यूसाठी :- तीन गावरान मक्याची कणसं, दोन-तीन हिरव्या मिरच्या, एक मोठा कांदा, दोन कप दुध, एक मोठा चमचा मिरपूड, अर्धा चमचा लोणी, चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ .

    कृती :- कणसं सोलून किसणीवर किसून घ्यावीत . मिरच्या एकदम बारीक चिराव्या. कणसाच्या किसात दुध मिसळून कुकरमध्ये दोन शिट्टया कराव्यात. नॉनस्टीकच्या भांडयात लोणी तापवावं आणि त्यात चिरलेल्या मिरच्या घालाव्या. बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी रंग येईपर्यंत परतावा. मग शिजलेलं दुध आणि कॉर्न घालून मीठ आणि मिरपूड घालावी. खाली उतरवल्यावर कोथिंबीर मिसळावी. वाढायच्या वेळी कॉर्न स्ट्यू परत गरम करावं. ब्रेडचे स्लाईस टोस्टरमधून भाजावेत. त्रिकोणी दोन तुकडे कापावेत. त्याला बटर लावून त्यावर गरम कॉर्न स्ट्यू पसरावं. टोमॅटो सॉसबरोबर खायला दयावं.

  • Bhelpuri-300

    भेळपुरी

    साहित्य : ३ वाट्या चुरमुरे , १०० ग्राम बारीक १ नंबर शेव, लिंबू किंवा कैरी, ३ मोठे कांदे , २ मोठे बटाटे, २ टोमाटो, थोड्या कडक पुऱ्या, तिखट चटणी , गोड चटणी, मीठ चवीनुसार, बारीक चिरलेली कोथिंबीर.

    गोड चटणी साहित्य :
    ११ ग्राम खजूर, थोडी चिंच, गुळ व मीठ चवीनुसार

    कृती :

    खजुरातील बी काढून टाकावी ,नंतर गुळ बारीक चिरावा, व चिंचेचा कोळकाढून घ्यावा, खजूर मिक्सर मधे वाटून घ्यावे, त्यात गुळ, चिंचेला कोळ व मीठ टाकून चटणी पातळ करून घ्यावी.

    तिखट चटणी:
    ५-६ हिरव्या मिरच्या, थोडा पुदिना, थोडी कोथिंबीर, मीठ चवीनुसार

    कृती :
    मिरच्या ,पुदिना , कोथिंबीरहे सर्व एकत्र करून त्यात मीठ घालून मिक्सर मधे वाटावे.नंतर त्यात आणखी पाणी घालून पातळ चटणी करावी.

    भेळ कृती:
    एका भांड्यात चुरमुरे, बारीक चिरलेला बटाटा, कांदा, टोमाटो, कैरीचे बारीक तुकडे, मीठ , कुस्करलेल्या कडक पुऱ्या एकत्र घ्याव्यात, त्यात तिखट व गोड चटणी टाकावी, मग सगळे एकत्र करावे, मग त्यावर बारीक शेव व कोथिंबीर टाकावी. भेळ तयार !

  • वालाचे बिरडे

    सीकेपी कुटुंबांमध्ये अगदी नियमितपणे.. कोणत्याही खास प्रसंगी केला जाणारा प्रकार म्हणजे वालाचं बिरडं…

  • वडापावाचा इतिहास….

    आपण सकाळ-संध्याकाळी पोटाची भूक भागवण्यासाठी 'वडापाव' खातो, अगदी स्वस्तात मिळणारे हे अन्न आणि चालता पळता ते खाऊ शकतो, यामुळे वडापाव खुप प्रसिद्ध आहे. पण या वडापावचा शोध कोणी लावला ? याचा कधी विचार केला आहे का ?

    वडापावचा ज्यांनी शोध लावला त्या कमलाबाई ओगले यांची ओळख करून देत आहोत..

    1965-70 चा काळ होता, कमलाबाई मुंबईतील दादर येथे राहत होत्या. उन्हाळ्याचे दिवस होते, पाव्हणे घरी आले म्हणून त्यांनी स्वयंपाक केला होता. बटाट्याची सुकी भाजी, भजे,पुरणपोळी वगैरे.. स्वयंपाक करताना त्यांनी बटाट्याची सुकी भाजी भज्याच्या पिठात टाकून तेलात सोडली, तर एक वेगळाच पदार्थ तयार झाला. त्यांनी तो पदार्थ खाऊन बघितला तर अगदी खमंग लागला. त्यांनी त्याला 'वडा' हे नाव दिले. नविन पदार्थ असल्यामुळे त्यांनी तो लोकांना खाण्यासाठी उपलब्ध करून द्यायच्या हेतूने घरापुढेच विकण्यास मांडला, जेव्हा लोक येऊन खाऊ लागले तर लोकांनाही खुप आवडला, पुढे पुढे मारवाडी हाॅटेलवाल्यांनी त्यांची ही कल्पना चोरली आणि त्यांच्या नावाने मुंबईत वडे विकू लागले. त्या सोबत सुरवातीला चपाती देत असत, धावपळीच्या मुंबई मधे चपाती सोबत कशी न्यावी म्हणून चहासोबतच्या पावासोबत वडा विकला जाऊ लागला. त्यांची कलाकृती चोरली हे पाहील्यानंतर त्यांनी 'रूचिरा' हा पाककृतीचा छोटेखानी पुस्तीका लिहली, आजही पाककृती मधे 'कमलाबाई ओगले' यांच्या 'रूचिरा' चा विक्रम कोणी मोडू शकले नाही.

    अशा या आज्जीचा वयाच्या 86 व्या वर्षी 1999 साली पुण्यात निधन झाले. आज या आज्जीबद्दल कोणाला माहीत नाही म्हणून तुम्हास ओळख करून देत आहे..