महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
सतलज नदीच्या पाण्यावर पोसलेली, पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील कसूर येथील मेथी उत्तम स्वादाची समजली जाते. या स्थानावरूनच तिला ‘कसुरी मेथी’ हे नाव मिळालं. भारतातील पंजाब राज्यातही तिचं उत्पादन होतं. तिची वाळवलेली पानं ‘कसुरी मेथी’ म्हणून विकली जातात. ही पानं कित्येक पंजाबी आणि उत्तर हिंदुस्तानी पदार्थांमध्ये स्वादासाठी वापरली जातात.
साहित्य :- कोकम फळे एक किलो, साखर दोन किलो.
कृती :- फळे पिकलेली असावीत. या फळांचे चिरून समान दोन भाग करा. ते वाटीसारख्या आकाराचे होतील. त्यातील बिया काढाव्यात. या कोकम वाट्यात साखर भरा. एक काचेची बसरणी घ्या. त्यात या साखर भरलेल्या कोकम वाट्या साखर सांडणार नाही अशा भरुन घ्या. साखर उरली असल्यास वरून सगळीकडे पसरून घालावी. बरणीला आतून साखर लावलेली असावी. अशा प्रकारे बरणी दोन तीन दिवस ठेवली की फळांचा रस सुटू लागतो. मात्र बरनी उन्हात तापत ठेवू नये.
जेव्हा कोकम सरबत करायचे असेल तेव्हा बरणीतील पाहिजे तेवढा रस काढून घ्या. जरुरी इतके पाणी घाला. चवीसाठी थोडे मीठ घाला. ढवळा, गाळून घ्या. प्यायला द्या.
साहित्य: मध्यम आकाराचे १ बीट, चमचाभर तीळ, तीन चार हिरव्या मिरच्या (भरड वाटून), बारीक चिरून कोथिंबीर, अर्धीपळी कच्चे तेल, थोडे पाणी, चिमुटभर साखर, चवीप्रमाणे मिठ, हळद, हिंग.
कृती: बीट बारीक किसणीने किसून घ्या. त्यात तीळ-हळद-हिंग-मिठ-साखर-कच्चेतेल-मिरची-कोथिंबीर घालून कालवून घ्या. थोडे पाणी घाला. साधारण पाव वाटी पुरते. आता त्यात मावेल तेवढी कणिक भिजवुन थोडावेळ झाकुन ठेवा. पातळ पराठे लाटा. मध्यम आचेवर भाजून वरून साजूक तूप लाऊन खा.
जवस चटणी
समाविष्ट साहित्य:- जवस, जिरे, जांभूळ पावडर, मिरची पावडर, मसाले, मीठ.
वैधता:- २ महीने टिकते.
फायदे:-
१) गुडघेदुखी, सांधेदुखी, संधिवात व कोणतेही हाडांचे आजार यांसाठी उपयुक्त.
२) मधुमेही व्यक्तींसाठी तसेच सगळ्यांसाठी उत्तम.
३) लोह व कँल्शियमने भरपूर.
४) भात, पोळी, भाकरी, ब्रेड सोबतही खाऊ शकतो.
५) आमटी, भाजी व कोशिंबीरचा उत्तम स्वाद, पौष्टिकता व शक्ती वाढवते.
कढीपत्ता चटणी
समाविष्ट साहित्य:- कढीपत्ता, डाळ्या, जिरे, मिरची पावडर, जांभूळ पावडर, मसाले व मीठ.
वैधता:- २ महीने टिकते.
फायदे:-
१) गुडघेदुखी, सांधेदुखी, संधिवात व कोणतेही हाडांचे आजार यांसाठी उपयुक्त.
२) मधुमेही व्यक्तींसाठी तसेच सगळ्यांसाठी उत्तम.
३) लोह व कँल्शियमने भरपूर.
४) भात, पोळी, भाकरी, ब्रेड सोबतही खाऊ शकतो.
५) आमटी, भाजी व कोशिंबीरचा उत्तम स्वाद, पौष्टिकता व शक्ती वाढवते.
मिक्स चटणी
समाविष्ट साहित्य:- कढीपत्ता, जवस, तीळ, डाळ्या, शेंगदाणे, खोबरे, जिरे, जांभूळ पावडर, मसाले, मिरची पावडर, मीठ.
वैधता:- २ महीने टिकते.
फायदे:-
१) गुडघेदुखी, सांधेदुखी, संधिवात व कोणतेही हाडांचे आजार यांसाठी उपयुक्त.
२) मधुमेही व्यक्तींसाठी तसेच सगळ्यांसाठी उत्तम.
३) लोह व कँल्शियमने भरपूर.
४) भात, पोळी, भाकरी, ब्रेड सोबतही खाऊ शकतो.
५) आमटी, भाजी व कोशिंबीरचा उत्तम स्वाद, पौष्टिकता व शक्ती वाढवते.
शेंगदाणे चटणी:-(उपवास)
समाविष्ट साहित्य:- शेंगदाणे, जिरे, मिरची पावडर, मीठ.
वैधता:- २ महीने टिकते.
फायदे:-
१) भरपूर कँल्शियम, व्हिटामिन, प्रोटीनयुक्त.
२) पोटाच्या कँसरचा धोका कमी करते.
३) ह्रुदयरोगावर नियंत्रण ठेवते.
४) भात, पोळी, भाकरी, ब्रेड सोबतही खाऊ शकतो.
५) आमटी, भाजी व कोशिंबीरचा उत्तम स्वाद, पौष्टिकता व शक्ती वाढवते.
खोबरे चटणी (उपवास)
समाविष्ट साहित्य:- खोबरे, जिरे, मिरची पावडर, मीठ.
वैधता:- २ महीने टिकते.
फायदे:-
१) भरपूर कँल्शियम, व्हिटामिन, प्रोटीनयुक्त.
२) हाडांना मजबूत करते व अतिरिक्त वजन कमी करते.
३) डोळे, त्वचा, दात व केसांसाठी उपयुक्त.
४) भात, पोळी, भाकरी, ब्रेड सोबतही खाऊ शकतो.
५) आमटी, भाजी व कोशिंबीरचा उत्तम स्वाद, पौष्टिकता व शक्ती वाढवते.
तीळ चटणी
समाविष्ट साहित्य:- तीळ, जिरे, मिरची पावडर, मसाले, मीठ.
वैधता:- २ महीने टिकते.*
फायदे:-
१) गुडघेदुखी, सांधेदुखी, संधिवात व कोणतेही हाडांचे आजार यांसाठी उपयुक्त.
२) मधुमेही व्यक्तींसाठी तसेच सगळ्यांसाठी उत्तम.
३) लोह व कँल्शियमने भरपूर.
४) भात, पोळी, भाकरी, ब्रेड सोबतही खाऊ शकतो.
५) आमटी, भाजी व कोशिंबीरचा उत्तम स्वाद, पौष्टिकता व शक्ती वाढवते.
६) डोळे, त्वचा, दात व केसांसाठी उपयुक्त.
तव्यावर एक चमचा तेल घालून पिठाचा उंडा तव्यावर थापावा. मध्ये एक भोक पाडून त्यावर तेल सोडावे. वरून कांद्याची पात दाबावी. तव्यावर झाकणी टाकून थालीपीठ खमंग भाजावे.
साहित्य:- वाटीभर राजगिरा पीठ, 2 बटाटे उकडून, 2 चमचे ओले खोबरे, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे हिरव्या मिरचीचा ठेचा, मीठ, साखर, लिंबाचा रस, तूप, बेदाणे.
कृती:- बटाटे सोलून किसावेत. त्यात राजगिरा पीठ व चिमूट मीठ घालून मळून ठेवावे. तुपाचा हात आवश्य क तर मळताना लावावा व गोळा करावा. नारळ चव, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ, साखर, लिंबाचा रस व बेदाण्याचे तुकडे घालून सारण बनवावे. भिजवलेल्या पिठातला गोळा घेऊन राजगिरा पिठावर पारी लाटावी. त्यात सारणाचा गोळा ठेवून बंद करावी. राजगिरा पिठावरच हलका पराठा लाटावा. हाताने हलके थापत मोठा करावा. चिरा पडतील त्या नीट करून घ्याव्यात. तापल्या तव्यावर दोन्हीकडून तूप सोडून खमंग भाजावा. दही, चटणीबरोबर सर्व्ह करावा.
साहित्य: २ टोमॅटोंचा रस, १ टोमॅटो बारीक चिरून, ३-४ कढीपत्त्याची पानं, २ टीस्पून तिळाचा कूट, मीठ चवीनुसार, १ टीस्पून साखर, १ टीस्पून तूप, १ टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून तिखट, २ कप पाणी
कृती: तूप गरम करा. जिरं घालून तडतडलं की त्यात कढीपत्ता घाला. नंतर त्यात चिरलेला टोमॅटो घाला. मिनिटभर परतून टोमॅटोचा रस घाला. उकळी आली की पाणी घालून मंद आचेवर शिजवा. शिजत आलं की त्यात तिखट, मीठ, साखर आणि तिळाचा कूट घाला. चांगलं उकळा.
साहित्य :- 1 टी स्पून धणे, अर्धा टी स्पून जिरे, 1 टी स्पून शहाजिरे, 4 ते 5 तमालपत्रे, अर्धा टी स्पून दालचिनी, अर्धा टी स्पून काळे मिरे, अर्धा टी स्पून लवंग, 5 मसाला वेलदोडे व पाव जायफळ.
कृती :- जायफळ सोडून सर्व मसाला कोरडाच भाजून घ्या. (फार भाजू नका.) नंतर जायफळासहित मिक्सरवर पूड करून घ्या. टीप - हा मसाला एकदम जास्त प्रमाणात न करता लागेल तसा थोडाच करावा.
कणीक, मीठ, फेसलेली अंडी घालून घट्ट पीठ भिजवावे. (कणीक लागल्यास जास्त घालावी) पाणी फार घालू नये. चार-पाच पातळ पोळ्या लाटा, पिठी म्हणून भरपूर कॉर्नफ्लोअर वापरावं. पोळीचा चपटा रोल बनवून कात्रीने नाजूक रिबिनीप्रमाणे पट्ट्या कापाव्या.
साहित्य : २०० ग्रॅम काजू , ३०० ग्रॅम पनीर , २०० ग्रॅम साखर, १ कप दूध, ३ चमचे तूप, १/२ चमचे वेलची पावडर , २ चमचे टुकडे केलेले पिस्ते.
कृती :
१) काजू पनीर बर्फी बनवण्यासाठी काजू दोन तास दूधात भिजवून ठेवा.
२) दोन तासानंतर दूध आणि काजू मिक्सर मध्ये बारीक करुन,एकत्र करुन त्याची पेस्ट करुन घ्या.
३) या पेस्टमध्ये साखर व बारीक केलेले पनीर एकत्र करुन मिक्सर मध्ये पुन्हा एकदा एकत्र करुन त्याची बारीक पेस्ट करुन घ्या.
४) आता एक नॉनस्टिक पॅन गरम करुन घ्या व त्यात दोन चमचे तूप घाला. या पॅनमध्ये काजू, साखर, पनीर यांची पेस्ट घाला.
५) आता हे मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत राहा. आता तुमचे मिश्रण तय्यार आहे.
६) आता या मिश्रणात वेलची पावडर घालून गॅस बंद करा व टुकडे केलेले पिस्ते घाला.
७) दोन ते तीन तासात बर्फी तयार होईल. तयार झालेल्या बर्फीचे तुम्हाला हवे तसे काप करुन सर्व्ह करा.
८) तुमची स्वादिष्ट काजू पनीर बर्फी तयार आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti