(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.

Sort By:

  • p-2960-Zatpat-Khichdi-300

    झटपट खिचडी

    साहित्य : १ टोमॅटो, १ कांदा, ६ ते ७ लसूण पाकळ्या, १ इंच आल्याचा तुकडा, थोडी कोथिंबीर, २ मिरच्या.

    कृती : कुकर मध्ये २ चमचे तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद, किंचि तिखट घालून त्यात टोमॅटो कांद्याचे वाटण घालणे व चांगले परतणे. मग त्यात अर्धा तास भिजवलेले, १ वाटी तांदूळ, २ वाट्या मिक्स पाच डाळी घालून परतणे. अर्धा चमचा गरम मसाला आणि १ चमचा धणे जिरे पावडर घालणे. मस्त ५ मिनिटे परतणे. त्यात दुप्पट पाणी घालून १ शिट्टी करून गॅस १० मिनिटे मंद आचेवर ठेवून मग बंद करणे. वरुन कोथिंबीर आणि खवलेला नारळ घालून गरम गरम खिचडी वाढणे.

  • सुरणाची भाजी

    सुरणाची भाजी

    साहित्य :- अर्धा किलो पांढरा सुरण, (लाल अथवा गुलाबी सुरण खाजरा असतो), १ डावभर तेल, फोडणीचे साहित्य, चिंच, साखर चवीनुसार, १ चमचा लाल तिखट, ५-६ सुक्या लाल मिरच्या, १ चमचा उडदाची डाळ, थोडे किसलेले ओले खोबरे.

    कृती :- सुरणाची सालं काढून सुरणाच्या लांबट पातळ फोडी कराव्यात. उकळत्या पाण्यात ३-४ आमसुले किंवा चिंच टाकून थोडे मीठ टाकून सुरणाच्या फोडी उकडून घ्याव्यात. १ डावभर तेलाची, कडीपत्ता, जिरे, मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. फोडणीत लाल मिरची व उडदाची डाळ घालावी व उकडलेल्या सुरणाच्या फोडी घालाव्यात. किसलेलं ओलं खोबरं घालावे. लगेच मीठ व साखर घालावी. भाजी खरपूस परतून कोथंबीर घालून उतरवावी. यात चिंचेचा कोळ घातल्याने सुरणाची खाज निघून जाते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • सुरणाची भाजी

    लुक्मीव

    साहित्य:- २ वाट्या मैदा, १ वाटी रवा, साजूक तूप, २ वाट्या खवा, दीड वाटी पिठीसाखर, केशर-वेलची पूड, १ वाटी सुकामेवा पूड.
    कृती:- मैदा, रवा, मीठ व अर्धा चमचा पिठीसाखर एकत्र करावी. त्यात अर्धी वाटी तुपाचे मोहन घालून कालवून घ्यावे व नंतर गरजेप्रमाणे पाणी घालून घट्ट कालवावे. 2 वाट्या खवा तांबूस परतून त्यात पिठीसाखर मिसळून छान मऊसर करून घ्यावा. त्यात वेलची पूड, केशर व काजू-बदामाची जाडसर पूड मिसळावी. रवा - मैदा तासभर भिजल्यावर पुन्हा चांगले मळून घ्यावे. लुक्मीी चौकोनी आकाराची असते. पुरीला घेतो तेवढीच लाटी घेऊन लांबट लाटावे. अर्ध्या भागात सारण भरून दुसरा अर्धा भाग त्यावर दाबून चौकोनी आकार द्यावा. नंतर लुक्मी साजूक तुपात तळून गरमागरम वाढाव्यात.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • सुरणाची भाजी

    वरण कथा

    केळीच्या हिरव्यागार पानावर पसरलेला वाफाळता मोकळा पांढरा शुभ्र भात, त्याच्यावर वाढलेलं पिवळं धम्मक आणि घट्ट तुरीचं वरण, वरणावर साजूक तुपाची सैल हाताने सोडलेली धार आणि सोबत तोंडी लावणं म्हणून मेतकूट किंवा लोणच्याची एखादी फोड…बास्स, अगदी बास्स…! अस्सल खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटण्यासाठी एवढा साधा बेतही पुरेसा असतो. कारण त्यांच्यासाठी हे कॉम्बिनेशन म्हणजे जिव्हा अक्षरश: तृप्त करणाराच मामला असतो.

    खरंतर वरण म्हणजे अनेकांच्या लेखी अगदी मामुली पदार्थ. किंबहुना वरणाला वाखाणणाऱ्यांपेक्षा नाक मुरडणारेच अधिक असतील, तरीही छातीठोकपणे सांगता येईल की, गरमागरम भातावर तूप टाकून तो हिंग-जिरं-हळद घालून केलेल्या वरणाशी कालवून खाल्ला की त्याक्षणी जिभेवर जी चव रेंगाळते; तिचं वर्णन करायला शब्द नाहीत.

    असं हे वरण महाराष्ट्रात घरोघरी केलं जातं. त्याला कुठल्या फोडणीची गरज नसते, की त्यात चवीला काही टाकण्याची. साधी तुरीची डाळ शिजवायची. ती शिजवतानाच त्यात हिंग, जिरं आणि हळद टाकायची. नंतर डाळ शिजल्यावर ती घोटून त्यात आवश्यक तेवढं पाणी आणि चवीला मीठ टाकून पुन्हा एक उकळी घ्यायची की गरमागरम पिवळं धमक वरण तयार. हे वरण घरोघरी होत असलं, तरी या पध्दतीच्या वरणाची खरी मक्तेदारी ब्राह्मणांचीच! त्यातही कोकणस्थ! कारण एरव्ही हे वरण त्यांच्या रोजच्या जेवणातही सर्रास बनत असलं, तरी जेव्हा चारी ठाव असा पुरणा-वरणाचा स्वयंपाक करायचा असतो, तेव्हा तुरीच्या डाळीचं हेच घट्ट वरण ‘मस्ट’ असतं. फक्त त्यात अधिकचा छोटा गुळाचा खडा टाकला जातो. एरव्ही गुळाऐवजी वरणासोबत लिंबाची फोड दिली जाते आणि जेवताना ती वरणावर पिळली जाते. मग वरण-भाताला येणारी ती गोड-आंबट चवही भन्नाट असते. असं हे वरण ही कोकणस्थांशिवाय संपूर्ण महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांची खासियत आहे आणि त्यात तिखट चमचमीत असं काही नसल्यामुळेच त्याला खानदेश-मराठवाड्यातले ब्राह्मणेतर फिकं वरण किंवा सपक वरण असंच म्हणतात. अन् तरीही केवळ ब्राह्मण समाजच नाही, तर इतर समाजांतही वेळोवेळी याच पध्दतीने वरण केलं जातं. मात्र क्वचित कधी करताना आपली भौगोलिक किंवा समाजाची म्हणून खासियतही जपली जाते. उदाहरणार्थ कोकणातच मराठा-कुणबी समाजात गोडं वाटण लावलेलं गोड वरण केलं जातं. किंवा आंब्यांच्या दिवसांत कैरीच्या फोडी टाकून आंबट वरण केलं जातं.

    कोकणात मुख्यत: बहुजन समाजांत केलं जाणारं गोड वरण भन्नाट टेस्टी असतं. या वरणासाठी आधी तूर किंवा मूगडाळ शिजवून घेतली जाते. या शिजवलेल्या डाळीत कच्च्चा कांदा-खोबरं, धणे-जिरे, हळद आणि थोडे तांदूळ हे साहित्य एकत्र पाट्यावर वाटून त्याची गोळी मिसळली जाते. नंतर हे मिश्रण चवीला मीठ टाकून चूल-गॅसवर थोडं उकळलं जातं. कांदा-खोबऱ्याच्या गोड्या वाटणामुळे या वरणाला अप्रतिम चव येते.

    याप्रमाणेच आंबट वरण करताना तुरीची डाळ शिजवतानाच त्यात कैरीच्या सोललेल्या फोडी टाकल्या जातात. नंतर डाळ घोटताना या फोडी डाळीशी एकजीव होतात. त्यामुळे या वरणाला सुरेख आंबट चव येते आणि चार घास जास्त खाल्ले जातात. कोकणात आंबटपणासाठी कैरीच्या फोडी टाकल्या जातात. पण महाराष्ट्रात इतर ठिकाणी कोकम किंवा किं चित चिंचेचा कोळ टाकला जातो.

    कोकणाप्रमाणेच खानदेशातही काही ठिकाणी वरणात कांद्याचा वापर केला जातो. परंतु तो वाटून घेण्याऐवजी थोड्या तेलात कांदा परतला जातो आणि त्यात जिरं, लसूण, सुक्या लाल मिरच्यांचं बी टाकून मागाहून त्यात शिजवलेली तुरीची डाळ घोटून टाकली जाते. शक्यतो वरण म्हटलं की त्यात वरुन तूप टाकणं एवढंच अपेक्षित असतं. तेलावर फोडणीवगैरे देऊन कुणी वरण करत नाही. कारण एकदा का वरणाला जिरं-मोहरीची फोडणी दिली की ती आमटी किंवा फोडणीचं वरण होऊन जातं. म्हणूनच साधं वरण म्हणजे निव्वळ शिजवलेली तूरडाळ घोटून त्यात जरुरीपुरतं मीठ-पाणी टाकून केलेला पदार्थ आणि हा संपूर्ण महाराष्ट्रात बहुतांशी तूरडाळीचाच केला जातो. पण काही ठिकाणी मूगडाळ, उडीद डाळ किंवा मसूरडाळीचंही वरण केलं जातं. मात्र डाळ कुठलीही असली, तर तिचं वरण करण्याची पध्दत सारखीच असते.

    विशेषत: तूरडाळ पचायला जड असल्याने अलीकडे अनेकजण मुगाच्या डाळीचं वरण पण, नेहमीच्याच पध्दतीने करतात. मात्र कोकणात मूगाच्या डाळीचं वरण अजून एका वेगळ्या पध्दतीने केलं जातं. त्यासाठी मूगडाळ आधी शिजवून घेऊन त्यात आवश्यक तेवढं पाणी टाकून चवीला मीठ टाकलं जातं. नंतर एका पळीत तेल घ्यायचं. त्यात सोललेला लसूण ठेचून टाकायचा. हे तेल कडकडीत तापवायचं. लसणाला तांबुस रंग आला की, पळी तशीच बाजूला घेऊन मूगाच्या वरणाच्या पातेल्यात टाकायची नि झाकण मारायचं. क्षणभर चुर्रर्र आवाज होतो आणि एक खमंग वास वातावरणात दरवळतो. लसणीच्या चवीचं हे मुगाचं वरण भाताबरोबर खाण्यातही एक वेगळीच लज्जत आहे.

    वरणाचे असे अनेक प्रकार असले, तरीही आजवर त्याला फार प्रतिष्ठा लाभलेली नाही. त्यामुळेच कधी कधी त्याला इतर पदार्थाची जोड दिली जाते. उदाहरणार्थ खानदेशात वरण-बट्टी केली जाते, तर विदर्भात वरणफळं केली जातात. अर्थात यातही खरा भर असतो वरणावरच. किंबहुना वरणाशिवाय बट्टीला आणि वरणफळांना गोडी येणारच नाही. पैकी वरण-बट्टी हा पदार्थ खानदेशात लेवा पाटील समाजात खूप प्रसिध्द आहे. वरण-बट्टी करताना आधी तूरडाळीचं घट्ट वरण करुन घेतलं जातं. नंतर गहू आणि मक्याचं जाडसर दळून आणलेल्या पिठात ओवा-जिरं, हळद, मीठ टाकून ते पीठ मळलं जातं. नंतर त्याचे नेहमी चपात्यांसाठी करतो, तसे गोळे करून ते तेलात तळून किंवा निखाऱ्यांत खरपूस भाजून घ्यायचे. नंतर हे भाजलेले-तळलेले गोळे म्हणजे बट्ट्या गरम असतानाच फोडायच्या, त्यावर भरपूर घरगुती तूप टाकायचं, त्यावरच येथेच्छ गरम तुरीचं वरण टाकायचं आणि ते कालवून खायचं. रवाळ बट्ट्या आणि तूप-वरणाचं हे मिश्रण चापून खाताना खाणाऱ्याला लोकलज्जेचंही भान राहात नाही. लेवा पाटील समाजात ही वरणबट्टी शिजवून घोटवून केलेल्या वांग्याच्या भाजीबरोबर खायची पध्दत आहे.

    वरणबट्टीप्रमाणेच विदर्भात नागपूरकडे वरणफळं केली जातात. वरणफळं करण्याच्या विविध पध्दती आहेत. उदाहरणार्थ काही ठिकाणी फोडणीचं वरण करून ते उकळत असताना गव्हाच्या कणकेचे छोटे गोळे टाकले जातात. ही कणिक मळताना त्यात चवीसाठी तिखट-मीठ टाकलं जातं. काहीजण कणकेच्या शंकरपाळ्यांच्या आकाराच्या चकत्या करतात. तर काही ठिकाणी चकल्यांचा आकारही देतात. कणकेचे हे गोळे किंवा विविध आकार उकळत्या वरणात चांगले शिजून निघतात आणि त्यात वरणाची मस्त चव उतरते. अशा पध्दतीने तयार झालेली वरणफळं भाकरी किंवा भाताबरोबर खाताना मजा येते.

    एकूण वरणाला कुणीही-कितीही नाकं मुरडली, तरी वरणाची ही नानाविध रूपं पाहिल्यावर ज्याच्या तोंडाला पाणी सुटलं नाही, असा माणूस शोधूनच काढावा लागेल!

    9822064468

  • methi-300

    मेथीच्या भाजीतले दिवे

    दिव्यांकरिता दोन वाटी किंवा आवश्यक तेवढी कणिक घेऊन त्यात चवीपुरते मीठ घालून पाण्याने थोडी घट्ट भिजवावी.

  • p-2390-kaju-badam-kulfi

    काजू बदाम कुल्फी

    दूध घट्ट होईपर्यंत उकळा. निम्मं झालं की त्यात साखर, वेलची व कॉर्नफ्लोअर दोन चमचे पाण्यात विरघळून दुधात टाका. ढवळत उकळी येईपर्यंत शिजवा. मग मंद आचेवर 3-4 मिनिटं ढवळत शिजवा.

  • खरडा आणि ठेचा….

    खरडा बनवतात तो दोन्ही, हिरव्या आणि लाल मिरचीचा तर अस्सल ठेचा बनतो फक्त टंच रसरसलेल्या हिरव्यागार मिरचीचाच…

  • p-1724-moru-kalan

    मोरू कालन

    एका भांडय़ात तेल गरम करा. त्यात मोहरी घाला. ती तडतडल्यावर कढीपत्ता, आलं लसणाची पेस्ट घाला. दोन मिनिटं तसंच ठेवा. मग त्यात चिरलेला कांदा आणि बारीक केलेली मिरची घाला. थोडा वेळ परता.

  • Milk Powder

    मिल्क पावडरचे मोदक

    साहित्य -

    २०० ग्रॅ. मिल्क पावडर, २०० ग्रॅ. आयसिंग शुगर, २०० ग्रॅम बाजारी खोबरे कीस, सात-आठ वेलदोड्याची पूड, अर्धा चमचा रोझ इसेन्स व चंदेरी गोळ्या.

    कृती -

    मिल्क पावडर, आयसिंग शुगर व खोबरे कीस एकत्र करावे. त्यात वेलदोड्याची पूड व रोझ इसेन्स घालावा. त्यात डावभर दूध घालून मळावे. जरूर वाटल्यास आणखी थोडे दूध घालावे. वरील मिश्रणाचे छोटे मोदक (सुपारीएवढे) प्रसादासाठी करावे. मोदकाचे साचे विकत मिळतात त्यातून काढावे. प्रत्येक मोदकावर एकेक चंदेरी गोळी लावावी. मोती लावल्याप्रमाणे फार छान दिसते.

    -- संजीव वेलणकर, पुणे
    ९४२२३०१७३३

  • आरोग्यदायी गाजराची भाकरी

    गाजराचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. गाजर हे ‘अ’ जीवनसत्वाने समृद्ध असते. गाजर खाल्ल्याने आतडय़ांच्या तक्रारी दूर होतात. तसेच चेहर्‍यासाठीही गाजर उपयुक्त आहे. शरीरात पाणी कमी झाल्यास गाजराच्या रसाने ती उणीव भरून काढली जाते. हृदय रोगांवर रामबाण इलाज आहे.