(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.

Sort By:

  • Aamrasacha-modak-300

    आंब्याच्या रसाचे (आमरसाचे) मोदक

    आंबे फक्त सिझनमध्ये मिळतात त्यामुळे हल्ली बाजारात आमरसाचे डबे मिळतात. त्यात अवधूत ह्या नावाचा डबा घ्यावा. ताजे आंबे व डब्यातील रस ह्यामध्ये फरक असतो. परंतु त्यातील रसाचे पण मोदक चांगले होतात. सीझनमध्ये हा रस आटवून ठेवला की वर्ष-दोन वर्षे सुध्दा चांगला राहतो. मग आपल्याला केव्हाही त्याचा उपयोग करुन घेता येतो. फक्त पिठीसाखर मोदक तयार करताना मिक्स करायची.

  • p-2960-Zatpat-Khichdi-300

    झटपट खिचडी

    साहित्य : १ टोमॅटो, १ कांदा, ६ ते ७ लसूण पाकळ्या, १ इंच आल्याचा तुकडा, थोडी कोथिंबीर, २ मिरच्या.

    कृती : कुकर मध्ये २ चमचे तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद, किंचि तिखट घालून त्यात टोमॅटो कांद्याचे वाटण घालणे व चांगले परतणे. मग त्यात अर्धा तास भिजवलेले, १ वाटी तांदूळ, २ वाट्या मिक्स पाच डाळी घालून परतणे. अर्धा चमचा गरम मसाला आणि १ चमचा धणे जिरे पावडर घालणे. मस्त ५ मिनिटे परतणे. त्यात दुप्पट पाणी घालून १ शिट्टी करून गॅस १० मिनिटे मंद आचेवर ठेवून मग बंद करणे. वरुन कोथिंबीर आणि खवलेला नारळ घालून गरम गरम खिचडी वाढणे.

  • कोकणचा मेवा – भाग २

    रत्नागिरीच्या बाजारात दिसणाऱ्या कोकमासोबतच काळे टपोर करवंदेही पर्यटकांना आवडतात. डोंगर उतारावरील करवंदांच्या जाळीतून ग्रामीण महिलांनी (कोकणात त्यांना मामी म्हणतात) बाजारात आणलेले ताजी करवंदे पाहून तोंडाला पाणी सुटते. अत्यंत चवदार असलेल्या या करवंदांचे सरबतही कोकणात मिळते. पाच रुपयाचा वाटा घेतल्यावर अर्ध्या तासाच्या प्रवासात हा गोडवा सहजपणे जिभेवर रेंगाळतो.

    कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत. एरवी बाजारात दिसणाऱ्या जांभळापेक्षा लहान आकारातली ही जांभळे खूप गोड आणि चविष्ट असतात. पानांच्या कोनमध्ये त्यांचे सौंदर्यही लोभस वाटते. जांभळाच्या सरबताची चवही समुद्र किनाऱ्यावरील स्टॉल्समध्ये घेता येते. मात्र ताज्या जांभळाची चव काही निराळीच...

    प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस वजनदार असूनही तो सोबत नेतांना भार जाणवत नाही. त्याची गोडीच मुळी अशी असते. अनेक पौष्टिक घटक असलेल्या फणसात कापा आणि बरका असे दोन प्रकार येतात. कापा हा प्रकार जास्त प्रिय आहे. फणस कापण्याचे कष्ट नको असतील तर तयार गरेदेखील बाजारात मिळतात. सोबत दुकानातून फणसाचे तळलेले गरेदेखील मिळतात. कच्च्या फणसाच्या भाजीची चवही एखाद्या कोकणी माणसाच्या घरी घेता येते. लहान गोल आकाराचे क्वचीत आढळणारे बटाटा फणसाच्या (विलायती फणस म्हणूनही परिचीत आहे) भाजीची चव काही निराळीच असते. हे फणस सहजपणे सोबत नेता येते.

    उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे जामफळ. पांढऱ्या शुभ्र रंगाचे घंटेसारख्या आकारातील हे फळ फारसे गोड नसले तरी त्याची चव छान असते. त्यापेक्षाही त्याचे गुणधर्म शरीलाला पोषक असतात. दहा रुपयात डझनभर फळ घेतल्यावर प्रवासात फारशी तहान जाणवत नाही.

    ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ही चव सोबत ठेवण्यासाठी किंवा आवडत्या पाहुण्यांचा पाहुणचार करतांना या मेव्यापासून बनविलेले पदार्थ उपयोगात आणले जातात. रत्नागिरीच्या गावागावातून असे पदार्थ तयार स्वरुपात मिळतात. फणसपेाळी, आंबापोळी, आंबावडी, विविध प्रकारची सरबते, कैरीचे पन्हे, चॉकलेट्स, टीन किंवा बाटलीबंद आंब्याचा रस, चिक्की आदी विविध पदार्थ पर्यटक आवडीने खरेदी करतात. या प्रक्रीया उद्योगावर अनेकांचे रोजगारही अवलंबून आहेत. या पदार्थंाच्या माध्यमातून कोकणची ओळख देशाच्या विविध भागात जाते.

    कोकणात मिळणाऱ्या या मेव्यामुळे उन्हाळ्यातली ही सफरही आनंददायी होत असते. आपल्या आवडत्या व्यक्तिकडे हा मेवा पाठविण्यासाठी कुरिअरची मदतही घेतली जाते. कोकणी मेव्याने रोजगाराची आणि तेवढ्याच 'मधूर' संबंधाची अशी साखळीच तयार केली आहे. 'कोकणच्या राजा' ने रत्नागिरीचे नाव सर्वदूर पोहोचविले असले तरही कोकणचा इतरही मेवा सर्वांच्या पसंतीस उरला आहे. म्हणूनच कवीमनही या मेव्याच्या प्रेमात पडून
    गळे वसंती टपटप जेव्हा आंब्याच्या डाहळी!
    पिकले आंबे गळुनि भ्‌तळी रस जोवरि वाहतो
    वनदेवींसह झिम्मा खेळत तोवरि नृप राहतो
    कुठे आढळे फळभाराने लवणारी आवळी,
    कुठे गाळिती भुळभुळ आपुली पक्व फळे जांभळी

    असे कोकणचे वर्णन करतांना आनंदते. अनेकांना रसस्वादाचा आनंद देत हा मेवा आपल्यालाही खुणावतो आहे. मग पुढच्या उन्हाळ्यात यायचं हं कोकणला!
    -- डॉ.किरण मोघे
    जि.मा.अ.रत्नागिरी

    शुक्रवार, ८ जुन, २०१२

    'महान्यूज'मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.

  • साबुदाणा चकली

    सर्वसाधरणपणे उपवास म्हटले की डोळ्यासमोर येतात ते पदार्थ म्हणजे साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याची खीर, बटाट्याचा किस वगैरे. मात्र उपवासाच्या पदार्थातही साठवणीचे अनेक पदार्थ आहेत. यातीलच एक म्हणजे साबुदाण्याची चकली. एकदा बनवून ठेवून जेव्हा हव्या तेव्हा तळून किंवा मायक्रोवेव्ह ओवनमध्ये भाजून घेतलेल्या या चकल्या बहारदारच.

    साहित्य (Ingredients):

    १/२ कप साबुदाणे - Tapioca pearls (Sago)
    १ मध्यम आकाराचे बाफवून सोललेले बटाटे ( Medium size , peeled, steamed potato )
    स्वादापुरते मीठ व साखर.
    १/४ चमचा (टी स्पून) जीऱ्याची पूड.
    ताजा लिंबाचा रस - चवी पुरता.
    १/४ चमचा हिरव्या मिरच्यांची पेस्ट
    १/२ चमचा आल्याची पेस्ट
    १ ( टेबल स्पून) चमचा तांदळाचे पीठ.
    स्वादासाठी ओवा किंवा अज्वैन (carom seeds )

    कृती:

    १. साबुदाणा पाण्यात एक तास भिजवून ठेवा. संपूर्ण पाणी निथळून घ्या.
    २. एका बाऊल मध्ये किंवा भांड्यात वाफवून कुस्करलेले बटाटे, पाणी निथळून काढलेले आणि नरम झालेले साबुदाणे, मीठ, जीऱ्याची पूड, आले-मिरचीची पेस्ट, लिंबाचा रस, ओवा किंवा अज्वैन (carom seeds ) ह्या सर्वांचे चांगले मिश्रण करावे.
    ३. मिश्रणात तांदळाचे पीठ घालून साधारण जाडसरच मिश्रण तयार करावे आणि ते चकली - पाडण्याच्या भांड्यात घालावे.
    ४. चकल्या बटर पेपरवर पाडून उन्हात सुकवाव्यात.
    ५. संपूर्ण ड्राय झालेल्या चकल्या ३० मिनिटे मायक्रोवेव्ह ओवन मध्ये भाजून घ्याव्यात.

    -- सौ. निलीमा प्रधान

  • खजूर पनीर लाडू

    खजूर पनीर लाडू

    साहित्य:- २०० ग्रॅम किसलेले पनीर, २०० ग्रॅम सिडलेस खजूर,दोन वाट्या पिठीसाखर,अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव, एक वाटी फ्रेश क्रीम, अर्धा चमचा वेलदोडा पावडर , अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट.

    कृती:- प्रथम खजूर चिरुन घेऊन मिक्सरमधुन बारीक करावा. एका फ्राय पॅनमध्ये फ्रेश क्रीम घालून त्यात खजुराचा मिक्सरवर करून घेतलेला लगदा, ओल्या नारळाचा चव (खोबरे) आणि किसलेले पनीर हे सर्व घालुन नीट परतुन घ्यावे. उतरवुन कोमट झाले की त्यात पिठीसाखर अन वेलची पुड घालुन लाडु वळावे. अन थोड्या डेसिकेटेड खोबर्याकच्या किसात घोळवुन घ्यावे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • p-78 - grape-lemon-Sarbat-300

    ग्रेप लेमन सरबत

    साहित्य :

    द्राक्षे २५० ग्रॅम, एक मोसंबी, एक लिंबू, मध तीन चमचे, साखर तीन चमचे, थोडीशी मिरपूड, एक ग्लास पाणी.

    कृती :

    द्राक्षे धुऊन, कोरडी करुन बिया काढून टाकाव्या. मोसंबी सोलावी, लिंबाचा रस काढावा.

    नंतर द्राक्षे, मोसंबी, लिंबू रस, मध, साखर, पाणी एकत्र करुन मिक्सर मधून काढून एकजिनसी करावे. मिश्रण गाळून घ्यावे.

    थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा. थंड झाल्यावर त्यात थोडी मिरपूड व पुरेसे पाणी घाला. आणि प्यायला द्या.

  • खजूर पनीर लाडू

    ललिका पंचमी

    नवरात्रीमध्ये ललिता पंचमीच्या दिवशी काही घरी हे घारगे आणि तांदुळाचे वडे करतात.
    काकडीचे घारगे
    साहित्य:- १) काकडीचा कीस (काकडी जून असावी), २) गूळ, मीठ, ३) तांदळाचे पीठ, ४) गोडे जिरे, हळद.

    कृती:- भोपळ्याच्या घारग्याप्रमाणे पीठ तयार करून हे घारगे करावेत. येथे फक्त भोपळ्याच्या किसाऐवजी काकडीचा कीस वापरावा. घारगे (नारळाचे)

    साहित्य – १) १ नारळाचे खोबरे, २) खोबर्याीइतकाच गूळ, ३) तांदळाचे पीठ, ४) गोड जिरे, हळद, मीठ. कृती – नारळाच्या चवात गूळ घालून त्याचा पाक तयार करावा. त्यात जिरे, मीठ व हळद वाटून घालावी व त्याचा घट्ट असा पाक झाला की खाली उतरावा व त्यात मावेल एवढेच पीठ घालावे व भिजवून ठेवावे व १ तासानंतर वडे करावेत.

    सूचना – नारळाच्या चवात गूळ, जिरे, हळद घालून मिक्सरमधून चव काढला तरी चालतो. त्यात नंतर गूळ व मीठ घालून पाक करावा व त्यात पीठ घालावे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    लाल भोपळ्याचे घारगे
    साहित्य:- २ वाटया भोपळा सोलून कीस करून, १ वाटी किसलेला गूळ, तांदुळाचे पिठ, १/२ चमचा तेल, तळणासाठी तेल.
    कृती:- प्रथम एका भांडयात भोपळा उकड्ण्यासाठी ठेवावा झाकण ठेवावे भोपळा वाफेवर शिजवावा. भोपळा शिजला की त्यात गूळ घालावा व गूळ पुर्ण एकजीव झाला कि त्यात मावेल एवढे तांदळाचे पिठ घालावे. मिश्रण छान चमच्याने एकजीव करावे. आणि झाकण लावून वाफवून घ्यावे. थंड झाले की छान मळून घ्यावे. थोडेसे तेल लावावे. एका प्लास्टिक पेपर वर तेल लावून छान थापुन पुऱ्या कराव्या. गरम तेलात छान खरपुस तळून काढाव्या.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    तांदळाचे वडे
    साहित्य :- ३ वाट्या तांदूळ, ५०० ग्रॅम गूळ, ४ वेलदोडे पूड, ३ चमचे खोबऱ्याचे काप, ३ चमचे पांढरी चवळी, अर्धा चमचा हळद.
    कृती :- तांदूळ तासभर भिजत ठेवावेत. पाणी बदलून चाळणीवर तांदूळ निथळत ठेवावे. वाटल्यास फडक्यावर पसरून ठेवावे. कोरडे होऊ लागले की खलात घालून कुटून घ्यावे. हे तांदळाचे पीठ फिक्या बदामी रंगावर येईपर्यंत भाजावे. भाजून झाले की पीठ मापून घ्यावे. तितकाच गूळ मापून घेऊन बारीक चिरावा. एका पातेल्यात अर्धी वाटी पाणी घेऊन त्यात गूळ घालावा. पातेले चुलीवर ठेवावे. एकीकडे चवळी कोरडी भाजून घ्यावी. गूळ पातळ होऊन विरघळला की त्यात कुटलेले पीठ, हळद व भाजलेली चवळी घालावी. मिश्रण घट्टसर होईपर्यंत चुलीवर ढवळावे. घट्ट झाले की खाली उतरवून त्यावर वेलचीपूड घालावी. मिश्रण निवाले की त्याचे बेताच्या आकाराचे वडे तळून ठेवावे. कुकरमध्ये चाळणीवर केळीचे (किंवा कर्दळीचे) पान धुवून ठेवावे. त्यावर हे वडे ७-८ मिनिटे वाफवावे. गार झाले की लोण्याशी खावे.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • p-3124-batata-koshimbir

    बटाटयाची कोशिंबीर

    साहित्य : ४ मोठे उकडलेले बटाटे, एक चमचा भरून मीठ, २ डाव भरून गोड दही, २ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा साखर, पाव चमचा जिरे पूङ

    कृती : उकडलेले बटाटे सोलून घ्या, एका पातेलीत घालून ते हाताने छान कुस्करा, सुरी वापरता येत असेल तर मिरचीचे बारीक तुकडे करा नाहीतर आई किंवा ताईकडून ते करून घ्या. कुस्करलेल्या बटाटयात साखर, जिरेपूड, मिरच्यांचे तुकडे व अर्धा चमचा मीठ घालून सर्व नीट कालवून घ्या. आता त्यात दही घालून डावाने सर्व नीट ढवळून घ्या, चव घेऊन पहा. मिठाची जरूरी आहे का? असल्यास थोडे घालून, चव घेऊन पहा, झाली कोशिंबीर तयार. कोथिंबीर असेल तर तीही थोडी निवडून, धुवून, चिरून वर पेरलीत तर कोशिंबीर छान दिसेल.

    टीप : ही कोशिंबीर २ मोठया माणसांना पुरेशी होईल.

  • खजूर पनीर लाडू

    आंब्याचा शिरा

    साहित्य : २ वाटय़ा जाड रवा भाजलेला, अर्धी वाटी तूप, अर्धी वाटी साखर (अथवा आवडीप्रमाणे बदलावे), २ मध्यम आकाराचे आंबे (शक्यतो हापूस), १० काडय़ा केशर, २ मोठे चमचे मनुका, चिमूटभर मीठ.

    कृती : एका आंब्याच्या बारीक फोडी कराव्यात व एका आंब्याचा रस काढावा. केशर कोमट दुधात वा पाण्यात भिजवावे. मनुका साध्या पाण्यात भिजत ठेवाव्यात. तुपात रवा परतून त्यात चार वाटय़ा उकळते पाणी घालून झाकण घालून एक वाफ येऊ द्यावी. झाकण काढून शिजलेल्या रव्यात साखर, आंब्याचा रस व तुकडे घालून ढवळावे. मीठ व मनुकाही घालाव्यात व परत झाकण ठेवावे.

    चांगली वाफ आल्यावर व शिरा तयार झाल्यावर त्यात भिजवून खललेले केशर घालून मिसळावे. शिरा गरमच खावा.

    Bhakti Phadke
    7030342027

  • खजूर पनीर लाडू

    आजचा विषय केळफूल

    केळफूल हे स्निग्ध, मधुर, तुरट, गुरू, कडसर, अग्निप्रदीपक, वातनाशक तसेच काही प्रमाणात उष्ण आहे. रक्तपित्त, कृमी, क्षय, कोड यावर ते गुणकारी आहे. आपल्या आहारात या केळफुलांचा वापर नक्कीच करू शकतो. बनाना फ्लॉवर म्हणजेच केळफूल आणून त्याची भाजी केली जाते.