महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
साहित्य:- दोन वाट्या उडदाची डाळ, जिरे, आल्याचा तुकडा, हिरव्या मिरच्या, मीठ, दही, उकडलेले मूग, साखर, जिरेपूड, पापडी, बारीक शेव, चिंचेची चटणी, तिखटपूड.
कृती:- दोन वाट्या उडदाची डाळ चार-पाच तास भिजत घालावी. नंतर मिक्सारमध्ये वाटून घ्यावी. वाटताना त्यात थोडे जिरे, आल्याचा तुकडा व एखादी मिरची घालावी. वाटून झाल्यावर त्यात मीठ घालावे. त्याचे लहान लहान गोळे करून तळून घ्यावेत. हे तळलेले वडे पाण्यात घालावेत व नंतर दाबून पाणी काढून टाकावे. तीन-चार वाट्या दही घुसळून घ्यावे. त्यात मीठ, साखर, जिरेपूड घालावी. हे दही उडदाच्या वड्यांवर घालावे. त्या दहीवड्यांवर उकडलेले मूग घालावेत. पापडी कुस्करून घालावी व बारीक शेव भुरभुरावी. वरून थोडे दही घालावे. त्यावर चिंचेची चटणी व लाल तिखट पूड घालून सर्व्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
साहित्य : २०० ग्रॅम काजू , ३०० ग्रॅम पनीर , २०० ग्रॅम साखर, १ कप दूध, ३ चमचे तूप, १/२ चमचे वेलची पावडर , २ चमचे टुकडे केलेले पिस्ते.
कृती :
१) काजू पनीर बर्फी बनवण्यासाठी काजू दोन तास दूधात भिजवून ठेवा.
२) दोन तासानंतर दूध आणि काजू मिक्सर मध्ये बारीक करुन,एकत्र करुन त्याची पेस्ट करुन घ्या.
३) या पेस्टमध्ये साखर व बारीक केलेले पनीर एकत्र करुन मिक्सर मध्ये पुन्हा एकदा एकत्र करुन त्याची बारीक पेस्ट करुन घ्या.
४) आता एक नॉनस्टिक पॅन गरम करुन घ्या व त्यात दोन चमचे तूप घाला. या पॅनमध्ये काजू, साखर, पनीर यांची पेस्ट घाला.
५) आता हे मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत राहा. आता तुमचे मिश्रण तय्यार आहे.
६) आता या मिश्रणात वेलची पावडर घालून गॅस बंद करा व टुकडे केलेले पिस्ते घाला.
७) दोन ते तीन तासात बर्फी तयार होईल. तयार झालेल्या बर्फीचे तुम्हाला हवे तसे काप करुन सर्व्ह करा.
८) तुमची स्वादिष्ट काजू पनीर बर्फी तयार आहे.
साहित्य : पाणीपुरीच्या पुर्या एक पाकिट (सुमारे ५० पुर्या) मीठ घालून उकडलेले पांढरे वाटाणे २ वाटया, ८-१० वाटया भरून चिंचेचे पाणी (कृती खाली दिली आहे.)
कृती : एका प्लेटमध्ये पुर्या घेऊन त्याला हाताने वरून फोडा. त्यात एक चमचाभर पांढरे वाटाणे घाला. पाणी एका वेगळया वाटीत घ्या. जो तो आपापल्या पुर्यांमध्ये पाणी घालून पुर्या खाईल.
पाणीपुरीचे पाणी -
साहित्य : अर्धी वाटी चिंच उकळून, कोळून त्याचा गर, ७-८ हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आले, १५ काडया पुदिना, एक वाटी धुवून चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे, ५ लवंगा, ६-७ काळे मिरे, शेंदेलोण-पादेलोण यांची एकत्रित पूड, ३ चहाचे चमचे भरून, ४-५ चमचे गूळ, अर्धा चमचा लाल तिखट.
कृती : यासाठी तुम्हाला आई किंवा काकूची मदत लागणार आहे. तुम्ही आईकडून चिंच उकळून घेऊ शकता. मग ती गार झाली की हाताने चोळून तिचा सर्व गर काढायचा. नंतर आईकडून लवंगा तव्यावर किंवा कढईत भाजून घ्यायच्या. त्या भाजतांना धुर निघू लागतो व लवंगा फुगतात आणि काळया होतात. पुदिना धुवून घेऊन त्याची पाने बाजूला काढा व मिरच्यांचे बारीक तुकडे करा. आले किसून घ्या, एका ताटात कोथिंबीरख् पुदिन्याची पाने, मिरचीचे तुकडे, काळी मिरी, जिरे, भाजलेल्या लवंगा, २ चमचे शेंदेलोण-पादेंलोण पूड, आले हे सर्व घेऊन एकत्र कालवा व आईकडून मिक्सरमध्ये एकदम बारीक गुळगुळीत चटणी वाटून घ्या. आता ही चटणी साधारण मध्यम आकाराच्या पातेलीभर पाण्यात (सुमारे १ लिटर पाण्यात) मिसळा, त्यात गूळ घाला व हलवा. झाले पाणी तयार, चव घेऊन पहा, मीठ कमी वाटत असेल तर उरलेली एक चमचा शेंदेलोण-पादेलोण पूड या पाण्यात मिसळा. अजून तिखट पाणी हवे असेल तर अर्धा चमचा तिखट त्यात घालून सर्व नीट ढवळा.
कणिक मिठ टाकुन भिजवुन घ्यावी. त्याच्या छोट्या छोट्या चपट्या गोळ्या करुन घ्याव्या. एका पातेल्यात पाणी उकळत ठेवावे,
साहित्य:- अर्धा किलो मोठी बडीशेप्, दोन टे.स्पून मीठ,एक टे.स्पून हळ्द्, लिन्बू, टूटीफ्रुटी,बडीशेप गोळ्या, किसलेले खोबरे.
कृती:- गार पाण्यात हळ्द, मीठ, लिंबू कालवा. ते पाणी बडीशेपेला लावा. ३-४ तास उन्हात ठेवा व नन्तर बारीक गॅसवर भाजून बाकीचे साहित्य मिसळा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
ब्लेण्डरमध्ये पपईचे तुकडे आणि दूध घालून हळूवार ब्लेण्ड करून घ्या. आता अन्य सर्व जिन्नस घालून घट्ट आणि फेसाळ होईपर्यंत पुन्हा ब्लेण्ड करा. थंडगार पपई हनी स्मुदी ग्लासात ओतून सर्व्ह करा.
बुद्ध आणि जैन कालात कमी झालेलं मांसाहाराचं महत्व सुंग कालात पुन्हा वाढलं. सातवाहन आणि पल्लवांसारखे हिंदू राजे मांसभक्षण करीत होते. चरकसंहिता आणि सुश्रूतसंहिते सारखे ग्रंथ त्या काळात निर्माण झाले.
प्रथम लोखंडी कढईत तेल घालून त्यात सालीचा किस चांगला कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यावा. मग तो काढून घ्यावा. त्यानंतर कढईत तीळ व खोबऱ्याचा कीस चांगला परतावा. एका बाऊलमध्ये वरील सर्व साहित्य एकत्र करून ही चटणी चांगली कालवावी. भात- पोळीबरोबर हे तोंडीलावणे चांगले लागते.
सुरण चिरून बाजूला ठेवावा. पातेलीत तेलावर लाल मिरच्यांचे तुकडे, काळी मिरी पावडर, उडदाची डाळ आणि ओले खोबरे टाकून परतावे. गार झाल्यावर मिक्सरवर वाटावे. सुरणाच्या फोडी हळद व थोडे पाणी घालून शिजवाव्यात. फोडी शिजल्या की वाटण मिक्स करावे. चांगले ढवळावे व एक उकळी आणावी. बारक्या कढईत मोहरीची फोडणी करून ती या भाजीवर वरून घालावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
साहित्य : कांद्याचे वाटण २०० ग्रॅम (३०० ग्रॅम कांदे तेलावर परतून त्याची पेस्ट करा), आलं-लसूण पेस्ट- एक वाटी, लाल मिरच्या ८ ते १०, बडीशोप एक चमचा, मोठी वेलची ४ ते ५, छोटी वेलची ८ ते १०, स्टार फूल, दालचिनी २ ते ३, लवंग, जायपत्री १ चमचा, काळी मिरी २ चमचे, शहाजिरे २ चमचे, धणे अर्धी वाटी, खसखस पाव वाटी, ज्वारीचे पीठ २ चमचे, शेंगदाणा तेल एक वाटी, खोबरेल तेल १/२ वाटी, तिखट २ चमचे, तमालपत्र ४ ते ५, हळद एक चमचा, मीठ चवीनुसार.
कृती : कांदा व लसूण सोडून सर्व मसाले लालसर, काळपट रंगात भाजून घ्यावेत व गरम पाण्यात १० मिनिटे उकळल्यानंतर बारीक वाटून घ्यावे. पातेल्यात तेल टाकून प्रथम आले-लसूण पेस्ट टाकून ते शिजवल्यावर कांद्याचे वाटण तसेच वरील वाटलेला मसाला व तमालपत्र घालावे. थोडेसे पाणी टाकून हे मिश्रण तेल सुटेस्तोवर उकळावे. सगळ्यात शेवटी हळद, तिखट व खोबरेल तेल टाकावे. वरून थोडी कोिथबीर घालावी आणि चवीनुसार मीठ घालावे.
पाटोडी (पाटवडी)
साहित्य : सावजी ग्रेव्ही २ वाटय़ा, चण्याच्या डाळीचे पीठ एक वाटी, खोबऱ्याचा कीस २ चमचे, हळद, तिखट, मीठ चवीनुसार, तेल २ चमचे, मोहरी, हिंग.
कृती : पाटोडीसाठी- थोडय़ा तेलात मोहरी फोडणीला घालून त्यात हिंग, हळद, तिखट, मीठ व एक वाटी पाणी घालून, बेसन घाला, ढवळत राहा. मिश्रण शिजवा. थोडे घट्ट झाल्यावर त्यात थोडी कोिथबीर घाला. नंतर हे मिश्रण ट्रेमध्ये घालून थापा. वरून थोडा खोबऱ्याचा कीस घाला. थंड झाल्यावर वडय़ा कापाव्यात. भाजी सव्र्ह करतेवेळी सावजी ग्रेव्हीला थोडे पातळ करून चवीनुसार मीठ घालावे. नंतर यात तयार पाटोडय़ा घालून एक उकळी आणावी.
Copyright © 2025 | Marathisrushti