(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.

Sort By:

  • घावन घाटले

    घावन घाटले

    घावन :- तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवावे. नंतर दळून आणावे.आपल्या अंदाजाने पीठ घ्यावे. त्यात थोडे मीठ व पाणी घालून धिरड्यासाठी पीठ भिजवतो तसे भिजवावे. सपाट तव्याला तेलाचाहात फिरवून त्यावर वरील पिठाची धिरडी घालावी. ह्याला घावन असे म्हणतात. हे घावन घाटल्याबरोबर खाण्याची पद्धत आहे.

    घाटले :-घाटले म्हणजे तांदळाचे पीठ गूळ-खोबरे वगैरे घालून केलेली एक प्रकारची खीरच आहे.

    साहित्य :- ५ ते ६ वाट्या पाणी १ वाटी बारीक चिरलेला गूळ अर्धी वाटी तांदळाचे पीठ दीड वाटी ओले खोबरे अर्धा चमचा मीठ ८ ते १० वेलदोड्याची पूड.

    कृती :- एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवावे. त्यात गूळ, ओले खोबरे, मीठ व वेलदोड्याची पूड घालावी.दुसऱ्या लहान पातेलीत तांदळाच्या पिठात १ वाटी पाणी घालून कालवून घावे व सरसरीत करावे. वरील पाण्याला उकळी आली की त्यात हे कालवलेले पीठ ओतावे. उकळून जरा दाटसर झाले की उतरवावे. निवल्यावर घाटले फार दाट होते. म्हणून फार दाट करू नये. वरील प्रमाणाने केलेले घाटले ५।६ मंडळींना जेवण्याच्या वेळी पुरते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • घावन घाटले

    कटाची आमटी

    साहित्य:- पुरणासाठी चण्याची डाळ शिजल्यावर चाळणीत घालून जास्तीचे पाणी काढून घ्यावे. हे डाळीचे पाणी म्हणजेच "कट'. चार वाट्या कट, छोट्या लिंबाएवढ्या चिंचेचा कोळ, पाव वाटी गूळ, दोन आमसुले, काळा मसाला दोन चमचे, तिखट-मीठ चवीनुसार, तमालपत्र दोन पाने, फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीलिंबाची पाने.

    कृती :- दोन चमचे तेलात मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीलिंबाची पाने घालून फोडणी करावी. त्यात तमालपत्राची दोन पाने घालावीत. नंतर चिंचेचा कोळ, आमसूल व कट घालून उकळावे. आवडीप्रमाणे तिखटपूड, मीठ व दोन चमचे काळा मसाला घालावा. गूळ घालावा अथवा गुळाऐवजी वाटून तयार केलेले थोडे पुरण घालावे म्हणजे आमटीला दाटपणा येईल. आमटी चांगली उकळून घ्यावी.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • p-295-betelleaf-juice

    विड्याच्या पानाचे मोदक

    साहित्य -

    ४ वाट्या ओल्या नारळाचा चव, २ वाट्या खडीसाखरेची पावडर,२ वाट्या साखर, ७ ते ८ विड्याची पाने, आर्धी वाटी दुध, १ वाटी गुलकंद, २ चमचे वेलची पावडर

    कृती -

    प्रथम विड्याची पाने दुध घालुन मिक्सरला वाटुन घ्यावी , कढई मध्ये नारळाचा चव साखर व खडीसाखरेची पावडर घालुन सर्व मिक्स करुन घ्या व गँसवर ठेवा, व ते ढवळत रहा थोडे गरम झाल्यावर त्या मध्ये ऊरलेले सर्व पदार्थ घाला व कडेने तेल सुटल्यावर गँस बंद करा, हे थंड झाल्यावर मोदकाच्या साच्यात घालुन मोदक बनवा.

    -- संजीव वेलणकर, पुणे
    ९४२२३०१७३३

  • p-2360-Vadi-che-Sambhar

    वडीचे सांबार

    डाळीच्या पिठात चवीप्रमाणे हळद, तिखट, मीठ व आलेलसूणचे वाटण व दीड कप पाणी घालून भिजवा. गॅसवर कढईत ते मिश्रण घालून शिजवा. घट्ट झाले, की तेल लावलेल्या थाळीत थापा. त्याच्या वड्या पाडा.

  • घावन घाटले

    Butter Garlic Prawns

  • घावन घाटले

    सुके अंजीर

    सुके अंजीर दररोज खाल्ल्याने हाडं मजबूत होतात. गळ्याला सूज आली असेल तर सुके अंजीर पाण्यात उकळून ते बारीक करून खावेत, फायदा होतो. दोन अंजीर मधोमध कापून ते एक ग्लास पाण्यात रात्रभर ठेवावेत आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी प्यायल्याने रक्तसंचार वाढतो.
    मधुमेह असणा-यांना अंजीर उपयुक्त आहे. पण सुके अंजीर हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खावं.

    कमरेचा ज्यांना वारंवार त्रास होतो अशांनी सूंठ, अंजीराची साल आणि कोथिंबीर याचं सारखं प्रमाण घेऊन ते पाण्यात भिजवून ठेवावं. नंतर ते बारीक वाटून घ्यावं. सकाळी हे पाणी गाळून प्यावं. त्याने कमरेचा त्रास कमी होतो. अंजीरमध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असल्याने त्याचं सेवन नियमित केलं तर वजन कमी होण्यास मदत होते. कर्करोग होऊ नये म्हणून अंजीर खावं.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • घावन घाटले

    वडापावाचा इतिहास….

    आपण सकाळ-संध्याकाळी पोटाची भूक भागवण्यासाठी 'वडापाव' खातो, अगदी स्वस्तात मिळणारे हे अन्न आणि चालता पळता ते खाऊ शकतो, यामुळे वडापाव खुप प्रसिद्ध आहे. पण या वडापावचा शोध कोणी लावला ? याचा कधी विचार केला आहे का ? Being Marathi टिम आपणास वडापावचा ज्यांनी शोध लावला त्या कमलाबाई ओगले यांची ओळख करून देत आहे.. 1965-70 चा तो काळ होता, कमलाबाई मुंबईतील दादर येथे राहत होत्या,उन्हाळ्याचे दिवस होते, पाव्हणे घरी आले म्हणून त्यांनी स्वयंपाक केला होता. बटाट्याची सुकी भाजी, भजे,पुरणपोळी वगैरे.. स्वयंपाक करताना त्यांनी बटाट्याची सुकी भाजी भज्याच्या पिठात टाकून तेलात सोडली, तर एक वेगळाच पदार्थ तयार झाला. त्यांनी तो पदार्थ खाऊन बघितला तर अगदी खमंग लागला. त्यांनी त्याला 'वडा' हे नाव दिले. नविन पदार्थ असल्यामुळे त्यांनी तो लोकांना खाण्यासाठी उपलब्ध करून द्यायच्या हेतूने घरापुढेच विकण्यास मांडला, जेव्हा लोक येऊन खाऊ लागले तर लोकांनाही खुप आवडला, पुढे पुढे मारवाडी हाॅटेलवाल्यांनी त्यांची ही कल्पना चोरली आणी त्यांच्या नावाने मुंबईत वडे विकू लागले. त्या सोबत सुरवातीला चपाती देत असत, धावपळीच्या मुंबई मधे चपाती सोबत कशी न्यावी म्हणून चहासोबतच्या पावासोबत वडा विकला जाऊ लागला. त्यांची कलाकृती चोरली हे पाहील्यानंतर त्यांनी 'रूचिरा' हा पाककृतीचा छोटेखानी पुस्तीका लिहली, आजही पाककृती मधे 'कमलाबाई ओगले' यांच्या 'रूचिरा' चा विक्रम कोणी मोडू शकले नाही. अशा या आज्जीचा वयाच्या 86 व्या वर्षी 1999 साली पुण्यात निधन झाले. आज या आज्जीबद्दल कोणाला माहीत नाही म्हणून तुम्हास ओळख करून देत आहे..

  • घावन घाटले

    काजू

    काजूला ड्रायफ्रुट्सचा राजा मानले जाते. शरीरासाठी काजू खूप गुणकारी आहेत. काजूचे निअयमित सेवन केल्यास विविध फायदे दिसून येतील. थोडेसे काजू खाल्ल्याने शरीराला केवळ उर्जाच मिळत नाही तर विविध आजार आपल्यापासून दूर राहतात. काजूमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात आढळून येते. काजू लवकर पचतात.

    काजुमध्ये आयर्न जस्त प्रमाणात असते. यामुळे ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे, त्यांनी नियमित काजू खावेत.काजू पाण्यात भिजवून बारीक करून याचा उपयोग मसाज करण्यासाठी केल्यास त्वचा उजळेल. काजू तेलकट, शुष्क इ. प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी लाभप्रद आहे. तुमची त्वचा तेलकट असेल तर काजू रात्रभर दुधामध्ये भिजवून ठेवा.

    सकाळी काजी बारीक करून त्यामध्ये मुलतानी माती, लिंबू किवा दही थोड्या प्रमाणात मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावा.काजूमध्ये प्रोटिन्स अधिक प्रमाणात आढळतात. काजू दररोज खाल्याने हाडे मजबूत होतात. काजूमुळे दात आणि हिरड्याही सशक्त राहतात. तसेच ह्दयविकारावरही काजूही रामबाण औषण सिद्ध झाले आहे. काजूमध्ये एंटी ऑक्सिडेंट असल्याने शरीराचे वजन संतुलित ठेवले जाते.कुज उर्जेचा उत्तम स्रोत मानले जाते.

    काजू खाल्ल्याने शरीराला शक्ती मिळते. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती काजूचे सेवन करू शकतो. अनेकवेळा व्यक्तीला काही कष्ट न करता थकवा जाणवतो, अशावेळी २-३ काजू खाऊन पाहा, फरक जाणवेल. तुमचा मूड चांगला राहील. काजू खाल्ल्याने थकवा दूर होण्यास मदत होते. काजुमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते. याच्या सेवनाने केस आणि त्वचा स्वस्थ आणि सुंदर होते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • मिश्र डाळीच्या इडल्या

    आपल्या जिभेचे कौतुक पुरवण्याचे काम आपण सर्वच जण करतो. आणि त्यात दाक्षिणात्य पदार्थ अतिशय उपयोगी ठरतात. ब्रेकफास्टला किंवा कधीतरी हलके अन्न म्हणून डोसा, इडली असे पदार्थ खातच असतो. यातही पौष्टीक असे दाक्षिणात्य पदार्थ आपण घरच्या घरी करु शकतो. त्यातील एक म्हणजे मिश्र डाळींच्या इडल्या. त्याचे साहित्य आणि कृती..

  • घावन घाटले

    मशरूम

    मशरूम कॉर्न कटलेट
    साहित्य : 2 मोठे कांदे व 100 ग्रॅम मशरूम चिरलेले, 1 वाटी ओल्या मक्याचे दाणे, 1 वाटी उकळून मॅश केलेले बटाटे व ब्रेडचा चुरा, 2 चमचे बदाम काप, 1 मोठा चमचा टोमॅटो कॅचप, बटर, तूप, गरम मसाला, मीठ, मिरेपूड अंदाजे.
    कृती : तूप गरम करून कांदे परतून घ्या. ब्रेडचे तुकडे सोडून सर्व साहित्य एका नंतर एक टाकून परतून घ्या. मीठ मिरेपूड टाकून 2 मिनिटे शिजू द्या. थंड झाल्यावर ब्रेडचे तुकडे मिसळा व कटलेटच्या आकाराचे गोल बनवा. अर्धीवाटी कॉर्नफ्लोअर आणि 1/2 वाटी मश्रुम पावडरमध्ये तेल व मीठ टाकून पाण्याने पातळ मिश्रण बनवा. या मिश्रणात कटलेटस बुडवून ब्रेडच्या चुऱ्यात रोल करा. गरम तेलात सोनेरी होईपर्यंत तळा.

    मशरूम आचारी टिक्का
    साहित्यः १२-१५ मध्यम आकाराचे बटन मशरूम, १ कांदा चौकोनी चिरुन, १ भोपळी मिरची चौकोनी चिरुन, १ टोमॅटो चौकोनी चिरुन, २-३ चमचे घट्ट दही , १-२ चमचे डाळीचे पीठ ( भाजलेले असेल तर उत्तम.), २ चमचे आलं-लसुण पेस्ट , २ चमचे लोणचे मसाला. १/२ चीज क्युब किसुन, १/२ चमचा कसूरी मेथी, १/२ चमचा साखर, १ चमचा लाल तिखट, मीठ, हळद, तेल बांबु स्क्युअर्स कींवा लोखंडी सळ्या ग्रील करण्यासाठी.
    सॅलड साठी :- १ कांदा उभा पातळ चिरुन, १ टोमॅटो उभा पातळ चिरुन, मीठ, तिखट, लिंबूरस
    कृती :- प्रथम मशरूम स्वच्छ कापडाने नीट पुसुन घावेत. मश्रुम्स कधीही धुवुन घेउन नयेत त्यांना खुप पाणी सुटतं आणी ते मऊ पडतात.मशरूम ना खुप माती असेल तर एखादा स्वच्छ न वापरलेल्या टूथब्रश ने हलक्या हाताने साफ करुन घ्यावेत.देठ तसेच राहु द्यावेत. कांदा, आणि ढबु मिरचीचे मोठे चौकोनी तुकडे करुन घ्यावेत. टोमॅटो च्या मधल्या बिया काढुन त्याचे पण मोठे तुकडे करुन घ्यावेत.

    एका बाउल मध्ये दही, डाळीचे पीठ, आलं-लसुण पेस्ट, लोणच्याचा मसाला, कसुरी मेथी, साखर, तिखट, मीठ, हळद, चीज ईत्यादी सर्व मॅरीनेशन चे साहित्य घेउन नीट एकत्र करावे. हे मॅरीनेशन मशरूम, कांदा आणि भोपळी मिरची च्या तुकड्यांना सर्व बाजुनी लागेल असे चोळावे. २०-२५ मिनीट्स फ्रीज मध्ये झाकून ठेवावे. बांबु स्क्युअर्स किंवा लोखंडी सळी वर आधी कांद्याचा तुकडा, मग टोमॅटो तुकडा खुपसुन घ्यावा. मग त्यावर मश्रुम देठाकडुन खुपसावे. मग त्यावर ढबु चा तुकडा खुपसून घ्यावा. मग परत कांदा, टोमॅटो, मश्रुम आणि भोपळी असे अल्टरनेट खुपसुन घ्यावे. आता तवा गरम करुन त्यावर एक चमचा तेल सोडावे आणि त्यावर या सळ्या/स्क्युअर्स अलगद ठेवावे.गोल गोल फिरवत सगळीकडुन नीट भाजुन घ्यावे.गॅस ची आच मध्यम असावी म्हणजे करपणार नाही व नीट भाजले जातील. तंदुर ईफेक्ट येण्यासाठी डायरेक्ट गॅस च्या फ्लेम वर काही मिनिटे भाजावे. सॅलड साठी दिलेले साहित्य एकत्र करुन सॅलड करुन घ्यावे. गरमगरम मश्रुम टीक्का, सॅलड आणि लिंबाच्या फोडीसोबत सादर करावे.