उत्साहाने करित होता, सारे कांहीं इतरांसाठी
क्षीण होवूनी जाता शरीर, आधार तयाला झाली काठी...१,
धनाचा तो प्रवाह वाहतां, गंगाजळीचे पाणी पाजले
दुजाकरिता त्याग करूनी, समाधानी ते इतरा केले....२,
धन संपत्तीचे झरे आटतां, प्रेमळपणाचे शब्द राहीले
कालक्रमणाच्या ओघामधल्या, दुर्बलतेस कुणी न जाणले...३,
अपेक्षा ती सदैव असते, मिळत रहावा सहयोग
अवमूल्यन ते केले जाते, दुर्लक्ष करूनी दुर्बल अंग...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
कालचा व्हॅलेंटाईन डे.. तसा कोरडाच गेला…
स्मृतींलहरींच्या हिंदोळ्यावर
मन धावते, हरीच्या गोकुळी।।धृ।।
रवीरथी नारायण हरिमुरारी
घुमवी मंजुळ मधुरम पावरी
जागते गोकुळी राधा बावरी
छुमछुम छंदी, नाद गोकुळी।।१।।
चराचरातुनी सुरेल नादब्रह्म
हरेरामकृष्ण, गोविंद गोविंद
जीवा तोषवीतो हरि कृपाळु
देवकीनंदन, ब्रह्म ते गोकुळी।।२।।
प्राजक्त,उभा रुक्मिणी द्वारी
सडा फुलांचा सत्यभामे द्वारी
निर्मळी प्रीती, निर्मळी भक्ती
हरिहराचा भुलभुलैया गोकुळी।।३।।
-- वि. ग. सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १३७.
२० - ५ - २०२२.
जीवंतपणी घेई समाधी, ज्ञानेश्वर राजा ।
दु:खी होऊनी हळहळली, विश्वामधली प्रजा ।।
सम्राट होता बालक असूनी, राज्य मनावरी ।
हृदय जिंकले सर्व जणांचे, लिहून ज्ञानेश्वरी ।।
आसनीं बसत ध्यान लावता, समाधिस्त झाले ।
बाह्य जगाचे तोडून बंधन, प्राण आंत रोकले ।।
निश्चिष्ठ झाला देह जरी , बाह्यांगी दर्शनी ।
जागृत आसती प्राण तयांचे, आजच्याही क्षणी ।।
संचार त्यांच्या आत्म्याच्या , सदैव होत राही ।
ज्ञान भुकेल्या भाविकाला, चेतना ते देई ।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
ओठावरले गीत माझे, आज कसे हे रुकून गेले
गीतामधले शब्द रूकता, ओठ कसे हे सुकून गेले....।। धृ ।।
आकाशातील थवे पाहूनी,
चंचल माझी नजर झाली
भिर भिरणाऱ्या दृष्टी पटावर
असंख्य चित्रे उमटूनी गेली
चित्र बघूनी नाचे मन जे
पाषाणा परी स्थिर कां झाले....१
ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले
गीतामधले शब्द रूकता ओठ कसे हे सुकून गेले
झूळझूळ वाहे सरीता पाणी
पाण्यावरती दिसे तरंग
हलके हलके भिजवी अंग
पुलकीत करी रोम रोम जे
थंड आज परि होता दिसले....२
ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले
गीतामधले शब्द रूकता ओठ कसे हे सुकून गेले,
सारे कांहीं तसेच आहे
सभोवतालचा निसर्ग ठेवा
अंतर्मनही माझे आपले
लुटीत असे जो सुखद मेवा
परि दोन्हीमधले अंतर ते
आज भासते दूर जाहले...३
ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले
गीतामधले शब्द रूकता ओठ कसे हे सुकून गेले
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
पूजा पाठ करीत असतां पूजा गेलो विसरुनी
प्रभुचरणी ध्यान लागतां भान गेले हरपूनी
पूजेमधल्या विधीमध्यें बहूत तास घालविले
मनी घेऊनी आनंदे पूजा कर्म केले
पूजेमधली सर्व कृतिं कटाक्षाने पाळली
नेटकेपणासाठी योग्य साधने जमविली
वर्षामागून वर्षे गेली पूजाअर्चा करुनी
खंत मनी राहून गेली झालो नसे समाधानी
मूर्ती समोर बसूनी एक चित्त झालो
ध्यान अचानक लागूनी स्वतःसी विसरलो
आनंदाचा मार्ग मिळाला देई खरे समाधान
पूजा विधीतील भावाला असे महत्वाचे स्थान
डॉ भगवान नागापूरकर
9004079850
bknagapurkar@gmail.com
ओंकारा गणनाथा गजवदन बुद्धिदाता
कपिल अमेया विकट मोरया, तूं जीवनदाता ।।
युगेंयुगें तव सगुणरूप-अवतार एकदंता
युगेंयुगें खल अगणित नाशुन रक्षियलें जगता
युगेंयुगें जनमन, गणराया, स्तवतें तव गाथा ।।
अविरत असते नयनांसन्मुख वक्रतुंडमूर्ती
अविरत जपती हृदय आणि मुख प्रमथनाथकीर्ती
अविरत झुकुनी गजमुखचरणीं नत माझा माथा ।।
जीवन जावें तुझिया पुढती कुसुमें वाहत रे
जीवन जावें तुझिया पुढती नाचत राहत रे
जीवन जावें प्रथमपते तव गुण गातां गातां ।।
जन्मोजन्मीं वसो मनीं विघ्नेश दु:खहर्ता
जन्मोजन्मीं असो पाठिशी दंती सुखकर्ता
जन्मोजन्मीं ठेव गणेशा शिरीं वरदहस्ता ।।
- - -
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
विषण्यतेने बघत होतो,भिंतीवरच्या खुणा
काळ जाऊन वर्षे लोटली,आठवणी देती पुन्हा
बसत होतो नदीकांठी,बालपणीच्या वेळी
पात्र भरुनी वहात होती,गोदावरी त्या काळी
सदैव पूर येउनी तिजला,गावास वेढा पडे
गांव वेशीच्या घरांना मग,पाण्याचे बसती तडे
चित्र बदलले आज सारे,पात्र लहान होई
बांध घातला धरणावरी,पाणी अल्पसे येई
खिन्नपणे खूप भटकलो,भोवतालच्या भागी
चकित झाले मन बघूनी,हिरवळ जागोजागी
इच्छित दिशेने पाणी वाही,बांध घातल्यामुळे
सारे जीवन प्रफुल्ल करीं,आनंदमय सगळे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
मार्ग निसर्गाचे सदा, निश्चीत आणि अढळ
चालतो त्याच दिशेने, जसजशी येते वेळ....१
चालत आसता थांबे, भटके वाट सोडूनी
करूया काही आगळे ठरवी तो विचारांनी....२
आगळे वेगळे काय, त्याला जे वाटत असे
नियतीची वाट मात्र, त्या दिशेने जात नसे....३
परिस्थितीचे कुंपण, टाकले जाते भोवती
कळत वा नकळत, मार्गी त्यास खेचती....४
करून घेतो निसर्ग, वाटते त्याला हवे जे
अकारण तुम्हा वाटते, हे तर आहे माझे....५
जीवनाच्या सांजवेळी, बघता मागे वळूनी
प्रवास केला आगळा, हेच येते समजूनी....६
मिळूनी काही आगळे, समाधानी वृत्ती येते
आनंदाने निरोप घ्या, नियती तुम्हा सांगते....७
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti