(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • व्यसनासक्ति विषयी !

    दारु, बिडी-सिगार, अफू, गांजा, त्यांचा राजा गर्द !

    लत लागतां, कित्येक संसार, त्याने केले सारे बरबाद

    अजगराच्या विळख्याहूनी, महाभयंकर सत्य

    एक नव्हे, अनेक सारे, नष्ट होतील त्यांत

    होत आहे उध्वस्त आमची, तरुण ही मंडळी

    नशेच्या ह्या चक्रामध्ये, गुंतली जी सगळी

    जाणूनी घ्या त्या शत्रुला, छुपा रुस्तूम तो

    प्रवेश एकदा शरिरीं मिळतां, कायमचा तो राहतो

    सहज काढून टाकीन त्याला, नका करुं वल्गना

    घेऊन जाईल प्राण तुमचे, हीच त्याची गर्जना

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • मुलीच्या कविता

    बालपणात
    एकत्र खेळतात सगळे मुलंमुली
    वय वाढत जाते भवतालचं
    मुलीचं वय जरा लवकरच वाढत असते .

    'आता तू मोठी झालीस ' ऐकू येते
    वेळीच एकत्र खेळणं थांबवावं
    .......असं वाटणं अनुभवाचं .

    कसं सांगावं
    वेगळे असतात आतून सगळे
    वेगळे असतात स्पर्श
    वेगळे असतात खेळ
    वेगळ्या असतात नजरा
    आणि
    मुलात माणूस
    अन माणसात नरपण , पशूपण वाढत असते .

    -- कौशल ( श्रीकांत पेटकर )

  • पत्थर हो, गर्जना धडकुनी मागे फिरते

    गझल; जाती: समजाती-पद्मावर्तनी-अनलज्वालाl मात्रा: ८+८+८=२४मात्रा

  • आस्तित्व

    समोर ये तूं केंव्हा तरी,
    बघण्याची मज ओढ लागली,
    फुलूनी गेली बाग कशी ही,
    बीजे जयांची तूच पेरीली ।।१।।

    कल्पकता ही अंगी असूनी,
    दूरद्दष्टीचा लाभ वसे,
    अंधारातील दुःखी जनांची,
    चाहूल तुज झाली असे ।।२।।

    शीतल करुनी दुःख तयांचे,
    जगण्याचा तो मार्ग दाखविला,
    सोडूनी सारे वाटेवरी,
    आकस्मित तू निघूनी गेला ।।३।।

    आस्तित्वाची चाहूल येते,
    आज इथे केंव्हातरी,
    तव आशीर्वादे जगतो सारे,
    हीच पावती त्याची खरी ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

  • भोंडले (१)

    ऐलोमा पैलोमा वरळीच्या देवा
    माझा प्रोग्रॅम होऊ देईन तुला मेवा
    माझ्या प्रोग्रॅम लागला मराठी चॅनलवर
    तिकडून आला नातू त्याने बदलला सत्वर

    एक चॅनल बदलू बाई
    दोन चॅनल बदलू
    दोन चॅनल बदलू बाई
    झी चॅनल बदलू
    झी चॅनल बदलू बाई
    सोनी चॅनल बदलू

    सार्‍या चॅनलची चाचणी
    पहाल तेथे नाचगाणी
    करिष्मा समता मनाली बौंद्रे
    भोवती नाचती हूप हूप वानरे
    आकूया वाकूया अर्धे शरीर झाकूया
    करिष्मा तुझी पाच वर्षे
    मनालीची सहा वर्षे
    नंतर मनाही राहणार भाव
    आहे तोवर खावा भाव

  • केश कर्तनालयात

    न्हाव्याने विचारले साहेब
    कोणता कट मारू?
    मी म्हणालो कोणताही मार
    पण कटकट नको करू!

    न्हाव्याने विचारले साहेब
    गोविंदा कट का सचिन कट?
    मी म्हणालो कोणताही चालेल
    पण कर सगळं सफाचट

    न्हाव्याने विचारले साहेब
    दाढी मिशी पण करू?
    मी म्हणालो दाढी भादर
    पण मिशीला नको लावू कातर!

    न्हाव्याने विचारले साहेब
    करू का मालिश चांगला?
    मी म्हणालो करायचं तर कर
    पण नको करूस टकलाचा तबला

    न्हावी म्हणाला आरसा भरून
    साहेब, कसा दिसतोय कट?
    मी म्हणालो बसा जरा खाली धर
    टकलाचाच दिसतोय चांदोबा कट!

    न्हावी म्हणाला साहेब
    काखा वर करा मारतो बगल
    मी म्हणालो अरे बाबा
    काखा वर करून कसं भागल?

    -- विनायक अत्रे.

  • बालपणी रमतांना (ओवीबद्ध रचना)

    इवलेसे लहानसे
    होते विश्व ते छानसे
    चार भिंतितले कसे
    ते मोरपंखी जसे।।१।।

    मनमानी वागायचे
    हवे तेव्हा उठायचे
    दिस कोड कौतुकाचे
    पिलू आई-बाबांचे।।२।।

    भोकाड पसरायचे
    लोटांगण घालायचे
    ढोंगी बगळा व्हायचे
    खोटच रडायचे।।३।।

    पोट दुखतं म्हणावे
    घरी खुशाल लोळावे
    आईच्या मागे फिरावे
    अभ्यासाला टाळावे।।४।।
    बालपणी रमतांना
    गमती आठवतांना
    खुप खुप हसतांना
    गंमत वाटतेना।।५।।

    सौ.माणिक शुरजोशी

  • गोकुळीच्या आम्ही गोपिका

    गोकुळीच्या आम्ही गोपिका,निघालो विकण्या दूध, लोण्या कितीदा विनवावे तुज श्रीरंगा, उशीर होई मथुरेच्या बाजारां,--!!

    करून सगळी आवरां -आवरी, निघालो आम्ही सगळ्या सत्वरी कामे सारी भराभरा आटोपुनी, डोईवर घेऊनी भरलेला घडा,--!!

    ठुमक ठुमक चालीची
    नक्कल करीत थांबशी, ‌‌ उगी आम्हां विलंब करीशी काय केला आम्ही गुन्हा,-!!

    नको नको रे मारुस खडा,
    ओघळ दह्यादुधाचे पहा, दंगेखोर किती तुमचा जथा,
    मिळून घालता ना डांका--!

    गोंडस तव रूपाला देखण्या,
    नुसते आम्ही बघत राहतां,
    अल्लद हे घडेही पळवतां, नवनीत सारेफस्त करतां, सांगा काय समजवावे तुम्हां,
    दया कर आम्हांवर कान्हा,-!

    भांडू कातुझ्याश गोविंदा* पाहता तुला,कासाविशीजीवां
    सोड, वाट मनमोहना ,
    कसे सांगावे नंद -यशोदा,--!

    हिमगौरी कर्वे.©

  • दुजातील ईश्वर

    दिसत नाही काय तुला, त्याच्या मधला ईश्वर ।
    ‘अहंब्रह्मास्मी’ सूत्र कसे मग, तुजला कळणार ।।

    देह समजून मंदिर कुणी, आत्मा समजे देव ।
    त्या आत्म्याचे ठायी वाहती, मनीचे प्रेमळ भाव ।।

    आम्हा दिसे देह मंदिर, दिसून येईना गाभारा ।
    ज्या देहाची जाणीव अविरत, फुलवी तेथे मन पिसारा ।।

    लक्ष केंद्रीतो देहा करीता, स्वार्थ दिसे मग पदोपदी ।
    विसरून जातो सहजपणे, अंतर्मनातील देव कधी ।।

    माझ्यातील देवही विसरणे, स्वभाव असेल जर माझा ।
    कशी दिसेल दुजामधली, मग ती ईश्वरी ऊर्जा ।।

    जाणून घे तू अस्तित्व त्याचे, सर्व जीवांच्या अंतर्यामी ।
    म्हणशील त्याला ईश्वर तू , अन् ईश्वर आहे मी ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

  • जखमांचे वण

    किती खाल्ला मार, किती खाल्या शिव्या याची गणतीच नव्हती.
    एकच गोष्ट सतत कानी पडत होती.
    उनाड आहे, बावळट आहे, धडपड्या आहे, तडफड्या आहे, मूर्ख कुठचा.
    भडीमार होत होता आईकडून शब्दांचा..
    आम्ही होतो बालपणीच गांधीवादी.
    एका गालांत कुणी मारली तर दुसरा गाल पुढे करणारे.
    मुकाट्यानें मान वर न करता सारे शब्द पचविणारे.
    खेळणें, कुदणें, उड्या मारणें,
    त्यातच ढोपर, कोपर, हातपाय फुटून जाणें, भळभळा रक्त वाहायचे.
    पण सांगा रडून कुणाला ?
    कारण ते असायचे स्वतःच्याच प्रतापाचे...
    निमुटपणें बाजूस बसून, सहन करायचे
    आणि कुणास समजू नाहीं म्हणून माती टाकायचे.
    भरत होत्या साऱ्या जखमा हलक हलके.
    न भरून कसे चालायचे ?
    मस्तीची रग, खेळातील धडपड आणि स्वत:च डॉक्टर बनून जखामाबद्दल वाटणारी मायेची कढ.
    सारे तुटून पडायचे, घाव बरे करण्यासाठी.
    ... संध्याकाळची वेळ, सूर्य अस्ताला चाललेला.
    किती घटका राहील्या होत्या त्याला डुबण्यासाठी !
    विचार करितो मी. शांत बसून पंचाहत्तरीच्या काठी.
    हातपाय खाजवितो, कुरवाळीतो सुरकुतलेल्या कातड्याकडे बघतो.
    मध्येच नजर खिळून राहते ती जखमांच्या वणावर.
    कितीतरी लहान मोठ्या आकाराची.
    ज्यावर दिसत होती चित्रे आठवणीची.
    प्रत्येक वणावर होता एक इतिहास, एक घटना, एक जबरदस्त प्रसंग.
    कोडगे बनून केलेली मस्ती, आईचा मार, शिव्या आणि बाबांचा राग.
    पण आज सारे काही मनाला आनंदीत करून टाकणारे.
    शरिरावरले वण बनले होते एक जीवन आलबंम.
    नेत होते भूतकाळांत.
    जो होता निश्चित आणि उपभोगलेला.
    त्यात भविष्यकाळाची अनिश्चितता नव्हती कि वर्तमान काळाची क्षणिकता.

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०