बघा बघा तो रवि चालला, अतिशय वेगानें ।
पूर्व दिशेला चंद्रही येई, त्याच तन्मयतेने ।।
युगानु युगें लपंडाव हा, त्यांचा चालला असे ।
भावांमधली शर्यत बघूनी, गम्मत परी भासे ।।
मोठा भाऊ रवि त्याला, पकडण्या धांव घेई ।
लहान भाऊ चंद्र असूनी, निसटून मात्र जाई ।।
संताप येता लाल होऊनी, रवि जाई तापूनी ।
परि शांत असे चंद्र बघा, राग घेई गिळूनी ।।
लहान असूनी थकून जाई, कांही काळ जाता ।
नभीं न येतां घरींच झोपे, थकवा जाण्या करीता ।।
विश्रांतीचा काळ घालवूनी, हलके हलके येई ।
पुनरपि त्यांचा खेळ बघतां, आनंद मनास होई ।।
मीच माझा गुरू, जे मनी ठरवू
विचारांती तेच करू ....।।धृ।।
सल्ला घेईन सर्वांचा, वाटे मज किंमतीचा
मनाची कदर करूं...१
मीच माझा गुरु
निर्णय असे अनेक, सारेच असती ठिक
निवड एकाची करूं...२
मीच माझा गुरु,
इतरांना जे वाटते, माझ्या सोईचे नसते
सोईचा आग्रह धरूं...३
मीच माझा गुरू
शेवटीं माझ्या करिता, गोष्टीची उपयोगिता
स्वतःसाठीं योग्य करू...४
मीच माझा गुरू
ईश्वर वसतो मनीं, इच्छा त्याची समजोनी
आदर त्याचाच करूं...५
मीच माझा गुरू
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
बदलीत गेलो घरे मी माझी, आज पावतो कितीक तरी ।
पोटासाठीं नोकरी करतां, भटकत होतो आजवरी ।।
बालपण हे असेंच गेले, फिरता फिरता गावोगावी ।
वडिलांची नोकरी होती, धंदा करणे माहीत नाही ।।
पाऊलवाट तीच निवडली, मुलाने देखील जगण्यासाठी ।
तीन पिढ्या ह्या चालत राही, एका मागून एकापाठी ।।
गेले नाहीं आयुष्य सारे, स्थिर राहूनी एके जागी ।
देश वेळ आणि घरे निराळी, जगलो होतो विविध अंगी ।।
शरीर देखील असेच आहे, आत्म्याचे ते छोटे घरकुल ।
मिळवित असतां सत्व तेज ते, देह सोडूनी दूजात जाईल ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
प्रेम-स्वभाव असे ईश्वरी गुण
मनीं ठसला हा आत्म्यांत राहून
प्रेम करावे वाटे आंतरिक ही ओढ
ज्याची मुळे खोल पडने अवघड
आपसांतील प्रेम आत्म्यातील नाते
न दिसता देखील बांधलेले असते
सर्व जीवाविषयीं सहानुभूती भासे
ह्रदयामध्ये ती सुप्तावस्थेत दिसे
आमचे राग लोभ बाह्य संबंधामुळें
षडरिपू विकार शारीरिक सगळे
वाईट गुणधर्म देहाशीं निगडीत
चांगले जे कर्म आंतरीक इच्छेत
राग येऊन केंव्हां दुष्कृत्य घडते
पश्चाताप वाटता मन शांत होते
कितीही दुष्ट असो प्रेम भाव असतो
आनंदाच्या प्रसंगीं उभारुन तो येतो
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
कळत नाही कुणाचं का पुन्हा नाव येतं आहे,
शांत ओठांवर तुझंच नकळत नाव येतं आहे.
विस्मृतीच्या वाटेवरती ठेवले कितीही पहारे,
आठवणींचे मोडुनी सारे ठाव येतं आहे.
टाळतो मी चांदण्यांना, टाळतो सुगंधी वारे,
का पुन्हा प्रत्येक श्वासात भाव येतं आहे?
रोज माझ्या हासण्यामागे लपविले किती मी अश्रू,
जखम जुनी जागी करून घाव येतं आहे.
शोधताना मी स्वतःला दूर गेलो सर्वांपासून,
तुझ्याच दारी शेवटी हे पाऊल येतं आहे.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
आजूबाजूचा परिसर सपाट ओसाड होता. जसे जसे आम्ही गिरनार पायथ्याशी पोहचत होतो, आम्हला गिरनारच्या डोंगर रंगांचे दर्शन होत होते. गिरनार पायथ्याला गिरनार तलेठी म्हणतात.
ठोका खोकी
बनवा खोपी
ही झोपडपट्टी
गटारावरी
भटारखाना
आणि हातभट्टी. ||१||
ओसंडे घन
दुर्गंधि-घाण
कचरा सडला
तिथेच भ्रामक
जीवन नामक
खेळ मांडला. ||२||
रोज ठणाणा
नविन घोषणा
सुधारणांच्या.
शून्यें असतीं
नांवावरती
सरकारांच्या. ||३||
मंत्री येतां
जिवंत प्रेतां
बघुन न बघती
गोठ्यामधली
ढोरें सगळी
तशीच ज़गती. ||४||
चक्रव्यूह रणिं
रचला कोणी
मुळी न ठाउक
अभिमन्यूंची
भेट मृत्युशी
इथेंच घाउक. ||५||
-- सुभाष स. नाईक
मजला नव्हते ज्ञान कशाचे, पद्यामधल्या काव्य रसाचे ।
कोठून येते सारी शक्ती, काव्य रचना करूनी जाती ।।
अवचितपणे विचार येतो, भावनेशी सांगड घालीतो ।
शब्दांचे बंधन पडूनी, पद्यरूप जातो देऊनी ।।
सतत वाटते शंका मनी, हे न माझे, परि येई कोठूनी ।
असेल कुणी महान विभूती, माझे कडूनी करवून घेती ।।
तळमळ आता एक लागली, जाणून घ्यावी शक्ती आगळी ।
अर्पीन माझे प्राण त्याला, स्फूर्ती देवता जो मज झाला ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
हपालेल्या निष्ठूर काळा,
समाधानी तू कसा होशील,
बळी घेण्याचे सत्र तुझे ते,
केंव्हां बरे तू थांबवशील ? ।।१।।
नित्य तुला भक्ष्य लागते,
वेध घेई टिपूनी त्याचा,
मिस्कीलतेने हासत जातो,
गर्व होई स्वकृत्याचा ।।२।।
अवचित कशी ही भूक वाढली,
मात करूनी त्या वेळेवरी,
सूडानें पेटूनी जावूनी,
बळी घेतले गरीबांचे परी ।।३।।
काळ येई परि वेळ न आली,
म्हणून सदा हताश होतो,
वेळेची ढिलाई बघूनी,
तांडव नृत्य करीतो ।।४।।
शांत होऊ दे क्रोध तुझा ,
बळी कुणाचा राग कुणावरी,
‘वेळवरती’ अवलंबूनी तूं,
जाण ठेव याची तरी ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
"मी कुणाला कळलो नाही"
मित्र कोण आणि शत्रू कोण
गणित साधे कळले नाही..
नाही भेटला कोण असा
ज्याने मला छळले नाही...
सुगंध सारा वाटीत गेलो
मी कधीच दरवळलो नाही..
ऋतू नाही असा कोणता
ज्यात मी होरपळलो नाही..
केला सामना वादळाशी
त्याच्या पासून पळालो नाही..
सामोरा गेलो संकटाना
त्यांना पाहून वळलो नाही..
पचऊन टाकले दु:ख सारे
कधीच मी हळहळलो नाही..
आले जीवनी सुख जरी
कधीच मी हुरळलो नाही..
कधी ना सोडली कास सत्याची
खोट्यात कधीच मळलो नाही..
सोडून गेले माझेच मला
"मी कुणाला कळलोच नाही.."
"मी कुणाला कळलोच नाही"
-- संकलन : अशोक साने
फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो.. लेखकाचे नाव माहित नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti