तप्त लोखंडात, लपली ती आग
दिसे लाल लाल, जाळी सर्व भाग...१,
सुंदर फूलात, सुंगध तो छान
अवती भवती काटे, ते कठीण...२,
विजेची ती तार, प्रकाशी दिव्याला,
झटका तो देई, स्पर्श होता तिला..३,
सुखाच्या पाठीशीं, असे दुःख छाया
न दिसे ती आम्हा, असे मोह माया...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
शब्द जरी जाहले अबोल
मौनी मन, मनाशी बोलते
द्वंद्व! ते सत्य, असत्याचे
जीवाला सदा खात असते
कर्म! मनी बिलोरी आरसा
स्वचे, खरे प्रतिबिंब दिसते
जरी प्रतारणा जगाशी केली
सत्यता उरीची जीवा छळते
सर्वांती नोंदणी ती चंद्रगुप्ती
लेखाजोखा, सामोरी मांडते
जन्म! कर्म विवेकी, संचिती
अर्थ! मुक्ती, मोक्षाचा सांगते
प्रीती, सद्भावना सदा सांगाती
सत्य! सूर्यप्रकाशी समोर येते
-- वि. ग. सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. ३९.
८ - २ - २०२२.
ठरविक वेळ, ठरविक जागा, बरेच महिने असे चालले होते.. अचानक दिसेनासे झाले.
तुम्ही गेला आणि गेले सुकूनी माझे काव्य
समजूनी आले रूप तुमचे होते जे दिव्य १
तुमच्या अस्तित्वाने मजला येत असे स्फूर्ती
प्रफूल्लीत ते भाव सारे ओठावर वाहती २
कोकीळ गाते गाणे जेंव्हां वसंत फुलतो वनी
मोर नाचे तालावरती श्रावण मेघ बघूनी ३
हासत डोलत कळी उमलते प्रात: समयी
दवबिंदूच्या वर्षावाची किमया सारी ही ४
गात नाचत फुलत राहतो चैतन्याने कुणी
स्फूर्ती देवता हवी तयाला येण्या उचंबळूनी ५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
पूर्णपणें मज पटले आतां
कविता कुणी करवून घेतो
कोण असेल तो माहित नाहीं
मजकडून तो लिहून घेतो
घ्यानी मनीं कांहींही नसतां
विषय एकदम समोर येतो
भाव तयांचे जागृत होऊन
शब्द फुले ती गुंफून जातो
एका शब्दानंतर दुसरे
आणि तिसरे, लगेच चौथे
शब्दांची ती भरुनी ओंजळ
माझ्या पदरीं कुणी टाकतो
गुंफण करुनी हार बनता
त्याजकडे मी बघत असे
फक्त प्रभूचे नाम घेऊनी
अर्पण त्याला करीत असे
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
तनमन हृदयी एकची ब्रह्माण्डनायक
मागेन हिशोब तुझ्याकडे,
कधीतरी माझ्या एकटेपणाचा, सुरकुतलेली पुस्तकातली फुले, देतील साक्ष;
नि सांगतील तुलाच ,
आपल्या ओठांवर,
बघ ते गुलाब ठेवून,
सुगंधित निघेल ग अत्तर, सुरकुतलेल्या पाकळ्यांमधून ,
आपल्या प्रेमाचं,
त्या विफल प्रेमाचा,
करून टाक सौदा,
प्रेमातल्या आणाभाकांचाच व्यवहार*,---!!!
हिमगौरी कर्वे.©
(अरुणा साधू, मुंबई) – माझे यजमान “अरुण साधू” ह्यांना जाऊन दोन वर्ष होत आहेत. २५ सप्टेंबर ला ह्यांचा दुसरा स्मृतीदिन. दिवस,वर्ष सरतात, पण क्षणाक्षणाला त्यांची आठवण येते आणि माझे मन व्याकुळ होऊन जाते. ह्या व्याकुळतेतून सुचलेली ही कविता…..
उत्साहाने आला होता, मुंबई बघण्याकरिता,
रम्य स्थळांना भेट देणे, ही योजना मनी आखता ।।१।।
मान्य नव्हती त्याची योजना, नियतीच्या चाकोरीला,
पाकीट पळवूनी त्याचे, घाला कुणीतरी घातला ।।२।।
धन जाता हाता मधले, योजना ती बारगळली,
अवचित त्या घटनेने, निराशा तेथे पसरली ।।३।।
जात असता सरळ मार्गी, दुष्टपणाला बळी गेला,
समाजाला धडा शिकवण्या, सूडाने तो पेटून गेला ।।४।।
वाम मार्गी जावून त्याने, तेच धन पुन्हा कमविले,
सूड घेतला असून देखील, समाधान ते नाही लाभले ।।५।।
दुष्ट वृत्तीची वलये ती, फिरत असती सभोवती,
सूड अहंकार लोभही, त्यानाच गतीमान करती ।।६।।
एका वरचा राग तुम्ही, फैलविता सहजपणे,
तोडून टाका ही वलये, प्रेम दया या भावनेनें ।।७।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
स्वयंप्रेरित, स्वयंप्रेषित हे सदा आपल्या जोषात
आभाळओझे घेऊन खांद्यावर धावधावती कैफात
नाही साथ कुणाची, नाही कसली सहानुभूती
तरीही चिंता जगाची, आसक्तीची करुन सक्ती
कुणी वंदा कुणी निंदा, करे कुणी वा वंचना
नादावलेल्या कर्मयोग्यांची असे व्रतस्थ आराधना
अशक्याचा हव्यास त्यांना, अचूकतेचा ध्यास केवढा
सौख्याशी करुन वाकडे, पुकारत स्वत:शी स्वत:चा लढा
आत्यंतिकाची अस्वस्थता सततच्या जणू प्रसूतिवेणा
अखंड असे हा होम पेटता, धगधगती अंतःप्रेरणा
रोरावणाऱ्या प्रपातास, कुठे कधी का उसंत आता
नशीबी त्यांच्या ती, तेवढी, एक शेवटची शांतता
बदकांच्या कुडीत कोणी कोंडिले हे राजहंस गोजिरे
अश्वत्थामाच्या जखमेला घेऊन कपाळीच्या देव्हारे
जनाकलनाच्या कक्षेपार भ्रमणारे हे भूस्तरीय तारे
ओसंडणाऱ्या गर्दीतही, एकाकी व्यथित बिचारे
हिंदोळून पारंब्यांना आशेच्या, लोंबकळती हुतात्मे
आसूसले प्रतीक्षेत मुक्तीच्या, केव्हाचे शापित आत्मे
- यतीन सामंत
Copyright © 2025 | Marathisrushti