तिळगुळाचा
सण स्नेहाचा
संक्रांती सण
महाराष्ट्राचा
पतंग उडे
नभात सडे
पतंगाचेच
युद्धची झडे
ही काटाकाटी
नी वाटाघाटी
मौजची भारी
प्रितीची दाटी
सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
१३/१/२०
समकालीन भारतीय साहित्य पत्रिकेला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साहित्य अकादमीने विभिन्न भारतीय भाषेतील निवडक साहित्य “चयनम “ नावाने नुकतेच प्रकाशित केले आहे. समकालीन भारतीय साहित्य पत्रिकेचे संपादक व हिंदी साहित्यिक श्री अरुण प्रकाश यांनी “चयनम “ चे संपादन केले आहे. साहित्य अकादमीच्या सुवर्ण जयंती वर्षा निमित्त ही योजना अस्तित्वात आली आहे.
नव्हतो कधींही कवि वा लेखक कसे घडले कांहीं न कळले
साहित्य सेवेचा गुण मिळूनी काव्य मजला सूचू लागले १
वाङ्मयाविषयी प्रेम होते वडीलांना त्या काळी
अथांग ज्ञान त्यांनी मिळविले पुस्तके वाचूनी सगळी २
खो – खो मधल्या खेळा सारिखे खो देत ते गेले बसूनी
साहित्याची ठेव सोपवूनी मज ते गेले चटकन निघूनी ३
गोंधळून गेलो होतो मनीं नव्हते ज्ञान कांहीं मजला
बरसत असतां त्यांचे ज्ञान छिद्रे होती मज झोळीला ४
कुणीही नसता मार्गदर्शक घडत होते सारे अवचित
चेतना देण्यास मज लागी आशिर्वाद त्यांचा होता सतत ५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
राधे, केवढा केशसंभार,
जीव गुंतला त्यात फार,
का असे ते मोकळे सोडशी,
केसांची जादू मिरवशी, --!!!
रक्षक की मी या विश्वाचा,
दुसरा तिसरा नच" कोणता,
असे असूनही बघ किती,---
केशकलापां पडलो फशीं,--!!!
केस तुझे मानेवरून रुळती,
बटां -बटां वाऱ्यावर खेळती,
बघावे तेव्हा मनसोक्त डुलती, अडके त्यात जीव, हीच भीती--!!!
सुंदर काळेभोर कुंतल,
खूप त्यात खोल गुंतती,
त्यातच सुवासिक तेलगंध, रात्रं-दिन पाडे मोही,--!!!
तुझ्या गोऱ्या मुखड्यावर,
केसांची महिरप काळी,
गोजिरवाणे रूप तुझे,--
येते त्याला मादक झळाळी,--!!
जीवघेणा मदनबाण मारा,
कसे तुझे कुंतल, करिती,
या माऱ्याने सर्वस्व हरलो
तुजसाठी क्षणक्षण झुरलो,
द्वैतातील अद्वैत साधुनी,--
दोन जीव लागले प्रेमापाठी,--!!!
हिमगौरी कर्वे.©
मर्यादेचा बांध घालूनी, मर्यादेतचि जगती सारे ।
अनंत असता ईश्वर , मर्यादा घाली त्यास बिचारे ।।
जाण जगाची होई इंद्रियांनी, त्याला असती मर्यादा ।
विचार सारे झेपावती, ज्ञान शक्ती बधूनी सदा ।।
अथांग वाटे विश्वमंडळ, दाही दिशांचा भव्य पसारा ।
ईश्वर आहे थोर त्याहूनी, मोजमापाच्या उठती नजरा ।।
कशास करीतो तुलना सारी, भव्य दिव्यता आम्हा दाखवूनी ।
अज्ञानाने पडती मर्यादा, अनंत तत्वास त्याच क्षणी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
समर्थ नाहीं कुणी, जाणून घेण्या प्रभूला,
थोटके पडतो सारे, घेण्यास त्याच्या दयेला ।।१।।
बरसत असे दया, प्रचंड त्या वेगाने,
दुर्दैवी असूनी आम्हीं, झेलतो फाटक्या झोळीने ।।२।।
असीम होते कृपा, पात्र नसूनी कुणी,
तो बरसत राही सतत, परि आहे सारे अज्ञानी ।।३।।
दयेच्या तो प्रवाह, वाहात राही नदीसारखा,
डुबती कांहीं त्यांत, परि न दिसे अनेकां ।।४।।
नशीब लागते थोर, पेलण्यास दया ती,
जलांत असूनी कांहीं तहानलेली राहून जाती ।।५।।
शिवून तुमची झोळी, प्रथम पात्र व्हा सारे,
सदैव उघडी आहेत, कृपेची त्याची द्वारे ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
झालो मी अठरा वर्षांचा
म्हणुन मिळे अधिकार नामी.
मत देण्याचा.
या दिवशी मी आहे राजा
ताजा ताजा.
उलथिन मी नेत्यांची तख्तें
बदलिन मी नावांचे तक्ते.
-
तख़्त - सिहासन
-- सुभाष स. नाईक
काय केले दुःख विसरण्याला
युक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला ।।धृ।।
निराशेच्या काळांत
दुःख होते मनांत
हार झाली जीवनांत
शांत राहण्याचा मार्ग, त्यावर शोधला ।।१।।
युक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला
चूक राई एवढे
दुःखाचा पर्वत पडे
मनीं पश्चाताप घडे
भोग भोगण्या, झालो तयार ।।२।।
युक्ति जमली नामीं आनंद आणण्याला
एकाग्र चित्तांत
जातां ध्यानांत
डूबता आनंदात
विसरुन गेलो जगाला ।।३।।
युक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला
सारी ऊर्जा जाई
ध्यानांत एकरुप होई
त्यांत ईश्वर पाही
ऊर्जा शिल्लक न राही, दुःख भावनेला ।।४।।
युक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
पाऊस येता मन जाते भाराऊनी
सृष्टीचे रुप जाते हिरवेगार होऊनी
अनेकांच्या मनातले विचार पाऊस घेतो जाणूनी
म्हणूनच ती गाणे गाते संगीतमय होऊनी
तृप्त होते जीवसृष्टी मातीचा गंध घेऊनी
पण हाच पाऊस कधी कधी जातो काळ बनूनी
चातकालाही आवडे पाऊस भारी
तो थकतो पावसाची वाट बघूनी
समुद्र जातो खवळूनी
किनाऱ्यावरील लोक जीव मुठीत बसतात धरुनी
लहान मुले लुटतात मजा पावसात खेळूनी
धबधबाही खेळतो हिरव्यागार सृष्टीतूनी
वाट पाहते तुझी डोळे भरुनी
पण जीवसृष्टीला नको टाकू रडवूनी
- भाग्यश्री सतीश प्रधान
सौख्य, समृद्धीच्या पंखाखाली
जरी निश्चिंती, मी सदैव जगलो...
तरीही अव्यक्त हुरहुर अनामिक
स्मरणगंध सारे उसवित राहिलो...
उसवीणे ते, आनंदी आत्मरंगले
धागे सारे शब्दात गुंफित राहिलो...
प्रीतभावनांचे पदर ते दवभरलेले
गीतात, नित्य आळवित राहिलो...
तरीही अजुनही हुरहुर अनामिक
आत्मारामा अंतरी शोधित राहिलो...
हुरहुर जरी ती, तरीही शांती सुंदर
मनास माझ्या समजावित राहिलो...
साक्षी, उभी अंगणी प्रसन्न बकुळी
तीलाच स्मरत मी गंधाळत राहिलो...
--वि.ग.सातपुते.( भावकवी )
9766544908
रचना क्र. १८५
२/८/२०२२
Copyright © 2025 | Marathisrushti