“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
येत्या १५/२० वर्षात एक पिढी हे जग सोडून जाणार आहे ! कटू पण खरेच सांगत आहे…..
एक दिवस आमचा
तीनशे चौसष्ट त्यांचे
रस्तोरस्ती अत्याचार
सामुदायिक बलात्कार
वृद्धा, प्रौढा, लहान मुली
कुणीही चाले त्यांना
दुसर्या दिवशी भरे
पेपराचा रकाना
हुंडाबळी, जळीत प्रकरणे
वाचून दगड झालीत मने
दोन ओरखाडे भितींचे
माझे ही घर मातीचे
टीव्ही शो बघताना
तोकड्या कपड्यात नाचे टिना
डोळे फाडून चवीने पाहतो
एकमेकींना टाळ्या देतो
आठ मार्च येतच राहणार
स्त्री शक्तीचे नारे ऐकणार
जोरदार टाळ्या देणार
आज ते हात आमचे
उद्या लेकी सुनांचे
परवा नाती पणतींचे
तरीही माझे घर मातीचे
माझे घर मातीचे
-- सौ. सुधा मोकाशी
कृष्ण कमळ-
क्षणक्षण येते तुझीच आठवण
देवा सत्य तुची ब्रह्मांडी दिगंतर
जगव्यवहारी मी जगत रहातो
त्या जगण्यावीण नाही गत्यंतर
जगता जगताच कळूनी चुकते
आणि मीच येतो त्वरी भानावर
दिल्या घेतल्याचेच हे जग सारे
अनुभवांती उलगडती प्रीतपदर
सुख दुःख जन्मता सदा सोबती
भाळी प्रारब्धाचे भोगणे निरंतर
हा जन्म विवेकी जगण्यासाठी
खुणगाठ मनी माझिया निरंतर
मुक्तीमोक्ष जरी कुतार्थ जीवन
भगवंता मी तुज स्मरतो निरंतर
*********
--वि.ग.सातपुते. (भावकवी)
(9766544908)
रचना क्र. ३१९
४/१२/ २०२२
अधरंमधुरं घुमवित वेणू..
त्रैलोकी ब्रह्मरूप आगळे..
ब्रह्मानंदी..! मंत्रमुग्धता..
गगन ईश्वरी , निळेसावळे..।।..१
अस्ताचली रवी केशरी..
नभांगण ! ते सप्तरंगले..
सोज्वळ ती तिन्हीसांजा..
दिव्यत्वाचे , दिव्य सोहळे..।।..२
लोचनी , श्रीरंग सावळा..
सावळबाधा ती ब्रह्मांडी..
सखा , कृपावंत आगळा..
कन्हयाचे , रंगरूप सावळे..।।..३
कृष्ण,कृष्ण तो मनप्रांगणी..
गंध भृकुटी , बुक्का भाळी..
सुवर्णकांती भर्जरी पितांबर..
मयूरपिसी ते स्पर्श आगळे..।।..४
ब्रह्म ! सारेच निलकांती..
कृष्ण दंगल्या मीरा राधा..
चराचरी , वृंदावन गोकुळ..
श्रद्धाभक्तीचे रूप आगळे..।।..५
©️वि.ग.सातपुते.(भावकवी.)
( मुक्तरचना )
मी अलवार कवटाळीतो
अंतरीच्या गतआठवांना
हॄदयस्थ, ते ध्यास भास
स्मृतींनाच, उलगडताना....
भावस्पर्ष ! मृदुल कृपाळू
जगविती माझ्या स्पंदनांना
अबोल ओंजळ भावनांची
मी, रिती कुठे करू कळेना....
दिव्यत्व,भक्तीभावप्रीतीचे
वेदनांची, क्षालनी सांत्वना
ओघळ लोचनी जाणिवांचे
स्मृतींचा, गंधाळ हुंगतांना....
माथी आभाळ सावळबाधी
सांजवेळी हुरहुर पाऊलांना
ओढ, हरिपावरीच्या सुरांची
मी नित्य आळवितो दयाघना....
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २३२
१२/९/२०२२
आज आमच्या आजोबांचा काही वेगळाच होता नूर
आजीला म्हणती चल जाऊया, फिरायला खूप दूर
काठी सोडून हाती घेतला
तिचा सुरकुतलेला हात
तिच्या इश्श मध्ये कळली, तिची अंतरीची साथ
नाना-नानी पार्क सोडून
धरली चौपाटीची वाट
जूने दिवस आठवले, पाहून झेपावणारी लाट
ओलसर वाळूचा बसायला घेतला पाट
दुखत नव्हते आता, कंबर-ढोपे-पाठ
अहो दात नाहीत तरी घेतले
चणे-दाणे चघळायला
गजराही घेतला आजोबांनी
तिच्या ईवल्या आंबाडयांत माळायला
आजूबाजूच्या तरुणाईची दखल कुठली दोघांना?
निसटून नव्हत दयायच नं ह्या मोरपंखी क्षणांना
बोलता बोलता क्षितीजावर
चढू लागली लाली
आणि साक्षीला चंद्राची स्वारी देखील आली
आता खट्याळपणाला रंग चढला
आजोबांच्या रोमरोमात
आजीला म्हणती नभीचा चंद्र , दिसतोय तुझ्या डोळ्यात
अहो आज नाही तुमचा माझा
वा वाढदिवस लग्नाचा
मग शिळ्या कढीला म्हणते मी
एवढा ऊत आलाय कशाचा?
अग, फार दिवसाची इच्छा होती
तुला माहीत नसेल वेडे
जाण्यापूर्वी वाटल, आपणही साजरा करावा कि
एखादा व्हॅलेंटाईन डे, एखादा व्हॅलेंटाईन डे
-- सौ. अलका वढावकर
वंदन वंदन त्या विभूतीला..
मानवतेच्या महामानवाला..।। धृ ।।
जो जाणतो अर्थ मानवतेचा..
मानव! एकच धर्म मानवी..
सर्वाठायी एकची आत्मा..
वंदन वंदन त्या विभूतीला..।।..१
विवेकीनिधर्मी,चारित्र्यागृही..
स्पृश्यास्पृश्यतेचा, विरोधक..
जगती, मानवतेचाच पुजारी..
वंदन, वंदन त्या विभूतीला..।।..२
प्रज्ञावंती, नितीज्ञ तो सहिष्णू..
मानवी संस्कृतीचा अध्यापक..
बुद्ध! आगळाच परिवर्तनाचा..
वंदन, वंदन त्या विभूतीला..।।..३
भारतीय संविधानाचा उद्गाता..
जगतवंद्य! हा श्रेष्ठमहामानव..
अमर, देशभक्त भारतभूमीचा..
वंदन, वंदन त्या विभूतीला..।।..४
भीमराव! सर्वांचाच कैवारी..
ज्ञान, विज्ञानाचा असे पाईक..
आदर्श पुत्र, हा भारतभूमीचा..
वंदन, वंदन, त्या विभूतीला..।।..५
रचना:-वि.ग.सातपुते.(भावकवी)
ज्या ज्या वेळी धीर ठेवशी
मिळेल कांहीतरी
गडबड मनां होऊन जातां
निराशाच पदरीं ।।१।।
शांत चित्त आपुले
तूं ठेव प्रत्येक समयी
मिळेल यश पदरी तुझ्या
खात्री याची घेई ।।२।।
आत्मविकास तूं सोडूं नको
आपल्या कामाचा
मोबदला मिळेल तुजला
योग्य प्रयत्नाचा ।।३।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti