(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • तुला लाभलेली निसर्ग देणगी

    खळी पडून गालावरी सुंदर तूं दिसते

    आनंदाचे भाव दर्शनी मधूर तूं हांसते ।।१

    इवले इवले ओठ फूलपाकळ्यांपरि

    लांब लांब केस काळे भुर भुर उडती मानेवरी ।।२

    मोत्यासारखे दांत भासे कुंदकळ्या

    बदामाचा आकार मिळे तुझ्या डोळ्या ।।३

    इंद्रधनुष्याचा बाक दिसे भुवयाला

    चाफेकळीची शोभा मिळाली नाकाला ।।४

    चमकते अंगकांती फाटलेल्या झग्यातूनी

    दिसते निसर्गाची देणगी तुझ्या गरीबीतूनी ।।५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • बलात्कार

     

  • मीच एक सर्वज्ञ

    जगीचा, साराच छद्मीपणा
    सुज्ञजन, सारे ओळखून आहे

    सत्यता! विकृत मनांमनांची
    साऱ्यांनाच, तशी ज्ञात आहे

    काही, आत्मप्रौढी मिरविणारे
    स्वतःला मी सर्वज्ञ मानत आहे

    ते झाले जरी, थोडे आत्ममुख
    स्वओळख त्यांची होणार आहे

    जो शहाणा त्याचा बैल रिकामा
    माणसा ही जगाची रहाटी आहे

    मी,पणाचा आव कुणा नसावा
    गर्वाचे घर नेहमीच खाली आहे

    नम्रता, कृतज्ञता सदा वंदनीय
    मीत्व! सर्वथाच निंदनिय आहे

    करू नये सान, थोर इथे तुलना
    सरणी सर्वां सारखा न्याय आहे

    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ३७.

    ६ - २ - २०२२.

  • निसर्गाचे मार्ग

    आखून देतो निसर्ग सदा,
    मार्ग जीवनाचे ।
    त्या वाटेवरी चालत रहा,
    आवाहन त्याचे ।।१।।

    चालत राहती जे जे कुणी,
    त्यावरी विसंबूनी ।
    यशस्वी होती तेच जीवनी,
    समाधान लाभूनी ।।२।।

    कर्ता समजूनी काही काही,
    अहंकारी होती ।
    सुख- दु:खाच्या चक्रामध्ये,
    तेच सापडती ।।३।।

    भटकत जाती भिन्न मार्ग,
    काही कळापरि ।
    परिस्थितीचे चटके बसता,
    येती वाटेवरी ।।४।।

    हिशोबातील तफावत ही,
    दु:खाचे कारण ।
    नजीक जाता आखल्या मार्गी,
    सुखी होई जीवन ।।५।।


    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • पुण्य संचय करा

    ज्या ज्या वेळी येई संकट, धांव घेत असे प्रभूकडे ।
    संकट निवारण करण्यासाठीं, घालीत होता सांकडे ।।

    चिंतन पूजन करूनी, करीत होता प्रभू सेवा ।
    लाभत होती त्याची दया, त्याला थोडी केव्हां केव्हां ।।

    संकटी येता करी पूजन, उपयोग होईना त्याचा ।
    कामी येईल पुण्य , विचार करीतां भविष्याचा ।।

    संचित पुण्य आजवरचे, कार्य सिद्धीला लागते ।
    सुख दु:खाच्या हर समयीं, ठेवा मुखीं प्रभू नामाते ।।
    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • माझा प्रेमविवाह

    तिचं मा़झं प्रेमप्रकरण जेव्हा
    तिच्या घरी माहित पडलं
    बोलणं भेटणं बंद करून तिनं
    मला एक पत्र धाडलं..!!
    दारात उभा राहून तिच्या मी
    म्हणालो तिला चल राणी येशील का
    आठ दिवसांची मुदत मिळालीय
    खरंच सांग मला नेशील का...!!
    एका विवाहमंडळात डायरीतली
    तारीख पाहून मुहुर्त ठरला..
    नातेवाईक दोघांचेही नव्हते म्हणून
    मामाचा मळवट भटजीनेच भरला..!!
    हळद नव्हती मेंदी नव्हती
    पाचशेचा शालू शंभराचा चूडा..
    जून्या ड्रेसवर मी मुंडावळ्या बांधून
    तिथेच उरकला साखरपुडा...!!
    दोन चार मित्र मैत्रिणी तिच्या
    दोन-चार माझ्याही होत्या..
    वरात अशी जंगी निघाली..
    करवल्या मात्र कुठेच नव्हत्या...!!
    थम्पस्अप आणि वेफर्सची
    पंगत शेवटी बसली होती..
    पेढ्याचा घास घेऊन डोळे पुसता पुसता
    ती माझ्यासाठी हसली होती...!!

    ..... राजेश जगताप..

    मुंबई ९८२१४३५१२९

  • बहिणीची हाक

    राखण करीतो पाठीराखा, भाऊ माझा प्रेमळ सखा,
    विश्वासाचे असते नाते, एकाच रक्तामधून येते ।।१।।

    आईबाबांचे मिळूनी गुण, तुला मला हे आले विभागून,
    हृदयामधली ज्योत त्यांच्या, तेवत आहे आज आमच्या ।।२।।

    प्रकाश झाला परंपरेनें, त्याला माहित पुढेच जाणे,
    मार्ग जरी भिन्न चालले, मूळ तयाचे खालीं रूजले ।।३।।

    अघात पडतां तव वर्मी, दु:खी होऊन जाते बघ मी,
    दिसत नाही कुणा हे बंधन, जीव श्वासाचे अतूट स्पंदन ।।४।।

    भांडत रूसत हासत होतो, जगण्यामधला भाग असे तो,
    खेच खेचता ढील सोडतां, सुटत नाहीं मग तो गुंता ।।५।।

    बाह्यांगीं तूं दूर आहे जरी, तव प्रतिमा ही राही अंतरी,
    बघत राहते तुझी भाऊबीज, आठवणीत मी जगते आज ।।६।।
    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • गाथा यशाची, वैभववाडीतील सुपुत्राची…!

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मांगवली गावचे सुपुत्र श्री महेश संसारे यांच्या यशाची गाथा आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी आहे. जिद्द, चिकाटी आणि मेहनत याचे मूर्तिमंत उदाहरण त्यांनी आपल्या कर्तृत्वातुन कृषिक्षेत्राला प्रदान केले.

  • हवापाणी

    माणसाचे तेज डोके
    कसे पिकू लागले?
    निसर्गात मिळे फुकट
    तेच विकू लागले!

    हवा होती मुक्तवावर
    बंदिस्त होऊ लागली
    रस्त्यावर , दुकानात
    पैसा कमवू लागली!

    पाणी होते प्रवाही
    बाटलीबंद झाले
    जारबंद संस्कृतीला
    पैसे मोजू लागले!

    माती तर अमापच
    बघा जिथे तिथे मिळे
    विटा पाडून भट्टीवर
    बंगले बांधू लागले!

    हवा, पाणी, मातीची
    अशी चालू लूट आहे
    कुरतडे उंदीर तशी
    विनाशाची वाट आहे!

    -- विठ्ठल जाधव
    शिरूरकासार, जि.बीड
    सं.९४२१४४२९९५

  • झेंडू

    उन्हातही फुलावेस
    असा तुझा रूबाब आहे
    निसर्गाचे वरदान
    पिवळाझेंडू लाजवाब आहे
    कशास शोधू तो स्वर्ग
    कुठला कुणास ठाऊक ?
    बळीराजा इथेच घडवितो
    दार स्वर्गाचे मनभाऊक..

    विठ्ठल जाधव
    शिरूरकासार (बीड)
    सं. ९४२१४४२९९५