(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • समाधानी वृत्ती

    कशांत दडले समाधान ते
    शोधत असतो सदैव आम्ही
    धडपड सारी व्यर्थ होऊनी
    प्रयत्न ठरती कुचकामी

    बाह्य जगातील वस्तू पासूनी
    देह मिळवितो सदैव सुख
    क्षणीकतेच्या गुणधर्माने
    निराशपणाचे राहते दुःख

    'समाधान' ही वृत्ती असूनी
    सुख दुःखातही दिसून येती
    चित्त तुमचे जागृत असतां
    समाधान ते सदैव मिळते

    सावधतेने प्रसंग टिपता
    समाधान ते येईल हाती
    सुख दुःखाला दुर सारता
    अंतरभागी समाधान दिसती

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

  • तन मनातील तफावत

    देह मनाच्या वया मधील, तफावत ती दिसून येते
    चंचल असूनी मन सदैव, शरिर परि बदलत राहते...१,

    चैतन्ययुक्त ते मन सदा, स्थिर न राहते केव्हांही
    जन्मापासूनी मृत्यूपर्यंत भाग दौड ती चालत राही...२,

    परिस्थितीच्या चौकटीमध्यें, विचारांचा दबाव राहतो
    शरिराच्या सुदृढपणाचा, मनावरती परिणाम होतो...३,

    दिसून येते केव्हां केव्हां, मन अतिशय उत्साही
    परि शरिराचा दुबळेपणा, मनास त्याक्षणी साथ न देई....४

    विचित्र होते वातावरण ते, जेव्हां मनास साथ ना मिळे
    विचारांच्या चुका होऊनी, दु:खी होते जीवन सगळे...५

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • अभिलाषा

    ************
    मन मुक्त विरक्त आता
    अभिलाषा उरली नाही
    संवेदनाशून्य काळीज
    चिंता कशाचीच नाही....
    कोलाहल उगा अंतरी
    तो कधीच संपत नाही
    स्पंदनांची चाहूल संथ
    सामर्थ्य चैतन्यी नाही....
    उदय अस्त कालचक्री
    त्याला कधी अंत नाही
    सहज सुखा पांघरताना
    केवळ स्वार्थी होवू नाही....
    हरिहर जाणतो सर्वकाही
    तिथे कुणास सुटका नाही
    हे सत्यब्रह्मांडी सुर्यप्रकाशी
    याचा विसर मना पडू नाही....
    **********************
    -वि.ग.सातपुते.( भावकवी )
    रचना क्र. ९
    एप्रिल /२०२३
    9766544908
  • ऐ, भिमा..!!

    डाॅ.बाबासाहेब आंबेडकर…यांचं नाव घेऊन राजकारण करून सामान्य माणसाला स्वातंत्र्यानंतर पासून दूर ठेवलेल्या अनु याची खदखद व्यक्त करणारी मुक्त छंद कविता

  • वातावरण

    विचारांची उठती वादळे ।

    अशांत होते चित्त सदा ।।

    आवर घालण्या चंचल मना ।

    अपयशी झालो अनेकदां ।।

    विषण्णतेच्या स्थितीमध्यें ।

    नदीकांठच्या किनारीं गेलो ।।

    वटवृक्षाचे छायेखाली ।

    चौरस आसनावरी बसलो ।।

    डोळे मिटूनी शांत बसतां ।

    अवचित घटना घडली ।।

    विचारांतले दुःख जाऊनी ।

    आनंदी भावना येऊं लागली ।।

    एक साधूजन ध्यान लावीत ।

    बसत होता त्या आसनावरी ।।

    पावित्र्याची वलये फिरती ।

    आसन दिसले रिकामें जरी ।।

    वातावरणाची ही किमया ।

    अनुभवते प्रखरतेनें ।।

    शुद्ध अशुद्ध विचार येती ।

    सभोवतालच्या जाणिवेने ।।

    डॉ. बगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • तुझ्याशिवाय

    तुझ्याशिवाय,

    दिन भासे राती सारखा,
    रात्र उजाडता भकास पसरे,
    दिन उन्हासारखा,--!!!

    तुझ्याशिवाय,

    पावसाळा अगदी कोरडा,
    वर्षाव संजीवनाचा भले,
    होत राही सारखा,--!!!

    तुझ्याशिवाय,

    हेमंत ऋतू येता,
    उदासपण भरलेले,
    जीवन अव्याहत चालता,--!!!

    तुझ्याशिवाय,

    आगमन होते शिशिराचे,
    मन पालवी गारठून जाते,
    दूर -- दूर तू राहता, -!!!

    तुझ्याशिवाय,

    ग्रीष्म ही भासे रुक्ष पहा,
    अधिक अधिक करत राहे,
    काहिली जिवाची माझ्या,--!!!

    तुझ्याशिवाय,

    ऋतू सगळे निष्काम बनतां,
    आससून मी वाट पाहते,
    माझ्यात मीच नसतां,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

  • सळसळली पाने ऋतू हिरवा बावरा

    सळसळली पाने ऋतू हिरवा बावरा
    फुलांत उमलला गंध मोहक साजीरा
    नटली वसुंधरा शेला हिरवा ल्याला
    उमलल्या कळ्या धुंदीत चैतन्य सळसळला
    आनंदाचे गाणे पक्षी उंच आकाशी विहारता
    बगळ्यांची माळ फुले एका ओळीत बद्धता
    पानोपानी बहरला निसर्ग भवताल सारा
    खुणावे मन अलगद हे पाहून नजर फुलोरा
    उधळून मोती सौंदर्य मोहक खुलवी नजारा
    देवाने निर्मिली ही सुंदर मनोहर निसर्ग सत्ता
    कोण न यावर अधिकारी माणूसही असे खुजा
    निसर्गाचे लेणे सुरेख हे पहावे नतमस्तक होता
    सृजनाचा सोहळा सारा रंगीत बेधुंद नटला
    नजर थबकेल पाहून हा रंगीत बेधुंद निसर्ग सोहळा

    -- स्वाती ठोंबरे.

  • असा मी काय केला गुन्हा?

    कुठले नाते? खरे की खोटे?
    काही कळेनासे वाटे !
    बंधने तोडोनी नात्यांची,
    इज्जत गेली पुर्षार्थाची !

    कशी नाही रे शर्म वाटली तुला,
    आपल्याच मुलीची अब्रू लुटतांना?
    जन्मदात्यानेच अब्रू लुटल्यावर,
    समजले मला आईच्या नशिबीचे भोग !
    विश्वासावे सख्या भावावर,
    पण त्यानेही केला कळस सर्वांवर !

    जन्मल्याच केली असतीस हत्या तर,
    निदान अब्रू आली नसती चव्हाटयावर !
    तूटले असते माझे नाते तुमच्या बरोबरचे
    मुलगी आणि बहिणीचे !

    काय माझ्याकडून प्रज्ञापराध झाले,
    ज्याने मी अनाथ आणि पोरकी झाले !
    बेअबृची लक्तरे माझ्या नावापुढे चिकटली,
    आणि जीवनाची घडी विस्कटली !

    देवा हात झाडूदेत स्त्रीची अब्रू लुटणाऱ्यांचे,
    तरच देवा मिळेल तिला खरा ज्ञाय !
    चित्र दिसूदे स्त्रीचा सन्मान करतांना,
    नाहीतर लागेल सर्वांना तिची हाय !

    देवा शिकव सर्व नराधमांना,
    स्त्रीचा मान ठेवायला !
    आणि सुरक्षा देण्याला,
    नाहीतर दिसेल इतिहासाची पुनरावृत्ती होतांना !!

    स्वप्नातही आणू नकोस अशी काळ-वेळ कुणावर,
    नाहीतर निसर्ग कोपेल आपल्यावर !

    जगदीश पटवर्धन

  • पुण्याचा साठा

    खिशांत माझ्या पडली होती, सुटी नाणी काही

    वस्तूंची ती खरेदी करण्या, सर्व बाजार पाही....१,

    सराफ्याच्या दुकानी दिसला, एक हिऱ्याचा हार

    डोळे माझे चमकूनी गेले, फिरती गरगर...२,

    दाम विक्रीचे जाणूनी घेता, हताश मी झालो

    हातातील धनाचे मोजमाप, करू मी न शकलो...३

    दोन वेळची पूजा करूनी, जप माळ जपती

    खूप साचले पुण्य आपले, हे कांहीं समजती....४,

    कसा मिळेल ईश्वर त्यांना, तपोबलाच्या अभावी

    जन्मोजन्मीचे पुण्य साचता, दर्शन मिळे प्रभावी....५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • मुक्तछंद…..

    थोडंसं झुकून माझ्या डोळ्यांवर , तुझ्या पापण्या ठेव,---
    त्यांच्यातील ओलावा घे टिपून, अलगद हृदयापर्यंत थेट,---
    जखमी मनाला असा दिलासा,
    तूच देऊ शकशील बघ,
    घायाळ मनाची करूण व्यथा, तुलाच फक्त समजेल,---!!!
    त्यातली शल्यें, टोंच, बोंच, त्यातला सगळा आक्रोश,
    तुझ्यापर्यंतच ना पोहोचेल,-? रक्ताळलेला तो प्रत्येक अश्रू , बघण्याची, पुसण्याची कुवत,--- तुझीच असते नेहमीच,---!!!
    त्या दुःखाला जीवघेण्या,
    सुखात करतोस परावर्तित,
    ही अशी जादू विलक्षण,
    येते तरी तुझ्याकडे कुठून,--? वाटते कधी,-- सगळं संपलं,
    कडेलोटाकरता उभे आपण,
    पण तुझा जादू - ई-- स्पर्श,
    थरारून उठते सगळे तनमन,--
    लहान वाटतं दुनियेचं वर्तुळ,
    इतकं मोठ्या आकाराचं,
    माझं तुझं प्रेमावकाश,--!!!
    कधीतरीच छळतं एकटेपण,
    आसवं गळतात डोळे मिटल्यावर, यातना वेदनांची ती सरमिसळ, मध्ये भासतोस तू ,-उभा पहाड, खडा होतो कोसळता जीव, सामावण्यासाठी तुझ्या मिठीत यातना वेदना पडतात मागेच,
    येऊन तू करतोस अमृतस्पर्श,--!!!

    © हिमगौरी कर्वे.