छम छम बाजे
पैंजण माझे
मी अप्सरा स्वर्गाची
देवलोकींच्या राज्याची ।। धृ ।।
स्वर्गामघुनी आले भूवरी
धडधड होती तेव्हां उरी
तपोभंग तो करण्यासाठीं
आज्ञा होती इंद्राची ।। १।।
मी अप्सरा स्वर्गाची
देवलोकींच्या राज्याची
तपोबलाच्या सामर्थ्यानी
प्रतिसृष्टी बनविली ज्यांनी
सत्वहरण ते अशा ऋषीचे
परीक्षा ठरली दिव्यत्वाची ।। २ ।।
मी अप्सरा स्वर्गाची
देवलोकींच्या राज्याची
भाग्य माझे थोर कसे
विश्वामित्राना जिंकले असे
मात्रत्वाचे रंग भरुनी
देई देणगी शकुंतलेची ।। ३।।
मी अप्सरा स्वर्गाची
देवलोकींच्या राज्याची
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
-- वर्षा कदम.
मनाची समजूत कशी घालावी
नेत्री साक्ष तुझ्याच अस्तित्वाची
सांगना मी तुला गं विसरु कसे
हुरहुर मनाला तव प्रीतसुखाची
क्षणाक्षणांच्या झुल्यावर झुलते
निर्मल, प्रीतगंगा गतआठवांची
प्रीतीविना कां? असते जीवन
लाभते प्रीती, संचिती सुखाची
कोवळ्या कळीत मकरंद मधुर
भ्रमरास ओढ़ त्यात मिटण्याची
सत्यप्रीती! अवघे मर्म जन्माचे
त्याविण नसे, प्रचिती सुखाची
भावप्रीतीचेच, निष्पाप चांदणे
कृपा सार्थकी, त्या भगवंताची
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १५३
२१ - ६ - २०२२.
ओरिसातील जगन्नाथपुरी येथील जगन्नाथाचे ( भगवान श्रीकृष्णाचे) मंदिर खूप प्रसिद्ध आहे. तेथेच घडलेली ही एक प्राचीन कथा आहे.
त्या नगरीत जयदेव नावाचा हरिभक्त राहत होता. श्रीकृष्णावरील भक्तीपोटी त्याने 'गीत गोविंद' हा ग्रंथ लिहिला. तो खूपच लोकप्रिय झाला. अतिशय प्रासादिक व मधुर रचना असलेला हा ग्रंथ घराघरात पोहोचला होता. त्या नगरीचा राजाही कृष्णभक्त होता. त्यानेही असाच एक ग्रंथ लिहिला होता. मात्र लोकांनी त्याचा फार स्वीकार केला नाही. राजाला त्याची फार मोठी खंत होती. त्यामुळे त्याने आपल्या राजसत्तेचा वापर करून आपला ग्रंथ लोकांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचाही फारसा फायदा झाला नाही. नगरीतील प्रजा ' गीत गोविंद' याच ग्रंथाचे पारायण करी.
त्यामुळे राजा आणखीनच अस्वस्थ झाला. त्याने काही पंडितांना बोलावून यावर मार्ग काढण्याची सूचना केली. त्यावर पंडितांनी ग्रंथाबाबत जगन्नाथाचाच कौल घेण्याची राजाला विनंती केली. जगन्नाथाच्या मंदिरातील गाभार्यात जयदेव याचा 'गीत गोविंद' आणि राजाचा ग्रंथ असे दोन्ही ग्रंथ ठेवायचे. जगन्नाथाला जो ग्रंथ आवडेल तो गाभार्यात राहील व नावडता ग्रंथ मंदिराबाहेर पडेल, असे गृहीत धरून मंदिरात कौल मागण्यात आला.
दोन्ही ग्रंथ रात्री मंदिराच्या गाभार्यात जगन्नाथापुढे ठेवले गेले व सर्वाच्या समक्ष मंदिराला कुलूप लावण्यात आले. दुसर्या दिवशी राजासह सर्व लोकांना असे दृश्य दिसले की जयदेवचा ग्रंथ मंदिराच्या गाभार्यात आहे व राजाचा ग्रंथ मंदिराच्या बाहेर आहे.
जगन्नाथाचा कौलही आपल्या विरोधात गेल्याचे पाहून राजाही खूपच व्यथित झाला व त्याने मंदिरातच प्राणार्पण करण्याचे ठरविले. तलवारीने तो आपला शिरच्छेद करणार तेवढ्यात प्रत्यक्ष जगन्नाथ प्रकट झाले व त्यानी राजाला थोपविले. ते राजाला म्हणाले की, तुझ्या भक्तीबद्दल मला आदर आहे. मात्र जयदेवाचा ग्रंथ श्रेष्ठ आहे यात मुळीच शंका नाही. मात्र तुझ्या ग्रंथातील चोवीस ओव्या जयदेव याच्या ' गीत गोविंद ' ग्रंथात घातल्या जातील.
ते ऐकून राजाचे समाधान झाले.
असे म्हणतात की, जयदेव याच्या त्या 'गीत गोविंद' ग्रंथात राजाने रचलेल्या चोवीस ओव्या नंतर लोकांना पहायला मिळाल्या.
तुझ्या आठवणीत
शब्द विरघळतात
पाझरतात भावनां
हळवा होतो एकांत...
मी आभाळ पहातो
तरळतेस तूच नेत्रात
हाच भास विलक्षण
हळवा होतो एकांत...
ही सुरम्य प्रीत वेडी
तुझेच रुप पापणीत
मी मज भुलुनी जाता
हळवा होतो एकांत...
स्मरण तुझेच लाघवी
नित्य माझ्या अंतरात
तुजविण सुनेच सारे
हळवा होतो एकांत...
--वि.ग.सातपुते.( भावकवी )
9766544908
रचना क्र.२०८
१९/८/२०२२
येतात तुझे आठव,
डोळ्यांत काळे ढग,
उरांत फक्त पाझर,
शिवाय नुसते रौरव ,--!!!
येतात तुझे आठव ,
होते सरींची बरसात,
चित्तात उठे तूफान",
मनात चालते तांडव,--!!!
येतात तुझे आठव,
प्रीतीचे हे संजीवन ,
स्मृतींचे मोठे आवर्तन,
त्यांचे लागती न थांग,---!!!
येतात तुझे आठव,
सरींची त्या उधळण,
शब्दांचे पोकळ वाद,
कल्पनांचे नुसतेच डाव,--!!!
येतात तुझे आठव,
अश्रू असूनही शुष्क,
मन मात्र पाणथळ,
कसानुसा होई जीव,--!!!
येतात तुझे आठव,
भोवती दुःखाची पाचर,
सहवासाचे अमृतथेंब
, कधी बनती विष:कण,--!!!
येतात तुझे आठव,
प्रेमाचे निव्वळ भास,
आत्म्यात फक्त उलघाल,
काट्यांची बनते शेज,--!!!
येतात तुझे आठव,
कधी येईल राघववेळ,
कुशीत तुझ्या शिरून,
संपवेन दुर्भाग्याचा खेळ,--!!!!
©️ हिमगौरी कर्वे.
वा झुरळा,
खबरदार जर पंख फुलवोनी जाशील पुढे,
मुडदा पाडीन तुझा गधड्या
हा मी मर्द मराठ्याचा वंशज असे
म्यान न करातले का तुला हे दिसे
दचकलो पाहून तुला मी न कीटका
मारुनच तुला मी टाकीन उसासे ॥
क्षुद्रा जरी चावला होतास मला,
तरी शूर वीर मी न तुला चावलो
धर्मयुद्ध खेळीन शर्थीचे मी
हा पहा तलवार आणण्या चाललो ॥
असेल रंग तुझ्यासारखा तिचा
पण गंजली म्हणून म्हणू नको
भ्यायलो तुला मी, समजून
विकट असा हासू नको ॥
-यतीन सामंत
तुम्ही गेला आणि गेले सुकूनी माझे काव्य
समजूनी आले रूप तुमचे होते जे दिव्य
तुमच्या अस्तित्वाने मजला येत असे स्फूर्ती
प्रफूल्लीत ते भाव सारे ओठावर वाहती
कोकीळ गाते गाणे जेंव्हां वसंत फुलतो वनी
मोर नाचे तालावरती श्रावण मेघ बघूनी
हासत डोलत कळी उमलते प्रात: समयी
दवबिंदूच्या वर्षावाची किमया सारी ही
गात नाचत फुलत राहतो चैतन्याने कुणी
स्फूर्ती देवता हवी तयाला येण्या उचंबळूनी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
लुळा पांगळा बसूनी एकटा, गाई सुंदर गाणे,
आवाजातील मधूरता, शिकवी त्याला जगणे....१,
जगतो देह कशासाठी, हातपाय असता पांगळे
मरण नसता आपले हाती, जगणे हे आले.....२,
लुळा असला देह जरी, मन सुदृढ होते
जगण्यासाठी सदैव त्याला, उभारी देत होते.....३,
गीत ऐकता जमे भोवती, रसिक जन सारे
नभास भिडता सुरताना, शब्द उमटती वाह ! वा रे ! ....४,
असमान्य ते एकचि मिळता, उणीवतेची खंत कशी
दुबळ्या देही कला श्रेष्ठ ती, वीज चमकते रात्री जशी....५
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
पहाटे पहाटे गांजाचे दम लावून आमची गँग सफाई मोहिमेवर निघाली काही जणांच्या हातात झाडू होते , तर काहींनी खराटे आणले होते मात्र दोन जणांनी काहीच आणले नव्हते त्यांना विचारले तर म्हणाले घरचे झाडू , खराटे सकाळी घरी लागतात म्हणून नाही आणले , मात्र हे दोघेही एकदम झकपक कपडे घालून आले होते त्यापैकी एकाने नवा ‘सफारी ‘ आकाशी रंगाचा तर दुसऱ्याने झब्बा आणि पायजामा घातला होता क्रीम कलरचा , मला त्यांचे ते कपडे पाहून जरा नवल वाटले हे असे कपडे घालून हे कसले झाडू मारणार ?
Copyright © 2025 | Marathisrushti