युगा मागुनी युगे संपली सुर्याभोवती फिरते अवनी
मिलन त्यांचे कधी होईना सूर्याची ती पाठ सोडेना ।।१।।
October 4, 2025
आणखी एक बॉम्बस्फोट
शांततेच काळीज चिरून गेला
पुन्हा एकदा निरपराध्यांच रक्त चाखून गेला
आणखी एक बॉम्बस्फोट
सर्वसामान्यांची झोप उडवून गेला
संपूर्ण देशात भयाच सावट पसरवून गेलां
आणखी एक बॉम्बस्फोट
पुन्हा तोच प्रश्न विचारून गेला
ज्याच उत्तर देण्यापूर्वी ईश्वरही झोपी गेला
आणखी एक बॉम्बस्फोट
मानवतेला काळिमा फासून गेला
डोळ्यातील अश्रुनैवजी रक्त गोठवून गेला
आणखी एक बॉम्बस्फोट
डोक बधिर करून गेलां
जीवनात जगण्याची खात्री नाही हे पटवून गेला
कवी – निलेश बामणे
February 22, 2013
१० वर्ष आईची.. पुढली
१० बाबांची.
१० दिली नवऱ्याला..
१० दिली मुलांना..
सर्वार्थाने केवळ त्यांची.
आता मात्र मुक्त हो...
ही १० स्व:तःची...
वाच, नाच, मौज कर...
हवे ते ते स्वैर कर.
पुढील १० आहेत मग
त्याच्या-आपल्या तब्येतीची...
त्या पुढील १० वानप्रस्थ...
संसारातून निवृतिची.
म्हणून म्हणते...
हीच १० वर्षे फक्त तुझी
नाहीत दुसऱ्या कुणाची
सूनेच्या संसारातही
नाक न खुपसण्यायची
आताच मस्त जगून घे
खळखळून हसून घे
प्रेमात पड स्वतःच्याच
लाड कर स्वतःचेच
स्वतःवरच रुसून घे
नवऱ्याला मार काखोटीला
जग सारे फिरुन घे
देव करो तुला मिळावी
१० वर्षे स्वैर सुखाची.
देव करो तुला कळो
महती स्वत:च्या एका क्षणाची....
March 17, 2017
साथ लतावेलींची,
सोबत झाडफांद्यांची,
संगत तूप साखरेची,
तशी जोडी आपुली,
आपण दोघे पती-पत्नी
असूयांत जन्मोजन्मी,--!!!
हिमगौरी कर्वे.©
June 19, 2019
कुणीतरी आवडणे हे प्रेम नाही,
त्याच्याशिवाय दुसरं कोणीच न आवडणे हेच खरं प्रेम आहे.
नुसत्या नजरा भिडल्या म्हणून प्रेम होत नाही,
मनाने मनाला अलगद स्पर्श केला की प्रेम फुलतं.
रोज हजारो चेहरे समोरून जातात,
पण एकच चेहरा डोळ्यांत कायमचा विसावतो.
असंख्य आवाज कानावर येतात,
पण एकाच हाकेने हृदय धडधडू लागतं.
अंतर कितीही वाढलं तरी,
आठवणींचा धागा कधी तुटत नाही.
वेळ कितीही बदलली तरी,
मनातील ओढ कधी कमी होत नाही.
रागातही काळजी असते,
अबोलपणातही प्रेम दडलं असतं.
स्वार्थाच्या पलीकडे जपणं,
प्रत्येक दुःखात खंबीरपणे सोबत उभं राहणं,
आणि प्रत्येक श्वासात तिची चाहूल लागणं,
यालाच खरं प्रेम म्हणतात.
कारण...
प्रेम म्हणजे फक्त "मी तुझ्यावर प्रेम करतो" एवढंच नसतं,
प्रेम म्हणजे "तू आनंदी असावीस" ही मनापासूनची प्रार्थना असते.
म्हणूनच...
कुणीतरी आवडणे हे प्रेम नाही,
त्याच्याशिवाय दुसरं कोणीच न आवडणे हेच खरं प्रेम आहे.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
July 16, 2026
सुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
May 13, 2012
नवलाईचे विश्व सारे, नवलाईतच जगते
आगळ्याच्या शोधामध्यें, नव-नवीन इच्छीते
ताजे वाटते आज जें, शिळे होई उद्यांच ते
प्रवाही असूनी जीवन, बदल घडवीत जाते
मुल्यमापन बदलांचे, संस्कारावरी अवलंबूनी
परिस्थीतीच्या भोवऱ्यामध्यें, विचार फिरे क्षणोंक्षणीं
मुळतत्व ते राही कायम, आकार घेई जसा विचार
ताजा शिळा भाव मग तो, ठरविला जाई वेळेनुसार
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
August 24, 2015
November 9, 2013
December 14, 2021
भोपाळ येथे विषारी वायुमुळे एका रात्रीत सहस्त्रावधी लोक मृत्यूमुखी पडले. ४.१२.८४ ची रात्र...
एक भयानक रात्र अशी,
सहस्त्रावधींचा घेई बळी ।
नियतीच्या खेळामधली,
कुणा न समजे ही खेळी ।।१।।
मध्यरात्र होऊन गेली,
वातावरण शांत होते ।
गादीवरती पडून सारे,
स्वप्ने रंगवीत होते ।।२।।
तोच अचानक विषारी वायू,
पसरला त्या वातावरणी ।
हालचालींना वाव न देता,
श्वास रोखीले स्वप्न थांबवूनी ।।३।।
कित्येक जनांचे बळी घेतले,
काळ्या काळाने ।
शांत निद्रेची महा निद्रा,
करूनी टाकीली क्षणात त्याने ।।४।।
भरडून गेले सारे परि,
पापी वा पुण्यवान ते ।
कळला नाही हिशोब त्याचा,
मोजमाप काय असते ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 9, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti