सह्यगिरीच्या डोंगररांगा
हिरवाईने नटून बहरल्या |
रंगबिरंगी रानफुले गोजिरी
भाळावरती त्यांनी माळीली |
संततधारा शिरी बरसात होत्या
मेघातुनी अलवारश्या रेषा |
झाकोळून गर्द रंग हा गहिरा
घननीळ नभातच मिसळून गेला |
वेध लागले सहस्त्ररश्मीला
कधी पाहतो शृंगार धरेचा |
हळूच बाजूला करुनी ढगांना
थोपविल्या त्या झरझर धारा |
अलगद पसरली रवी किरणेही
सोन पाऊली धरणीवर उतरली |
उघडून निळी आभाळाची छत्री
प्रतिबिंब पडे नदीच्या पात्री |
व्योमाच्या या लख्ख उजेडात
सातारा माझा उजळुन निघाला |
सृष्टीच्या ऐकून या काव्या
भैरोबा पेढ्याचा हसला ||
?मी सदाफुली
©✍️संध्या प्रकाश बापट

कां व्हावे निवृत्त मी ? कुणी सांगतो म्हणूनी
निसर्गालाच सांगू द्या वय झाले समजूनी
कार्यक्षमता माझ्या मधली मोजमाप हे कुणी करावे ?
विकलांग होईल केंव्हा शरीर निसर्गालाच हे ठरवूं द्यावे
सहजची जगतो ऐंशी वर्षे संसार सागरी पोहता पोहता
स्थिरावले मन विचार करुनीं निवृत्तीची जाणीव येता
सर्वासंगे जगता जगता शेवटचा तो श्वास ठरु दे
हासत खेळत आनंदाने ह्या जगाचा निरोप घेऊं दे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
सुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
जीवनात सदैव तू
पुढे बघून चालशील
अडखळलेल्या खड्ड्यांची
जाणीव ठेवुन वागशील
कर्तव्यापासून तू कधी
दूर नको पळू
तुटलेल्या त्या स्वप्नांसाठी
आसु नको ढाळू
सर्व काही मनासारखे होइल
अशी अपेक्षा नको धरूस
पण तुझ्या आवडी निवडींना
कधी नकोस पुरूस
संसार हि तारेवरची कसरत
नंतर तुला कळेल
इतकी ही तडजोड नको करूस
कि मन तुझं जळेल
माहित आहे मला तुला
सारं कसं निटनेटक लागतं
जास्त हट्ट नको करूस
चुकून नातं ते फाटतं
जीवन आहे ते बाळा
कधी वादळ यायचं
आयुष्य थोड विस्कटलं
तर नाराज नाही व्हायचं
शपथ आहे तुला बाळा
माझं थोडं तू ऐकायचं
विरहाची जाणीव नको
अगदी आनंदाने तू जगायचं
सर्वांची खूप काळजी करतेस
स्वभाव आहे तुझा
स्वतःसाठी पण जग बाळा
आशिर्वाद आहे माझा.
- डॉ. सुभाष कटकदौंड
चमचम चमकते नाणें दूरी वरुनी दिसले ।
चांदीचे समजूनी मन तयावर झेपावले ।।
निराशा आली पदरीं जाणतां तुकडा पत्र्याचा ।
खोटी चमक बाळगुनी फसविणे गुणधर्म तयाचा ।।
भास ही चेतना ती तर्क वाढीवी कसा ।
दिसून येई सदैव मनावर जो उमटे ठसा ।।
ठसे उमटती संस्कारांनीं बघतां भोवती सारे ।
मनावर बिंबून जाते आणि भासते तेच खरे ।।
दिसून येतो ऊर्जा वापर देह, बुद्धी वा मनीं ।
संस्काराचे बीज अंकुरते परिस्थिती बघूनी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
दुष्काळ
कणकण भारत कोसळताना पाहुन अंतरी कळवळला।
कौटिल्याचा ज्ञानदिप तो मार्ग दावितो आम्हाला॥धृ॥
सिमेवरती उभा सिकंदर फिकीर तयाची कोणाला ।
धनानंद हा तुकडे फेकुन जमवीत बसला श्वानांना।
नंदकुळाचा नाश करीन मी भिष्म शब्द तो धगधगला।।१।।
जिंकाया जग इर्षा धरुनी समरांगणी तो तळपतसे।
सिंकदराला विश्वविजेता कोण मूढ तो म्हणवितसे।
गर्व तयाचा चाणक्याने सिमेवरती उतरविला।।२।।
राजनितीचे सुत्र नवे मग विश्वपटावर मांडियले
अखंड भारत पाहीन डोळा शब्द कृतीतुन अवतरले।
सेल्युकस मग सिमेवरती काही मिनिटांत लोळविला॥३॥
कसे नियंत्रित राखावे या राष्ट्राला मग एकवटुन।
सुत्रबध्द ते केले सारे ज्ञान आपुले ग्रंथातुन।
अलौकिक तो अजुनी आहे ग्रंथ जगातील ठरलेला॥४॥
- रणजित हिर्लेकर
दाही दिशांनी फिरत होतो
मनी बाळगुनी तळमळ ती
कसे मिळेल समाधान ते
विवंचना ही एकच होती
धन दौलत ही हातीं असतां
धुंडाळल्या त्या बाजार पेठा
न मिळे समाधीन कोठें
थकली पाऊले चालून वाटा
देखिले निसर्गरम्य शिखरे
आणिक कांहीं प्रार्थना स्थळे
शिलकीमध्यें दिसे निराशा
कारण त्याचे कांहीं न कळे
भावनेमधली विविध अंगे
येऊं लागली मनीं दाटूनी
उसंत मिळता थोडी तेव्हां
उतरत होती काव्य रुपानी
धुंदीमध्यें सदैव राहूनी
लिहीत गेलो सुचले जे जे
कसा काळ तो जावूं लागला
कोडे ह्याचे कधीं न उमजे
शोध आजवरी घेत होतो
सांपडले परि तेच समाधान
उत्स्फूर्तपणे जे करीत आलो
त्यातच दिसली बीजे महान
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
कुठे नाही स्वरूप देवा,
बघायला मिळत आम्हा,
काळीज नमते तुज पाहता,
चराचरातील या घटका, ---
निसर्ग मज वाटतो,
तुझेच रुप देवा,
तिथेच आम्ही तुला मानतो,
स्वरूप कोणते का असे बा,
ना तू कुठल्या देवळा,
ना कुठल्या मंदिरी,
प्रत्येकाच्या हृदयी
बसशी,असशी तू हरी,----
प्रेम, माया, ममता,
आपुलकी, जिव्हाळा,
कुठे तू नसशी
फक्त सांग मज गा ,---!!!!
माणुसकी जे जपती,
त्यांच्या मनोमनी तू ,
दया करुणा अहिंसा,
दाखवीत प्रगटशी तू,--!!!.
अनोळखी हात करता,
निरपेक्ष ती सहाय्यता,
बापुड्या दीन -दुबळ्या,
जिवांचा तू रक्षण कर्ता,--!!!
संकटात कोण पुढे येई,
कोण देईल अमोल दिलासा,
कोण आपला हात देई,
असता कुठली अवघड वेळा,--!!!
वैविध्य अन् वैचित्र्य ,
पाहुनी माणूस चकित होई,
कोण नेई शेवटास,
जिंकता जरी कुठली लढाई,--!!!
नीतिमत्तेची चाड नसता,
कोण ओढे फटकारे,
आत्म्यातला परमात्माच दाखवी, आपुले अस्तित्व बरे,--!!!!
हिमगौरी कर्वे.©
चकित झाले गोकूळवासी
बघून बाललीला
सांगा कोण आहे तरी कृष्ण ?
विचारी यशोदेला ।।१।।
प्रासादातील मोदक खातां
तोंड ते उघडले
मुखामध्ये मोदक नसूनी
ब्रह्मांड ते दिसले ।।२।।
उच्छाद मांडूनी कालीयाने
पाणी केले दुषित
मर्दन करण्यासाठीं त्याचे
उडी टाकी डोहात ।।३।।
पूतना असूनी राक्षसिण
स्तनांत होते विष
स्तनपान करुनी त्यानें
तीला केले कासाविस ।।४।।
खोड्या बघूनी यशोदेनें
उखळाला बांधले
उखळासहीत झाडे पाडूनी
चकीत त्यानीं केले ।।५।।
अनेक अशा लीला करुनी
अचंब्यात पाडले
बालमुर्ति तो ईश असूनी
सर्वांस गुंगविले ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti