(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पुण्यस्रोत

    निसर्ग हा हिरवळलेला
    पुण्यस्रोत शुभ्र जलाचा....

    दरीदरीतुनी झेपावतो
    उंच धबधबा डोंगरीचा....

    निळ्यानिळ्या अंबरी
    धुसर पांघर धुक्याचा....

    रंग कोवळे सप्तरंगले
    धुंद सुगंध मृदगंधाचा....

    सांजाळल्या सांजवेळी
    पापणीत भास तृप्तीचा....

    समोर वाहते कृष्णामाई
    साक्षात्कार जणू गंगौघाचा....

    रचना क्र. ९२
    ३१/७/२०२३
    -वि.ग.सातपुते.(भावकवी)
    9766544908

  • स्मरणगंध

    तव बकुळफुलांच्या सुगंधात
    अजुनही मी विरघळतो आहे..

    कां? या प्रश्नाला उत्तर नाही
    भाग्यच भाळीचे भोगतो आहे..

    तव लडिवाळ स्मरण गंधाळ
    चराचरातुनी दरवळतो आहे..

    काय, काय, कसे विसरावे
    याच संभ्रमी मी जगतो आहे..

    घुसमट विरही असह्य जीवा
    मनआभाळही गहिवरले आहे..

    तव बकुळफुलांच्या सुगंधात
    अजुनही मी विरघळतो आहे..

    -- वि.ग.सातपुते (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. २८१

    २/११/२०२२

  • दुःख विसर बुद्धी

    कसे मानू उपकार, देवा तुझे
    देऊन बुद्धि विसर, करी कल्याण माझे

    खेळ आहे जेथें, हार जीत आहे
    घर बांधणीते, पड झड पाहे

    असे जन्ममरण, ह्याच देहीं
    हेच असतां जीवन, सुख दुःखे पाही

    एक दुःख येतां, मन होई निराश
    काळ पुढे जाता, विसरे ते सावकाश

    एका दुःखाचा चटका, दग्ध करी मनां
    जमता दुःखे अनेक, नष्ट करील जीवनां

    निसर्गाची रीत, दुःख तोची काढी
    करता दुःखावर मात, दुःखाचा विसर पाडी

    दुःख होते दुर, हेच आणिल समाधान
    दुःख बुद्धि विसर, असे तत्व महान

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • आमचे खेळ

    या मित्रांनो सारे या, सर्व मिळूनी खेळू या ।।धृ।।
    खेळ आमच्या देशाचे गरिबांसाठी सोईचे
    मैदान नको मोठे ते वस्तूही अल्प लागते ।।
    खेळांना त्या समजून घ्या- --- या मित्रांनो सारे या,

    हुतुतूचा खेळ बघा दोन गट, छोटी जागा
    स्पर्श रेषा ओलांडूनी ह्तुतू म्हणती तोंडानी ।।
    एकाच दमात भिडू मारू या ---- या मित्रांनो सारे या,

    खो खो मध्ये चपळाई चकमा देण्याची घाई
    उलट सुलट बसे एकाच रांगेत दिसे ।।
    मिळता खो भिडूला पकडू या- --- या मित्रांनो सारे या,

    लपंडाव हा खेळ कसा लपलेल्यांना शोधत बसा
    राज्य येते त्यावरती शोध घेई सभोवती ।।
    तीक्ष्ण नजर ती ठेऊया – --- या मित्रांनो सारे या,

    आट्या पाट्या च्या खेळात कांही घरे आखतात
    सीमेवरती दक्ष राहती घरात येण्या ते रोकती ।।

    चपळाईने घरात शिरू या – --- या मित्रांनो सारे या,

    एका पायाची गम्मत लंगडी आहे माहित?
    उड्या मारीत पळावे भिडू सारे पकडावे ।।
    आखल्या रेषेतच खेळू या- --- या मित्रांनो सारे या,

    एक दिलाने खेळू या आनंद सारा लुटू या
    निरोगी सदा राही तो प्रफुल्ल मन बाळगतो ।।
    शीण अभ्यासाचा घालवू या – --- मित्रांनो सारे या,

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • कवी अनिल यांच्या २ कविता

    जुई

    पावसाची सर ओसरून जाते, उगाच तुषार भिरभिरती

    इवल्या इवल्या फुली भरलेल्या अंगनिथळत्या जुईभवती

    आधीच हळवा सुवास कोमल त्यात जळाआत विरघळला

    ओल्या झुळकीत भरून वारा नेत असतो अशा वेळेला

    तलम ढगांच्या सात घड्यांतून गाळीव पडते सौम्य चांदणे

    जाळीच्या पडद्यामधून दिसते जुईचे नितळ रूप देखणे

    कवळ्या फांद्यांचा लवचिक बांधा पाचूच्या पानांत झाकून घेत

    शुभ्र शुचितेची सौजन्यकांती हिरवे लावण्य लेऊन येत

    मादकता जाते मार्दवी विरून, सौंदर्य सोज्ज्वळाआड दडते

    सोलीव सुखाचे स्वप्नच एक जीवाला जगतेपणी पडते !

    कवी अनिल

    -----------------------------------------

    पावसा पावसा थांब ना थोडा

    पावसा पावसा थांब ना थोडा

    पिळून काढुन न्हालेले केस

    बांधु दे एकदा सैल अंबाडा

    पावसा पावसा लप ढगात

    सागफ़ुलांची कशिदा खडीची

    घालु दे तंगशी चोळी अंगात

    पावसा पावसा ऊन पडु दे

    वाळाया घातला हिरवा शालू

    चापूनचोपून तिला नेसू दे

    पावसा पावसा पाहा ना जरा

    जांभळ्या फ़ुलांचा देवबाभळीने

    वेणीत घालाया केला गजरा

    पावसा पावसा आडोश्यातुन

    साजरा शृंगार रानराणीचा

    दुरून न्याहाळ डोळे भरून …

    कवी अनिल

  • ममतेतील खंत

    भरल्या ह्रदयी ओल्या नयनी

    निरोप देई देवकी माता

    भगवंताचे रक्षण करण्या, विनवी वेडी माया ममता. //धृ//

    आकाशवाणीने बोले श्रीहरी

    देवकीचे तो येईल उदरी

    संहार करण्या दुष्टजनाचा

    ईश्र्वर अवतरे ह्या जगता //१//

    भगवंताचे रक्षण करण्या, विनवी वेडी माया ममता.

    रक्षक सारे निद्रिस्त केले

    कारागृहाचे दार उघडले

    मार्ग दिसे वसुदेवाला परि

    प्रभू शक्तीचे दर्शन धडता //२ //

    भगवंताचे रक्षण करण्या, विनवी वेडी माया ममता.

    उचलून नेई बाल प्रभूला

    नंदाघरी तो ठेवून आला

    चमत्कार तो दिसला नयनी

    खंत कशाला बाळगी आता //३//

    भगवंताचे रक्षण करण्या, विनवी वेडी माया ममता.

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • राजमाता कैकयी

    अकारण कां नांवे ठेवता सदैव कैकयीला ।
    चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला ।।धृ।।
    जेव्हां दशरथ युद्धास जाई ।
    कैकयी त्याच्या सेवेत राही ।।
    राजनीति अन् युद्धनीति ही ।
    अवगत झाली सारी तिजला ।।१।।
    चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्हीं राजमातेला
    नजीकच्या त्या देशामधूनी ।
    रावणादी असुरी शक्ती वाढूनी ।।
    सामान्य जनाला जर्जर करुनी ।
    हा हाः कार तो माजविला ।।२।।
    चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्हीं राजमातेला
    परिस्थितीला जाणून घेतां ।
    केवळ चौदा वर्षाकरीता ।।
    राम वनी तो पाठवी माता ।
    तोड नसे त्या दूरदृष्टीला ।।३।।
    चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्हीं राजमातेला
    माता आणि राजधुरंदर ।
    दुहेरी भूमिका ही शिरावर ।।
    निर्णय घेऊनी अतिशय खडतर ।
    इतिहास जिने घडविला ।।४।।
    चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला
    रावणवृत्ती महा असूरी ।
    नष्ट केली तिनेच खरी ।।
    मार्ग निवडले जरी कांटेरी ।
    यशस्वी केले रामप्रभुला ।।५।।
    चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला
    धाडीला नसतां राम वनीं ।
    मारीला असता रावण कुणी ?
    स्वतःचे शिरीं कलंक घेवूनी ।।
    धरणीवरचा पाप भार रोकला ।।६।।
    चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • गरज आहे, एकत्र येऊन खच्चून बोंब ठोकण्याची!

    अनेक ठिकाणी किंवा प्रत्येक ठिकाणी शेवटी शेतकरीच नागविला जातो. त्याला कारण शेतकर्‍यांमध्ये एकी नाही, दूरदृष्टी नाही, हिंमत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बोंबा मारण्याची शक्ती नाही. सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सरकारविरुद्ध एल्गार पुकारला तर सरकारला शेवटी झुकावेच लागेल. उत्तरप्रदेशातील शेतकर्‍यांनी केंद्र सरकारला भूसंपादनचा नवा कायदा तयार करण्यास भाग पाडले ते आपल्या संघटीत आंदोलनाच्या जोरावरच; किमान त्यापासून तरी इकडच्या शेतकर्‍यांनी धडा घ्यावा!

  • कालचक्र

    दयाघनाची अगाध लीला
    सारे शब्दांच्या पलिकडले
    सृजनशीलतेचे अगम्य कोड़े
    प्रारब्धाचे दृष्टांत आगळे...

    ब्रह्मांड ! साक्षात्कार ईश्वरी
    चराचर निसर्गात रंगलेले
    सप्तरंगली सृष्टी मनोहर
    वैविध्यतेत रूपरंग नटलेले...

    असीम अंबर, अथांग सागर
    नाते धरेचे चैतन्यात रमलेले
    अनाकलनीय रुपे भगवंताची
    अस्तित्व, देवत्वाचे रुजलेले...

    तोच सार्वभौमी सत्ताधीश
    सत्य अंतिम श्वासात उरलेले
    तोच जगवितो अन तारितो
    कालचक्र अखंडित चाललेले....

    --वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र.२६३

    १७/१०/२०२२

  • सांत्वन

    सांगा, सांगा कुठला देवधर्म आता
    सांगा कुठले सत्य - असत्य आता..।।

    कुणी सांगावे, ते ऐकावे
    देवकृपे ते घडते सारे
    डोळी दिसले तेच पाहिले
    सांगा काय ज्ञात - अज्ञात आता....।

    रामकृष्णही जन्मले जगती
    देवत्वाची ती साक्ष जगती
    निधर्माचेच ते रक्षणकर्ते
    सांगा कुणी पाहिला देव तो त्राता....।

    कुठली प्रीती, कुठली भक्ती
    सुखसागरी मस्त धुंदित जगावे
    श्वासात गंधतो स्वार्थभोग आता
    सांगा निष्पाप स्पर्श हवा कुणा आता...।

    सांत्वन मनीचे रोज करावे
    कधीतरी भेटल तो नियंता
    दमले नेत्र अन जीव हा सारा
    सांगा कुठली मोक्षमुक्ती आता....।

    --वि.ग.सातपुते.( भावकवी)

    9766544908

    रचना क्र.२०२

    १६/८/२०२२