हपालेल्या निष्ठूर काळा, समाधानी तू कसा होशील
बळी घेण्याचे सत्र तुझे ते, केंव्हां बरे तू थांबवशील ?...१,
नित्य तुला तें भक्ष्य लागते, वेध घेई तू टिपूनी त्याचा
मिस्कीलतेने हासत जातो, गर्व होई तो स्वकृत्याचा....२,
अवचित कशी ही भूक वाढली, मात करूनी त्या वेळेवरी
सुडानें तूं पेटूनी जावूनी, बळी घेतले गरीबांचे परी....३,
काळ येई परि वेळ न आली, म्हणून सदा तूं हताश होतो
वेळेची ही ढिलाइ बघूनी, तांडव नृत्य ते करितो...४,
शांत होऊ दे क्रोध तुझा तो, बळी कुणाचा राग कुणावरी
‘वेळवरती’ अवलंबूनी तूं, जाण ठेव मनी याची तरी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
सर्व थरांतिल नारि-नरांना उघडें मंदिर आहे
विठुरायाच्या वारकर्यांना उघडें मंदिर आहे ।।
विठुराया ज्यांचा सांगाती
नाहीं त्यांना ज़ातीपाती
उच्च-नीच नाहीं, सार्यांना उघडें मंदिर आहे ।।
उभे पुजारी-सेवक-बडवे
कुणि न विठूच्या भक्तां अडवे
अष्टप्रहर, साती वारांना उघडें मंदिर आहे ।।
प्रपंच विसरुन केलिस वारी
अजुन थबकसी कां बाहेरी ?
कड्याकुलुप नाहीं दारांना, उघडें मंदिर आहे ।।
हातांमध्ये टाळ नसेना !
गळ्यात तुळशीमाळ नसेना !
ज्यांच्या हृदयीं विठू, तयांना उघडें मंदिर आहे ।।
अधिकारी, तैसे चपरासी
समान विठुच्या पायांपाशी
भाव मनींचा सच्चा, त्यांना उघडें मंदिर आहे ।।
दंभ,अहंकारा पळवाया,
सत्-चित्-आनंदा मिळवाया,
उघडा ज्ञानाच्या नयनांना, उघडें मंदिर आहे ।।
- - -
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
छान वाटले
भेटता तू एक
दूर जाऊ नको
वेगळी तू एक......... !
भेट तुझी होणे
गोष्ट साधी नाही
भावले मना असे
कुणी आधी नाही..........!
भावना छान ही
आवडते कुणी
मनात घर एक
करे नवे कुणी...........!
अंतर आहेच
खूप गोष्टींचे
नात्यात नको
यामुळे अंतर............!
कल्पनेतले हे
सुंदर जग न्यारे
मनास लागू नये
वास्तवाचे वारे...........!
कवितेने दिली
भेट अचानक
कविता सुरेख
आहे तूच एक...........!
-- अरुण वि. देशपांडे - पुणे
9850177342
(साभार - काव्यानंद प्रतिष्ठान -पुणे -ई-मासिक - काव्यानंद -अंक-मार्च -२०१९ )
मूर्तिमंत वाटे देवी लक्ष्मी प्रेमळ स्वरूप माझे आई
धन्य जहलो जन्म मिळूनी उदरामाजी तुझिया ठायी
प्रेमाचा तो सागर देखिला तुझ्याच ह्रदयाजवळी जावूनी
निकटपणाचा आनंद घेत नऊ मास मी उदरी राहुनी
दुग्धामृत पाजून मजला वाढवी अंकुर काळजीने
घास भरवण्या काढून ठेवी उपाशी राहून आनंदाने
निद्रा न लागे तुजला तेंव्हा आजारी जेंव्हा मी पडलो
पाणी दिसले तुझ्या नयनी दु:खाने जेंव्हा हळहळलो
अनंत ऋणे करुनी ठेवसी तुच माझ्या शिरावरी
अशक्य आहे तेच फेडणे ह्याच जन्मी तरी
मात्रत्वाचे ऋण फेडण्या असे वाटते, माताच व्हावे
पुनर्जन्मी त्नू पुत्र होऊनी सेवा करण्या मजला मिळावे.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
सुख दुःखाच्या लाटेमध्ये,
तरणे वा बुडणे,
जगेल तो त्या क्षणी,
ज्याला माहित पोहणे ।।१।।
पोहणे जगणे कला असूनी,
अनुभव हा शिकवूनी जातो,
जागरुकतेने कसे जगता,
यशही त्याला तसेच देतो ।।२।।
जीवनाविषयी ज्ञान मिळवण्या,
कष्ट लागती महान,
परि केवळ एक अनुभवी प्रसंग,
सारे देतो मिळवून ।।३।।
अनुभवाचे ज्ञान श्रेष्ठ हे,
निसर्ग शिकवी क्षणोक्षणी,
सतर्कतेने वेचून घ्यावे,
दैनंदिनीच्या घटनामधूनी ।।४।।
बोल सारे अनुभवाचे,
त्या बोलीची भाषाच न्यारी
सुख दुःखाच्या गुंत्यामधला,
अर्थ सांगतो कुणीतरी ।।५।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
शान्त समईत जशी वात,तशी समाजात स्त्री जात,
जळून जळून प्रकाश देत,
क्षणिक फक्त मोठ्या होत,--!!!
पणतीची ज्योत तशी,
आमुची ही असे जात,--
जगच छोटे भोवतालचे,-- स्वयंप्रकाशी मोठे करत,
लामणदिव्यात उर्जास्त्रोत, रात्रंदिनी सारखे *अविरत,
मंद असूनही सतत, कार्यरत, भोवताली प्रकाश पसरवत,--!!!
नंदादीपातील जशी ज्योत,
स्त्री तशी तिच्या संसारात,
हळूहळू अगदी तेवत,--!!!
दुसऱ्याला प्रकाशमान करत,--!
निरांजनातील छोटीवात, संसारासाठी उभी राहत,
सारखे सारखे पहा जळत,
स्वतःला ओवाळून टाकत,--!!!
निमूट उभे राहणे,
खंबीर अचल होणे,
स्वतः चटके सोसत,
भोवताल उजळून टाकणे,--!!!
अंधारावर मात करत करत,
काळ्या तमास नष्ट करणे,
आपले स्त्रीत्व साकारत,
प्रकाश-कारणे झिजणे,--!!!
असे झिजत झिजत,
पुढे वाटचाल करणे,--
वाऱ्यावादळांतही पुरत्या,
जिद्दीने पुन्हा फडफडणे--!!!
जो येई तो हात लावी,
धक्के सहत राहणे,
वेदनांनी तडफडत,
आपुले तेज सांभाळणे,--!!!
कुणी धरू पाहे ज्योत"",
त्यास धीराने सामोरे जाणे,
वेळीअवेळी चमकत, चमकत
आपली अस्मिता जपत राहणे,-!
कणाकणाने पळापळाने,
जिवांत जीव आहे तोवर, उभे-आडवे, जळत राहणे,
मग तेजाचावसा,दान देणे,--!!!
ज्योतीने ज्योत पेटवीत,
मगच संपत संपत जाणे,!--
उजेडाच्या वाटेअंती, *ज्योतिर्मय श्वास सोडणे,!
हिमगौरी कर्वे.©
नववधू
नवासाज
लालेलाल
रंगी आज
खुले रंग
मेहंदीचा
प्रेमभाव
हा प्रीतीचा
हाती चुडा
भरला गं
येई आता
साजण गं
सलज्जता
वाढलीच
हाती हात
गुंफलीच
गौरवर्णी
हातावरी
मेहंदिची
नक्षी खरी
जाई आता
सासरला
गुंती मन
माहेराला
मनातुनी
बावरली
सख्या भेटी
आतुरली
मालत्यांनी
ओटी भरा
लेक जाई
तिच्या घरा
सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
मनांतरीच्या भावनांना
शब्दातुनी मी माळीतो
अंतरातील गुज प्रीतीचे
भावगीतात मी मांडितो
स्पर्श! वात्सल्यप्रीतीचे
स्वरगंगेसवे, गुणगुणतो
गुणगुण आर्त भावनांची
मी हृदयांतरी आळवितो
गीता! ही प्रीतभावनांची
श्वासासंगे, मी गुणगुणतो
गीतात! नि:ष्पाप सुगंधा
गंधाळ! जीवनी दरवळतो
दिव्य! सुरम्य भावस्पर्ष
प्रीतशब्दातूनी,ओघळतो
लोचनी, तीच एक प्रीती
मी, मलाच भुलूनी जातो
कृपा ही त्याच दयघनाची
मी तिला मनांतरी स्मरतो
सदैव, हीच ओढ प्रीतीची
माझ्या गीतातुनी मांडतो
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ५६
२३ - २ - २०२२.
सांग नां ! आतातरी
नाते तुझे नी माझे....
क्षण मी विसरु कसे
प्रेमात हरविले माझे....
आज मी इथे, तू इथे
तुज शोधिते मन माझे....
भास तुझाच अंबरात
त्यात गुंतले श्वास माझे....
क्षिणली, सारीच गात्रे
व्याकुळले हृदय माझे....
आज अधीर लोचनी तूं
हळहळते अंतरंग माझे....
–वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. २१८
२८/८/२०२२
ज्या ज्या वेळी येई संकट,
धांव घेत असे प्रभूकडे ।
संकट निवारण करण्यासाठीं,
घालीत होता सांकडे ।।१।।
चिंतन पूजन करूनी,
करीत होता प्रभू सेवा ।
लाभत होती त्याची दया,
त्याला थोडी केव्हां केव्हां ।।२।।
संकटी येता करी पूजन,
उपयोग होईना त्याचा ।
कामी येईल पुण्य ,
विचार करीतां भविष्याचा ।।३।।
संचित पुण्य आजवरचे,
कार्य सिद्धीला लागते ।
सुख दु:खाच्या हर समयीं,
ठेवा मुखीं प्रभू नामाते ।।४।।
--डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti