“सोड मानवा , सोड रे ! हे वागणे आहे लज्जास्पद ,
तुला पाहूनी असे, लाजेल एखादे श्वापद…!
भल्या मोठ्या अपेक्षांची भली मोठी रास रचतोस,
गैरसमजुतीची ठिणगी पडताच, प्रेम वृत्ती मागे सरतोस…!
सन्मान, सचोटी,आदराचा खोटा सोहळा थाटतोस,
तुझा हट्ट हेका मात्र शिरतुरा खोचून सांगतोस…!
नतद्रष्ठ बुध्दी तुझी रे, अजाणते समज बाळगतोस,
सारासार विचार न करता, बंध नात्यांचे चिरडतोस…!
स्वार्थी मन, वासना तुझी रे, दानवासम वागतोस,
म्हणवूनी सत्पुरुष स्वतःस , अहंकाराचा मुकुट घालतोस…!
कुत्सित भावना, कुंठित विचारांची बाजारपेठ मांडतोस,
निर्लज्जपणे तूच तुझी माणुसकी खुलेआम विकतोस…?
सोड मानवा, सोड रे! हे वागणे आहे लज्जास्पद…..!”
August 20, 2018
धक्के देऊन आली धरणीकंप करुन
भावना मनीं चमकली बनेल ही महान ।।१।।
बालपणाची मुर्ति गोंडस तुझें भाव
तेज चेहऱ्यावरती घेती मनाचे ठाव ।।२।।
शाळेतील जीवन दाखवी मार्ग विजयाचे
सर्वामध्यें चमकून प्रमाण मिळे यशाचे ।।३।।
एकाग्रचित्त करुनी मिळवलेस तूं यश
प्रतिष्ठा टिकवूनी असेच जा सावकाश ।।४।।
विजे सारखी चमकूनी झेप घे नभांत
प्रकाशमान होऊनी यशस्वी हो जीवनांत ।।५।।
एका गोष्टीची जाण असावी तुझ्या मनीं
मिळण्यास हा मान पाठीराखे आहेत इतर कुणी ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 27, 2018
चालणे सुरु तर कर ....पोहोचणार नाही कशावरुन ?
बोलणे सुरु तर कर ...टाळ्या पडणार नाही कशावरुन ?
टिम्ब काढ रेषा होतील...रेषारेषांचे चित्र जाईलच बनून
आवड तयार होईल ...कलाकृती छान घडणार नाही कशावरुन ?
लिहिणे सुरु तर कर.. कविता होईल ओळी मिळून
जमणार नक्की ...लाईक मिळणार नाही कशावरुन ?
हे जमत नाही ते जमत नाही...सोड सांगणं( गाऱ्हाणं) फिरून फिरून
गाणं सुरु तर कर ...सूर सापडणार नाही कशावरुन ?
घाबरतो उगाच आपण...रुपडं बघून वरुन वरुन
अंतरंगात बघ गुण शोधून ...जगणं जमणार नाही कशावरून ?
# कौशल
-- श्रीकांत पेटकर
February 25, 2019
शब्द माझा मोगरा, अन शब्द माझा पिसारा,
शब्द माझा बोलका,
नि तोच माझा किनारा,
तोलतो मापतो,वाटतो,
शब्दही सतत 'झुंज' देतो,
राखतो पूर्ण ताकदही,
सत्ताही पालटून देतो,---!!!
खेळतो खेळी कल्पनांची,
काव्यतुरेही तो खोवतो ,
राखतो बहुत अंतरे,---
नाना जिवांना सांभाळतो,--!!!
प्रकटे पण शब्दांतूनही,---
कितीक आकसनेमका,
तोच कधी जिंकून घेईल,
अनेक हृदय संपदा, --!!!
वाट दाखवी कधी,
वचन नित्य पाळतो,
'दटावे' कधी क्वचित,
गुरू होऊन सुधारतो,--!!!
शिस्त लावे 'करडी',
कठोर शिक्षणही देतो,
नेहमी जवळ घेऊनी,
आई बनुनी समजावतो,,--!!!
पित्यासमान हात देतो,
तरी जरब' वाटते बालका,-!!
वडील बनुनी धावतो,--
प्रसंगी,येतो कसा रक्षणां,--!!!
मित्र म्हणून मदत करी,
धावतो बिकट संकटा,
नातेही सगळी जपताना,
न करी विचार थोडका,---
शेजारी होऊन सख्खा
सावलीगत पाठीराखा,--!!!
अनोळखी हात देई,
प्रसंग उद्भवता बांका,
अलगद बाहेर काढतो,
त्यांतून ठरवून नेमका,--!!!
शब्द नेतो देवाजवळी,
हृदयांतर करी सारखा,
, आपल्या माणसांसाठी,
प्रसंगी नशिबाला धडका,-!!
शब्दांवाचून सर्व "निर्धन",
कवी त्याच्यावाचून पोरका,
शब्दच आमुचे अमोल रत्न,
बेलभांडार वाहते शब्दां--!!
©️ हिमगौरी कर्वे.
March 28, 2020
चित्र उमटते दर्पनात ते, सुंदर असेल जसे तसे
धूळ सांचता दर्पना वरी, चित्र स्पष्ट ते दिसेल कसे
दर्पना परि निर्मळ मन, बागडते सदैव आनंदी
दुषितपणा येई त्याला, भावविचारांनी कधी कधी
निर्मळ ठेवा मन आपले, झटकून द्या लोभ अहंकार
मनाच्या त्या पवित्रपणाने, जीवन होत असे साकार
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 15, 2019
अजुनही, तुझाच चेहरा
माझिया, बंद लोचनात
प्रतिबिंब तुझे सोज्ज्वळ
निर्मळ माझ्या काळजात
सत्यसाक्षी तूच अनामिक
हृदयस्थ! तूच तूं एक प्रीत
जिथे पहावे, तिथे तूच तूं
भास, तुझाच गे ब्रह्मांडात
मी इथे, तर तू त्या सलीली
प्रीतगंगा, दुथडी प्रवाहात
मी डुंबतो सचैल प्रीतडोही
निरंतर, तुझ्याच आठवात
निमिष! एकची मजसी पुरे
तव दर्शनाचे, या जीवनात
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. १४९.
१२ - १२ - २०२१.
December 17, 2021
विसरून गेलो सारे कांहीं,
आठवत नाही मला,
रचली होती एक कविता,
त्याच प्रसंगाला ।।१।।
जल्लोषांत होतो आम्हीं,
दिवस घातला आनंदी,
खिन्नतेचा विचार त्या दिनीं,
शिवला नाही कधीं ।।२।।
नाच गावूनी खाणेंपिणें,
सारे केले त्या दिवशीं,
बेहोशीच्या काळामध्यें,
कविंता मजला सुचली कशी ।।३।।
छोटे होवून गेले काव्य,
अमर राहिले आतां ते,
प्रसंग जरी तो मरून गेला,
कविता जिवंत राहते ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
August 20, 2020
संप …….!!! एक कविता……..!!!
September 20, 2011
विधी लिखीत असे अटळ त्याच प्रमाणे होई निश्चित
कोण बदले मग काळाला प्रभूचा सहभाग असे ज्यांत ।।१।।
राम राज्याभिषेक समयीं असता सर्वजण आनंदी
राज्य सोडूनी वनी जाईल जाणले नव्हते कुणी कधीं ।।२।।
नष्ट करुनी सर्प कुळाला तक्षकावरही घात पडे
परिक्षिताचे प्रयत्न सारे फिके पडती नियती पुढे ।।३।।
आकाशवाणीचे शब्द ऐकतां हादरुनी गेला कंस मनीं
काळाने त्या झडप घातली प्रयत्न त्याचे निष्फळ करुनी ।।४।।
दुर्दैवी होते विधी विधान हरिश्चंद्र तारामती यांचे
राजा राणी असूनी दोघे जीवन गेले परि कष्टाचे ।।५।।
सुख दुःखानें भरले असे प्रत्येकाचे व्यक्ती जीवन
सहज लीलेने घ्यावे सारे प्रभूचेच आहे समजून ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 26, 2017
असीम, अपार, अमाप उदंडा, कुठून आणावे मापदंडा, विशाल विस्तीर्ण जगड्व्याळां तूच बनतोस गुरु आभाळा-!
तुझ्यासारखा नाही दाता तुझ्यासारखा नाही त्राता,
तूच एकटा तुझ्यासारखा,
अतुल अजोड तूंच अनंता,--!!
तूच घालशी जन्मा,
पृथ्वीवरील संजीवनी,
तूच राखीशी जलसाठा ,
सांभाळुनी अजस्त्र मेघां,--!!!
तुझ्यातूनच उठते दामिनी,
तूंच निसर्गाची करणी,
तूच देशी तूच सावरशी ,
धरेवरील अखिल चराचरा,--!!
वास करे भगवंत जिथे,
जागा देशी पुण्यवाना,
बघे त्रैलोक्याचे राज्य सारे,
ही मृत्यूनंतरची कल्पना,--!!!
ओढ वाटून ही धरा,
तुझ्यासाठी तरसत राहते
मग कधीतरी तुझी दया,
तिच्यावरती बरसत राहते, तुझ्यामुळे ती बनते सजीव,
पाझरत रहावे कृपाळा,--!!!
हिमगौरी कर्वे.©
May 20, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti