(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • पावनखिंडीतला ढाण्या वाघ ( १२-१३ जुलै १६६०)

     वीर बाजी प्रभू देशपांडे यांच्यावर केलेली ही कविता. 

  • कालचा मी आणि आजची ती

    कालचा मी आणि आजची
    ती.... खूप फरक असतो का...
    खरा तर फरक त्याच्यामध्ये असतो
    तो आजचा होऊ शकत नाही
    आणि ती आजपण सोडत नाही
    ह्यामध्ये त्याचाही दोष नसतो
    तो काल मध्येच अडकलेला असतो
    आपली मुळे पार आंत गेली आहेत...
    त्याला माहित असते...
    पण त्याला आजचाही मोह असतोच
    मग ती आणि तो ऍडजस्ट करतात
    स्वतःला...
    तो वाट बघत असतो तिची
    मुळे रुजण्याची
    आणि ती मात्र
    वेलीसारखी पसरत रहाते
    मुक्तपणे......
    -- सतीश चाफेकर.
  • ऋणानुबंधन

    ठाऊक नव्हते कालपावतो

    नांव तुझे आणि गांवही

    क्षणांत जुळले अचानक परि

    नाते आपुले जीवनप्रवाही

    उकल करितो जेंव्हां ह्याची

    ओळख पटते माझ्या मनां

    तेच रुप अन तीच मूर्ती

    पूर्व जन्मीच्या खाणाखुणा

    असेल हे जर ऋणानुबंद

    आणेल एका छायेखालीं

    साथ देऊन अनुभऊ

    सुख दुःखे ही जीवनातली

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • प्रीत जडली आहो तुम्हावर (लावणी)

    प्रीत जडली आहो तुम्हावर,कधी येणार घरी।।
    सांज झाली सख्या साजना,धडधड वाढली उरी।।धृ।।

    शृंगार केला तुमासाठी,
    माळला मोगरा सुगंधी ।।
    नाकात चमके नथनी, विडा रंगला मुखामंदी।।
    पैठणी नेसे येवल्याची,
    पदरी मोर जरतारी।।
    सांज झाली सख्या साजना,
    धडधड वाढली उरी
    ।।१।।
    ठसक्यावरी हा ठसका,
    याद केली का राया तुमी।।
    उशीर काव करतासा, धनी वाट पाहतो आमी।।
    अधीर झाली भेटण्यासी,
    जशी राधा यमुने तीरी।।
    सांज झाली सख्या सजना,
    धडधड वाढली उरी
    ।।२।।
    शयन मंदिरी बसले,
    मनात आपण ठसले।।
    कोमेजून जाईल काया,
    प्रीतीत संकोच कसले।।
    कवेत घेऊनी टाका हो, मदनबाण मजवरी।।
    सांज झाली सख्या सजना,धडधड वाढली उरी।।३।।

    सौ.माणिक शुरजोशी
    नाशिक

  • ऋणमुक्त

    मनी घोंगावते मोहोळ स्मृतींचे
    जेंव्हापासूनी मज कळु लागले
    मनहृदयी! ती सारीच ऋतुचक्रे
    आज सारे सारे, आठवू लागले।।

    वात्सल्य,प्रीत,मैत्र, सखेसोयरे
    पुन्हा, या जीवा खुणावू लागले
    क्षण सारे सारे, हृदयी कोरलेले
    गुज अंतरी, आजला उकललेले।।

    सुख, दुःख, आंनद, जिव्हाळा
    भोग सारेच, जे प्राक्तनी लाभले
    बंद पापण्यातुनी, सारे तरळलेले
    अव्यक्त मनीचे, आज सांडलेले।।

    रुजले, फुलले, गंधाळले जीवन
    असाध्य, ते सारे दैवयोगे लाभले
    खेळलो, बागडलो, मोठे झालो
    वाटते, व्हावे ऋणातूनी मोकळे।।

    -- वि ग सातपुते(भावकवी)

    9766544909

    रचना क्र ४२.

    १० - २ - २०२२

  • संन्यस्त अश्वत्थ बनते

    आकाशाशी स्पर्धा करणे, हीच मातीची ओढ असे,
    खालून मुळ्यांची पेरणी,
    झाडाझुडपांचा पायाच असे,
    वाढावे असेच उदंड,
    खालून वरवर जावे,
    कितीही वर गेलो तरी,
    पायाला न कधी विसरावे,
    गगन विस्तीर्ण भोवती,
    बुंध्यातून वाढीस लागावे,
    फांद्या पाने ,फुले यांनी,
    खोडास सतत बिलगावे,
    झाड लेकुरवाळे असते,
    तरी किती निस्संग,---!!!
    एक निळाई त्याच्या डोळी,
    दुसरा न कुठला रंग ,--!!!
    *हिरवे असून, आसमानी जाई,
    अवती भोवती किती लेकरे,
    सोडून सगळ्या ऐहिक गोष्टी, मोक्षाचा फक्त माग काढे*,--!!!
    फांद्या, पाने, फुले सारे,
    शिकती सारे झाडाकडुनी, दुसऱ्याला देऊन टाकणे,
    स्वार्थ कधी नसतोच मनी,--!!!
    म्हणूनच का एवढे जाते,
    उंचावरती पसरत ते ,------?
    कुठून आणे तटस्थ वृत्ती,
    संन्यस्त अश्वत्थ बनते,--?

    © हिमगौरी कर्वे.

  • १६ – जीवनपथ सुकर करा

    जीवनपथ सुकर करा गणदेवा हो

    सूखशिखरीं दु:खदरीपासुन न्या हो ।।

    गडबडतो धडपडतो मी, पडतो मी

    बडबडतो कुढतो चिडतो रडतो मी

    अजुन घडा कच्चा, परिपक्व हवा हो ।।

    अंध तरी, वा लोचन बंद करी मी

    मंदबुद्धि आहे, मदमत्त परी मी

    अक्षय प्रज्वलित करा ज्ञानदिवा हो ।।

    नि:पाता माझ्या मनिंची चंचलता

    निश्चल मन होइ, नाम तुमचें घेतां

    विफल-जीवनास मिळे अर्थ नवा हो ।।

    त्यजिन पदीं मदमत्सर विषयवासना

    काम क्रोध लोभ मोह त्यजिन ‘मीपणा’

    होउन कृतकृत्य पूर्ण, त्यजिन भवा हो ।।

    - - -

    भव : जग

    -

    -- सुभाष स. नाईक

  • आत्म्याचे बोल

    काय आणि कसे बोलतो, त्यांना माहीत नव्हते

    सहजपणे सुचणारे, संभाषण ते असते....१,

    शिक्षण नव्हते कांहीं, अभ्यासाचा तो अभाव

    परि मौलिक शब्दांनी, दुजावरी पडे प्रभाव...२,

    जे कांहीं वदती थोडे, अनुभवी सारे वाटे

    या आत्म्याच्या बोलामध्ये, ईश्वरी सत्य उमटे....३

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • मती गुंग होते

    कधी कधी मती गुंग होते
    माणुस कधी कळत नाही
    भेटीसाठी कुणी उताविळ
    तर कुणी, बोलतही नाही....।
    बंद दरवाजे, बंद खिडक्या
    कोण शेजारी कळत नाही
    मी आणि फक्त कुटुंब माझे
    संसारी दुसरे कुणीच नाही....।
    संवादही सारे खूंटले आता
    प्रेमवात्सल्यही जगले नाही
    व्यवहारी, जग हे झाले सारे
    कुणा कुणाची फिकिर नाही....।
    सुसंस्काराची सुकली माती
    ओल, कुठेच झिरपत नाही
    तोंड देखले, हास्यही छद्मि
    नातीच कुठली उरली नाही....।
    रुक्ष मनांतर, रुक्ष जिव्हाळा
    सहृदयतेचा अंकुर कुठे नाही
    समान शीले, समान व्यसनं
    याविण मैत्र दूजे उरले नाही....।
    शब्द एकची जीवास पुरेसा
    तोची या युगी लाभत नाही
    कातरवेळी, व्याकुळ स्पंदने
    समाधान कुठे जाणवत नाही....।

    –वि.ग.सातपुते.( भावकवी )

    9766544908

    रचना क्र. २३३

    १३/९/२०२२

  • पाखराला तमा न दाण्याची

    प्रदीप निफाडकरांची गझल