समकालीन भारतीय साहित्य पत्रिकेला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साहित्य अकादमीने विभिन्न भारतीय भाषेतील निवडक साहित्य “चयनम “ नावाने नुकतेच प्रकाशित केले आहे. समकालीन भारतीय साहित्य पत्रिकेचे संपादक व हिंदी साहित्यिक श्री अरुण प्रकाश यांनी “चयनम “ चे संपादन केले आहे. साहित्य अकादमीच्या सुवर्ण जयंती वर्षा निमित्त ही योजना अस्तित्वात आली आहे.
*पुरी गर्वाने टम्म फुगली,
बशीत ऐटीत ढिम्म बसली,
बासुंदीने मग तिला पाहिली, तिला कशी चटकन बुडवली*,
*चिंगुराव, चिंगुराव,
केवढा तुमचा तोरा,
पेरू खाता चोचीने,
ढंग तुमचा न्यारा*,--!!!
*मनीमाऊ, मनीमाऊ
टपोरे तुमचे डोळे,
शेपूट आपली फिस्कारत,
करता गोल वाटोळे*,--!!!
*खारुताई, खारुताई,
काय खाता लपवून,
कोणी आले की कशा,
सुळकन जातां पळून*,--!!!
*वाघोबा, वाघोबा,
केवढा तुमचा दरारा,
नुसते पाहून तुम्हाला,
घाम फुटतो जगाला*,--!!!
*मुंगीताई मुंगीताई ,
निघालात तरी कुठे,
केवढी ही लगबग,
काम तुमचे मोठे*,--!!!
© हिमगौरी कर्वे.
लहानपणी वाटायचं,
तो ससा फार गर्विष्ठ होता,
म्हणूनच शर्यतीत झोपला…
पण मोठा झाल्यावर समजलं,
प्रत्येक झोप ही आळशीपणाची नसते.
कधी कधी माणूस थकलेला असतो,
जबाबदाऱ्यांच्या ओझ्याने वाकलेला असतो,
सगळ्यांना पुढे जाताना पाहत,
स्वतःला सावरायला
क्षणभर थांबलेला असतो.
जिंकण्याची इच्छा कमी नसते,
फक्त श्वास घ्यायला
एक निवांत क्षण हवा असतो.
जीवनाच्या शर्यतीत
प्रत्येक जण कासवासारखा संथ नसतो,
आणि प्रत्येक ससा बेफिकीरही नसतो.
काही जण हसत धावत असतात,
आतून मात्र हजारो लढाया लढत असतात.
आज समजतं…
त्या सशाने हार झोपेमुळे नाही पत्करली,
तर थकव्याने घेतलेल्या
त्या एका विश्रांतीची किंमत
त्याला पराभवाने चुकवावी लागली.
म्हणून आता
कोणाच्या प्रवासावर हसू येत नाही,
कारण प्रत्येकाच्या आयुष्यात
एक अशी शर्यत असते,
जिथे धावण्यापेक्षा
स्वतःला सावरणं अधिक महत्त्वाचं असतं.
आणि हो…
जिंकणं सुंदर असतंच,
पण थकलेल्या मनाला
स्वतःची साथ देणं,
हे त्याहूनही सुंदर असतं.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
त्याला तपासण्यासाठी, नेले मेंटल हॉस्पीटलला
की तो आजकाल असंबद्ध बोलू लागला
पण डॉक्टर संतापून म्हणाले
तुम्हाला त्याची समज असावी,
की तो आहे एक ‘नवकवी’
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
चहुकडे अंधार पडलेले
दुरवर नजर जात नाही
आकाशी चंद्राला चांदण्या
काही केल्या सोडत नाही
-- शरद अर्जुन शहारे
सुखसमृद्धीचे रांजण
भोगण्यासही पायबंदी
क्षण विकलांग पांगळे
शब्दभावनां जायबंदी
संसारी, सारी तृप्तता
धागे सारे ऋणानुबंधी
परी फुकाचा विसंवाद
सुसंवाद तो भोगवादी
विवेकबुद्धी इथे जगावे
भाळीचे प्रारब्ध भोगावे
विनासक्त डुंबावे जीवनी
सुखाच्या, तुडुंब रांजणी
स्वर्गानंदी, ऐश्वर्यमहाल
शब्दसुखदा मात्र दुर्मिळ
अर्थ न उमजे जीवनाचा
व्यर्थ! सौख्याचा रांजण
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. ९.
९ - १ - २०२२.
कोकणातली खूप मंदिरे...
सागरकाठावरी!
भक्ती गाठते मुक्तीकिनारा,
बसून लाटांवरी!
कृतज्ञतेचे मीठ सांडते,
रात्रंदिन येथे,
जाळ्यामध्ये येती धावत,
माशांचेच जथे!
आकाशाचा रंग पांघरून
स्वच्छ निळे पाणी
ओठावरती लाटांच्या तर,
फेसांची गाणी!
होड्या झुलती दबा धरुनिया,
पकडाया मासे,
शकुनी मामा होऊनी कोळी,
जाळ्यांचे फासे!
समुद्र भेटे जिथे नभाला
क्षितीजरेषा निळी!
सांजसूर्य भेटाया येता,
क्षितीज त्याला गिळी!
दगडांचा आडोसा पाहून,
कुजबुज करते प्रेम,
चोरून बघणारांची दृष्टी,
अचूक साधी नेम!
विश्रांती ना चुकून घेती,
लाटा दमल्या तरी,
ओंकाराला स्मरते येथे,
वाऱ्यातून वैखरी!
अहंपणाचा अंश उरेना,
ऐकून सागरगाज!
आत्मपरीक्षण करता येते,
माजालाही लाज!
- प्रमोद जोशी
102 निर्मल अपार्टमेंट्स, श्रीकृष्णनगर,मु.पो. जामसंडे,
ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग-416612. 9423513604
फळ आज हे मधूर भासते, तपोबलातील अर्क असे ।
कष्ट सोसले शरिर मनानें, चिज तयाचे झाले दिसे.....१
बसत होतो सांज सकाळी, व्यवसाय करण्या नियमाने ।
यश ना पडले पदरी. केव्हा मान फिरविता नशीबाने....२
निराश मन सदैव राहूनी, मनीं भावना लहरी उठती ।
शब्दांना आकार देवूनी, लेखणी मधूनी वाहू लागती....३
लिहीता असता भाव बदलले, त्यात गुरफटलो पुरता ।
छंद लागूनी नशाच चढली, जीवनामधील रंग बघता...४
त्या रंगाच्या छटा उमटल्या, फुला फुलातूनी दिसूनी येती ।
सप्त रंगाचे मिलन दिसले, आकाशाच्या क्षीतीजावरती....५
काव्यावरती जगेल कोण, हवी भाकरी जगण्यासाठी ।
मानहानी ती सदैव होई, केवळ अल्पशा पैशापोटी....६
मदत कुणाची मिळत होती, आला दिवस जाई निघूनी ।
काव्यातील आनंदात परि, डुबता सारे विसरूनी.... ७
विवंचना आणि सुख दु:खे, बनली होती स्फुर्ती देवता ।
अनुभवले जे जे आजवरी, चित्रीत झाले बनूनी कविता....८
अनुभव होता तना मनाचा, म्हणूनी भासले सत्य काव्य ते ।
उचलून घेतले जनसामान्यांनी, मनास त्यांच्या पटले होते....९
लपली असती कला एक ती, सर्व जणांच्या अंतरंगी ।
परिस्थितीशी झगडा देवूनी, बाहेर आणती कुणी प्रसंगी....१०
गेलो विसरूनी उदास दिन , आज उमटले चित्र निराळे ।
सरस्वती नि लक्ष्मी दोघी, आशीर्वाद त्यांचा मिळे.... ११
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
प्रश्न
जय कशाला म्हणतात हो?
उत्तर कुणी देणार का?
प्रतिस्पर्धि होता पराजित
त्यालाच जय म्हणावे का?
उत्तर
आपला हक्क हस्तगत करणे
आक्रमकाला समज देणे
नाहीच येता समज,पराभूत करणे
अशी जयाची परिभाषा करणे
सौ.माणिक (रुबी)
स्थितप्रज्ञ असा समुद्र आणि
तितकंच अथांग असं आकाश
एकमेकांना भेटतात
क्षितिजाच्या तितक्याच प्राचीन रेषेवर
आणि ती चिरंतन रेषा जपून ठेवते
त्यांच्यातल्या जुन्या संदर्भांचे दाखले..
त्या हितगुजाचे अर्थ जाणवतात फक्त
त्या समुद्राला,आकाशाला आणि त्या क्षितिजाला
काही हितगुजं शब्दातीत असतात हेच खरं...
---आनंद
Copyright © 2025 | Marathisrushti