पुर्ण झाली
ज्ञानेश्वरी
वाङ् मयी
यज्ञ करी
विश्वात्मक
तुम्ही देवा
प्रसादाचा
द्यावा मेवा
नाथ माझा
हा निवृत्ती
सद्गुरु
करी तृप्ती
दुष्टपण
सुटावेच
मैत्रीस्तव
सत्कर्मेच
तम,पाप
नष्ट होवो
सर्वामुखी
घास जावो
त्रय गुणी
बाधा नको
षड् रिपू
देवा नको
ईश निष्ठ
समुदाय
मांगल्याची
असे माय
ज्ञानदिप
प्रकाशिले
आचरण
शुद्ध झाले
सज्जन हे
कल्पतरू
चिंतामणी
गाव जणू
संतजन
येती घरा
पसा दान
देती नरा
-- सौ. माणिक (रुबी)
बागेतील तारका-
नाचत होत्या दोन बाहुल्या, इकडून तिकडे
टकमक पाहात होत्या, हांसत चोहीकडे
झीम्मा खेळे, फुगडी खेळे, गरगर फिरती
हातवारे करुन त्या, माना डोलावती
जवळ येवून गुजगोष्टी, सांगे एकमेकींना
सासू नणंद यांच्या, कुलंगड्या काढतांना
सुख दुःखाच्या कथा, सांगितल्या त्यांनीं
कांहीतरी करुन दाखवूं, वदल्या दोघीजणी
अज्ञानी गरीब बिचार्या, जेंव्हा संकल्प करती
कळसुत्री बाहूल्या त्या, दोर इतरां हातीं
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail - bknagapurkar@gmail.com
भावमनीचे उमटूनी पडती ज्याचे सहवासे
काव्यामधला ईश्वर मजला तोच परि भासे
शब्द तयाचे ऐकत असता मन येते भरूनी
शब्दांना त्या बांध घालता काव्य पडे उमटूनी
अनूभव ज्याचा वदला जातो कंठा मधूनी
भोगलेला असे परि तो एके काळी त्यांनी
सत्य सारे तेथे असता दिव्यत्वाची जाण
म्हणूनच पटते मनास तेंव्हां हेच खरे जीवन
वाचित गेलो धर्मामधूनी जे जे सारे काही
शिक्षीत नसूनी स्वानूभवे तेच व्यक्त होई
हेच भासले काव्य मजला साऱ्या जीवनाचे
उतरत होते लेखणीतूनी बोल अनूभवाचे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
चंचल मन हे चंचल धारा, पंख पसरीत उडे भरारा ।
झेप घेवूनी उलटी सुलटी, लक्ष तयाचे चमकत तारा ।।
लुकलुकणारे तारे अगणित, नभांग सारे प्रसन्न चित्त ।
ताऱ्यावरूनी ताऱ्यावरती, झोके घेते सहज अविरत ।।
वेळ क्षणाचा पुरतो त्याला, टिचक्या टपल्या मारीत गेले ।
आवर घालणे कठीण होता, चटकन निसटून हातून गेले ।।
कोठून येते त्याला शक्ती, सटकून जाण्याची ही युक्ती ।
अन्न पाणी हे कसे घेई ते, पचनी सारे कसे पडते ।।
हटवादी हे असे केवढे, नको तिथेची जाय बापडे ।
देहाला त्या भोग देऊनी, भोग भोगण्या लावी तेवढे ।।
स्वैराचारी बंध मुक्त ते, देहावरती राज्य करीते ।
अवचित मिळता संत महात्मा, बंधनात ते अडकून पडते ।।
राज्य उलटते सारे आता, मनावरती ताबा बसता ।
माया जाते हारून जेथे, ब्रह्मरूप ते सारे होता ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
वाहूनी कृष्णकमल तव शिरी,
अर्पितो भाव माझे श्रीहरी....।।धृ।।
तू आहेस ईश्वर,
करी सारे साकार
नशिब माझे थोर
मिळे तुझा आधार
सेवेसाठी कृपा होता मजवरी, शब्द गुंफूनी कविता करी....१,
अर्पितो भाव माझे श्री हरी....
विविधतेने नटलेले
कृष्णाचे जीवन गेले
लय लागूनी जगले,
कसे जगावे शिकवले
जीवन सारे असूनी रूप ईश्वरी, दाखवी स्वानूभवे तो हरी….२
अर्पितो भाव माझे श्री हरी,
रंगीबेरंगी कोमल
कृष्णकमळ फूल
पाकळ्या बघता निल
प्रसन्न चित्त होईल
दरवळू दे कृष्ण कमळा परि, सेवा भावाचे समाधान उरी.....३,
अर्पितो भाव माझे श्री हरी
राही न्यूनता काही
ही अज्ञानाची ग्वाही
मज क्षमा ती व्हावी
परि आशिर्वाद तू देई
उकलन तव जीवनाची करी, यशासाठी जावे त्याच वाटेवरी....४
अर्पितो भाव माझे श्री हरी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
नाहीं रे मी विसरलो देवा तुजलो
संसारात अडकलो, वेळ ना मिळाला ।।१।।
तूंच गुंतविले, लक्ष्य मोहांत
चित्त देण्या सांगितले, तुझ्याच खेळांत ।।२।।
तुलाची हवे यश, तुझ्या खेळांतले
माझ्या कौशल्यास, तूं मार्गदर्शन केले ।।३।।
तुझ्याच साठीं, गुंतविले मन
बनोनी सोंगटी, फिरे पटावरी ।।४।।
काय दोष माझा, न दिले लक्ष्य मी
खेळवण्यातील मजा, आलो तिला कामीं ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
कबूल, आम्हीच त्यांना निवडून दिलेले!
कबूल, आम्हीच त्याबद्दलच भोगलेले!
-- श्रीकांत पेटकर
कौशल
पर्यावरणविषयक लघुकाव्ये….
आज मन आनंदले,
सुखाच्याही पार गेले,
भंवसागरी तरणे खासे,
आता सोपे वाटले,--!!!
दुनियादारी निभावणे,
असते किती कठीण,
तरीही तावून-सुलाखणे,
सहजी कसे जमले,--!!!
मनमोर थुई थुई नाचे,
पदन्यासाची तऱ्हा वेगळी, डोळ्यातून दोन थेंब सुखाचे समस्यांची असून चलती,--!
खंबीर,धीरगंभीर राहणे,
तटस्थभूमिका निभावावी,
येऊ देत वारे--वादळे,
मात्र एक झुंज द्यावी,--!
तुझ्यापेक्षा मी सरस,
म्हणत त्यांन भिडावे,
संकटांचे सतत घोर,
जिवामुळी लावू न घ्यावे
एक दत्तगुरु पाठीराखे,
राहावे निर्धास्त लेकराने,
गुरुमाऊलीच्या कुशीत सगळे,
आपुले दुःख सांगावे,--!!!
ते असतां मागे,
त्यांची जाणीव ठेवावी,
एक त्यांचे स्मरण,
सारी दुनिया विसरावी,--!!!
आनंदाच्याही डोही बुडावे,
ओलेत्याने राहावे कोरडे,
पाणी जाताना नाकी तोंडी,
दत्तगुरूंनीच फक्त वाचवावे,--!!
हिमगौरी कर्वे.©
Copyright © 2025 | Marathisrushti