(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जातीची दांडगाई आणि ज्ञानेश्वरांची मराठी

    ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवात सहाव्या अध्यायात माउलींनी मराठी भाषेची महती सांगताना ” माझ्या मराठाचिया बोलू कौतुके “अशी सुरवात करून ओव्या रचल्या .ज्ञानेश्वरांनी जाणीव पूर्वक मराठीचिया या शब्दा ऐवजी मराठाचिया हा शब्द प्रयोग केला होता . या मधे मराठी बोली बोलणारा तो मराठा हा हेतू असावा .परंतु आज मराठी भाषाच जणू जातीभेदांनी झाकोळून गेली आहे.

  • संशयी मन

    कृष्ण कमळ –

  • संधी

    गंगा आली मार्गामध्ये तहान आपली भागवून घे

    संधी मिळता जीवनामध्ये उपयोग त्याचा करून घे

    ठक ठक करुनी दार ठोठवी संधी अचानक केव्ह्ना तरी

    गाफील बघुनि चित्त तुझे निघून जाईल ती माघारी

    चालत राही सुवर्ण संधी हाका देवूनी वाटेवरी

    बोलविती जे प्रेमाने तिज सन्मान तयांचा सदैव करी

    धुंदी मध्ये राहून आम्ही चाहूल तिची विसरून जातो

    जीवनातले अपयश बघुनी नशिबाला परी दोष देतो

    यशस्वी ठरती तेच जीवनी उपयोग करुनी संधीचा

    साथ देऊनी प्रयत्न्याची मार्ग निवडती योग्य दिशेचा

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • प्रेमाची नाही वेगळी कहाणी

    नाही ग मी राजा
    पण तू आहेस माझी राणी
    आपल्या प्रेमाची नाही
    वेगळी अशी कहाणी...

    सांग मला एकदा
    काय आहे तुझ्या मनी ?
    जुन्या त्या आठवणींनी
    नको डोळ्यात पाणी

    नको होऊस तू दूःखी
    थोड्याश्या विरहानी
    प्रेम नाही होणार कमी
    जरी ढळेल जवानी

    आपल्या प्रेमाची नाही
    वेगळी अशी कहाणी...

    आपण फक्त जवळ बसावं
    धुंद करेल रातराणी
    आयुष्य असंच फूलत रहावं
    कायम प्रेमाच्या फुलांनी

    नाजुकशा कोमल शब्दांना
    रंगवावं तू प्रेमानी
    मीही गाईन तुझ्यासाठी
    सुंदर प्रणयाची गाणी

    आपल्या प्रेमाची नाही
    वेगळी अशी कहाणी...

    प्रेमाला नको ओहोटी
    अगदी कोणत्याही क्षणी
    भिजवत राहीन सदैव
    तुला प्रेमाच्या लाटांनी

    बांधला सुंदर ताजमहाल
    मुमताजसाठी शहाजहाननी
    प्रेम कसं व्यक्त करू माझं
    नाही कोणतीही निशाणी

    आपल्या प्रेमाची नाही
    वेगळी अशी कहाणी

    - डॉ. सुभाष कटकदौंड

  • लावा ‘कवी’मनाला व्हिसा कुणी !

    माणसांच्या मनाचा थांग लागणे कठीण,
    कविमन तर त्याहून 'पक्षीण',
    गगनात माराया उंच भरारी,
    मनमानेल तेव्हढी पंखात हवा भरी !

    "यांना" विना कवीमन स्वर्गात पोहचते कधी ?
    आणि झरझर घरट्यात येते कधी ?
    स्वर्गातील संमेलनाची सर्वांना वर्दी,
    तेथेही पहतो तर, कवींचीच गर्दी !

    स्वर्गात सुद्धा कवीला भुरकट दिसले,
    म्हणे प्रदूषणाचे धुके पसरले !
    कवीला स्वर्गात दिसले प्रदूषण,
    करतो शब्दच्छल विनाकारण !

    मनाचे तरंग पसरले स्वर्गात,
    देवलोकीचे झाले हैराण क्षणार्धात !
    मनाच्या हिंदोळ्यावर कवींचे शब्द,
    नाही त्याला काश्याचे बंध !

    कविमनाचे वरचे 'वर' जाणेयेणे,
    शाब्दिक प्रदूषणात 'भर' पडणे !
    करण्या स्वर्गातील शाब्दिक प्रदूषण कमी,
    लावा कवी मनाला व्हिसा कुणी !

    -- जगदीश पटवर्धन

  • ऋतू

    किती रात्री अशाच जागवल्या, राजसा तुझ्या स्मृतींमध्ये,
    वाट पाहताना जीव थकला,
    मन चिंतातूर आतमध्ये,---

    सारखे हे काळीज उले,
    चंद्र उगवे हा डोईवरी,---
    का सवतीने वाट अडवली,
    मोहात पाडत तुला सत्वरी,--!!!

    कितीक दिन होऊन गेले,
    ना निरोप कसला संदेश,
    तू गेल्यावर भोवताली,
    वाटे हा परकाच प्रदेश ,--!!!

    भोवती आहेत नाती सारी,
    आवडते ही मज सासुरवाडी,
    राम नाही पण त्यात कुठला ,
    एकली भासते मी संसारी,--!!!

    रामरगाडा अवती असता,
    सांगाया कोणास जावे ,
    दुःख तुझ्या विरहाचे रे,
    कोणापाशी मोकळे बोलावे,--!!!

    आता येईल जीवा बेचैनी,
    कसे त्यास रमवावे,
    डोळे लावून बसू किती,
    दूर तू त्या परागणी,--!!!

    नसते तुला कधीच चिंता,
    घरच्या आपल्या माणसांची,
    ते सगळे मात्र जीव टाकती,
    कशी तुझी बेपर्वा वृत्ती,--!!!

    मनमोर माझा नाचेल खरा,
    जेव्हा कधी येशील तू ,--
    इतरांसाठी असेल ग्रीष्म, माझ्यासाठी फुलेल ऋतू --!!!

    हिमगौरी कर्वे.©

  • चिमणीची निद्रा मोड

    चिंगी

    'पहाट झाली,

    चिव चिवते चिमणी

    उमज येईना,

    उठविले तिजला कोणी.....१,

    आई आहे कां ?

    जी उठवी शाळेसाठी,

    गुदगुदल्या करूनी

    कुरवाळिते हळूंच पाठी....२,

    घड्याळ उठवी

    घण घण करूनी नाद

    घरट्यामधुनी,

    नाही ऐकला असा निनाद.'..३,

    चिमणी

    ' उषाराणी येते,

    साऱ्यांची आई बनूनी

    प्रेमानें मोडी झोंप,

    नाजूक करकमलांनी.....४,

    घड्याळ आमचे,

    दवबिंदू पडतां पानावरूनी

    चाळविती निद्रा,

    टपटप आवाज करूनी' .....५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • जीवन ध्येय

    प्रभूची लीला न्यारी, विश्वाचा तो खेळकरी

    कुणी न जाणले तयापरी, हीच त्याची महीमा II१ II

    जवळ असूनी दूर ठेवतो, आलिंगुनी पर भासवितो

    विचित्र त्याचा खेळ चालतो, कुणी न समजे त्यासी II २ II

    मोठ मोठे विद्वान, त्यांत कांहीं संतजन

    अध्यात्म्याचे ज्ञान घेवून, विश्लेषण करती प्रभूचे II३ II

    कांहीं असती नास्तिक, कांहीं असती आस्तिक

    त्यांत काही ज्ञानी मस्तिक, चर्चा करिती प्रभूची II ४II

    सत्य परिस्थिती ऐसी, कुणी न जाणले प्रभूसी

    सर्वांची चालना तर्कासी, प्रभूच्या अस्तित्वाविषयी II ५II

    फक्त एकमुखी वाच्यता, असे ती सर्वता

    महान शक्ती असता, ह्या ब्रह्मांडामध्ये II ६II

    सर्वांनी जाणले एक, ‘अपूर्व शक्ती’ ह्याचा चालक

    त्याच ऊर्जेचे हे प्रतीक, सारे विश्वमंडळ II ७II

    कुणा नाही दुजा भाव, समजोनी त्या शक्तीची ठेव

    ज्ञानी देती नाव, निरनिराळी त्या शक्तीसी II ८ II

    कुणी म्हणती राम, कुणी म्हणे रहीम

    कुणी संबोधती गौतम, येशू असे कुणाचा II ९II

    परी तत्व नसे वेगळे, नावे होत निरनिराळे

    सामान्यास ते न कळे, हीच खरी शोकांतिका II १०II

    सारे जीवन निघून जाई, परी त्या शक्तीचा बोध न होई

    विश्लेषण करीत राही, त्याच्या अस्तित्वाविषयी II११ II

    जाणावी ती शक्ती, रूप आकार त्यास नसती

    शक्ति समजोनी करावी भक्ती, आदर भाव ठेवून II१२ II

    मानवजन्म श्रेष्ठ ठरविला, विशेष बुद्धी मिळून त्याला

    विचार शक्ती उपजण्याला, मानवामध्ये II १३II

    बहूत झाले विद्वान, कर्तव्य करूनी मिळवी मान

    मानव जातीची ती शान, ह्या संसारी II १४II

    मार्ग निरनिराळे दाखवी, सारे मिळती एक ध्येयी

    सर्वार्पण त्या शक्ती होई, ध्येय मिळतां जीवनाचे II१५ II

    विचार करा मनाशी, आपले वैर आपणाशी

    नसते केव्हां प्रभूशी, हेच मूळ दु:खाचे II१६ II

    वाद नसतो ध्येयापरी, चर्चा असे मार्गापरी

    हीच मानव निर्मिती खरी, सर्व सुख दु:खाची II १७II

    तथा कथित पंडित, सामान्यांत विद्वान होत

    ज्ञान त्यांचे थोडेसे जास्त, बहुजनां पेक्षा II १८ II

    वापरूनी ज्ञान शक्ती, सामान्य जनांस वाकविती

    आपले अस्तित्व स्थापती, प्रभू शक्तीशी विसरून II १९II

    तर्क शक्ती थोर, आहे चा नाही करणार

    नाही ना आहे म्हणणार, ज्ञानाचा खेळ करूनी II२०II

    मार्गाचे करूनी भेद, करीत राही वाद

    जीवन करी बरबाद, विसरूनी ध्येयासी II २१II

    ध्येय असे महान, मार्ग हे साधन

    साधनास साध्य समजोन वाया जाई आयुष्य II २२II

    साध्य नका समजू साधनासी, ठेवा विश्वास साध्यासी

    कोणत्याही साधनाने जातासी, साधका प्राप्त होई ध्येय साध्य II २३II

    निरनिराळ्या मार्गाचे प्रयोजन, ज्ञान शक्ती वापरून

    स्वअस्तीत्व ठेवण्या टिकवून, केले असे II२४ II

    अस्तित्वाची भावना मोठी, प्रत्येक झगडतो त्यासाठी

    आयुष्य खर्ची त्या पोटी, सकळ ज्ञान II २५II

    न कळे त्यास देवपण, भांडण्यास जाई विसरून

    आयुष्य मातीमोल, करून टाकीत असे II २६II

    विसरूनी जा सर्व भेद, मिटवून टाका वादविवाद

    लहान मोठ्याचा संवाद, नष्ट करा त्वरीत II २७II

    सारेच आहेत छोटे, कुणी नसती मोठे

    हे केवळ आपपासातील तंटे, मानवनिर्मित असती II २८II

    जात धर्म होत अनेक, हे मानव निर्मित प्रतिक

    सर्व मार्गाचे ध्येय एक, न कळे अज्ञानामुळे II २९II

    म्हणून जाणावा ईश, सार्थकी लावा आयुष्य

    जात धर्माचे पाश, सोडून घ्यावे II ३०II

    महान शक्ती तीच ईश्वर, दुसरा नसे कोणी वर

    आपणच देतो त्यासी आकार, सगुण रुप देवूनी II ३१II

    मानवता हाच धर्म खरा, आपसातील भेद विसरा

    प्रभू देई तयाना आसरा, जीवन सुखी करण्या II ३२II

    दुसऱ्याची दु:खे जाणा, त्यांच्या सुखात आनंद माना

    प्रभू अंश त्यासी म्हणा, हीच जीवनाची गुरू किल्ली II ३३II

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • ईश्वरीय सत्ता

    जीवनात जेंव्हा जेंव्हा
    पहुडावं विश्रांतीसाठी
    एकांती मिटावेत डोळे.
    आणि तूच दिसावीस
    सतत हेच घडते आहे
    प्रितीची ओढ अनावर
    ओठात दडलेले सत्य
    हेच मात्र खरं
    तू जरी आज दूरदूर
    तरी तुझा स्पर्शभास
    मनांतरी मुक्तमुग्ध भेट
    सारी निर्मलतेची साक्ष
    हीच सत्यप्रितीची ओढ
    अनाहत ध्यास, भास
    भावनांचाच कल्लोळ
    हेच मात्र खरं
    जर भाग्यात असते
    सत्यस्पर्शाचे वरदान
    ललाटी नसता दुरावा
    जरी कुठेही असतो तरी
    सदैव एकरूप असतो
    सर्वत्र ईश्वरीय सत्ता
    त्यालाच स्मरत रहावे
    हेच मात्र खरं
    -- वि.ग.सातपुते (भावकवी)
    9766544908
    रचना क्र. ७६.
    १० - ३ - २०२२.
  • देहाला कां शिणवितां ?

    शरीरातील अवयव सारे, यंत्रवत् असती ।
    आपल्यापरी कार्य करुनी, कार्यारत राहती ।।

    यंत्रामधल्या मुख्य गाभ्याला, आत्मा म्हणती कुणी ।
    अविरत मिळे चैत्यन्य शरीराला, त्याचे कडूनी ।।

    शुद्ध अशुद्ध संस्कार सारे, अवयवी घडती ।
    त्याच रुपें आत्म्याकरवी, परिणाम होती ।।

    खाणें शुद्ध पिणे शुद्ध विचार निर्मळ, पवित्र ते ।
    संगम होता योग्य साऱ्यांचा, शुद्धीकरण घडते ।।

    उपास तापास करुनी कांहीं, शिणविती देहाला ।
    हट्टयोग साधूनी कित्येक, दमविती शरीराला ।।

    देह असे साधन केवळ, प्रभूकडे जाण्याचे ।
    साध्य होईल त्याच आधारें, इप्सित जीवनाचे ।।

    खाद्यपाणी हे तर इंधन, असे शरीर यंत्राचे ।
    अभावी त्याचे कसे चालेल, जीवन मग तुमचे ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com