-- स्वाती ठोंबरे.
दोघे एका डहाळीवरच झुलू,
निसर्गाचे ,देणे किती पाहू,
बघ, रसरशीत खाली फळे,
दोघे मिळून चवीने खाऊ,--!!!
पक्ष्यांची जात आपुली,
निसर्गमेवा"आपुल्याचसाठी,
मानव त्याचा बाजार मांडे,
निसर्गराजा, फिरवी कांडी,
एका वृक्षा,-- किती फळे,
रसाळ,गोड,चविष्ट मधुर,
तुझ्यासमवेत स्वाद वाढे,
फळ बने आणखी रुचिर,
प्रेमसंगत वाढून आपुली,
एकमेकांचे उष्टे' खाऊ,--!!
त्यागातच प्रेम असते,
सखे, दुनियेस दाखवून देऊ,--!!
दोन "सांसारिक" जीव आपुले,
करती मधुर रसपाना,--!!!
निसर्गच लुटून देतो सारे,
शिकवतोही साऱ्या जगतां,--!!!
संसार या कैरीसारखा,--
कच्चा असता चटकदार,
चाखण्यां मिळती सर्व चवी,
आंबट, तुरट, गोडसर फार,--!!
नवीन संसार सुरु होतां,
फळां, जपावे लागते,
करतां-करतां,फळ मग,
कशी संपन्नता आणते,--!!!
हिरवाकंच रंग संपे,
जो असतो तारुण्याचा,
पिवळसर कांतिमान रंग चढे,
पिकल्यावर तो प्रौढत्त्वाचा,--!!!
आंबट, तुरट फळ,
हळूहळू, होई जसे गोड,
तसेच साथीदार होती कृतार्थ,
संसारी मिळतां योग्य जोड,--!!!
फळ संपे दुसऱ्यासाठी,
बघ त्याचे समर्पण,
सूचित होई त्यातून प्रिये,
संसाराचेच उदाहरण,--!!!
हिमगौरी कर्वे.©
मुलांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी आणि बालरंगभूमीचा आशय परीकथेच्या पुढे नेऊन ती सशक्त करण्यासाठी जगभरात उदयास आलेली 'ग्रिप्स नाट्य चळवळ' सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे. ग्रिप्स नाट्यचळवळीत योगदान दिलेले जगभरातील रंगकर्मी जर्मनीची राजधानी बर्लिन येथे एकत्र आले आहेत. ग्रिप्स नाट्यचळवळीचा पन्नास वर्षांचा आढावा, मुलांचे भावविश्व आणि नाटक यांवर विचारमंथन; तसेच विविध भाषांतील नाटकांचे सादरीकरण अशा उपक्रमातून ग्रिप्सचा सुवर्णमहोत्सव रंगत आहे. या महोत्सवात पुण्यातूनही काही कलावंत सहभागी झाले आहेत. भारतात ही चळवळ रुजवणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे ग्रिप्सचे विशेष निमंत्रित आहेत.
भारतामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रात ही चळवळ आणली डॉ. मोहन आगाशे यांनी. त्यांनी १९८६ च्या सुमारास पुण्याच्या मॅक्सम्युलर भवनाच्या मदतीने नाटके बसवायला आणि सादर करायला सुरुवात केली. ही चळवळ पुण्यातून देशभर पसरली. साठच्या दशकात कम्युनिस्ट चळवळीच्या प्रभावातून विद्यार्थी चळवळीतून ग्रिप्स चळवळ उदयाला आली. खास मुलांसाठी आणि तरुणांसाठी लिहिलेली नाटके व्हायला लागली. फोकर लुडविंग यांनी त्याची सुरुवात केली. ही नाट्य चळवळ जगभर पसरली. ग्रिप्स चळवळीतील नाटके इतर बालनाटकांप्रमाणे परीकथांवर आधारलेली नसतात, तर खेळाच्या मैदानांची कमतरता, पर्यावरण, अभ्यासातल्या अडचणी या मुलांना भेडसावणाऱ्या विषयांवर ती बेतलेली असतात. मनोरंजनाच्या माध्यमातून मुलांचे विविध प्रश्ना हाताळणे हे ग्रिप्सच्या नाटकांचे वैशिष्ट्य आहे. सध्या पुण्यातले श्रीरंग गोडबोले आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर सध्या बालनाट्यमहोत्सवाची ही चळवळ चालवत आहेत. महाराष्ट्रातले अमृता सुभाष, आनंद इंगळे, उपेंद्र लिमये, गौरी लागू, परेश मोकाशी, रसिका जोशी आणि विभावरी देशपांडे यांच्यासारखे कलावंत या चळवळीने घडविले. 'ग्रिप्स चळवळीला पन्नास वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्ताने जगभरातील रंगकर्मी बर्लिन येथे एकत्र आले आहेत. १५ जूनपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात २८ देशांतील रंगकर्मींचा सहभाग आहे. 'चिल्ड्रन्स राइट' हा महोत्सवाचा मध्यवर्ती विषय असून विविध उपक्रम होत आहेत. नाट्यमहोत्सवासाठी महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या 'जंबा बंबा बू!' या नाटकाची निवड झाली आहे. श्रीरंग गोडबोले आणि विभावरी देशपांडे लिखित आणि राधिका इंगळे दिग्दर्शित या नाटकाचा प्रयोग महोत्सवात होत आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
हातातील काडी घासतां पेटीवरी
अग्नि त्याच्यातील ज्वाला त्या धरी
लपलेला अग्नि घर्षणाने पेटतो
अज्ञान झटकता ज्ञानी उजाळतो
चितांत असतो प्रभू सदैव शांत
ओळखण्या त्यासी लागताती संत
संत हाच गुरु मार्गदर्शक असे
चित्तातील प्रभूला जागवित असे
उजळण्या मन घर्षण लागे संताचे
पेटवा ज्ञानाग्नि सार्थक होई जीवनाचे
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
चंचल केलंस मन, स्थिर करण्यासांगे ।
दिलेल्या गुणाची मग, बदलेल कशी अंगे ?
निसर्ग नियमाच्या, कोण विरूद्ध जाईल ।
फायद्याचे ते का त्याचे परि होईल ?
चपळता जसा गुण, स्थिरपणा असे दुजा ।
आगळ्यातील आनंद, हिच त्यातील मजा ।।
देहा ठेवून चंचल, सांगे स्थिरावण्या मन ।
हा उलटा खेळ कसा, खेळण्या भासे कठीण ।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
सकाळी रोजच्या प्रमाणे
अाँफीसची तयारी केली
पत्नीने चहा केला, डबा केला रोजप्रमाणे
मी ओफिसला
ती घरी
मुलींचा अभ्यास बघितला, शाळेसाठी तयारी केली
परत अाणायला घाई केली रोजप्रमाणे
मी घरी आलो
तिने पाणी दिलं
चहा केला रोजप्रमाणे
महिलादिनानिमीत्त
सोसायटीत कार्यक्रम आहे म्हणाली
माझ्यासाठी जेवण तयार करुन ठेवलं
..........नंतरच ती गेली कार्यक्रमाला
मी तिला शुभेच्छा दिल्या
रोजसारखीच आजही राबली
वर्षभर राबणार अशीच
अन
फेबुवर,वाँट्सअपवर नुसत्याच शुभेच्छा देत मी सुटलो
आज कारण मिळाले म्हणून....
असा .....
मी महिलादिन साजरा केला
-- श्रीकांत पेटकर
शब्दांविना संवादू,
असंभव"" तो वाटतो,
किमया त्यांची न्यारी",
अर्थ मर्म दाखवतो,
शब्दांवाचून किती भाषा,
मानव नेमका वापरतो,
परंतु त्यांच्यासम हा ,
म्हणत म्हणत कसा,
वर्चस्व त्यांचे मानतो,--
स्पर्श बोले कधीकधी,
मात्र शब्दांसारखा,
तान्हुल्यांची खास सोय,
जाणे बाळ ममता, माय--!!!
, हाच स्पर्श जादू करे,
प्रेमभावना व्यक्त करे,--!!
आबालवृद्धां आधार वाटे ,
इतुका बोलका अगदी भासे,--
खाणा-खुणा करत लोक,
बोलती काही एकमेकांशी,
मूक सांकेतिक भाषा जणू,
मदत करे सार्थ अशी,--!!
चित्रलिपी केव्हातरी,
आंतरिक संवाद साधे,
मार्मिक प्रसंग रेखाटुनी,
हृदयांशी हृदये जुळवे,
कित्येक कलाही बोलती,
आत्मिक संवाद साधती,
खूण पटे आत्म्याला आत्मी, यथोचित अबोल भाषा साची,
नयनांची भाषा आगळी,
फक्त डोळ्यांमधुनी बोले,
कधी अनेक शब्द हारती,
असे भाव प्रदर्शित करे,--!!!
हिमगौरी कर्वे.©
मायेचा बाप
कष्टकऱ्या धाप
आम्हाला सुखी माप....१
कर्तव्य फार
शिस्तिला हो धार
लळा अपरंपार.......२
घराचे छत
गावात ही पत
उद्योगी पारंगत.......३
खर्च मोजून
जावक योजून
हौस भरभरून.......४
समसमान
वागवतो छान
शिकविण्यास रान.....५
अबोल फार
महान विचार
झाला नाही लाचार....६
करू सन्मान
सदा असो भान
घरादाराची शान.....७
हा ताणा बाणा
भाव मनी जाणा
हा संसाराचा कणा....८
-- सौ. माणिक (रुबी)
नदिकाठच्या कपारीमध्ये, बेडूक बसला दबा धरूनी
उडणाऱ्या त्या माशी वरते, लक्ष सारे केंद्रीत करूनी...१,
नजीक येवूनी त्या माशीचे, भक्ष त्याने करूनी टाकले
परि दुर्दैव त्याचे बघा कसे, सर्पानेही त्यास पकडले...२,
बेडूक गिळूनी सर्प चालला, हलके हलके वनामधूनी
झेप मारूनी आकाशी नेले, घारीने त्याला चोचित धरूनी...३,
'भक्ष्य बनने' दुजा करिता, मृत्यूची ही चालते श्रृखंला
जनक असता तोच सर्वांचा, गमंत येई त्या खेळाला...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti