प्रेमिकांचे गीत गाऊं
आनंदात न्हाऊ //धृ//
बागेमधल्या फुलानीं
सुगंध आणिला वनीं
फुलपाखरासमान गंधशोषित जाऊ //१//
प्रेमिकांचे गीत गाऊं आनंदात न्हाऊ
कोकिळ गाते आम्रवनीं
कुहू ss कुहू ss स्वर काढूनी
नक्कल करण्या तिची उंच लकेरी घेऊं //२//
प्रेमिकांचे गीत गाऊं आनंदात न्हाऊ
श्रावणाच्या पडती सरी
अंग भिजते थोडे परि
सप्तरंगाचे इंद्रधनुष्य आकाशांत पाहूं //३//
प्रेमिकांचे गीत गाऊं आनंदात न्हाऊ
निरभ्र आहे आकाश
पौर्णिमेचा पडे प्रकाश
एक दिलानें एक सुराने नाचत ताल धरूं //४//
प्रेमिकांचे गीत गाऊं आनंदात न्हाऊ
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
का असे जगणे होते,
भलतेच कधी जीवघेणे,
वेदनांचे उठती टाहो,
आक्रंदनांचे तीव्र हिंदोळे,
सहावे कुठवर, सोडून द्यावे,
जखमी घायाळपण लपवावे,
कोण त्राता, कोण करविता,
संभ्रमी सारे जीव पडावे,
अगदी अनाकलनीय ना,
आपल्या आयुष्याचे कोडे ,
त्यातून कशी केव्हा सुटका, प्रारब्धाचेच खेळ सारे,--!!!
संयम, नि संतुलन किती,
जागोजागी का दाखवावे,
माणूस म्हणून जगणे मग,
शेवट यंत्रवतच"" बनावे, ---
कुठे जातात सगळ्या,
भावना,अन् संवेदना,
जसे या जीवनारण्यी,
ठेचकाळतच फक्त हिंडावे,
माया ममता प्रेम आस्था,
वागणे का असे नसावे,
उथळ, स्वार्थी वरपांगी,
पुरते आयुष्य असेच जावे,--?
लावावा जीव कुणाला,
पदरी येते फक्त फसवणे, तोंडावरती गोड बोलती,
प्रत्यक्षात काही वेगळे,--!!!
ताणतणांवा सीमा नसे ,
दुनिया कशी वेगळे टोचे,
जखमा आणखी खोलत,
वर मीठ चोळण्यां काहीसे, समस्यांना सीमा नसतां,
दोष तरी कुणाला द्यावा,-?
हेच आपले प्राक्तन म्हणत,
--- आहे तेच स्वीकारावे,--!!!
हिमगौरी कर्वे.©
पावन हो तू आई तव चरण शरण येई ।।धृ।।
संसाराचा खेळ मांडला
खेळविसी तूं मजला
थकूनी मी जाई ।।१।।
पावन हो तू आई तव चरण शरण येई
रात्रंदिनीं ध्यास लागला
जीव माझा तगमगला
झोप तर येतच नाही ।।२।।
पावन हो तू आई तव चरण शरण येई
आळवितो मी तुजला
विसरुनी देहभानाला
नयनी तव रुप पाही ।।३।।
पावन हो तू आई तव चरण शरण येई
देह झिजविला
दुर सारुनी सुखाला
कां तप फळा न येई ।।४।।
पावन हो तू आई तव चरण शरण येई
साद दे हांकेला
पेटलो आहे हट्टाला
नसता परत जन्म घेई ।।५।।
पावन हो तू आई तव चरण शरण येई
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
लग्न म्हणजे प्रारंभात, प्रेम आणि श्रृंगार,
लग्न म्हणजे पूर्वार्धात, तडजोड आणि संसार,
मध्यंतरात तर लग्न म्हणजे, वाद-वैताग-अंधार,
पण लग्न म्हणजे उत्तरार्धात, सोबत आणि गंधार |
-- सौ. अलका वढावकर
जगी काय मिळविले काय हरविले
अंती एकच प्रश्न अनुत्तरीत असतो
हव्यासापोटी किती, काय हरविले
सत्यभास हा जीवा अविरत छळतो
सारीपाट ! उलगडता जन्मभराचा
अंती सारा सत्याचा हिशोब स्मरतो
झाले गेले, सारे जरी विसरुनी जावे
तरी गतकाळ नित्य आठवीत असतो
अंती पश्चातापाचे दग्ध दुःख अंतरी
जीव ! क्षणक्षण निश:ब्दीच जगतो
जगण्याविना, न दूजा मार्गच कुठला
प्रारब्धभोग जन्मभरी भोगावा लागतो
चित्रगुप्ता जवळी, चोख हिशोब सारा
बिनचूक खरा इथेच चुकवावा लागतो
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १३३
११ - १० - २०२१.
विषण्यतेने बघत होतो भिंतीवरच्या खुणा
काळ जाऊन वर्षे लोटली आठवणी देती पुन्हा
बसत होतो नदीकांठी बालपणीच्या वेळी
पात्र भरुनी वहात होती गोदावरी त्या काळी
सदैव पूर येउनी तिजला गावास वेढा पडे
गांव वेशीच्या घरांना मग पाण्याचे बसती तडे
चित्र बदलले आज सारे पात्र लहान होई
बांध घातला धरणावरी पाणी अल्पसे येई
खिन्नपणे खूप भटकलो भोवतालच्या भागी
चकित झाले मन बघूनी हिरवळ जागोजागी
इच्छित दिशेने पाणी वाही बांध घातल्यामुळे
सारे जीवन प्रफुल्ल करीं आनंदमय सगळे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
धांवत असे मन आमचे, शोधण्या नेहमीं सुखाला
सुख तर आहे मृगजळ, फसवित राही सर्वाला...१
मृगजळाचे धावूनी पाठी, निराशा हाती येत असे,
वेडी आशा मनीं बाळगुनी, सुखासाठी तडफडत असे...२,
आपल्या हाती नसेल तेथें, सुख आम्हा भासत असे
जवळ जातां प्रयत्न करूनी, सुख नसूनी दुःखची भासे...३,
खरे सुख कशांत बघतां, तें तुमच्या मनींच वसत
बाह्य जगी शोधत असतां दुःख तुमचे हातीं लागते...४,
दुःख असे अंवती भंवती, सुख तुमच्या अंतर्यामीं
बाह्य जगातील सुख परि कधीं न येती तुमचे कामीं....५
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
मानवता आहे जगात,-?
प्रश्न खूपदा पडे,
आई बापा टाकून देतात,
कोणते पुण्य मग मिळे,--?
संसारी रममाण होतात, भूतकाळाचा पडे विसर,
उभे ज्यांनी केले ते,
वृद्धाश्रमी सापडतात,--!!!
हेच संस्कार मुलांवर,
का बरे करतात,--?
आईबापाला अंतर देऊन,
कोणते समाधान मिळवतात,?
वरील चित्रफितीतुनी,
कोणता मिळे संदेश,
वागणे प्राण्यांचे पहा,
प्रेम केवढे हे विशेष,--!!!
जिने त्यांना सांभाळले,
माया ममता दाखवून,
इतकी वर्षे गेली मध्ये,
तरी ना गेले ते विसरून,--!!!
हिंस्त्र प्राणी म्हणत म्हणत,
जग त्यांना हिणवते,
माणसांहून भावना थोर प्राणिजगत सांभाळते,--!!!
*प्रेम त्यांचे असते मूक,
तरीही किती बोलके,
अनुभव घ्यावा त्यांचा,
ठरतील श्रेष्ठ ते शेलके*,--!!!
हिमगौरी कर्वे.©
पिढी गेली रूढी बदलली, बदलून गेले सारे
क्षणा क्षणाला बदलून जाते, मन चकित करणारे....१,
सुवर्णाचे दाग दागीने, हिरे माणके त्यात
पिढ्यान पिढ्याचे मोल राहती, श्रीमंतीचा थाट....२,
चमचम आली तेज वाढले, नक्षीदार होवूनी
फसवे ठरले आजकालचे, क्षणक जीवन असुनी....३,
हासणारी ती फुले बघीतली, आणिक इंद्र धनुष्य
नक्कल करता निसर्ग कलेची, दिसे त्यात ईश....४,
ओबड धोबड बटबटती ते, रंग पसरवी सारे,
कुणा न कळे आधुनिक कला, ही फसती ज्याला बिचारे....५,
नाद मधूर हा प्रवाह वाहे, हृदयस्पर्शी जो असे
जीवंत वाटते काव्य सदैव ते, ज्ञान भरले ज्यात दिसे....६,
अर्थ काय आणि भाव कोणता, उलघडण्याचे कष्ट पडे
नव काव्याची चाल कशी ही, वाटते सर्वांना कोडे....७,
जे जे होते सुंदर मौलिक, दृष्टी आड चालले
सवंगपणा आणि नाविन्यात, आत्मा तोच विसरले...८
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti