कशांत दडले समाधान ते,
शोधत असतो सदैव आम्ही,
धडपड सारी व्यर्थ होऊनी,
प्रयत्न ठरती कुचकामी ।।१।।
बाह्य जगातील वस्तू पासूनी,
देह मिळवितो सदैव सुख,
क्षणीकतेच्या गुणधर्माने,
निराशपणाचे राहते दुःख ।।२।।
'समाधान' ही वृत्ती असूनी,
सुख दुःखातही दिसून येती,
चित्त तुमचे जागृत असतां,
समाधान ते सदैव मिळते ।।३।।
सावधतेने प्रसंग टिपता,
समाधान ते येईल हाती,
सुख दुःखाला दूर सारता,
अंतरभागी समाधान दिसती ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
रोज रोज तुला सकाळी पाहतो । तुला बघता क्षणी माझा दिवस मजेत जातो ।
रोज हसताना तुझ्या गालावर पडते फुलाची पाकळी । तिच तर आहे माझ्या खऱ्या प्रेमाची साखळी ।
कित्येक दिवस दिलीस मला तुझ्या नजरेची साथ । फक्त तुझ्याकडून प्रेमाचा होकार मागताना करू नकोस माझा घात।
जेव्हा तुला दिसतो,,, तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर दिसतो राग । तोच तर आहे माझ्या प्रेमाचा खरा भाग....!!!!!!
कवी - सचिन जाधव
sachinrjadhav1992@gmail.com
Mob -8459493123
ही पुण्यदा गंगामाई
हिचाच अगम्य डोह
डुंबता मनी प्रसन्नता
तिचाच मजला मोह
सुखदुःखा गिळूनिया
अविरत तिचा प्रवाह
नाही कुणाचाच द्वेष
तिचाच मजला मोह
ती विरक्तीचा सागर
तिच्यात शमतो दाह
ती भगिरथाची गंगा
ठायी तिच्या निर्मोह
जीवनांतीगंगोदक
दृष्टांत मुक्तीचा सोहं!
(सोहं --- ब्रह्मानंद!)
-- वि. ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र.१५०.
१३ - १२ - २०२१.
जमले होते असंख्य भाविक, जगंदबेच्या दर्शना ।
कांहीं तरी मागत होते, हात जोडूनी चरणा ।।
दयावान ती आहे समजता, गर्दी होते तिजपाशीं ।
कधी न दिले काहींहीं तिजला, मग ही मागणी कशी ? ।।
जावू नका दर्शनास तिच्या, रिक्त अशा त्या हाताने ।
तिला पाहिजे ताट पूजेचे, भरलेले भक्ती भावाने ।।
व्यर्थ होवून जाती ते श्रम, भक्तीभावाच्या अभावी ।
उभे आयुष्य वाऱ्या करूनी, हाती काही न येई ।।
मानव रूप देऊनी तिजला, धनादी वस्तू अर्पिती ।
पूजाविधींचा थाट करूनी, मोठेपणा दर्शविती ।।
भक्तीची ती भुकेली असूनी, काही न लागे तिजला ।
केवळ तुमचे भाव जाणूनी, सर्वच मिळेल तुम्हाला ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
मीच माझा गुरू, जे मनी ठरवू
विचारांती तेच करू ....।।धृ।।
सल्ला घेईन सर्वांचा, वाटे मज किंमतीचा
मनाची कदर करूं...१
मीच माझा गुरु
निर्णय असे अनेक, सारेच असती ठिक
निवड एकाची करूं...२
मीच माझा गुरु,
इतरांना जे वाटते, माझ्या सोईचे नसते
सोईचा आग्रह धरूं...३
मीच माझा गुरू
शेवटीं माझ्या करिता, गोष्टीची उपयोगिता
स्वतःसाठीं योग्य करू...४
मीच माझा गुरू
ईश्वर वसतो मनीं, इच्छा त्याची समजोनी
आदर त्याचाच करूं...५
मीच माझा गुरू
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
तू जो दिला होतास ना निशिगंध
तो आता हरवला आहे
पण त्याचा सुगंध येतो नेहमी
कुठल्यातरी कोपऱ्यातून...
तू दिलेलं प्रत्येक फुल
नाही ठेवता आलं जपून
पण त्यांचा सुगंध मात्र दरवळतो
कुठल्या ना कुठल्या तरी कोपऱ्यातून...
-- आनंद
सुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
साथ तुझी सुटणार नाही….
नदी वाहे झुळझुळ झुळ,
पाणी तिचे थंडगार.
कचरा टाकू नका कुणी,
नदी रडते वारंवार.
नदी देते पाणी गोड,
झाडे, शेती, फुले फुलती.
नदी जर झाली स्वच्छ सुंदर,
पक्षी आनंदाने गाती.
चला मिळून वचन देऊ,
नदी नेहमी स्वच्छ ठेवू.
नदी हसली, आपण हसू,
आनंदी भारत घडवू.
पावसाचे थेंब पडती,
नदी आनंदाने हसते.
स्वच्छ नदी, सुंदर धरती,
सारे मिळून तिला जपू.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
Copyright © 2025 | Marathisrushti