आली मांगल्याची दीपदिवाळी
सुखसौख्याला सजवित आली
उत्सवांचा राजा, सण दिवाळी
दीपोत्सवी आत्मरंगी रंगरंगली...
स्वर्ग जणु अवनीवरी अवतरला
जणु वसुंधराच तारांगण जाहली
दिव्यत्वाचे, प्रकाशपर्व उधळीत
अमंगळ सारित मांगल्या आली...
सोहळा दीपोत्सवाचा ब्रह्मानंदी
अंगणी संस्कारांची सडारांगोळी
तेजाळीत वात्सल्यतेची नीरांजने
दीपोत्सवी पावित्र्य रुजवित आली...
वसूबारस,धनतेरस,नरकचतुर्दशी
बलिप्रतिपदा,भाऊबीज बंधुत्वाची
पंचदिनी, दीपोत्सवी ही दीपावली
चैतन्या! सजवित मढ़वित आली...
वि.ग.सातपुते.( भावकवी )
( 976654908 )
रचना क्र. २७०
२४/१०/२०२२
वातावरणी वस्तू पडतां,
नाश पावते लवकर ती,
हवा पाण्याच्या परिणामानें,
हलके हलके दूषित होती ।।१।।
ठेवूं नका उघडयावरती,
वस्तू टिकते निश्चितपणे,
दूषितपणाला बांध घालता,
कसे येई मग त्यात उणे ।।२।।
बाह्य जगातील साऱ्या शक्ती,
आघात करती मनावरी,
दूषिततेचे थर सांचूनी,
मनास सारे दुबळे करी ।।३।।
देहामध्यें बंदीस्त ठेवून,
एकाग्रचित्त करा मनाला,
कांहीं न करता येते तेव्हां,
राग लोभादी बाह्य गुणाला ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
ग्रामीण भागामध्ये पुष्कळ पुष्कळ लिहिण्यासारखे असे असते. सोबतीला हिरवागार निसर्ग पशुपक्षी ओढे-नाले आणि वेगवेगळ्या स्वभावाची माणसे सुद्धा भेटतात.
जन्म हा सुखाचा की दुःखाचा..
कां ? कुठला अक्षम्य गुन्हा आहे..
जरी गतजन्मांचेच ऋणानुबंध सारे
कुणाची कुणाला आज ओढ आहे..
बेगडी नात्यांचेच स्वार्थी भावबंध
खरे कोण कुणासाठी जगतो आहे..
ऐश्वर्याचे रांजण ,जरी स्वर्गीयसुखी
सांगा , आज मनःशांती कुठे आहे..
ऐश्वर्यासाठी नात्यांचीही पायमल्ली
नि:स्पृह प्रेम जिव्हाळा संपला आहे..
बिलोरी प्रतिबिंबही कितीही देखणे
तरी इथे सत्य, असत्य संभ्रमात आहे..
वास्तव ! जे पेरावे तेच जगी उगवते
हे सत्य कुणा केंव्हा कळणार आहे..
कां ? जगण्याचीच हीच रित जगती
जन्म कलियुगी , जीवाला सजा आहे..
©️ वि.ग.सातपुते (भावकवी)
रचना क्र. ३८
दिनांक :- १३-३-२०२१
पहाटेच्या दवात भिजलेली एक वाट,
क्षितिजापर्यंत पसरलेली नामाची प्रभात.
खांद्यावर भगवी पताका, ओठी विठ्ठलनाम,
पाऊलोपाऊली उमलत जाते जीवनाचे गूढ धाम.
ही वाट केवळ पंढरीकडे वळत नाही,
ती माणसाला माणसाशी जोडत राहते.
हातात हात, नजरेत विश्वास,
मनामनांतील अंतर हळू हळू कमी होतं जाते.
टाळांच्या नादात केवळ लय नसते,
ती काळजाच्या ठोक्यांची भाषा असते.
मृदंगाच्या प्रत्येक स्पंदनातून
संतविचारांचा नवा सूर जन्म घेतो.
इथे पुस्तकांची पाने उघडत नाहीत,
उघडतात अंतःकरणाची कवाडे.
इथे अक्षरांपेक्षा माणसे वाचावी लागतात,
आणि शब्दांपेक्षा अश्रू समजून घ्यावे लागतात.
पायांवरील फोड सांगतात कष्टाचे सौंदर्य,
घामाचे थेंब शिकवतात संयमाचे ऐश्वर्य.
दुःखाच्या वाटेवर चालतानाच
सुखाचा अर्थ उलगडत जातो.
दिंडीत चालताना जातपात नाहीशी होते,
अहंकार धुळीत मिसळतो.
उरते फक्त एकच ओळख
"मी वारकरी... विठ्ठल माझा."
चंद्रभागेच्या वाळूत
काळही क्षणभर नतमस्तक होतो.
विटेवरच्या सावळ्या मूर्तीकडे पाहताना
डोळे भरून येतात,
आणि अंतर्मनात प्रकाश उगवतो.
वारी म्हणजे चालतं-बोलतं विद्यापीठ
अनुभव हा गुरु,
जीवन हे पाठ्यपुस्तक,
भक्ती ही परीक्षा,
आणि पदवी मिळते माणूस झाल्याची.
जो ही वाट एकदा मनापासून चालतो,
तो पंढरीहून कधीच पूर्वीसारखा परतत नाही.
त्याच्या पावलांनी अंतर जिंकलेले नसते,
त्याच्या अंतःकरणाने विश्व कवटाळलेले असते.
विठ्ठल भेटतो विटेवर नव्हे,
तर माणसाच्या माणूसपणात.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
पचास साल हुए जिंदगीके, गोल्डन ज्युबली मनायी गयी
हंगामा और जल्लोष मे, पूरा दिन पूरी रात गयी
सारे बच्चे और रिश्तेदार, जमा हुए इकठ्ठा
फिर पडोसवाले क्यूं रहेंगे पिच्छे, जब खानेको था मिठा
सबने तारिफ की पचास साल, जिंदगी के ऊपर
हम तो बहूत खुष हुए सुनकर, उसे पहीली बार
जीन जीन चिजोंको किसीने आजतक ना जाना
जीन गुणोंको हमनेही ना पहचाना
वो हमारेमे संकरीत है, उसकी दिगयी हमे कल्पना
आदर्शवाद, सच्चाई और प्यार के पूजारी
देखी किसीने हमारे मे थे बाते सारी
आचंबेके साथ सोंच रहे थे गंभीरतासे
के इन गुणोंका पता उन्हे लगा कैसे
जीन गुणोंका अर्थ हमने, आज तक ना जाना
कैसे मिला उनका उन्हे ठिकाना
जो कुवेमेही नही था, वो बालटी मे कैसे आया
और इन बातोंका हमे आश्चर्य हुआ
शायद यह हो सकती है पार्टी की मिठाईयां
नैतीक दबाव उनपर जीस वझेसे आया
खिलानेवाले की कुच तो इज्जत करो
उसके आसलीयत पर मत उतरो
कमसे कम इतनी उमरबाद, होने दोजी खूष उसे
सोचा हुंगा किसीने, मन मे ऐसे
कलतक दे रहे थे जो गालीयां
दिखी आज हमारेमे उनको खुबीयां
चार झुठ एक सच्चे के बराबर, जब रेटकर कहा जाता है
और किसीकी तारीफ, हकीकत बनती
जब आखों मे पानी लाकर कहा जाता है
यह तो पता हुआ उनकी तारीफ से,
के आसलीयत मे जिंदगी होनी चाहीए कैसी
इन ताऱिफ और गुलदस्तोकी चौकटने प्रसन्न किया हमारा चित्त
और ख्यालोंकी दुनीयांने बिती सारी रात
करवटे बदलते बदलते सोचना मजबूर किया
के जो कुछ जिंदगी मे सच्चा हुआ, तुने क्या पाया
जिंदही का मकसद क्या, जरा सोच इन बातों पे
यही विचार झाकने लगा मन मे, उमरके इस मोड पे
रईस बापकी इकलोती आवारा आवलाद
देखी हमने पैसोको करते बरबाद
लक्ष्मी के मोलको वो गधा जानेगा कैसे
वह तो समझताहै पैंसो को पानी जैसे
समयका मोल हमने किया उस आवारा भाती
और खो बैठे वो महान संपत्ती
गया वख्त फिर हात आता नही,
बचपन मे शिक्षकने घोल घोलकर बाते कही
अर्थ उन पक्तीओंका तो हम जान गये थे
पर मतलब से उसके बहूत दूरी पर थे
पचास साल जानेके बाद, पंक्तीओंका दोहरा रहे है करते याद
पर अब तो ये बेफूझूलकी हुई ना बाते
दुनीयांके चक्करको कैसे वापीस फिराते
पेंडीग रखो इन बातोंको, फूरसतसे करेंगे हम उनको
कर दिया इन्ही बेफीकीर आदतोंनो सर्वनाश
और समय खो जाने पर आता था हमे होश
खेल कुद और तंदुरस्ती को जान
विद्यार्थी दशा मे नही हुयी इसकी पहचान
समझते थे खाईंगे पियेंगे बनेगे नवाब,
खेलेंगे पढेंगे बनेंगे खराब
चार बच्चोंका अड्डा जमाए, झाडके तले बैठते थे
और दुसरे दोस्त, जो खेल रहे, उनपर कॉमेट्स करते थे
बगैर खेले मैदान मे, खेलोंपर करते थे मार्गदर्शन
किसीसे कुछ सुना, या अकबारपढा, यही था हमारा ग्यान
बातें बनाना यही कला, हमने सिखी पढाईके जमानेसे
और उमरके हिसाबसे जो मिला ग्यान, निकालते उगालकर दिमागसे
उन बातो मे ना कुछ अनुभव था, ना अभ्यास किया पंक्ती
बकते थे भडाभड जो मुहसे निकल आती
खेल कुद मे रहे पिछए और लिख पढाईमे निचे
इसी कारण जिंदगी मे रहे कच्चे
ग्यानी अनुभवोंकी थी हमारेमे कमतरता,
सिर्फ उमरके अनुभवोंको कोन पुछता
अब आपही सोंचो जरा,
जीसके जिंदगी मे था खाना पिना मौज उडाना
समयको फूकटका माल समझकर बरबाद करना
कैसे इन लोगों ने हमे आदर्शवादी माना
यह तो हुआ जबानी जमाखर्चा, क्या झूठ और क्या सच्चा
पर एक सज्जनने जो कही बात,
उसमे दिखी मुझको जिंदगी की हकीकत
उसने सुनाया हमारे तारीफ का राज
वही बना जिंदगीके तस्सलीका आवाज
ये दुनीया देखनेमे है खूबशूरत, पर काटोंसे भरी हुयी अनगीनत
हर कदमपर जिंदगी के लीए चाहीए झगडा
एक एक दिन गीने इन्सान आगे बडा
सोचना पडता था के गया दिन कैसा
आनेवाले दिन का नही था भरोसा
यह संसार है बेरहेम, बेदर्द औऱ जालीम
इसी जिंदगीमे हम जिये थे ५० साल कमसे कम
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
एक विशाल मन, भाग त्याचे अनेक
विखूरले जावूनी, स्वतंत्र वाटे प्रत्येक...१,
छोट्या त्या भागावरी, वेष्टण शरिराचे
अस्तित्व वेगळेच, भासते त्या मनाचे...२,
मनाचे ते स्वभाव, सारखेच असती
फरक वृत्तीमध्ये, कुणाच्याही नसती...३,
अगणीत ती मनें, कोठे नसे फरक
अनेक ती बनली, जनक तिचा एक....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
तुझेच घेऊनी तुलाच द्यावे, भासते ही रीत आगळी
उमजत नाही काय करावे, तुझीच असतां सृष्टी सगळी
वाहणाऱ्या संथ नदीतील, पाणी घेऊन अर्घ्य देतो
सुंदर फुले निसर्गातील, गोळा करुन चरणी अर्पितो
अन्न ग्रहण करण्यापूर्वी, नैवेद्य तुजला दाखवितो
जगण्याचा तो मार्ग दोखवी, ह्याचीच पोंच आम्ही देतो
विचार ठेवूनी पदोपदीं, साऱ्यांचा तूं असशी मालक
दुजास देण्यातील आनंद, हाच मिळवित असे एक
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
नास्तिक असूनी श्रद्धा नव्हती, ईश्वराचे ठायीं
विज्ञानाची कास धरुनी ती, भटकत तो जायी //
चार पुस्तके वाचूनी त्याचे, तर्कज्ञान वाढले
दृष्य अदृष्य तत्वांमधले , भेद जाणवले //
नसेल त्याचे आस्तित्व कसे , तर्काला सोडूनी
समजूनी ह्याला "अंध विश्वास" , देई फेटाळूनी //
आधुनिक होते विचार त्याचे, कलाकार तो होता
पृथ्वीवरील घटणाना परि , योग म्हणत होता //
काढून टाकल्या तसबिरी आणि मुर्ति, देखील ती
नाव प्रभुचे त्या वातावरणी, कुणी न घेती //
प्रेमळ त्याचा स्वभाव असूनी, चित्त तयाचे स्वछंदी
रहात होता सुंदर बंगलीं, अतिशय आनंदी //
छंद तयाला फुलझाडांचा, बाग केली छान
विविधतेची झाडे झुडपे, दिसे शोभावान //
दिवसभराचे कष्ट करुनी, फुलवित असे बाग
सुवास सारा दरवळूनी, डोलती तेथे नाग //
पक्षी आणि प्राणी जमवूनी, संग्रहालय दिसले
आवाजांचे सूर निघूनी मग, मधूर ते भासले //
मोर नाचे थुई थुई तेथे, नभी येता ढग
आनंदाला सिमा पडेल, कशी तेथे मग //
सारे होते नयन मनोहर, त्या वातावरणीं
संबोधित होता त्या वास्तूला "निसर्ग " तो म्हणूनी //
वेड लागुनी तन्मय झाला, सौंदर्याच्या ठायीं
निसर्गातील रस सदैव, शोषित तो राही //
नास्तिक तो अन् ईश्रर नसे, ही त्याची धारणा
परि तोच भासला खरा आस्तिक समरस होतांना //
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti