(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • चेतना

    ओठावरले गीत माझे, आज कसे हे रुकून गेले

    गीतामधले शब्द रूकता, ओठ कसे हे सुकून गेले....।। धृ ।।

    आकाशातील थवे पाहूनी,

    चंचल माझी नजर झाली

    भिर भिरणाऱ्या दृष्टी पटावर

    असंख्य चित्रे उमटूनी गेली

    चित्र बघूनी नाचे मन जे

    पाषाणा परी स्थिर कां झाले....१

    ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले

    गीतामधले शब्द रूकता ओठ कसे हे सुकून गेले

    झूळझूळ वाहे सरीता पाणी

    पाण्यावरती दिसे तरंग

    हलके हलके भिजवी अंग

    पुलकीत करी रोम रोम जे

    थंड आज परि होता दिसले....२

    ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले

    गीतामधले शब्द रूकता ओठ कसे हे सुकून गेले,

    सारे कांहीं तसेच आहे

    सभोवतालचा निसर्ग ठेवा

    अंतर्मनही माझे आपले

    लुटीत असे जो सुखद मेवा

    परि दोन्हीमधले अंतर ते

    आज भासते दूर जाहले...३

    ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले

    गीतामधले शब्द रूकता ओठ कसे हे सुकून गेले

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • जागतिक नारळ दिन

    भारत हा जगातील नारळ उत्पादनात एक अग्रगण्य देश आहे. जगात नारळ उत्पादनात भारताचा तिसरा क्रमांक लागतो. भारतात १९.८ लाख हेक्टर क्षेत्रात २०४४ कोटी नारळाचे वार्षिक उत्पादन घेतले जाते.

  • कोण जिंकलं…..!

    युद्ध संपलं…
    शत्रूवर विजय मिळाला…
    सगळीकडे फटाके… जल्लोष…
    चार दिवस सगळेच 'विजयोत्सव' साजरा करतील…
    नेताजी मंचावर उभे राहून घोषणा देतील –
    "हे आपल्या पराक्रमी सैन्याचं यश आहे!"
    ...आणि त्या यशाचं भांडवल करून
    निवडणुकीची रणधुमाळीही जिंकतील!
    आणि डिप्लोमॅटीक जगात रमतीलही......!

    पण...
    तिकडे, एखाद्या दूर, दुर्लक्षित गावात...
    वृद्ध आई वडील–
    डोळ्यांत आसवं, हातात फोटो घेऊन....
    विरपुत्राच्या आठवणीत हरवलेली
    दुचीत बसलेली आई......
    अन् सोललेल्या खावंदावर शहादत मलम लेपुन,
    शून्यात नजर लावून बसलेले वडील.......!

    एक अनाथ मुलगा –
    बाबांच्या कुशीत खेळण्यासाठी रडतोय,
    तळमळतोय.....
    आईला वारंवार विचारतोय....
    "बाबा कधी घरी येणार ...!"
    "मला त्यांच्या कुशीत खेळायचं" म्हणतोय.....
    पण ती कुशी तर आता फक्त आठवणीतच उरली आहे...

    ...आणि ती,
    ती वीरपत्नी –
    जिचं कुंकू उजडलंय...
    भकास जिनगीचे चटके अंगावर सहन करत....
    ती जिवंत मरण जगते आहे,
    कधीही न भरावं असं दुःख घेऊन...

    आपण?
    आपणही चार दिवसात त्यांना विसरून जाऊ,
    फेसबुकवर "जय जवान" लिहून पुढची पोस्ट पाहू...!

    पण एक प्रश्न तसाच उरतोच...
    हो, त्यांनी मातृभूमी वाचवली…
    ते लढले आपल्यासाठी....
    त्यांनी शौर्यही गाजवलं…
    ...पण
    " कोण जिंकलं हो ?"

    ©गोडाती बबनराव काळे, लातूर
    9405807079

  • पुरुषाचं दुखणं कुठे कोणाला समजतं?

    अनेकदा आपण स्त्रीबद्दल वाचतो पण पुरुषाच दुख कधीच कोणाला समजत नाही. त्याचे दुख जरी कोणाला समजले तरी त्याच्याविषयी कोणीच बोलत नाही. अशीच प्रत्येक पुरुषाची व्यथा सांगणारी ही कविता.

    स्त्रीचं ममत्व आणि प्रेम लोकांना कळतं

    पण पुरुषाचं दुखणं कुठे कोणाला समजतं?

    लहानपणी तो मोठी मोठी स्वप्न पाहतो

    स्वतःच्या स्वप्नासाठी न जगता तो कुटुंबासाठीच जगतो

    लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मरमर करतो

    पण बालवयातच ताईच्या शिक्षणासाठी

    स्वतःच्या शिक्षणावर पाणी सोडतो

    या बालवयातच त्याच्यावर जबाबदारीचं ओझं पडतं

    पण पुरुषाचं दुखणं कुठे कोणाला समजतं?

    तारुण्यात उसंत घ्यावी म्हणतो

    तोवर कामाचा व्याप डोक्यावर चढतो

    कुठे तरी चार पैशाची नोकरी मिळावी

    म्हणून पुन्हा तो पायपीट करतो

    काँलेजला रोज जातो पण अभ्यासात लक्ष देत नाय

    कारण नोकरी शोध म्हणून रोज शिव्या देते आय...

    या तारुण्यात पण त्याला तरुण म्हणून जगता येत नसतं

    पण पुरुषाचं दुखणं कुठे कोणाला समजतं?

    बायका-पोरांमध्ये आयुष्य सुखात घालवाव असं प्रत्येक पुरुषाला वाटतं

    पण रोज सकाळी उठून संध्याकाळी झोपायला येणं एवढचं त्याचं रुटीन असतं

    ट्रेन बस आणि आँफीस इतकेच त्याचे विश्व असते

    चार प्रेमाचे शब्द बोलण्यासाठी त्याला मात्र फुरसत नसते

    रोज धक्के खात जगतो तो, मात्र आपल्याला आईच सगळ्यात जवळ असते

    त्याच्या भावना त्याला व्यक्त करता येत नाहीत

    आई मात्र रडून मोकळी होते

    पण रोज संसाराच्या विचाराने

    त्याची मात्र घुसमट होते

    संसाराचं ओझं काय असतं हे त्याच्याशिवाय कोणालाचं माहित नसतं

    पण पुरुषाचं दुखणं कुठे कोणाला समजतं?

    बघता- बघता चिऊ- दादा इतके मोठे होतात

    क्षणात विसरतात त्याला, अनं पोरकं करुन जातात

    शेवटी चष्मा आणि काठी एवढेच सोबत राहतात

    मग काही दिवसांनी चार खांदेकरीसुद्धा येतात

    अलगद संसार सोडून तो सरणावरती चढतो

    सगळ्यांना सुखात ठेऊन हा आयुष्यभर दुखाला कवटाळून बसतो

    अपु-या त्याच्या स्वप्नाचं ते सरणंसुद्धा मग जळतं नसतं

    पण कुटुंबासाठी जगलेल्या त्या पुरुषाचं दुखणं कुठे कोणाला समजतं ?

    - अमोल उंबरकर

  • ती कुंकू लावते मंगळसूत्र घालते

    ती कुंकू लावते मंगळसूत्र घालते
    मग तिला नावं ठेवली जातात
    पण या नावं ठेवणाऱ्या काही बायका
    फॅशन म्हणून वेगवेगळी मंगळसूत्र घालतात
    तिने हळदी कुंकू केलं म्हणून
    मागासपणा काहीजणी म्हणतात
    पण किटी पार्टी असते खरी यांची ती
    पण नावाला या हळदी कुंकू आहे म्हणतात
    संस्कार संस्कृती जपली तर बॅकवर्ड ठरतो
    हाय फायच्या नावाखाली सरळ
    सण परंपरा नाकारणं होत असत
    हल्ली आता नवीनच फॅशन आली
    पुरुषांना उगाच बोलायचं
    स्त्री मुक्तीच्या नावाखाली नाहक
    सरसकट प्रत्येक पुरुषाला चुकीच ठरवायचं
    खरच सांगा बायांनो अस खरं असतं?
    कुठलाच नवरा किंवा पुरुष प्रत्येक
    जड जोखड बायकांवर लादत असतो?
    नसत अस खर काही पण दाखवलं जातं
    काही टक्के असतील पुरुष तसे
    पण बायकांचं बोलणं मात्र होत असत
    स्त्री पण दुसऱ्या स्त्रीला बोलते
    सोडत नाही बाई बाईलाच बोलणं
    पुरुष राहिले बाजूला सारे मग
    बाईला बोलणं पण कुठे अजूनही सुटलं
    सण संस्कृती ही आपली परंपरा
    त्यात बायकांना वेठीस धरण होत नसत
    करा किंवा करु नका प्रत्येकीच मत
    पण पुरुषांना बोलणं चुकीच होत असत
    सणात भारी साडी दागिने बायकांना नटायला
    कारण मग हळदी कुंकूच चालते
    तेव्हा सहज हौसेने होत असते पण
    दुसरीने हे सण जपले तर मागासपण ठरते
    हल्ली म्हणे टिकली लावली तर ती
    ओल्ड फॅशन होते टिकली ही फॅशन
    हे गणित नव्यानेच आता कळते
    खर सांगू प्रत्येक स्त्री टिकली लावल्यावर
    सुरेख छान दिसते चेहेऱ्यावरील
    भाव टिकली रेखते
    मंगळसूत्र घाला अथवा नका घालू
    हा प्रत्येकीचा निर्णय असतो पण
    त्या वरुन पण इशू करणं कित्येक
    बायकांना सहज अस जमत असत
    थोडक्यात सार सांगते कित्येक स्त्रिया
    त्यांच्या सवडीने वागत असतात
    बोलतांना मात्र त्या स्त्री समानतेवर
    उगाच नारे लावून बोलत असतात
    नवीन फॅशन म्हणून जुन्याला
    नावं ठेवण बऱ्याचदा होत असत
    पण हौस करायची तर जुन्याच
    गाठोडं काहीजणींना चालत असत
    सत्य आहे हे सखींनो राग मानू नका
    पुरुषाला बोलतांना विचार करुन पहा
    स्वतंत्र आहे स्त्री तरीही नारे लागतात
    काळाच्या नावाखाली चुकीचे नारे लागतात
    -- स्वाती ठोंबरे.
  • चारोळी – भाकरी साठी वणवण

    भाकरी साठी वणवण
    फिरलो दाही दिशा
    चंद्र -तारे चमकती डोळ्यासमोर
    अशी झाली माझी दशा

    -- सौ. माणिक दिलीप शूरजोशी

  • जीवन ध्येय

    प्रभूची लीला न्यारी, विश्वाचा तो खेळकरी

    कुणी न जाणले तयापरी, हीच त्याची महीमा १

    जवळ असूनी दूर ठेवतो, आलिंगुनी पर भासवितो

    विचित्र त्याचा खेळ चालतो, कुणी न समजे त्यासी २

    मोठ मोठे विद्वान, त्यांत कांहीं संतजन

    अध्यात्म्याचे ज्ञान घेवून, विश्लेषण करती प्रभूचे ३

    कांहीं असती नास्तिक, कांहीं असती आस्तिक

    त्यांत काही ज्ञानी मस्तिक, चर्चा करिती प्रभूची ४

    सत्य परिस्थिती ऐसी, कुणी न जाणले प्रभूसी

    सर्वांची चालना तर्कासी, प्रभूच्या अस्तित्वाविषयी ५

    फक्त एकमुखी वाच्यता, असे ती सर्वता

    महान शक्ती असता, ह्या ब्रह्मांडामध्ये ६

    सर्वांनी जाणले एक, ‘अपूर्व शक्ती’ ह्याचा चालक

    त्याच ऊर्जेचे हे प्रतीक, सारे विश्वमंडळ ७

    कुणा नाही दुजा भाव, समजोनी त्या शक्तीची ठेव

    ज्ञानी देती नाव, निरनिराळी त्या शक्तीसी ८

    कुणी म्हणती राम, कुणी म्हणे रहीम

    कुणी संबोधती गौतम, येशू असे कुणाचा ९

    परी तत्व नसे वेगळे, नावे होत निरनिराळे

    सामान्यास ते न कळे, हीच खरी शोकांतिका १०

    सारे जीवन निघून जाई, परी त्या शक्तीचा बोध न होई

    विश्लेषण करीत राही, त्याच्या अस्तित्वाविषयी ११

    जाणावी ती शक्ती, रूप आकार त्यास नसती

    शक्ति समजोनी करावी भक्ती, आदर भाव ठेवून १२

    मानवजन्म श्रेष्ठ ठरविला, विशेष बुद्धी मिळून त्याला

    विचार शक्ती उपजण्याला, मानवामध्ये १३

    बहूत झाले विद्वान, कर्तव्य करूनी मिळवी मान

    मानव जातीची ती शान, ह्या संसारी १४

    मार्ग निरनिराळे दाखवी, सारे मिळती एक ध्येयी

    सर्वार्पण त्या शक्ती होई, ध्येय मिळतां जीवनाचे १५

    विचार करा मनाशी, आपले वैर आपणाशी

    नसते केव्हां प्रभूशी, हेच मूळ दु:खाचे १६

    वाद नसतो ध्येयापरी, चर्चा असे मार्गापरी

    हीच मानव निर्मिती खरी, सर्व सुख दु:खाची १७

    तथा कथित पंडित, सामान्यांत विद्वान होत

    ज्ञान त्यांचे थोडेसे जास्त, बहुजनां पेक्षा १८

    वापरूनी ज्ञान शक्ती, सामान्य जनांस वाकविती

    आपले अस्तित्व स्थापती, प्रभू शक्तीशी विसरून १९

    तर्क शक्ती थोर, आहे चा नाही करणार

    नाही ना आहे म्हणणार, ज्ञानाचा खेळ करूनी २०

    मार्गाचे करूनी भेद, करीत राही वाद

    जीवन करी बरबाद, विसरूनी ध्येयासी २१

    ध्येय असे महान, मार्ग हे साधन

    साधनास साध्य समजोन वाया जाई आयुष्य २२

    साध्य नका समजू साधनासी, ठेवा विश्वास साध्यासी

    कोणत्याही साधनाने जातासी, साधका प्राप्त होई ध्येय साध्य २३

    निरनिराळ्या मार्गाचे प्रयोजन, ज्ञान शक्ती वापरून

    स्वअस्तीत्व ठेवण्या टिकवून, केले असे २४

    अस्तित्वाची भावना मोठी, प्रत्येक झगडतो त्यासाठी

    आयुष्य खर्ची त्या पोटी, सकळ ज्ञान २५

    न कळे त्यास देवपण, भांडण्यास जाई विसरून

    आयुष्य मातीमोल, करून टाकीत असे २६

    विसरूनी जा सर्व भेद, मिटवून टाका वादविवाद

    लहान मोठ्याचा संवाद, नष्ट करा त्वरीत २७

    सारेच आहेत छोटे, कुणी नसती मोठे

    हे केवळ आपपासातील तंटे, मानवनिर्मित असती २८

    जात धर्म होत अनेक, हे मानव निर्मित प्रतिक

    सर्व मार्गाचे ध्येय एक, न कळे अज्ञानामुळे २९

    म्हणून जाणावा ईश, सार्थकी लावा आयुष्य

    जात धर्माचे पाश, सोडून घ्यावे ३०

    महान शक्ती तीच ईश्वर, दुसरा नसे कोणी वर

    आपणच देतो त्यासी आकार, सगुण रुप देवूनी ३१

    मानवता हाच धर्म खरा, आपसातील भेद विसरा

    प्रभू देई तयाना आसरा, जीवन सुखी करण्या ३२

    दुसऱ्याची दु:खे जाणा, त्यांच्या सुखात आनंद माना

    प्रभू अंश त्यासी म्हणा, हीच जीवनाची गुरू किल्ली ३३

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • रंगाच्या उधळूनी लाटां

    रंगाच्या उधळूनी लाटां, नाचल्या किती गोपिका,
    आज पंचमी, रंगात नाहली,
    विलक्षण गोकुळाची कळा,||
    श्रीहरी नावातच हिरवा,
    निळा रंग गगनाचा,
    आभाळभर पसरलेला,
    रंग शोभे तो निळ्या'चा,
    अस्तित्त्व' त्याचे आसमानी,
    आणि सखाहरी तो धरणीचा,|| २ ||
    गोपिका आज नाचल्या
    टाकुनी सगळ्या बंधना
    जिवाशिवांचे' बनले ''अद्वैत'''',
    विसरून साऱ्या तनांमनां,
    कृष्णा'सम तो कोण सवंगडी,
    मिळेल त्यांना नेमका,---???
    रंगवुनी टाकती, भान विसरती,
    माखवुनी टाकती एकमेकां,
    समर्पणा'ची 'तऱ्हा'च न्यारी,
    गोकुळीचाच, वाजे डंका,---!!!! || ४ ||
    सगळ्या एकजीव, एकतान,
    एकरूप एकप्राण'
    एकमेव ध्येय आणि
    एकच ते 'पंचप्राण',----!!!
    शरीरे अनेक रंग खूप,
    रुपे' -- वेगळी तयांची,
    आत्म्या' मधला, एकच कान्हा,
    एकच दिसे फक्त श्रीरंग,''''----!!! || ५ ||
    खेळती बेधुंद' गोपिका
    जशा रमुनी गोकुळा,
    तशीच भोगती सर्व,
    इंद्रिये इह'-- सुखां,
    अतृप्त'खेळे आत्मा,
    त्यात सतत सारखा,
    होई देहा'चेचगोकूळ'
    आत्मा'कृष्णसखा''',!!

    हिमगौरी कर्वे. ७७७ ५०८५६५७.

  • दृष्टी

    व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली वैभव दळवी यांची हि कविता

  • अंबेस दाखवी काव्य

    पाटीवरती अंक लिहीले, बागडूं लागला आनंदाने

    पित्याचे ते लक्ष वेधण्या, हनुवटी खेची तो हातानें....१,

    प्रथमापासूनी लक्ष पित्याचे, होते अवखळपणाकडे

    अजाणपणा तो दाखवोनी, दुर्लक्ष करी तो मुलाकडे...२,

    शब्दांची ती गुंफन करूनी, कवितेचा तो संग्रह केला

    तोच संग्रह घेवून चाललो, दाखविण्या माहूरी रेणूकेला...३,

    जगदंबा ही आदी शक्ती, सारे तिजला ज्ञात असते

    अजाण बालक हट्टी असूनी, तिच्याच घऱी दाखविण्या जाते...४,

    पाटीवरले अंक बघूनी, हृदय पित्याचे गहीवरले

    रेणूका तर जननी विश्वाची, भाव मनीचे आधीच कळले...५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com