अपमान होईल तुझा शारदे, हे घे तू जाणूनी ।
मूर्खावरती बरसत आहेस, जाणेना कुणी ।।
ज्ञान-विज्ञान अभाव दोन्हीचा, असे माझे ठायी ।
भाषा साहित्य यांच्या छटा, दिसून येत नाही ।।
निर्धनासी धन मिळता, जाई हर्षूनी ।
हपापलेला स्वभाव येई, मग तो उफाळूनी ।।
माकडाचे हाती मिळे कोलित, विनाशास कारण ।
गैरउपयोग होई शक्तीचा, नसता सामान्य ज्ञान ।।
शब्द वाकतील तुझ्या कृपेने, भावना उफाळता ।
वेड्यापरी कोठेही पळतील मर्यादा सोडता ।।
जाण आहे एकची मजला, तुझ्या शक्तीची ।
वाल्मिकी, कालीदास, अज्ञानीना ज्ञानी केल्याची ।।
तसेच देऊन ज्ञान थोडेसे, शाहणा कर आधी ।
ठेवणार नाहीत नावे मजला, नंतर कुणी कधी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
"नरेंद्रजीं"चे धरून बोट
"देवेंद्रजी" पळत आहेत
"घड्याळ्या"च्या काट्यांना
ते अधूनमधून लोंबकळत आहेत
विझली "गांधी" नामाची आँधी
उरली थोडी ज"रा हूल" आहे
अखिलत्व गमावलेल्या पक्षास
"अखिलेशी" यशाची भूल आहे
सन्मान बहु पडला पदरात
बारा मती ची ही करामत आहे
कोणत्याही सत्ता-ऋतूत
"शरद" ऋतु ऐन भरात आहे
मज तुजसवे घेऊन टाक रे
अन् मतदारां पुढे उभा "ठाक रे"
धाकट्याची ही टाळी टाळून
मोठा म्हणे तू असाच वाक रे
मंत्रीपदाच्या खुर्चीत
कवी-राम रममाण आहे
कमळाच्या कर्जात आता
सा"री पब्लीक" गहाण आहे
मतमतांच्या या गलबल्यात
जनतेस हे कळले आहे
आळीपाळीने या साऱ्यांनी
लोकशाहीस छळले आहे
------ कवी कोण आहे माहिती नाही
चला दूर ...चला दूर...
या थंडीपासून
आपण उघड्यावर
उन्हात पळूया...
खात गोड...खात गोड...
तिळाचे लाडू
आपण सर्वांशी
गोड गोड बोलूया...
पतंग उडवुया...पतंग उडवुया...
पतंग कापुया
पतंग पकडुया
पतंग भिडवुया...
मकर संक्रांतीचा सण
उत्साहात साजरा करुया ...
जीवनात त्याच्या माध्यमातून
कित्येकांच्या हृदयात
आनंद ,उत्साह
आणि गोडवा भरूया ...
दूर गेलेल्या मनाशी संवाद
साधून त्यांना
पुन्हा जवळ आणूया ...
सर्वांना
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
मनापासून देऊया...
© कवी - निलेश बामणे
( मो. ८६९२९२३३१० )
मनाला जुळती मन....
नाते उदयास येते....
'माना'ची मातंबरी
मन गुंतुनि जाते....
भावनांचा खेळ....
'मान'ली तरच नाती....
आज करावा गोड...
उद्या कुणाचे हाती....
दु:ख ही गोड मानावे..
गोड ही विष ठरते......
कुण्या 'मधुमेही'च्या
मनात शिरून जाणावे....
बिंदुला जोडुनिया बिंदु....
रांगोळी बनते.....
तयासी रंगत
आपले 'जीवन' रंगते.....
लाभता ध्येय....
अन् उद्देश....
हा 'जीव' भरतो रंग....
जगण्याचे तरंग...
भाव बुडबुडे....अन्
मानलेले 'गोता'वळे....
कधी अर्थ....
सर्वार्थाने निरर्थक.....
अथांग....
अबोध.....
अनंत.....
न उमजे मज....
बिंदु शी बिंदु.....
जीवनाचे कोडे....
न उलगडे मज.....
डॉ.दीपक सवालाखे....
यवतमाळ.
आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपचे लेखक
क्षण क्षणाने रंगुन गेला,?
क्षण क्षणात भंगुन गेला,?
क्षण क्षणांत रोम दाटले,?
क्षण क्षणांचे मोती झाले !?
क्षण क्षणांचे गुलाम झाले,?️
क्षण क्षणांत गुंतुन गेले,?
क्षण क्षणात चिंब न्हाले,?
क्षण क्षणांत क्षणिक झाले !?
क्षण क्षणात क्षणभंगुर झाले,✨
क्षण क्षणांस ओझे वाटले,?️
क्षण क्षणात स्मृती भासले,?
क्षण क्षणात वाहत गेले !?️
क्षणात हसले , क्षणात रडले,?
क्षणात रडूनी हासू उडवले,?
क्षण क्षणांत मुरून विरले,?
क्षणात क्षणांचे क्षितीज झाले !?
-- श्वेता संकपाळ.
२७-०६-२०१९
काय म्हणू ग तुजला देवकी
भाग्यवान की अभागी
ईश्वर तुझीया उदरी येवूनी
सुख न लाभले तुजलागी //
जन्मोजन्मीचे पुण्यसाचुनी
मात्रत्व लाभे स्त्रिजन्माला
तु तर असता जननी प्रभूची
तुजविण श्रेष्ठ म्हणू कुणाला //
राज वैभवी वरात निघता
कारागृही तुज घेवून गेले
अवताराची चाहूल असूनी
दुःखी सारे जीवन गेले //
कंसाने तव मुले मारीली
निष्ठूर होऊनी स्वार्थापोटी
तु गिळून घेशी दुःखे सारी
आगमन प्रभूचे होण्यासाठी //
ईश्वर येता तव उदरी
भाग्यवान तू ठरलीस
जनकल्याणा त्यागूनी त्याला
सर्व श्रेष्ठपदी गेलीस //
माझ्या भोवताली,
माणसांचे रान,
चहूबाजूंना असूनही,
वाटा सुनसान,--!!!
टोचे सले असे एकटेपण,--!!
माझ्या भोवताली,
नातीगोती किती,
प्रश्न एकच पडे,
विचारती किती,--
टोचे सले असे एकटेपण,--!!
माझ्या भोवताली,
मित्रपरिवार किती,
असंख्य हात निव्वळ,
फक्त वर ते उठती,
टोचे सले असे एकटेपण--!!
माझ्या भोवताली,
पिके खूप मतांची,
उपयोगाला येती,
त्यातील का कधी,--!!
टोचे सले असे एकटेपण--!!
माझ्या भोवताली, दे
कितीक सहयोगी,
असते का त्यांना,
आंच हितचिंतनाची,--?
टोचे सले असे एकटेपण,--!!!
माझ्या भोवताली,
माझे असे किती,
प्रेम माया कुठली,
आणावी आपुलकी,--
टोचे, सले, असे एकटेपण--!!
माझ्या भोवताली,
इहलोकातील गर्दी,
प्रांजळ निर्मळ,
भावना कोणाची खरी,--
टोचे सले असे एकटेपण,---!!!!
©️ हिमगौरी कर्वे.
धडपड असते प्रत्येकाची जगण्यासाठी,
तेच जगती जगी या शक्ति ज्यांचे पाठी...१,
बुद्धी, अनुभव, विचार, बळ शक्तीची रूपे
यश मिळविण्या जीवनातील हीच मोजमापे...२,
नीती-अनिती, पाप-पुण्य, सामाजिक बंधने
सरळमार्गी जगण्यासाठीं हवीत ही कारणे...३,
जन्म मृत्यूच्या रेषेवरती, उभा संकटकाळी
पशुसमान वागत दिसतो, मानव त्यावेळी...४,
प्रथम गरज भागवी सारे, स्वजीवनाची
आदर्श जगणे तत्वे राहती, मग नंतरची....५,
मृत्यूच्या दाढे मधूनी, एक सुटून जातां
मृत्यूपाश टाकी दुजासाठी, स्व जगण्या करिता....६,
जगण्यासाठी मृत्यू आणि मृत्यूमुळेच जगणे
निसर्गाचे चाले अविरत हेच खेळणे....७
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
सुचले होते सारे कांहीं , ढळत्या आयुष्यीं ।
संधिप्रकाश दिसत होता, सूर्य अस्ताशीं ।१।
काळोखाची भिती उराशीं, लांब आहे जाणे ।
कळले नाहीं यौवनांत, कशास म्हणावे जगणे ।२।
समजून आले जीवन ध्येय, चाळीशीच्या पुढें ।
खंत वाटली जाणता, आयुष्य उरले केवढे ।३।
विषय सारे अथांग होते, अवती भवती ।
कसा पोहू या ज्ञान सागरीं, विवंचना होती ।४।
निराश होऊं नकोस वेड्या, कर्तृत्वाला काळ न लागे ।
क्षणांत चमकूनी प्रकाश देणें, हीच विजेची अंगे ।५।
वर्षा येवून निघून जाते, न्हाऊं घाली धरणीला ।
हिरवे प्रफुल्लित वातावरणीं, आनंद दिसे सर्वाला ।६।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti