स्थितप्रज्ञ असा समुद्र आणि
तितकंच अथांग असं आकाश
एकमेकांना भेटतात
क्षितिजाच्या तितक्याच प्राचीन रेषेवर
आणि ती चिरंतन रेषा जपून ठेवते
त्यांच्यातल्या जुन्या संदर्भांचे दाखले..
त्या हितगुजाचे अर्थ जाणवतात फक्त
त्या समुद्राला,आकाशाला आणि त्या क्षितिजाला
काही हितगुजं शब्दातीत असतात हेच खरं...
---आनंद
ज्याच्यासाठीं व्याकूळ झाली, उभी अयोध्या नगरी,
कां धाडिला राम वनीं ? कैकयीला भरत विचारी ।।धृ।।
आम्ही बंधू चौघेजण,
झालो एका पिंडातून,
कसा येईल भाव परका ?
असतां एकची जीव, चार शरीरीं
कैकयीला भरत विचारी ।।१।।
वचनपूर्ती ब्रीद ज्याचे,
आदर्श जीवन रघूवंशाचे,
कसली शंका मनांत होती ?
पारख ना केलीस, त्या हिऱ्याची परी,
कैकयीला भरत विचारी ।।२।।
सर्व जणांचे प्राण होता,
जगणे कठीण झाले आतां,
रोष कशाला घेसी त्याचे,
अकारण ते आपल्या शिरावरी ?
कैकयीला भरत विचारी ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
बागेतील तारका –
शालेय शिक्षण पुरे करून, महाविद्यालयात जाऊ लागलो. नवा उत्साह, नवे मित्रमंडळ आणि उच्च ते वातावरण. मनाचे, विचारांचे आणि बागडण्याचे एक वेगळेच स्वतंत्र. मला त्यावेळचा एक गमतीचा प्रसंग आठवला. ज्याचे धागेदोरे पुढील जीवनात पंधरा वर्षानंतर विणले गेलेले आढळले. महाविद्यालयातील तो दिवस आठवतो.
वृत्त :- मानसी
लगावली :- गागालगा लगागा गालगा लगागा*
आगीत पेटलेले गाव पाहिले मी
चोरास साथ देण्या साव पाहिले मी
++++++++++++++++++
गावात श्वापदांची वाढली मुजोरी
डोळ्यात पेटलेले भाव पाहिले मी
+++++++++++++++++++
भूकेजला कसा आत्ताच गाव माझा
धान्यास फेकणारे राव पाहिले मी
++++++++++++++++++
हास्यात आज होते दु:ख गोठलेले
ह्रदयात लपवलेले घाव पाहिले मी
+++++++++++++++++++
थाटात आज होते गावचे पुढारी
जोषात हारणारे डाव पाहिले मी
++++++++++++++++++
भूकेस शरण गेली आज माय कोणी
ओट्यात दडवलेले पाव पाहिले मी
++++++++++++++++++
© जयवंत वानखडे,कोरपना
मुसळधार वर्षा चालली,
एक सप्ताह होऊन गेला,
पडझड दिसली चोहीकडे,
भरुन वाहे नदी-नाला ।।१।।
काय प्रयोजन अतिवृष्टीचे ?
हानीच दिसली ज्यांत खरी,
निसर्गाच्या लहरीपणानें,
चिंतीत झाली अनेक बिचारी ।।२।।
दूरदृष्टी माझी मर्यादेतच,
विचार तिजला अल्प घटकांचा,
विश्वचालक काळजी करि,
साऱ्या चौऱ्यांशी लक्ष योनींचा ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
मुसळधार ती वर्षा चालली, एक सप्ताह तो होवून गेला
पडझड दिसली चोहीकडे, दुथडी वाहतो नदी-नाला...१,
काय प्रयोजन अतिवृष्टीचे ? हानीच दिसली ज्यांत खरी
निसर्गाच्या लहरीपणानें, चिंतीत झाली अनेक बिचारी....२,
दृष्टी माझी मर्यादेतच, विचार तिजला अल्प घटकांचा
विश्वचालक काळजी करि, साऱ्या चौऱ्यांशी लक्ष योनींचा....३
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
निराकार तो असूनी व्यापतो,
सर्व विश्व मंडळ,
सूक्ष्मपणातही दिसून येतो,
करी जगाचा प्रतिपाळ ।।१।।
दर्शन देण्यास भक्त जणांना,
धारण करितो रूप,
तसाच दिसे नयनी तुमच्या,
ध्यास लागता खूप ।।२।।
दृष्टांत होणे सत्य घटना ती,
जीवनी तुमच्या घडे,
वेड लागता प्रभू चरणाचे,
सदैव स्वप्न पडे ।।३।।
कुणामध्येही अस्तित्व दाखवी,
हीच त्याची किमया,
परि टिपून घेई खऱ्या भक्ताची,
दृष्टांताची ही माया ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
ती आल्यावर
बाग बहरली ,घेत उखाणे ती आल्यावर
सुरू जाहले ,नवे तराणे ती आल्यावर
मीच टाळतो,पितही नाही,पाजत नाही
सरले सारे ,जुने बहाणे ती आल्यावर
मुलगा गेला हातामधुनी माय सांगते
चालू झाले हे गाऱ्हाणे ती आल्यावर
पदरी पडले रत्न देखणे तिच्या सारखे
घरही झाले असे शहाणे,ती आल्यावर
किती जाळले सूर्याने मज ती नसताना
नभात जमले मेघ दिवाणे ती आल्यावर
मनात माझ्या गीत हरघडी नवे जन्मते
सहज बोलणे,होते गाणे,ती आल्यावर
ती आली अन सुचू लागली मला शायरी
पंख लाभलेली उड्डाणे,ती आल्यावर
© जयवंत वानखडे,कोरपना
भ्रमणध्वनी ९८२३६४५६५५
जन्मच जर सोसण्यासाठी, तर दुःख कशाचे करावे,--?
आयुष्याला तारण्यासाठी,
का सुखाचे आधार घ्यावे,--?
इथे कुणी ना आपल्यासाठी, कळवळून मग काय मिळवावे,
फक्त मग जगण्यासाठी,
शरीरही का झिजवावे,--?
थोडा उजेड दिसण्यासाठी,
कितीदा डोळे मिटून घ्यावे,
पार अंधारा करण्यासाठी,
सतत सारखे ठेचकळावे,
जखमी मन लपवण्यासाठी, जिद्दीला किती उभारावे,
घायाळ जिणे झाकण्यासाठी, डोळेझाक करत राहावे,
येतो तो वार करण्यासाठी,
कसे त्याला सारखे आवरावे,
हात उठतो थोपवण्यासाठी, अनामिक ओझे किती पेलावे,
जो तो फक्त आपल्यासाठी, मतलबाला कसे *आंकळावे,
अशा नि:स्वार्थी मनासाठी,
केवढे आणि किती झुरावे,-?
© हिमगौरी कर्वे.
Copyright © 2025 | Marathisrushti