(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • श्रीमंत योगी, जाणता राजा

    श्रीमंत योगी, जाणता राजा,
    श्री शिवछत्रपतींना त्रिवार वंदन,-

    श्रीशिवराय छत्रपती,अजून आठवती,लोक पहा आजमिती,--
    होsssss जीssss जीssssजी,

    रयतेस अभय' तरी दरारा,
    परस्त्री' माता, आपुल्या मातेचा आदर करती होssss जीsss जी,

    आज्ञेत राहून तिच्या, सकल कारभार केला,राज्यात पहा,
    सर्वधर्मसमभाव' पाहती होssss
    जीssss जीssss‌जी,-++

    छत्तीस वर्षे गनिमाशी झुंजला,
    जातिभेद झुगारुन एकोपा साधला,
    शक्ती,युक्ती,नीती,रीती,भक्ती होssssजीsss जीsss जी,-++

    दगडधोंड्यात जागवली अस्मिता
    स्वराज्यहेतू कृतीने योजिला,
    महाराष्ट्रधर्म' वाढवला की होsss
    जीsssssजीsssजी,---++

    शब्द आईचा पाळला,राज्य मानुनी
    श्रींची इच्छा,; साठी सत्ता स्थापिली
    होssssजीssssजीssssजी,-++

    राज्यकार्यी जीव वाहिला,समर्पित जीवना,संकटे किती झेलली,sss होsssजीsssजीssssजी,-++

    प्रजेस पित्यासम,न्यायास नेहमी तडी, तरून गेला,कित्येकदा,तो धर्मसंकटी,होsssजीsssजी,-++

    वासनांधांना नव्हती क्षमा,
    सजा कठोर पापकर्मा,
    सेवा, मदतीचा हात मिळतां,
    ओघ भरघोस दानाचाच वाही,होsss जीsssजीsssजी-+

    जीर्णोद्धार मंदिरांचा, मान मशिदींचा,ज्ञानादरे कलाकारही पूजी, होsssजीsssजीsssजी,-+

    कदर विद्या कलांची, प्राधान्य त्या कामा, कलेपुढे हमेशा नमला,असा रत्नपारखी, होsss जीssssजीsssजी,-+

    मातब्बर' शत्रूंना चकवा,साधुनी गनिमी कावा,एकनिष्ठांना प्रेमदायी होsssजीsssजीsss,-+

    फितुराची गय' न केली,विवेकाने गड,किल्ले राखतां,महाराष्ट्र् अजिंक्य ठेवी, होsssजीsssजी,--++

    राजा सदोदित झुकला,संतांच्या बोला,मान दिला सत्यता,करुणा शांती होsssजीsssजीsssजी,-+

    कधी माघार घेऊनी,राजकारण खेळला,मानुनी बुद्धिवंतांचा सल्ला,
    गरिबांत गरीब समाधानी त्याच्या दारी होsss जीsssजीsss,जी,-+

    आरमार' निर्मुनी जगाला,नवा दृष्टिकोन दिधला,नव्या कल्पना,नव्या जाणिवा,नाविन्याचा आधार होई, हो,ssssजीsssजीsssजी,-+

    तरीही धाकापुढे त्याच्या,फिरंगी'ही नमला,मनांत धास्तावला,वचक त्याचा पाहुनी, होsssजीsssजीsssजी,-++

    © हिमगौरी कर्वे.

  • शब्द माझा मोगरा

    शब्द माझा मोगरा, अन शब्द माझा पिसारा,
    शब्द माझा बोलका,
    नि तोच माझा किनारा,

    तोलतो मापतो,वाटतो,
    शब्दही सतत 'झुंज' देतो,
    राखतो पूर्ण ताकदही,
    सत्ताही पालटून देतो,---!!!

    खेळतो खेळी कल्पनांची,
    काव्यतुरेही तो खोवतो ,
    राखतो बहुत अंतरे,---
    नाना जिवांना सांभाळतो,--!!!

    प्रकटे पण शब्दांतूनही,---
    कितीक आकसनेमका,
    तोच कधी जिंकून घेईल,
    अनेक हृदय संपदा, --!!!

    वाट दाखवी कधी,
    वचन नित्य पाळतो,
    'दटावे' कधी क्वचित,
    गुरू होऊन सुधारतो,--!!!

    शिस्त लावे 'करडी',
    कठोर शिक्षणही देतो,
    नेहमी जवळ घेऊनी,
    आई बनुनी समजावतो,,--!!!

    पित्यासमान हात देतो,
    तरी जरब' वाटते बालका,-!!
    वडील बनुनी धावतो,--
    प्रसंगी,येतो कसा रक्षणां,--!!!

    मित्र म्हणून मदत करी,
    धावतो बिकट संकटा,
    नातेही सगळी जपताना,
    न करी विचार थोडका,---

    शेजारी होऊन सख्खा
    सावलीगत पाठीराखा,--!!!
    अनोळखी हात देई,
    प्रसंग उद्भवता बांका,
    अलगद बाहेर काढतो,
    त्यांतून ठरवून नेमका,--!!!

    शब्द नेतो देवाजवळी,
    हृदयांतर करी सारखा,
    , आपल्या माणसांसाठी,
    प्रसंगी नशिबाला धडका,-!!

    शब्दांवाचून सर्व "निर्धन",
    कवी त्याच्यावाचून पोरका,
    शब्दच आमुचे अमोल रत्न,
    बेलभांडार वाहते शब्दां--!!

    ©️ हिमगौरी कर्वे.

  • त्यागवृत्ती

    जीवनाच्या सांज समयीं । उसंत मिळतां थोडीशी ।।
    हिशोब केला स्वकर्माचा । वर्षे गेली कशी ।।१।।

    दिवसामागून वर्षे गेली । नकळत अशा वेगानें ।।
    सुख दुःखाच्या मिश्रणीं । जीवन गेले क्रमाक्रमानें ।।२।।

    आज वाटे खंत मनीं । आयुष्य वाया दवडिले ।।
    ऐहिक सुखाच्या मागे जातां । हातीं न कांहीं राहिले ।।३।।

    ' घेणे ' सारे आपल्यासाठीं । करीत जीवन घालविले ।।
    ' देण्या ' मधल्या आनंदाला । मन सदा वंचित राहिले ।।४।।

    सुधारुन घे आतां तरी । अनुभवाने चूक आपली ।।
    उर्वरित वर्षे जाऊं दे । त्यागवृत्ती मध्यें सगळी ।।५।।

    भोगातले सुख कसे ते । क्षणांत येई क्षणांत जाई ।।
    त्यागातील समाधान परि । उशीरा लाभून सदैव राही ।।६।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • तिरंगा स्वाभिमानाचा

    अभिमान अम्हा देशाचा
    विश्वास असे ज्ञानाचा,
    तो क्षणही दूरवर नाही
    नव उदय महासत्तेचा

    आव्हान संकटे आली
    ना मानली कधिही हार,
    त्वेषात पेटुनी लढलो
    उघडले कीर्तीचे दार

    संघर्ष जरीही केला
    पण हात पसरले नाही,
    अडखळलो पडलो उठलो
    परि इमान विकले नाही

    बुद्धीच्या जोरावरती
    श्रम जिद्द आणि शांतीने,
    उत्तुंग भरारी घेता
    यश आले आनंदाने

    त्यागाची लावुनी ज्योत
    आत्मनिर्भर भारत बनवू,
    करोनि स्वदेशी जागर
    हा महान भारत घडवू

    ही हिंद संस्कृती मोठी
    संदेश विश्वशांतीचा,
    अन् फडकत अविरत ठेवू
    तिरंगा स्वाभिमानाचा

    - विजय जोशी

  • हे वेडे प्रेम पाखरू (काव्य)

    प्रेमात पडते
    हे वेडे प्रेम पाखरू
    तुझ्यावर ही प्रीत जडते
    //१//

    धुंदीत जगते
    मन गुंतले स्वप्नात
    स्वप्नी नभात ते विहरते
    //२//

    बागेत बागडे
    फुलावर विसावले
    फुलपाखरू स्वच्छंदी गडे//३//

    मकरंद घेण्या
    मन आज आतुरले
    फुलाफुलातुनी हुंदडण्या
    //४//

    हुंदडले अती
    हाती भरल्या ओंजळी
    मधुओंजळ करना रिती
    //५//

    प्राशी मधुरस
    हे प्रेम पाखरू खुश
    प्रित-अंगणी लागे चुरस//६//

    -- सौ.माणिक शुरजोशी
    नाशिक

  • कवीची श्रीमंती

    खंत वाटली मनास कळला नसे व्यवहार ।

    शिकला सवरला परि न जाणला संसार ।।

    पुढेच गेले सगे सोयरे आणिक सारी मित्रमंडळी ।

    घरे बांघूनी धन कमविले श्रीमंत झाली सगळी ।।

    वेड्यापरी बसून कोपरी रचित होता कविता ।

    कुटुंबीय म्हणती त्याला कां फुका हा वेळ दवडीता ।।

    सग्यांच्या उंच महाली बैठक जमली सर्व जणांची ।

    श्रेष्ठ पदीचा मान देवूनी कौतूके झाली कवितांची ।।

    व्यवहारी निर्धन जरी तो विराजमान मनीं दुजांचे ।

    ईश्वरी चैत्यन्न स्फुरले जे जे गुंफूनी ठेविले हार तयांचे ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • सावरकरांची व्यथा

  • जन्माला आलो तर

    जन्माला आलो तर
    मरणं ही ठरलेलं आहे,
    कुणाचं लवकर जाणं
    हे विधिलिखित आहे
    कोण कसं लवकर गेलं
    ही हळहळ व्यक्त होते,
    आयुष्य असेल थोडं
    तर नशीब ही रुसते
    लहान मोठं वय ह्याचा
    संबंध मग राहतं नाही,
    मरणदारी नौका जाणं
    सत्य मग टळत नाही
    किती करा टेस्ट आणि
    किती खा गोळ्या,
    हृदय बंद पडेल कधी
    न कळेल वेळ तेव्हा
    कोण न ह्याला अपवाद
    न कोण ह्यातून सुटला,
    क्षण भंगुर आयुष्य हे
    न रहावा कधी राग रुसवा
    मी ही जाईल अशी अचानक
    हृदय हलकेच बंद पडता,
    काव्य हृदयावर करता करता
    धडधड वाढेल मग तेव्हा
    नसेल भरोसा कसला तो
    कोण जाईल सोडून केव्हा,
    आठवणी उरतात मागे साऱ्या
    ह्यालाच उत्तरायण म्हणतात
    -- स्वाती ठोंबरे.
  • भीतीपोटी कर्म करता

    भीतीपोटी सारे करतां

    असेच वाटते....।।धृ।।

    विवेकानें विचार करा, तुम्हांस हे पटते

    त्रिकाळ चाले पूजा अर्चा

    प्रभूविषयी होई चर्चा

    बालपणींच पडे संस्कार

    सारे देण्या समर्थ ईश्वर

    कृपे वाचूनी त्याच्या, तुम्हां सुख दुरावते....१

    भीतीपोटी सारे करता, असेच वाटते,

    चूक असे हे ठसें मनाचे

    कर्म ठरवीं तुम्हींच तुमचे

    सहभाग नसे यात प्रभूचा

    सारा खेळ असे तो मनाचा

    अपयश मिळेल म्हणून टाकी, भार ईश्वरावरते.....२

    भीतीपोटी सारे करता असेच वाटते

    ऐषआरामाचे आम्ही पाठीं

    धडपड चाले सुखासाठी

    साशंक सदा मन असते

    म्हणून सारे वंचित होते

    मिळवण्यासाठीच त्याला भजावे, ही भावना मनी येते....३

    भीतीपोटी सारे करता असेच वाटते

    वाद नसे ईश्वर शक्तीचा

    चालवी सतत गाडा विश्वाचा

    खेळ बघे तो दूर राहूनी

    सारे देई तुम्हावरती सोपवूनी

    परि मन वेड्या आशेने, त्याजकडे धावते...४

    भीतीपोटी सारे करता, असेच वाटते

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • तुझ्या असण्याचा मला भास होतो

    vinod_10