(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • कर्ममुक्ती

    न राही तुमचे ते कर्म, ज्यात प्रभू इच्छा अंतीम....१,

    प्रत्येक घटनेचे अंग, त्यात मुख्य ईश्वरी भाग....२

    तुमच्या मार्फतच होई त्याचा इशारा कोण पाही....३,

    सर्व समजे मीच केले अहंकाराने मन भरले....४,

    षडरिपू असे साधन खेळविता यावे म्हणून...५,

    राग,लोभ, मोह मायादी ठेवती वाटते आनंदी....६,

    परि याच्याच शक्तीने प्रभू खेळ चाले युक्तीने....७,

    षडरिपू सारे टाळून मुक्ती मिळेल खेळातून.....८

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • प्रभू मिळण्याचे साधन

    बागेतील तारका-

  • जन्माला आलो तर

    जन्माला आलो तर
    मरणं ही ठरलेलं आहे,
    कुणाचं लवकर जाणं
    हे विधिलिखित आहे
    कोण कसं लवकर गेलं
    ही हळहळ व्यक्त होते,
    आयुष्य असेल थोडं
    तर नशीब ही रुसते
    लहान मोठं वय ह्याचा
    संबंध मग राहतं नाही,
    मरणदारी नौका जाणं
    सत्य मग टळत नाही
    किती करा टेस्ट आणि
    किती खा गोळ्या,
    हृदय बंद पडेल कधी
    न कळेल वेळ तेव्हा
    कोण न ह्याला अपवाद
    न कोण ह्यातून सुटला,
    क्षण भंगुर आयुष्य हे
    न रहावा कधी राग रुसवा
    मी ही जाईल अशी अचानक
    हृदय हलकेच बंद पडता,
    काव्य हृदयावर करता करता
    धडधड वाढेल मग तेव्हा
    नसेल भरोसा कसला तो
    कोण जाईल सोडून केव्हा,
    आठवणी उरतात मागे साऱ्या
    ह्यालाच उत्तरायण म्हणतात
    -- स्वाती ठोंबरे.
  • कळसूत्री बाहुल्या

    नाचत होत्या दोन बाहुल्या, इकडून तिकडे ।
    टकमक पाहात हांसत होत्या, चोहीकडे ।।

    झीम्मा खेळे, फुगडी खेळे, गरगर फिरती ।
    हातवारे करुन त्या, माना डोलावती ।।

    जवळ येवून गुजगोष्टी, सांगे एकमेकींना ।
    सासू नणंद यांच्या, कुलंगड्या काढतांना ।।

    सुख दुःखाच्या कथा, सांगितल्या त्यांनीं ।
    कांहीतरी करुन दाखवूं, वदल्या दोघीजणी ।।

    अज्ञानी गरीब बिचाऱ्या, जेंव्हा संकल्प करती ।
    कळसूत्री बाहुल्या त्या, दोर इतरां हातीं ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • निसर्गाचे चक्र

    कृष्ण कमळ-

    निसर्गाचे चक्र

    सतत फिरत राहते चक्र निसर्गाचे

    उत्पत्ति स्थीति लय ह्या कालकृमणाचे ।।धृ।।

    एक एक पाकळी

    लहानशी कळी

    जाई उमलून

    फूल त्याचे बनून

    सुगंधी टपोरे फूल

    कांही वेळ राहील

    कोमेजून जाई

    देऊनी …..

  • थंडी

     

  • साक्ष भगवंती

    सुरम्य सप्तरंगलेले जीवन
    फुले, पाने, काटेही संगती
    शब्दभावनां! वैखरीवरती
    कृपाच! आगळी भगवंती

    सुखदुःख,वेदनांचे मोहोळ
    भावनांतुनी गुंतलेली प्रीती
    सत्य! हेची मर्म जीवनाचे
    हृद्य वास्तव, सदैव सांगाती

    मनाचा कोंडमारा जीवघेणा
    घुसमट मौनी, छळे एकांती
    भळभळणाऱ्या, दग्ध वेदनां
    तरीही सोबती सांत्वनी प्रीती

    प्रवास श्वासांचा, थांबा मृत्यू
    कालचक्राचा अदृश्य चालक
    ललाटीचे अलिखित भाकीत
    साक्ष! हीच कृपाळु भगवंती

    -- वि.ग.सातपुते. (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. १०.

    १० - १ - २०२२.

  • राधेचे मुरली प्रेम

    मुरलीच्या सुरांत विसरली राधा सर्वाला

    कुज बूज करुनी जन समजती वेडी ते तिजला

    त्या सुरात कोणती जादू

    ती किमया कशी मी वदू

    सप्त सुरांचा निनाद उठुनी

    खेचून घेती चित्ताला – - -

    विसरली राधा सर्वाला

    धेनु वत्से बावरली

    बाल गोपाल आनंदली

    रोम रोम ते पुलकित होऊनी

    माना डोलती सुरतालाला – - -

    विसरली राधा सर्वाला

    प्रभूचा होता ध्यास मनी

    ती बघे हरिला रात्रन दिनी

    जे शब्द निघाले मुरलीतूनी

    हाका मारती ते तिजला – - -

    विसरली राधा सर्वाला

    हरिच्या ओठ्ची भाषा

    सुरात ऐकता येई नशा

    तो नाद एकला कानी पडता

    भाव समाधी लागली तिजला - – -

    विसरली राधा सर्वाला

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • पेराल ते घ्याल

    शत्रु तुमचा तुम्हींच असूनी तुम्हींच कारण दुःखाचे ।

    सर्व दुःखाच्या निर्मितीपाठीं हात असती केवळ तुमचे ।।

    बी पेरतां तसेंच उगवते साधे तत्व निसर्गाचे ।

    निर्मित असतो वातावरण क्रोध अहंकार मोहमायाचे ।।

    कसे मिळेल प्रेम तुम्हांला घृणा जेंव्हां तुम्हीं दाखविता ।

    क्रोध करुन इतरांवरी मिळेल तुम्हांस कशी शांतता ।।

    शिवीगाळ स्वभाव असतां आदरभाव कसा मिळे ।

    शत्रुत्वाचे नाते ठेवतां सलोख्याचा सांधा ढळे ।।

    इच्छा मात्र असते सुखाची सदैव मिळावा आनंद ।

    शक्य होण्या वातावरणी हवा प्रेमळ सुसंवाद ।।

    वागतां कसे या वरती आवलंबून सारे असे ।

    वाईट वागण्याचे बी पेरुनी चांगले उगवेल कसे ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • नदीवरील बांध

    विषण्यतेने बघत होतो भिंतीवरच्या खुणा

    काळ जाऊन वर्षे लोटली आठवणी देती पुन्हा

    बसत होतो नदीकांठी बालपणीच्या वेळी

    पात्र भरुनी वहात होती गोदावरी त्या काळी

    सदैव पूर येउनी तिजला गावास वेढा पडे

    गांव वेशीच्या घरांना मग पाण्याचे बसती तडे

    चित्र बदलले आज सारे पात्र लहान होई

    बांध घातला धरणावरी पाणी अल्पसे येई

    खिन्नपणे खूप भटकलो भोवतालच्या भागी

    चकित झाले मन बघूनी हिरवळ जागोजागी

    इच्छित दिशेने पाणी वाही बांध घातल्यामुळे

    सारे जीवन प्रफुल्ल करीं आनंदमय सगळे

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०