दिन ढळला सखया, कधी येणार तू ,-?
नयनांची ही निरांजने,
आता लागली रे विझू,--||१||
वाट तुझी पहावी किती,
भासते तुझीच कमी,
मलमलीची गादीही,
टोचू लागली अंतर्यामी,--||२||
भोवताली सारी सुखे,
एक विरह त्यांना मारे,
आजुबाजूस सगळे,
इहलोकीचे पसारे,--||३||
असा कुठे गेलास तू ,
परतण्याची वाट नाही,
आभाळ तारे वारे,
दशदिशा झाल्या स्तब्धही,--||४||
चातकाची अवस्था माझी,
चंद्रम्यास आम्ही तरसतो,
मी असे काय वेगळी,
तुझा विरह मला छळतो,--||५||
तू तर सर्वस्व माझे,
दूर माझ्यापासून रे,
तुझ्यावाचून पुरी दुनिया,
वाटते मज शून्य रे,--||६||
आयुष्य माझे असूनही,
तुझे ते किती झाले,
जरा दुरावा येता थोडा,
माझी न मी राहिले,--||७||
पार ज्याच्या सूर्य जातो,
अशा त्या रम्य क्षितिजी,
हळूहळू अंधार येई,
रात्र उगवे उजेडामाजि,--! ||८||
विरहाच्या अंधारात,
बुडालेली सर्वस्वी मी,
सूर्यराजा सोडून गेला,
किती कासावीस धरणी,--||९||
एक तुझ्या स्पर्शे रविकरा,
ती बघ रे ,- धन्य होई,
तन-मन चमकून उठे,
धरती प्रकाशमानी होई,--||१०||
चांदण्याही आता बघा,
आभाळी उगवू लागल्या,
चंद्रसाजणाची वाट पाहत,
कशा लाज लाजून गेल्या,--||११||
चांदण्याचा जथा ठेवून मागे,
चंद्रमा निघे पुढे पुढे,
सर्व पुरुष कसे सारखे,
नेहमीच मज पडते कोडे,--||१२||
दिनमणी उगवला तरी,
तू मात्र दूरस्थ,
मी दिशाहीन झाले,
राहू कशी संन्यस्त,--! ||१३||
© हिमगौरी कर्वे.
उपास तापास करुनी, शिणवित होतो देहाला
भजन पूजन करुनी, पूजीत होतो देवाला
कथा किर्तनें ऐकूनी, पुराण मी जाणिले
माळ जप जपूनी, प्रभू नामस्मरण केले
वेचूनी सुमनें सुंदर, वाही प्रभूचे चरणीं
फुलांचे गुंफूनी हार, अर्पण केले कंठमणीं
जाऊनी तीर्थ यात्रेत, दर्शन घेतले तीर्थांचे
प्रसिद्ध देवालयांत, चरण स्पर्षिले मूर्तीचे
मनामध्यें ठेऊन शांती, मूल्यमापन केले जीवनाचे
कांहीं न मिळाले हातीं, व्यर्थ दवडिले क्षण वेळेचे
संसारातील प्रेम व राग, ह्यातच मन गुरफटले
कर्तव्यातील एक भाग, प्रभू भक्तीसी संबोधले
परमार्थ आणि संसार, भिन्न नाहींत दोन
प्रभूचाच आहे संसार, मनी तूं हे जाण
कर्म फळ आशा, बाळगूं नको मनीं
तेंव्हा न येईल निराशा, कर्म करिता क्षणीं
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
छान वाटले
भेटता तू एक
दूर जाऊ नको
वेगळी तू एक......... !
भेट तुझी होणे
गोष्ट साधी नाही
भावले मना असे
कुणी आधी नाही..........!
भावना छान ही
आवडते कुणी
मनात घर एक
करे नवे कुणी...........!
अंतर आहेच
खूप गोष्टींचे
नात्यात नको
यामुळे अंतर............!
कल्पनेतले हे
सुंदर जग न्यारे
मनास लागू नये
वास्तवाचे वारे...........!
कवितेने दिली
भेट अचानक
कविता सुरेख
आहे तूच एक...........!
-- अरुण वि. देशपांडे - पुणे
9850177342
(साभार - काव्यानंद प्रतिष्ठान -पुणे -ई-मासिक - काव्यानंद -अंक-मार्च -२०१९ )
तुज कितीही, विसरु म्हटले तरी
तूंच गे सदैव, लोचनातुनी तरळते
निक्षूनीया,कितीही ठरविले तरीही
आठवण अंतरी, तुझीच गहिवरते.
असे कसे, कां? घडते,उत्तर नाही
सत्य! हेच मनीचे हळुवार उमलते
विसरणे तुजला कदापि शक्य नाही
प्रीतदान! हे ईश्वरी, मला जगविते
मनहृदयी भावगंधली निष्पाप प्रीती
औक्षवंती! गीतातूनी मज भुलविते
जलावीना! मत्स्यगंधा कां जगते?
प्रीतीविना कां जगती जगणे असते
जरी दूरदूर तूं, सभोवारी भास तुझा
आत्मसुखदा! जीवनांती हीच असते
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र.१६०.
२२ - १२ - २०२१.
थोडा रिकामा दिसलो रे दिसलो
की एखादा शब्द येतो कुठूनतरी
त्याला थोडं गुणगुणलं
कि अजून दुसरा
मग तिसरा
असे येत राहतात
फेर धरतात
मी सुद्धा
जास्त विचार करत नाही
शब्दांना येऊ देतो मग लिहून घेतो
मला बरं वाटते ...छान वाटते
ते काही म्हणत नाही
अन मीही काही म्हणत नाही
हे सारं कविता आहे
की अजून दुसरं काही म्हणून
पण
एवढं मात्र खरं
कि
हे शब्द येत राहतात मराठीतून
.........दुसऱ्या भाषेतून येतच नाही
इतकं सहज आलंच नाही अजून
-- श्रीकांत पेटकर
कुठे नाही स्वरूप देवा,
बघायला मिळत आम्हा,
काळीज नमते तुज पाहता,
चराचरातील या घटका, ---
निसर्ग मज वाटतो,
तुझेच रुप देवा,
तिथेच आम्ही तुला मानतो,
स्वरूप कोणते का असे बा,
ना तू कुठल्या देवळा,
ना कुठल्या मंदिरी,
प्रत्येकाच्या हृदयी
बसशी,असशी तू हरी,----
प्रेम, माया, ममता,
आपुलकी, जिव्हाळा,
कुठे तू नसशी
फक्त सांग मज गा ,---!!!!
माणुसकी जे जपती,
त्यांच्या मनोमनी तू ,
दया करुणा अहिंसा,
दाखवीत प्रगटशी तू,--!!!.
अनोळखी हात करता,
निरपेक्ष ती सहाय्यता,
बापुड्या दीन -दुबळ्या,
जिवांचा तू रक्षण कर्ता,--!!!
संकटात कोण पुढे येई,
कोण देईल अमोल दिलासा,
कोण आपला हात देई,
असता कुठली अवघड वेळा,--!!!
वैविध्य अन् वैचित्र्य ,
पाहुनी माणूस चकित होई,
कोण नेई शेवटास,
जिंकता जरी कुठली लढाई,--!!!
नीतिमत्तेची चाड नसता,
कोण ओढे फटकारे,
आत्म्यातला परमात्माच दाखवी, आपुले अस्तित्व बरे,--!!!!
हिमगौरी कर्वे.©
शिव कुणाचे चिंतन करितो ?
प्रश्न पडला मनी,
तोच तर आहे प्रभू जगाचा
काय तयाचे ध्यानी...१,
जेव्हां आम्ही चिंतन करितो,
ध्यान लावी प्रभूकडे,
प्रयत्न करूनी जगास विसरे,
लक्ष केंद्रितो त्याजकडे....२,
उलट दिशेने शिवाचे चिंतन,
चालते जगतासाठीं
ध्यानामध्यें स्वतःसी विसरे,
लक्ष्य त्याचे इतरांसाठीं ....३
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
स्वप्न पहावीत...
नाही कोण म्हणतंय ?
स्वप्नं जरूर पहावीत.
इतकी सारी पहावीत की
त्यांची ढिगारे व्हावीत.
भान ठेवून उघड्या डोळ्यांनी
त्या स्वप्नांकडे पहावं.
निर्धाराच्या अचूक बाणाने
त्या स्वप्नांना वेधावं.
स्वप्नांसाठी आजच्या वर्तमानाला
निरर्थक नाही मारावं.
उद्यासाठी आजच्या क्षणाला
व्यर्थ नाही टाळावं.
अशक्य अश्या स्वप्नांसाठी
शरीराने जरूर थकावं.
पण न खचता मनानं
पून्हा धैर्यानं उठावं.
तुटलेल्या मोडलेल्या स्वप्नांसाठी
कधी नाराज नाही व्हावं.
नव्या उमेदीने नव्या स्वप्नांकडे
दृढविश्वासाने पहावं.
स्वप्नांना कसं स्फूर्तीनं अन्
अगदी आनंदानं हाकावं.
अस होऊ नये की त्या स्वप्नांसाठी
बिचाऱ्या निद्रेनेच थकावं.
हरवलेल्या त्या स्वप्नांसाठी
कधी व्यर्थ नाही झुरावं.
नव्या अशा स्वप्नांसाठी झोपेला
अगदी शांत मनाने भरावं.
डॉ.सुभाष कटकदौंड
हासतात तुला वेड्या ते,
पकडला गेलास समजून
परि सहानूभूती आहे त्यांच्यात,
चोर आहेस म्हणून
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti