उपकार करुन त्याने मन माझे जिंकिले
परि वेळ गेला निघूनी आभार ना मानले
केली नाही परतफेड उपकाराची मी
कामाचे होते वेड सतत मग्न कामी
कामाच्या मार्गांत चालता पाऊल वाट
प्रयत्न करुन कार्यांत यश साधले अर्धवट
खंत वाटली मनां आठवोनी उपकार
पश्चाताप सांगु कुणा उशीर झाला फार
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
जातीचे प्रमाणपत्र आपल्याला उपजिल्हाधिकारी कार्यालयातून दिले जाते.आणि हे देत असताना तहसील कार्यालयामार्फत आपली सर्व कागदपत्रे तपासून पाहिली जातात आणि त्याची छाननी करून व सर्व सत्यता पडताळून पाहिली जावून आपली फाईल एकेक टेबल पुढे सरकत जाते. आणि शेवटी सर्व सोपस्कार पूर्ण करून आपल्याला जातीचे प्रमाणपत्र दिले जाते.
आपल्याला हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही आपली फरपट संपत नाही.जेव्हा केव्हा निवडणुका येतात तेव्हा याप्रमाणपत्राची वैधता ( VALIDITY ) करून घ्यावी लागते.हे कशामुळे?
ज्या यंत्रणेद्वारे जातीचे प्रमाणपत्र दिले गेले ती यंत्रणा म्हणजे शासन. मग या शासनाच्या अधिकृत क्लास वन आणि सुपर क्लास वन अधिकार्यांनी एकेक कागदपत्रे अक्षरश:चाळणीतून तपासूनच हे प्रमाणपत्र दिले ना.... मग हि यंत्रणा विश्वासार्ह नव्हे काय? जर विश्वासार्ह आहे तर मग VALIDITY कशासाठी?
जर का एखादी फाईल VALIDITY न होता लातूर येथून जर परत आली तर हे प्रमाणपत्र देणारा अधिकारी दोषी आहे असे समजावे काय?
VALIDITY चे एक टेबल जर उपजिल्हाधिकारी कार्यालयातच वाढविले तर जमणार नाही काय? काय तो येथेच फैसला होवून सामान्याची ससेहोलपट तरी होणार नाही.कारण जातीचे प्रमाणपत्र मिळविताना किती कष्ट लागतात हे प्रमाणपत्र काढ्लेल्यालाच माहित...
प्रशासनाने या बाबत जरूर सकारात्मक विचार केल्यास जनतेला नक्कीच दिलासा मिळू शकेल.
-- महादेव विश्वनाथ कापुसकरी
जिथे नसावा गलबला, गलका, कोलाहल काही
काळालाही शाप नसावा, लगबग वा घिसाडघाई
मनस्ताप वा कसली चिंता, गोंगाटही नाही
शांततेला मग धीर यावा, नीरवता जिवंत व्हावी ॥
असावी शांततेला एक वात्सल्याची झाक
काळालाही नसावा वेळेचा काही धाक
ऐकू यावी अंतरीची केवळ हळूवार हाक
समाधि लागावी या जगाची न उरे जाग ।।
जिथे विहरावा वारा मुक्त आपुलकीचा आज
जिथे सागरा उधाण यावे चैतन्याचा हो स्पर्श
जिथे व्हावे मोकळे आकाश, विसरुनी सारे पाश
गर्भरेशमी हिरव्यापानी, लेवून लवावी लाज ॥
जिथे नसावी घरांना द्वारे मोकळे व्हावे कोंडले श्वास
संकोचाचे संदर्भ सुटावे आकारुनी यावे अपूर्ण ध्यास
स्वर्गाचा तो तोल ढळूनी, तादात्म्याचे ताल जुळावे
द्वैताचे मग भान हरपूनी, धरिणीमध्ये आभाळ मिळावे ॥
जिथे नसावी जुनी जळमटे, उमेदीला वा भगदाडे
ममत्वाच्या भासाने खुलावी, मनामनाची हळू कवाडे
शांत सनातन शांतीच्या मग कुशीत होऊन अधीन
आसमंतात विरघळत जावे, व्हावे निसर्गाशी तल्लीन ॥
(जगभरच्या वाढत्या कोलाहलात, गर्दीत दुर्मिळ झालेल्या शांततेचा कधी अनिवार ध्यास लागतो. काही नको फक्त आपण व आपली शांतता एवढंच हवं असं वाटू लागतं)
-यतीन सामंत
सुनीलने माझ्या चेहऱ्यावरचे भाव पटकन ओळखले. पक्का बाबू असल्या मुळे मुर्गा पटकन कसा कापला पाहिजे ह्या कलेत तो पारंगत होताच, लगेच म्हणाला, तो इस ख़ुशी के मौके पर एक-एक कप काफी हो जाय. अश्या रीतीने साउथ ब्लॉकच्या काफी हाउस मध्ये कॉफी पीत-पीत चोरी झाल्याचा आनंद आम्ही साजरा केला.
दूर कुठेतरी बसलो होतो
दमून भागून
ते छोटेसे घर त्यावेळी
खरेच राजवड्यासारखे
वाटले...
मनात आले
श्वास मोकळा करण्यासाठी
असेच घर हवे
आणि अशीच
सावली..
जी सावली आपल्या
सावलीला देखील
सामावून घेते ..?
-- सतीश चाफेकर.
ज्यांचे घर फुलून आले ।।
त्यांनी आसरा द्यावा ।।
ज्यांना ज्ञान प्राप्ती झाली ।।
त्यांनी लोकांना शिक्षण द्यावे ।।
ज्यांचे नाते सूर्या बरोबर आहे ।।
त्यांनी थोडा उजेड द्यावा ।।
ज्यांचे नाते चंद्रा बरोबर आहे ।।
त्यांनी थोडा अंधार द्यावा ।।
निसर्गाने दिलेली जन्माची ।। देणगी स्विकारून घ्यावे ।।
।। जाता जाता मातीला समृद्ध आणि भेट देऊन जावे ।।
आज कुणाच काय भरवसा
रडते जीवन ढसाढसा // धृ //
प्रेम दिसेना जगांत कोठे
ह्रदया मधले सरले साठे
ओढ कुणाची कुणा न वाटे
ओरड करुनी कंठ न दाटे
सुकुनी गेला घसा
रडते जीवन ढसाढसा - – - १
बाप ना भाऊ इथे कुणाचा
लोप पावला कढ रक्ताचा
मायमाउली सहज विसरते
काळ तिचा तो नऊ मासाचा
फुटला नात्याचा आरसा
रडते जीवन ढसाढसा – - – 2
सुरक्षतेचे कवच दिसेना
शब्दावरी विश्वास बसेना
दुर्मिळ झाली त्याग भावना
कदर कुणाची कुणी करेना
इथे लागतो केवळ पैसा
रडते जीवन ढसाढसा – - – ३
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
उठतां बसतां भेटे मज सारखा पांडुरंग
माझा सखा पांडुरंग ।।
नेत्र पाहती मूर्ती श्यामल
जिव्हा जपते ‘विठ्ठल विठ्ठल’
गातो हृदयाचा प्रत्येकच ठोका ‘पांडुरंग’ ।।
काम-क्रोध-मद-मोह बांधती
लोभ नि मत्सर हरती शांती
नाशतसे त्या सहा रिपूंचा धोका पांडुरंग ।।
संकटांचिया काट्यांमधुनी
नेई विठ्ठल बोट पकडुनी
दूर करितसे चिंता-भीती-शोका पांडुरंग ।।
अज्ञानाची अवस काज़ळी
विठू न येऊं देतो भाळीं
जीवनआभाळीं पसरी आलोका पांडुरंग ।।
मार्तंडाहुन तेजस दीप्ती
बह्मांडाहुन विस्तृत व्याप्ती
अनंत, उरतो भरुनी साती लोकां पांडुरंग ।।
आनंदाचें पेव विठू हा
चिरहर्षाची ठेव विठू हा
हृदयीं चिन्मय उन्मादाचा झोका पांडुरंग ।।
एकमेव-गणगोत विठ्ठलू
माझी जीवनज्योत विठ्ठलू
जन्ममृत्युच्या पल्याड जाण्यां मोका पांडुरंग ।।
- - -
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरीता,
शक्तीस द्यावी दिशा चांगली, जीवन यशाकरीता ।।धृ।।
बागेतील फुले सुंदर,
फुलपाखरांचे रंग बहारदार,
मोहक इंद्र धनुष्याकार,
निसर्गातील रम्यतेमध्यें शोधा, ईश्वरी गुणवत्ता,
खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरीता ।।१।।
भजन पूजन प्रभूचे,
भक्ति-भाव मनाचे,
उपवास करी देहशुद्धीचे,
तपसत्वाच्या शक्तीनें करा, आत्म्याची मुक्तता ,
खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता ।।२।।
गरिबासी मदतीचा भाव,
दुःखितांसाठीं प्रेमळ स्वभाव,
घ्या इतरांच्या मनाचे ठाव,
मिळवा कल्याण करुनी, त्यांच्यात समाधानता,
खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता ।।३।।
धनसंपत्ती गंगाजळ,
मोहमोयांचे जाळ,
षड्-रिपू विकार सकळ,
विवेक बुद्धीने नष्ट करा, ही मनाची मलिनता,
खर्च करावी ऊर्जा आपली योग्य कामांकरिता ।।४।।
सर्वत्र आहे प्रभू संचार,
अणूरेणूत झाला साकार,
ब्रह्मांडही त्याचा आकार,
विलीन व्हा ईश्वरी तत्वांत, त्यास सर्व अर्पिता,
खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti