भावनेच्या जावूनी आहारीं, नुकसान करतात सारे,
तर्कशुद्धता विसरून जाते, अंगात भरूनी वेडे वारे ..१,
भावनेची लाटच उठता, मती होते एकदम गुंग,
बरोबर वा चूक काय, जाण रहात नसते मग..२
आपले सारे खरे असावे, हाच होत असे अट्टाहास,
आपण केल्या कर्मावरच, बसतो आपला विश्वास..३
इंद्रीय आणि भावना यांची, जमुनी जात असतां जोडी
तर्कशुद्ध विचारांत त्याला, राहत नसते केव्हां गोडी...४
काही क्षणाचा काळ जाता, भावना जाई मग निघून
विचार मात्र मिश्कीलतेनें, हसती पश्चाताप बघून...५
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
एक विशाल मन, भाग त्याचे अनेक
विखूरले जावूनी, स्वतंत्र वाटे प्रत्येक...१,
छोट्या त्या भागावरी, वेष्टण शरिराचे
अस्तित्व वेगळेच, भासते त्या मनाचे...२,
मनाचे ते स्वभाव, सारखेच असती
फरक वृत्तीमध्ये, कुणाच्याही नसती...३,
अगणीत ती मनें, कोठे नसे फरक
अनेक ती बनली, जनक तिचा एक....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
समकालीन भारतीय साहित्य पत्रिकेला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साहित्य अकादमीने विभिन्न भारतीय भाषेतील निवडक साहित्य “चयनम “ नावाने नुकतेच प्रकाशित केले आहे. समकालीन भारतीय साहित्य पत्रिकेचे संपादक व हिंदी साहित्यिक श्री अरुण प्रकाश यांनी “चयनम “ चे संपादन केले आहे. साहित्य अकादमीच्या सुवर्ण जयंती वर्षा निमित्त ही योजना अस्तित्वात आली आहे.
जीवनातील वाटे वरती, कडेकडेने उभे ठाकले
परि वाटसरूंना सारे ते, यशातील अडसर वाटले...१,
वाट चालतां क्रमाक्रमानें, बाधा आणून वेग रोकती
ध्येयावरल्या उच्च स्थळीं, पोहचण्या आडकाठी करिती...२,
षडरिपूचे टप्पे असूनी, भावनेवर आघांत होतो
सरळ मार्गाच्या विचाराला, आकर्षणाचा खेंच बसतो...३,
पवित्र निर्मळ भावनेमध्ये, रंगाच्या त्या छटा उमटती
गढूळपणाच्या वातावरणीं, सारे कांहीं गमवूनी बसती....४,
थोडे राहता गाफील तुम्ही, जाळ्यामध्ये अडकून जातां
जीवनाचे जे साध्य असते, स्वकर्माने गमवून बसतां...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
भेट तुझी-माझी.....
बरसती श्रावणधारा
बेधुंद वाहतो वारा
पडती सुखनैव गारा
प्रेमरंगी रंगतो इंद्रधनु न्यारा
भेट तुझी-माझी......
खळखळता गोड झरा
अंगावर रोमांचित शहारा
फुलतो मोर पिसारा
सुगंधी फुलांचा फुलोरा
भेट तुझी-माझी......
हिरवा निसर्ग सारा
उभा राही जोडूनी दोन्ही करा
स्मरावा गत आठवांचा पसारा
प्रेमगंधी गंधाळावा आसमंत खरा
भेट तुझी-माझी.....
पाहताच तुला सामोरा
उधान येई मनमोरा
लोचनी चमकती अश्रूधारा
स्पर्शाने होई मी-तु बावरा
भेट तुझी-माझी.....
घडते अशी जशी वीणा झंकारावी
बोलात कविता जुळावी
प्रेमगीते मधूर गुणगुणावी
इंद्रधनुसंगे ती खुलावी
भेट तुझी-माझी......
मन तृप्त होई काठोकाठ
आनंदतरंगाचे वाहती पाट
सहवासाच्या सोबतीने दरवळते वाट
हातात हात घेऊनच उजाडते नवी पहाट
-----शुभांगी दळवी
मनांतरीच्या भावनांना
शब्दातुनी मी माळीतो
अंतरातील गुज प्रीतीचे
भावगीतात मी मांडितो
स्पर्श! वात्सल्यप्रीतीचे
स्वरगंगेसवे, गुणगुणतो
गुणगुण आर्त भावनांची
मी हृदयांतरी आळवितो
गीता! ही प्रीतभावनांची
श्वासासंगे, मी गुणगुणतो
गीतात! नि:ष्पाप सुगंधा
गंधाळ! जीवनी दरवळतो
दिव्य! सुरम्य भावस्पर्ष
प्रीतशब्दातूनी,ओघळतो
लोचनी, तीच एक प्रीती
मी, मलाच भुलूनी जातो
कृपा ही त्याच दयघनाची
मी तिला मनांतरी स्मरतो
सदैव, हीच ओढ प्रीतीची
माझ्या गीतातुनी मांडतो
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ५६
२३ - २ - २०२२.
जगावे अगदी बिनधास्त,
निर्भय आणि निडर,
कशाला पर्वा कुणाची,
जगणे असावे कलंदर ,
असे जगावे जबरदस्त,
पत्थरांशी टक्करावे,
निधड्या छातीने अगदी,
संकटांना दूर सारावे,
मार्गी जेवढ्या अडचणी,
तेवढी घ्यावी आव्हाने ,
तू मोठा का मी म्हणत,
सरळ त्याच्याशी झुंजावे,
सामना करणे अटळ मग,
कशासाठी ते भ्यायचे,
सिंहाचे काळीज करून,
का नाही लढायाचे,---? आत्मविश्वासाने जग जिंका, भल्याभल्यांनी दाखवले, पळपुटेपणाने शेवट,
काय त्यातून मिळवणे, अडचणींच्या छातीवर,
पाय रोवून उभे रहाणे,
निराशा व्यथा सोडून,
ताठ कणा ठेवणे,--!!!
*सुखे आणिक दु:खे ,
देहाच्या छाया पडछाया,
त्यांना प्रकाश देणे ,
खंबीर करून किमया*,---!!!
निर्धास्त जगावे,
अचल रहावे,
स्वीकारुनी स्वाभाविक,
सदैव मार्ग क्रमावे,---!!!
हिमगौरी कर्वे©
झालो मी अठरा वर्षांचा
म्हणुन मिळे अधिकार नामी.
मत देण्याचा.
या दिवशी मी आहे राजा
ताजा ताजा.
उलथिन मी नेत्यांची तख्तें
बदलिन मी नावांचे तक्ते.
-
तख़्त - सिहासन
-- सुभाष स. नाईक
प्रेमरंग उधळूनी
प्रेमालींगण देऊनी
दाखव मला, हिरवी फीत
तुला कशी ……………….!
Copyright © 2025 | Marathisrushti