(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • परदेश

    रुक्या टक्यात मोजावा
    तो काळ आता सरला
    डोलरात बाळ सांगे
    किती रुबाबे मजला
    आमी येडे नि बावळे
    करे त्याचा फुगीर आकडा
    रुपयात किती भेटे
    याचा हिशेब हा एवढा...
    तरी वाटे बरे आहे
    माझा लेक परदेशात
    सांगतो मी अभिमाने
    नाणं खणखणीत माझं
    पण खरं सांगू वाटे
    इथे हवे रे कुणी बाळा
    पैसा कामी येतं नाही
    पुरे क्षण तो जिव्हाळा
    तू लाख जरी बोलवे
    ही माती सांगे नाळ
    पाय अडकून राही
    उंबऱ्यात काही काळ
    आता सोड तुही हेका
    तू तिथे मी इथे आहे बरा
    उगा दोष देत नाही
    माझ्या गुणाच्या तू लेका
    कधी वाटे पुन्हा यावे
    परतुनी माय देशी
    एक ओंजळ वाहाशी
    आई बा च्या स्मृतीपाशी!!
    -- वर्षा कदम.
  • तू गुंतला असा की

    तू गुंतला असा की
    जगण्यास वेळ नाही
    अन् सांगतो जगाला
    मरण्यास वेळ नाही

    गाणार गीत केव्हा
    तू सांग जीवनाचे
    जेव्हा तुलाच वेडया
    हसण्यास वेळ नाही

    आयुष्य तू तुझे तर
    जगतो खुशाल आहे
    आता जगाकडे ही
    बघण्यास वेळ नाही

    मिटणार ना कधी जे
    ते नाव दे यशाला
    म्हण एकदा तरी की
    हरण्यास वेळ नाही

    आयुष्य युद्ध आहे
    जिंकून एकदा घे
    सांगू नको पुन्हा की
    लढण्यास वेळ नाही.

    WhatsApp वरील संजीव वेलणकर यांच्या संगीत संगीत आणि फक्त संगीत या ग्रुप वर आलेला लेख साभार प्रकाशित.

  • कावळा म्हणाला.. माणसाला..

    माणूस म्हणाला..
    कावळ्याला’..

    एकदा माणूस म्हणाला..
    कावळ्याला’..

    कसे सांगायचे रे यांना,
    बाहेरचे खाऊ नका...

    पितृपक्ष चालू झाला,
    घरच्या शिवाय जेवू नका..

    ‘कावळा म्हणाला..
    माणसाला’..

    ‘कावळा म्हणाला..
    माणसाला’..

    अरे हे बुद्धीमान मनुष्या..

    पंधरवडाच फक्त आठवणीने,
    नैवद्य खिडकीवर असतो... !

    बाकीचे ३५० दिवस मात्र आम्ही,
    उकिरड्यावरचं बसतो रे .. !

    पुण्य मिळवायच्या आशेवर..
    ठेवलास तू घास छतावर..

    जिवंतपणीच सांभाळ रे बाळा..
    तुझ्या वृध्द पालकांना..

    जिवंतपणी त्यांची सेवा करून ..
    आणि त्यांचे आशिर्वाद घेऊन ..
    पुण्य मिळेल हमखास बाळा..!

    जातीपाती विसरून, गोरगरिबांना
    दान करून, गरजू ना मदत करून..
    गाठी पुण्य कमवशिल हमखास रे .!

    ‘कावळा म्हणाला..
    माणसाला’..

    जे का रंजले, गांजले..
    त्याशी म्हणा जो, आपुले...
    तोचि साधु ओळखावा..
    देव तेथे ची जाणावा...!

    -- गणेश उर्फ अभिजित कदम,
    कुडाळ सिंधूदुर्ग

  • परीराणी आणि बेडूक

    परीराणी एकदा उतरली तळ्यात
    घसरून पाय पडली त्यात
    हसू लागला कावळा
    सोबत होता बगळा
    बेडूक म्हणे! परीताई परीताई
    "कसली गं एवढी घाई
    कुठे जायचंय तुला
    घेऊन चल ना मला
    मी जातेच मावशी कडे
    ती राहते नदी पलिकडे
    यायचंय तर.... चल
    पण आवाज करायचा नाही
    मला त्रास द्यायचा नाही
    दिलास तर परत आणायची नाही
    म्हणून 'बेडकाने मारली उडी
    हो डुबूक डुबूक
    नदी पलिकडे गेले
    परीताई आणि बेडूक
    मावशीकडे गेल्यावर बेडूक झाला पसार
    पावसात भिजून त्याने नदी केली पार
    झाडावरून झाडावर
    मारल्या उड्या भराभरा
    झोपाळ्यावर बसून
    केला त्याने कहर
    कसा त्याचा खेळ न्यारा
    सारा दिनभर
    भानावर आला थोडा
    अंधार पडल्यावर
    परीताई माझी वाट पहात असेल
    मला सोडून ती गेली तर नसेल ?
    परत आला मावशीकडे
    शोधू लागला परीला
    परीताई कधीच निघून
    गेली आपल्या गावाला
    परीताईची वाट बघत
    बेडूक अजून बसलाय
    तिला हाका मारून मारून
    आवाज त्याचा बसलाय
    म्हणून तर पावसामध्ये
    बेडूक अजून रडतो
    परीताईला जोरजोरात
    हाका मारतो..
    डरॅव-डरॅव-डरॅव

    -सौरभ दिघे

  • बदनाम

    सितेसाठीच रामालाही

    आज बदनाम केले आहे

    श्रीकृष्णाला गोपिकांनीच

    आज बदनाम केले आहे

    लक्ष्मीनेच तर सरस्वतीस ही

    आज बदनाम केले आहे

    महाभारता द्रोपदीनेच

    आज बदनाम केले आहे

    देवांनाही इंद्राने त्या

    आज बदनाम केले आहे

    कलियुगाने माणसालाच

    आज बदनाम केले आहे

    कवी – निलेश बामणे

    202, ओमकार टॉवर, बी – विंग, गणेश मंदिरा जवळ, श्रीकृष्ण नगर, संतोष नगर, जन.ए.के.वैद्य मार्ग, गोरेगांव ( पूर्व ), मुंबई – 400 065.

    मो. 8652065375 / 8692923310

    Email- nileshbamne@yahoo.com

    nileshbamne10@gmail.com

  • वादळ गतस्मृतींचे

    आठविते ते सारे आता
    स्मृतींचीही कमाल आहे
    गात्रे जरी झाली मलुल
    मन, मात्र उत्साही आहे

    अनुभवलेले जीवन सारे
    जपुन पाऊले टाकित आहे
    काय मिळाले अन हरविले
    आता विसरून गेलो आहे

    घडायाचे ते ते घडूनी गेले
    अजूनी काय घडणार आहे
    अंतरात वादळ गतस्मृतींचे
    आज मात्र घोंगावते आहे

    ललाटीच्या त्या रेषा साऱ्या
    संचिताचे भगवंती दान आहे
    आता व्हावे केवळ अंतर्मुख
    विरक्तित खरा आनंद आहे

    -- वि. ग. सातपुते. (भावकवी)

    9766544908

    रचना क्र.१४२.

    २६ - ५ - २०२२.

  • देव…फसवणूक का सत्याची जाणीव?

    देवानेच आपल्याला फसवलं आहे,
    हे वाक्य माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
    वेगवेगळ्या आवाजात उमटलं…

    लहानपणी...
    आईच्या कुशीत झोपताना वाटायचं,
    जग खूप सुरक्षित आहे,
    देव म्हणजे गोष्टीतला राजा,
    जो शेवटी सगळं ठीक करतो…
    पण पहिल्यांदा जेव्हा हरवलं एखादं खेळणं,
    किंवा तुटली एखादी मैत्री.
    तेव्हा कळलं,
    “गोष्ट संपली तरी सगळं ठीक होतंच असं नाही…"

    किशोरवयात...
    स्वप्नांना पंख फुटले होते,
    आकाश स्वतःचं वाटत होतं,
    पण पहिल्याच अपयशाने
    ते पंख जळाले…
    रात्री उशिरा देवाला विचारलं,
    "मी एवढं मनापासून मागितलं होतं,
    मग का नाही दिलंस?"
    उत्तर आलंच नाही…
    तेव्हाच पहिल्यांदा वाटलं,
    देवानेच आपल्याला फसवलं आहे…

    तरुणपणात...
    प्रेमावर विश्वास ठेवला,
    एखाद्या माणसात देव पाहिला…
    पण जेव्हा तोच माणूस दूर गेला,
    हातातून हात सोडून.
    तेव्हा समजलं,
    देव कधी कधी माणसांच्या रूपात
    आपल्याला तोडतो…

    मध्यमवयात...
    जबाबदाऱ्या, कर्जं, अपेक्षा,
    सगळं पेलताना स्वतःच हरवून गेलो,
    आरशात पाहिलं तर
    ओळखीचे चेहरेही अनोळखी वाटले…
    देवाला विचारलं
    "हीच का माझी वाट?"
    तो पुन्हा शांत…
    आणि ती शांतता
    सगळ्यात मोठी फसवणूक वाटली…

    वृद्धावस्थेत...
    हात थरथरू लागले,
    पावलं मंदावली,
    आणि आयुष्य मागे वळून पाहताना
    एक प्रश्न कायम उरला,
    "खरंच, देवानेच आपल्याला फसवलं का?"

    कदाचित...
    फसवणूक ही त्याची नव्हतीच,
    आपणच स्वप्नांना कायमस्वरूपी समजलं,
    आपणच नात्यांना शाश्वत मानलं,
    आणि अपेक्षांना देवाचं वचन समजलं…

    तो तर फक्त उभा होता,
    आपल्या प्रत्येक पडण्यात.
    प्रत्येक अश्रूमध्ये,
    प्रत्येक तुटण्यात…

    देवानेच आपल्याला फसवलं आहे,
    हे वाक्य अजूनही मनात येतं.
    पण आता त्यात राग नाही,
    फक्त एक थकलेली जाणीव आहे.

    की कदाचित,
    देव फसवत नाही…
    तो फक्त आपल्याला
    सत्याच्या इतकं जवळ नेतो,
    की आपलेच भ्रम आपल्याला
    फसवणूक वाटायला लागतात…

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
    मो:- 9011841212

  • पत्र महिमा

    पत्र लिहावे मित्रा
    पत्र लिहावे आप्ता
    मित्र आणि आप्त
    थोर नशीबाने प्राप्त

    पत्र आनंद लिहिण्याचा
    पत्र आनंद वाचण्याचा
    पत्र आनंद खरडण्याचा
    पत्र आनंद जाणावा घरोघरी

    येता दिवाळी दसरा
    पत्र आनंद पसरा
    पत्र आनंदाची रांगोळी
    पत्र खुसखुशीत कडबोळी - जाण बाबा

    पत्र महिमा पुरातन
    संस्कृतीचे साधन
    मानवाचे भूषण
    संस्कृतीचे लक्षण - जाणिजे

    -- विनायक अत्रे.

  • जागतिक बँकेचा वर्धापनदिन

    शिक्षणासाठी जागतिक बँक विषेश परिश्रम घेते. या साठी आंतरजालाधारित प्रशिक्षण व इतर पर्यायांचा उपयोग केला जात आहे. भारतासहित अनेक देशांना या बँकेने विवीध प्रकल्पासाठी कर्जे दिली आहेत.

  • निसर्गाचे मार्ग वेगळे

    मार्ग निसर्गाचे सदा, निश्चीत आणि अढळ ।

    चालतो त्याच दिशेने, जसजशी येते वेळ....१

    चालत आसता थांबे, भटके वाट सोडूनी ।

    करूया काही आगळे ठरवी विचारांनी....२

    आगळे वेगळे काय, त्याला जे वाटत असे ।

    नियतीची वाट मात्र, त्या दिशेने जात नसे....३

    परिस्थितीचे कुंपण, टाकले जाते भोवती ।

    कळत वा नकळत, मार्गी त्यास खेचती....४

    करून घेतो निसर्ग, वाटते त्याला हवे जे ।

    अकारण तुम्हा वाटते, हे तर आहे माझे....५

    जीवनाच्या सांजवेळी, बघता मागे वळूनी ।

    प्रवास केला वेगळा, हेच येते समजूनी....६

    मिळूनी काही आगळे, समाधानी वृत्ती येते ।

    आनंदाने निरोप घ्या, नियती तुम्हा सांगते....७

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com