कशांत दडले समाधान ते,
शोधत असतो सदैव आम्ही,
धडपड सारी व्यर्थ होऊनी,
प्रयत्न ठरती कुचकामी ।।१।।
बाह्य जगातील वस्तू पासूनी,
देह मिळवितो सदैव सुख,
क्षणीकतेच्या गुणधर्माने,
निराशपणाचे राहते दुःख ।।२।।
'समाधान' ही वृत्ती असूनी,
सुख दुःखातही दिसून येती,
चित्त तुमचे जागृत असतां,
समाधान ते सदैव मिळते ।।३।।
सावधतेने प्रसंग टिपता,
समाधान ते येईल हाती,
सुख दुःखाला दूर सारता,
अंतरभागी समाधान दिसती ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 10, 2021
जीवनांतले चित्र पालटूनी, रंग ते बदलले
जनी जनार्दन ठरविले, सारे काय मिळविले ।१।
सुंदर तसबीर एक आणली, देवी श्री लक्ष्मीची
श्रद्धेचे भाव गुंतविले, पूजा करूनी तिची ।२।
शिक्षण घेवूनी ज्ञान मिळविले, कष्टानें सारे
शरीर होते चैतन्यमय, आणि धडपडणारे ।३।
रंग बधितले जीवनांतील, विविध छटांचे
सजविण्यास लागते त्या छटांना, बळ संपत्तीचे ।४।
ज्ञान आणि प्रयत्न जेव्हां, एक ठिकाणी असे
प्रसन्न करण्या धन लक्ष्मीला, अडचण येत नसे ।५।
शक्ति, युक्ति, बुद्धी एकटवूनी, परिश्रम केले
धनराशीचे अल्प भांडार, त्याने जमविले ।६।
तेज चमकले त्याच्या जीवनीं, धन लक्ष्मीचे
समजूं लागला फार सुखी, क्षण कर्तृत्वाचे ।७।
माहीत नव्हते लक्ष्मी असते, चंचल स्वभावी
केव्हां येईल जाईल कशी, भंरवसा तो नाहीं ।८।
चालत असतो खेळ नियतीचा, गमतीनें सदा
कुणाचे फांस कसे पडतील, कळेना अनेकदां ।९।
कमाईस त्याच्या ओहोटी लागली, व्यवहारामध्यें ती
प्रयत्न सारे फोल ठरूनी, अपयश येती ।१०।
निराश बनले जीवन सारे, अंध:कार झाला
दु:खाच्या त्या चटक्यामध्यें, जीव होरपळला ।११।
मार्ग बदलले पूर्ण तयानें, आपल्या जीवनाचे
धन कमविणें लक्ष नव्हते, त्याच्या प्रयत्नांचे ।१२।
वाचन करूनी चिंतन केले, मन रमविण्या चित्ताला
ध्यान साधना देवूं लागली, आनंद त्याला ।१३।
विसरूनी गेला हलके हलके, दु:ख निर्धनतेचे
काव्य लेखनानें उघडले द्वार, नव जीवनाचे ।१४।
चकीत झाला एके दिवशीं, बघूनी तसबिरीला
श्री लक्ष्मीचे ठिकाणी सरस्वतीचा, बदल कुणी केला ? ।१५।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 2, 2019
छान चाललंय सगळं आपलं,
फक्त थोडंसं वातावरण तापलं,
गंमतीने आयुष्याच्या नावेमधलं,
हळूच स्मृतींच गाठोड मापलं…
इतभर सुख गोड मानलेलं,
पुरतं हसण्याचं मनी ठाणलेलं,
सांगा! आडव्या-तिडव्या आयुष्याचं,
गुपीत तरी कोणी जाणलेलं?
झुकझुक गाडी अन् वाऱ्यासारखं ,
आयुष्य भूरर्कन निघून गेलं,
रेसलींगच्या या वाटेवरती,
नेहमी भेटलं सारख्यास वारखं…
तूं तू – मी मी करता करता,
नात्यांचा धागा झीजुन गेला,
आपलेपणाचा काळा शालू,
माणुसकीने पांघरलेला……
– श्वेता संकपाळ (१७-०७-२०१८)
July 21, 2018
आगमनाची प्रतीक्षा मज
तू श्वासांची शृंखला..
भावनांची विश्वस्त ठेव
तू सागरीचा शिंपला ..
काट्यात अडते पाऊल
तू फुलांचा सडा..
ह्रदयाच्या काठोकाठ
भरला प्रेम घडा..
रात्र चांदण्यांची नक्षी
तू चंद्र शीतल..
सांज आठवांची मैफिल
तू क्षितीज तरल..
सूर ताल लय संगीत
तू छेडीता तारा..
सप्तरंगी सजते इंद्रधनु
तू रंगांचा नजारा..
उन्मळून पडल्या पानांची
तू नवी पालवी..
जुन्या वळणावरती
तू वाट नवी..
फुला पानांत निजलेल्या
तू दवांच्या ओळी..
सुख स्वप्न साकार व्हावे
पहाटेच्या वेळी..
पुसटशी हातावरची
तू माझी जन्मरेख..
जन्मभर आखला हा
प्रेमाचा आलेख..
July 14, 2026
कृष्ण कमळ-
August 24, 2014
“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
June 11, 2012
सागराच्या अथांग कुशीत,
एक लाट रोज जन्म घेते,
धावत धावत किनाऱ्यापाशी,
आपले सारे स्वप्न सांगते.
किनारा मात्र शांत उभा,
वर्षानुवर्षे वाट पाहतो,
लाटांच्या त्या असंख्य कथा,
मनात अलगद साठवून ठेवतो.
कधी लाट हसते मोत्यासारखी,
कधी दुःखाने भरते डोळे,
किनारा तिच्या प्रत्येक स्पर्शात,
शोधत राहतो नवेच भोवरे.
भेट त्यांची क्षणभराची,
तरी कहाणी अनंताची,
लाट निघून जाते पुन्हा,
किनारा जपतो स्पर्श जुना.
संधिप्रकाशी रंग उधळता,
दोघेही गुपिते बोलत राहतात,
चंद्रकिरणांच्या साक्षीने,
अबोल प्रेम जपत राहतात.
वादळ आले, ऋतू बदलले,
काळाने किती खेळ मांडले,
तरी लाटेच्या प्रत्येक परतीत,
किनाऱ्याने प्रेमच सांभाळले.
असेच चालते प्रेम त्यांचे,
ना वचनांचे, ना शब्दांचे भार,
एक धावत येणारी लाट,
आणि एक वाट पाहणारा किनारा.
अनंत सागर, अनंत प्रतीक्षा,
अनंत स्पर्शांचा तो पसारा,
प्रेम म्हणजे कदाचित एवढेच
एक लाट...
आणि
एक किनारा...
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे
मो:- 9011841212
July 7, 2026
उपास तापास करुनी, शिणवित होतो देहाला
भजन पूजन करुनी, पूजीत होतो देवाला ।।१।।
कथा किर्तनें ऐकूनी, पुराण मी जाणिले
माळ जप जपूनी, प्रभू नामस्मरण केले ।।२।।
वेचूनी सुमनें सुंदर, वाही प्रभूचे चरणीं
फुलांचे गुंफूनी हार, अर्पण केले कंठमणीं ।।३।।
जाऊनी तीर्थ यात्रेत, दर्शन घेतले तीर्थांचे
प्रसिद्ध देवालयांत, चरण स्पर्षिले मूर्तीचे ।।४।।
मनामध्यें ठेऊन शांती, मूल्यमापन केले जीवनाचे
कांहीं न मिळाले हातीं, व्यर्थ दवडिले क्षण वेळेचे ।।५।।
संसारातील प्रेम व राग, ह्यातच मन गुरफटले
कर्तव्यातील एक भाग, प्रभू भक्तीसी संबोधले ।।६।।
परमार्थ आणि संसार, भिन्न नाहींत दोन
प्रभूचाच आहे संसार, मनी तूं हे जाण ।।७।।
कर्म फळ आशा, बाळगूं नको मनीं
तेंव्हा न येईल निराशा, कर्म करिता क्षणीं ।।८।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
June 12, 2019
शांत अशा त्या मध्यरात्री, उंच पलंगी मऊ गादीवरी
लोळत होतो कुशी बदलीत, निद्रेची मी प्रतीक्षा करी....१,
निरोगी माझा देह असूनी, चिंता नव्हती मम चित्ताला
अकारण ती तगमग वाटे, बघूनी दिशाहिन विचारमाला....२,
प्रयत्न सारे निष्फळ जावूनी, निद्रा न येई माझे जवळी
धूम्रपान ते करण्यासाठी, उठूनी सेवका हाक मारली....३,
बऱ्याच हाका देवून झाल्या, परि न सेवक तेथे आला
मागील दारी जावूनी बघता, दिसला तो मज शांत झोपला....४
कांहीं क्षण मी बघत राहीलो, शांत शरिरी शांत झोप ती
हेवा वाटूनी त्या निद्रेचा, येवूनी पडलो गादीवरती...५
--डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
April 25, 2016
December 4, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti