(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • वेळेचे मूल्य

    मूल्य नाही कुणा, तूं दिल्या वेळेचे
    गमावून टाकी, जाणूनी फुकाचे....१,

    लागत नसते, दाम वेळेसाठीं
    म्हणून दवडे अकारणा पोटीं....२,

    वस्तूचे मूल्य ते, पैशांनीच ठरते
    समज सर्वांची, अशीच असते...३,

    वेडे अहा सारे, कसे होई मूल्य
    वेळ जातां मग, आयुष्य जाईल...४,

    वेळ दवडतां, कांहीं न राहते
    सर्वच जीवन, व्यर्थ तें ठरते....५

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

  • नशीब…

    तुझी ती भेट
    अंतरंगात जपली
    तुझ्या विरहाने
    आग मनात लागली.
    तुझे ते रुप
    चंद्रमा नभात
    तुझी ती वाणी
    हसरी प्रभात
    भेटण्याची वेळ असे
    तुझ्या मनाची
    मी सदेेेैव पाहतसे
    वाट तुझ्या येण्याची
    वचन तु दिलेस
    सा ठेवुन प्रेमाची
    फसवून तु गेलीस
    लाज ठेव तया वचनाची
    ना दुसरीचे रुप
    माझ्या निरमल मनात
    निघून येशील पुन्हा
    हेच असावे माझ्या नशीबात......
    -- भालचंद्र हादगे

  • गायिका गाऊ लागे

    गायिका गाऊ लागे ,
    शास्त्रीय गान ते "सुस्वर",
    रसिकश्रोते स्तंभित,
    लुब्ध" होती गानावर,
    नाद ताल स्वर ,
    आलापी अंतरे मुखडे,
    रसिकांच्या दुनियेत,
    रोमांच "अंगावर खडे,
    स्वरा--स्वरांचे तरंग,
    काळजाला हात घालती,
    स्वर्गीय सुरांची पकड,
    सगळेच तिला वश होती,
    संगीताची दुनियाच न्यारी,
    रसिकांना "खिळवून" ठेवे,
    ब्रह्मानंदी लागता टाळी
    बुडणे त्या स्वरसमुद्री,
    परमानंद"" देई संगीत,
    दुःखे सगळी विसरती,
    अशा गानकलेने केवळ,
    मुक्त"" आनंदही लुटती,
    स्वरांची दुनिया वेगळी,
    या दुनियेची "सर" नाही,
    त्या दुनियेत पोहोचणे,
    इतुके कठीणही नाही,
    ताण ऐहिक जीवनी ,
    काळज्या आणखी चिंता,
    पदोपदी लागते निभावावे,
    अगदी कठोर व्यवहारा,
    संगीताचे जग निराळे,
    कान देऊनी ऐकावे,
    असंख्य प्रकार संगीताचे,
    भान हरपून जावे,
    वरवरचे सुख नसते,
    आत्माही होई शांत,
    परमात्म्याशी पोहोचणे,
    नसावी कुठली "भ्रांत",--!!!!

    हिमगौरी कर्वे.©

  • निसर्गाचे खेळणे

    धडपड असते प्रत्येकाची जगण्यासाठी,
    तेच जगती जगी या शक्ती ज्यांचे पाठी ।।१।।

    बुद्धी, अनुभव, विचार, बळ शक्तीची रूपे
    यश मिळविण्या जीवनातील हीच मोजमापे ।।२।।

    नीती-अनिती, पाप-पुण्य, सामाजिक बंधने
    सरळमार्गी जगण्यासाठीं हवीत ही कारणे ।।३।।

    जन्म मृत्यूच्या रेषेवरती, उभा संकटकाळी
    पशुसमान वागत दिसतो, मानव त्यावेळी ।।४।।

    प्रथम गरज भागवी सारे, स्वजीवनाची
    आदर्श जगणे तत्वे राहती, मग नंतरची ।।५।।

    मृत्यूच्या दाढे मधूनी, एक सुटून जातां
    मृत्यूपाश टाकी दुजासाठी, स्व जगण्या करिता ।।६।।

    जगण्यासाठी मृत्यू आणि मृत्यूमुळेच जगणे
    निसर्गाचे चाले अविरत हेच खेळणे ।।७।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • ध्यान स्थिती

    ध्यान स्थिती

    जेव्हां मजला कळत होते, निद्रेत आहे मी

    जागृत स्थिती असूनी मनाची, शरीर होते निकामीं ।।

    निद्रेमधल्या स्थितीत जाता, जाग न राही तेथे

    जागेपण आणि निद्रा दोन्हीं, एकत्र न येते ।।

    निद्रावस्था नि जागेपणा, याहून दुजे कोणते ?

    ध्यान स्थिति ही आगळी असूनी, मध्य बिंदू साधते ।।

    देह मनाला विश्रांती देई, ध्यान अवस्था ही

    ध्यानामधली ऊर्जा सारी, ईश्वरार्पण होई ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • रसिक श्रेष्ठ

    कवि होणें सुलभ असावे रसिक होण्यापरि

    जिवंत ठेविती कवितेला हीच मंडळी खरी

    भावनेचे उठतां वादळ व्यक्त होई शब्दानीं

    भाव शब्दांचा हार दिसतो काव्य ते बनूनी

    भाव येणे सहज गुण तो मानवी मनाचा

    परि बंदिस्त त्याला करणे खेळ हा कवीचा

    शब्द पिंजरा नि भाव पक्षी ओळखी को रसिक

    कवि मनाशीं 'स्व' भावांचे करी जुळवणूक

    कविते वरली टीका टिपणी मूल्यमापन त्याचे

    खरी चेतना रसिक असूनी भाव जागवी मनाचे

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • आस…

    ओळीने चालल्या
    बगळ्यांच्या रांगा
    हा निरोप अमुचा
    त्या ढगांना सांगा

    तहान लागली
    धरतीच्या लेका
    थेंब पावसाचे
    जमिनीत टाका

    पुरे झाली आता
    दुष्काळाची सजा
    पाषाणहृदयी तू
    होऊ नको राजा

    झाडांना दे पाणी
    जनावरांना चारा
    धान्याची बरकत
    जीवांना निवारा
    ओळीने चालल्या...

    -- © विठ्ठल जाधव
    शिरूरकासार (बीड)
    सं. ९४२१४४२९९५

  • प्रदूषण (९)- कैन्सर ट्रेन

    शेतात टाकले
    विषाक्त रसायने
    तिकीट कैंसर ट्रेनचे
    एडवान्स काढले.

    टीप : रोज बठिंडा पंजाब येथून एक ट्रेन बीकानेर, राजस्थानला जाते. त्या ट्रेनचे नावच लोकांनी कैंसर ट्रेन ठेवले आहे. या ट्रेन मध्ये कैंसरग्रस्त शेतकरीच असतात.बीकानेर येथे कैंसरचे मोठे हॉस्पिटल आहे. आता बठिंडायेथे हि कैंसर हॉस्पिटल निर्माणाधीन आहे.

  • गुरुबोध मात्र विसरू नकोस….

    रोज थोडे तरी कार्य
    केल्यावाचून राहू नकोस,
    ब्रह्यांडनायक पहातायेत तुला
    गुरूबोध मात्र विसरु नकोस....

    तुझ्या वाटेत आडवे खूप येतीलही...
    पायात पाय घालून पाडवतीलही....
    घाबरून त्यांना तू तुझं
    उभे राहणं सोडू नकोस..
    सद्गुरू पहातायेत तुला
    गुरूबोध मात्र विसरू नकोस

    तुझं कौतुक प्रत्येकाला इथं
    रुचेलच असं नाही...
    कौतुकासाठी तुझं नाव
    सुचेलच असंही नाही...
    तू मात्र इतरांचं कौतुक
    करण्यास कधी कचरु नकोस...
    सद्गुरु पाहातायेत तुला
    गुरूबोध मात्र विसरू नकोस

    तुला सुद्धा मन आहे
    माहीत आहे सद्गुरूला.....
    पण ब्रह्मांडाचा स्वामी असताना काय रे कमी तुला....
    इतरांना भरभरून देणं
    मात्र कधी सोडू नकोस ...
    सद्गुरू पाहातायेत तुला
    गुरूबोध मात्र विसरू नकोस

    रडावंसं वाटत तेव्हा
    रडून सरळ मोकळा हो...
    कार्यासाठी लढावंसं वाटत तेव्हा,
    लढून ही मोकळा हो....
    रडण्यामध्ये मात्र तुझे
    कार्य कधी विसरू नकोस
    सद्गुरू पाहातायेत तुला
    गुरूबोध मात्र विसरू नकोस

    तुझ्या कार्याचे पुरावे
    कोणाला द्यायची गरज नाही...
    कुणासाठी तुला कार्य
    सोडायचीही गरज नाही....
    सद्गुरू संकल्पासाठी पुढे
    चालणं सोडू नकोस..
    सद्गुरू पाहातायेत तुला
    गुरूबोध मात्र विसरू नकोस

  • गृहनिर्माण संस्था आणि भांडवल उभारणी

    सहकारी संस्थांना आपली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. तर गृहनिर्माण संस्थां कशाप्रकारे भांडवल उभारणी करू शकतात हे आपण आज या लेखातून समजून घेणार आहोत.