जेव्हा दुजाचे नुकसान होते, उत्सुक दिसे कुणी
स्वभावाची ही विकृती जाणता, खंत वाटली मनी
बागेमध्ये फिरत असता, फूल तोडतो अकारण
सुगंध त्याचा क्षणीक घेवूनी, देतो ते फेकून
हाती देता सुंदर खेळणी, तोड मोड करिते
लहान बालक खेळण्यापेक्षा, तोडण्यात दंग होते
लय पावणे प्रतिक शिवाचे, ईश्वरी असतो गुण
‘नष्ट करणे’ निसर्ग स्वभाव, हे घ्या तुम्ही जाणून.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
नाकासमोर हात ठेवा, लागेल तुम्हां गरम हवा ।
थंड हवा आत जाते, गरम होवून बाहेर येते ।।१।।
अन्न पाणी घेतो आपण, ऊर्जा निघते त्याच्यातून ।
भात्यापरि फुगते छाती, हवा आत खेचूनी घेती ।।२।।
आतल्या ज्वलनास मदत होते, उष्णता त्यातून बाहेर पडते ।
भावना जेव्हां जागृत होती, रोमरोमी पुलकित होते ।।३।।
अवयवे सारी स्फूरुनी जाती, देहामधूनी विज चमकती ।
धनको ऋणको विद्युत साठे, अलग अलग दिसती मोठे ।।४।।
विजातीय लिंग येता जवळी, परिणाम दिसे विजेचा त्यावेळी ।
प्रकाश आहे आपल्या देही, ज्ञानीजन तो सहज पाही ।।५।।
स्थिर करूनी चंचल मना, प्रकाश दिसेल हृदयी सर्वांना ।
उष्णता वीज प्रकाश शक्ती, निसर्गाची रूपे असती ।।६।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
मूल्य नाही कुणा,
तूं दिल्या वेळेचे,
गमावून टाकी,
जाणूनी फुकाचे ।।१।।
लागत नसते,
दाम वेळेसाठीं,
म्हणून दवडे,
अकारणा पोटीं ।।२।।
वस्तूचे मूल्य ते,
पैशांनीच ठरते,
परी वेळेची किंमत,
कुणा न समजते ।।३।।
वेडे आहोत सारे,
कसे होई मूल्य
वेळ जातां मग,
आयुष्य जाईल ।।४।।
आयुष्य खर्चणे,
हेच वेळेचे मुल्य ठरते,
जीवनांतील यश,
त्यावरुन कळते ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
मूर्तिमंत वाटे देवी लक्ष्मी प्रेमळ स्वरूप माझे आई
धन्य जहलो जन्म मिळूनी उदरामाजी तुझिया ठायी
प्रेमाचा तो सागर देखिला तुझ्याच ह्रदयाजवळी जावूनी
निकटपणाचा आनंद घेत नऊ मास मी उदरी राहुनी
दुग्धामृत पाजून मजला वाढवी अंकुर काळजीने
घास भरवण्या काढून ठेवी उपाशी राहून आनंदाने
निद्रा न लागे तुजला तेंव्हा आजारी जेंव्हा मी पडलो
पाणी दिसले तुझ्या नयनी दु:खाने जेंव्हा हळहळलो
अनंत ऋणे करुनी ठेवसी तुच माझ्या शिरावरी अशक्य आहे तेच फेडणे ह्याच जन्मी तरी
मात्रत्वाचे ऋण फेडण्या असे वाटते, माताच व्हावे
पुनर्जन्मी त्नू पुत्र होऊनी सेवा करण्या मजला मिळावे.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
नाचत होत्या दोन बाहुल्या, इकडून तिकडे ।
टकमक पाहात हांसत होत्या, चोहीकडे ।।१।।
झीम्मा खेळे, फुगडी खेळे, गरगर फिरती ।
हातवारे करुन त्या, माना डोलावती ।।२।।
जवळ येवून गुजगोष्टी, सांगे एकमेकींना ।
सासू नणंद यांच्या, कुलंगड्या काढतांना ।।३।।
सुख दुःखाच्या कथा, सांगितल्या त्यांनीं ।
कांहीतरी करुन दाखवूं, वदल्या दोघीजणी ।।४।।
अज्ञानी गरीब बिचाऱ्या, जेंव्हा संकल्प करती ।
कळसूत्री बाहुल्या त्या, दोर इतरां हातीं ।।५।।
डॉ.भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
झरा वाहतो पाषाणातून, भोवती सारे खडक,
निसर्गाच्या सान्निध्यात,
झरणे त्याचे बेधडक,
निर्धास्त तो उगमापासून,
चोखाळत आपली वाट,
निखळ निर्मळ निरामय,---
सारखा पुढे पुढे धावत,--!!!
भीती ना कुठली अंतरात,
सहजी अगदी नाचत उडत कठीण त्या दगडांमधून,
उत्फुल्ल होऊन मार्ग काढत,
रेषा बिंदूंच्या साऱ्या रेखित, मार्गक्रमण करत ठराविक,
तुषार कुठले मोती ठरत,
शुभ्र पांढरे आणि सफेत,
झुळुझुळु सारखा आवाज करत, गात आपुली जीवनधून,--!!!
वृक्षवल्लीला चैतन्य देत, कर्तव्याचा मार्ग अंगीकारत,
ना कुठला ताणतणाव,
संताप, विषाद अनावृत्त,
निधान त्याचे फक्त आनंद दुसऱ्याला जगवत जगवत,
सदैव चैतन्याचे उधाण,
न अचेतनाची ओढ,
वाहातच सारा जन्म,
आपल्या धुंदीत केवळ मस्तीत--!!
© हिमगौरी कर्वे.
शब्द हसवतात शब्द रडवतात ....
शब्द शब्दांची सांगड घालत
मनात रूजंवतात नवं कोर वाक्य !
शब्द तारतात शब्द मारतात
शब्दच तलावरीचे घाव होऊन
मन घायाळ करतात ....!
शब्द अन् शब्दाचा समजून
घेण्याचा भाव बदलला की
शब्दच रूसून छळू पहातात ....!
शब्द आतड्यांत उकीरडयाचे
भक्ष विनतो शब्द शब्दांची
रानफुल होऊन मृगजळ बनतो !
शब्द कोवळे घन थरारतो
थवे होऊन पक्षाचे उंच डोंगरावर
संध्येच्या प्रहरी गंधारतो !
शब्द निद्रेमधले गीत होतो
शब्द माझ्या कवितेचे प्रित होतो
शब्द करुणाघन होऊन शिळ
घालत क्षितीजाच्या संग
शुभ्र रत्न होऊन कोकिळाच्या
कंठातले मधुर सूर होतो .......
© कोमल मानकर , सिंदी रेल्वे . वर्धा
9011071641
जराशी फुंकर जखमेवरली
जराशाने मिळे दिलासा
कुणीतरी हवेच असली
बेगडी तर सहवास नकोसा
नाती अपुली जमा करावी
धन दौलतिची चिंता कशाला
जिवाभावाची मैत्र जुळावी
स्वार्थ विचारही नको वाऱ्याला
प्रेम भुकेली आहेत सारी
जिव्हाळ्याचे सूर जीवाला
ऐकून घ्यावे कधी श्रोत्यापरी
तेव्हढ्यानेही सुख मनाला
असोत कमी नि अधिक काही
कुणीही नाही पुर्ण जगाला
वाटून घेऊ जे जे ठायी
नेऊ आनंदे पूर्णत्वाला!!
-- वर्षा कदम.
कृष्ण कमळ-
..
रक्तातुनी गुण-दोष उतरतो,
वंश परंपरेने,
व्यक्तीतील स्वभाव धर्म,
जाणता येतो रक्ताने ।।१।।
मनांतील विचार मालिका,
कृत्य करण्या लाविती,
सभोवतालच्या परिस्थिती रूपे,
रक्ताला जागविती ।।२।।
कर्म फळाच्या लहरींना,
रक्त शोषून घेई,
याच गुणमिश्रीत रक्तामधूनी,
बीजे उत्पन्न होई ।।३।।
बीजांचे मग रोपण होऊनी,
नव जीवन येते,
स्वभाव गुणांची मालिका,
अशीच पुढे जाते ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti