-- स्वाती ठोंबरे.
मी एक चित्र काढले होते माझ्या भविष्याचे...
त्यात रंग ही भरणार होतो मनासारखे...
पण ते चित्र नियतीने फाडले...
मग मी चित्रच काढणे सोडले...
रंग सारे माझ्यासाठी बेरंग झाले...
आता फाटलेले चित्र जोडायचे आहे...
पण कोणाला ? ज्यांनी ते फाडले आहे...
आता ते चित्र जोडून काय कामाचे...
ते चित्रही आता भूतकाळ झाले आहे...
माझ्या भविष्याचे चित्र आता फक्त तिच्या हातात आहे ...
कवी - निलेश बामणे
प्रभूची लीला न्यारी विश्वाचा तो खेळ करी
कुणी न जाणले तयापरी हीच त्याची महिमा ।।१।।
जवळ असूनी दूर ठेवितो आलिंगुनी पर भासवितो
विचित्र त्याचा खेळ चालतो कोणी न समजे त्यासी ।।२।।
मोठे मोठे विद्वान त्यांत कांहीं संतजन
अध्यात्म्याचे ज्ञान घेऊन विश्लेषन करिती प्रभूचे ।।३।।
कांहीं असती नास्तिक कांही असती आस्तिक
त्यांत कांही ज्ञानी मस्तक चर्चा करिती प्रभूची ।।४।।
सत्य परिस्थीती ऐसी कुणी न जाणले प्रभूसी
सर्वांची चालना तर्कासी प्रभू अस्तित्वा विषयीं ।।५।।
फक्त एकमुखी वाच्यता असे ती सर्वता
महान शक्ति असता त्या ब्रह्मांडामध्यें ।।६।।
सर्वानी जाणले एक 'अपूर्व शक्ति' ह्याचा चालक
त्याच उर्जेचे हे प्रतीक सारे विश्वमंडल ।।७।।
कुणी नाहीं दुजा भाव समजोनी त्या शक्तीची ठेव
ज्ञान विज्ञान देती नाव निरनिराळे त्या शक्तिसी ।।८।।
कुणी म्हणती राम कुणी म्हणे रहीम
कुणी संबोधती गौतम येशू असे कुणाचा ।।९।।
परी तत्व नसे वेगळे नांवे होत निरनिराळे
सामान्यास ते न कळे हीच खरी शोकांतिका ।।१०।।
सारे जीवन निघून जाई परी त्या शक्तीचा बोध न होई
विश्लेषण करीत राही त्याच्या अस्तित्वाविषयी ।।११।।
जाणावी ती शक्ति रुप आकार त्यासी नसती
शक्ति समजोनी करावी भक्ति आदरभाव ठेवून ।।१२।।
मानवजन्म श्रेष्ठ ठरविला विशेष बुद्धी मिळून त्याला
विचार शक्ति उमजण्याला सर्वप्राण्यामध्ये ।।१३।।
बहूत झाले विद्वान कर्तव्याने मिळवी मान
मानव जातीची ती शान ह्या संसारी ।।१४।।
मार्ग निरनिराळे दाखवी सारे मिळती एक ध्येयी
सर्वार्पण त्या शक्ती होई ध्येय मिळतां जीवनाचे ।।१५।।
विचार करा मनाशी वैर आपले आपणाशी
नसते केंव्हां प्रभूशी हेच मूळ दुःखाचे ।।१६।।
वाद नसतो ध्येयापरी चर्चा असे मार्गापरी
हीच मानव निर्मिती खरी सर्व सुख दुःखाची ।।१७।।
तथा कथीत पंडित सामान्यात विद्वान होत
ज्ञान त्यांचे थोडेसे ज्यास्त बहूजनांपेक्षां ।।१८।।
वापरुन ज्ञान शक्ति सामान्यजनास वाकविती
आपले अस्तित्व स्थापती प्रभू शक्तिसी विसरुन ।।१९।।
तर्क शक्ति थोर आहे चा नाही करणार
नाहीं ला आहे म्हणणार ज्ञानाचा खेळ करुनी ।।२०।।
मार्गाचा करुनी भेद करीत राही वाद
जीवन करी बरबाद विसरुनी ध्येयासी ।।२१।।
ध्येय असे महान मार्ग हे साधन
साधनास साध्य समजून वाया जाई आयुष्य ।।२२।।
साध्य नका समजू साधनासी ठेवा विश्वास साध्यासी
कोणत्याही साधनाने गेल्यासी साधका प्राप्त होई साध्य ।।२३।।
निरनिराळ्या मार्गाचे प्रयोजन ज्ञान शक्ती वापरुन
स्व अस्तित्व ठेवण्या टिकवून केले असे ।।२४।।
आस्तित्वाची भावना मोठी प्रत्येक झगडतो त्यासाठीं
आयुष्य खर्ची त्या पोटी सकळजन ।।२५।।
न कळे त्यास देवपण भांडण्यांत जाई विसरुन
आयुष्य मातीमोल करुन टाकीत असे ।।२६।।
विसरुन जा सर्व भेद मिटवा वादविवाद
लहान मोठ्यांचा संवाद नष्ट करा त्वरीत ।।२७।।
सारेच आहे समान न कुणी मोठे न लहान
घ्या सारे समजून असती सारे मानवनिर्मित ।।२८।।
ज्ञात धर्म होत अनेक हे मानवनिर्मीत प्रतिक
सर्व मार्गाचे ध्येय एक न कळे अज्ञानामुळे ।।२९।।
मानव शक्ति तीच ईश्वर दुसरा नसे कोणी वर
आपणची देतो त्यासी आकार सगुण रुप देऊनी ।।३०।।
मानवता हाच धर्म खरा आपसातील भेद विसरा
प्रभू देई तयाना आसरा जीवन सुखी करण्या ।।३१।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
माझ्या बाबांच्या शुक्राणूतून
आलेली २३ गुणसूत्रं
माझ्या आअीच्या पक्व बीजांडातून
आलेली २३ गुणसूत्रं
मिळून झाला ४६ गुणसूत्रांचा
माझ्या गर्भपिंडाचा आराखडा …
त्यानंच ठरविलं माझं
रूपमत्व, व्यक्तीमत्व आणि बुध्दीमत्व
त्यानंच ठरविला माझा जीवनप्रवास
त्यानंच ठरविलं माझं जन्मनक्षत्र
नाडी, गण, योनी आणि जन्मरास
या गुणसूत्रांत …
नाही शनी, नाही मंगळ,
नाही राहू नाही केतू
कुणी नाही वक्री ...
कुणाची नाही दृष्टी वाकडी,
नाही साडेसाती,
नाही ग्रहांची पीडा किंवा कृपा
कशासाठी जाअू ज्योतिषीकडे?
निसर्गानंच लिहीली ...
माझी …… जन्मपत्रिका ...
-- गजानन वामनाचार्य, मुंबअी

आईची महती अनेक थोर कवींनी वर्णन केली आहे. ‘प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई’ – माधव जूलियन, ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ -यशवंत, ‘निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारखी धरी – भा. रा. तांबे किंवा ‘अंतरले पाय तुझे हाय हाय माते ।’ – केशवसुत. आई आपल्या मुलाची मायेने काळजी घेते. त्याला घास भरवते. लहानाचा मोठा करते. आजारपणात सेवा करते. आईमुळेच घराला घरपण येते. मुलाला घडवण्यात, त्याच्यावर चांगले संस्कार करण्यात आईचा वाटा फार मोठा असतो. चार-पाच दिवस जरी आई घरापासून दूर बाहेरगावी गेली तर घर सुने सुने होऊन जाते. आईच नसलेले घर तर अगदी पोरके होऊन जाते. इतके आईचे स्थान महत्त्वाचे आहे.
क्रियेला प्रतिक्रिया, ध्वनीला प्रतिध्वनी ।
तत्व ते सनातन, दिसे नित्य जीवनी ।। १
फेकतां जोराने, आदळे भिंतीवरी ।
प्रवास परतीचा, होई तुमचे उरीं ।। २
शिवी वा अपशब्द, दिले कुणासाठी ।
येऊनी धडकतील, तुमचेच पाठीं ।। ३
प्रेमाने बोलणे, सुंगध आणिते ।
आनंदी लहरी, मनां सुखावते ।। ४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
शीणसुस्ती महानिद्रा
क्षणात पळवी चहा,
प्रभाते तोंडधुवोनी,
घेता वाटे प्रसन्नता !!१!!
अर्धांगीनीहस्ते घेता,
निद्रा तात्काळ विरघळे,
पुन्हा स्नानांतरे घेता
अंगी चैतन्य सळसळे !!२!!
लिंबुयुक्ता विना दुग्धा
अरूची पित्त घालवी,
शर्करेविना घेता,
मधुमेह न गांजवी !!३!!
शितज्वर शिर:शुळा ,
खोकला नाक फुरफुरा,
गवतीपत्र अद्रकायुक्ता,
प्राशिता जाई सत्वरा !!४!!
भोजनपुर्व प्राशिता,
मंदाग्नी पित्तकारका,
घोटता घोटता वाढे,
टँनीन जहरकारका !!५!!
चहाविना आप्तस्नेह्यांचे,
स्वागतासी अपुर्णता,
यास्तव भूतलजन हे,
म्हणती त्यासी अमृता !!६!!
इति चहाभक्त विरचितम् चहास्तोत्रम्
चहाबाजप्रित्यर्थम् समर्पयामी !!७!!
आम्ही इंग्लिश मेडीयम करत चुका केल्या त्या चुकांवर चुका होता आहेत. त्या कधी थांबणार ? . विषय खूप गंभीर आहे. सर्वानीच गंभीर होऊन काहीतरी चांगला मार्ग काढायला हवा .
धागा धागा मिळून,
बांधले,खास घरटे,
फांदीचा आधार घेऊन,
उभ्या झाडास लटकवले,
एक चोंच करी किमया,
केवढी मोठी कारागिरी,
पिल्लांस सुरक्षित करण्यां,
माय बापाची चाले हेरगिरी,
घर मोठे प्रशस्त हवेशीर,
वारा चारी बाजूंनी वाहे,
निसर्ग सान्निध्यातले,
वाटते मोठे आरामशीर,
अंडी घालून ती उबवती,
वाट जन्माची पाहती,
कारागीरच ते नव्या उमेदी,
दार घरट्याचे असे बांधले,
सहजी कोणी उतरू नये,
पण साप नागांचा दहशतीने,
रक्षणास तत्पर दोन पाखरे,
चहूबाजूंनी घरट्याला चौकोनी,
असे जाळीदार नक्षी,
आखीवरेखीव जाळ्याला ,
केले कसे त्रिशंकूकृती ,
दुनिया सारी घरातच वसे,
संसार मांडला आगळा,
समर्थ नर मादी दोघे,
परंतु नशिबाचा खेळ वेगळा,--!
हिमगौरी कर्वे.©
देह मनातील, तफावत दिसून येते ।
चंचल असूनी मन सदैव, शरीर परि बदलत राहते...१,
चैतन्ययुक्त मन सदा, स्थिर न राहते केव्हांही ।
जन्मापासूनी मृत्यूपर्यंत भाग दौड ती चालत राही...२,
परिस्थितीच्या चौकटीमध्यें, विचारांचा दबाव राहतो ।
शरीराच्या सुदृढपणाचा, मनावरती परिणाम होतो...३,
दिसून येते केव्हां केव्हां, मन अतिशय उत्साही ।
परि शरीराचा अशक्तपणा, मनास त्याक्षणी साथ न देई....४
विचित्र होते वातावरण ते, जेव्हां मनास साथ ना मिळे ।
विचारांच्या चुका होऊनी, दु:खी होते जीवन सगळे...५
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti