(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • तू नावाचे तूफाsssन

    तू नावाचे तूफाsssन ,
    मी कसे पेलावे,---
    वाऱ्याचा अखंड स्त्रोत,
    सुसाटपणात वाहून जावे,---
    नुसता वारा कसला वादळच,
    त्यात भरकटत जावे,-?
    होत्याचे नव्हते करत,
    कितीदा तुला मी पेलावे,
    तू तर कोसळती उल्का,
    पतन किती जोरात तुझे,
    ओंजळ माझी चिमुकली,
    सांग कसे हाती धरावे,---!!!
    विलक्षण स्वैर प्रभावाने ,
    जिथे तिथे वागशी, --!!!
    तुझ्या चमकत्या हुशारीने,
    बरेच जण पडती फशी,
    बेधडक"" व्यक्तिमत्त्व असे,
    दिसते तुला खुलुनी,
    तुझ्या प्रेमळ सामंजस्याने,
    दुनिया सगळी जाई दिपूनी ,--!!!
    *कधी असा कधी तसा *,
    केव्हा मोठा, लहानही,
    सांभाळावे कसे सांग,
    चक्क" लहान बाळ कधीही,--!!!
    या परिपक्व बाल्यास ,
    किती "परोपरीने" समजवावे,
    होता तुझ्या भावनांचा उद्रेक, गडगडाटी ढगाला कसे आवरावे, हट्ट तुझ्यातील मुलांचे,
    सारखे किती पुरवावे,
    बसणे तुझे असे फुरंगटून*,
    किती वेळा समजून घ्यावे,--

    हिमगौरी कर्वे.©

  • रूपवती

    वाऱ्यावर झोके घेत,केस उडती धुंद हवेत
    क्रिडतात जणू पवणाशी ते बटांचे क्रीडादूत
    अदेत मद्य-मादकता लोचनात धुंद संकेत
    ते मधुर लालस्य अन हास्य काय करी अभिप्रेत
    उत्फुल देहावरी स्थिरावले अनामिक नेत्र
    व्याकुळ कधीचे, झाले तृप्त गात्र नि गात्र
    लेखणीतून परी कागदावर झिरपली प्रीत
    मजबुरीने अन राहिले गीत मात्र ओठात

    - महेश सूर्यवंशी
    ( पुणे,सासवड)

  • स्वप्न दोष

    भंग पावले पाहीजे स्वप्न माझे रातचे

    तोडणे स्वप्न श्रृंखला नसे मानवी हातचे ।।

    शिथिल गात्र बनती जाता निद्रेच्या आधीन

    उघडले जाते मग विचारांचे दालन ।।

    किती काळ भरारी घेई निश्चीत नसे कांही

    विचार चक्र थांबता स्वप्न दोष तो जाई ।।

    रात किड्यानो जागवा स्वप्नावस्थे मधूनी

    कुकुट कोकीळा येई मदतीसाठी धावूनी ।।

    वाऱ्याची थंड झुळुक पुलकीत देहा करी

    उषा राणीचे प्रयत्न यशस्वी सदैव ठरी ।।

    प्रयत्न करितो निसर्ग निद्रावस्था मोडण्याचा

    स्वप्नाचा दोष काढूनी निरोगी बनविण्याचा ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • नववधू

    नववधू
    नवासाज
    लालेलाल
    रंगी आज

    खुले रंग
    मेहंदीचा
    प्रेमभाव
    हा प्रीतीचा

    हाती चुडा
    भरला गं
    येई आता
    साजण गं

    सलज्जता
    वाढलीच
    हाती हात
    गुंफलीच

    गौरवर्णी
    हातावरी
    मेहंदिची
    नक्षी खरी

    जाई आता
    सासरला
    गुंती मन
    माहेराला

    मनातुनी
    बावरली
    सख्या भेटी
    आतुरली

    मालत्यांनी
    ओटी भरा
    लेक जाई
    तिच्या घरा

    सौ.माणिक शुरजोशी
    नाशिक

  • पाणी – कपात

     

  • चांदण्याना पण साथ हवी असते चंद्राची

    चांदण्याना पण साथ
    हवी असते चंद्राची,
    सरिता अंतिम सागरात
    हळुवार विलीन होते.
    मग स्त्रीला पण हवी
    असते गरज पुरुषाची..
    अपूर्ण आहे दोघे एकमेकांशिवाय,
    खरं स्त्रीत्वाचे अनेक नाजूक
    पैलू पुरुषाला खुणावतात..
    मग स्त्रीला पण खुणावत असतात
    पुरुषातील पुरुष सौंदर्य असतं, ते म्हणजे
    पुरुष जिगर, हिम्मत, पुरुष बाणा!
    अनादीअनंत काला पासून हे
    चक्र चालू आहे...
    ह्या भाव विभोरातून तो निलवर्णी सावळा
    कृष्ण पण सुटला नाही ..
    तर मग आपल्या सारख्या
    सामान्य लोकांनी ह्या विभोरात
    फक्त झोकून द्यायचं...
    ह्या जाणिवेत गुंतून जातो पुरुष,
    आणि स्त्री पण गुंतून जाते..
    भावना आणि मन नाजूक
    झालं की जाणिवा बद्ध होतात,
    गुंतलेल्या भावनांना सोडणं
    की धरण हे भाव विभोरावर असतं..
    पण सत्य हेच की गुंतल जातं
    त्याला मन म्हणतात..
    आणि भावना उत्कट होतात
    तेव्हा मन एकमेकांत जुळतात..
    स्त्री आणि पुरुष एकमेकांशिवाय
    अपूर्ण हे सत्य अंतिम ठरतं...
    मग त्या उत्कट भावनेत वाटा
    गंधाळल्या तर दोघेही बरोबर
    किंवा दोघेही चूक...
    एक भाव आणि एक मन
    ह्यांच हितगूज म्हणजे एक
    स्त्री मन आणि एक पुरुष भाव
    यांचं उत्कट गंधित मनोमिलन..
    -- स्वाती ठोंबरे.
  • चुकीचे तर्क

    मोठ-मोठ्याने आरडत ओरडत, स्वत:शीच बोलत होता
    विचार जरी गतिमान होते, विषय तोच तो घोळत होता.....१

    तऱ्हेवाईक बघूनी वागणे, खुळा त्याला समजत होते
    वेडेपणाचा प्रकार समजूनी, दुर्लक्ष्य त्याजकडे करीत होते...२

    वृक्षाखाली बसूनी एकटा, डोळे मिटूनी शांत दिसला
    त्याच विषयाचा विचार मनी, चक्र गतीने घोळू लागला...३

    बाह्यांगाची बघूनी शांतता, ज्ञानी त्यास समजू लागले
    मतप्रदर्शनी तर्क आधार, चुकीचे घेणारे ते ठरले...४

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • प्रेम नाणे

    तसेंच वागा इतरजणांशी,
    वाटत असते ,तुमच्या मनीं ।
    अपेक्षा करता प्रेमाची,
    सदैव इतरांकडूनी...१,

    सहानूभुतीचा शब्द लागतो,
    दैनंदिनीच्या जीवनीं ।
    क्षणा क्षणाला भासत असते,
    जीवन तुमचे अवलंबूनी...२,

    प्रेम वाटतां इतरांना,
    परत मिळते तेच तुम्हांला ।
    प्रेम नाण्याचे मूल्य जाणूनी
    चलनांत ठेवा हर घडीला...३,

    याच नाण्यांनीं काम बनते,
    चटकन सारे बघा कसे ।
    दोन मनें सांधली जाऊनी,
    आनंद सर्वत्र दिसत असे...४,

    राग लोभ हे शत्रू आपले,
    घालऊनी द्यावे तुम्ही त्यांना ।
    प्रेम नाण्याची मदत घेता,
    सहज जमेल हे सर्वांना...५,

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • दुष्काळ

    आला म्हणती तो काळ
    असा पडतो दुष्काळ ||धृ ||

    नसते पिण्यास पाणी
    नसते खाण्यास धान्य
    नसते रानात पळपळ
    नसते वनात सळसळ ||१||

    मरती भूकेली गुरंढोरं
    पडती आजारी पोरंसोरं
    होई जीवांची तळमळ
    रडते कडेवर ते बाळ ||२||

    मोकळी झालेली गव्हाण
    दु:ख धरतीचं आंदण
    होई ओसाड तो माळ
    राती भेटेना सकाळ ||३||

    कुठे घडतेय माळीण
    कुठे गुडूप किल्लारी
    कुठे तहानेने व्याकूळ
    होई उध्वस्थ गोकूळ ||४||

    असं माणसाचं जिण
    जरा रहावेस जपून
    माणसातील माणसा
    कर पशूपक्षी सांभाळ ||५||

    -- विठ्ठल जाधव
    शिरूरकासार, जि. बीड
    मो. ९४२१४४२९९५

  • गंभीर बनू नका

    फार गंभीर बनून जगू नका. हे विश्वकरोडों वर्षापासून आहे. कित्येक आले आणि गेले. कुणावाचून कुणाचे काही थांबत नाही. जे व्हायचे ते होत राहणार आहे. तुम्हाला विचारुन काही घडणार नाही.