ती अशीच
ती अशीच अचानक भेटली
तिचं नाव काय… गाव काय
काही काही माहित नव्हतं
कधी क्वचित मी खचून जाता
उंच भरारी घेते मी
टपकलेच जर अवचित अश्रू
नकळत त्यांना पुसते मी
थोपटते मी माझे मजला
गोंजारते मलाच मी
ऊर्मी माझ्या अंतरातल्या
नजाकतीने जपते मी
दुखता खुपता होता अगतिक
दु:ख झुगारुन देते मी
नव्या दमाने श्वास घेउनी
पुढे पुढे हो जाते मी
मीच असते तेव्हा माझी
भक्ति मी शक्तिही मी
माझ्या साठी माझी प्रेरणा
केवळ मी केवळ मी
बदलीत गेलो घरे मी माझी, आज पावतो कितीक तरी ।
पोटासाठीं नोकरी करतां, भटकत होतो आजवरी ।।
बालपण हे असेंच गेले, फिरता फिरता गावोगावी ।
वडिलांची नोकरी होती, धंदा करणे माहीत नाही ।।
पाऊलवाट तीच निवडली, मुलाने देखील जगण्यासाठी ।
तीन पिढ्या ह्या चालत राही, एका मागून एकापाठी ।।
गेले नाहीं आयुष्य सारे, स्थिर राहूनी एके जागी ।
देश वेळ आणि घरे निराळी, जगलो होतो विविध अंगी ।।
शरीर देखील असेच आहे, आत्म्याचे ते छोटे घरकुल ।
मिळवित असतां सत्व तेज ते, देह सोडूनी दूजात जाईल ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
|| हरी ॐ ||
वर्षानुवर्षे अग्रपूजेचा माझा मान,
त्याचे नाही कधी चुकले भान!
या वर्षी येताना मनात शंका नाना,
आनंदाने स्वागत होईल ना?
शेतकरी झाले होते अवर्षणाने हैराण,
पीक गेले हातचे शेत झाले वैराण!
माझ्याकडे विनंती आर्जव त्यांच्या मनात,
आगमनाने बरसूदे पाऊस आमच्या शेतात!
वरुणाला आज्ञा माझ्या बरोबर येण्या,
नकळत बरसला बेटा वेड्यावीण्या!
पल्लवल्या आशा मराठवाडा-विदर्भकरांच्या,
आला जीवात जीव थोडा सगळ्यांच्या!
आनंदाने नाचली माझी पोरं,
नद्या नाल्यांना आला मोठा पूर!
दीड दिवसाने आला दिवस पुनर्मिलाप
काहींचा नदी तलाव समुद्रात
काही कागदाच्या लागद्यांचे
घरच्याघरी आरामात!
पुनर्मिलापा दिवशी समुद्रावर जमले माझे भाऊबंध
आरतीत कोणाचेच नव्हते लक्ष!
आता आपले विसर्जन प्रदूषणयुक्त समुद्रात,
दुसरे ठिकाण नाही लक्षात आले वाटतं?
सुख दु:खाच्या गप्पागोष्टी जोरात,
एक म्हणाला मला आकारतांना पीओपी वापरतात !
किती आग होते माझ्या शरीराची
एवढे कमी म्हणून रासायनिक रंगाने रंगवतात !
एक दुसऱ्याला म्हणाला
त्याला आकारतांना मऊ कागदाचा लगदा
गोंद व्हायटिंग पावडर
आणि नैसर्गिक रंगांचा वापर !
शाडूचा म्हणाला हल्ली मला जास्त मागणी,
पण माती आता मिळणे कठीण, रंग झाले महाग,
वजनानेही मी जास्त वजनदार,
त्यामुळे वाढला कागदाच्या लगद्याचा डिमांड !
जगदीश पटवर्धन
अभिमान अम्हा देशाचा
विश्वास असे ज्ञानाचा,
तो क्षणही दूरवर नाही
नव उदय महासत्तेचा
आव्हान संकटे आली
ना मानली कधिही हार,
त्वेषात पेटुनी लढलो
उघडले कीर्तीचे दार
संघर्ष जरीही केला
पण हात पसरले नाही,
अडखळलो पडलो उठलो
परि इमान विकले नाही
बुद्धीच्या जोरावरती
श्रम जिद्द आणि शांतीने,
उत्तुंग भरारी घेता
यश आले आनंदाने
त्यागाची लावुनी ज्योत
आत्मनिर्भर भारत बनवू,
करोनि स्वदेशी जागर
हा महान भारत घडवू
ही हिंद संस्कृती मोठी
संदेश विश्वशांतीचा,
अन् फडकत अविरत ठेवू
तिरंगा स्वाभिमानाचा
- विजय जोशी
सारेच आहेत दुबळे
कुणाते नसे शक्ति
वेळ येतां दुर्बल ठरे
जे सबळ समजती ।।१।।
विचार मनी येतां
दुसरा शक्तिशाली
समजोनी जावे तेव्हां
हार तुमची झाली ।।२।।
मनाची सबलता
हेच शक्तीचे मापन
काय कामाचा देह
दुर्बल असतां मन ।।३।।
सुदृढ देह व मन
यांची मिळून जोडी
जीवनातील यश
तुमच्या पदरीं पाडी ।।४।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
सकाळच्या या प्रसन्न प्रहरी
सूर्यकिरण पसरले अंबरी ।।
उदर भरण करण्यासाठी
लगबग उडाली ही पक्ष्यांची ।।
कावळे, घारी, साळुंखी ही
पारवे, चिमण्या, बुलबुल संगती ।।
प्रत्येकाचा सूर निराळा
गाऊन सवंगड्या साद घालती ।।
पटकन आला थवा राव्यांचा
मंदिर शिखरी क्षणभर विसावला ।।
घाणेरीच्या झुडुपांमध्ये
क्षणात हा थवा मिसळून गेला ।।
मोबाईल हा गप्प बसेना
मग नजारा हा राव्यांचा ।।
छायाचित्रण करुनी तयांचा
आनंदाचा क्षण साठविला ।।
(रावा =पोपट)
-- मी सदाफुली
संध्या प्रकाश बापट
03/10/2019
[एकत्र चालत असूनही धरती आणि समुद्राचे कधीच मिलन होत नाही. खाऱ्या अश्रूंचा समुद्र प्रेमाचा गोड ओलावा आणणार तरी कुठून?]
मी अगदी साधा सामान्य माणूस. आम आदमी कुठच्याही बडेजावाला बुजणारा. आयुष्यातील कृत्रीमता, बेगडीपणा टाकणारा जरा वेगळाच प्राणी! जीवनाचा नैसर्गिक निखळ आनंद, आस्वाद घेण्याची स्वाभाविक ओढ.
Copyright © 2025 | Marathisrushti